07/03/2026
प्रमोद महाजन तेव्हा बोलले होते...जे होते चांगल्या साठी होते...
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते स्व.अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते
अन सरकार वर अविश्वास आला अटलजी चे सरकार १ मताने कोसळले होते...
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रचार सभेला प्रमोदजी यवतमाळ आझाद मैदानात यवतमाळ आले होते
तेव्हा त्यांनी सांगितले अटलजीच्या माघे मी होतो अटलजी च्या चेहऱ्यावर अजिबात दुःख नव्हते...
मी म्हणालो
जे होते चांगल्या साठी होते,देव करतो बरोबर करतो...
मग प्रमोद जी ने एक उदाहरण दिले
एक राजा होता त्याचा एक प्रधान होता अत्यन्त विश्वासू
त्याला सवय होती नेहमी तो म्हणायचा जे होते चांगल्या साठी होते...देव करतो बरोबर करतो...
एकदा राजा आपल्या तलवारीला धार लावत असतांना चुकून तलवार अंगठ्या वर चालली व अंगठा तुटला रक्त वाहू लागले
शेजारी प्रधान उभा होता तो नेहमी प्रमाणे म्हणाला जे होते भल्या साठी होते देव बरोबर करतो
राज्याला राग आला माझा अंगठा तुटला रक्त वाहत आहे आणि प्रधान हे काय बोलतो
म्हणून राज्याने आदेश दिले या प्रधानाला १ महिना तुरुंगात टाका...
प्रधानास तुरुंगात टाकले..
इकडे राज्याची जखम सुखली तो शिकारी ला गेला..
राजाचा घोडा वेगवान सुसाट जंगलात पुढे गेला
सैन्य पाठीमागे राहिले...
त्या घनदाट वनात पूजा चालली होती
त्या पूजेसाठी एक नर बळी द्यायचा होता
त्या ठिकाणी जो कोणी पहिला येईल प्राणी त्याचा बळी देण्याची प्रथा होती...
राजा त्या ठिकाणी आला
राजबिंडा बळी मिळाला म्हणून सर्व खुश त्यानी राजाला पकडले...
सर्व वस्त्र व अलंकार काढले पण एक पद्धत होती ती बळी देण्या पूर्वी त्यास अभ्यंग स्नान घालायचे
राजाला स्नान घालताना त्याचे अंगठा तुटलेला दिसला...
एक जण म्हंटला हा पूर्ण नर नाही...तेव्हा राजाला सोडून दिले
वस्त्र अलंकार घालून राजा परतला...
आता राजाला प्रधानाचे शब्द आठवले
जे होते भल्यासाठी,देव करतो...
राजा परत आला अन प्रधानाला कैदेतून मुक्त केले
अन म्हणाला तू बरोबर बोलला आज माझा अंगठा शाबीत असता तर माझा बळी गेला असता..
पण प्रधाना मला एक सांग माझा जीव वाचला पण तुझे काय भले झाले
प्रधान हसून म्हणाला
राजे तुमच्या घोड्या सोबत माझा घोडा वेगात सोबत असता तेव्हा तुम्हाला सोडले असते अन माझा बळी देण्यात आला असता...
म्हणून म्हणतो देव बरोबर करतो,देव भले करतो...
एका मताने सरकार पडले पण पुन्हा अटलजी चे सरकार आले अन आज सतत १० वर्ष भाजप चे सरकार आहे.
त्या भाषणाची आठवण आज होते...!
कोणाचे राजकिय मते भिन्न असू शकतात
पण स्व.शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,प्रमोद जी महाजन,स्व.गोपीनाथ मुंडे,स्व.विलासराव देशमुख, स्व.आर आर आबा यांच्या भाषण शैलीला जोड नव्हती..!
प्रमोद कुदळे
(आठवनी च्या हिंदोळ्या वरून)