Nagorao Panchal fc

Nagorao Panchal fc प्रा. नागोराव पांचाळ सरांचे फॅन पेज
प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
अध्यक्ष ओबीसी ब्रिगेड व VVSS

एकटा ओबीसीच लढतो आहे-        दलित+आदिवासींचे आरक्षण व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी                       ओबीसी-मराठा सं...
23/07/2024

एकटा ओबीसीच लढतो आहे-
दलित+आदिवासींचे आरक्षण व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी

ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः लेखांक-10
ओबीसीनामा-31. लेखकः-प्रा.श्रावण देवरे

जरांगेचं भोकांड (प्रकरण-3)
मराठा जातीच्या आरक्षणाची वांझोटी वाट कुठे कुठे अडली व कितीदा अडली हे आपण यापूर्वी अनेक लेखांमधून पाहिले आहे. अनेक संवैधानिक मार्गाने प्रयत्न करूनही जर एखाद्या जातीला आरक्षण मिळतच नसेल तर ती जात नंतरच्या काळात आरक्षणाचा विषय सोडून देते व आपल्या विकासाचे इतर मार्ग शोधून पुढच्या कामाला लागते. जाट, पटेल, गुज्जर अशा काही क्षत्रिय म्हणविणार्‍या जमीनदार-सत्ताधारी जातींनी आरक्षणासाठी देशभर धिंगाणा घातला. एक-एक महिना रेल्वे रोको, रस्ता रोको, मोर्चे, धरणे असे सर्व प्रयत्न करूनही त्यांना आरक्षण मिळत नाही, असे लक्षात आल्यावर जाट, पटेल, गुज्जर या जाती नंतरच्या काळात 10 टक्के EWS आरक्षणावर समाधान मानून गुण्या गोविंदाने व शांततेचे जीवन जगत आहेत.

परंतू देशातील मराठा ही अशी एकमेव जात आहे की जी आरक्षणासाठी पिसाळल्यासारखी सतत चेकाळात असते व वारंवार ओबीसींच्या ताटात तोंड घालून भाकरी पळविण्याचा प्रयत्न करीत असते. 10 राज्य मागास आयोगांनी व सुप्रिम कोर्टानेही अनेक वेळा ‘हाड् हाड्’ करूनही हे पिसाळलेपण थांबता थांबत नाही.

एका घरात एक लाडावलेलं बाळ असतं. शेजारच्या घरातील बाळाकडे एखादं नवं खेळणं बघीतल्यावर ते चेकाळतं आणी आपल्या घरी जाऊन ‘तेच खेळणे’ पाहिजे म्हणून हट्ट धरतं. लाडावलेल्या बाळाला दुसरे एखादे खेळणं देऊन शांत करण्याचा प्रयत्न घरातील जबाबदार पालक करीत असतो. परंतू शेजारच्या घरातीलच खेळणे पाहिजे असा हट्ट धरीत लाडावलेल्या कार्ट्याचा रडण्याचा आवाज वाढतच जातो. 'वाह्यात हट्टापायी जमीनीवर बसून जोरजोराने हातपाय आपटून मोठ-मोठ्याने रडणे-केकाटणे व आख्खा गाव गोळा करणे' याला खान्देशी भाषेत ‘भोकांड’ पसरविणे असे म्हणतात. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असं भोकांड पसरविणार्‍या जरांगेला केंद्र सरकारने 10 टक्के ‘EWS’ आरक्षण दिलं तरी त्याचं भोकांड थांबत नाही. राज्य सरकारने 10 टक्के वेगळं SEBC आरक्षण दिलं, तरी त्याच्या भोकांडाचा आवाज कमी होत नाही.

लहानपणी आम्हीही असंच भोकांड पसरवत होतो. ‘पाहिजे म्हणजे पाहिजेच’ असा हट्ट धरला होता व त्यासाठी आम्ही भोकांड पसरवलं होतं. आमच्या भोकांडाचा आवाज ऐकूण गल्लीतले पोरं येऊन टिंगल-टवाळी करीत असत. पण आमचं भोकांड सूरूच! सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की आमचे वडिल जवळ यायचे व माझ्या कानाखाली जोरदार आवाज काढायचे. क्षणात भोकांड बंद होत असे. वडिल घरी नसतांना एकदा आईने दोन्ही हात बांधून खूंटीला टांगून ठेवलं होते. पालक जर जबाबदार असतील तर ते लाडावलेल्या कार्ट्याला एका क्षणात वठणीवर कसं आणतात, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.

पालकाच्या भुमीकेत असलेले राज्य सरकार जरांगेच्या भोकांडाला एका क्षणात बंद करू शकते. परंतू पालकच बेजबाबदार असतील व जातीसाठी माती खाणारे असतील तर ते जरांगेच्या भोकांडाला डी.जे.चा भोंगा लावून आख्या महाराष्ट्रात भेंडी बाजार भरवणार. जरांगेच्या भोकांडाने आख्खा महाराष्ट्र भेंडी बाजार बनवला गेला आहे. कारण त्याच्या पाठीशी सर्व पक्षीय सत्ताधारी मराठा जात आहे. जरांगेचं भोकांड ओबीसीच बंद करू शकतो, कारण ओबीसी वगळता इतर सर्व जाती जरांगेच्या दहशतीपुढे शरण गेलेल्या आहेत.

सत्ताधारी जातींविरोधात लढण्याची परंपरा फुले-आंबेडकर शिकवितात, पण फुले-आंबेडकरांचे आजचे वारसदार जरांगेच्या पायाशी लोळण घेत आहेत. सत्ताधारी शोषक वर्गांविरोधात 'वर्ग-युद्ध' लढण्याची शिकवण मार्क्स देतो, परंतू आजचे कम्युनिस्ट वारसदार जरांगेला पाठींबा देऊन पांढरे निशाण फडकावीत आहेत. सत्यशोधक कम्युनिस्टवाले म्हणतातः ‘मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे बौद्धक्रांती, फुलेआंबेडकरवादी-क्रांती, मार्क्सवादीक्रांती अशा सर्व जागतिक क्रांत्या एका रात्रीतून घडणार आहेत’. समाजवादी तर मुळातच भीत्री-भागूबाई! त्यांच्याबद्दल न बोललेच बरे!

महाराष्ट्रातील सर्व दिग्गज पुरोगामी नेते, फुलेआंबेडकरवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष मराठा दहशतीला घाबरुन बिळात लपून बसलेले आहेत. अशा हिंसक जीवघेण्या संघर्षात एकटा ओबीसी समाज सीना तानके सत्ताधारी शोषक मराठा जातीविरुद्ध लढतो आहे.

ओबीसी समाज केवळ ओबीसी आरक्षणासाठी लढत नाही, तर तो दलित+आदिवासींचं आरक्षण वाचविण्यासाठीही लढतो आहे आहे. सगे-सोयरे शब्दामुळे सर्वच दलित+आदिवासी+ओबीसींचं आरक्षण धोक्यात आहे. पण एक पळपुटा दलित नेता सरकारला सांगतो- ‘‘सगे-सोयरेमधून आमच्या जातीला वगळा व एकट्या ओबीसींना फासावर लटकवा’’, अशी विनंती करून स्वतःची मान वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न हा दलित नेता करीत आहे. याला आंबेडकरवादाशी गद्दारी म्हणतात. ओबीसी विनंती करीत नाहीत, गद्दारीही करीत नाहीत व केविलवाणेही होत नाहीत, ओबीसी केवळ आक्रमक आंदोलन करून दलित+आदिवासी+ओबीसींचं आरक्षण वाचविण्यासाठी लढतो आहे.

ब्रिटीश भारतात राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय मुस्लिम नेते बॅरिस्टर जीना व तत्कालीन अस्पृश्यांचे नेतृत्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची युती झाली होती. महात्मा गांधींनी बॅरिस्टर जीना यांना 'बाबासाहेबांशी युती करु नका, आम्ही तुम्हाला तुमच्या मागण्यांसाठी पाठिंबा देऊ', असे अमिष दाखविले. परंतू कोणत्याही अमिषाला बळी न पडता बॅरिस्टर जीना यांनी बाबासाहेबांशी केलेली दोस्ती सोडली नाही. बाबासाहेबांना साथ देणारे बॅरिस्टर जीना, बेघर झालेल्या तात्यासाहेब महात्मा फुलेंना घर देणारे उस्मान शेख व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांशी युती करणारे MIM चे बॅरिस्टर ओवेशी! खरंच वैचारिक प्रमाणिकता व मित्रांशी एकनिष्ठता शिकावी ती फक्त मुसलमानांकडूनच! बाकी आपले सगळे नेते म्हणजे विश्वासघातकीच! स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेजाऱ्याला कधी फांसी देऊन मोकळे होतील, याचा भरवसा नाही'!

सत्ताधारी शोषक मराठा जातीविरोधात लढण्याचे सर्व लोकशाहीवादी मार्ग ओबीसींनी वापरलेत, परंतू तरीही अ-लोकशाही मार्गाने सत्ता बळकावणार्‍या मराठा समाजाचे भोकांड थांबता थांबत नाही. हे भोकांड थांबवायचे असेल व महाराष्ट्रात कायमस्वरूपी शांतता निर्माण करायची असेल तर हे काम फक्त आणी फक्त ओबीसीच करू शकतो. परंतू त्यासाठी केवळ रस्त्यावरची आंदोलने करून चालणार नाही. सभा, महासभा, धरणे आंदोलने, रोड शो वगैरे करून भागणार नाही. केवळ धरणे आंदोलन केलं आणी जरांगेने 57 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळवू दिलीत, हे सत्य नाही. जरांगेची जात सत्ताधारी आहे म्हणून ‘तो जे मागतो, ते त्याला लगेच मिळते.’

ओबीसींनाही आपले आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र बाण्याचे आक्रमक व वैचारिक लेव्हल असलेले आमदार तुम्हाला निवडून आणावे लागतील. कॉंग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा व दोन्ही शिवसेना या प्रस्थापित पक्षातील ओबीसी आमदार-मंत्री तुमचे ओबीसी आरक्षण वाचवू शकत नाहीत. कारण हे प्रस्थापित पक्ष एकतर मराठा जातीच्या मालकीचे आहेत, किंवा ब्राह्मण जातीच्या मालकीचे आहेत. जे पक्ष फुलेआंबेडकरवादी असल्याचा दावा करतात, ते पक्षही भाजपची B-Team म्हणून काम करीत आहेत, हे त्यांनीच ‘सगे-सोयरे’ शब्दावर घेतलेल्या भुमिकेवरून त्यांनीच सिद्ध केलेले आहे. त्यामुळे भाजपाची बी टीम बनलेले फुले आंबेडकरवादी पक्ष ओबीसींना केव्हा दगा देतील याचा भरोसा नाही.

ओबीसी मतांसाठी काही पक्ष नवटंकी करीत आहेत. जरांगेला पाठींबा देणारे नेते अचानक ओबीसी उपोषणालाही भेट देतात. सगे सोयरे शब्द फक्त ओबीसींनाच लागू करा व ओबीसी आरक्षण नष्ट करा, असे सांगणारे नेते अचानक दुसर्‍या दिवशी ओबीसी यात्रा काढतात. अशा नवटंकीला ओबीसींनी भुलू नये! ओबीसींची दिशाभूल करण्यात काही ओबीसी विद्वानही प्रयत्न करीत आहेत. केवळ एखाद्या फुलेआंबेडकरवादी पक्षाचे तिकीट मिळावे, एवढ्या एका क्षुल्लक स्वार्थापोटी हे विद्वान आपल्याच ओबीसी चळवळीसोबत गद्दारी करतात. ओबीसींशी गद्दारी केल्यावरही त्यांना हे फुलेआंबेडकरवादी पक्ष तिकीट देतात का?

महाराष्ट्रात एका फुलेआंबेडकरवादी पक्षाने मतदारसंघनिहाय रेटबोर्ड तयार केलेला आहे. आमचा एक ओबीसी विद्वान गोंदिया-भंडारा मतदारसंघाचे तिकीट मागायला गेला, तेव्हा त्याला पक्षाचे रेटकार्ड दाखविण्यात आले. या रेटकार्डप्रमाणे गोंदिया-भंडारा मतदारसंघाच्या तिकीटाचा दर दोन कोटी रूपये होता. अशा पक्षांना तुम्ही फुलेआंबेडकरवादी पक्ष म्हणत असाल तर तुम्हाला खड्ड्यात घालण्यासाठी मराठा-ब्राह्मणांची गरजच नाही. एक नकली फुलेआंबेडकरवादी (B-Team) नेता तुम्हा ओबीसींना खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसा आहे!

केवळ मराठा-ब्राह्मणांच्या मालकीचेच पक्ष तुमचे शत्रू नाहीत तर, स्वतःला फुलेआंबेडकरवादी म्हणविणारे नेते व त्यांच्या खाजगी मालकीचे पक्षही ओबीसींचे वाटोळे करायला निघालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘दुसर्‍यांच्या महालापेक्षा आपली झोपडी केव्हाही चांगली!’ ओबीसींना स्वाभिमानी राजकारण करायचे असेल तर तामीळनाडूप्रमाणे आपला स्वतःचा ओबीसी पक्ष स्थापन करावा लागेल. दुसर्‍यांच्या पक्षात तुम्हाला काडीईतकीही किंमत नाही, हे बळीराम सिरसकर, मखराम पवार, उपरे काका, भदे, खडसे, भुजबळ, मुंडे आदी असंख्य ओबीसी नेत्यांच्या उदाहरणांवरून सिद्ध झालेले आहे.

स्वतंत्र ओबीसी पक्ष, स्वाभिमानी राजकारण व संवैधानिक मार्गाने सत्ताप्राप्ती हे तीन मूलमंत्र लक्षात घेऊन ओबीसींना काम करावे लागणार आहे. आजच्या घडीला ओबीसींसमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांची चर्चा आपण पुढील आठव्या पर्वात करू या! तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः [email protected]

*महत्वाची सूचनाः 1) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, प्रकरण-3 लेखांक-10, दैनिक बहुजन सौरभच्या 23 जुलै 2024 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
*2) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, लेखांक-10, या लेखाची pdf file ची लिंक पुढीलप्रमाणे- https://drive.google.com/file/d/1ekVtpynL2_k11t25UudVw69wdWdH7GdK/view?usp=drive_link

हाके+वाघमारे+ससाणे यांच्या उपोषण आंदोलनाचे फलित ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-9  ओबीसीनामा-30     लेखकः   -प्रा....
19/07/2024

हाके+वाघमारे+ससाणे यांच्या उपोषण आंदोलनाचे फलित

ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-9

ओबीसीनामा-30 लेखकः -प्रा. श्रावण देवरे
(प्रकरण-2)
प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे व ऍड. मंगेश ससाणे या नवतरूणांच्या उपोषणाचे पहिले फलित हे आहे की, हे उपोषण अंतरवली सराटीत असलेल्या वडीगोद्री गावात आयोजित केल्याने लोकशाही मार्गाने ‘‘घर मे घुस के मारा’’ असा मेसेज जनतेत गेला व जरांगे बॅकफूटवर गेला. दुसरे फलित हे आहे की जरांगेला धनगर आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी जावे लागले. प्रा. लक्ष्मणराव हाके हे धनगर आहेत म्हणून धनगर समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी व फूट पाडण्यासाठी जरांगे तेथे गेला. धनगरांमध्ये फुट पाडण्याचा शकूनी कावा जरांगेला करावा लागला. परंतू समस्त धनगर तरूण इतर ओबीसी तरूणांप्रमाणेच हाके, वाघमारे व ससाणेंच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा आहे, हे नंतरच्या अभिवादन दौर्‍यावरून सिद्ध झाले व जरांगेचे षडयंत्र उघडे पाडले.

धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या तरूणांनी जरांगेचा बामणी-कावा ओळखून त्याला लाथ मारून हाकलून लावले पाहिजे होते. परंतू बामणांच्या सांगण्यावरून धारदार शस्त्रांनी मारायला आलेल्या धोंडीबा कुंभाराला तात्यासाहेब महात्मा फुलेंनी शिक्षण देऊन महापंडित बनविले, ही आमची ओबीसींची महान संस्कृती! गावबंदीचे बोर्ड लावून बाहेरून येणार्‍या पाहुण्यांना हाकलून लावणारी संस्कारहीन मराठा जात कुठे आणी ओबीसी आरक्षणच खतम करायला निघालेल्या कावेबाज जरांगेचं स्वागत करणारे धनगर उपोषणाकर्ते कुठे? जरांगेच्या बापाच्या वयाच्या भुजबळसाहेबांना शिव्या देणारा जरांगे संस्कारहीन व उनाडटप्पू म्हटला पाहिजे. धनगर उपोषणकर्त्यांच्या पायाशी बसण्याची लायकी नसलेल्या जरांगेला उशासी बसवले, हा आमच्या कार्यकर्त्यांचा मोठेपणा होय!!

सर्वात महत्वाचे फलित हे आहे की, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच ओबीसी उपोषण कार्यक्रमास भेट देण्यासाठी गेलेत. या पूर्वी आम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी आझाद मैदानावर दोन मोर्चे व दोन धरणे आंदोलने केलीत. बाळासाहेब आंबेडकर यांना एकदा प्रमुख पाहुणे म्हणून व एकदा उद्घाटक म्हणून सन्मानाने निमंत्रित केले होते. प्रकाश आंबेडकर आजपर्यंत ओबीसींनी आयोजित केलेल्या एकाही आंदोलनात उपस्थित राहीलेले नाहीत. निवडणूकीच्या तोंडावर असलेल्या 2-3 सभांना ते ओबीसी मतांसाठी गेलेत, हा अपवाद आहे. अर्थात अशा निवडणूक-पूर्व सभांना ब्राह्मण-मराठा नेतेही निमंत्रण नसतांना बळजबरी स्टेजवर जाऊन बसतात, हा आमचा अनुभव आहे. जरांगेच्या उपोषणाला सडेतोड उत्तर म्हणून त्याचवेळी चंद्रपूरात ओबीसी नेते रविंद्र टोंगे उपोषणाला बसले होते. जरांगेच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर रविन्द्र टोंगेंच्या उपोषणाला भेट द्यायला जातील अशी आमची भाबडी आशा होती. परंतू ओबीसींनी आयोजित केलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमांना जायचेच नाही, असे त्यांनी ठरविलेले असल्याने हाके व वाघमारेंच्या उपोषणाला भेट द्यायला ते जाणारच नाहीत, असा निष्कर्ष निघत होता.

परंतू प्रथमच बाळासाहेब आंबेडकरांनी आपला नियम तोडला व दिनांक 21 जून 2024 रोजी ते हाके-वाघमारेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी वडीगोद्रीला गेलेत. या बद्दल मी त्यांचे जाहीर आभारही मानले व अभिनंदनही केले. परंतू त्यासाठी मला 8 जून 2024 रोजी त्यांच्यावर एक लेख प्रकाशित करावा लागला. ( या लेखाची लिंक पुढील प्रमाणे- https://drive.google.com/file/d/1jRyQq8lVYz30XCBLcfWPB8mpldJgOr5x/view?usp=drive_link) या लेखाचा बाळासाहेबांवर पॉझिटिव्ह परिणाम झाला व नियम तोडून ते हाके व वाघमारेंच्या भेटीला 21 जून रोजी गेलेत. जरांगेच्या उपोषणाला ‘एकतर्फी’ पाठींबा देऊन आपण फार मोठी चूक केली, हे बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले असावे व ही चूक सुधारण्यासाठी ते हाके-वाघमारेंच्या उपोषणाला भेट द्यायला गेलेत. हे या उपोषण आंदोलनाचे मोठे फलित म्हटले पाहिजे.

2024 च्या लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या होत्या व या निवडणूकीत ओबीसी उमेदवार पराभूत झालेले होते. त्यामुळे ओबीसी तरूणांमध्ये प्रचंड निराशा पसरलेली होती. याचा फायदा जरांगेने उचलायचा ठरवला. अशा परिस्थीतीत आपण मराठ्यांना आक्रमक केले तर निश्चितच आपल्या ‘ओबीसीमधून मराठा आरक्षणाचे षडयंत्र’ यशस्वी होऊ शकते. म्हणूण जरांगे लोकसभा निवडणूकीनंतर ताबडतोब उपोषणाला बसला व त्याने सगेसोयरेचं नाटक सुरू केलं! लोकसभा निवडणूकीतील अपयशाने निराश झालेल्या ओबीसींकडून विरोध होणार नाही, असे जरांगेला वाटले. परंतू जरांगेचा हा (गैर) समज हाके, वाघमारे व ससाणेंनी घणाघाती घाव घालून तोडला. हे आणखी एक फार मोठे फलित या ओबीसी उपोषण आंदोलनाचे आहे.

यापुर्वी ओबीसी लोक सभा-संमेलनाला जात होतेच, परंतू येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था व जेवण्या-खाण्याची व्यवस्था असेल तरच तो घराबाहेर पडत होता. अशी खर्चिक व्यवस्था ओबीसी नेता किंवा ओबीसी कार्यकर्ता करूच शकत नाही. कारण ओबीसींकडे ना कारखाने, ना बँका, ना शिक्षणसंस्था! साखर कारखाने, बँका-पतपेढ्या, सुत गिरण्या, दुध डेअर्‍या, सोसायट्या या सारख्या सार्वजनिक संस्थांमध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार करून त्यातील काही लाख रुपये खर्चून सभा-सम्मेलने यशस्वी केली जातात व त्यातून राजकीय सत्ता मिळवितात. जनतेचा सार्वजनिक पैसा उधळूनच सभा-संमेलने व मोर्चा-धरणे आंदोलने होत असतात. आणी अशाप्रकारची आंदोलने मराठा लोकच करू शकतात, कारण ही साधने फक्त मराठ्यांकडेच आहेत. त्यामुळे ओबीसींकडून आपल्याला फारसा आक्रमक विरोध होणार नाही, याची खात्री जरांगेला होती. जरांगेच्या या खात्रीला कचाकच कात्री लावण्याचे काम ओबीसींनी करून दाखविले. जरांगेचा हा गैरसमज भुजबळांच्या लाखांच्या महासभांनी व हाके-वाघमारेंच्या उपोषणाने नष्ट केला.

ओबीसी हा समाजघटक रिकामटेकडा समाज नाही. पांढरे कपडे घालून मारोतीच्या पारावर बसून चकाट्या पिटणे, येणार्‍या-जाणार्‍यांची छेळ काढणे व आज कोणत्या पुढार्‍याची कोठे सभा आहे का याचा शोध घेणार्‍या रिकामटेकड्या चांडाळ चौकडीत सहभागी होणे ओबीसीला अजिबात परवडणारे नसते. ओबीसी समाज स्वतः कष्ट करून कुटुंब चालवत असतो. ओबीसी माणूस शेतकरी असला तरी मजूर लावून शेती करण्याइका तो ऐषआरामी नाही व तेवढी त्याची आर्थिक क्षमताही नाही. नाभिक, सुतार, लोहार, कुंभार या मायक्रो ओबीसी जातीतील अख्खे कुटूंब राबते तेव्हा संध्याकाळची गुजराण होते. नाभिक बांधवाने आंदोलनात सहभागी व्हायचे ठरविले तर त्याला किमान दोन दिवस कटिंग सलून बंद ठेवावे लागते. यातून त्याच्या कुटुंबाची उपासमार ठरलेलीच असते. धनगराला तर मेंढ्या उपाशी ठेवून आंदोलनात सहभागी होणे शक्यच नसते. एक जरी मेंढी मेली तरी त्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान होत असते. धोबी बांधवाने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांची दांडी मारली तर आख्खा गाव दुर्गंधीने हैराण होईल. हे सर्व ओबीसींचे वीकपॉईंट जरांगेला व त्याच्या संघी सल्लागारांना माहीत आहेत, म्हणून त्यांना खात्री होती की, ओबीसीकडून फार मोठ्या संख्येने विरोध होणार नाही. परंतू हाके, वाघमारे व ससाणेंच्या उपोषण आंदोलनाने जरांगेचा हाही गैरसमज तोडून टाकला.

ओबीसी अस्तित्वाचाच प्रश्न समोर उभा ठाकला आणी ओबीसीने हातातली सर्व कामे सोडून आंदोलनाकडे धाव घेतली. ओबीसीमध्ये मराठा घुसला तर आपल्या पोरा-बाळांना शिपायाची नोकरीसुद्धा मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर अंधकारमय काळेकुट्ट भविष्य त्याला दिसायला लागले. आपण वेळीच जागे होऊन विरोध केला नाही तर उद्याच्या भीकेला लागलेली आपलीच पोरं आपल्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आजच्या ओबीसींना झाली व त्यांनी आंदोलनाकडे धाव घेतली.

ओबीसी जनता उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडते आहे. लाखोंच्या संख्येने ओबीसी जनता घरातील चटणी-भाकर बांधून आंदोलनात सहभागी होत आहे. असेल ते साधन व मिळेल ते वाहन घेऊन हा ओबीसी आंदोलनात सहभागी होत आहे. कारण त्याला माहीत आहे की, नेहमी प्रमाणे कोणा पाटलांची गाडी आपल्याला घ्यायला येणार नाही. घरची चटणी-भाकर बांधून घ्या, कारण कोणी साखर कारखानदार आपल्याला बिर्याणी खाऊ घालणार नाही. प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे व ऍड. मंगेश ससाणे यांच्या आंदोलनाने त्याहीपेक्षा पुढचा टप्पा गाठला आहे. आता ओबीसी केवळ स्वखर्चाने येत नाही तर आंदोलनाला मदत करण्यासाठी खिशात पैसे घेऊनच आंदोलनात येतो. वडीगोद्रीच्या उपोषणाला येणार्‍या लोकांनी आपल्या घामाच्या कमाईतून लाखो रूपयांची मदत केली आहे, ही खरोखर क्रांतीकारी बाब म्हटली पाहिजे. वडीगोद्रीच्या आंदोलनाचे हे फार मोठे फलित म्हटले पाहिजे. पराभूत मानसिकतेला उभारी देऊन लढायला सिद्ध करणं हे महाकठीण काम आहे, मात्र या तीन नवतरूणांच्या उपोषणाने ते करून दाखविलं, हे सर्वात मोठं फलित म्हटले पाहिजे.

सातव्या पर्वाच्या तिसर्‍या प्रकरणात मी ओबीसींसमोरील दोन पर्यायांची चर्चा करणार आहे. तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

-प्रा. श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः [email protected]
*महत्वाची सूचनाः 1) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, प्रकरण-2 लेखांक-9, दैनिक बहुजन सौरभच्या 16 जुलै 2024 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
*2) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, लेखांक-9, या लेखाची pdf file ची लिंक पुढीलप्रमाणे- https://drive.google.com/file/d/1M4KQPvAqVzKCnzirR5kMRN2hCK_x3JAE/view?usp=drive_link

हाके+वाघमारे+ससाणे यांच्या उपोषण आंदोलनाचे फलित                     ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-8             ...
14/07/2024

हाके+वाघमारे+ससाणे यांच्या उपोषण आंदोलनाचे फलित

ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-8
ओबीसीनामा-29 लेखकः -प्रा. श्रावण देवरे

(प्रकरण-1)
घर मे घुस के मारा!

सहावे पर्व मध्येच सोडून मला शेवटच्या सातव्या पर्वावर यावे लागत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, सहाव्या पर्वातील घडामोडी ज्या काळात (2018-19 मध्ये) घडत होत्या त्याच काळात मी भरपूर लिहीलेले आहे. त्यातील काही लेख पुनर्प्रकाशित केलेत की आपल्या वाचकांना सहाव्या पर्वाचा इतिहास समजून घेता येईल. दुसरे कारण असे की, आता वर्तमानात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावर आत्ताच लिहीणे योग्य होईल. म्हणून मला सातव्या पर्वावर उडी मारावी लागत आहे.

3 ऑक्टोंबर 2016 च्या नाशिक ओबीसी महामोर्च्याने मराठ्यांच्या लाख मोर्च्यांनी निर्माण केलेली महाराष्ट्रव्यापी दहशत नष्ट केली होती. म्हणून मी त्या लेखाला ‘‘... भुजबळांमुळे ‘झाले मोकळे आकाश!’’ असे शिर्षक दिले होते. आता पुन्हा जरांगेच्या मराठा गुंडांनी जाळपोळ करून राज्यात सर्वत्र दहशत निर्माण केली होती, ती दहशतही भुजबळांच्या 17 नोव्हेंबर 2016 च्या अंबड महासभेने चुटकीसरशी नष्ट केली आहे. पुन्हा दुसर्‍यांदा भुजबळसाहेबांनाच पुढाकार घेऊन महाराष्ट्रावरच मराठा-दहशतीचं नावाचं काळ सावट नष्ट करावं लागलं! म्हणून अंबडच्या सभेचं विश्लेषण करतांना मी शिर्षक दिले होते- ‘‘अंबडची महाकाय सभाः ओबीसी इतिहासातील सुवर्ण पान’’

आता इतिहासाचे पुढील सुवर्ण पान लिहीण्याची जबाबदारी नव तरूणांवर आलेली आहे. आणी या नव तरूणांचे नेतृत्व करीत आहेत- हाके+वाघमारे+ससाणें हे नवतरूण. लाखांच्या सभा व उपोषणाच्या मंडपातील हजारो ओबीसींची उपस्थिती पाहता आम्हाला 1980-90 च्या काळातील ओबीसींच्या सभा व बैठकांची आवर्जून आठवण होत होती. त्याकाळी ओबीसींची एक बैठक घ्यायची म्हणजे प्रचंड धावपळ तारेवरची कसरत होती. त्याकाळी ना मोबाईल, ना सोशल मिडिया! घरात टेलीफोन घेण्याची अवकात नाही. गावागावात जाऊन सभा घेतांना तेथील हिंदूत्ववादी पक्ष व संघटनांचा विरोध ठरलेलाच असायचा! हिंदुत्ववादाच्या नावाने मंडल आयोगाला विरोध करणारे हे धर्मवीर ओबीसी जातीचेच होते. मंडल आयोगांच्या सभांना विरोध करणारे हेच धर्मवीर 1993 नंतर ओबीसी सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसीलदार व कलेक्टर कचेरीवर चकरा मारतांना दिसत होते. त्या काळातील मंडल आयोगाशी संबंधीत ओबीसींच्या भय-कथा मी नंतर केव्हा तरी स्वतंत्रपणे लिहीन. आपण आजच्या संभाव्य पर्यायावर चर्चा करू या!

हाके व वाघमारे यांनी उपोषणासाठी वडीगोद्री गाव निवडले, यात त्यांची युद्धशास्त्र पारंगता सिद्ध होते. युद्धशास्त्रात एक सिद्धांत फार महत्वाचा असतो, आणी तो म्हणजे युद्धाचे मैदान निवडण्याचा! शत्रूला युद्ध सुरू होण्यापूर्वीच अर्धमेला करायचे असेल तर त्याला त्याच्या अंगणात जाऊनच ललकारले पाहिजे. हाके व वाघमारे यांनी अंतरवलीसराटी मध्ये जाऊन उपोषणाचे गगनभेदी रणशिंग फुंकले आणी तिकडे जरांगेची पुंगी पी पी करायला लागली. म्हणून मी या पहिल्या प्रकरणाचे नांव ठेवले- ‘‘घर मे घुस के मारा!’’

पत्रकारांनी हाके व वाघमारेंच्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारताच जरांगे गोंधळला व पळ काढत म्हणाला की, ‘मी वाघमारे व हाकेंना शत्रू मानत नाही. माझा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भुजबळ!’ जर जरांगे खरोखर मराठा आरक्षणासाठी लढत असेल तर त्याने हाके+वाघमारे+ससाणेंच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांनी केलेल्या मागण्यांवर बोलायला पाहिजे होते. परंतू तिन्ही उपोषणकर्त्यांच्या मागण्या वैचारिक पातळीवरच्या असल्याने त्यांना उत्तर देण्याइतका अभ्यास जरांगेकडे नाही.

जरांगे एकट्या भुजबळांनाच शत्रू का मानतो? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे. भुजबळसाहेब हे मंत्री आहेत, संवैधानिक पदावर आहेत व त्यांच्या नावाभोवती दरारा असलेले वलय आहे. अशा ‘मोठ्या’ माणसाला शिव्या दिल्या, अरे-तुरेची भाषा वापरली की चवली-पावलीच्या खडकू लोकांना लाखभर प्रसिद्धी मिळते. शिव्या द्यायला अभ्यासही लागत नाही व अक्कलही लागत नाही. आणी या दोन्ही अमूल्य वस्तू जरांगेच्या मेंदूत नाहीत. दुसरे महत्वाचे असे की, भुजबळसाहेबांना पदाच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा सोडून जरांगेच्या हीन व नीच पातळीवर त्यांना येणे शक्य नाही, हे ओळखूनच जरांगेने शत्रू म्हणून भुजबळांची निवड केली आहे. सत्तेत असलेल्या भुजबळांना मंत्रीपदाचा वापर करुन जरांगेला धडा शिकविता येईल का?

मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना नारायण राणे यांनी (शाब्दिक) कानाखाली लावली. हा अपमान सहन न झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे यांना एखाद्या छपरी चोरासारखे उचलून जेलमध्ये टाकले. विशेष म्हणजे नारायण राणे हे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. आणी तरीही अटकेच्या भीतीने राणे हे नाशिकच्या बीळातून निघून कोकणच्या बीळात जाऊन लपले होते. परंतू जातीव्यवस्थेच्या मडक्यांच्या उतरंडीत ब्राह्मण-ठाकरे सर्वात वरच्या मडक्यात आहेत व मराठा राणे दुय्यम मडक्यात! ‘‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो’’ अशी डरकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी फोडली खरी, परंतू कारकून म्हणून छत्रपतींची नोकरी करणार्‍या दरबारी ब्राह्मणांनी धर्माचं हत्यार उचलले आणी शिवरायांनाच शूद्र ठरवून त्यांचा निकाल लावला. जे छत्रपती शिवाजी राज्यांना जमलं नाही ते आजच्या मांडलिक मराठ्यांना काय जमणार आहे? भुजबळ तर अगदी खालून दोन नंबरच्या मडक्यात आहेत. त्यामुळे जरांगेला कायद्याचा हिसका दाखवण्याची हिम्मत भुजबळांमध्ये असूच शकत नाही. दोष भुजबळांचा नाही, व्यवस्थेचा आहे.

भुजबळ जरांगेला जेलमध्ये टाकू शकत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त मंत्रीपद आहे, सत्ता नाही. मुख्यमंत्री मराठा, गृहमंत्री ब्राह्मण व दोन उपमुख्यमंत्रीपैकी एक मराठा व दुसरा ब्राह्मण, अशी एकहाती सत्ता ब्राह्मण-मराठ्यांच्या हाती असतांना शूद्र ओबीसी असलेल्या भुजबळांना कोण विचारतं? केवळ लाल दिव्याची गाडी व एक बंगला दिला म्हणजे कुणीही मंत्री होत नाही व सत्ताधारीही होत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भुजबळांना दोन नंबरचे स्थान आहे. कोणत्याही कार्यक्रमात वा बैठकीत अजीत पवार भुजबळांना ज्येष्ठ नेते म्हणून आपल्या शेजारी बसवतात. परंतू भुजबळांना चवली-पावलीच्या खडकू जरांगेने शीव्या दिल्या म्हणजे आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही तो अपमान आहे, असे अजित पवारांना कधीच वाटले नाही. कारण शिव्या देणारा अजित पवारांच्या जातीचा आहे. आपल्या मंत्रीमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याला शीव्या दिल्या जात आहेत, हा आपल्या मंत्रीमंडळाचाही अपमान आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंना कधीच वाटले नाही. कारण शिव्या देणारा शिंदेच्या मराठा जातीचा आहे व शिव्या खाणारा शूद्र ओबीसी जातीचा! फडणवीसांना हे सर्व हवेच आहे, महाराष्ट्राचा मणीपूर घडवू इच्छिणार्‍या ब्राह्मणांना या प्रकाराबद्दल ना लाज, ना शरम! त्यांनी तर कमरेचं सोडून डोक्याला केव्हाच गुंडाळून घेतलेलं आहे! ओबीसी विरुध्द मराठा, महार विरुध्द मातंग, आदिवासी विरुद्ध धनगर, माधव-ओबीसी विरुध्द मायक्रो ओबीसी असे वाद पेटवत असतांना प्रत्येक ब्राह्मणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे, कारण मनुस्मृती पुन्हा जीवंत करण्याचा हाच महामार्ग आहे.

पाय-पुसण्या किंमतीच्या या मंत्रीपदाचा राजीनामा भुजबळसाहेबांनी दिला आणी ते रणांगणात उतरलेत. केजरीवाल यांना अनेकवेळा अटक झाली व देशद्रोहासारखे गंभीर आरोप असूनही केजरीवाल अजुनही मुख्यमंत्रीपद सोडत नाहीत. कारण मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी फार मोठी हिम्मत लागते. ओबीसींच्या आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांच्या नंतर भुजबळच आहेत, ज्यांनी ओबीसी आरक्षणासाठी 2023 साली राजीनामा दिला. भुजबळांनी ही हिम्मत दाखवली व जहांमर्द असल्याचे सिद्ध केले. परंतू राजीनामा स्वीकारण्याची हिम्मत ना मुख्यमंत्री शिंदेंमध्ये आहे, ना दोघा उपमुख्यमंत्र्यांमध्ये! त्यामुळे या मराठा-ब्राह्मणांची मर्दानगी शंकास्पद बनलेली आहे.

सातव्या पर्वाच्या उत्तरार्धात मी ओबीसींसमोरील दोन पर्यायांची चर्चा करणार आहे. तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

-प्रा. श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः [email protected]

*महत्वाची सूचनाः 1) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे पाचवे पर्व, लेखांक-8, दैनिक बहुजन सौरभच्या 14 जुलै 2024 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
2) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सहावे पर्व, लेखांक-8, या लेखाची pdf file ची लिंक पुढीलप्रमाणे- https://drive.google.com/file/d/1_e-YeY0f3BmTqVkYOOqpawaawQyqHalC/view?usp=drive_link

20/11/2023

...अन तो क्षण आला ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो

'संविधान सन्मान महासभा'

25 नोव्हेंबर 2023
वेळ - दु. ४ वा.
ठिकाण - शिवाजी पार्क मैदान, दादर, मुंबई

#वंचित_बहुजन_आघाडी #मुंबई

 #विश्वकर्मा_वंशीय_समाज_संघटन आयोजित  #प्रधानमंत्री  #विश्वकर्मा  कौशल्य सन्मान योजना नोदणी कॅम्प
23/09/2023

#विश्वकर्मा_वंशीय_समाज_संघटन आयोजित #प्रधानमंत्री #विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना नोदणी कॅम्प

30/08/2023

#भारत आघाडीने #वंचित_बहुजन_आघाडी ला दिलेल्या निमंत्रणाचे सत्य..?
प्रा. नागोराव काशीनाथ पांचाळ
प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघडी.







ओबीसी ची दशा आणि दीशा.. प्रा. सोमनाथ साळुंखे दी.११.०८.२०२३ रात्री ०८:३० ते ०९.३०.OBC Brigade Maharashtra ओबीसी ब्रिगेड
11/08/2023

ओबीसी ची दशा आणि दीशा..
प्रा. सोमनाथ साळुंखे
दी.११.०८.२०२३ रात्री ०८:३० ते ०९.३०.
OBC Brigade Maharashtra ओबीसी ब्रिगेड

https://m.facebook.com/story.php?story_fbid=674598718019143&id=100064070617684&mibextid=CDWPTG
09/08/2023

https://m.facebook.com/story.php?story_fbid=674598718019143&id=100064070617684&mibextid=CDWPTG

मंडल आयोग दिवस जागरूकता सप्ताह मा भास्कर भोजने सर का तृतीय व्याख्यान विषय:- सुदृढ लोकशाहीसाठी महाराष्ट्रात विरोधक शिल्लक आहे ?
ओबीसी साठी कोणता पर्याय...
#मंडळआयोग
#ओबीसी #आंबेडकर #ओबीसी_ब्रिगेड
#वंचित

31/05/2023

#जनसेवक
#समाजसेवक
#लोकनायक
#लोकनेता
#प्रामाणिक
#नेतृत्व
श्रध्येय प्रकाश आंबेडकर यांचे प्रामाणिक झुंझार लढवय्यें
#वंचित बहुजन आघाडीचे #प्रदेशउपाध्यक्ष #ओबीसी चे नेते #प्रा_नागोराव_पांचाळ साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा



#ओबीसी_संवाद_दौरा

24/04/2023
 #वंचित_बहुजन_आघाडीआयोजित  #ओबीसी_संवाद_दौरा #प्रा_नागोराव_पांचाळ #मा_गोविंद_दळवी  #सोमनाथ_साळुंखे    #वंचित_बहुजन_आघाडी...
21/04/2023

#वंचित_बहुजन_आघाडी
आयोजित #ओबीसी_संवाद_दौरा
#प्रा_नागोराव_पांचाळ
#मा_गोविंद_दळवी
#सोमनाथ_साळुंखे
#वंचित_बहुजन_आघाडी_महाराष्ट्र
Nagorao Panchal

Address

Aurangabad

Telephone

+919511626643

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagorao Panchal fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nagorao Panchal fc:

Share

Category