VSK Devgiri

VSK Devgiri “संवादात सौहार्दम्”

राष्ट्र निर्मितीत भारतीय स्त्रीचे कायमच अनमोल योगदान – लीनाताई गहाणेराष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध वर्गाचा समा...
31/05/2026

राष्ट्र निर्मितीत भारतीय स्त्रीचे कायमच अनमोल योगदान – लीनाताई गहाणे

राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप संपन्न

छ. संभाजीनगर ३० मे: बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या रामचंद्र मेडिकल इन्स्टिटय़ूट च्या भव्य प्रांगणात राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध शिक्षा वर्गाच्या दिनांक ३० मे रोजी संपन्न झालेल्या समारोप प्रसंगी राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख लीनाताई गहाणे यांनी 'जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान' या विषयावर उद्बोधन करताना भारताचा मूळ स्वभाव, भारताने जगाला दिलेल्या योग अध्यात्म आणि तत्वज्ञान या महत्त्वपूर्ण देणग्या आणि संपूर्ण विश्व हे कुटुंब असून तिथे शांतता समृद्धी नांदली पाहिजे या उदात्त विचाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पावले टाकणारा भारत हा विश्वगुरूत्वाकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन केले.

त्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तव्य निभावणे आवश्यक आहे. भारतीय समाजाने महिला स्वातंत्र्य, महिला शिक्षण ह्याला मागे टाकलेले नाही. वेदकाळातील ऋषिकांपासून ते मंगलयानातील महिला शास्त्रज्ञ यांच्या पर्यन्त आपल्याला हे दिसून येते. स्त्री ही कुटुंबाचा परत्वे समाजाचा आधार स्तंभ आहे असे अत्यंत प्रभावी , राष्ट्रनिष्ठ , ओघवत्या शैलीत विचार मांडून लीनाताई गहाणे यांनी उपस्थितांना उदबोधित केले.

राष्ट्र सेविका समितिच्या दिनांक १५ मे पासून सुरू झालेल्या या पंधरा दिवस प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी प्रतिमा पूजन व भगव्या ध्वजाचे अनावरण झाले. त्यांनंतर शिक्षार्थी सेविकांनी मानवंदना , घोष , गणसमता, नियुद्ध, दंड , यष्टी , योगचाप , व्यायाम योग यांची अत्यंत देखणी प्रात्यक्षिके सादर केली. महिला ही मन आणि मनगट यांनी सक्षम बनून ती राष्ट्रभक्त नागरिक घडली पाहिजे यासाठी समिति प्रयत्न करते असे प्रतिपादन समितिच्या देवगिरी प्रांताच्या सहकार्यवाहिका सौ. अंजली बडवे यांनी केले.

याप्रसंगी आर के दमाणी मेडिकल काॅलेजच्या अधिष्ठाता डाॅ. सौ. शिरडकर यांनी बोलताना समिति कार्याची सांप्रत काळातील आवश्यकता प्रतिपादन करताना या मुली देशाच्या उज्वल भवितव्यात आपले भरभरून योगदान देतील असे मनोगत व्यक्त केले.

प्रवेश वर्गाचा अहवाल सर्वाधिकारी म्हणून संघमित्रा कापडी यांनी तर प्रबोध वर्गाचा अहवाल सौ. राधिका भिडे यांनी सादर केला. या शिक्षा वर्गात प्रवेश साठी ७१ तर प्रबोधसाठी ६३ तरूणी उपस्थित होत्या. समारोप कार्यक्रमास संभाजीनगर शहरातील नागरिक , रा. स्वं.संघ पदाधिकारी तसेच स्वयंसेवक , सेविका बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

१५ दिवसांच्या ह्या वर्गात मुलींना मन मनगट मजबूत करण्या सोबतच देशभक्तीचे संस्कार देऊन सज्जन शक्ती निर्माण करण्याचा उद्देश होता. विशेष ह्या वर्गात मातृहस्तेन भोजन हा वेगळा उपक्रम झाला तसेच उल्कानगरी ह्या भागात सघोष पथसंचलन निघाले होते.

*****

संघाला समतायुक्त, शोषणमुक्त समरस हिंदू समाज घडवायचा आहे – बाळासाहेब चौधरीजळगांव येथे रा.स्व.संघाच्या पश्चिम क्षेत्राचा क...
30/05/2026

संघाला समतायुक्त, शोषणमुक्त समरस हिंदू समाज घडवायचा आहे – बाळासाहेब चौधरी

जळगांव येथे रा.स्व.संघाच्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग १ संपन्न

जळगाव ३० मे : शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-१ चा जाहीर समारोप कार्यक्रम शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न झाला. सदर समारोप कार्यक्रम मुळजी जेठा (एम जे कॉलेज) महाविद्यालय एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झाला.

समारोप कार्यक्रमात एकवीस दिवसाच्या वर्गात प्रशिक्षणार्थी स्वयं सेवकांनी नियुद्ध, दंड प्रहार, सामूहिक समता, योग् प्रात्यक्षिक सादर केले. कार्यकमाची सुरुवात श्री संजय जी तलखेडकर यांच्या प्रास्ताविक ने झाली. या प्रसंगी मंचावर श्री. उज्ज्वल चौधरी ( जळगाव शहर संघ सचालक ) डॉ. श्री. निलेश पाटील ( जळगाव जिल्हा संघचालक ) प्रमुख पाहुणे श्री राजेश चौधरी, ( कार्यकारी संचालक संन शाईन ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड जळगाव श्री बाळासाहेब चौधरी ( पश्चिम क्षेत्र कायर्वाह :- महाराष्ट्र, गुजरात, गोवा ) उपस्थित होते. श्री राजेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

सदर वर्गासाठी 255 प्रशिक्षणार्थी हॆ डॉक्टर, वकील, शिक्षक प्राध्यापक, कामगार, महाविद्यालयीन तरुण इत्यादी होते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 33 संघ शिक्षक, 75कार्यकर्ते होते संघ वर्ग हा सकाळी 4,30 ते रात्री 10 पर्यंत सतत सुरु होता यामध्ये बौद्धिक माहिती, शारीरिक प्रशिक्षण, गीत गायन, योग, शारीरिक प्रशिक्षण शिकविले जाते. प्रमुख अतिथी श्री राजेशजी यांनी सांगितले की संघ हा चरित्र निर्माणाचे काम करतो. स्वयंसेवक हॆ भारत मातेची साधना करतात. संघ एक फक्त संस्था नाही तर एक विचार आहे.

प्रमुख वक्ते श्री बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले की आज संघला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. आज संघचे नाव सर्वाना माहिती झाले आहे. संघाची विशेष कार्यपद्धती आहे. आपण सर्व एकजुट नसल्यामुळे आपल्यावर 1500 वर्ष परकियांनी राज्य केले. त्यामुळे आपण एकजूट राहण्यासाठी डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज सर्व समाज एकजूट होत आहे. हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. आज सर्वासामान्य व्यक्ती व नेता सुद्धा म्हणतो की गर्व से कहो हम हिंदू है.
आज बरेच ठिकाणी लव जिहाद, लँड जिहाद अशा अनेक प्रकारांनी आपल्यावर आक्रमण होत आहे. त्यापासून समाजाला सावध व सक्षम करण्याचे काम स्वयंसेवक करत आहे. संघाला समतायुक्त, शोषणमुक्त समरस हिंदू समाज घडवायचा आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या समारोपनंतर भोजन व्यवस्था करण्यात आली होती. साधारण ४००० नागरिक या समारंभसाठी उपस्थित होते. पोळ्या संकलन करण्यात आल्या होत्या. महिलांचा सक्रिय सहभाग राहिला.

या समारोप कार्यक्रमास शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहकुटुंब व सह परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

संघाने हिंदूंना ‘हिंदू’ बनवण्याचे काम केले – रवींद्र किरकोळे जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा...
30/05/2026

संघाने हिंदूंना ‘हिंदू’ बनवण्याचे काम केले – रवींद्र किरकोळे

जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा जाहीर समारोप कार्यक्रम संपन्न

जामनेर, दि. ३० मे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत आयोजित संघ शिक्षा वर्गाचा जाहीर समारोप कार्यक्रम आज सायंकाळी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल, भुसावळ रोड, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे प्रतिवर्षी कार्यकर्ता प्रशिक्षण संघ शिक्षा वर्गामध्ये होत असते. यावर्षीचा संघ शिक्षा वर्ग दि. १५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत जामनेर येथे आयोजित करण्यात आला होता. वर्गाच्या समारोपानिमित्त जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भरतसिंह सुरतसिंह जाधव (श्री गजानन महाराज सेवाश्रम) हे होते. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय समरसता संयोजक श्री. रवींद्र बाळकृष्ण किरकोळे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर भुसावळ जिल्हा सह कार्यवाह चंद्रशेखर पाटील, जळगाव विभाग संघचालक राजेश आबा पाटील तसेच तालुका संघचालक ऍड. प्रमोद काशिनाथ सोनार उपस्थित होते.

श्री. रवींद्र बाळकृष्ण किरकोळे यांनी आपल्या उद्बोधनात म्हणाले की संघ शंभर वर्षापर्यंत सातत्याने सक्रियपणे कार्यरत राहिला त्यामध्ये अशा प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका आहे. या प्रशिक्षणातून केवळ शारीरिक कसरत होत नाही तर कार्यकर्त्यांमध्ये परस्परांचे मन जुळते. स्वयंशिस्त लागते. त्यामधूनच समरसमय, चारित्र्यवान, राष्ट्रभक्त मनुष्य निर्माणाची प्रक्रिया होते. हेच संघाला अपेक्षित आहे. तसेच संघ आणि राजकारण ह्या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. संघ पक्षीय राजकारणापासून कोसो दूर आहे हे समजून घेतले पाहिजे. संत रोहिदास यांचा समरस विचार हाच संघाचा विचार आहे. संघाने हिंदूंना हिंदू बनवण्याचे काम केले. आपली ओळख जातीच्या, प्रांताच्या, भाषेच्या आधारावर सांगणाऱ्या समाजाला संघाने ‘हिंदू’ बनवून एकजूट केले असे ते म्हणाले.

प्रमुख अतिथी भरतसिंह सुरतसिंह जाधव आपल्या मनोगत सांगताना म्हणाले, “संघ म्हणजे राष्ट्रप्रेम व धर्मनिष्ठेसाठी सतीचे वाण घेतलेली संघटना आहे. मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच जगतो. वारकरी संप्रदायाचा आणि गजानन भक्त परिवाराचा मी पाईक आहे. संघ कामातून निरपेक्ष भावनेने सेवा करण्याचा संदेश मिळतो. गजानन महाराज भक्त परिवारामध्ये सुद्धा आमचा हा संस्कार सेवाकार्यासाठी प्रेरक ठरतो.”

यावेळी संघ शिक्षा वर्गातील विविध उपक्रम, प्रशिक्षण पद्धती, स्वयंसेवकांचे अनुभव तसेच वर्गामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांनी तयार केलेल्या विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक केले. पंधरा दिवसांच्या या वर्गात शिक्षार्थी स्वयंसेवकांनी संघटन, व्यवस्थापन, बौद्धिक, शारीरिक व सेवाकार्याचे प्रशिक्षण घेतले. देवगिरी प्रांतातील महाविद्यालयीन व व्यावसायिक १२२ स्वयंसेवकांनी या वर्गात सहभाग घेतला. २३ ते ३० मे दरम्यान सात दिवस घोष वर्ग सुद्धा झाला. त्यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तसेच भोजन व्यवस्थेमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांनी १५०० पोळ्यांचे संकलन केले तर १५ दिवसात शहरातील २१३५ घरातून २१,३५० पोळ्या संकलित करण्यात आल्या.

---

30/05/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत, संघ शिक्षा वर्ग (सामान्य), जामनेर

30/05/2026

पश्चिम बंगाल में घुसपैठियों पर बड़ा प्रहार, बांग्लादेश जाने के लिए बॉर्डर पर उमड़ी भीड़

भारत की Gen Z राष्ट्रप्रेमी। देशपर उनका परम भरोसा
30/05/2026

भारत की Gen Z राष्ट्रप्रेमी। देशपर उनका परम भरोसा

30/05/2026

सशक्त भारत के लिए हमारी नागरिक जिम्मेदारियाँ,क्या करें, क्या न करें, इस वीडियो के माध्यम से जानिए
#नागरिक_कर्तव्य #सशक्त_भारत

30/05/2026

“जो भी कोई इस देश को अपनी मातृभूमि मानेंगे, भारत की संस्कृति का जिन्हें अभिमान है, जिन्होंने उसके सम्मान के हित कष्ट उठाए, तथा देश की एकता में जिनकी आस्था है उस प्रकार के सभी लोग हिंदुत्व की परिभाषा के अन्तर्गत आते हैं।”
- रज्जू भैया

30/05/2026
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* *पश्चिम क्षेत्र, कार्यकर्ता विकास वर्ग १, जलगांव*सार्वजनिक समापन समारोहआज शाम 6.30 बजेYOUTUBE ...
30/05/2026

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ*
*पश्चिम क्षेत्र, कार्यकर्ता विकास वर्ग १, जलगांव*

सार्वजनिक समापन समारोह
आज शाम 6.30 बजे
YOUTUBE Live

https://www.youtube.com/live/qlk0SXjKRck?si=zaJUdtSSpJIb6Qtr

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

Address

Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431005

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+912403552265

Alerts

Be the first to know and let us send you an email when VSK Devgiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VSK Devgiri:

Share

Category