BaiManus

BaiManus बाईमाणूस
आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी स्वतंत्र पत्रकारिता. कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे.

baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्

यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाल...
02/06/2026

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हा...
02/06/2026

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प… महाराष्ट्रातील जंगलांचा मुकुटमणी. देशभरातील वन्यजीवप्रेमी, पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी ...
02/06/2026

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प… महाराष्ट्रातील जंगलांचा मुकुटमणी. देशभरातील वन्यजीवप्रेमी, पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र. कोळसा खाणी आणि उष्ण, कोरड्या जंगलांसाठी ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा आज जगभरातील व्याघ्रप्रेमींच्या नकाशावर आहे. ताडोबातील वाघांचे फोटो सोशल मीडियावर लाखो लोक पाहतात. एखाद्या वाघिणीच्या बछड्यांचा जन्म, एखाद्या नर वाघाचा नवीन क्षेत्रावर ताबा, जंगलातील शिकार किंवा पाणवठ्याजवळची त्याची वावर या सगळ्यांची आज मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. पण या चमकदार पर्यटन उद्योगाच्या सावलीत काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत. वाघांच्या मागे धावणारे कॅमेरे केवळ निसर्गाची नोंद घेत आहेत की नकळतपणे शिकारीच्या जाळ्यालाही मदत करत आहेत?

'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रव...
01/06/2026

'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती.









सपना राजेश वाघमारेच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवतो. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या एका छोट्याशा आदिवासी कातकरी वाडी...
01/06/2026

सपना राजेश वाघमारेच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवतो. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या एका छोट्याशा आदिवासी कातकरी वाडीवर जन्मलेली ही मुलगी. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आदिवासी समाजासाठी एक आशेचा किरण, आदर्श बनली आहे. कातकरी समाजातील 'पहिली महिला वकील' होण्याचा बहुमान तिने पटकावला असून आता ती थेट सातासमुद्रापार, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे एलएलएम (कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण) घेण्यासाठी रवाना होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत तिची ही स्वप्नवत निवड झाली. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अश्रू, संघर्ष, कागदपत्रांची कमतरता आणि गरिबीशी दोन हात करत सपनाने मारलेली ही झेप थक्क करणारी आहे.

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दू...
01/06/2026

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.








आयपीएल 2026 स्पर्धा या विक्रमी रेकॉर्डमुळे चर्चेत राहिलीFollow: .in
01/06/2026

आयपीएल 2026 स्पर्धा या विक्रमी रेकॉर्डमुळे चर्चेत राहिली
Follow: .in

01/06/2026

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे B.Ed प्रवेश परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली. परीक्षा केंद्राबाहेर असलेले काँक्रीटचे झाकण अचानक कोसळल्याने सुमारे 15 ते 20 उमेदवार गटारात पडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Follow: .in

आकाशातून आग ओकणारा मे महिन्याचा सूर्य, अंगाची लाहीलाही करणारे ४४ अंश सेल्सिअस तापमान, डोक्यावर ना सावलीचा मंडप ना हातात ...
30/05/2026

आकाशातून आग ओकणारा मे महिन्याचा सूर्य, अंगाची लाहीलाही करणारे ४४ अंश सेल्सिअस तापमान, डोक्यावर ना सावलीचा मंडप ना हातात पाण्याचा घोट… आज ३० मे २०२६ रोजी अंतरवाली सराटीच्या मातीत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी थेट दोन हात करायला सुरुवात केली आहे. . पण, आज थेट उघड्यावर, विनासावली आंदोलनाचे हे टोकाचे पाऊल उचलणारे मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत? आणि अंतरावली सराटीतून सुरू झालेला हा वादळी प्रवास अवघ्या महाराष्ट्रात कसा पोहचला? जाणून घेऊया सुरुवातीपासून (लिंक कंमेंटमध्ये)



















नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहो...
30/05/2026

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

Address

N-6, CIDCO
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BaiManus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BaiManus:

Share