31/03/2020
कोरोनाच्या विषाणूमुळे संपूर्ण जग सुन्न झाले असताना
सदैव मुस्लिम द्वेषाची सुपारी घेऊन वावरणाऱ्या गोदी मीडिया आणि भक्त मंडळीना मुस्लिम समाजाला यानिमित्याने दोषी,अपराधी दाखविण्याची चढाओढ चालविली आहे. एकत्रित नमाज पठण ( जमात) करण्याला इस्लाम मध्ये असाधारण महत्व आहे, त्यामुळे मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याचा त्यांचा अट्टाहास गेल्या आठवड्यापर्यत काही प्रमाणात कायम होता,मात्र त्याबाबतही त्यांच्यात परिस्थितीबाबत जागृती झाली असून आजच्या घडीला जवळपास ९५,९८ टक्के मशीदींना कुलपे लावली असून केवळ आत रहात असलेले इमाम आणि साफसफाई करणारेच आत एकत्र रहात आहेत. पण गोदी मीडिया आणि काही धर्माध पत्रकार जुने फोटो,क्लिप दाखवून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच हज यात्रेवरून परतलेल्यांनी गावभर फिरत करोनाचा प्रसाद वाटप केला,असे बातम्या काहीनी छापल्या,काही चँनेलवर दाखविले तसेच सोशल मीडियावरून मेसेज व्हायरल करीत सुटले आहेत, त्या मुर्खांना इतकीही अक्कल नाही की यंदा हज यात्रा आँगस्टमध्ये होणार आहे, आणि उमरा यात्रेवर सौदी सरकारने सव्वा महिन्यापासून बंदी घातली आहे. आता त्यापुर्वी जाऊन आलेल्यांना करोनाचा रोग होवू शकतो, त्यामुळे त्यांनी आपली तपासणी करून होम क्वाराटाईन होणे गरजेचे आहे,मात्र केवळ मुस्लिमांमुळेच कोरोना फैलावत आहे,असा गैरसमज ही मंडळी करून देत आहेत,त्यामध्ये काथे अाडनावाचा एक केसाबरोबरच अक्कलेनेही चमन आणि एका बंद पडत आलेल्या चँनेलचा कथित कार्यकारी संपादक आघाडीवर आहे, तो मुस्लिम समाजाविरूद्ध नेहमी जाणीवपुर्वक एकांगी भाष्य करीत असतो, फेसबुकफ्रेडच्या एका पोस्टवर नेहमीप्रमाणे आज द्वेषपुर्ण मत मांडल्यावर प्रत्यूत्तर देत पुरता नांगवा केला . ताे आणि त्याच्या सारखी धर्माधतेची विष पेरणार्या भपंकासाठी हा पत्रप्रंपच.या महाभागानी जरा पुढील भाष्य वाचून आपली गहाण ठेवलेली अक्कलेला थोडा ताण द्यावा,हीच अपेक्षा,
मुस्लिम समाजाची दानत सर्वज्ञात आहे. आर्थिकदृष्ट्या पछाडलेला असतानाही हा समाज गरजूंवर खर्च करताना क्षणाचाही विचार करीत नाही. ताटातील भाकरी दुसऱ्याला देऊन स्वतः उपाशी राहणे, हा मुस्लिम समाजाच्या समाजकार्याची आत्मा आहे. भूकंप, महापूर, रोगराई अशा प्रत्येक वेळी प्रभावित झालेल्यांना मुस्लिम समाजाच्या दानतच अनुभव येतो. अत्यंत मागास म्हणून सच्चरने हिणवलेला मुस्लिम समाज प्रत्येक वेळी आपल्या तोंडचे घास गरजवंतांच्या ताटात वाढत आला आहे. मुस्लिमबहुल भागांत भिकारी जास्त दिसण्याचे मुख्य कारण हेच आहे. जितकी भीक त्यांना मुस्लिमबहुल भागांत मिळते तितकी भीक साऱ्या शहरात फिरूनही मिळत नाही. म्हणून अनेकांनी 'भीक' मागण्याला प्रोफेशन बनवले आहे. असो.
तर विषय असा आहे की कोरोनामुळे बंद पडलेल्या समाजातील उपेक्षित आणि गरजू गटाला स्वतःहून अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी देशातील मुस्लिम समाज आणि त्यांच्या संघटना धावून आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुन्नी दावते ईस्लामी, दावते ईस्लामी, रजा अकादमी, अहेले सुन्नत रिसर्च सेंटर सारख्या संघटनांनी अन्नधान्य आणि मूलभूत वस्तूंच्या पुरवठ्याची मिहिमच उघडली आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर मुस्लिमांच्या अनेक सेवाभावी संस्था शेकडोंच्या संख्येने मूलभूत वस्तूंच्या पाकिटांचे वितरण करीत आहेत. मागील ७ दिवसांत केवळ मराठवाड्यात शेकडो नव्हे हजारो लोकांना किमान एक महिन्याच्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
फरक मात्र इतकाच आहे की मुस्लिमांना आपल्या कार्याचा गाजावाजा करता येत नाही. मुळात गाजावाजा करण्याचा स्वभाव इस्लामने त्यांच्यात निर्माण होऊच दिला नाही. नाहीतर चार एक लोकांची संघटना बनवून, पाच दहा लोकांच्या मदतीचे फोटोसेशन करून, दहावीस वृत्तपत्रात प्रसिद्धी देणे यात मुस्लिमांना न जमेल असे काय आहे? फक्त आणि फक्त अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी खर्च करणारा मुस्लिम समाज गुप्तपणे खर्च करण्यावर आजही ईमान राखून आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुरप्रसंगी अनेकांना याची प्रचिती आली होती.
असे असताना एकीकडे मस्जिदीत नमाज अदा करणाऱ्या अपवादात्मक उदाहरणांवर तोंडसुख घेणारे मुस्लिम समाजाच्या या दानकार्यावर मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. दगडालाही पाझर फुटावा अशा कठीण परिस्थितीत हे धार्मिक द्वेष पसरविणारे मानव रुपी सैतान द्वेष आणि तिरस्काराचा व्यापार करीत आहेत. तर दुसरीकडे बाजारपेठेवर नियंत्रण असणारे, गुणाकाराचा व्यापार करणारे अहिंसावादी नफेखोर साठेबाजी करीत आहेत. तर तिसरीकडे न्यूनगंड बाळगण्यात समाधान बाळगणारे चाटूगामी मुस्लिम या दानकार्याला हिणवत आहेत. त्यांच्या मते मुस्लिम दानकार्य तर करावे, परंतु मुस्लिम म्हणून करू नये. व्वा! दास्यतेचा हा बिंदू गाठणे त्यांना कसे काय शक्य होते? हा प्रश्न मला नेहमी पडतो. आपले स्वाभिमान विकल्याशिवाय हे शक्य नाही. त्यांच्या अनुसार मराठा मोर्च्यात मुस्लिमांनी पाणी वाटावे, बहुजन मोर्च्यात बिस्कीट खाऊ घालावे, एखाद्या सामाजिक आंदोलनात सतरंज्या उचलाव्यात; मात्र मुस्लिम म्हणून नेतृत्वाच्या भूमिकेत येऊ नये.
असा न्यूनगंड बाळगणाऱ्यांना त्यांच्या मुस्लिम असण्याची इतकी लाज वाटत असेल तर त्यांनी मुकाट त्यांना हवा तो धर्म स्वीकारून आपले न्यूनगंड झटकावे. परंतु त्यांची मानसिक गुलामी समाजावर लादण्याचे पातक करू नये. जेव्हा मुस्लिम समाजाच्या चुकांवर टीका करताना त्यांचे मुस्लिम असणे अधोरेखित केले जात असेल तर त्यांच्या लोककल्याण कार्याचा उल्लेखही त्यांच्या मुस्लिम असण्याचा उल्लेख करूनच केला जाईल. जेव्हा अपवादात्मक ठिकाणी जमा होणारे मुस्लिम मुस्लिम म्हणून टीका केले जात असतील तर त्यांच्या समाज कार्याला देखील मुस्लिम समाजाचे समाजकार्यच म्हटले जाईल.
HK Ltd.