DNA News

DNA News Updated News for Society and Nation.

विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी:- डॉ. उदय मोहिते .....'केशवराज'मध्ये संस्था वर्धापनदिनानिमित्त ग...
28/06/2025

विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी:- डॉ. उदय मोहिते .....
'केशवराज'मध्ये संस्था वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न......
लातूर, २८जून : सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे तसेच व्यसन करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे आजार, मानसिक आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून ध्येयाकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक, अधिष्ठाता, कै. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर डॉ. उदय मोहिते यांनी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त २८ जून २०२५ रोजी लातूर येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने दयानंद सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रात कला, क्रीडा क्षेत्र, संस्कृती ज्ञान परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डाॅ. उदय मोहिते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज शैक्षणिक संकुल स्थानिक समन्वय समिती, अध्यक्ष मा. धनंजय तुंगीकर तर विशेष अतिथी, पर्यावरण रक्षक व सामाजिक कार्यकर्ते, बारीपाडा, धुळे पद्मश्री चैत्रामजी पवार, विशेष उपस्थित वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ह. भ.प. दत्तात्रय पवार तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जितेश चापसी, संजय गुरव, विष्णू सोनवणे, विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे, स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शैलेश कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर, केशव शिशुवाटिका शालेय समिती अध्यक्षा वर्षाताई डोईफोडे, श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे प्राचार्य महेश बांगर, केशव शिशु वाटिका प्रधानाचार्या अवंती कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री चैत्रामजी पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफीत दाखवून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. उदय मोहिते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलसारख्या बॉम्ब पासून दूर राहावे. आई-वडिलांच्या आज्ञेत रहावे आणि गुरुजनांचा आदर करावा. शाळेतून बाहेर पडताना चांगल्या आठवणी घेऊन बाहेर पडा, चांगल्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विशेष अतिथी म्हणून पद्मश्री चैत्रामजी पवार यांनी आपल्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याचा व सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला. वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात येऊन पर्यावरण रक्षणाचे कार्य कशाप्रकारे सुरू केले हे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपण ज्या गावातून आलोत, त्या गावाच्या विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात धनंजय तुंगीकर यांनी केशवराज संकुलाचे वेगळेपण सांगून संकुलातील शिक्षकांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सांगितले. तसेच ही संस्था आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करीत असून भारतमातेसाठी आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणारी एक पिढी घडवत आहे असे सांगितले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्था माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर शैलेश कुलकर्णी यांनी संस्था परिचय दिला. कु. अदिती बादाडे, चि. श्रेयश कंधारकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी तसेच विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजस्विनी सांजेकर व प्रदीप कटके यांनी केले. दहावी प्रमुख शैलजा कुलकर्णी व सहप्रमुख श्री संजय आढाव यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. याप्रसंगी महेश काकनाळे यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी विद्यार्थी, संघ पदाधिकारी, सर्व निमंत्रित पालक, विद्यार्थी, नातेवाईक, संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

11/06/2025

शिक्षक प्रशिक्षणामधून शिक्षकांची क्षमता वृद्धी व कौशल्यांचा विकास साधणार; जगाच्या पटलावर भारतीय विद्यार्थी आपल्या बुद्धीने कर्तुत्वाची छाप नक्कीच उमटविणार: भागीरथी गिरी, प्राचार्य, डायट लातूर

11/06/2025

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राबवणुकीमुळे देशातील मनुष्यबळ उच्च दर्जाचे निर्माण होणार; आगामी काळात जगात देशाचा नेतृत्व करण्यासाठी युवक सक्षम:- भागीरथी गिरी, प्राचार्या, डायट लातूर

वर्षा ठाकुर घुगे: दांडगा जनसंपर्क, उत्तम प्रशासक विकासाभिमुख जिल्हाधिकारी.....लातूर (उध्दवबापु फड) : नवनिर्मितीचे बीजांक...
09/06/2025

वर्षा ठाकुर घुगे: दांडगा जनसंपर्क, उत्तम प्रशासक विकासाभिमुख जिल्हाधिकारी.....
लातूर (उध्दवबापु फड) : नवनिर्मितीचे बीजांकुर आपल्या उदरात ठेवून नव्या जीवनाला आयुष्य देणारी प्रत्येक महिला ही 'फर्स्ट लेडी' असते. कारण प्रत्येक वेळी आपले आयुष्य पणाला लावून ती नवजीवन देते. स्त्रियांनी आज जवळजवळ सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये पुरुषवर्गच मोठ्या प्रमाणात कार्यरत असायचा अशा क्षेत्रांमध्येही स्त्रियांनी आपली सहभाग नोंदवून इतिहासाला नवी दिशा दिली. हा इतिहास घडवणाऱ्या महिलांचा प्रवास थक्क करणारा आहे.
महिलांमध्ये अंगभूत शक्ती सर्जनशीलता आणि असामान्य कर्तृत्व गाजवण्याची क्षमता अपार आहे.महिलांना कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळाली की त्या संधीचे सोने करतात हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याप्रमाणेच लातूर जिल्ह्याच्या इतिहासात व महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी म्हणून कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेल्या कर्तृत्ववान जिल्ह्यधिकारी वर्षा ठाकुर -घुगे.....
मला भावलेला एक असामान्य व्यक्तिमत्व...

*परिदों को मंजिल मिलेगी यकीनन*
*ये फैले हुए उनके पर बोलते है*
अक्सर वो लोग खामोश रहते है*
*जमाने मे जिनके हुनर बोलते है..*

अशा व्यक्तीमत्वाचा आज 10 जून रोजी जन्मदिन.त्या औचित्याने सजग प्रशासक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रसिद्ध वक्ते संवादतज्ञ उध्दव बापु फड यांनी केला आहे..

वर्षा ठाकूर यांचा जन्म 10 जून चा. त्यांच्या 40-50 वर्षांच्या काळातील त्यांची वाटचाल माणूस म्हणून ,व्यक्ती म्हणून, सनदी अधिकारी म्हणून अतिशय दमदार, कार्यनिष्ठ आणि संवादी राहिली आहे. प्रत्येक माणसाचं एक व्यक्तित्व असतं. एक स्वतःची ओळख असते. तशीच वर्षा ठाकूर घुगे यांची आहे.
वर्षा ठाकूर-घुगे हे नावच काफी आहे. या नावात एक सकारात्मकता आहे. हीच सकारात्मक ऊर्जा त्यांच्या संबंध आयुष्याच्या वाटचालीत दिसून येते.कुठल्याही आयएएस अधिकाराच्या जीवनात डिस्ट्रिक्ट कलेक्टर - जिल्हाधिकारी पद अत्यंत महत्वाचं समजल्या जातं. हे पद जितकं मानाचं, सन्मानाचं असतं, तितकंच ते जबाबदारीचं असतं. आपल्या लोकाभिमुख, अभिनव कल्पना, उपक्रम अधिकारी या पदावर राबवू शकतात. अशा या जिल्हाधिकारी पदावर त्यांनी जूलै २०२३ रोजी लातूर येथे सूत्र हाती घेतली
आपल्या कार्याप्रती प्रचंड निष्ठा आणि हाती घेतलेले काम नेटाने पूर्ण करायचे त्यासाठी संवाद सूत्र प्रभावीपणे वापरून कार्यक्षमतेतून गतीमान प्रशासन देणाऱ्या लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आहेत.
वर्षा ठाकूर-घुगे यांचा प्रशासकीय दिनक्रम पहाटे चार ते रात्री 12 -1 पर्यंत असतो. सतत प्रशासकीय चिंतन करून त्यावर मार्ग शोधण्याचा त्यांचा ध्यास त्यांच्या सह्दयी व्यक्तिमत्त्वातून दिसून आला आहे. आठ ते दहा तास नॉनस्टॉप बैठका, नॉन स्टॉप आढावा पाहताना त्यांच्या स्मरणाबद्दल चकित व्हायला होतं .
सामान्य माणूस केंद्रस्थानी माणून सुसंवादी आणि डेडलाईनमध्ये नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. त्या सतत आव्हान लीलया पेलण्याच्या सहज वृत्तीत आणि हसतमुख असतात. म्हणून एका गतीचं किंबहुना एका उत्कृष्ट प्रशासनतत्वाचे नाव वर्षा ठाकूर-घुगे आहे.
लातूर जिल्हाभर झंजावाती दौरे, बैठका कामाचे योग्य नियोजन करून जिल्ह्याचे रूप एक उत्कृष्ट जिल्हा म्हणून तयार करण्यसाठी मनापासून प्रयत्न करत असतात...

*जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले आहेत*.

लातूर जिल्हयाच्या ४० वर्षाच्या इतिहासात व महाराष्ट्रात एकाही जिल्हाधिकारी यांच्या काळात झाले नसतील ऐवढे विकासाभिमुख उपक्रम व महत्वपूर्ण कामे झाली आहेत.यात.लातूर जिल्हात त्यांनी वृक्षारोपण मध्ये माझं लातूर हरित लातूर अंतर्गत गेल्या दिड वर्षात ३५ लाख झाडांची लागवड केली.स्वच्छता अभियान (Clean India Mission), लोकसभा व विधानसभा निवडणुका, मतदान टक्का वाढण्यासाठी मतदार जागृती अभियान, 'कॉफी विथ कलेक्टर', बेरोजगार यांच्या साठी मराठवाडा महारोजगार मेळावा महासंसस्कृती महोत्सव,१०० वे अखिल भारतीय नाट्य संमेलन, राष्ट्रपती दौरा,जिल्हा विकास निर्देशांक, संविधान दिन आणि गुणवत्तापूर्ण कामासाठी प्रशिक्षण,गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार अभियान,१०० दिवस कार्यक्रम १०० दिवसांच्या शासकीय सुधारणांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनातून लातूर जिल्ह्याला यश मिळाले.लातूर जिल्ह्यातील २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरीसाठीशासनांकडून गौरवण्यात आले — महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कारागृह, पशुसंवर्धन, माहिती, सामाजिक न्याय आणि अनेक इतर क्षेत्रांतील सशक्त योगदान!

कामगिरीतून मिळालेला सन्मान… लातूरचा अभिमान!”

ही केवळ पुरस्कारांची यादी नाही, तर लातूर प्रशासनातील प्रेरणादायी कार्यसंस्कृतीची जिवंत झलक आहे. लातूर जिल्ह्याने जिल्हा विकास निर्देशांकात पहिला क्रमांक पटकावला आहे! हा केवळ एक क्रमांक नाही, तर लातूरच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा, कष्टाळूपणाचा आणि प्रगतीसाठीच्या अविरत धडपडीचा सन्मान आहे. विकासाच्या १२ महत्त्वाच्या आधारस्तंभांवर उभारलेला हा यशाचा किल्ला – आर्थिक मजबुती, औद्योगिक विस्तार, रोजगार निर्मिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भक्कम पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण यांसारख्या घटकांनमूळे हा सन्मान संपादन केला आहे. शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण, दरडोई वीज वापर, आरोग्य सुविधा आणि कायदा-सुव्यवस्थेतील प्रगती – हे सर्व दाखवते की लातूर भरभराटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख नाही, तर संपूर्ण लातूरवासियांची , लोकप्रतिनिधी समवेत जिल्ह्याच्या सामूहिक मेहनत आणि समर्पणाची फलश्रुती आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे आणि लोकसत्ता समूहाच्या अभ्यासपूर्ण संशोधनाने विकासाचा स्पष्ट मार्ग आखून दिला.
पण या सगळ्यात खरा विजय आहे लातूरकरांचा काॅपीमुक्त परीक्षा पॅटर्न लातूर जिल्ह्यात 100 केंद्रांवर बारावीची परीक्षा व 37,062 विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षेच्या सुरळीत आणि कॉपीमुक्त आयोजनासाठी 100 बैठे पथके, 90 भरारी पथके आणि सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात आली आहे. कंट्रोल रूममधून परीक्षा केंद्रांशी व बैठे पथकांशी संवाद साधत सतर्कतेच्या सूचना दिल्या. तसेच विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यांसारखे उपक्रम राबवले आहेत.

*कामाच्या जोरावर मिळालेले पुरस्कार*
👉प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल मराठवाडा समन्वय समितीमार्फत 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा भूषण पुरस्कार -2024 पुणे बालगंधर्व नाट्य मंदिर येथे मला प्रदान करून गौरविण्यात आले.

👉लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल #लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार २०२५

👉. मानव विकास निर्देशांक पुरस्कार २०२३-२४: लातूर जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकात (HDI) उल्लेखनीय योगदानाबद्दल लोकसत्ता कडून प्रदान.
👉राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार: स्कोच पुरस्कार (राष्ट्रीय स्तरावर): दिव्यांग समुदायासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल.
👉सैनिक कल्याण निधी संकलन पुरस्कार: महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान.

👉विकास कामगिरी-आधारित

मान्यता-२०२४-२५: गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (पुणे) कडून 'जिल्हा निर्देशांक' उपक्रमात अव्वल क्रमांक: लोकसत्ताच्या 'जिल्हा निर्देशांक' उपक्रमाचा भाग म्हणून, लातूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना सन्मानित करण्यात आले. अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

08/06/2025

विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांना होणार: प्रशांत मुगळे, प्रशिक्षक

08/06/2025

21 व्या शतकातील नवनवीन कौशल्य आत्मसात करणारा विद्यार्थी शिक्षक प्रशिक्षणातून घडणार: वैशाली चव्हाण प्रशिक्षक

06/06/2025

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत लातूरच्या युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीचे यश.....
लातूर : नेपाळची राजधानी काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या ८ खेळाडूंनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारामध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले. यात लातूरच्या युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीच्या कराटेपटूनी चमकदार अशी कामगिरी केली आहे.

काठमांडू येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन नेपाळचे उपपंतप्रधान प्रकाश मानसिंग, नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष सांगा महाराजन व नेपाळ कराटे फेडरेशनचे अध्यक्ष युवराज लामा हस्ते झाले. या स्पर्धेत काता व कुमिते अशा दुहेरी प्रकारांमध्ये लातूरच्या

युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीच्या करण भाऊराव पवार -सुवर्ण पदक , सम्राट राजभाऊ सूर्यवंशी-सुवर्ण पदक , शिवम वाल्मीक सोमवंशी-सुवर्ण पदक, आदित्य राम जगदाळे-सुवर्ण पदक, गौरव प्रकाश कोरे -रौप्या पदक, अतुल बब्रुवान
जाधव-सुवर्ण पदक, यश विजय चौगुले -रौप्या पदक, अजिंक्य गौतम कांबळे -रौप्या पदक यांनी घवघवीत यश संपादन केले. अटीतटीच्याच्या अंतिम खुल्या काता स्पर्धेत लातूरच्या करण भाऊराव पवार याने नेपाळ संघाच्या दिपक थारू याला १२ गुणांनी नमवून प्रथम क्रमांकासहीत सुवर्ण पदक पटकाविले. या सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शिहाण तुषार अवस्थी यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

06/06/2025

शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांचा शिक्षकसेनेच्या वतीने सत्कार ......
लातूर (प्रतिनिधी):- लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत गरड, पत्रकार दीपक क्षीरसागर, सूर्यकांत बाचिपळे आणि गंगाधर दाबे उपस्थित होते.

06/06/2025

आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षकांना समृध्द करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ नक्कीच होणार: दिलीप कानगुले, प्रशिक्षक, यशवंत विद्यालय, लातूर

Address

Shivgiri Colony
Ausa
413520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DNA News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share