Badlapur Vikas

Badlapur Vikas Nr. 320201010035829
IFSC - UBIN0532029

Leading News media of Maharashtra...
BADLAPUR VIKAS
PRESS - 9167689181

Official Mail : [email protected]
Keep Journalism non baised and FREE donate us
XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
Bank Ac.

05/11/2024

Extremely sorry to Indian government and PM Modi and there Other leaders that we wrote several articles in Badlapur vikas We have no intention to damage image of India

24/09/2024

महाराष्ट्र पोलीस खात्याने यापुढे विठ्ठलाचं नाव पोलीसी जाहिरातीसाठी सोशल मिडियावर वापरणं बंद करा

पंढरपुरातील भक्तांची मागणी

पंढरपुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्याकडून ज्याप्रकारे एका आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आले त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र आणि देशभरात महाराष्ट्र पोलीस खात्याविषयी जोरदार टिका सुरु आहे. विशेष म्हणजे आता पंढरपुरातुन विठ्ठल भक्तांनी देखील पोलीसांवर नाराजी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र पोलीसांनी यापुढे स्वतःचे व्हिडीओ, पोलीसांचे व्हिडीओ आणि पोलीसी जाहिरात विठ्ठल विठ्ठल असे म्हणत आमच्या पवित्र असे विठ्ठल रुकुमाईंचे नाव खराब करु नये अशी मागणी भक्तांकडून होत आहे.

महाराष्ट्र पोलीस माहील काही वर्षांपासुन आपल्या सोशल मिडियावर पोलीसांची जाहिरात करतांना जनतेत भावनीक होण्यासाठी तसेच जनतेला भावनिक दृष्ट्या आकर्षण करण्यासठी पोलीसांच्या चित्राच्या बैगराऊंडमध्ये विठ्ठल रुकमाईंचे गाणे चालवतात. जणु हे महाराष्ट्र खात्यातील पोलीस विठ्ठलाच्या रुपाने पिडीतेच्या मदतीसाठी आले असा दाखवुन देण्याचा अनेकदा महाराष्ट्र पोलीस खात्याकडून सोशल मिडियाद्वारे प्रयत्न केला जातो. परंतु नुकताच ज्याप्रकारे महाराष्ट्र पोलीस खात्याकडून मोठा कांड आणि त्या कांड मधून अल्पवयीन मुलींवरील होणारे अत्याचार हा तपास पुर्ण होण्याआधिच आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करुन त्याला संपविल्याने महाराष्ट्र पोलीस खात्यावर सर्वच स्तरातुन जोरदार टिका होत आहे. विठ्ठल रुकमाई हे आपल्या पवित्रामुळे त्या देवी देवतांची ओळख आहे. त्यांना माननारा वर्ग प्रामाणिकपणे व अहिंसक आहे परंतु सध्याची महाराष्ट्र पोलीस खात्याचे कारस्थान हे अप्रामाणिक व हिंसक असल्याने विठ्ठल रुकमाईला आता तरी बदनाम करणे बंद करा अशी मागणी होतांना दिसुन येते.

बदलापुर बलात्कारी अक्षय शिंदे याचा ज्याप्रकारे नाट्यमय एन्काऊंटर मुंंब्रा बाईपास हायवे याठिकाणी पोलीसांच्या व्हॅनमध्ये करण्यात आला त्यामुळे पोलीस प्रशासनाला कायद्याची आणि न्याय पालिकेची कोणतीच भिती नाही हे दिसुन आले. पोलीसांच्या ताब्यातुन बंदुकितुन आरोपी पिस्तुल हिसकाऊन पोलीसांच्या मांडीवर गोळी झाडतो आणि पोलीस आरोपीच्या डोक्यावर गोळी मारते हे न पचण्यासारखा विषय आहे. त्यामुळे हे एन्काऊंटर कि फेक एन्काऊंटर असेही बोलले जाते. मुळात आरोपी अक्षय शिंदे सह इतर आरोपी देखील या गुन्ह्यात संबंधीत असुन अनेक आरोपी हे भाजप पदाधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यासाठी पोलीसांने मुख्य आरोपीला संपविले असा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस खातं आता चांगलंच बदनाम झालय.

आधिच महाराष्ट्र आणि भारतातील मानवाधिकार संघटनेचं जगभर नाव खराब आहे व आता या घटनेमुळे मानवाधिकारी संघटना पोलीसांवर कारवाईसाठी कोणते पाऊल उचलते यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

24/09/2024

भाजप नगरसेवकांचं हेंद्रपाड्यात फुगडी घालुन एन्काऊंटर साजरा

बदलापुर शहरात आजही अनेकांमध्ये मानवाधिकार बाबत शुन्य ज्ञान

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- काल दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलीसांनी बलात्कारीचे आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा येथील कारागृहातुन दुसर्या गुन्ह्याच्या तपासासाठी ट्रान्सिट ने आणत असतांना मुंब्रा बायहास हायवेवर एंकाऊंटर केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती व घडलेला प्रकार पाहिल्यावर सर्वचजण हे महाराष्ट्र पोलीस खात्याकडून फेक एंकाऊंटर करण्यात आले आहे असे समजते. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात व देश भरात भारतीय पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आणि टिका होत आहे.
हे असे होत असले तरी ज्या शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली त्या शहरातील भाजप पक्ष मात्र या संधीला अतिशय चांगल्या प्रकारे राजकारणात वापरत असल्याचे दिसुन आले. भाजप वरिष्ठ नगरसेवक व पालिकेतील इमारतीच्या घोटाळ्यातील आरोपी (जामिनावर बाहेर असलेले) राजेंद्र घोरपडे, त्यांच्या पत्नि व माजी नगरसेविका भाजप पदाधिकारी रुचिता घोरपडे, सौ. निशा घोरपडे, सौ. अंकिता घोरपडे, अशोक घोरपडे, अण्णा कुलकर्णी व इतर भाजप पदाधिकारी हेंद्रेपाड्यातील आर्ट गॅलरी जवळ फटाक्याची आतिशबाजी करत अक्षय शिंदे याचा मृत्यु साजरा करत आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी परिसरातील नागरिकांना आकर्षण करण्यासाठी स्विकर वगैरे लाऊन सरकार व पोलीसांकडून कशाप्रकारे चांगले काम करण्यात आले हे सांगण्याचा भाजप पदाधिकार्यांनी प्रयत्न केले. भाजप बदलापुर महिला नगरसेविकांनी फुगडी घालत आपला आनंत व्यक्त केला.

भाजप महिला नगरसेविका रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देतांना सांगितले कि, खुप आनंद झाला आहे. शेवटी आमच्या कायद्यामध्ये फाशीची तरतुद नाही आहे हे आम्हाला माहित होत, लोकशाही तंत्र आहे आपल्याकडे पण सगळ्यांची मागणी होती कि अश्या कृत्य करणार्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचं आयुष्य संपलं पाहिजे आणि सगळ्यांचीच मागणी होती. खुप मोठं आंदोलन बदलापुरात झालं होत. सरकारचेे पण खुप धन्यवाद त्यांनी हा निर्णय घेतला.

महिला नगरसेविका सौ. निशा घोरपडे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेत आंदोलनकर्त्या महिलांचे आभार मानतत आज त्यांच्या आंदोलनाची चिज झाली अक्षय शिंदे एंकाऊंटरमुळे असे सांगत महिलांना ज्याप्रकारे लाडकी बहिण योजनेमार्फत पैसे मिळाल्यावर आनंत होतो अगदी त्याचप्रमाणे एंकाऊंटरच्या बातमीमुळे आनंद झाला आहे असे त्या म्हणाल्या.

एका स्थानिक महिलेने अतिशय आकर्षक अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या कि अशाच प्रकारे जे पेंडींग गुन्हे ज्यांच्यावर ही आहे त्यांनाही अशीच शिक्षा झाली पाहिजे.

त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणींनी व विद्यार्थींनी सांगितले कि, पोलीसांची जे केलं ते योग्य होतं व यामुळे भविष्यात कोणी छेड काढणार नाही मुलींची.

ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व कांग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांवर टिका करत पोलीसांनी जे काही केलं ते योग्य असे म्हणत विरोधी पक्षाने सुद्धा पोलीसांचे मनोबल वाढविले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.

विशेष म्हणजे हे तेच राजेंद्र घोरपडे आहेत ज्यांच्यावर कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या इमारतीच्या घोटाळ्याचे आरोप लागले होते व आर्थिक घोटाळ्यात गुन्हा दाखल होता. त्यावेळी शहरातील नागरिकांनी भ्रष्ट नेत्यांविषयी संताप व्यक्त केले होते व राजेंद्र घोरपडे अटकपुर्व जामिन मिळवण्यासाठी फरार झाले होते. बदलापुरातील जागृक नागरिकांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले कि, जर पोलीसांनीच न्यया द्यायचं असेल तर कुळगांव बदलापुर नगरपरिषदेत आजवर ज्या ज्या नेत्यांनी घोटाळे केले, जनतेच्या पैश्यांचा अपहार केला त्यांना ही एंकाऊंटरमध्ये ठार केलं तर चालेल का? त्यावेळेस राजकिय नेत्यांना कायद्याची आठवण येते आणि न्यायपालिकेत जामिन मागण्यासाठी जातात आणि तोच गुन्हा एखाद्या पैश्याने कमी असलेल्याने केला ज्याची जामिन घेण्याची किंवा कोर्टात वकिल नेमणुक करण्याची ऐपत नाही तर त्याला जन्मठेप ऐवजी पोलीसांकडून फेक एंकाऊंटर मध्ये मारुन टाकणे हे कितपत योग्य आहे.

हेंद्रेपाड्यातील इतर ही नागरिकांनी दबक्या आवाजात म्हटले कि, आज ज्याप्रकारे अक्षय शिंदेच्या मृत्युवर इथे ढिंगाणा सुरु आहे त्याने खरोखरच पिडीतेला व तिच्या कुटुंबियाला न्याय मिळणार आहे का? हेंद्रेपाड्यात ज्याप्रकारे विविध समस्या रहिवाश्यांना भेडसावत आहेत ते जर यापुढे समस्या सुटले नाही तर जनतेने देखील त्या त्या स्थानिक लोकप्रतिनिधींची आणि पालिकेतील अधिकार्यांची एंकाऊंटर करण्याची मागणी केली तर चालेल का?

एकुणच फेक एंकाऊंटरने दोषी जरी मेला तरी दोष काही मरत नाही. दोष मिटवण्यासाठी कायद्याप्रमाणेच न्याय मिळते. आज ज्याप्रकारे बदलापुरचे भाजप पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहेत त्यातील एकही लोकप्रतिनिधी जेव्हा बलात्काराची घटना घडली व सामान्य नागरिक बदलापुर रेल्वे स्थानकात उतरुन आंदोलन करत होते त्यांच्या पाठींबा देण्यासाठी आले नव्हते. म्हणजे तुम लढो हम कपडा संभालते है जी अवस्था बदलापुरातील भाजप कडून पाहायला मिळते. आंदोलन करणारे आज ही अनेक जर तुरुंगात व बलात्काराच्या मृत्युच्या बातमीने मात्र स्थानिक पातळीवर राजकारण आणि प्रसार कार्य सुरु असुन ह्यामुळे स्थानिक मतदारांना राजकारणी समजतात तरी काय? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

विशेष म्हणजे जल्लोष करणार्या एकाही व्यक्तिने अद्याप त्या भाजप पदाधिकार्यांकडून चालवण्यात येणार्या आदर्श शाळेतील विश्वतांना अटक करा अशी मागणी केलेली नाही. त्यामुळे हा खरोखरच पिडीतेच्या न्याय देण्यासाठी जल्लोष कि राजकिय पोळी भाजण्यासाठी असा प्रश्न आता जागृक नागरिक विचारत आहेत.

23/09/2024

मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- प्रत्येक वाईटातुन ही चांगलं घडलं ह्या म्हणी प्रमाणे आता आंतरराष्ट्रीय मानवाधिक....

23/09/2024

भारतात बलात्कार आरोपीला खोट्या एंकाऊंटर मध्ये हत्या करण्याची भारतीय पोलीसांची परंपरा

बदलापुर सारखीच हैंदराबाद मध्ये ही घटना 2019 साली घडली होती शेवटी पोलीसांविरोधात सुप्रिम कर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल

हैदराबाद (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच ठाणे जिल्ह्यातील बदलापुर बलात्कार प्रकरणात आज ज्या आरोपीकडून गोळीबार आणि एंकाऊंटरचे नाटक झाले त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांसह संपुर्ण भारतातील पोलीसांच्या फेक एंकाऊंटर विषयी चर्चा सुरु झाली आहे.

बदलापुरात अल्पवयीन मुलीवर भाजप पदाधिकार्याच्या संचालित शाळेतील सफाई कामगाराकडून बलात्कार करण्यात येतो आणि सत्ताधार्यांवर नागरिक नाराज दिसुन आल्याने नागरिकांना भावनिक दृष्ट्या खुश करण्यासाठी पुन्हा एकदा पोलीसांचा गैरफायदा घेण्यात आला आहे अशी चर्चा आहे. पोलीसांनी ज्याप्रकारे घटनेचे वर्णन केले आहे कि बलात्कारी आरोपीला कोर्टात नेत असतांना पोलीसांची पिस्तुल हिस्काऊन स्वतःवर गोळीबार करत आत्महत्येचा प्रयत्न केला हा विषय अद्याप महाराष्ट्रातील जनतेला न पटनारा विषय आहे. त्यामुळे सदर प्रकरणाला फेक एंकाऊंटरचे नाव देण्यात येत असुन सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. बदलापुरातील बलात्कार प्रकरणाची झालेल्या घटनेनंतर संपुर्ण भारतातील पोलीसी प्रक्रियेवर जागतिक पातळीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

बदलापुर प्रमाणेच काही वर्षांपुर्वी हैदराबाद येथील पोलीसांनी देखील अगदी अश्याच प्रकारे एंकाऊंटरचे नाटक रचत 4 आरोपींची हत्या केली होती. हे आम्ही आरोप करत नाही तर उच्च न्यायालयात आणि सुप्रिम कोर्टात हे सिद्ध झाले आहे कि पोलीसांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत खोटा एंकाउंटर मांडत 4 व्यक्तिंचे बळी घेतले. सध्या दोषी पोलीसांवर तपास सुरु असुन बदलापुर प्रमाणे हैदराबाद मध्ये ही झालेल्या घटनेनतर भारतात पिडीत महिलांना व अल्पवयीन मुलींना न्याय मिळत नाही परंतु प्रत्येक संधीच राजकिय नेते आणि भ्रष्ट पोलीस आपली पोळी भाजतांना दिसत असल्याचे समजते.

दि. 6 डिसेंबर 2019 रोजी तेलंगाणा पोलिसांकडून (हैदराबाद शहर विभाग) 4 बलात्काराच्या आरोपात अटक आरोपींवर घटनास्थळी पंचनामाच्या बहाण्याने तेथे घेऊन जाऊन त्याचठिकाणी गोळ्या झाडून एंकाऊंटर करण्यात येते. विषय होता एका 26 वर्षीय नर्सिगच्या विद्यार्थीनीचा हैदराबाद जवळील शमशाबाद याठिकाणी अज्ञातांनी गैंगरेप केले होते. या घटनेनंतर संपुर्ण शहरात व राज्यात हाहाकार माजले होते व सत्ताधार्यांवर तसेच पोलीस प्रशासनावर नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त केले होते. त्यावेळी परिस्थिती पाहिल्यानंतर सायबराबाद मेट्रोपोलिटन पोलिसाने 4 तरुणांवर संशय घेत अटक केले होते. ह्या तरुणांनी बलात्कार केला किंवा नाही या दुसर्याच विषय. पोलिसांना फक्त एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले ज्यामध्ये हे चार तरुण जात होते त्या माहितीवरुन त्यांनी चारही आरोपींना अटक केली व नंतर एंकाऊंटर केले. त्यावेळी पोलीस आपल्या जबाबात म्हणतात कि, आरोपींनी पळण्याचा तसेच पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बचावाखातर नाइलाजाने आरोपींवर गोळ्या झाडण्यात आले. तेवढेच नाही तर तेलंगणा राज्यातील काही मुर्ख नागरिकांनी घटनेबाबत काहीही विचार न करता थेट पोलीसांचाच सत्कार करुन त्यांना डोक्यावर बसुन घेण्याचे काम केले. यामुळे एंकाऊंटर करणारे पोलीस ही त्यावेळी त्या मुर्ख जनतेवर गालातल्या गालात हसतांना दिसुन आले.

एंकाऊंटर मध्ये मृत्यु झालेल्यांचे त्याच दिवशी शासकिय रुग्णालयात पोस्ट मार्टम उरकण्यात आले आणि गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु पोस्टमार्टर मध्ये अनेकांना शंका होती त्यामुळे तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा 21 डिसेंबर रोजी पोस्टमार्टम करण्यात आले.

विषय फेक एंकाऊंटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिडियाने बातमी करण्यास सुरुवात केली, पिडीतेच्या कुटुंबियांनी देखील न्याय मागण्यासाठी पाटपीट केली. 2022 साली सुप्रिम कोर्टाने चौकशीची कमिटी स्थापन केली आणि चौकशीत हे निष्पन्न झाले कि पोलीसांकडून खोट्या पद्धतीने एंकाऊंटरचा बनाव करण्यात आला व चारही तरुणांची हत्या करण्यात आली. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश व्ही.एस. सिरपुरकर यांनी तेलंगाणा उच्च न्यायालयाला पोलीसांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

धक्कादायब बाब म्हणजे आज वर्ष 2024 संपण्यावर आहे परंतु तेलंगाणा हाई कोर्टाने अद्याप पोलीसांवर कारवाई केले नाही. उलट पिडीतांच्या कुटुंबियांना अश्या प्रकारे दबावतंत्राचा वापर करण्यात आला कि आता थेट कुटुंबियातील सदस्यच म्हणतात आम्हाला पोलीसांविरोधात तेलंगाणा उच्च न्यायालयात पीटीशन दाखल करायचे नाही. या त्यांच्या वाक्यातुन पुन्हा एकदा सिद्ध होते कि भारताची न्याय व्यवस्था आणि भ्रष्ट भारतीय पोलीसांची व्यवस्था करावी तितकी निंदा कमी आहे. 302 सारखा गुन्हा ज्या भ्रष्ट पोलीसांवर दाखल झाला आहे ते पिडीतेच्या कुटुंबियांना दबाव करण्यास घाबरत नाही यामुळे भ्रष्ट पोलीसांचा नेक्सस कुठ पर्यंत आहे हे अंदाज बांधका येईल. शर्मेची बाब म्हणजे जेव्हा पिडीतेच्या कुटुंबियांनी तेलंगाणा उच्च न्यायालयात पोलीसांविरोधात जाण्यास टाळले तेव्हा आरोपी पोलीसांचा बचाव करणारे सुप्रिम कोर्टात अर्ज दाखल करणारे पिटिशन दाखल करणार्या पोलीस विभागाने पिडीतांचे नाव वगळत फक्त स्वतःच्या विभागाच्या नावाने पिटीशन दाखल केले व सहाजिकच पिडीतेच्या कुटुंबियांनी जबाब न दिल्याने इंट्रीम निकाल भ्रष्ट पोलीस अधिकार्यांच्या बाजुने लागला. यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवर भारतीय नागरिकांनी किती विश्वास ठेवायला हवं हे त्यांचं त्यांनी ठरवावं. एंकाऊंटर मध्ये जीव गमावलेल्या तरुणांचे नाव मोहम्मद अरिफ, जोल्लु शिवा, जोल्लु नविन आणि चिंताकुंटा चेन्नाकेसवुलु असे आहे. या गुन्ह्यात एकुण 10 पोलीसांचा समावेश असुन एसआयटी मार्फत चौकशी झाल्यानंतर सुद्धा तेलंगाणा पोलीसांना त्यावेळी क्लिन चिट देण्यात आले होते हे पाहिल्यावर एसआयटी देखील खरोखरच प्रामाणिक पणे तपास करते कि फक्त नागरिकांच्या मागणीला तोंडपुसल्याचे काम म्हणुन एसआयटीच्या अधिकार्यांची नेमणुक होते हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. हैदराबाद काय आणि महाराष्ट्र काय एसआयटीच्या तपासात अनेक त्रुटी पाहायला मिळते.

विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर बलात्कारी अक्षय शिंदेला बळीचा बकरा करायचा आणि बलात्काराला शिक्षा दिली असे भासवुन मते मिळवायची या उद्देशाने सत्ताधार्यांनी पोलीसांकडून हे एनकाऊंटर केल्याची टिका आता संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून होत आहे.

विशेष म्हणजे या घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस खात्यावर कोणाचेही लगाम नाही असे म्हणण्याची वेळ आता अनेकांवर आली आहे. सन 2014 पासुन भारत नव्या भारताच्या वाटचालीसाठी आहे असे म्हणणार्या सत्ताधार्यांनी आता भारताला पाकिस्तानच्या आर्मि पद्धतीवर नेऊन ठेवले आहे असे सुज्ञ नागरिकांनी टिका करत मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान मध्ये सुद्धा अश्याच प्रकारे पोलीसी कारभार चालतो व पोलीसांच्या मनाप्रमाणे झाले नाही सेनेच्या मनाप्रमाणे झाले नाही कि एंकाऊंटर केले जाते. नाही तरी भाजपचे अनेक आमदार व खासदार ठोकून काढा, आमच्या एका शब्दावर माणुस कापले जाते, मशिदीतील महिलांना कापुन ठोकुन काढणार असे वक्तव्य करतांना आजिबात भित नाही. त्यामुळे आपला भारत देश आज खरोखरच महाशक्तिशाली होण्याच्या दिशेला जात आहे कि अराजक्ताच्या दिशेला हे आता मतदारांनीच आणि प्रत्येक भारतीयांनी ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा दो दिवस लांब नाही जेव्हा सामान्य पाणी प्रश्न आणि हक्क विचारणी केल्यावर ठोकले जाईल व एखाद्या खोट्या गुन्ह्यात नाव टाकत एंकाऊंटर केले जाईल. मुळात गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे परंतु पोलीसच जर गोळ्या झाडून न्याय देणार असेल तर न्याय पालिका कशासाठी? आणि न्याय देणारे हे पोलीस कोणत्या धुतल्या तांदळाचे आहेत हा मोठा प्रश्न आहे.

23/09/2024

हैदरााबाद (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच ठाणे जिल्ह्यातील बदलापुर बलात्कार प्रकरणात आज ज्या आरोपीकडून गोळीब.....

23/09/2024

बदलापुर पोलीसांची पुन्हा एकदा नाचक्की बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- अल्पवयीन मुलीचे बलात्कार करणारा अक्षय शिं....

23/09/2024

बलात्कार्याला आज ही भारतात न्याय पालिका शिक्षा देण्यास असमर्थ भारतातील खोट्या एंकाऊंटर ने होणारी हत्या कधी थां.....

23/09/2024

अक्षय शिंदेचा मृत्यु कि पोलीसांनी केलेल्या प्लानिंगने झालेली हत्या

बलात्कार्याला आज ही भारतात न्याय पालिका शिक्षा देण्यास असमर्थ

भारतातील खोट्या एंकाऊंटर ने होणारी हत्या कधी थांबणार?

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतीय न्याय व्यवस्थाची संपुर्ण भारत देशात दैयनिय अवस्था झाली आहे हे नुकताच बलात्कारी अक्षय शिंदेच्या गोळीबार आणि मृत्यु प्रकरणातुन दिसुन येते. भारत ज्या देशाला भविष्यातले महाशक्तीशाली होणारे देश म्हणुन सध्या भारतीय संबोधत असतात त्या भारत देशात न्याय व्यवस्थेतून एका बलात्कारीला योग्य शिक्षा देता येत नाही हे आज 23 सप्टेंबर 2024 रोजी दिसुन आले.

आज बदलापुर पोलीसांकडून बलात्कारी आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टात नेतांना कोर्टाबाहेर अक्षय शिंदेकडून गोळीबारचा प्रकार घडला. ज्यामध्ये अक्षय शिंदेने पोलीसांच्या ताब्यातील बंदुक हिस्काऊन गोळीबार केला व त्याला प्रतिउत्तर म्हणुन पोलीसांनी देखील गोळीबार करत अक्षय शिंदेला जखमी केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. बलात्कारीचा मृत्यु झाला म्हणुन अनेक जण खुष झाले असतील परंतु काय खरोखरच त्या पिडीत मुलीला न्याय मिळेला का ? हा विचार मात्र ठराविक लोकांना सतावत आहे.

भारतीय न्याय व्यवस्था आज एखाद्याने बलात्कार केल्यानंतर शिक्षा देऊ शकत नाही व कायद्याला बगल देत पोलीसांच्या खेळीनंतर खोटे एंकाउंटर करत आरोपीला शिक्षा दिली जाते असा आरोप आता नागरिकांकडून पोलीसांवर होत आहे. पोलीस ज्यांच्या ताब्यात असलेली बंदु आरोपी अक्षय शिंदे हिसकावतो हे एका चित्रपटाच्या सिनप्रमाणे आहे. नेटफ्लिक्स मधील काही एपिसोड पाहिल्यावर अगदी चांगल्या प्रकारे कळुन येईल कशाप्रकारे भारतीय पोलीस खोट्या एंकाऊंटरमुळे जागतिक पातळीवर बदनाम आहे. आज झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा भारतातीय पोलीसांकडून खोट्या एंकाऊंटरचे सत्र सुरुच असल्याचे पुन्हा एकदा बोलले जात आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर न्याय पालिका शिक्षा देऊ शकत नाही म्हणुन पोलीसांनी शिक्षा दिली असे म्हणुन जर काही मुर्ख भारतीय नागरिक पोलीसांचे कौतुक करत असतील तर त्यांना देखील माहित नाही भविष्यात हेच पोलीस त्या मुर्खांना देखील खोट्या एंकाऊंटर करतांना मागे पुढे पाहणार नाही. मुळात कायद्याप्रमाणे एखाद्याला शिक्षा देण्यात भारतीय न्याय व्यवस्था असमर्थ आहे हे पुन्हा एकदा आजच्या फेक एंकाऊंटरमुळे दिसुन आले.

या घटनेनंतर आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून भारतीय पोलीसांच्या कार्यप्रमाणीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मृत अक्षय शिंदे याची तातडीने पोस्टमॉर्टम करण्यात यावी तसेच पोस्टमॉर्टम करणार्या डॉक्टरांवर राजकिय आणि पोलीस दबाव होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसाार पोलीसांनी मागील अनेक दिवस बलात्कारी आरोपीला 10-10 तास मारहाण करत 23 सप्टेंबर रोजी कशाप्रकारे पोलीसाकडून बंदुक हिस्कावणे आहे याबाबत ट्रेनिंग दिले असा पोलीसांवर आता आरोप होत आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टम मधून आरोपीला पोलीस कोठडीत कशाप्रकारे मारहाण झाली तसेच गोळीबार झालेल्या ठिकाणी देखील फॉरेन्सिक रिपोर्ट तातडीने तपास करणे गरजेचे आहे कारण ह्या शिवाय खरं काय घडलं हे सांगताच येणार नाही. मुळात आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळीबार करण्यासाठी त्याला कोणी दबाव दिले हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

यापुर्वी हैदराबाद याठिकाणी सुद्धा पोलीसांनी अश्याच प्रकारे काही तरुणांना ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता त्यांना तपासासाठी घटनेस्थळी शेतीवर नेह त्याठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करत फेक एंकाउंटर केले होते. याबाबत जागतिक पातळीवर तसेच भारतीय मानवाधिकार संघटनेने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे फेक एंकाउंटर करुन संपुर्ण विषयाला दाबण्यासाठी भारतात विविध ठिकाणी अनेक प्रकार पोलीसांकडून आजवर प्रयत्न झाल्याचे तपासात आणि कोर्टाच्या निकालातून दिसुन येते. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या काळातुन महाराष्ट्र पोलीस खात्याने उल्हासनगरात काय कारस्थान केले हे सामान्य जनतेला माहित असणे गरजेचे आहे.

23/09/2024

अक्षय शिंदे फायरिंग प्रकरण ; आत्महत्या कि पोलीसांची खेळी?

बदलापुर पोलीसांची पुन्हा एकदा नाचक्की

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- अल्पवयीन मुलीचे बलात्कार करणारा अक्षय शिंदे उर्फ काठीवाला दादा ह्याने आज उल्हासनगर कोर्टातुन बाहेर येतांना पोलीसांच्या ताब्यातील पिस्तुलीने स्वतःवर तीन राऊंड फायर करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती समोर येत आहे. ह्यामुळे पुन्हा एकदा बदलापुर पोलीसांच्या कार्यपद्धतीची नाचक्की होतांना दिसत आहे.
बदलापुर येथे भाजप पक्षातील पदाधिकार्यांंकडून चालवण्यात येणार्या आदर्श विद्यामंदिराचा सफाई कर्मचारी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरण घडल्यानंतर संपुर्ण बदलापुरात नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाले व नागरिकांना उद्रेक आंदोलनात दिसुन आले. बदलापुरच्या आंदोलनाची तसेच महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार घटनेची चर्चा संपुर्ण देशात होत असतांना स्थानिक पातळीवर पोलीसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले. त्यानंतर गुन्ह्याचा तपासासाठी एस.आय.टी. कडे सोपविण्यात आले. विशेष म्हणजे एस.आय.टी. च्या पथकाने सुद्धा विशेष काही तपास केले नाही हे देखील मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सांगितले होते त्यामुळे महाराष्ट्र पोलीस खात्याच्या कार्यप्रमाणीवर सुरुवातीपासुनच प्रश्न चिन्ह उपस्थित होते.

आज 23 सप्टेंबर 2024 रोजी कोर्टात नेतांंना जो प्रकार घडला जेथे पोलीसांच्या ताब्यातून शस्त्रातून आरोपी स्वतःवर गोळीबारचा प्रकार घडतो व पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीसांची नाचक्की झाल्याचे दिसुन येते. नागरिकांना आता थेट हे खरोखरचे पोलीस की नाटकातले पोलीस असा सवाल विचारत आहेत. तसेच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कि यामागे देखील पोलीसांची काहीतरी खेळी आहे असा प्रश्न आता जागृक नागरिकांकडून होत आहे.

अर्थातच पोलीसांकडून अश्या प्रकारची चुक कशी होऊ शकते जेथे आरोपी पोलीसांकडून शस्त्र हिस्काऊन घेतो आणि तीन राऊंड फायरिंग सुद्धा करतो. मुळात जेव्हा अतिरेका हल्ला होतो किंवा एखाद्याकडून दहशतवादी कृत होतं तेव्हा मात्र याच पोलीसांच्या पिस्तुल आणि रायफल वेळेवर चालत नाही. टेक्लिकल हे शस्त्र जेव्हा पोलीस आपल्या कमरेला लावतात त्यावेळी लॉक केलेले असते व सफाई कामगाराची तो लॉक उघडायचे कसे हे सहजासहजी कळत नाही त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीला काय काय ट्रेनिंग देण्यात आली हे आता तपास करणे गरजेचे आहे असे देखील जागृक नागरिकांनी मागणी केली आहे. एकुणच पोलीसांकडून जो काही प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना वेढ्यात काढण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचे दिसुन येते.
एका शास्त्रज्ञाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आरोपीला मदत होण्यासाठी देखील अश्या प्रकारचे कृत्य होण्यास भाग पाडू शकतात कारण त्यामुळे आरोपीची मानसिक स्थिती योग्य नाही हे कोर्टात दर्शवुन जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी भविष्यात मदत मिळते.

एका अनुभवी वकिलाने देखील नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडीत किती वेळेसाठी ठेवण्यात आले व कोठडीतून बाहेर म्हणजेच पोलीसांच्या कॅबिनमध्ये किती वेळ ठेवण्यात आले हे देखील तपासणी गरजेचे आहे कारण त्यामुळे बरेच काही उघड होण्यास मदत मिळेल. मुळात बलात्कार करणारा आरोपी पोलीस कोठडीत पोलीसांकडून मारहाण झाल्यानंतर कोर्टात नेतांना कोर्टाबाहेर स्वतःहुन पोलीसांच्या ताब्यातील बंदुक घेऊन फायरिंग एखाद्याच्या मार्गदर्शनाशिवाय करणार हे काही पटण्यासारखी घटना नाही. त्यामुळे तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.

या सगळ्या घटनानंतर आता अक्षय शिंदेला कोर्टात नेेणार्या त्या सर्व पोलीसंना तात्काळ निलंबन करण्याची मागणी जोर धरत आहे. एके ठिकाणी पोलीसांविषयी बातमी प्रकाशित केल्यास किंवा पोलीसांना त्यांच्या जबाबदारी बाबत सांगितल्यास सामान्य नागरिकांवर आणि पत्रकारांवर महाराष्ट्रातील पोलीस राग व्यक्त करतात त्यातच दुसर्या ठिकाणी पोलीसांचे कारस्थान पाहिल्यावर अश्या पोलीसांना शिव्या आणि जोड्या नाही तर काय नारळ देऊन सत्कार करायचं का? असे मत बदलापुरकर व्यक्त करत आहेत.

बातमी प्रकाशित करतांना माहिती मिळते कि अक्षय शिंदे याचा रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

23/09/2024

मतदारांसाठी महत्वाची माहिती असलेले निकाल गायब करणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजप आमदार किसन कथोरे फसवणुक प्रकरण पुन्हा चर्चेत

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भाजप सरकारच्या कारकीर्दीत आता न्यायपालिका देखील स्वतंत्र नाही अशी म्हणण्याची वेळ भारतीयांवर आली आहे. वर्तमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या इलेक्शन पिटीशन मुंबई उच्च न्यायालयातील पोर्टलवर वरुन गायब झाल्याने कोर्टाच्या निकालाला गायब करण्यामागे कोण असा प्रश्न आता जागृक मतदार विचारत आहेत. याबाबत बदलापुर विकास मिडियातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तेलगी स्कैम मध्ये ज्या आरोपींचे नाव आहेत त्यांच्यासोबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी आपल्या पत्निच्या नावे मालमत्ता खरेदी केली होती. त्याचसोबत किसन कथोरे यांनी आपल्या पत्निच्या नावावर असलेल्या वाहतुकिची माहिती, मालमत्तेची खरी माहिती निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दाखल न करता निवडणुक लढवली व एकप्रकारे मतदारांची फसवणुक केली. हे प्रकरण बदलापुर येथील रहिवाशी व आर.टी.आय. कार्यकर्ते कै. अरुण सावंत यांनी उघडकीस आणले व थेट मुंबई उच्च न्यायालयात इलेक्शन पिटीशन दाखळ करुन सर्व पुरावे जमा केले. मुंबई उच्च न्यायालयाने सदर विषयात आमदार किसन कथोरे यांना दोषी मानत कै. सावंत यांच्या बाजुने निकाल लावला. त्यानंतर आपली आमदारकी पद वाचवण्यासाठी किसन कथोरे हे सुप्रिम कोर्टात धाऊन गेले पण तिथे देखील त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. विशेष म्हणजे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर भारताच्या निवडणुक आयोगाने संबंधीत प्रकरणाची माहिती तर घेतली परंतु अद्याप आमदार किसन कथोरे विरोधात कारवाई मात्र केली नाही.

नुकताच हा प्रकरण पुन्हा एकदा तेव्हा चर्चे आला जेव्हा ब्रिटेन येथील महाराष्ट्र विकास न्युज मिडिया लि. कडून महाराष्ट्र विकास मिडियावर अरुण सावंत यांच्या द्वारे करण्यात आलेल्या पिटीशनचे निकाल कोर्टाच्या वेबसाईटवरुन गायब अशी बातमी प्रकाशित करण्यात आली व बदलापुरात पुन्हा एकदा मतदारांना स्थानिक राजकारण्यांचे कारस्थान दिसुन आले. विशेष म्हणजे सदर निकालाची कॉपी फक्त एका खाजगी कंपनीच्या संकेटस्थळावर दिसत होती परंतु बातमी प्रकाशित केल्यानंतर तातडीने ती कंपनीचे संकेतस्थळ बंद झाल्याचे दिसुन येते.

भारताचा नागरिक जो सत्य उघडकीस आणण्यासाठी तसेच अंबरनाथ व मुरबाड विधानसभा मतदार संघाच्या मतदारांना न्याय मिळवुन देण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता आमदार किसन कथोरे विरोधात पुरावे दाखल करतो व कोर्टात सिद्ध देखील होते कि आमदार किसन कथोरे यांनी मतदारांची फसणुक केली. त्यानंतर सुद्धा अश्या महत्वाच्या कोर्टाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या पोर्टलवरुन गायब झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे. भारतात ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे जेथे मुंबई उच्च न्यायालय देखील सत्तेच्या दबावाला बळी पडते? असा प्रश्न आता भारतातील जागृक मतदार विचारत आहेत.
विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या पोर्टलवरुन अश्या ठराविक निकाल गायब होणे हा चिंतेचा विषय असुन मुंबई उच्च न्यायालयात ही भ्रष्ट कारभार चालत असल्याची आता राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याअनुषंगाने बदलापुर विकास मिडियाच्या वतीने संबंधीत विभागात मुंबई उच्च न्यायालयाच्या रिजस्ट्रर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरु झाली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कारभाराबाबत सुप्रिम कोर्ट आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला सुद्धा माहिती देण्यात आल्याचे समजते.

23/09/2024

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगपरिषद हद्दीतील बदलापुर पुर्व शिरगाव याठिकाणी ठाणेकर ग्रुप या ब...

Address

Badlapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur Vikas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Badlapur Vikas:

Share