Vijeta Times

Vijeta Times जनसामान्यांचा आवाज
MH32D0024065

२० वर्षे जुनी वाहने पुन्हा रस्त्यावरनूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क आकारले जाणारगडचिरोली | लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्र सरकारकडू...
19/09/2025

२० वर्षे जुनी वाहने पुन्हा रस्त्यावर

नूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क आकारले जाणार

गडचिरोली | लोकमत न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना दिलासा देणारा मोठा निर्णय…
आता २० वर्षांहून जुनी वाहने कायदेशीररित्या पुन्हा रस्त्यावर धावणार. मात्र, यासाठी नोंदणी नूतनीकरण करताना दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे.

---

ग्रामीण भागाला दिलासा

शहरी भागात जुनी वाहने कमी प्रमाणात वापरली जात असली तरी ग्रामीण भागात शेतकरी व सामान्य नागरिक आजही जुनी वाहनेच वापरतात. मुदत संपल्याने ती चालविताना भीती वाटत होती. नव्या निर्णयामुळे या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

---

शुल्क संरचना (२० वर्षे जुनी वाहने)

🚲 दुचाकी : ₹२,०००

🛺 तीनचाकी : ₹५,०००

🚗 चारचाकी : ₹१०,०००

🚛 इतर वाहने : ₹१२,०००

---

नूतनीकरण न केल्यास दंड

दुचाकी : ₹३०० मासिक दंड

चारचाकी : ₹५०० मासिक दंड

---

जिल्ह्यातील चित्र

गडचिरोली जिल्ह्यात २ लाख २२१ वाहने नोंदणीकृत आहेत. यापैकी ३० हजारांहून अधिक जुनी व मुदतबाह्य वाहने आहेत. आता नव्या नियमामुळे ती पुन्हा कायदेशीररित्या वापरात येणार आहेत.

---

प्रतिक्रिया

🔹 “ट्रॅक्टर आणि जीप अजून चांगल्या स्थितीत आहेत. फक्त कागदपत्रांमुळे अडचण येत होती. आता दिलासा मिळाला.”
— संतोष जाधव, शेतकरी

🔹 “नवे वाहन घेणे परवडत नाही. शुल्क जरी वाढले तरी जुनी दुचाकी वापरता येईल.”
— कविता मेश्राम, दुचाकीधारक

---

तज्ज्ञांचे मत

“२० वर्षांनंतर वाहनांची तपासणी करूनच नूतनीकरण होईल. त्यामुळे सुरक्षा वाढेल आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त राहील.”
— प्रा. अजय पाटील, वाहन तज्ज्ञ

---

👉 तज्ज्ञांच्या मते, वेळेत नूतनीकरण केल्यास दंड टळेल आणि वाहन वापरणेही सुरक्षित राहील.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व बार्शी तालुक्यातील पांगरी येथे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते मुख्य...
17/09/2025

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व बार्शी तालुक्यातील पांगरी येथे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व बार्शी तालुक्यातील पांगरी येथे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.....
प्रत्येक गाव समृद्ध झाले तर,राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधी पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत...
बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण विकासाची एक दिशा आहे,या अभियानात सर्व अधिकारी,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले....
यावेळी प्रांतअधिकारी सदाशिव पडदुणे,ॲड.अनिल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,माजी सभापती विजय गरड, सोसायटी चेअरमन युवराज खबाले,सोसायटी व्हा.चेअरमन रामलिंग गोडसे,माजी सरपंच बाळासाहेब मोरे,धनंजय खवले,सरपंच सौ.मनिषा धस,उपसरपंच सौ.प्रमिला नारायणकर,शहाजी धस,माजी उपसरपंच सतिश जाधव,डाॅ.विलास लाडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 #अवाहन..बार्शी नगरपालिका बार्शी
16/09/2025

#अवाहन..

बार्शी नगरपालिका बार्शी

बार्शी सिव्हिल  #इंजिनिअर असोसिएशनपदी दुसऱ्यांदा  #गणेश वाघमारे #बार्शी - शहरातील सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बार्शीच्या...
16/09/2025

बार्शी सिव्हिल #इंजिनिअर असोसिएशनपदी दुसऱ्यांदा #गणेश वाघमारे

#बार्शी - शहरातील सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बार्शीच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे यांनी एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, मावळते अध्यक्ष प्रशांत हिरे यांच्याकडून लवकरच ते पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे वाघमारे यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल नगरपालिकेसह बांधकाम क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

गणेश वाघमारे यांनी सिव्हिल इंजिनिअर पदवीचे शिक्षण घेतले असून गेल्या 10 वर्षांपासून ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. कन्सलटिंग, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, घरकुल योजनांचा लाभ या कामात त्यांचा अनुभव दांडगा आहे. 'विश्वासहर्ता आणि गुणवत्ता' याच एकमेव सूत्राच्या आधारे त्यांनी बांधकाम व्यवसायात कमी कालावधीत आपला नावलौकिक मिळवला. आता, सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. यापूर्वी, 2022 ते 23 मध्येही त्यांनी अध्यक्षपदी कामकाज पाहिले होते. बांधकाम अभियंता यांना नगरपालिका कामकाजात येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यावर निश्चितच भर राहील, असे त्यांनी बार्शी टाइम्सशी बोलताना म्हटले.

महाराष्ट्र विद्यालयातील जलतरण खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड बार्शी :- #क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुण...
16/09/2025

महाराष्ट्र विद्यालयातील जलतरण खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड

बार्शी :- #क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद ,सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या खेळाडूंनी घवघवी यश संपादन केले.
सोलापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये
१७ वयोगट मुलांमध्ये चि जयसिंह हरीश कुमार शिंदे या खेळाडूने ५० मीटर फ्री स्टाईल प्रथम क्रमांक ,५० मीटर बटरफ्लाय प्रथम क्रमांक तसेच १०० मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
याच वयोगटात चि माधव विठ्ठल शिंदे या खेळाडूने १०० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक,२०० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक तसेच ८०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षे वयोगट मुलींमध्ये कु जानवी किरण वासकर या खेळाडूने १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक, २०० मीटर बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक तसेच ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक मिळविला.याच वयोगटात कु गायत्री गणेश डवरे या खेळाडूने १००मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक, २००मीटर फ्री स्टाइल प्रथम क्रमांक तसेच ४००मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक मिळविला.
१९ वयोगट मुलांमध्ये प्रसाद दत्तात्रय शिंदे या खेळाडूने ५० मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील ,योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा डॉ.बी.वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष श्री एन.एन.जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री पी.टी.पाटील साहेब, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री ए.पी. देबडवार साहेब, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जयकुमार शितोळे साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव,श्री एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक श्री एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

16/09/2025
15/09/2025

कोण होणार बार्शीकर सांगा बार्शी बाजार समिती सभापती.

शेजारच्या शेतकऱ्याची शेती वहिवाटतो या कारणावरून शेतकऱ्याचा खून केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर.बार्शी:-माढा पोलिस स्...
11/09/2025

शेजारच्या शेतकऱ्याची शेती वहिवाटतो या कारणावरून शेतकऱ्याचा खून केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर.

बार्शी:-माढा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४९/२०२५ नुसार आरोपी भिवा संपती बुद्रुक रा.बुद्रुकवादी ता.माढा जि.सोलापूर याच्यावर शेत वहिवाटीच्या कारणावरून कांतीलाल ज्ञानदेव माने या शेतकर्‍याचा लोखंडी कोयत्याने,गळ्यावर,डोकीत,कपाळावर व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलेच्या आरोपावरुन मयताच्या पत्नीने बीएनएस कलम-१०३(१),३५१(३),३५२,३(२) व अनुसूचित जाती-जमाती अधिनियम ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.कांतीलाल माने हे गावातील संदीप पाटील यांचे शेत वहीवाटत होते.याचा राग भिवा बुद्रुक याला होता.कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार सुरु करण्यासाठी गेले असता भिवा बुद्रुक याने लोखंडी कोयत्याने,गळ्यावर,डोकीत,कपाळावर व काठीने मारहाण करून कांतीलाल यांचा खून केला.सदर प्रकरणातील आरोपी भिवा संपत्ती बुद्रुक याने त्यांचे वकिलामार्फत बार्शी येथील मा.अतिरिक्त व सत्र न्यायाधीश मा.श्री.व्ही.के.मांडे साहेब यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.यावेळी मूळ फिर्यादिच्यावतीने अ‍ॅड.विवेक गजशिव यांनी काम पाहिले.सदरील जामीन अर्जाचे सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीने तिचे वकील अ‍ॅड.विवेक गजशिव यांचेमार्फत लेखी युक्तिवाद व प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला.सदरचा लेखी युक्तिवाद व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्ही.के.मांडे साहेब यांनी आरोपी भिवा संपती बुद्रुक याचा जामीन अर्ज नामंजूर करून फेटाळला.याकामी मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.विवेक गजशिव,अ‍ॅड.राहुल पाटील,अ‍ॅड.श्रीराम काशीद यांनी काम पाहिले.

09/09/2025

बार्शी तालुक्यातील सासुरे येथे डोक्यात गोळी झाडून एकाचा मृत्यू, मृत युवक बीडमधील गेवराईचा.
DYSP सह वैराग पोलीस घटनास्थळी

Address

2311/12 Hede Galli, Barshi
Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijeta Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijeta Times:

Share