Mukkam Post chiplun

Mukkam Post chiplun Tourism Place
Historical Place
Cultural Centre of Ratnagiri

11/11/2025

काय आहे रे तुझ्या चिपळूण मधे एवढ?!?
🤔🤔🤔

आता राहलेली ठिकाणी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा !!!🙏🏻

11/11/2025

कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत, हे बोलणं सोप्प आहे.. पण ही परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे मरणापेक्षा जास्त भयानक आहे..
कोकणातील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही, तरी सुद्धा तो आपल्या मातीशी इमाने इतबारे राहून काम करतो, शेती करतो, कष्ट करतो, घाम गाळतो आणि आपल्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो..
त्याचं कोकणी शेतकऱ्याची ही कैफियत.. शासकीय यंत्रणेपर्यंत नक्की पोहोचवा...

*आपल्या विभागाचे दमदार उमेदवार म्हणून आता घराघरात पोहचा डिजिटल प्रचाराच्या माध्यमातून!!!*विचार तुमचा, प्रचार आमचा..!!📢📢*...
07/11/2025

*आपल्या विभागाचे दमदार उमेदवार म्हणून आता घराघरात पोहचा डिजिटल प्रचाराच्या माध्यमातून!!!*

विचार तुमचा, प्रचार आमचा..!!📢📢

*आमची वैशिष्ट्ये -*
• अगदी माफक दरात इलेक्शन कॅम्पेन..
• अगदी १ ते २ दिवसांत व्हिडीओ बनवून मिळणार
• संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन सेवा..
• दर्जेदार व्हिडिओ मुळे, दर्जेदार प्रचार..!
• ४९९ पासून व्हिडिओ सुरु..
• मोशन graphics, व्हिडिओ प्रचार, व्हॉइस ओव्हर आणि बरंच काही...
📍📍📍📍
*आताच मेसेज करा आणि आपल्या डिजिटल कॅम्पेन ला सुरवात करा!!!*
☎️☎️☎️☎️
जाहिरातवाला.कॉम - 9022346094

(टिप - कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार ह्या पेज वर केला जाणार नाही.. ही फक्त जाहिरात आहे !!)

07/11/2025

गावाकडची सफ़र भाग एक | मुक्काम पोस्ट भिले

त्या दिवशी सहज भिल्यामध्ये फुलपाखरे आलीत का ,हे पाहायला गेलो होतो आणि कदम बुवांकडे टपरीवर नाश्ता करायचा हा हेतू होता.

फुलपाखरे शोधताना शेतामध्ये आम्हाला कोकणी शेतकरी भेटले.

पाऊस यंदा खूप पडतोय भात शेतीचे नुकसान झाले आहे, विदर्भ मराठवाड्यातील बातम्या या पार्श्वभूमी वरती कोकणी माणसाला सुद्धा यंदा फटका बसणार एवढेच आम्हाला माहीत होता.

त्याच्यातली तीव्रता अजिबात माहीत नव्हती.

पण प्रत्यक्षात कोकणातल्या जमिनीवर जाऊन चित्र न्याहाळले, त्यावेळेला कळलं की परिस्थिती प्रचंड भयानक आहे.

यावर्षीचे पूर्ण उत्पन्न जवळजवळ ७० टक्के लोकांचं बाद झालेले आहे.

पूर्ण वर्षाची मेहनत फुकट गेलेली आहे.

याची भरपाई येईल ती जेमतेम चार-पाच हजार रुपये या पद्धतीने मिळून जाईल पण यावर्षीची मुलांच्या शिक्षणाची फी घरातील तांदुळाचा खर्च आणि पुढच्या वर्षी शेती करायची की नाही याचा मानसिक तणाव यामध्ये कोकणी शेतकरी द्विधा मनस्थितीत दिसून आला.

गेले दोन वर्षे पाऊस लांबत आहे मग यावरती शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने भात पीक घ्यावे भात कधी कापावे याकरता कोणताही लेख पाहण्यात आला नाही.

जर पावसाची सिच्युएशन अशीच राहणार असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीने जसजशी कापणी जवळ येईल तसतसे आपल्या गावातील देवळंचे मंडप आणि मंडपाच्या बाजूला असणाऱ्या अंगणामध्ये झापांच मांडव घालून ठेवला पाहिजे.

तसेच गावातून कोटी कोटी ची जिर्णोद्धार ची कामे चालतात त्याने भविष्यातील येणारी नैसर्गिक संकटे या दृष्टीने देऊळ तर बांधावेच पण देवळाच्या बाजून गावकऱ्यांना सामावून घेईल असा व्यवस्थित पत्र्याचा हॉल सुद्धा बांधावा हा हॉल बऱ्याच कामाला उपयोगाला येऊ शकतो, नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसाठी तसेच गावातील विविध उपक्रम राबवण्यासाठी तसेच मुलांना अभ्यास करण्यासाठी तसेच गावातील कोणाचे लग्न असले तर नाममात्र भाड्यामध्ये विवाह सोहळा साजरा करण्यासाठी सुधा उपयोग येईल.

नुसतं देवळामध्ये राजस्थानच्या हायफाय संगमरवर घालून एकेक कोटीची मंदिरे नंतर ठराविक सण सोडल्यास कुलूप लावून बंद असतात .

यानिमित्ताने निदान बारा महिने देवळामध्ये जागता राहील आणि देव सुद्धा आनंदी होईल.

यावर्षी मात्र कोकणातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणे आवश्यक आहे नाहीतर हा शेतकरी शेती करायची की नाही यावर ठाम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असे जाणवले.

आपल्याला काठावर बसून यातील काहीही माहित नसते ते या भेटीदरम्यान कळले.

निवेदन - संकेत हळदे
माहिती आणि मार्गदर्शन - पराग वडके
छायांकन- सुमित जाधव
विशेष आभार - डॉ. गौरव बारटक्के

https://youtu.be/jMuX1fu-V_8?si=4wZj62l42SUG-HxJमाणूस गेला तरी त्याच्या अतृप्त इच्छा मात्र पूर्ण होतातच!कश्या ?! हेच सां...
21/10/2025

https://youtu.be/jMuX1fu-V_8?si=4wZj62l42SUG-HxJ

माणूस गेला तरी त्याच्या अतृप्त इच्छा मात्र पूर्ण होतातच!
कश्या ?! हेच सांगणारी ही शॉर्ट फिल्म !

*हेडफोन्स वापरा आणि एंजॉय करा!!*

निर्मिती- थिएटर अकॅडमी चिपळूण
लेखन / दिग्दर्शन/ संकलन - संकेत हळदे
छायांकन - यश शिर्के
साउंड आणि लाईट - सुमित जाधव
कलाकार - असादत मोरे, आकाश मोहिते
व्हॉइस ओव्हर - क्रांती कांबळे

माणूस गेला तरी त्याच्या बराचश्या अतृप्त इच्छा तश्याच राहतात.. मग तो कोणत्या न कोणत्या रूपाने, मार्गाने पूर्ण करण्....

15/10/2025

चिपळूण मध्ये एका दिवसात काय खाल ?

व्हिडिओ -

हा अनुभव घायला कोकणातच याव लागत!!
14/10/2025

हा अनुभव घायला कोकणातच याव लागत!!

गावची जमीन गावातच राहणार!मोरवणे ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव; परगावीयांना जमीन विक्रीस बंदीचिपळूण  (दिव्य रत्नागिरी न्यूज): क...
16/09/2025

गावची जमीन गावातच राहणार!

मोरवणे ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव;
परगावीयांना जमीन विक्रीस बंदी

चिपळूण (दिव्य रत्नागिरी न्यूज): कोकणातील वाढत्या बांधकाम व्यवसायामुळे आणि गुंतवणूकदारांच्या ओघामुळे गावोगावी स्थानिक शेती-जमिनी बाहेरच्या लोकांच्या ताब्यात जात आहेत. यामुळे गावच्या मूळ रहिवाशांच्या हातची जमीन सरकण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार, गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील लोकांना विकता येणार नाही. एखाद्या कुटुंबाला खरी गरज भासल्यास, ती जमीन फक्त गावातील नागरिकांनाच विकावी लागेल.

परप्रांतीय विक्रीला आळा

गेल्या काही वर्षांपासून कोकणातील गावे हे परगावीय व परप्रांतीय लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. चांगले हवामान, निसर्गरम्य वातावरण आणि परवडणाऱ्या दरात जमीन उपलब्ध असल्याने बाहेरील लोकांनी कोकणात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उपलब्ध राहणार नाही, अशी चिंता वारंवार व्यक्त केली जात होती. मोरवणे ग्रामसभेच्या ठरावामुळे मात्र या व्यवहारांवर आळा बसणार असल्याचे चित्र आहे.

ग्रामसभेत जोरदार चर्चा

ग्रामसभेत गावकऱ्यांनी मते मांडताना सांगितले की, "जमिनी गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव राहिल्या पाहिजेत. बाहेरचे लोक पैसे देऊन जमीन खरेदी करतात, मात्र त्यातून गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेती, घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. म्हणून हा ठराव आवश्यक आहे." ग्रामसभेतील चर्चेनंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

सामाजिक बंधनकारक निर्णय

हा ठराव कायदेशीर बंधनकारक नसला तरी गावासाठी तो सामाजिक बंधन ठरणार आहे. ग्रामस्थांनी पुढे जाऊन ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कोणीही गावाबाहेरील व्यक्तीस जमीन विकण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसभा त्याविरोधात उभी राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

इतर गावांसाठी आदर्श

मोरवणे ग्रामसभेचा निर्णय हा केवळ एक ठराव नसून गावाच्या एकात्मतेचा आणि भविष्याच्या दृष्टीने दूरदृष्टीचा पुरावा मानला जात आहे. यामुळे गावकऱ्यांचे हक्क अबाधित राहतील आणि भविष्यातील पिढ्यांना शेती व घरजमिनींचा तुटवडा भासणार नाही. या निर्णयामुळे परिसरातील इतर गावांसाठीही हा ठराव आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोरवणे ग्रामसभेच्या या निर्णयामुळे "गावची जमीन गावातच" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक स्वाभिमानाचे हे एक भक्कम पाऊल मानले जात आहे.
#दिव्यरत्नागिरी

कोळकेवाडी धरणासह उपधरणांवर नियंत्रण ठेवल्यास चिपळूणमध्ये पूरस्थिती रोखता येणे शक्यप्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा महत्त्...
24/08/2025

कोळकेवाडी धरणासह उपधरणांवर नियंत्रण ठेवल्यास चिपळूणमध्ये पूरस्थिती रोखता येणे शक्य

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा महत्त्वपूर्ण अभ्यास

संरक्षण भिंती, गाळ उपसा आणि प्लास्टिकमुक्ती ही पूरनियंत्रणाची गुरुकिल्ली

चिपळूण : गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा बारकाईने अभ्यास करून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पूरनियंत्रणासाठी ठोस उपाय सुचवले आहेत. कोळकेवाडी धरणासह कामथे, मोरवणे आणि अडरे या उपधरणांच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवले, शहरात संरक्षण भिंती उभारल्या, वाशिष्ठी नदीतील बेटे काढली, गाळ उपसा आणि प्लास्टिकमुक्ती प्रभावीपणे राबवली तर चिपळूण शहराला भविष्यातील पूरस्थितीत मोठा दिलासा मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुसळधार पाऊस आणि प्रशासनाचा प्रभावी समन्वय

कोळकेवाडी परिसरात फक्त पाच दिवसांत तब्बल १,००० मि.मी. पाऊस झाला. तर चिपळूण शहरात फक्त ३६ तासांत ३०० मि.मी. पर्जन्यवृष्टी नोंदली गेली. मंगळवारी शहरात पाणी घुसले तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठे नुकसान टाळले. धरण प्रशासन, महाजनको, पोलीस, लघुपाटबंधारे, कृषि विभाग या सर्व यंत्रणांच्या उत्तम समन्वयामुळे पाण्याचा निचरा लवकर होऊ शकला.

धरण व्यवस्थापन; पूरनियंत्रणाची किल्ली

कोळकेवाडी धरणातून थेट पाणी सोडले जात नाही, तर वीजनिर्मितीनंतरचे अवजलच वाशिष्ठीत सोडले जाते. पाऊस आणि भरती-ओहोटीचा ताळमेळ साधून टर्बाइनद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केल्याने पाण्याची पातळी संतुलित ठेवता आली. त्यामुळे अवजल सोडण्याची वेळ योग्य रीतीने बदलता आली आणि पुराचे पाणी नियंत्रणात ठेवता आले.
“कोयना धरणाचे पाणी चिपळूण परिसरात कधीच येत नाही, हा गैरसमज नागरिकांनी दूर करावा,” असेही प्रांताधिकारी लिगाडे यांनी स्पष्ट केले.

उपधरणांवरही लक्ष आवश्यक

कामथे, मोरवणे आणि अडरे ही छोटी धरणे असली तरी त्यांच्या पाण्याचा परिणाम पूरस्थितीवर होतो. या धरणांची पातळी नियंत्रित ठेवली, तर शहराला मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

पूरनियंत्रणासाठी सुचवलेले ठोस उपाय
१) संरक्षण भिंतींची गरज : नलावडे बंधाऱ्यामुळे यंदा मोठा फायदा झाला. अशाच प्रकारच्या संरक्षण भिंती शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उभारल्यास पाणी रोखता येईल.
२) वाशिष्ठीतील बेटे काढणे : गोवळकोट परिसरातील मोठी बेटे नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरत आहेत. ही बेटे काढल्यास प्रवाह सुरळीत होईल. यासाठी ना. नितेश राणे यांनी परवानगी प्रक्रियेस मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
३) गाळ उपसा सुरू ठेवणे : शासन व नाम फाऊंडेशनच्या मदतीने मागील दोन वर्षांपासून गाळ उपसा सुरू असून त्याचा सकारात्मक परिणाम जाणवतो आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार शेखर निकम यांनीही या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे.
४) नालेसफाई अनिवार्य : एप्रिलपासूनच नालेसफाईला सुरुवात करण्यात आली होती. नाल्यांमधील प्लास्टिकसह कचरा वॉटर लॉकिंगस कारणीभूत ठरतो. वेळेवर सफाई केली तर पूरस्थितीत मोठा फायदा होतो.
५) प्लास्टिकमुक्त चिपळूण : पूरस्थितीत सर्वात मोठा अडथळा प्लास्टिक कचरा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे प्लास्टिकमुक्तीची मोहीम सातत्याने राबवली तर पूरनियंत्रणाला मोठा हातभार लागेल.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा अभ्यास स्पष्ट करतो की, केवळ पाऊसच नव्हे तर धरण व्यवस्थापन, नदीतील गाळ आणि प्लास्टिककचऱ्याचे नियंत्रण हे पूरनियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. शासन, प्रशासन आणि जनसहभाग यांचा संगम घडवून आणल्यास चिपळूण शहराला भविष्यातील पुराच्या संकटातून नक्कीच मोठा दिलासा मिळू शकेल.
#दिव्यरत्नागिरी

माहिती." रत्नागिरीची "रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्‍वर, काळबादेवी, पालगड, मंडणगड, आयनी-...
24/08/2025

माहिती." रत्नागिरीची "

रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्‍वर, काळबादेवी, पालगड, मंडणगड, आयनी-मेटे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. खारेपाटणपासून रत्नागिरी जिल्ह्यास सुरवात होते.

पहिले गाव लागते राजापूर. एकेकाळचे प्रसिद्ध बंदर, राजापूरहून तीस किलोमीटरवर डावीकडे आडिवरे येथे श्री महाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. राजापूरजवळ श्री धूतपापेश्वराचे मंदिर नदीकिनारी आहे. राजापूरपासून पाच किलोमीटरवर गंगातीर्थ आहे. राजापूरची गंगा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध असले तरी तेथे पाणी असल्याची खात्री करूनच भेट द्यावी. पुढे गेल्यावर हातखंबा येथून डावीकडे वळल्यावर रत्नागिरी लागते.

रत्नागिरीपासून १५ किलोमीटरवर पावस आहे. हे गाव स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत होऊन तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे स्वामींची समाधी व सुंदर मंदिर आहे. पावसला जाताना भाट्याच्या खाडीवरील राजिवडा बंदर ओलांडून जावे लागते. भाटये येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र आहे. तेथे नारळाची रोपेही विकत मिळतात. शिवरायांच्या आरमारातील शूर सेनानी मामाजी भाटकर भाट्ये येथीलच. त्यांची समाधी तेथे आहे. पावसला जाण्यासाठी लांजा येथूनही मार्ग आहे, पण तो अरुंद. रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. श्रीमती इंदिराबाई गोरे यांचा हा वाडा आता टिळक स्मारक म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतच प्रसिद्ध थिबा पॅलेसही आहे. ब्रिटिशांनी १९१०-११ मध्ये ही वास्तू उभारली. तेथे आता वस्तूसंग्रहालय आहे, तसेच बाजूला असलेला थिबा पॉइंटही चांगला आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर जाता येते, तेथे दिवसा जाणे कधीही चांगले. किल्ल्यात शिवकालीन भगवतीचे मंदिर आहे. रत्नदुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेला किनारा काळ्या वाळूचा असल्याने त्याला काळा समुद्र तर उत्तरेकडील समुद्राला पांढरा समुद्र असे म्हणतात. या किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरातील खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्गचित्रे कोरलेली आहेत. अथांग समुद्रकिनारा, निसर्गसंपन्न परिसर आणि प्राचीन गणेशमंदिर. पावसजवळचे गणेशगुळे आकर्षक आहे.

रत्नागिरीहून पन्नास किलोमीटरवर गणपतीपुळे आहे, रत्नागिरीहून झाडगावमार्गे गणपतीपुळे येथे जाताना वाटेत मत्स्य महाविद्यालय लागते. गणपतीपुळेला गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून समोर अथांग सागर व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण किनारा पसरलेला आहे. या देवस्थानचा इतिहास १६०० पासूनचा आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे हे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाईपर्यंतचा इतिहास या मंदिराशी निगडित आहे. देवालयाचा गाभारा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सचिव अण्णाजी दत्तो यांनी, सभामंडप व मंदिराभोवतालची दगडी पाखाडी सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी तर आवारातील धर्मशाळा रमाबाई पेशवे यांनी बांधलेली आहे. नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी तर नगारखाना चिमाजी अप्पा यांनी बांधला आहे. गणपतीपुळेच्या शेजारी मालगुंड असून ते कवी केशवसुतांचे गाव. त्यांचे वस्तुसंग्रहालय वजा स्मारक पाहण्यासारखे आहे.

चिपळूणच्या दिशेने जाताना वाटेत संगमेश्वर लागते. त्याच रस्त्यावर आरवली व तुरळ येथे गरम पाण्याचे झरे रस्त्यालगतच आहेत. या पाण्याला गंधकाचा वास येतो. त्वचारोग बरे करण्यासाठी तेथे स्नान करण्यासाठी अनेकजण थांबत असतात. संगमेश्वरजवळील कसबा येथे चालुक्‍य घराण्यातील कर्ण राजाने बांधलेले श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. तेथे सरदेसायांचा मोठा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने अचानक हल्ला करून अटक केली होती. या ठिकाणी संभाजी राजांचा स्मारक स्तंभ आहे. संगमेश्वरहून चिपळूणकडे जाताना डावीकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. देवरूखपासून १५ किलोमीटरवर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे हे देवस्थान पाहण्याजोगे आहे. उंच डोंगराला वळसा घालून गेल्यावर एका गुहेत हे स्वयंभू देवस्थान आहे. या डोंगरावर मोठा धबधबा आहे. देवस्थानपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कशेळीचा कनकादित्य रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे ही सारी ठिकाणं पर्यटकांच्या परिचयाची. पण इथून जवळच आहे, एक आगळं-वेगळं ठिकाण. त्याचं नांव आहे कशेळी. (मंडणगड जवळचं केळशी नव्हे) महाराष्ट्रात एकेकाळी सौरसंप्रदाय पसरला होता. परंतु सूर्याची फारशी मंदिरं आजमितीस अस्तित्वात नाहीत. पण कोकणात काही सूर्यमंदिरे आहेत. आरवली, आंबव, नेवरे, कशेळी अशा काही गावांमध्ये ही सूर्यमंदिरे आहेत. कशेळीचा कनकादित्य हे आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण निश्‍चित आहे. रत्नागिरीपासून २२ कि.मी. आणि राजापूरपासूनही २२ कि.मी. अंतरावर कशेळी हे छोटं गाव आहे. रत्नागिरी - भाट्ये - पावस - पूर्णगड - कशेळी असा हा उत्तम रस्ता आहे. या टुमदार गावाला विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभला आहे. तिथला डोंगरकडा अन्‌ केवड्याचं बन केवळ अनुभवण्याजोगं. सुमारे ८०० वर्षे नांदतं, असं श्री कनकादित्याचं मंदिर गावात उभं आहे. चहूबाजूंना आंबा-फणस-नारळी-पोफळीची दाटी आहे. त्यातच धनेश म्हणजे हॉर्नबिल हा पक्षी हमखास पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातच श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी चार मंदिरे आहेत. म्हणजे हे सूर्यपंचायतन आहे. शिवाय एक मारुती मंदिरही आहे. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने कशेळी गावातच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आवर्जून भेट देण्याजोगे आहे. इथून जवळच वेत्ये गावचा विलोभनीय समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणेच फेडतो. आडिवरे येथील देवीच्या महाकालीची मूर्ती येथेच सापडली. कशेळीच्याच भेटीत राजापूरमधील अनेक ठिकाणांनाही भेट देता येते. चिपळूणहून खेडला जाताना परशुराम हे गाव लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या श्री परशुराम मंदिराची, आदिलशाही विजापूरकर वैभवाची वास्तू तेथे आहे. परशुराम, काम व काळ या अनुक्रमे विष्णू, ब्रह्मदेव व शंकराचा अवतार असलेल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती मंदिरात आहेत. परशुरामात प्राचीनकाळी घरोघरी पाणी पोचविण्याची पाटवजा व्यवस्था होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. परशुराम घाटात पावसाळ्यात सवत कडा हा धबधबाही दिसतो. खेडहून पुढे दापोलीला जाता येते. दापोलीत पाहण्यासाठी जवळपास ६२ पर्यटनस्थळे आहेत. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि दुर्गादेवीचं मंदिर अनेकांच्या परिचयाचं. बकुळ वृक्षांच्या गराड्यात असलेलं श्री गणेश मंदिर आणि तेथून हर्णे-मुरूडच्या किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - फत्तेगड आणि गोवा किल्ला. आंजर्ले - केळशी रस्त्यावर आडे - पडले गाव आहे. इथे पुलाजवळ श्रीभार्गवरामाचं म्हणजे श्री परशुरामाचं देखणं मंदिर आहे. शिवाय श्री बेलेश्‍वराचंही मंदिर आहे. आंजर्ले इथे मुक्काम करून हर्णे - मुरूड (अण्णासाहेब ऊर्फ भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव) आसूदचा श्री व्याघ्रेश्‍वर आणि श्री केशवराज, दापोली - लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, चिखलगाव दाभोळ - कोळथरे - पंचनदी - पन्हाळे लेणी अशी अनेक ठिकाणं पाहून दिवसभरात परत येता येतं. दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे. श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. दाभोळहून होडीने किंवा फेरी बोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशुराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो. आसूदच्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर व्याघ्रेश्वर मंदिर लागते. हे मंदिर ८०० वर्षे जुने आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी सुमारे पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आतल्या लाकडी खांबांवर दशावतार कोरलेले आहेत. मुरुड आसूद पुलापाशी डावीकडे वळल्यानंतर मुरुड गाव लागते. इथेच दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळचा रस्ता थेट समुद्रकिनारी जातो. कर्देमुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे इथला निसर्गरम्य समुद्रकिनारा लागतो. हा समुद्रकिनारा बराच प्रसिद्ध आहे. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरुड, कर्दे परिसरात बरेचसे स्थलांतरित पक्षी येतात., त्यामुळे हे ठिकाण बघण्यासारखे आहे.

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

Address

Chiplun

Telephone

+917448238805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukkam Post chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mukkam Post chiplun:

Share