Mukkam Post chiplun

Mukkam Post chiplun Tourism Place
Historical Place
Cultural Centre of Ratnagiri

31/05/2026

७ हाऊसफुल्ल प्रयोगानंतर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची साक्ष !🔥🔥

तब्बल 80 कलाकारांच्या संचात... कविराज भूषण यांच्या काव्यछंदातून उलगडणारे भारतातील पहिले महानाट्य
श्री शिवराज मंच मालवण प्रस्तुत
महानाट्य - शिवराज भूषण
🚩🚩🚩🚩

शनिवार दि. 30 मे 2026 रोजी रात्रौ. 9:30 वाजता
स्थळ - इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण

थिएटर अकॅडमी चिपळूण चे तीन महिन्यांचे अभिनय व नाटय प्रशिक्षण वर्गाचे  सादरीकरण उत्साहात पार पाडले..
31/05/2026

थिएटर अकॅडमी चिपळूण चे तीन महिन्यांचे अभिनय व नाटय प्रशिक्षण वर्गाचे सादरीकरण उत्साहात पार पाडले..

31/05/2026

अंडा राईस आणि बुर्जी पाव स्पेशलिस्ट - श्री साई स्नॅक्स कॉर्नर 🥚🥚
शिवाजी नगर एस. टी. स्टँड | महानगर गॅस समोर

31/05/2026

चिपळूण मध्ये पोटभर खायचं कुठे ?!
तुम्ही पण कमेंट करून सांगा !!!

#चिपळूण 👑 #चिपळूणचाबाल्या

31/05/2026

गांधरेश्वर उद्यान चिपळूण

31/05/2026

लंडन रोड चिपळूण

19/12/2025

रोशन मोर यांचे RM SHAWARMA & FOOD CAFE at चिपळूण चौपाटी ✨

DM for Free Promotional Video and content (Till 31 Dec 2025)
For details 9022346094

18/12/2025

माननीय आमदार चिपळूण तालूका , तसेच सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांना नम्र विनंती.

चिपळूण - निरबाडे व्हाया कळंबस्ते या मार्गावर रस्ताच शिल्लक नाही.

टू व्हिलर चालकांचे अक्षरशः हाल होत आहेत. पेशंट वहातूक ,वढाप वहातूक करताना रिक्षा फसत आहेत.

सर्वच सत्ताधारी असल्याने आणि विरोधी पक्ष नावाला उरला असल्याने या भागातील प्रवाशांना कोणी वाली उरला नाहीये.

तरी या पत्राद्वारे कळकळीची विनंती करत आहोत की लवकरात लवकर डांबरीकरण करून प्रवाशांना सुखद धक्का द्यावा.

आपला

सामान्य ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी प्रवास करणारा चिपळूणकर.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे शहर मुंबई गोवा महामार्गावर मुंबई आणि गोव्याच्या जवळपास मध्यभागी वसलेले आहे. वशिष्ठी नदीच...
13/12/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे शहर मुंबई गोवा महामार्गावर मुंबई आणि गोव्याच्या जवळपास मध्यभागी वसलेले आहे. वशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले हे शहर कोकणातील एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. मुंबई किंवा कराड वरून चिपळूण शहरात येताना डाॅ. आंबेडकर चौक हे चिपळूण शहराचे प्रवेशद्वार लागते. या नाक्यावरून कराड रोड ने गावाच्या दिशेने अंदाजे २०० मीटर पुढे आले की उजव्या हाताला एक कोकणातील घरासारखे दिसणारे हॉटेल आहे. हेच चिपळुणातील प्रसिद्ध *परांजपे हॉटेल.*

परांजपे हाॅटेल साधारणपणे १९४२ च्या दरम्यान आप्पा म्हणजे कै. शांताराम नारायण परांजपेनी सुरू केले. तेंव्हा हाॅटेल समोर सागवानाची भली मोठी २ झाडे होती. अनेक किलोमीटर परिसरात एवढं मोठं झाड नव्हते. त्यामुळे परांजपे हाॅटेल ला परांजपें पेक्षा _सायातलं हाॅटेल_ म्हणूनच जास्त ओळख होती. कुठे चहा प्यायला जायचं तर सायातलं हाॅटेल. आजही जुनी जेष्ठ लोकं आठवण काढत असतात. त्यावेळी उद्योग धंद्यासाठी परीस्थिती बिकट होती. व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने लोकसंख्या पण मोजकीच होती. परीस्थिती सगळ्यांचीच तशी बेताची. हाॅटेल मध्ये जाऊन खायचं म्हणजे तसं घाबरूनच लोकं खायची. कारण घरून तशी परवानगी नसायची.

पण हळूहळू लोकं हाॅटेल मध्ये यायला लागली. त्यावेळी चिवडा १ आणा, चहा १ आणा, शेंगदाणा लाडू २ पैसे, कांदा भजी १ आणा एवढेच दर आणि एवढेच पदार्थ होते. तेंव्हा लाईट नव्हती, एसटी नव्हती. बैलगाडीचा वापर जास्त होता. धामणंद दसपटी चे लोक बैलगाडीने येत असत. त्यांचं प्रेमाचे हक्काचे ठिकाण म्हणजे सायातलं परांजपे हाॅटेल. चहा-पाणी, बैलांना पाणी-पेंढा व थोडा आराम करायला लोक इथे थांबत. तेंव्हा आडगावातून बैलगाडीने लोकं यायची. बैलांना इतकी सवय झाली होती की सायातलं हाॅटेल आलं की बैल तिथे थांबायचे. बैलगाडी मालक अनेकदा झोपलेले असायचे. पण बैल थांबणारच. हाॅटेल च्या मागे ४/५ पुरूष पाणी असलेली जुनी विहीर आहे. तिथे भाकरी-चटणी खाऊन लोक पुढे जायचे. तेंव्हा चहा तयार नसायचा, पाहीजे तेवढाच बनवला जायचा. तेंव्हाचा दिवसभराचा धंदा म्हणजे १५/२०/२५ रूपये ! सुरुवातीच्या काळात आप्पांच्या हाॅटेल व्यवसायात पत्नी पुष्पा वहिनी, सर्व पदार्थ घरी बनवून मोठं योगदान देत होत्या. सर्व पदार्थ चुलीवर बनवले जायचे. आजही पुष्कळसे पदार्थ हाॅटेल मध्ये चुलीवर बनवले जातात. आप्पांनी कधी कुणाला पैसे नाहीत म्हणून चहा पाण्यापासून अडवले नाही. आप्पांनी ह्या व्यवसायात भरपूर कष्टाने, मेहनतीने आणि सचोटीने आपलं स्थान निर्माण केले.

परांजपे हाॅटेल चालू झाल्यावर आप्पांचे सर्व जाती-धर्मातील मित्र जोडले गेले. अनेक मनमिळाऊ - आपुलकी ची माणसं आप्पाना आपल्या आयुष्यात सावलीसारखी लाभली. आप्पांच्या कारकिर्दीत हाॅटेल मध्ये सर्व नोकरांनी उत्कृष्ट सेवा दिली. आजपर्यंत हाॅटेल ला अनेक कलाकारांनी, आमदार, मंत्री महोदय, मान्यवरांनी भेट दिली आहे व आजही अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मिसळ, चिवडा ची चव घेण्यासाठी वारंवार येत असतात. अभ्यंकर रंगमंदिर, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रमाला आलेले, येणारे साधारण सर्वच कलाकार ... [ लक्ष्मीकांत बेर्डे, डाॅ. काशीनाथ घाणेकर, मोहन गोखले, भक्ती बर्वे, किशोर कदम, अरूण नलावडे, संजय मोने असे अनेक … ] परांजपे हाॅटेल ची चव घेतल्याशिवाय भेट दिल्याशिवाय पुढे गेले नाहीत, पुढे जात नाहीत !

हे हॉटेल सकाळी ५ वाजता उघडायचे. आजही हा शिरस्ता कायम आहे. बाकीची हॉटेल सकाळी ८ वाजता उघडायची त्यामुळे परांजपे हॉटेल हा या श्रमजीवी लोकांचा मोठा आधार होता. गावातील रिक्षावाले, गावातील सर्व श्रेणीतील लोक मग ते नोकरदार असोत की व्यापारी, सरकारी अधिकारी असोत की डॉक्टर किंवा वकील, तरुण विद्यार्थी असोत की रोजंदारी वर काम करणारा कामगार सर्वांच्या पसंतीस उतरलेले हे हॉटेल चिपळूणच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

एखादे बैठे घर असावे अशी वाटणारी वास्तू ! त्यामध्ये मागच्या पडवीत भटार खाना, मधल्या भागात एका बाजूला खाद्य पदार्थ साठवायची जागा, काउंटर तर दुसऱ्या भागात, ग्राहकांसाठी ४ टेबलं आणि बाके. पुढील पडवीत आणखी ४ टेबल आणि बाके. असे हे छोटेखानी स्वरूप.

परांजपे यांचा शेव-चिवडा खूपच प्रसिद्ध ! या चिवड्याची चव ही अगदी वेगळी, इतकी की मुंबई पुण्यात राहणाऱ्या मूळच्या चिपळूणकर माणसाला आजही हा चिवडा घेऊन जावासा वाटतो. तांबूस लाल रंगाचा दिसणारा चिवडा, त्यावर भावनागरी प्रकारची मध्यम आकाराची शेव आणि बरोबरीला कांद्याचा काप असा हा शेव चिवडा सुरुवातीपासून आजपर्यंत वर्तमान पत्राच्या कागदावर दिला जातो. येथील दुसरा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे उसळ-पाव किंवा मिक्ष्चर पाव. हिरव्या वाटण्या ची उसळ, हवी असल्यास त्यात बटाट्याची भाजी आणि त्याबरोबर पाव. सोबतीला कांदा आणि मागाल तेव्हढा रस्सा ! खरे खवय्ये या उसळी बरोबर २-३ पाव घेऊन खातात. नंतर १ शेव-चिवडा घेऊन त्या उसळी मधे मिसळतात. त्यावर रस्सा ओतायला सांगून हे मिश्रण थोडा वेळ तसेच राहू देतात. एकदा का हे मिश्रण मुरले की मग खरी त्या उसळीची लज्जत दसपटीने वाढते. त्याची चव आणि सर दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला येणे शक्य नाही. सोबतीला बटाटा-वडा आणि कांदा भजी देखील मिळतात. आजही चाकरमानी आपल्या चिपळूण भेटीत एक सकाळ तरी या अपूर्व सोहळ्यासाठी नक्की राखून ठेवतात. जुन्या नव्या मित्रांना भेटायचे असेल तर _आप्पांकडे नाश्त्याला जाऊया_ हा सर्वोत्तम पर्याय. पोटपूजा आणि गप्पाष्टक यासाठी यासारखी दुसरी योग्य जागा नाही.

हॉटेल चे मालक श्री. निवास परांजपे सांगतात की आज आमच्या हॉटेल ला ८० वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळात प्लेग, आता करोना, आर्थिक मंदी आणि या वर्षीचा महापूर अशी अनेक आव्हाने समोर उभी राहिली. पण उत्तम दर्जा, जिभेवर रेंगाळणारी अवीट चव, रास्त दर, स्वच्छ्ता आणि आपुलकी ह्या परांजपे हॉटेल च्या वैशिष्ट्यांनी आमच्या ग्राहकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. कोकणी माणूस हा जन्मजात खवय्या ! त्याच्या दृष्टीने हॉटेल च्या इंटीरियर पेक्षा तेथील पदार्थांची चव महत्त्वाची ! म्हणूनच आजही हॉटेल च्या मूळ रूपात काळानुसार फारसा बदल न करताही हे हॉटेल आजही ग्राहकांना पुन्हा-पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरले आहे.

येथे कोकणातील विशेष असे इतर पदार्थ जसे की कुळीथ पीठ, आंबा वडी, आंबा / फणस पोळी, आमसुले इत्यादी पदार्थ देखील तुम्हाला मिळू शकतील. यापुढे कधी जर चिपळूण वरून रस्त्या मार्गे जाणे होणार असेल, तर परांजपे हॉटेल येथे थांबून थोडासा विसावा आणि येथील खाद्यपदार्थांचा आनंद नक्की घ्या !

पोस्ट साभार ✍️ विनोद देवधर - डोंबिवली_

06/12/2025

ता ऐकलाव काय !
चिपळूण मधे सध्या निवडणुकांचा वारा हाय!!
त वाईज जरा जपून.. सत्ता येते - जाते..
माणुसकी टिकून राहते..
झो ह्या राजकारणापाय एकमेकांचे दुश्मन बनू नका !
चिपळूणकर म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात
निवडणुकांना सामोर जावा..
आणि आपला एकोपा कायम टिकवून ठेवा..
काय समजलीव!!!

Address

Chiplun

Telephone

+917448238805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukkam Post chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mukkam Post chiplun:

Share