LNN Your trusted source for news in Kalyan and beyond. 10 years of unwavering commitment to fast, reliable reporting, with citizens at the forefront.

कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा धावण्याच्या दिशेने पुढचे पाऊल ; रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक, आरटीओ अधिकाऱ्यांचे प्रयत्न...
22/08/2025

कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा धावण्याच्या दिशेने पुढचे पाऊल ; रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक, आरटीओ अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू

अधिक वाचण्यासाठी

अनेक वर्षांची नागरिकांची मागणी प्रत्यक्षात उतरणार कल्याण दि.22 ऑगस्ट : अनेक वर्षांपासून कल्याण शहरातील रिक्षा मी.....

डोंबिवलीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair ; विद्यार्थ्यांच्या ज्ञान -कलागुणांना मिळाले...
22/08/2025

डोंबिवलीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair ; विद्यार्थ्यांच्या ज्ञान -कलागुणांना मिळाले व्यासपीठ

डोंबिवली दि. २२ ऑगस्ट :
डोंबिवलीच्या जनरल एज्युकेशन सोसायटीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल (GEI’S Blossom International School, Dombivli ) शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. आज आणि उद्या अशा दोन दिवसीय या भव्य मेळाव्यात विद्यार्थ्यांनी, सर्जनशीलतेने बनवलेले आपले कृतीशील प्रकल्प आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे सादर केले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन एनईएस रतनाम महाविद्यालय, भांडुप येथील प्रा. राजीव मिश्रा यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास कोल्हटकर , प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तौमर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी भाषा आणि सामाजिक शास्त्र या शैक्षणिक प्रकल्पांसोबतच खेळ, कॉम्पुटर ,संगीत, नृत्य, चित्रकला आणि हस्तकलेच्या विषयातील कल्पकतेने आपले कौशल्य चमकदारपणे प्रदर्शित केले. लहान मुलांच्या रंगतदार आणि निरागस सादरीकरणांनी पालकांना अगदी भावूक केले.

तर इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, गणितीय संकल्पना आणि वैज्ञानिक प्रयोग अत्यंत उत्स्फूर्तपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगातून नवकल्पकता ठळकपणे उमटली.

या ज्ञानसोहळ्याला पालकांनीही उत्स्फूर्तपणे दाद दिली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे प्रकल्पांचे सादरीकरण केले, तर शिक्षकांनी ते मनापासून रेकॉर्ड करून शाळेच्या विविध माध्यमांवर उपलब्ध करून दिले.

या बहुरंगी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांची सादरीकरण कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, कलात्मक जाण, आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वृद्धिंगत झाले. या अविस्मरणीय सोहळ्याने GEI’S Blossom International School ची शैक्षणिक आणि कलात्मक दृष्टी अधिक खुलली असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा हा नवा टप्पा ठळकपणे अधोरेखित झाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे.

डोंबिवलीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair ; विद्यार्थ्यांच्या ज्ञान -कलागुणांना मिळाले...
22/08/2025

डोंबिवलीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair ; विद्यार्थ्यांच्या ज्ञान -कलागुणांना मिळाले व्यासपीठ

अधिक वाचण्यासाठी

  डोंबिवली दि.22 ऑगस्ट : डोंबिवलीच्या जनरल एज्युकेशन सोसायटीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल (GEI’S Blossom International School, Dombivli ) शाळेमध्ये STEAM e...

पाणी ओसरल्यानंतर साथीच्या आजारांची भिती: केडीएमसीकडून सफाई, धुरीकरण आणि औषध फवारणी मोहीम सुरु अधिक वाचण्यासाठी https://w...
22/08/2025

पाणी ओसरल्यानंतर साथीच्या आजारांची भिती: केडीएमसीकडून सफाई, धुरीकरण आणि औषध फवारणी मोहीम सुरु

अधिक वाचण्यासाठी https://www.localnewsnetwork.in/fear-of-epidemics-after-water-recedes-kdmc-starts-cleaning-fumigation-and-spraying-campaign/

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

  कल्याण डोंबिवली दि.22 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी पाण....

22/08/2025

कल्याण शीळ मार्गावरील पलावा उड्डाणपुलाजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली... आज सकाळची घटना...

व्हिडीओ माहिती सौजन्य: एलएनएन सिटीझन रिपोर्टर

* *
* *

22/08/2025

वैतागवाडी : कल्याणातील वाहतूक कोंडीचे ग्रहण अधिकच गडद; वाहतूक नियोजन हाताबाहेर

कल्याण दि.22 ऑगस्ट :
कल्याण शहराने गुरूवारी कधीही न भूतो अशी भयानक वाहतूक कोंडी अनुभवली. ज्यामध्ये सामान्य नागरिक अडकून पडले, शालेय विद्यार्थी अडकून पडले, रुग्णालयात जाणारे पेशंट अडकून पडले, या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर अडकून पडले, कोर्टातील वकील अडकून पडले, व्यावसायिक अडकून पडले, कर्मचारी अडकून पडले. इतकेच नाही तर दूध, औषधं, पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या हजारो गाड्याही अडकून पडल्या. कल्याण शहराची इतकी भयाण अवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती. मात्र काल निर्माण झालेली ही परिस्थिती म्हणजे शहर नियोजनातील भूतकाळात झालेल्या तसेच वर्तमानात होणाऱ्या चुकांची परिणीती. इतकेच नाही तर उद्यावर येऊन ठेपलेल्या एका भीषण संकटाची नांदी ठरली आहे. ( frustration: Traffic congestion in Kalyan is getting worse; Traffic planning is out of hand)

कधी काळी ‘निसर्गाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक आणि टुमदार वाड्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेले कल्याण आज गर्दी, गोंधळ आणि वाहतुकीच्या समस्येमुळे अक्षरशः वैतागवाडी झाले आहे. गेल्या काही वर्षांत शहराने प्रचंड वेगाने नागरीकरणाचा आणि लोकसंख्या वाढीचा अनुभव घेतला. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशा पायाभूत सुविधा विकासाचे नियोजन झाले नसल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनली आहे. याचे कालच्यापेक्षा ज्वलंत आणि भीषण उदाहरण बहुधा कोणतेही नसेल.

वाढती वाहनसंख्या – सर्वात मोठे संकट...
एका अंदाजानुसार, दर महिन्याला शेकडो नवीन चारचाकी आणि दुचाकी कल्याण परिसरात नोंदणीकृत होत आहेत. प्रत्येक घरात सरासरी दोन वाहने असणे आता नित्याचे झाले आहे. ही वाहने चालवण्यासाठीचे रस्ते मात्र दशकानुदशके तेच आहेत. परिणामी रस्त्यावर वाहनांचा सुळसुळाट होऊन शिस्तबद्ध वाहतुकीऐवजी प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे.

रस्त्यांची बिकट अवस्था...
कल्याणमधील बहुतेक रस्ते अरुंद, खड्डेमय आणि अव्यवस्थित आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते आणि त्यामुळे मागे-मागे लांबच लांब रांगा लागतात. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू असून ते महिनोनमहिने अपूर्ण राहते. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा अधिकच उडतो.

बेशिस्त वाहनचालक आणि पार्किंगचा गोंधळ...
वाहतुकीच्या कोंडीचे आणखी एक कारण म्हणजे बेशिस्त वाहनचालक. सिग्नल तोडणे, डावीकडून ओव्हरटेक करणे, रस्त्यावरच गाडी उभी करणे, दुचाकीस्वारांचे वेड्यावाकड्या पद्धतीने गाडी चालवणे – या गोष्टी रोजच घडत आहेत. रिक्षा चालक तर आपल्याच मनमर्जीने थांबतात, वळतात. यामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होतो. पार्किंगची समस्या तर एवढी गंभीर आहे की बाजारपेठा, स्टेशन परिसर किंवा शाळांच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्याने पादचाऱ्यांनाही चालणे अवघड होते.

अपुरी उपाययोजना...
वाहतुकीसाठी विशेष चौकशी पथके, पर्यायी रस्ते, मल्टी-लेव्हल पार्किंग (स्टेशन परिसरातील एकमेव प्रकल्प वगळता) यांसारखे प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत. त्यातही कल्याणात आणि आसपासच्या भागामध्ये पायाभूत विकासाचे अनेक मोठाले प्रकल्प सुरू असून त्या तुलनेत ट्रॅफिक पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी, अपुरी आहे. ज्यामुळे अस्तित्वात असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करणे अतिशय जिकिरीचे बनले आहे. तर शहरातील वस्तुस्थिती विचारात न घेता काढल्या जाणाऱ्या वाहतूक बदलाच्या अधिसूचनाही या गोंधळात भर घालत आहेत.

सण-उत्सव काळात काय होणार?...
कालचा विचार करता एरवीच्या सर्वसाधारण दिवशी जर एवढी बिकट परिस्थिती असेल तर येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा सण-उत्सव काळात कालच्यापेक्षा भयानक परिस्थिती उद्भवू शकते. ज्याचा सर्वात मोठा फटका रुग्णवाहिका, आणि आपत्कालीन वाहनांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे हीच मोठी समस्या बनते. इतकेच नाही तर कालच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक डॉक्टरही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने रुग्णांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले.

या मुद्द्यांवर गांभीर्याने काम करणे आवश्यक...

शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत असे चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, फ्लायओव्हर आणि बायपासची निर्मिती, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, बससेवा वाढवणे, स्थानकांवर पार्क-एंड-राईड सुविधा उपलब्ध करणे यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो अशा मुद्द्यांवर गांभीर्याने काम करणे आवश्यक बनले आहे.

या सर्वांवर कल्याणकरांना आता सर्वाधिक अपेक्षा आहे ती प्रशासनाच्या ठोस कारवाईची आणि त्याला राजकीय नेत्यांनी पूर्णपणे पाठिंबा देण्याची. अन्यथा, वाढत्या गर्दीमुळे आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे जीवनमानावर परिणाम होईलच, शिवाय आर्थिक घडामोडींनाही फटका बसेल. वेळ वाया जाणे, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण आणि ताणतणाव हे सर्व घटक इथल्या नागरिकांचा वैताग अधिकच वाढवत आहेत.

©️©️©️

टीम लोकल न्यूज नेटवर्क - LNN

वैतागवाडी : कल्याणातील वाहतूक कोंडीचे ग्रहण अधिकच गडद; वाहतूक नियोजन हाताबाहेरअधिक वाचण्यासाठी https://www.localnewsnetw...
22/08/2025

वैतागवाडी : कल्याणातील वाहतूक कोंडीचे ग्रहण अधिकच गडद; वाहतूक नियोजन हाताबाहेर

अधिक वाचण्यासाठी https://www.localnewsnetwork.in/frustration-traffic-congestion-in-kalyan-is-getting-worse-traffic-planning-is-out-of-hand/

fans Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

कल्याण दि.22 ऑगस्ट : कल्याण शहराने गुरूवारी कधीही न भूतो अशी भयानक वाहतूक कोंडी अनुभवली. ज्यामध्ये सामान्य नागरिक अ....

डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या...
22/08/2025

डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

तर काँग्रेसमध्ये पडली अंतर्गत वादाची ठिणगी

डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
डोंबिवलीतील काँग्रेसच्या चार माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केल असून पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाईल अशी ग्वाही यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील काँग्रस पक्षाला खिंडार पडले आहे. माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हदयनाथ भोईर, माजी नगरसेविका हर्षदा हदयनाथ भोईर, टिटवाळ्याचे माजी नगरसेवक बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे उपस्थित होते.

डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून या माजी नगरसेवकांची ओळख आहे. तसेच हदयनाथ भोईर, हर्षदा भोईर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुदाम भोईर, माजी उपमहापौर दि. पंडित भोईर यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या निष्ठावान काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने डोंबिवलीत काँग्रेसला खिंडार पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

‘भाजपमध्ये दाखल झालेल्या या नगरसेवकांशी आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत. विकासासाठी काँग्रेसचे असुनही त्यांनी कल्याण डोंबिवलीतील सर्व विकास कामांच्या विषयावर पालिकेतील ठरावांना नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे निरपेक्ष भावनेतून काम करणाऱ्या या नगरसेवकांचा भाजपमध्ये नेहमीच सन्मान केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

‘काँग्रेस म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे काँग्रेस असेच डोंबिवलीतील चित्र होते. मागील काही वर्षाचा विचार केला तर प्रभागातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी पक्ष बदल आवश्यक वाटू लागला होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. यापूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये होतो तरी आम्हाला विकास कामांसाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम यापूर्वीपासून भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी केले आहे,’ अशी प्रतिक्रिया यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी व्यक्त केली.

तर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढविण्यासाठी मित्र पक्षाचा सन्मान राखून असे पक्ष प्रवेश ही काळाची गरज असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले.

डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या...
22/08/2025

डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

अधिक वाचण्यासाठी https://www.localnewsnetwork.in/4-congress-corporators-from-dombivli-join-bjp-they-will-always-be-respected-by-the-party-state-president-ravindra-chavan-assures/

BJP Maharashtra Ravindra Chavan

तर पक्षप्रवेशाने काँग्रेसमध्ये पडली अंतर्गत वादाची ठिणगी डोंबिवली दि.22 ऑगस्ट : डोंबिवलीतील काँग्रेसच्या चार माज...

22/08/2025

*कल्याण पश्चिमेत काल झालेल्या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीला निमित्त ठरलेला प्रेम ऑटो ते शहाड पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतुकीची आज सकाळची ही सद्यस्थिती...*

https://www.instagram.com/reel/DNpHa48i2uF/?igsh=c2JkcXlzaDVsdTJh

* *
* *

21/08/2025

*कल्याण मुरबाड मार्गावरील शहाड पुलावर पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ पाहून या शहाड पुलावरून प्रवास करणारे वाहनचालक अक्षरशा जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तो पाहता सरकार आणि प्रशासन अपघात झाल्यानंतरच जागा होणार का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.*

व्हिडिओ माहिती सौजन्य: ॲड.रौनक सोमाणी, एलएनएन सिटीजन रिपोर्टर

* *
* *

Address

Kalyan West

Alerts

Be the first to know and let us send you an email when LNN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LNN:

Share