07/07/2024
सह्याद्री परिक्रमा करायची आहे ??... मग श्री. सदाशिव टेटविलकर सर लिखित #सह्याद्री_परिक्रमा हे पुस्तक आपल्या संग्रही असलेच पाहिजे. कारण; 👇
गडकिल्ले भटकंती करायला लागल्यावर प्रत्येक सह्यभटक्यांच्या मनात एकदा तरी एक विचार नक्की दाटून येतो, तो म्हणजे एकदा तरी सह्याद्री परिक्रमा केली पाहिजे गड्या... दख्खनच्या या मुळपुरूषाची एकदा तरी संपूर्ण परिक्रमा करून तो पायी पालथा घालावा, अशी इच्छा या आधुनिक जगात आज अनेक सह्यभटके मनाशी बाळगून आहेत. आजच्या आधुनिक साधनांच्या साहाय्याने ही परिक्रमा त्यामानाने थोडीबहुत सुकर होईल सुद्धा... परंतु; आजपासून ४० वर्षापूर्वी उपलब्ध अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने ही सह्याद्री परिक्रमा करावी असे पाच मित्रांच्या साथीने ठरले आणि केवळ ठरलेच नव्हे तर त्यांनी ती परिक्रमा पूर्ण सुद्धा केली. ही त्याचीच कथा...
..या मोहिमेतील ते पाच साथीदार म्हणजे रवी कांबळे, आनंद सावंत, जयंत गमरे, सुभाष मांडले आणि त्या सर्वांचे भाऊ म्हणजे अर्थात सदाशिव टेटविलकर होय. या सह्याद्रीभ्रमण मोहिमेत ब्रम्हगिरी ते तेरेखोल किल्ल्यापर्यंत जाण्याचे निश्चित केले. सह्याद्री परिक्रमेला ५ मे १९८३ या दिवशी ब्रम्हगिरीच्या कोंदणात बसविलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाने सुरुवात झाली. ही परिक्रमा करत असताना सह्याद्रीत असणारे गडकिल्ले, लेण्या, मंदिरे, घाटवाटा, गावं, तिथली माणसे, त्यांचे जीवन या सर्वांचा थोडा बहुत अभ्यास करता यावा हा मूळ उद्देश त्या सवंगड्यांचा होता. या संपूर्ण परिक्रमेत इगतपुरीचे देशमुख, भराडे, खडकेद चे रोहिदास कथले आणि प्रेमळ गावकरी, पांझर गावचे लक्ष्मण खडके, कुमशेतचे दत्तू असावले, इ. सारख्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या माणसांनी केलेल्या सहकार्यामुळे सुसह्य झाला. तर कधी भर उन्हात जंगलाला लागलेल्या वणव्यातून हा प्रवास करावा लागला. साक्षात रायगडावर झालेली गो. नि. दांडेकरांची (आप्पा) भेट ही या परीक्रमेतील साथीदारांना ऊर्जा देणारा क्षण होता. चिखली गावाच्या लोकांना सांगितलेली सुधागडच्या गड पुरुषाची कथा अत्यंत अंगावर शहारे आणणारी अशीच होती, असे एक ना अनेक प्रसंगांनी युक्त अशी सह्याद्री परिक्रमा परिपूर्ण आहे. हा सर्व प्रसंग आता पुस्तकाच्या साहाय्याने लिखित रुपात शब्दबध्द झालेला असून, आपल्या संग्रही असला पाहिजे असाच आहे.
पुस्तकाचे नाव :- सह्याद्री परिक्रमा
लेखक :- सदाशिव टेटविलकर
ISBN :- 9789391621940
पृष्ठ :- १९२ (संपूर्ण रंगीत)
मूल्य :- ₹५००/-
पुस्तक मागविण्यासाठी कृपया केवळ 9769428306 या अधिकृत भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.