19/06/2025
आपल्या शब्दसामर्थ्याने निसर्गाला वाचकांसमोर साजिवंत करणारे, मारुती चितमपल्ली!
वाघ, पक्षी, झाडं-झुडपं आणि आदिवासींच्या जगण्याशी त्यांनी जुळवलेला भावनिक बंध कुणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या लेखणीतून निसर्ग बोलायचा… आणि त्या प्रत्येक पानातून वाचकांच्या मनात हिरवळ रुजायची.
‘रानवाटा’, ‘चिटकुल्या’, ‘प्राणीसंवाद’, ‘निसर्गवेध’ अशा त्यांच्या पुस्तकांनी हजारो वाचकांच्या मनात निसर्गाचं अनोखं विश्व उभं केलं. फक्त निरीक्षण नव्हे, तर त्यांनी निसर्गाशी संवाद साधला… आणि तो संवाद इतका जिवंत होता, की वाचक त्याच्याशी एकरूप व्हायचे.
त्यांचं जीवन म्हणजेच निसर्गसंवर्धनाचं मूर्त स्वरूप. पेंच, ताडोबा, नवेगावसारख्या अभयारण्यात काम करताना त्यांनी जंगलाचं आणि तिथल्या जीवांचं संरक्षण केलं, त्याचबरोबर त्यांची कहाणीही आपल्या पर्यंत पोहोचवली.
त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी मिळाली होती. तर जानेवारी 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
मारुती चितमपल्ली हे केवळ सेवानिवृत्त वन अधिकारी नव्हते—त्यांचं संपूर्ण आयुष्यच निसर्गाच्या सेवेसाठी समर्पित होतं.
निसर्गाची भाषा जाणणारा हा माणूस, आज वयाच्या 93व्या वर्षी, अखेर निसर्गातच विलीन झाला.
द बेटर इंडिया तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌿
[ Homage to Maruti Chitampalli | Tribute | Indian forest officer | Marathi naturalist writer | Raanvata Nisargayan Aaranayrishi | Environmental inspiration ]