Samachar Hub

Samachar Hub I still believe that if your aim is to change the world, journalism is a immediate short-term weapon

⚡विकास हवा यात वाद नाही, पण हा विकास कोकणच्या मुळावर का?⚡समुद्राची गाज' नव्हे, लोकांच्या आवाजाची गरज आहे!मुंबई ते सिंधुद...
09/06/2025

⚡विकास हवा यात वाद नाही, पण हा विकास कोकणच्या मुळावर का?
⚡समुद्राची गाज' नव्हे, लोकांच्या आवाजाची गरज आहे!

मुंबई ते सिंधुदुर्ग फक्त ५ तासांत! गेमचेंजर सागरी मार्ग!
मथळा वाचून क्षणभर डोळे विस्फारले जातात. कोकणातील भविष्यासाठी मोठं स्वप्न उभं राहतंय असा भास होतो. पण नंतर लक्षात येतं की ही अजून एक बुलडोझर घोषणांची साखळी आहे, जी जमिनीवर नांगरायला विसरते.

आज कोकणवासीयांचा आवाज स्पष्ट आहे – "गरज नाही या रस्त्याची." आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा. त्या रस्त्याची अवस्था काय आहे हे पावसाळ्यात कुणालाही विचारता येईल. ६ तासाचं अंतर म्हणे, पण कधी १६ तर कधी २० तास लागतात. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि त्यावर कोणी उत्तर देत नाही.

तरीही प्रत्येक वर्षी एखादं नवीन स्वप्न दाखवायचं – कधी बुलेट ट्रेन, कधी सागरी मार्ग, कधी हायस्पीड कोरिडॉर. पण जे आहे ते निट करू शकत नाहीत. लोक विचारतात – "विकास म्हणजे नेमकं काय?"
➡️ निसर्गाच्या कुशीत कोकणाला काँक्रिटचा बेल्ट घालणं?
➡️ माशांच्या पोटावर पाय देऊन सी-रूट काढणं?
➡️ चार हॉटेलवाल्यांच्या हितासाठी संपूर्ण समुद्रकिनारा विकायला काढणं?

हे जर विकासाचं मॉडेल असेल, तर कोकणवासीयांना त्याचा तीव्र विरोध आहे. कोकणाच्या सौंदर्याला, जैवविविधतेला, आणि माणसांच्या जगण्याला गाडून 'विकास' करणं म्हणजे धोका आहे, प्रगती नव्हे.

तेच तर वाचकाने उपहासाने म्हटलं – "विकासाच्या नावाखाली घाण घालून ठेवणार ती वेगळीच. आता समुद्राची गाज ऐकत तेथेच राहतो!"

ही हास्यविनोदी पंक्ती खूप काही सांगून जाते –
राजकारण्यांच्या घोषणांच्या गाजेपेक्षा, खऱ्या समुद्राची गाज शंभर पट जास्त प्रामाणिक आहे. ती खोटं बोलत नाही, तारखा बदलत नाही आणि टेंडरमधून टक्केवारीही घेत नाही.

लोकांना हवे आहेत –
✅ पूर्ण आणि सुरक्षित महामार्ग
✅ वेळेवर रेल्वे
✅ आरोग्य, शिक्षण, रोजगार
✅ आणि सर्वात महत्त्वाचं – निसर्गाची अबाधितता

हे सगळं बाजूला सारून, 'फोटोजनिक' रस्त्यांची स्वप्नं दाखवणं म्हणजे केवळ राजकीय बाजारबुणग्या आहेत. हे जनता ओळखून आहे.

समुद्राची गाज ऐकवत नवीन रस्त्यांचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी, एकदा का होईना, लोकांच्या मनातील आवाज ऐकावा – "जे आहे ते जपा, आधी ते पूर्ण करा."
नाहीतर उद्या सागरी मार्गाच्या उदघाटनाला फक्त खड्डे, खर्च, आणि खंत हजर राहतील... जनता नाही.

पावसाळा सुरू झाला की कोकणातल्या रस्त्यांचा खराखुरा चेहरा उघड होतो. वरकरणी गुळगुळीत दिसणारे रस्ते पहिल्या पावसातच खरडून निघतात आणि खड्ड्यांचा उधाण येतो. वर्षभर "समृद्धी", "विकास", "५ तासांत सिंधुदुर्ग" अशा घोषणा ऐकवणाऱ्यांची झोपी गेलेली तंत्र यंत्रणा मग एकदम मौनात जाते.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली कित्येक वर्षं लांबणीवर टाकलं जातंय. अधूनमधून एखादं फित उघडण्याचं उदघाटन, पाण्याखाली गेलेली अपूर्ण कामं आणि मंत्रीमहोदयांचं गाजरगप्प आश्वासन – हाच परिपाठ झालाय. आजही रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत रस्ता म्हणजे खड्ड्यांची साखळी, वाहतूक ठप्प आणि प्रवाशांची परीक्षा.

ही परिस्थिती 'विकास' म्हणून खपवण्याचा प्रकार म्हणजे कोकणवासीयांची खुलेआम थट्टा आहे. हाच रस्ता, हाच पावसाळा, पण प्रत्येक वर्षी तेच प्रश्न – मग विकास कुठे गेला? "१५ दिवसात रस्ता तयार करतो", "संपूर्ण महामार्ग जूनपर्यंत पूर्ण" या घोषणा ऐकून आता जनतेनेही त्यावर विनोद करायला सुरुवात केली आहे.

कोकणच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांना हा नविन सागरी महामार्ग नको आहे. जे आहे ते जपा – ही मागणी आता बळावते आहे. पण सत्ताधाऱ्यांचं डोळ्यांत केवळ निवडणूक निकालच दिसत असतील, तर रस्त्यावरचे खड्डे त्यांना कसे दिसणार? निवडणुकीआधी "गेली ७० वर्षांत काहीच झालं नाही" म्हणणारे सत्तेवर आल्यावर मात्र, ७० दिवसातही काहीच करत नाहीत!

आज कोकणातील रस्त्यांची अवस्था म्हणजे एकाचवेळी सत्तेचा फसवणूकनामा, प्रशासनाची बेजबाबदारी, आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीचं जिवंत उदाहरण आहे.

जनतेने आता निर्णय घ्यायला हवा. विकास हवा पण झकास हवा – खोट्या जाहिरातींच्या घोषणांमध्ये नव्हे, तर जमिनीवर जाणवेल असा. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये सापडलेली गाडी फसलेली नाही – फसवलेली आहे, आणि हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे.

ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार

🗳️ मत म्हणजे केवळ बटन नव्हे, लोकशाहीवरचा विश्वास असतो!भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे — पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेच...
08/06/2025

🗳️ मत म्हणजे केवळ बटन नव्हे, लोकशाहीवरचा विश्वास असतो!

भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे — पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा सहभाग. या मूलभूत मूल्यांचा पाया जर हादरू लागला, तर लोकशाही केवळ नावापुरती उरते. अलीकडेच राहुल गांधी यांनी EVM प्रणालीबाबत प्रश्न उपस्थित करत, पारदर्शकतेच्या दृष्टीने पुनर्विचाराची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेला सत्ताधारी पक्षाने हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती पाहता ही मागणी केवळ रास्त नाही, तर अत्यंत आवश्यक आणि समर्पक आहे.

EVM म्हणजे Electronic Voting Machine — एक असा यांत्रिक यंत्रणा प्रणालीचा प्रकार जो मतप्रक्रियेला वेगवान, सोपा आणि खर्चिकदृष्ट्या कमी पडणारा मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने उठणाऱ्या शंका, आकडेवारीतील तफावत, मतमोजणीतील विलंब, VVPAT चा अपुरेपणा आणि डेटा transparency चा अभाव या सर्व कारणांमुळे EVM वरचा विश्वास गमावला जातोय. राहुल गांधींनी या सगळ्या बाबींवर लक्ष वेधताना एक मूलभूत प्रश्न विचारला आहे — आपण अशा यंत्रांवर एवढा विश्वास का ठेवतो आहोत, ज्या यंत्रांचं नियंत्रण आणि तपासणी प्रक्रिया जनतेच्या नजरेपासून पूर्णपणे दूर आहे?

हे केवळ राजकीय पक्षांचं वा निवडणूक आयोगाचं मुद्दा नाही, तर संपूर्ण मतदारसंघाचा प्रश्न आहे. मतमोजणी म्हणजे जनतेच्या निर्णयाचा हिशोब. ही प्रक्रिया जर अपारदर्शक असेल, किंवा "तांत्रिक कारणास्तव डेटा उघड करता येणार नाही" असं सांगितलं जाईल, तर मतदाराचा विश्वास उध्वस्त होतो. निवडणूक आयोगाने 2024 निवडणुकीनंतर निकाल, मतदान टक्केवारी, आणि अंतिम आकडे सार्वजनिक करण्यास विलंब करणे, किंवा आधीच दिलेले स्पष्टीकरण वेबसाइटवरून हटवणे — हे सर्व प्रकार EVM वरची शंका वाढवतात.

सत्ताधारी पक्ष म्हणतो, “बॅलट पेपरमध्येही गोंधळ होतो, मग पुन्हा त्याच्याकडे कशाला जायचं?” पण हा प्रश्न फसवणूक करणारा आहे. जगात अनेक प्रगत राष्ट्रांनी — जसे की जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स — EVM वापरून पुन्हा त्याचा त्याग केला आहे. कारण यंत्रावर संपूर्ण अवलंबून राहिल्यास, लोकांचा हस्तक्षेप, ऑडिट, किंवा मॅन्युअल तपासणी शक्य राहत नाही. EVM ही "ब्लॅक बॉक्स"सारखी बनते. भारतातही जर EVM वापरायच्याच असतील, तर VVPAT चा 100% मॅन्युअल मॅचिंग अनिवार्य करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?

खरे म्हणजे, जर बॅलट पेपरमध्येही समस्या आल्या, तर त्या "दृश्यमान" असतात — एकेक मत पुन्हा मोजता येते, जनतेसमोर ठेवता येते, न्यायालयीन पुनरावलोकन करता येते. पण EVM मध्ये तांत्रिक गडबड झाली, डेटाच गायब झाला, किंवा सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला — तर कोणतीही संधी उरत नाही. राहुल गांधींची ही मागणी म्हणजे निवडणूक यंत्रणेला बदनाम करणे नव्हे, तर तिच्यावरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी आहे.

लोकशाहीत प्रामाणिकपणे विचारणं हे गुनाह नसून गरज आहे. जर सत्ताधारी पक्षाला EVM प्रणालीवर इतका विश्वास आहे, तर त्यांनी खुल्या मंचावर तज्ज्ञांसोबत चर्चा, थर्ड पार्टी ऑडिट आणि संपूर्ण डेटा सार्वजनिक करण्यात कोणताही आडपणा वाटू नये. पण वास्तव उलट आहे — जेव्हा राहुल गांधी मतदान प्रक्रियेवर प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना ‘शहरी नक्षलवादी’ म्हटलं जातं, आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. हीच खरी शंका निर्माण करणारी बाब आहे.

आज भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक म्हणजे — निवडणुकीवरचा विश्वास उडत चालला आहे. हा विश्वास केवळ निवडणूक आयोगावरच नाही, तर संपूर्ण संविधानिक संस्थांवर परिणाम करणारा आहे. अशा वेळी, राहुल गांधी यांसारख्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित करणं, चर्चा मांडणं, आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरदायित्वाच्या कठड्यावर उभं करणं — हे लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

राहुल गांधींची मागणी ही देशाच्या लोकशाहीसाठीच नव्हे, तर जनतेच्या मताच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक आहे.

ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार

08/06/2025

🧨 EVM वरचं सत्य झाकण्यासाठी राहुल गांधींवर चिखलफेक? हे वागणं लोकशाहीला धोक्यात घालणारं आहे!

गडचिरोलीतून नागपूरकडे परतताना दिलेल्या विधानात देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लोकशाहीच्या प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला ‘शहरी नक्षलवाद’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे वक्तव्य केवळ हलकंफुलकं नाही, तर अतिशय गंभीर आहे. जो कोणी देशाच्या संविधानिक संस्थांवर प्रश्न विचारतो, तो नक्षलवादी ठरतो का? मग खुद्द भाजपने UPA काळात सर्वोच्च न्यायालयावर, निवडणूक आयोगावर, CBI वर जे आरोप केले होते, ते कोणत्या विचारधारेत मोडतात?

राहुल गांधी यांनी लिहिलेला लेख हा केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल नव्हे, तर संपूर्ण भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत होता. त्यात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न — मतदान टक्केवारीतील तफावत, मतमोजणीच्या वेळेचा विलंब, VVPAT च्या रँडम तपासणीत गोंधळ — हे सर्व सामान्य मतदारालाही सतावणारे मुद्दे आहेत.

फडणवीस म्हणतात, “हा विषय जुना झाला.” पण सत्य कधीच जुने होत नाही. जर राहुल गांधी खोटं बोलत असतील, तर मग निवडणूक आयोगाने २०२४ च्या निवडणुकीचा प्रत्येक डेटा जनतेसमोर का आणला नाही? आयोगाने त्यांचं स्पष्टीकरण वेबसाईटवरून का हटवलं? VVPAT आणि EVM मॅचिंगचं प्रमाण का उघडपणे जाहीर केलं गेलं नाही?

हे सगळं पाहिलं तर एकच निष्कर्ष निघतो — जनतेच्या शंकेवर उत्तर न देता, प्रश्न विचारणाऱ्यावरच चिखलफेक करायची हीच भाजपची नीती आहे. 'कन्व्हिन्स करता आलं नाही, तर कन्फ्यूजन पेरा' हे वाक्य राहुल गांधींसाठी नाही, तर भाजपच्या सध्याच्या प्रचारधोरणाचं लख्ख वर्णन आहे.

जेव्हा मतमोजणी थांबवली जाते, इंटरनेट बंद केलं जातं, आणि दुसऱ्या दिवशी निकाल पूर्णपणे बदलतो — तेव्हा प्रश्न विचारायचा अधिकार कुणाचा? लोकशाहीत हा अधिकार विरोधी पक्षाचा आणि जनतेचा असतो. पण सत्ताधारी या प्रश्नकर्त्याला देशद्रोही ठरवतात — आणि हेच खरं संकट आहे.

फडणवीस यांनी असा सल्ला दिला की "पराभव स्वीकारा आणि आत्मपरीक्षण करा". हे वाक्य स्वतः फडणवीसांनी २०१९ च्या सत्तेबाहेर गेल्यानंतर स्वतःसाठी ऐकायला हवं होतं. एका रात्रीत अजित पवारांसोबत सत्ता स्थापनेचा गुप्त शपथविधी करणारे तुम्ही — आणि सत्तेसाठी प्रत्येक तत्व विसरणारे तुम्ही — आता लोकशाहीचे संरक्षक असल्याचा आव आणता, ही शुद्ध विनोदाची गोष्ट झाली.

खरं तर राहुल गांधी हे एकच मागणी करत आहेत — मोकळं, पारदर्शक, आणि उत्तरदायित्व असलेलं मतदान आणि मतमोजणीचं प्रक्रियाशास्त्र. पण भाजपला ही पारदर्शकता नको आहे. कारण 100% ईव्हीएम घोळ उघड होईल, आणि सत्ताधाऱ्यांची पोलखोल होईल, याची त्यांना भीती वाटते. म्हणूनच आज राहुल गांधींना बदनाम करण्याचा डाव रंगवला जातोय.

लोकशाहीची खरी परीक्षा ही विरोधक किती प्रभावी आहेत यावर नव्हे, तर सत्ताधारी प्रश्नांना किती प्रामाणिकपणे उत्तर देतात यावर होते. पण आज प्रश्न विचारणारा देशद्रोही ठरतो, आणि झूट पसरवणारा देशभक्त मानला जातो — ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.

ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार

🛑जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या झुठ्या समृद्धीची पोलखोल!🛑स्लॅब कोसळतो, सरकार तोंड लपवतो – हेच का बुलेट वेगातील भारत?समृद्धी म...
08/06/2025

🛑जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या झुठ्या समृद्धीची पोलखोल!
🛑स्लॅब कोसळतो, सरकार तोंड लपवतो – हेच का बुलेट वेगातील भारत?

समृद्धी महामार्गाचा स्लॅब कोसळल्याची घटना ही केवळ अपघात नव्हे, तर शासनाच्या बेपर्वाईचे, निकृष्ट नियोजनाचे आणि भ्रष्ट व्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभा राहिलेला हा प्रकल्प इतक्या कमी कालावधीतच खराब होतो याचा अर्थ स्पष्ट आहे – यामागे केवळ निकृष्ट काम नाही, तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही आहे. उद्घाटनाच्या झगमगाटात ‘क्रेडिट’ घेणाऱ्यांनी आता या लाजीरवाण्या भगदाडाचंही क्रेडिट घ्यायला हवं.

स्लॅबच्या कोसळण्यामुळे निर्माण झालेली भगदाडं ही केवळ पुलावरची नाहीत, तर प्रशासनाच्या जबाबदारीतील भगदाडं आहेत. परवा उद्घाटन केल्याचे सांगितले गेले, संपूर्ण मार्ग खुला केल्याचा गवगवा झाला, मग हा असा अपघात कसा घडतो? जनतेचे प्रश्न रास्त आहेत. एकीकडे एवढे करोडो रुपये खर्च करून काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे हेच काम काही दिवसांत धोकादायक बनते. यातून फक्त एकच गोष्ट दिसून येते – सगळं काही वरवरचं आहे, आणि कामाचं प्रत्यक्ष स्वरूप निकृष्ट, अपूर्ण आणि फसवणूक करणारे आहे.

नितीन गडकरी यांना देशात ‘कामाचे मंत्री’ म्हणून ओळख दिली जाते. पण त्यांच्या काळात आणि त्यांच्या अधिपत्याखाली एवढे मोठे अपयश घडल्यास, त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. सर्वात बोगस कामं, सर्वात मोठ्या कंपन्या आणि त्यांना मिळणारे सरकारी ठेके – यातून सरकारच्या आणि खासगी ठेकेदारांच्या साटेलोट्याचं सत्य उघड होतं. जिथे मंत्री स्वतः करोडो रुपये मंजूर झाल्याचे अभिमानाने सांगतात, तिथे हे पैसे खरंच कुठे गेले, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.

हा संपूर्ण प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उघड लूट आहे. विकासाच्या नावाखाली सरकारी निधीचा गैरवापर आणि शासकीय प्रकल्पांमध्ये सुरु असलेले दलालीचे खेळ आता थांबले पाहिजेत. किती भ्रष्टाचार करणार? किती कमवणार? वयाच्या शेवटच्या टप्प्यातही एवढी हाव का? पुढच्या पिढीला नाव ठेवणारं कोणी उरणार नाही, मग एवढा हव्यास कशासाठी? हा संताप आता सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालाय.

या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. या प्रकल्पाचा खर्च, दर्जा आणि प्रत्येक टप्प्याचे लेखाजोखा जनतेपुढे आणला पाहिजे. ही केवळ अपयशाची घटना नाही, तर शासनाच्या नैतिक दिवाळखोरीचा कडवा दाखला आहे.

मुंबईत मेट्रो स्टेशन पहिल्याच पावसात पाण्याने भरते, पुलांचे स्लॅब कोसळतात, रस्त्यांवर खड्डे उघडतात – ही सर्व दृश्यं म्हणजे ‘विकास’ या नावाखाली चाललेली गुंतवणूकदारांची लूट आहे. उद्घाटनाचे रंगीत फ्लेक्स, मंत्र्यांचे फोटोज आणि ‘सर्व मार्ग खुले’ म्हणणारी भाषणं ही खोटी आश्वासनं आता उघडी पडत चालली आहेत.

शेवटी, हे लक्षात घ्या – जनतेने आता केवळ विकासाचे पोस्टर्स बघू नयेत, तर त्यामागे कोणता गंध आहे, त्याची शहानिशा करायलाही सुरुवात करावी. अन्यथा, हे भगदाड एक दिवस कुणाच्या जिवावर बेतेल, आणि तेव्हा सत्ताधारी मात्र पुन्हा एकदा जबाबदारी झटकून निघून जातील.

ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार

गडकरींच्या महामार्गांना 'भ्रष्ट' वळण – अडीच फुटांचे डिव्हायडर झाले एक फुटाचे!विकासाचा गवगवा मोठा असला तरी प्रत्यक्षात जम...
08/06/2025

गडकरींच्या महामार्गांना 'भ्रष्ट' वळण – अडीच फुटांचे डिव्हायडर झाले एक फुटाचे!

विकासाचा गवगवा मोठा असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर होत असलेल्या कामांची गुणवत्ता पाहिली की चित्र फार भयानक आहे. अडीच फुटांचे डिव्हायडर एक फुटाचे करून टाकणे हे केवळ भ्रष्टाचाराचे नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेवर खेळ करण्याचे प्रतिक आहे. नागरीकांच्या कराच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या रस्त्यांवर असा हलगर्जीपणा म्हणजे लाजीरवाणी बाबच!

हा प्रकार केवळ एका ठिकाणचा नाही. देशभरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प हे भ्रष्टाचार, निकृष्ट काम, आणि टोलच्या नावाखाली लुटमार यांचे जिवंत उदाहरण झाले आहेत. प्रत्येक किलोमीटरमागे हजारो कोटींचा खर्च दाखवला जातो, पण प्रत्यक्षात रस्ता काही महिन्यातच खचतो, फुटतो, किंवा वाहतूक धोकेदायक ठरते.

या प्रकरणात एखाद्या आमदाराने स्वतः पुढे येऊन डिव्हायडर उखडून फेकला, हे दाखवते की भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांपेक्षा कृती करणारे लोकप्रतिनिधी अजूनही अस्तित्वात आहेत. पण ही जबाबदारी फक्त काहीजणांची का? संपूर्ण व्यवस्था, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल.

गडकरींसारखे केंद्रीय मंत्री आपल्या कामाच्या जाहिरातीत, मोकळेपणाने मुलाखती देण्यात अग्रेसर असतात, पण त्यांच्या मंत्रालयाखालील प्रकल्पांमधील 'डिव्हायडर'सारखा भ्रष्टाचार त्यांना का दिसत नाही?

हे सगळं उघड झाल्यावर चौकशी तर होईल, पण नेहमीप्रमाणे "कामात थोडी गडबड झाली, पण पुढे सुधारणा करू" या थातुरमातुर उत्तरांवरच सर्व काही मिटेल. कंत्राटदार बदलले जातील पण त्याच मंडळींच्या कंपनीचे नाव दुसरे असेल.

महामार्गांची गती असो किंवा टोलच्या रकमा – सर्व काही 'विकास'च्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे आहे. जर अडीच फुटाचा डिव्हायडर एक फुटाचा होतो, आणि त्यावर कुणाची नजरही जात नाही, तर या देशात "डिव्हायडरपेक्षा" मोठा भ्रष्टाचार नक्कीच दडलेला आहे.

गडकरी साहेब, रस्त्यांवरचे खड्डे जनतेला दिसतात, पण मंत्रालयातील खड्डे कोण बुजवणार?

ॲड रूपा कदम
संपादक दैनिक सिंधुदुर्ग समाचार

08/06/2025

विकासावर शिक्कामोर्तब की लोकशाहीवर फितपट्टी?

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विधान — “मुंबईचा डेव्हलपमेंट प्लान मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केलाय, तो जनतेसमोर जातो त्यावेळी मतदान करतात, लोक विकासावर मतदान करतात आणि पुढचे १६ वर्ष राहुल गांधी आणि सर्वांनी विसरून जा...” — हे केवळ अहंकाराचे दर्शन नव्हे, तर लोकशाहीच्या मूलतत्त्वालाच झुगारून देणारा अविवेकी दावा आहे. एखाद्या योजनेला एकदाच जनतेची संमती मिळाली, की ती १६ वर्ष चर्चा, विरोध, पुनर्विचार यासाठी बंद झाली, असा कोणता कायदा भारतीय संविधानात आहे?

लोकशाहीमध्ये कोणताही "डेव्हलपमेंट प्लान" अंतिम नसतो. कारण विकास ही एक चालू प्रक्रिया आहे — त्यात सुधारणा, फेरआढावा, नव्याने उद्भवणाऱ्या गरजा, आणि लोकांच्या तक्रारी यांना स्थान असते. पण बावनकुळे यांच्या मते एकदा जनता मतदान करते, आणि मग पुढील दीर्घ काळ ती केवळ मुकदर्शक राहावी. हे विधान फक्त लोकांची बुद्धी कमी लेखणारे नाही, तर जनतेच्या मताचा अर्थ केवळ पावतीसारखा समजणारे आहे.

खरे तर, जेव्हा 'विकासावर मतदान' केले गेले, तेव्हा काय घडले? मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घोषणा अद्याप अपूर्ण आहेत. तुटपुंज्या मोबदल्यावर हजारो झोपडपट्टीवासीयांना बेघर करण्यात आले. महानगरपालिका हद्दीत मेट्रो, कोस्टल रोड, आणि इतर प्रकल्पांतून निष्कासन झालेल्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पाण्याची अडचण, सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणांचे हाल, आणि पायाभूत सुविधांची ढासळती अवस्था ही वास्तवता आहे — मग जनतेनं काय विसरावं?

तसे पाहिलं तर, बावनकुळे यांच्या '१६ वर्ष विसरा' या वाक्यात सूचक धमकी आहे — की एकदा तुम्ही आम्हाला निवडलं, की आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकारच नाही. हे 'विकास' नावाखाली फास लावण्याचा प्रकार आहे. अलीकडील काळात विकासाच्या नावाखाली जो 'प्रचार महोत्सव' चालला आहे, त्यात प्रत्यक्ष काम कमी आणि जाहिराती अधिक दिसतात. विकास फक्त फ्लायओव्हर आणि फित कापण्यापुरता मर्यादित झालेला नाही का?

राहुल गांधी यांचा उल्लेख करत बावनकुळे जणू काही सांगू इच्छितात की विरोधकांनी आता तोंड बंद ठेवावं. पण हे विसरता कामा नये की विरोधकांचा उद्देश सरकारवर टीका करूनच धोरणे योग्य मार्गावर आणणे असतो. विरोधक हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या मतांचा अपमान म्हणजे जनतेच्या आवाजाचाही अवमान होतो. शिवाय, राहुल गांधी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण आणि आरोग्यावर सातत्याने आवाज उठवत आहेत — त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचा एकदम 'विसर पडावा' अशी मांडणी म्हणजे राजकीय मग्रुरीचा कळस आहे.

राजकीय सत्तेवर आलेले नेते जर एवढ्या सहजपणे 'जनतेने आता विसरावं' सांगू लागले, तर हा धोका आहे. कारण ही प्रवृत्ती हुकूमशाहीकडे जाणारी आहे. आपण सर्वांनी या प्रकाराला प्रश्न विचारले पाहिजेत, चर्चा घडवली पाहिजे आणि सरकारला त्याच्या वचनांवर कायम आठवण करून दिली पाहिजे. विकास ही लोकांची गरज आहे, पण त्याचबरोबर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

सत्य विचारलं की गडबड होते, म्हणून सत्ताधारी विसरायला सांगतात. पण जनता विसरत नाही – ती संधीच्या प्रतीक्षेत असते.

ॲड रूपा कदम

06/06/2025

✅ आता जनतेने काय करायला हवं?

1. राजकीय अंधश्रद्धा सोडा – नेता म्हणजे देव नाही. त्याची परीक्षा घ्या.
2. मतदान हा फक्त हक्क नाही, तो भविष्याचा रिमोट आहे – चुका केल्या, तर ५ वर्षं भोगायला लागेल.
3. प्रश्न विचारा, मागणी ठेवा, आंदोलन करा, आणि विसरू नका.
4. भडक भाषणं, भावनिक स्टंट्स, जाती-धर्माचे राजकारण – हे हसू आणि नकार दोन्ही देण्यासाठी तयार राहा.
5. मीडिया जर विकलेली असेल, तर जनतेनेच “लोकशाहीचे रिपोर्टर” व्हावं.

05/06/2025

🛑 क्रिकेटचा विजय की जनतेचा पराभव?

🔹पैसा, प्रसिद्धी, आणि पिळवणुकीच्या खेळामागचं वास्तव

क्रिकेट हा भारतात 'धर्म' मानला जातो, खेळ नाही. "सचिन आमचा देव आहे", "विराट म्हणजे राजा", "धोनी म्हणजे युगपुरुष" अशा घोषणा देणाऱ्या देशात, क्रिकेट फक्त खेळ राहिलेलं नाही – ते एक शस्त्र झालंय. भांडवलशाहीचं शस्त्र. कधी विचार केलाय का – या शर्यतीच्या खेळात खरोखर कुणाचा विजय होतो?

🔹क्रिकेट – देशासाठी नव्हे, ब्रँडसाठी

आज भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून बाजारू पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या मनोरंजन उद्योगाचा कणा बनलाय. जिथे खेळाडूंच्या पाठीवर जाहिराती असतात, जिथे षटकारापेक्षा ब्रेकमध्ये आलेल्या प्रॉडक्टचं महत्त्व जास्त असतं. कधी IPL चे मालक कोण आहेत हे बघितलंय का?
– कोट्यवधींचे उद्योगपती, मॉल्स चालवणारे, खनिज संपत्तीचे व्यापारी, तेल-साखर-धातूचे दबंग घराणे.
त्यांच्यासाठी क्रिकेट म्हणजे ब्रँड प्रमोशन आणि आपल्या देशासाठी? – एक अश्रू विसरायचं साधन.

🔹खेळाडू विकले जातात, आणि भावनाही!

IPL म्हणजे खेळाडूंचा लिलाव. लाखो रुपयांना विकले जाणारे खेळाडू हाच देशाच्या सामाजिक ढोंगाचा आरसा आहे. एका बाजूला गावखेड्यात फुटबॉलला बूट नाही, बॅडमिंटनला कोर्ट नाही, हॉकीला बॅट नाही… आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटपटूंना जाहिरात कंपन्यांनी सोन्याचा बॉल दिलाय.

या लोकांना विचारावं – तुम्ही मिळवलेल्या कोट्यवधी पैशांतून कोणती शाळा सुरू केलीत? कोणती स्पोर्ट्स अकॅडमी चालवता? कोणत्या गरीब खेळाडूला हायएंड ट्रेनिंग देता? उत्तर एकच – माझं काम फक्त खेळणं आहे. पण खरं काम ते आहे का?

🔹जनता – एक अंधारात ठेवलेली जमात

रात्रीतून मॅच पाहणारा तरुण सकाळी बेरोजगार असतो.
क्रिकेटच्या ट्रेंडमध्ये रमलेली जनता दिवसभर महागाईच्या नाडीत भरडली जाते. जेव्हढ्या उर्जेने माणसं एक ओव्हरवर ओरडतात, तेव्हढी उर्जा पेट्रोल दरवाढ, शिक्षण हक्क, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्याचं ढासळतं स्वरूप यावर खर्च करत नाहीत.

कारण क्रिकेटने सत्ता आणि भांडवलदारांवर लक्ष जाऊ न देण्यासाठी एक झाकपाक घातलंय – रोटी, कपडा, मकान विसरून – फक्त रन, बॉल, विकेट बघा.

🔹क्रिकेटमध्ये मरणाऱ्या गर्दीचं काय?

कालच्याच घटनेत एक तरुण मुलगा मॅचच्या गर्दीत चिरडला गेला. कोणी विचारलं का – तो कशासाठी मेला? उत्तर स्पष्ट आहे – तो मेलाय एका बनावट विजयाच्या जल्लोषात. ती मॅच जिंकली होती – पण कोणासाठी? कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या मालकांसाठी. त्यांच्या ब्रँडच्या गुंतवणुकीवर ROI मिळालं, आणि एका सामान्य माणसाच्या जीवावर – जाहिरातींचा टॅग लागला.

🔹आणि शेवटी… नेमकं जिंकलं कोण?
▪️भांडवलशाही जिंकली.
▪️कॉर्पोरेट्सचा नफा वाढला.
▪️टीआरपी मिळाले.
▪️बँक खाती भरली.

आणि हरलं कोण?
▪️त्या गर्दीत जीव गमावलेला युवक.
▪️त्याच्या वडिलांचं स्वप्न.
▪️शहराच्या रस्त्यावर रात्रभर झोपलेला कामगार.
▪️मनोरंजनात गढून गेलेली, पण सत्यापासून दूर गेलेली जनता.

जेव्हा आपल्याला वाटतं की आपण देशासाठी जिंकलो, तेव्हा एक मिनिट थांबा… आणि विचार करा –

> आपण कुणासाठी ओरडलो होतो?
> कुणाच्या विजया साठी झेंडे फडकावले होते?
> आणि त्या गर्दीत आपल्या सारखाच एखादा भाऊ मरण पावला… त्यासाठी कोण जबाबदार?

आपण विजेते आहोत का बळी?
हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे.

ॲड रूपा कदम
संपादक

05/06/2025

🏏 क्रिकेटचा विजय की जनतेचा पराभव?

गर्दी क्रिकेटसाठी होते…
विजय साजरा होतो भांडवलदार टीमचा!
खेळाडू कोट्यवधींना विकले जातात,
आणि सामान्य माणूस गर्दीत चिरडून मरतो.

कोणासाठी खेळतो क्रिकेटपटू?
देशासाठी नाही – स्पॉन्सर, ब्रँड, मालक यांच्यासाठी!
त्यांच्या खात्यात नफा,
आणि आपल्याकडे – केवळ टाळ्या, सेल्फी, आणि विसरलेली विवेकबुद्धी!

जिंकलं कोण?
– कॉर्पोरेट्स, मीडियावाले, जाहिरातदार.

हरलं कोण?
– सामान्य जनता, तिचं भान, आणि एक जीव…

04/06/2025

🛑 गांधी-नेहरू परिवार पर कितनी भी कीचड़ उछालो, इससे ये सच्चाई नहीं बदलती कि…

1️⃣ देश में महंगाई चरम पर है
2️⃣ बेरोजगारी ऐतिहासिक स्तर पर है
3️⃣ किसान आज भी कर्जमाफी की राह देख रहे हैं
4️⃣ महिलाओं, आदिवासियों और पिछड़े वर्गों पर अत्याचार बढ़ते जा रहे हैं
5️⃣ चीन अब भी हमारी जमीन पर कब्जा जमाए बैठा है
6️⃣ स्वास्थ्य और शिक्षा पर सरकारी खर्च घटा है

🤦 सरकार को काम करने के लिए चुना था,
तो फिर नेहरू–इंदिरा–राहुल–प्रियंका के पुराने निजी फ़ोटो और फालतू टिप्पणियों में इतना समय क्यों बर्बाद?

🗣 देश के असली मुद्दों पर जवाब दो, पुरानी तस्वीरों और गंदी टिप्पणियों से जनता को भटकाओ मत!

✅ अगर सरकार सच में मजबूत है,
तो फिर राहुल गांधी ट्रक चला रहे हैं या साइकिल — इससे आपके विकास का क्या संबंध?

📣 जो खुद को "सनातनी" कहते हैं, उन्हें बदलाव और कर्म को महत्व देना चाहिए — ना कि फोटो एडिट करके झूठी ट्रोलिंग में समय गवाना!

पल्लवी जोशी यांनी 'आरपार' या पॉडकास्टमध्ये दिलेलं वक्तव्य "ताशकंद फाईल्स ते दिल्ली फाईल्स" या विषयावर सध्या चर्चेत आहे. ...
30/05/2025

पल्लवी जोशी यांनी 'आरपार' या पॉडकास्टमध्ये दिलेलं वक्तव्य "ताशकंद फाईल्स ते दिल्ली फाईल्स" या विषयावर सध्या चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या संदर्भातील रहस्य, त्यावरील संशय, आणि त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न यावर सविस्तर चर्चा केली आहे.

https://www.facebook.com/share/r/16GBftmoXe/

पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची वक्तव्यं म्हणजे इतिहासाचं अर्धसत्य पसरवून लोकांच्या भावना चाळवण्याचा प्रयत्न आहे.

🛑 २ ऑक्टोबर केवळ गांधी जयंती नाही, ती लाल बहादुर शास्त्री यांचीही जयंती आहे — पण तुमचं सरकार आणि तुमचे समर्थक दरवर्षी गांधीजींना बदनाम करत बसतात, आणि शास्त्रीजींचं नाव निव्वळ गांधीविरोधासाठी वापरतात.

१. शास्त्रीजींचा मृत्यू दु:खद होता, पण ‘पोस्टमार्टेम’चं राजकारण करणं म्हणजे त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूपाठचा सवाल उपस्थित करणं योग्य आहे, पण तो विषय गंभीर चौकशीचा आहे — चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो उकरून काढणं, किंवा एक पक्ष विशिष्टपणे दोषी ठरवणं, हे शास्त्रीजींच्या विचारांची खिल्ली उडवणं आहे.

२. शास्त्रीजींची टोपी रक्ताने माखलेली होती म्हणणं ही अतिरंजित नाटकी भाषा आहे. शास्त्रीजींचा मृत्यू ताशकंदमध्ये हार्ट अटॅकने झाला असा अधिकृत निष्कर्ष आहे. ‘टोपी रक्ताने माखलेली’ म्हणणं म्हणजे अशास्त्रीय आणि भावनिक पातळीवर लोकांची दिशाभूल करणं. वास्तविक, शास्त्रीजींच्या कुटुंबियांनीही गंभीर चौकशीची मागणी केली होती — पण त्यावेळीही, आणि नंतरही अनेक सरकारं (सर्व पक्षीय) त्यात निष्क्रिय राहिली.

३. जर खरंच शास्त्रीजींचं इतकं महत्त्व वाटत असेल, तर मोदी सरकारने त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी का सुरू केली नाही? दहा वर्षे सत्ता आहे, विशेष भर केवळ गांधी-नेहरू टीकेवर, पण शास्त्रीजींसाठी कोणताही विशेष स्मारक प्रकल्प, दस्तऐवज उघडणं किंवा चौकशी पुढे नेणं का नाही?

४. गांधीजींची जयंती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते — कारण ते एक सार्वकालिक मूल्य आहे. शास्त्रीजी हे गांधीजींचे अनुयायी होते, त्यांचं ‘जय जवान, जय किसान’ हे घोषवाक्य गांधीजींच्या विचारधारेचीच पुढची पायरी होती. त्यामुळे गांधीजींच्या विरोधात उभं करून शास्त्रीजींचं महत्त्व अधोरेखित करणं ही इतिहासद्रोही मांडणी आहे.

ज्यांना गांधीजींची चेष्टा करायची सवय आहे, त्यांना शास्त्रीजीही फक्त एक “हत्येचा थरार” वाटतात. पण ज्यांना देशहिताची आणि मूल्यांची जाणीव आहे, त्यांना दोघंही आदर्श वाटतात — गांधी अहिंसेचा आणि शास्त्री कर्तृत्वाचा.

त्या टोपीत रक्त नसून, त्यात एक निर्भीड, पण नम्र देशप्रेम साठलेलं होतं — जे तुमच्या भाषणांतून नाही, तर कृतीतून दिसलं पाहिजे.

ॲड रूपा कदम

भाच्यांच्या 'प्रेमात' हरवलेली निष्ठा – पण सत्य झाकता येत नाही!सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय महत्वाकांक्ष...
29/05/2025

भाच्यांच्या 'प्रेमात' हरवलेली निष्ठा – पण सत्य झाकता येत नाही!

सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपायी काँग्रेसवर टीका करत, राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवले. पण आपण लक्षात ठेवा – ज्यांनी आजवर तोंडभरून काँग्रेस खाल्ली, ज्यांनी आपल्या संधी काँग्रेसमुळे मिळवल्या, तेच आता स्वार्थासाठी भाजपच्या मांडीला मांडी लावत आहेत.

बाळासाहेब थोरातांसारखा निष्ठावान नेता, आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेला कार्यकर्ता… त्यांचा भाचा मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी आपली निष्ठा विकतो?

💥 राहुल गांधी कोण आहेत?
▪️ अडचणींच्या काळात काँग्रेसशी खंबीरपणे उभे राहणारे.
▪️ पंतप्रधानपद नाकारून पक्षाचा कायापालट
करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे.
▪️ भाजपसारख्या प्रचार यंत्रणेला एकटा पुरून उरणारे.
▪️ देशातल्या तरुणाईला, शेतकऱ्यांना, महिलांना आवाज
देणारे.

📌 आणि तांबे साहेब?
▪️ पक्षविरोधी उमेदवारी करून विधानपरिषदेत गेले –
कोणाच्या पाठिंब्याने हे सगळ्यांना माहीत आहे.
▪️ भाजपच्या गोटात जाऊन काँग्रेसवरच टीका करणे
म्हणजे निष्ठेचा अपमान नाही का?

काही गोष्टी लक्षात ठेवा:
1️⃣ सत्यजित तांबे यांच्या विजयात काँग्रेसचा नाही, तर
भाजपचा हात होता.
2️⃣ काँग्रेसने त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या, पण त्यांनी
केवळ सत्तेचा विचार केला.
3️⃣ राहुल गांधी यांच्यावर टीका करणं म्हणजे भाजपच्या
स्क्रिप्टनुसार बोलणं.

ज्यांच्या मुळांमध्ये निष्ठा नाही, त्यांची टीका ही केवळ असमाधानाचं ढोंग असतं.

👉🏼 राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असो, किंवा 'न्याय योजना', 'कृषी धोरण' – त्यांच्या प्रत्येक कृतीमागे सामान्य माणसासाठीचा विचार आहे. आजही ते कोणत्याही सत्तेच्या लालसेशिवाय जनतेसाठी लढत आहेत.

📢 या टीकाकारांच्या मनगटात काँग्रेसचं रक्त नाही – त्यामुळेच हे राहुल गांधींवर प्रश्न उभे करतात. पण भारताच्या कोट्यवधी तरुणांच्या मनात राहुल गांधींचं स्थान आजही दृढ आणि प्रभावी आहे.

ॲड रूपा कदम

#राहुलगांधी #भाच्याचं_राजकारण #जनतेसाठी_राहुल

Address

Vikram Mudranalay, Daily Sindhudurg Samachar
Kankavli
416602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samachar Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samachar Hub:

Share