24/05/2024
" कोल्हापूर जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान विभागाने गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृह इमारत कामात केली काम पूर्ण होण्या अगोदरच निधीची उचल,"
' सामाजीक कार्यकर्ते सर्जेराव खाडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली मागणी '
कोल्हापूर /प्रतिनिधी
गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह इमारत दुरुस्तीच्या कामात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारत दुरुस्ती कामाचे बील अगाऊ उचल करुन इमारत दुरुस्तीचे सुरु केले आहे,हे इमारत दुरुस्तीचे काम मनमानी पध्दतीने काम होत असलेबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव खाडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निराधार,अनाथ व समाजातील विशेष घटकातील मुलींचे किमान शिक्षण कायद्यानुसार शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी शासनाने राज्यभरात अनेक ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह सुरू केली आहेत.आज अनेक निराधार मूली या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून शिक्षण घेऊन सक्षम व स्वावलंबी बनल्या आहेत.गगनबावडा येथे ही शासनाने निराधार बालिकांसाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरु केले आहे.मात्र हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासनाचा निधी लाटण्याचे कुरण बनले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गगनबावडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण असल्यामुळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे वस्तीगृह दुरुस्ती करणे गरजेचे आहे,नेमका याच गोष्टीचा फायद्या घेत जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान विभागाने गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय दुरुस्तीसाठी सत्तर लाखाच्या वरती निधीची तरतुद केली आहे,जिल्हा परिषद सर्व शिक्षा विभागाने या इमारत दुरुस्ती कामाची निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदाराना इमारत दुरुस्तीचे काम देऊन प्रत्यक्ष का पूर्ण होण्या अगोदर इमारत दुरुस्तीच्या कामाचे बिल उचल केले आहे.
त्यामुळे गगनबावडा कस्तुरबा गांधी विद्यालय वस्तीगृह दुरुस्तीचे काम मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शासन नियम धाब्यावर बसवून गगनबावडा येयील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह दुरुस्ती कामाचे बिल उचल केलेल्या प्रकरणाची चौकशी करून सर्व शिक्षा अभियान विभागाने सुरू केलेल्या इमारत दुरुस्तीच्या कामाचे सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत सामाजिक लेखापरिक्षण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे सर्जेराव खाडे यांनी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.