Hum Laturkar - हम लातूरकर

Hum Laturkar - हम लातूरकर Hum Laturkar - हम लातूरकर

लातूरकरांनी आपले वाहने पिवळ्या पट्टीतच लावावी, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विश्व एंटरप्राईजेसला मनपाने दिली मुदतवाड...
04/07/2025

लातूरकरांनी आपले वाहने पिवळ्या पट्टीतच लावावी, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विश्व एंटरप्राईजेसला मनपाने दिली मुदतवाड..

लातूर -लातूर शहर महानगरपालिकेने ऑनलाईन ई-निविदेच्या माध्यमातून नो-
पार्किंगमध्ये थांबणा-या वाहनांना दंड आकारण्याचे काम विश्व एंटरप्रायजेस या
एजन्सीला दिले असून सदरील कामाची मुदत 12/12/2024 रोजी संपल्यानंतर मा.आयुक्त महोदय यांच्या मान्यतेने जा.क्र. लाशमनपाला / वा.वि./634/2024-25
दि.21/01/2025 रोजी पूर्वीच्या दराप्रमाणे निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विश्व एंटरप्रायजेस यांना सदरील कामास मुदतवाढ दिली आहे.
तेव्हा नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली वाहने पिवळ्या पट्टीच्या
आतमध्येच लावून वाहतूक नियमांचे पालन करावे जेणेकरून नागरिकांना दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागणार नाही. अशी माहिती विश्व एंटरप्राईजेसचे संचालक विश्वनाथ आल्टे यांनी दिली आहे.
Amit V. Deshmukh Dhiraj Vilasrao Deshmukh Latur Police Department

 #माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलरचे पूजन९लाख मेट्रिक...
15/06/2025

#माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलरचे पूजन

९लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ठ

माजी मंत्री चेअरमन दिलीपराव देशमुख यांची माहिती

पर्यावरणदिना निमीत्त कारखाना परिसरात वृक्षारोपण संपन्न

लातूर दि.५.

राज्यात नावलौकिक असलेल्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गाळप हंगामासाठी मिल रोलरचे पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी 5 जून २०२५ रोजी कऱण्यात आले त्यानंतर संचालक मंडळाची चालू गळीत हंगाम आढावा बैठक संपन्न झाली आज पर्यावरण दीन निमीत्त कारखाना परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

चालु गाळप हंगामात ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ठ

चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी केली जात असून मांजरा कारखान्याने आज पर्यतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत.त्यानुसार येणारा गळीत हंगाम देखील यशस्वी करून ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप केला जावा यासाठी यंत्रणा सज्ज होत असुन येणाऱ्या गाळप हंगामामध्ये कारखान्याने 9 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून गाळपास येणाऱ्या उसाची तोड 100% हार्वेस्टरद्वारे करण्यात येणार आहे कारखाना मालकीचे सध्या 8 हार्वेस्टर उपलब्ध असून येणाऱ्या हंगामासाठी आणखीन कारखाना मालकीचे 17 हार्वेस्टर घेण्याचा निर्णय मांजरा साखर कारखान्याने घेतला असुन 100% हार्वेस्टर द्वारे ऊसतोड करणार आहे कारखाना मालकीचे एकूण 25 हार्वेस्टर व कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँके मार्फत दिलेले 43 हार्वेस्टर व इतर हार्वेस्टर असे एकूण 80 हार्वेस्टर द्वारे ऊसतोड करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली

पर्यावरण दिनानिमित्ताने कारखान्यावर वृक्षारोपण

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कारखान्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख व सन्माननीय संचालक मंडळ मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पर्यावरनाच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून प्रत्येकानी आपापल्या परीने वृक्षाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत असे मनोगत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव काळे, कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे,मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, बालाजी पांढरे,अनिल दरकसे विलास चामले, अरुण कापरे, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, विकास देशमुख,कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी कामगार आदींची उपस्थिती होती.

 #लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करापदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा ...
15/06/2025

#लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करा

पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

लातूर (प्रतिनिधी)

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाचा विचार आपल्या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली असल्याचे सांगून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करुन स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूकीची तयारी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करुन सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. लातूर शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवार दि. ६ जून २५ रोजी प्रभाग आणि ग्रामअध्यक्षांच्या नियुक्ती पत्रवितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ. दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे आदी उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केलेल्या या संघटनात्मक फेरबदलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, हे बदल भविष्याचा वेध घेऊन केले. असून, काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, तर काही जुने चेहरे कार्यमुक्त झाले आहेत आणि काही सदाबहार चेहऱ्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. देशमुख यांनी महाराष्ट्रात असे संघटनात्मक फेरबदल करणारा लातूर हा कदाचित पहिला जिल्हा असेल असे नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती

आमदार देशमुख यांनी लोकसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा बारकाईने अभ्यास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठीची तयारी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरू करावी, असे आवाहनही याप्रसंगी केले. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे संदर्भ वेगळे असले तरी काही गोष्टी एकसारख्याच असतात. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि विरोधी पक्षांना गेलेली मते याचा बारकाईने अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात करता येईल असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील, मतभेद बाजूला सारून सर्वांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल, उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करावी लागेल या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट स्थापन करून लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही प्रमुख पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

"नव्या ऊर्जेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू!"- खासदार डॉ. शिवाजी काळगे

काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्या ऊर्जेने आणि उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात विजय मिळवता आला असला तरी, विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश त्यांनी मान्य केले.

खासदार काळगे म्हणाले की, "सत्ता नसल्यामुळे आपणाला काम करायला अडचणी येत
असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सत्ता खेचून आणू." यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवर बोलताना ते म्हणाले की, "सर्व नियुक्ती झालेल्या गुणवान कार्यकर्त्यांना आता काम करण्याची संधी मिळाली आहे." यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लातूर काँग्रेसच्या कार्यक्रमाला प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती
लातूर येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात विजयकुमार साबदे, गोरोबा लोखंडे, फारुख शेख, प्राध्यापक प्रवीण कांबळे, अहमदखान पठाण, व्यंकटेश पुरी, सुलेखा कारेपूरकर, रविशंकर जाधव, प्रवीण सूर्यवंशी, रामराजे काळे, एकनाथ पाटील, सचिन बंडापले आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, सर्व प्रभाग अध्यक्ष, सर्व गाव अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर व ग्रामीण भागासाठी प्रभाग आणि ग्रामअध्यक्षांची नियुक्ती माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते नियुकती पत्र प्रदान आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने लातूर शहर आणि ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने नवे प्रभाग अध्यक्ष आणि ग्रामअध्यक्ष नियुक्त केले आहेत. संबंधित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करत त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी काळात संघटनात्मक कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लातूर शहरातील प्रभाग अध्यक्ष पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. 1: श्री. गोरोबा लोखंडे,प्रभाग क्र. 2: श्री. सत्यवान कांबळे, प्रभाग क्र. 3: श्री. जी.ए. गायकवाड, प्रभाग क्र. 4: श्री. आसिफ बागवान, प्रभाग क्र. 5: श्री. यशपाल कांबळे, प्रभाग क्र. 6: श्री. गिरीष ब्याळे, प्रभाग क्र. 7: श्री. तबरेज तांबोळी, प्रभाग क्र. 8: श्री. सुरज राजे, प्रभाग क्र. 9: श्री. हारूण बासले, प्रभाग क्र. 10: श्री. डॉ. बालाजी साळूंके, प्रभाग क्र. 11: श्री. महादेव बरूरे, प्रभाग क्र. 12: श्री. धोंडिराम यादव, प्रभाग क्र. 13: श्री. ॲड. विजय गायकवाड, प्रभाग क्र. 14: श्री. सिद्राम कटारे (सर), प्रभाग क्र. 15: श्री. राजकुमार कत्ते, प्रभाग क्र. 16: श्री. बालाजी गवळी, प्रभाग क्र. 17: श्री. प्रा. संजय जगताप, प्रभाग क्र. 18: श्री. सुंदर पाटील कव्हेकर, ग्रामीण भागातील ग्रामअध्यक्ष यामध्ये बाभळगाव: श्री. अविनाश देशमुख, महापूर: श्री. संतोष भोसले, महाराणाप्रताप नगर: श्री. मुजाहिद इनामदार, शामनगर/१२ नं. पाटी: श्री. शिवलिंग धुमाळ, कव्हा: श्री. गोविंद इर्ले, सिरशी: श्री. रामराजे जाधव, कातपूर: श्री. दिनेश देशमुख, गंगापूर: श्री. भास्कर शिंदे, चांडेश्वर: श्री. महेश नलावडे, नांदगाव: श्री. सतिष कुलकर्णी, पेठ: श्री. दासराव सुर्यवंशी, बोरवटी: श्री. ज्योतीराम लकडे, पाखरसांगवी: श्री. अण्णासाहेब देशमुख, बसवंतपूर: श्री. बिरू सरवदे, हरंगुळ बु.: श्री. भिमाशंकर झुंझारे, हरंगुळ खु.: श्री. श्रीकांत भुजबळ, हणमंतवाडी: श्री. लक्ष्मण सपाटे, खंडापूर: श्री. नारायणराव ढोरमारे, खोपेगांव: श्री. विलास मोरे, खाडगांव: श्री. दौलत देशमुख, साई: श्री. ज्ञानेश्वर पवार, सिकंदरपूर: श्री. पुष्पराज सुरवसे या नियुक्त्यांमुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, आगामी काळात संघटनात्मक कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

या बैठकीत ॲड. किरण जाधव, ॲड.दिपक सुळ, श्रीशैल उटगे यांनी भाषण केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोळे यांनी केले, तर शेवटी फारुख शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 #आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नीलंग्याकडे अगोदर लक्ष द्यावे - ॲड. किरण जाधव आमदार अमित देशमुख यांच्या कार्यक्षमतेव...
15/06/2025

#आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नीलंग्याकडे अगोदर लक्ष द्यावे - ॲड. किरण जाधव

आमदार अमित देशमुख यांच्या कार्यक्षमतेवर मतदारांनी शिक्कामोर्तब केले

भाजपच्या नेत्यांनी संकटकाळात पाठ फिरवली

शहर जिल्हा कोंग्रेसचे ॲड. किरण जाधव यांचा भाजपला टोला

लातूर दि. १३.

लातूर शहर आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला असून शहरात नव्याने होत असलेले गावभागातील पटेल चौक येथील दवाखाना , शादीखाना, टागोर नगर गार्डन, प्रगती पथावर असलेला विलासराव देशमुख मार्ग , रस्ते , नाले, विविध योजना विविध विकास कामे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून घेतलेला वैद्यकीय प्रवेशाचा ७०/३० चा निर्णय , त्यांच्या विकास कामांची यादी मोठी आहे.

लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका निवडणुका जवळ आले की भाजप नेते लातूरकडे येतात, टीका करतात आणि जातात. मात्र ते सत्तेत असूनही केंद्राकडून किंवा राज्याकडून लातूरसाठी विशेष काहीही दिलं गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. रेल कोच फॅक्टरी मधील स्थानिकांना रोजगार अजूनही प्रतीक्षेतच आहे. उलट भुयारी गटार योजनेतून अस्तित्वात असलेले रस्ते फोडण्याचे काम सत्ताधारी करीत असून आमदार संभाजी पाटील यांनी आपल्या निलंगा मतदार संघाकडे आधी लक्ष द्यावे असा टोला लातूर शहर जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव लगावला आहे काल भाजपचे आमदार संभाजी पाटील यांनी लातूरच्या काँग्रेस नेत्यांनी काहीच विकास केला नाही अशी भूमिका मांडली होती त्याला काँग्रेसने हे उत्तर दिले आहे

*लातूरचा विकास लातूरच्या काँग्रेस नेत्यांनी केला आहे*

आमदार अमित देशमुख हे बोलून नाही, तर काम करून दाखवणारे नेते आहेत.त्यांची कामगिरी ही केवळ लातूर जिल्ह्यातच नाही, तर राज्यभरातील तरुणांमध्ये प्रेरणादायी असून
राजकारणाच्या नावाखाली टीका करणं सोपं आहे, पण लातूरच्या जनतेने बारकाईने पाहिलंय की कोण बोलतं आणि कोण प्रत्यक्ष काम करतं. मजबूत नेतृत्व असल्यानेचं लातूर सगळ्या क्षेत्रात ठसा उमटवत दिमाखात उभा आहे लातूरच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख,आमदार अमीत देशमुख यांनी प्रयत्न केल्याने विकास झालेला आहे हे लातूरच्या लोकांना दिसत आहे पण विरोधकांना मात्र प्रसिध्दी मिळवण्यासाठी काँग्रेसवर टीका करण्याची सवय लागली आहे असाही टोला अँड किरण जाधव यांनी लगावला आहे

*संकटात सत्ताधारी कुठेच नव्हते आम्ही मात्र लोकांच्या मदतीला धावलो*

लोकशाहीत सत्ताधारी विरोधी पक्ष या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. पण टीका करताना सत्ताधाऱ्यांनी ती वस्तुनिष्ठ आणि सत्यावर आधारित करावी. लातूरच्या जनतेने गेल्या दोन दशकांत कोण काम करतंय, आणि कोण भाषण करतंय हे बारकाईने पाहिलंय.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान आमदार अमित देशमुख यांनी त्यांच्या कामाचा लेखाजोखा, जनतेसमोर मांडला होता आणि लातूरच्या जनतेने त्यांना चौथ्या वेळेस लातूर शहर मतदार संघामधून निवडून देऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब केलेले आहे. गेल्या आठवड्यात लातूर व जिल्हाभरात विविध गावात शहरात ठिकठिकाणी अतिवृष्टीने पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे हाल झाले शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यावेळेस सत्ताधारी कुठेच दिसत नव्हते मात्र आमदार अमित देशमुख, काँग्रेस चे पदाधिकारी यांनी शहरात ठिकठिकाणी जावून पाहणी केली लोकांना आधार दिला लातूर शहराचा विकास करण्यासाठी स्थानीक काँग्रेस चे आमदार सक्षम आहेत त्यांच्यामुळेच शहराचा विकास झाला आहे आणि होत आहे, संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्याच्या विकासाकडे अधिक लक्ष दिलं तर बरे होइल. असा पलटवार लातूर शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी केला आहे

*शहरातील विविध प्रश्नांवर आमदार अमित देशमुख यांनी घेतल्या बैठका*

लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत प्रशासक असल्यामुळे अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेटी घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटूनही जिल्ह्यातील समस्या सोडवल्या जात आहेत या उलट सत्ताधारी मात्र केवळ सत्तेच्या मस्ती मध्ये भाषणबाजी करण्यात मग्न आहेत. लातूरची जनता हे सर्व जाणते त्यामुळे संभाजी पाटलांनी निलंग्यामध्ये लक्ष अधिक द्यावे आणि तेथील विकासाच्या संदर्भाने नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, लातूरच्या विकासासाठी अमित देशमुख कार्यक्षम आणि सक्षम आहेत असेही यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाची ई-निविदा अखेर निघाली!माजी आ.कव्हेकर व युवा नेते अजित पाटील कव्हेकरांच्या प्रयत्नाला ...
15/06/2025

कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाची ई-निविदा अखेर निघाली!
माजी आ.कव्हेकर व युवा नेते अजित पाटील कव्हेकरांच्या प्रयत्नाला यश
लातूर दि.14-06-2025
राजकीय क्रीडांगण बनलेल्या कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीची ई-निविदा नुकतीच काढण्यात आलेली आहे. दरम्यान शासनाच्या हालचाली लक्षात घेता विभागीय क्रीडा संकुल कव्हा येथेच होणार आहे. हे निश्‍चित झालेले आहे. त्या कामी कव्हा गावचे सुपूत्र माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते तथा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
लातूर तालुक्यातील विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्‍न दीर्घ काळापासून प्रलंबीत होता. 15 ऑगस्ट 2008 रोजी कव्हा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन कव्हा विभागीय क्रीडा संकुलासाठी 25 एकर जमीन मोफत दिली होती. 29 ऑक्टोबर 2013 रोजी 8 हेक्टर 79 आर जमीनीचा ताबा विभागीय संचालक क्रीडा व युवक सेवा विभाग यांना देण्यात आला. 2021 साली माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी याच कामासाठी न्यायालयीन लढा उभारून हे क्रीडा संकुल कव्हा-खोपेगाव याच ठिकाणी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामध्ये यश मिळाले असले तरी या कामाबाबतची ई-निविदा प्रक्रिया सुरू न झाल्याने विभागीय क्रीडा संकुलाच्या कंम्पाऊंड वॉलचे काम पूर्ण होऊन उर्वरित काम रखडले होते. त्यानंतर लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता व उपलब्ध निधीच्या अनुषंगाने क्रीडा सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या कामाची ई-निविदा मात्र रखडली होती. याबाबत भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्‍नबाबतचे निवेदन देताच या कामाची ई-निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जाहीर केली असून ई-निवीदा प्रणालीद्वारे 10 ते 17 जून या कालावधीत ऑनलाईन ई-कोटेशन मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ई-निविदेची प्रक्रीया पूर्ण होण्याचा कालावधी 17 व 18 जुन 2025 रोजी ठेवण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच विभागीय संकुलास गती मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कव्हा व पंचक्रोषीतील नागरीकामधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील - अजित पाटील कव्हेकर
नियोजित विभागीय क्रीडा संकुल उभारल्यानंतर या भागातील होतकरू खेळाडूंना नव्याने सुविधा उपलब्ध होणार आहेत. या शिवाय विद्यार्थी व तरुणाईला विविध खेळाबद्दल आकर्षन निर्णय होईल आणि यातूनच राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी चांगले खेळाडू तयार होतील. या कामाचे शुक्‍लकाष्ट संपले असून विभागीय क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री आ.संजय बनसोडे, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेशअप्पा कराड यांच्यासह या कामी मदत करणार्‍या सर्वांचे मी कव्हा गावचा सुपूत्र या नात्याने आभार मानतो. या सर्वांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार्‍या विभागीय क्रीडा संकुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील अशी प्रतिक्रीया भाजपा युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
------------------------------------------

15/06/2025

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन

लातूर, दि. 15 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उद्या, 16 जून 2025 रोजी होत असून, लातूर जिल्ह्यातील शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार असून, त्यांचे पहिले पाऊल अविस्मरणीय ठरावे यासाठी पायांचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रम राबविला जाईल.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय 147 अधिकाऱ्यांनी 230 शाळा दत्तक घेतल्या असून, या शाळांमध्ये पटवाढ आणि गुणवत्तावृद्धीसाठी वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत.
‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शाळा परिसरातही वृक्षलागवड आणि स्वच्छता मोहीम राबविली गेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ दिला जाईल.

जिल्हा परिषद शाळांचा पट 25 टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले असून, यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती आणि उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे.

‘राजमाता जिजामाता’चे‘नीट’ परीक्षेत घवघवीत यशलातूर : महाराष्ट्र टेस्टिंग एजन्सीच्यावतीने वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प...
15/06/2025

‘राजमाता जिजामाता’चे
‘नीट’ परीक्षेत घवघवीत यश
लातूर : महाराष्ट्र टेस्टिंग एजन्सीच्यावतीने वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या ‘नीट’ परीक्षेत येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
ईशिता अरविंद खोत ही विद्यार्थिनी ४८९ गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम, सिध्दी संजय अंबुसकर ही ४५० गुण घेऊन द्वितीय, तर गीता गोरोबा गोरे ही ४२० गुण घेऊन तृतीय आली आहे. तसेच यश गोपाळ जाधव याने ३९७, दिशा तानाजी चोरघे ३८०, रुद्राक्ष तुळशीदास बंडगर ३१५, अमर शरद जाधव ३१०, तर मृणाल विवेक आवळे आणि वेदिका गोपालदास तिवारी यांनी प्रत्येकी ३०० गुण मिळविले आहेत.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, पुणे शिक्षण संचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ, शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, उपप्राचार्या कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, समन्वयक अश्‍विनी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, करिष्मा केंद्रे, राजेंद्र जायेभाये, प्राचार्य जी. आर. मुंडे, शैक्षणिक समन्वयक राजीव मुंढे, राणी केंद्रे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. ए. एस. खोत, प्रा. डी. ए. फंड, प्रा. वैशाली पाटील, शिवकांत वाडीकर, विष्णू कराड, परमेश्‍वर गित्ते, बालाजी चाटे यांनी कौतुक केले.

लातूर शहराच्या व जिल्हयाच्या विकासाला नियोजन पूर्वक गती देउ..शिवाजीराव पाटील कव्हेकरलातूर दि.15-06-2025लातूर ग्रामीण व श...
15/06/2025

लातूर शहराच्या व जिल्हयाच्या विकासाला नियोजन पूर्वक गती देउ..
शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.15-06-2025
लातूर ग्रामीण व शहराच्या विकासासाठी आपण मांजरा धरणातून शहरासाठी कायम पाईपलाईन 150 कोटीची सन 1996 मध्ये पूर्ण केली. ग्रमीण भागातही अनेक गावाला पाण्याच्या योजना दिल्या लातूर जिल्हा स्टेडियमचे बंद पडलेले काम पुन्हा शासनाच्या वतीने आपण पूर्ण केले. लातूरला एस.एस.सी. बोर्ड स्थापन केले. भुकंपग्रस्त ग्रामीण 30 हजार कुटूंबाला आपण कोटयावधी रूपये मंजूर करून वाटप केले. भुकंप काळात काम करणार्‍या 1000 इंजिनिअरला ना.नितीनजी गडकरी साहेब यांनी आमच्या प्रयत्नामुळे नौकरीत कायम केले. अशा विविध योजना राबवल्या येत्या काळात लातूर शहराला स्मार्ट चंदीगड बनवन्याचा प्लॅन आपण तयार केला असुन ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाला सर्वाच्या सहकार्याने गती देउ असे कव्हा येथील सत्कार प्रसंगी मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.
कव्हा स्टेडियम कामाला शासणाने गती दिल्यामुळे कव्हेकरांचे अभिनंदन..
महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विभागीय स्टेडियम सन 2008 मध्ये मंजूर केले सदरील स्टेडियमसाठी शासनाच्या मागणीनुसार मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांनी ग्रामपंचायत कव्हा यांना आग्रहकरूण 25 एकर जमीण मोफत दिली. सदरील जमीनीमध्ये कंम्पाउंन्ड वॉलचे कामही करण्यात आले परंतू राजकीय हव्यासापोटी कव्हा गावात व या भागात स्टेडीयम नको म्हणून विरोध करन्यात आला त्यामुळे चालू असलेले स्टेडियमचे काम बंद पाडन्यात आले. या विरूध्द मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मा.उच्च न्यायालय संभाजीनगर येथे रिट दाखल केली. त्या वरूण मा.उच्च न्यायालयणे स्टेडियमचे काम कव्हा येथे करावे कामाचा प्रोग्रेस रिपोर्ट दर 3 महिन्याला द्यावा व सन मे 2025 पर्यंत काम पूर्ण करावे असा आदेश दिला तरी ही कामाला गती दिली नाही.
राज्यातील कॉग्रेस ठाकरे सरकार जाउन शिंदे फडणवीस सरकार आले. त्या काळात ना.फडणवीस ना.गिरीष महाजणजी ना.संजय बनसोडे जे क्रिडा विभागाचे मंत्री होते त्यांनी कामाला गती दिली व निधी ही उपलब्ध करून दिला. सदरील कामाला मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शिवेंद्रराजे भोसले, यांनी गती देण्याच्या सुचना दिल्यामुळे स्टेडियम कामाचे टेंन्डर निघाले त्यामुळे आता कव्हा येथील काम कोणीही थांबउ शकणार नाही स्टेडियम मुळे लातूर तालुका औसा तालुका भागातील ग्रामीण शहरी भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. हे काम कव्हा येथेच व्हावे म्हणून मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांनी जो संघर्ष केला व परिश्रम घेतले त्या बददल कव्हा ग्राम पंचायत व कार्यकर्त्याच्या वतीने शॉल,श्रीफळ देउन सत्कार करन्यात आला यावेळी गावातील जेष्ठ सहकारी प्रा.गोविंदराव घार, सरपंच श्री.किशोर घार,मा.सरपंच अच्युतराव पाटील, प्रा.अशोकराव पाटील यांचा पुष्पगुच्छ व शॉल देउन सत्कार करण्यात आला यावेळी नेताजी मस्के,नामदेव मोमले, राम घार, अमर पाटील, लक्ष्मण सुर्यवंशी, शिवराज बोयणे, नागेश जाधव, ज्ञानेश्‍वर शिंदे, कांताप्पा पाटनकर,आदीसह ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी फादर्स डे औचीत्य साधुन प्रा. प्रशांत पाटनकर यांनी कव्हेकर साहेबांचा सत्कार केला.

चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी मनपाचे दहा दिवसीय तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न. लातूर /प्रतिनिधी : दि. १५ ज...
15/06/2025

चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी मनपाचे दहा दिवसीय तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न.



लातूर /प्रतिनिधी : दि. १५ जून लातूर महानगरपालिका व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने मनपा शाळा क्रमांक ११ येथे मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसुळे यांच्या संकल्पनेतून दिनांक ५ जून रोजी सुरू करण्यात आलेल्या तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा आज दिनांक १५ जून रोजी मुख्याध्यापक वैभव बोंदर यांच्या उपस्थितीत चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी समारोप करण्यात आला.

महानगरपालिकेतील शाळेत विविध क्रियाशील उपक्रमाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसुळे व मनपा शिक्षण विभाग प्रमुख श्वेता नागणे यांच्या संकल्पनेतून मनपा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी लढता यावे व विद्यार्थी स्वयंसिद्ध व्हावे या हेतूने दहा दिवसीय तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचे लातूर मनपा व तायक्वांदो असोसिएशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

दहा दिवस चाललेल्या या तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच मास्टर नेताजी जाधव, मास्टर धनश्री मदने व मास्टर जान्हवी मदने यांनी तायक्वांदो मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले तर मनपा शाळेच्या वतीने दहा दिवस नियमित पोषक आहार, फळे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरात प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी हाताने, पायाने व डोक्याने फरशा फोडून प्रशिक्षणात देण्यात आलेले धाडस, साहस, आत्मविश्वास, निर्भयता व असाधारण ताकदीचा प्रत्यय उपस्थितांना आणून दिला.

या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनात मनपा शाळा क्रमांक ११ चे शिक्षक देवराज लंगोटे, ईश्वरप्रसाद मांडे, सौ अनिता गुजे व भुतकर ताई यांनी हिरीरीने भाग घेतला होता

13/04/2025
13/04/2025
13/04/2025

देशमुख कुटुंब ❣️

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hum Laturkar - हम लातूरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share