Jsm Backpacker

Jsm Backpacker JSM BACKPACKER
YOUR GUIDE TO TRAVEL & ADVENTURE
जे पेराल तेच उगवेल🌾
निष्ठा | कर्म | धर्म

11/02/2024
07/02/2024

रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे समाधी स्मारक तुम्ही पाहिले आहे का?

रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे
समाधीस्थळ, किंजळोली, ता. महाड, जि. रायगड

रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म १६१६ साली झाला असून, त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजळोली जावळीच्या चंद्रराव मोन्यांशी घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजाला मोर्याच्या सैन्याकडून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी याना मराठा सैन्यात दाखल करून घेतले.

१६६५ माये औरंगजेवाले मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांना दीड लाख या फौजेनिशी स्वराज्यावर सोडलं. स्वराज्यावर याच्या रूपाने नवीन संकट घोंगावत होते. मिर्जाराजाने ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केते. त्यापुढे मराठी सैन्यात्ता टिकाव लागणे फारच अवघड होते. मोगल सरदार दिलेरखानाले ४०००० सैन्यासह पुरंदर गडाला वेढा दिला व गड घेण्याचा प्रयत्न केला मुरारबाजींनी गडावरील सैन्यास येऊन गड झुंजवायची शर्थ केली. स्वराज्याने नुकसान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना ११ जून १६६५ रोजी भेटण्याचे ठरविले. नेमके याच दिवशी दिलेरखानाने पठाणांच्या फौजेनिशी पुरंदर माचीवरून बालेकिल्ल्यावर आक्रगणाला सुरवात केली गड राखण्यासाठी मुराबाजीनी सातशे निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली. या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले तरी हल्ला चालूत होता. हा पराक्रम पाहून दिलेरखानाने लढाई थांबवली व मुरारबाजींना तो म्हणाला, "अरे तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जहागिरी ठेऊन शौर्याचे आम्ही चिज करू" हे ऐकून मुरारबाजी म्हणाले. मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल येतो की काय ?" असे बोलूल मुरारबाजी दिलेरखानावर चालून गेले मात्र दिलेरखानाले सोडलेला बाण मुरारबाजीच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले अवघ्या सातशे मावळ्यानिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणा-या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

तब्बल दीड महिने पुरंदर लढता ठेवून १९ जून १६६५ या दिवशी हा महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला दिलेरखानाचा बाण लागून मुरारबाजी धारातीर्थी पडते. पुरंदर गडाच्या माचीवर मुरारबाजीचा पुतळा आहे. या मागे एक छोटेखानी घुमटीत वीराचे स्मारक आहे. हे बहुधा मुरारबाजीच्या बलिदानाचे स्थान आहे. महाडजवळच्या किंजळोली (बुद्रुक) या गावी मुरारबाजीच्या राहत्या वाड्याची जागा आहे. किंजळोली (खुर्द) गावाशेजारच्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात काही प्राचीन वीरगळ व इतर अवशेष आहेत. सोमेश्वर महादेव मंदिराच्या अगदी समोर असलेली समाधी ही मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे.


---------------------------
Business Enquiry-
[email protected]

Follow Us
Twitter-https://x.com/bhau_06_?t=csidEwDniqPYDylptrnRzw&s=09
Facebook-https://www.facebook.com/jagdish.mahadik.528?mibextid=ZbWKwL
Instagram-https://www.instagram.com/jsm_backpacker?igsh=MW1yaHB6MjloMW1sZQ==

सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतर...
05/02/2024

सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, कांगोरी, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हे किल्लेही स्वराज्यात दाखल करून घेतले. ह्यातील काही गड केवळ टेहळणीसाठी वापरत असल्यामुळे ते घेणे फारसे अवघड गेले नसावे पण ते घेण्यासाठी त्यांनी नेमका कुठला मार्ग घेतला ते इतिहासाला माहित नाही पण हे सर्व किल्ले नोव्हेंबर व डिसेंबर १६५७ ह्या दोन महिन्यात घेतल्याचे दिसुन येते. महाराज पन्हाळगडावर अडकले असता राजापुरच्या इंग्रजांनी विजापूरकरांना केवळ दारुगोळाच पुरवला नाही तर सिद्धी जोहारच्या सैन्यात येऊन इंग्रजी निशाण फडकावीत तोफा डागल्या त्यामुळे पन्हाळ्याच्या कोंडीतून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळ महाराज राजापुरास धडकले. राजापुर वखारीचा रेसिडेंट रेव्हिंग्टन व काही इंग्रजाना पकडून कैद केले. त्यातील दोन इंग्रज कैदेतच मरण पावले. या कैद्यांना महाराजांनी रायगडजवळील सोनगड येथे आणले व त्यांना रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी काही
काळ सोनगडावर कैदेत होते. शेवटी रेसिडेंट रेव्हिंग्टन आजारी पडला तेव्हा बरे होताच परत येण्याच्या अटीवर तो १७ ऑक्टोबर १६६१ रोजी सुरतेस गेला.
पुरंदर तहात मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यात सोनगडाचा उल्लेख येतो. मात्र महाराष्ट्रात तीन सोनगड असल्याने नेमका कोणता याचा गोंधळ होतो. अर्थात यावेळी कणकवलीजवळचा सोनगड आणि सिन्नरजवळचा सोनगड शिवाजी राजांच्या ताब्यात नसल्याने, रायगडाजवळचा सोनगड महाराजांनी मोघंलाना दिला असला पाहीजे. अर्थात पुढे लगेचच दोन वर्षांनी हे सर्व गड महाराजांनी परत घेतले. यानंतर सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते.

महाड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधार पाले या लेणी मध्ये 22 क्रमांकाच्या लेणीत आपल्याला भगवान गौतम बुद्धां...
31/01/2024

महाड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधार पाले या लेणी मध्ये 22 क्रमांकाच्या लेणीत आपल्याला भगवान गौतम बुद्धांची प्राचीन शिल्प पाहायला मिळते या शिल्प मध्ये भगवान गौतम बुद्ध सिंहासनावर विराजमान झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या बाजूला बोधिसत्व वज्रपाणि पाहायला मिळतात गौतम बुद्धांच्या चरणा जवळ दोन हरणांचे शिल्प पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्या दोन्ही हातात मुकुट धरून गंधर्व पाहायला मिळतात आणि या प्राचीन शिल्पेत अप्रतिम अशी नक्षीकाम केलेले मकर सुद्धा पाहायला मिळते..

06/01/2024

जगाचा ईश्वर- जगदीश्वर मंदिर🍃🔱

Address

Mahad
402301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jsm Backpacker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share