MS News

MS News .

25/09/2025

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर, मुंडेंनी घेतली मुलीच्या लग्नाची जबाबदारी .

25/09/2025

अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरले; कॉ. राजन क्षीरसागर यांचा गर्भित इशारा ...

#मराठवाडा #गोदावरी #पाऊस

25/09/2025

भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित दादा पालकाच्या भूमिकेत शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बांधावर

#गोदावरी #मराठवाडा #पाऊस

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज धोंडराई व हिरापूर येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करून ...
24/09/2025

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज धोंडराई व हिरापूर येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करून त्यांना तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.

✅ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू
✅ शासनाद्वारे लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचे काम सुरु
✅ 65 मिमी पेक्षा कमी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांचेही पंचनामे होणार
यावेळी आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

#माजलगाव #गोदावरी #जायकवाडी #पाऊस #पुर

 #पहा_आणि_थंड_बसाशहरवासीयांचे आराध्यदैवत श्री तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या पॉवर हाऊस रोडवरती अस्वच्छतेचे साम्राज्य...अक...
24/09/2025

#पहा_आणि_थंड_बसा

शहरवासीयांचे आराध्यदैवत श्री तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या पॉवर हाऊस रोडवरती अस्वच्छतेचे साम्राज्य...

अकार्यक्षम आणि निष्क्रिय नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार दिमाखात सुरू....

उदंड जाहले भावी नगराध्यक्ष-नगरसेवक पण एक नाही कामाचा...

सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त...

#नगरपरिषद #स्वच्छता #माजलगाव

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार पूर पाहणी दौऱ्यावर... #जायकवाडी  #पाऊस  #गोदावरी  #मराठवाडा  #पुर  #अतिवृष्टी
24/09/2025

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार पूर पाहणी दौऱ्यावर...

#जायकवाडी #पाऊस #गोदावरी #मराठवाडा #पुर #अतिवृष्टी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दौऱ्यावर...अतिवृष्टी आणि महापुराची पाहणी करण्यासाठी तातडीचा दौरा #पाऊस  #गोदावरी  #अति...
23/09/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दौऱ्यावर...

अतिवृष्टी आणि महापुराची पाहणी करण्यासाठी तातडीचा दौरा

#पाऊस #गोदावरी #अतिवृष्टी #जायकवाडी

23/09/2025

बीडच्या पोहणेर येथील पूरग्रस्त भागाचे आमदार धनंजय मुंडेंकडून होडीतून पाहणी..
#मराठवाडा #गोदावरी #पुर #अतिवृष्टी

कोणत्याही मुसळधार पावसाला ढगफुटी शब्द वापरण्याचा एवढा अतिरेक झालाय कि खऱ्या ढगफुटीसाठी पर्यायी शब्द शोधण्याची वेळ आली आह...
23/09/2025

कोणत्याही मुसळधार पावसाला ढगफुटी शब्द वापरण्याचा एवढा अतिरेक झालाय कि खऱ्या ढगफुटीसाठी पर्यायी शब्द शोधण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मुसळधार पाऊस ढगफुटी नसते, नदीला पूर आला म्हणजे ढगफुटी नसते, शहर पाण्याखाली गेले म्हणजे ढगफुटी नसते. मुसळधार, अति मुसळधार, अतिवृष्टी असे काही पावसाचे प्रकार असतात. आणि यापुढे ढगफुटी असते.

ढगफुटीचे काही निकष असतात. सामान्यपणे एका तासात १०० मिमी जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी समजले जाते. (दिवसभरात १०० नाही, तासाभरात १००) ढगफुटीवेळी ढगांची उंची १५ किलोमीटरपर्यंत असते. सामान्यपणे ढगफुटी १०-१५ किमी परिसरात होत असते, त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी सामान्य किंवा मुसळधार पाऊस असू शकतो. हा पाऊस ५ मिनिट ते २-३ तास पडू शकतो. काही वेळा एखाद दिवस सुद्धा होतो. (उदा. मुंबई २६ जुलै). ढगांतून पाण्याचा खाली येणारा लोंढा इतका प्रचंड असतो कि काही वेळा त्याच्या वेगामुळे जमिनीवर जोराचे वारे वाहायला लागते.

जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता.

पण आता या शब्दाचा अति भडीमार सुरु आहे. मुसळधार पाऊस या शब्दाचे गांभीर्य कमी वाटते म्हणून ढगफुटी, ढगफुटीसदृश्य पाऊस असे शब्द सर्रास वापरणे सुरू आहे. ढगफुटीसदृश्य असे काहीच नसते, त्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस म्हणतात. नदी नाल्यांना पूर आला तरी त्याला ढगफुटी म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण मुसळधार पावसाच्या परिस्थितीत ५०-६० मिमी पाऊस पडला तरी नदीला मोठा पूर येऊ शकतो. (दिवसभरात ६० मिमी पाऊस पडला तरी त्याला अतिवृष्टी म्हटले जाते)
_

काल पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, सगळीकडे पाणी साचले तर लगेच सगळे ढगफुटीचा निकष लावून मोकळे झाले. पण पावसाचे आकडे पहिले तर तीन तासात २०-३० मिमी पाऊसच झालेला दिसत आहे, काही ठिकाणी तीन तसात ७० मिमी पाऊस झालेला आहे. याला ढगफुटी म्हणायचे म्हटल्यावर तासाला १० मिमी पावासाला मुसळधार म्हणावे लागेल. मग रिमझिम पाऊस कशाला म्हणायचं?
त्या पुण्यात नाले बंद केलेत, ओढे बुजवून टाकलेत, पाणी जिरण्याचे मार्ग बंद केलेत, ड्रेनेज लाईन ४० वर्षांपूर्वीच्या आहेत, सगळं शहर काँक्रीटने झाकलं आहे, तिथे तासाभरात १०-२० मिमी पाऊस सुद्धा पुरेसा आहे कमरेइतके पाणी साचण्यासाठी. मुंबईचं जे आधीच झालेलं आहे तेच आता पुण्याचं होत आहे... ते शहर लहानश्या पावसाने सुद्धा बुडणारच आहे.
_

शहराच्या बाहेर येऊन ग्रामीण भागाचा विचार केला तरी पूर येण्यासाठी ढगफुटीची गरज नसते. मुसळधार पाऊस सुद्धा पुरेसा असतो. तलाव बंधारे भरलेले असतील तर दिवसभरात ५०-६० मिमी पाऊस पडला तरी पूर येऊ शकतो. एका तासात ५०-६० मिमी पाऊस पडत असेल तर तोसुद्धा खूप पाऊस असतो. पण त्याला ढगफुटी म्हणत नाहीत. त्याला अतिमुसळधार पाऊस म्हणतात. आणि एवढ्या पावसाने सुद्धा चांगला पूर येऊ शकतो. जलसंधारणाची पाणी साठवण्याची आणि जमिनीची पाणी पिण्याची क्षमता संपली कि पूर यायला सुरुवात होतेच.

मागील काही वर्षात कमी वेळात जास्त पाऊस पाडण्याचे प्रमाण वाढले आहे हा एक वातावरणाचा मोठा बदल झालेला आहे. नगरसारख्या सारख्या ठिकाणी जिथे दिवसभर रिमझिम पाऊस चालून १०-२० मिमी पाऊस व्हायचा तिथे आता एकदोन तासात २०-३० मिमी पाऊस पाडण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि हा पाऊस सुद्धा मुसळधार वाटतो, हेच प्रकार ग्रामीण भागात सुद्धा वाढले आहेत.
आठवडाभरापूर्वी पाथर्डी, शेवगाव मधे झालेला पाऊस हाही याच प्रकारचा दुर्मिळ पाऊस. आमच्या भागात असा मुसळधार पाऊस फार कमी होतो, दुर्मिळच. पण फक्त तो खूप झाला म्हणून ढगफुटी झाली असे नाही, तो अतिमुसळधार पाऊस आहे जो तीनचार तासाच्या कालावधीमध्ये ७०-१०० मिमी झालेला आहे. आणि अशा सपाट प्रदेशमधे महापूर येण्यासाठी हा पाऊस पुरेसा आहे, त्यासाठी ढगफुटीची गरज नाही. पावसाच्या बाबतीमधे आकर्षक आणि भीतीदायक शब्दप्रयोग मांडून विनाकारण निसर्गावर सगळं ढकलून देण्याची गरज नाही. (वर काही ढगफुटीचे आकडे सांगितले आहेत ते ४०-५० वर्षांपूर्वीचे आहेत. म्हणजे तेव्हासुद्धा असा भयंकर वाटावा असा पाऊस पडत होताच, हि काही आजकालची बाब नाही.)

अतिवृष्टीमुळे जगात सगळीकडे पूर येतो. यातून अमेरिका, जपान, चीन, युरोप सारखे प्रगत देश सुद्धा सुटलेले नाहीत. पाणी जिरण्याची आणि साठण्याची क्षमता संपली कि पूर येतोच. त्यासाठी ढगफुटीची गरज नाही. पुणे मुंबईसारख्या शहरांमधे लहानश्या पावसाने पूर येणे याला पावसाचा दोष म्हणता येत नाही. याला प्रशासनाचे चुकलेले नियोजन आणि, अतिक्रमणाचा अतिरेकच कारणीभूत आहे.

पुणे किंवा पुण्यासारख्य घाटाच्या वरील राज्यातील कोणत्याही शहरात जर तासादोन तासात ५०-६० मिमी पाऊस पडला, किंवा दिवसभरात १०० मिमी पाऊस पडला तर ते शहर बुडू शकते यात दुमत नाही, कारण तिथली तेवढी पाणी धारण क्षमता नाही, त्यापेक्षा कमी असेल तर प्रशासकीय अपयश आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे दिवसभरात २०० मिमी पाऊस सुद्धा सामान्य बाब आहे तिथे शे-दीडशे मिमी पावसाने शहर बुडते ते प्रशासनाचेच अपयश असते. तिथे ३००-५०० मिमी पावसाने पूर येणे आपण सामान्य समजायला हवे. पण हि शहरे तिथल्या सामान्य पावसाच्या ३०% पावसानेच बुडत आहेत. आणि ती बुडाली म्हणून तिथे ढगफुटी झाली असे म्हणून जमत नाही...
__

प्रत्येक गोष्टीला भयंकर करून सांगणे बंद व्हायला हवे, काही गोष्टी सामान्य असतात पण त्या कधीतरी अनुभवायला मिळतात म्हणून त्या जास्त भयानक वाटत हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक मुसळधार पाऊस ढगफुटी नसते, पूर आला म्हणजे ढगफुटीच झाली असे नसते, ढगफुटी हि कधीतरी होणारी घटना आहे. मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी याच गोष्टी कधीतरी अनुभवायला मिळतात, ढगफुटी हा त्यापुढचा टप्पा आहे.

____

© श्रीकांत आव्हाड

=================

23/09/2025

श्री क्षेत्र गुंज येथील श्री दत्तात्रय मंदिराच्या पायऱ्यां पर्यंत पोहचली गोदामाय...

#गोदावरी #पुर #मराठवाडा #अतिवृष्टी #पाऊस

आदर्श पत्रकारितेचे विद्यापीठ म्हणजे अनंत भालेराव -माजी आमदार डी.के.देशमुख[नूतनीकरण केलेल्या 'अनंत भालेराव' सभागृहाचे उद्...
20/09/2025

आदर्श पत्रकारितेचे विद्यापीठ म्हणजे अनंत भालेराव -
माजी आमदार डी.के.देशमुख

[नूतनीकरण केलेल्या 'अनंत भालेराव' सभागृहाचे उद्घाटन संपन्न]

माजलगाव : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन "दै.मराठवाडा"च्या माध्यमातून मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा मापदंड निर्माण करणारे संपादक अनंत भालेराव हे आदर्श पत्रकारितेचे चालते-बोलते विद्यापीठ होते असे प्रतिपादन नवविकास मंडळ शिक्षण संस्थेचे कार्यवाह तथा माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख यांनी केले.

नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या अद्ययावत व सुसज्ज अनंत भालेराव सभागृहाच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मा.आ.डी.के.देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा होते तर उपाध्यक्ष ॲड.आर.डी.भिलेगावकर, संचालक संपादक शिरीष देशमुख, संचालक डॉ.सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री.देशमुख म्हणाले की,भालेराव यांनी स्वातंत्र्याआधी बंदूक आणि स्वातंत्र्यानंतर लेखणी घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्ये टिकवण्याचे काम केले. भालेराव यांच्या नावाने असणारे हे सुसज्ज सभागृह येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यांच्या कार्याचे स्मरण करून देणारे ठरेल.
याप्रसंगी ॲड.शर्मा यांनी अध्यक्षीय समारोपात भालेराव यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव केला.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षक दिनानिमित्त संस्थेतील सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांना खादीचा रूमाल आणि गुलाबपुष्प देऊन संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार डी.के.देशमुख यांच्या ८४ व्या वाढदिवसा निमित्ताने नवविकास मंडळ परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते यांनी प्रास्ताविक केले, पर्यवेक्षक एम.एन.मसलेकर यांनी मनोगत व्यक्त केले तर पर्यवेक्षक एस.एस.देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे गीत व पसायदान योगिता मोडक यांनी सादर केले तर सूत्रसंचालन हिमांशू देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक के.एल.मोताळे, जे.पी.कुलकर्णी,अंजली शिंदे यांच्यासह सर्व संस्कार केंद्रातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#शिक्षण #अनंतभालेराव #मराठवाडा #मुक्तीसंग्राम #पत्रकारिता #चळवळ

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण१९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले...
19/09/2025

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण
१९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती.
तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले, 'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले'
यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला.

मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.
अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता.
वेणुताई अत्रेंना म्हणाल्या
भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते.
तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते.

आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले.
ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ?
हा यशवंतराव साहेबांचा
महाराष्ट्र...
आजची संस्कृती म्हणजे
तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो वगैरे वगैरे .

संदर्भ - "मी यशवंतराव चव्हाण "

Address

Majalgaon
431131

Telephone

+919970820707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MS News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MS News:

Share