
17/09/2025
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याच्या ऐतिहासिक मुक्तीसंग्रामाचा अमूल्य ठेवा आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच, निजामाच्या अन्यायी हुकूमशाहीवर उघड लढा देत मराठवाड्याच्या वीर जनतेने अपार पराक्रम दाखविला. अनेकांनी निजामाच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, चळवळीला वेग दिला आणि शौर्याने निजामाच्या तावडीतून मराठवाड्याचा मुक्ती संग्राम यशस्वी केला.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तरी हैद्राबाद संस्थान वगळता अनेक संस्थानं भारतात सामील झाली नव्हती. परंतु, ७ सप्टेंबर १९४८ रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन पोलोमुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या अन्यायातून मुक्त झाला. मराठवाड्याच्या जनतेच्या धैर्य, संघर्ष आणि स्वातंत्र्यप्रेमाची अमूल्य गाथा साकारली.
या दिनी न्याय, स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेऊया...मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!