Maharashtra News Check

Maharashtra News Check Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra News Check, Media/News Company, मुंबई, Mumbai.

News Check is Maharashtra’s leading News channel, and the Yash Group, Maharashtra’s leading news Chanel for - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel.

🛑 ब्रेकिंग न्यूज | लांडगे Vs पवार : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय अंगठीचा डाव रंगात!📍 पिंपरी-चिंचवड, 26 जुलै 2025पिंपरी-चिंच...
26/07/2025

🛑 ब्रेकिंग न्यूज | लांडगे Vs पवार : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय अंगठीचा डाव रंगात!

📍 पिंपरी-चिंचवड, 26 जुलै 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. विकासाच्या श्रेयावरून सुरू झालेला हा वाद आता प्रतिउद्गारांपासून ते थेट सार्वजनिक कार्यक्रमांतील संघर्षांपर्यंत पोहोचला आहे.

🗣️ "मी पैलवान आहे, कोणालाही घाबरत नाही!" अशी आक्रमक भाषा वापरत लांडगे यांनी पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी ठाम प्रत्युत्तर दिलं – "महेश लांडगे यांचे वस्ताद अजितदादा आहेत!"

📊 विकासाचे श्रेय कोणाचे?
महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना संपूर्ण श्रेय देत अजित पवारांचा उल्लेख टाळला. अजित पवारांनी मात्र स्पष्ट सांगितले, “1992 ते 2017 पर्यंत पिंपरी‑चिंचवडच्या विकासाची सूत्रे माझ्याच हातात होती.”

🚧 शिवनेरी नामकरणावरून वाद:
पोलीस आयुक्तालय भूमिपूजनाच्या कार्यक्रमात जिल्ह्याच्या नव्या नामकरणावरूनही दोघांमध्ये थेट शाब्दिक चकमक झाली. एकीकडे लांडगे "शिवनेरी" नावाची मागणी करताना दिसले, तर पवार यांनी "स्थिती अपरिवर्तित ठेवावी" हे सुचवलं.

🔍 राजकीय विश्लेषक म्हणतात...
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष महायुतीतील अंतर्गत विसंवादाचे स्पष्ट संकेत देतो. आगामी महापालिका निवडणुकांवर याचा निश्चितच परिणाम होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

📢 मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया:
या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना शांततेचे आणि सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, संघर्षाचा सूर अजूनही टिकून आहे.

"रोड हिप्नोसिस" – एक अनोखी पण धोकादायक स्थितीसंपूर्ण भानावर असूनही मन हरवू शकतं का? गाडी चालवत असताना आपल्या डोळ्यांनी र...
21/07/2025

"रोड हिप्नोसिस" – एक अनोखी पण धोकादायक स्थिती

संपूर्ण भानावर असूनही मन हरवू शकतं का? गाडी चालवत असताना आपल्या डोळ्यांनी रस्ता पाहत असतो, पण मेंदू तो रस्ता ‘लक्षपूर्वक’ पाहतोय का? हा प्रश्न मला माझ्या स्वतःच्या अनुभवातून विचारायला भाग पाडला.

सुमारे १५ दिवसांपूर्वीची गोष्ट…
मी संभाजीनगर-जालना मार्गावरून प्रवास करत होतो. सिंदखेडराजा जवळ जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. गाडीमध्ये AC सुरू होता आणि वातावरण अतिशय शांत होतं. समोर एका स्कॉर्पिओ गाडीच्या मागे मी माझं वाहन चालवत होतो.
काही काळाने नकळत नजर शून्यात गेली… काही क्षणात गाडीचा ताबा सुटल्यासारखा वाटला… आणि अचानकच गाडी थोडी साईडला आदळली. त्या धक्क्यानेच पुन्हा भानावर आलो!

जे घडलं त्याचं स्पष्ट स्मरण होत नव्हतं. टोल नाका ओलांडल्यानंतरही मागची १५-२० मिनिटं अगदी धूसर वाटत होती.

याच अवस्थेला म्हणतात "रोड हिप्नोसिस" – मराठीत 'रोड संमोहन'.

---

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

रोड हिप्नोसिस ही एक मानसिक स्थिती आहे, जिथे चालकाचे डोळे उघडे असतात, पण त्याचं लक्ष रस्त्यावर नसतं. ही अवस्था मुख्यतः दीर्घ काळ वाहन चालवल्यानंतर उद्भवते, विशेषतः जेव्हा रस्त्यावर फारशी घडामोड घडत नाही, वातावरण एकसुरी असतं, किंवा प्रवासी झोपलेले असतात.

या अवस्थेत मेंदू ‘ऑटो पायलट’ मोडवर जातो. चालक गाडी चालवत असतो, पण त्याचं पूर्ण भान हरवतं.
त्याला अपघात होईपर्यंत मागची १५-२० मिनिटे आठवतच नाहीत.

---

ही अवस्था कधी होते?

सलग 2.5 तास किंवा त्याहून अधिक वेळ गाडी चालवल्यावर

रात्री किंवा एकसुरी रस्त्यावर

थकवा, झोपेची कमतरता आणि शांत वातावरणात

समोरच्या वाहनाच्या मागे लांब वेळ चालवल्यावर

---

याचे धोके काय?

वाहनावरील ताबा सुटू शकतो

चालक अपघाताकडे झपाट्याने पुढे जात असतो, पण त्याला त्याची जाणीवही होत नाही

ब्रेक मारायचं, वेग लक्षात घ्यायचा, रस्ता वाचायचा — या सगळ्या प्रक्रिया ‘शरीर’ करत असतं, पण ‘मेंदू’ त्या मागे नसतो

यामुळे गाडी भरधाव वेगाने अपघात करते आणि चालकाला काहीही आठवत नाही

---

टाळण्यासाठी काय करावं?

✅ दर 2.5 तासांनी गाडी थांबवा. बाहेर पडा, चालून या, शरीर ताजंतवाना ठेवा
✅ चहा, कॉफी किंवा पाणी प्या – कॅफिन थोडकं का होईना, मेंदूला अ‍ॅलर्ट ठेवतं
✅ शक्य असल्यास गाणी लावा, थोडा संवाद ठेवा
✅ एकसुरी ड्रायव्हिंग करत असाल, तर अधूनमधून गाडीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा
✅ स्वतःला प्रश्न विचारा – मी कुठे आहे? मी मागच्या काही किलोमीटरमध्ये काय पाहिलं?
✅ जर प्रवासी झोपलेले असतील, तर चालकाने अधिक सावध राहण्याची गरज आहे
✅ थकवा जाणवताच गाडी बाजूला घ्या – ५-१० मिनिटांची विश्रांती प्राण वाचवू शकते

---

एक शेवटचा महत्त्वाचा विचार:

डोळे उघडे असले तरी मन बंद असेल, तर अपघात अटळ असतो.
"मी ठीक आहे, मला झोप नाही आली" ही भावना फसवणूक ठरू शकते.

प्रत्येक प्रवास महत्वाचा आहे, पण प्रत्येक प्रवासी त्याहून अधिक अनमोल आहे.
थोडी सावधगिरी, थोडी विश्रांती, आणि थोडं भान – हेच तुमचं आणि तुमच्या सहप्रवाशांचं आयुष्य वाचवू शकतं.

---

🚦 "सुरक्षित प्रवास हीच खरी यशस्वी पोहोच!

11 June News
21/07/2025

11 June News

21/07/2025
हिंजवडी गावात ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी विक्रीस!हिंजवडी (प्रतिनिधी): गावात काही दिवसांपासून वॉटर ATM च्या माध्यमातून 1...
07/07/2025

हिंजवडी गावात ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी विक्रीस!

हिंजवडी (प्रतिनिधी): गावात काही दिवसांपासून वॉटर ATM च्या माध्यमातून 1 रुपयामध्ये पाणी विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे हे पाणी कोणतेही बाहेरून आणलेले नाही, तर थेट ग्रामपंचायतच्या नळातूनच घेतले जात आहे, अशी शंका आहे आणि त्यावर केवळ 10% फिल्टर प्रक्रिया करून ते विकले जात आहे.

गावातील नागरिकांनी यावर आक्षेप घेतला आहे. ग्रामपंचायतीचेच नळाचे पाणी थोडंसं फिल्टर करून पैसे घेणं योग्य आहे का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारी पाणी विकता येते का? ग्रामपंचायतच्या नळांचे पाणी हे सामान्यतः सर्वांसाठी उपलब्ध असतं आणि ते मोफत किंवा कमी दरात दिलं जातं. मात्र, अशा पद्धतीने त्याच पाण्यावर प्रक्रियेसाठी पैसे घेणं कायदेशीर आहे का? यावर प्रशासनाकडून स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.

गावकऱ्यांची मागणी:

1. पाण्याची संपूर्ण तपासणी व रिपोर्ट जाहीर करावा

2. वॉटर ATM चालवणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण तपशील जाहीर करावेत

3. ग्रामपंचायतच्या पाण्याचा गैरवापर रोखण्यात यावा

4. संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी

सध्या गावात यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेक लोकांना वाटतंय की, पिण्याच्या पाण्यावर अशाप्रकारे पैसा उकळणं थांबवणं गरजेचं आहे.

कायदेशीर बाजू तपासण्याची गरज:
तज्ज्ञांच्या मते, ग्रामपंचायतचे पाणी व्यापारी हेतूने विकणं बेकायदेशीर ठरू शकतं, यासाठी अधिक तपासणीची गरज आहे.

ग्रामपंचायतच्या पाण्याचा कायदा व नियम:

1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 (Maharashtra Village Panchayat Act, 1958) नुसार, ग्रामपंचायतची जबाबदारी आहे पिण्याचे स्वच्छ पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे.

2. कलम 45 (1) (xvii) नुसार,
ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते, पण याचा उपयोग फक्त ग्रामस्थांच्या वापरासाठी असतो,
व्यापारी उद्दिष्टासाठी (Commercial Purpose) पाणी वापरण्यास किंवा विकण्यास ग्रामपंचायत थेट परवानगी देत नाही.

3. जलपुरवठा व स्वच्छता विभागाचे नियम:
राज्यातील जल जीवन मिशन, ग्रामीण जलयोजना किंवा ग्रामपंचायत नळ योजना यामधून मिळणारे पाणी केवळ गावकऱ्यांच्या वापरासाठी असते, त्याचे विक्रीस परवानगी नाही.

4. पाणी विक्री करणे बेकायदेशीर ठरते, जर:

ग्रामपंचायत पाणी एखाद्या खासगी व्यक्तीला विकते

तो खासगी व्यक्ती तेच पाणी ATM वॉटर मशीन मधून पुन्हा विकतो

ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी नसेल किंवा खुली निविदा नसेल.

5. जर एखाद्याने पाणी विक्री केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते:

ग्रामपंचायत कायदा कलम 53 नुसार दंड

जलपुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल होऊ शकतो

बेकायदेशीर वापर केल्यास वॉटर कनेक्शन बंद केला जाऊ शकतो.

12/04/2025

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कराड तालुक्यातील वाठार गावात, फक्त ५ वर्षांची संस्कृती रामचंद्र जाधव अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली... आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह गावाजवळील शेतात आढळून आला.

ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. गुरुवारी संध्याकाळी संस्कृती आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. काही वेळातच ती दिसेनाशी झाली. कुटुंबीयांनी सगळ्या गावात शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही.

पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. ड्रोनच्या मदतीने शिवारात शोध घेण्यात आला. शेवटी, पहाटे पाचच्या सुमारास तिचा मृतदेह शेतात आढळला... आणि तो क्षण गावासाठी अत्यंत दुःखदायक होता.

अत्यंत दुर्दैवाने, ही फक्त अपघाती घटना नव्हती – पोलीस तपासात समोर आलं की संस्कृतीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.

या प्रकरणात एक १६ वर्षांची मुलगी आणि गावातील आणखी एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहेत. अजूनही खुनामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ही घटना आपल्याला अंतर्मुख करते... आपल्या समाजात लहानग्यांच्या सुरक्षेची किती गरज आहे हे अधोरेखित करते.

01/04/2025

लोक का फसवतात?
कधी स्वतःला किंवा तुमच्या जोडीदाराला विचारलंय का, "तू का फसवलंस?"
👇

1. घाईघाईत लग्न करणं
आजकाल बऱ्याच जणांची लग्नं समाजासाठी, आई-वडिलांसाठी, अपत्य झालं म्हणून किंवा फक्त नवरा-बायको म्हणून ओळख मिळवण्यासाठी होतात. अशा घाईघाईने किंवा चुकीच्या कारणांसाठी केलेल्या लग्नात एकमेकांशी जुळवून घेणं कठीण जातं. एकमेकांशी नातं सुधारण्याचा प्रयत्न दोघांनीच करायला हवा, नाहीतर बाहेर कोणी तरी जवळचं वाटायला लागतं.

2. भावनिक दुर्लक्ष
नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते एकमेकांसोबत राहणं आणि भावना समजून घेणं. जर जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर कोणी तरी दुसरं त्याला समजून घेईल. बरेच बाहेरचे संबंध सुरुवातीला भावनिक जवळीकीमुळेच होतात. त्यामुळे नेहमी मोकळेपणाने बोला, एकमेकांच्या भावनांची कदर करा.

3. जुन्या सवयी
जर तुम्ही अविवाहित असताना किंवा भूतकाळात नात्यांमध्ये बेफिकीर वागला असाल आणि त्या सवयी बदलल्या नाहीत, तर लग्नानंतरही तसंच होण्याची शक्यता असते. जुन्या चुकीच्या सवयी ओळखा आणि त्या सोडून द्या.

4. चुकीची संगत
काही मित्र तुमचं चुकतंय हे सांगण्याऐवजी त्यात तुम्हाला आणखी ढकलतात. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिलात, तर तेही तुमच्या फसवण्याला समर्थन देतील. चांगल्या सवयी असलेल्या आणि नातं टिकवण्यासाठी योग्य सल्ला देणाऱ्या लोकांसोबत राहा.

5. लैंगिक निराशा
जेव्हा जोडीदाराच्या लैंगिक गरजा पूर्ण होत नाहीत, जेव्हा पत्नी नेहमी काही ना काही कारण सांगते, किंवा नवरा फक्त स्वतःचाच विचार करतो, तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होतो. अशा वेळी कोणी तरी दुसरं जवळचं वाटू लागतं.

म्हणूनच, एकमेकांच्या गरजांची काळजी घ्या.

नवऱ्यांनी बायकोला फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर प्रेमाने जवळ घ्या, तिच्या गरजाही समजून घ्या.

बायकांनीही संवाद साधा, तुम्हाला काय हवंय हे स्पष्ट सांगायला शिका.

एकमेकांवर विश्वास ठेवा आणि नात्याला जपायला शिकाआ!

24/03/2025

चुकीला माफी नाही! नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहिम खानचे घर बुलडोझरने जमीनदोस्त

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर हिंसाचारमधील दंगेखोरांना अटक करण्यात आली असून, आता त्या हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान याच्या घरावरच बुलडोझर चालविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर नागपूर महापालिकेकडून सोमवारी, आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. फहीम खान याच्या नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केले आहे. महापालिकेने त्याच्या कुटुंबाला याबाबत नोटीस बजाविल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेच्या पथकाकडून आज सकाळी 10 वाजल्यापासून फहीम खान याच्या घराची तोडफोड सुरू करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फहीम खान यांच्या आईच्या नावावर नोंदणीकृत असलेले हे 86.48 चौरस मीटरचे घर बेकायदेशीररीत्या बांधल्याचे महापालिकेने 21 मार्चला नोटीस बजावली होती, त्यात नमूद केले होते. आता या कारवाईला वेग आला आहे. दुसरीकडे या कारवाईतून दंगेखोरांना राज्य सरकारने एक संदेशच दिल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता याप्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळते.

देशाला हादरवून टाकणारी एक भयावह घटना उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात समोर आली आहे. मुस्कान नावाच्या एका महिलेने आपल्या प्रिय...
21/03/2025

देशाला हादरवून टाकणारी एक भयावह घटना उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात समोर आली आहे. मुस्कान नावाच्या एका महिलेने आपल्या प्रियकर साहिलच्या मदतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केला आहे. खून झालेला व्यक्ती मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता. या खुनानंतर जे घडले, त्याने सर्वांची झोप उडवली आहे.

खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिलने पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांना पाण्याच्या ड्रममध्ये सीमेंटसह भरून घरात लपवले. त्यानंतर घराला कुलूप लावून ते दोघं पसार झाले.

मुस्कानला वाटलं की ती सर्वकाही लपवू शकेल. मात्र, एक चूक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मुस्कानने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. पण मुस्कानच्या आईला तिच्यावर आधीपासूनच राग होता आणि तिला आपल्या जावई सौरभवर खूप प्रेम होते. म्हणूनच, तिने वेळ न दवडता पोलिसांना सर्व माहिती दिली.

पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली असून या दोघांची चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर मुस्कानच्या आई-वडिलांनी केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी न्यायालयाला मागणी केली आहे की, "आमची मुलगी समाजात राहण्याच्या लायकीची नाही, तिला फाशीची शिक्षा द्यावी."

आपल्या मुलीच्या गुन्ह्यावर पांघरुण न घालता तिच्या चुकीसाठी कठोर शिक्षा मागणारे हे आई-वडील खरोखरच समाजासाठी आदर्श ठरत आहेत. देशभरातून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून सोशल मीडियावरही त्यांना पाठिंबा मिळत आहे.

ही बातमी Maharashtra News Check साठी – जनतेच्या मनातील आवाज.

हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स आगीप्रकरणाला कलाटणी; चालकानेच रचला कट, दिवाळी पगाराचा वाद ठरला जीवघेणापुणे | 20 मार्च 2025ह...
20/03/2025

हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स आगीप्रकरणाला कलाटणी; चालकानेच रचला कट, दिवाळी पगाराचा वाद ठरला जीवघेणा

पुणे | 20 मार्च 2025

हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या आगीप्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली असून, ही आग अपघाताने नसून मुद्दाम लावण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दिवाळीचा पगार न मिळाल्याने रागाच्या भरात बस चालक जनार्दन हंबर्डीकर (निवासी: पुणे) यानेच ही आग लावल्याची कबुली दिली आहे.

या घटनेत शंकर कोंडीबा शिंदे (63), गुरुदास खंडू लोखरे (40), सुभाष सुरेश भोसले (45) आणि राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (42) या चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपीने आधीच बेंझिन नावाचे ज्वलनशील केमिकल आणि टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्या बसमध्ये ठेवल्या होत्या. फेज वनजवळ एकेरी वाहतूक सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि बसमध्ये प्रचंड भडका उडाला. आग लागण्याआधीच आरोपी गाडीतून उतरला होता.

पोलीस तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, कामगारांशी असलेला वाद आणि पगार कपातीमुळे त्याने हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्रोत: महाराष्ट्र न्यूज चेक

Address

मुंबई
Mumbai
411035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra News Check posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share