Amuk Ani Tamuk

Amuk Ani Tamuk Behind every strong person is a story that gave them two choices: Sink or Swim.

10/05/2024

टक.. टक.. घाव!! | Atomic Habits | Sh*tal Vispute

10/05/2024

टी व्ही आणि .. | Atomic Habits in marathi | Sh*tal Vispute | टी व्ही आणि .. | Atomic Habits in marathi | Sh*tal Vispute |

या पाणी पुरीवाल्या समोर झुकून ताटली पुढे करताना.....एकदम मोठा...आ..आ..आ करून एका घासात गिळणे......म्हणजे जिंकले आपण...दु...
11/12/2022

या पाणी पुरीवाल्या समोर झुकून ताटली पुढे करताना.....एकदम मोठा...आ..आ..आ करून एका घासात गिळणे......म्हणजे जिंकले आपण...दुसरे.काय... 😀😀

शीतल 🙏

मोठा भाऊ  श्री.रवी, मधला मी किरण आणि लहान भाऊ श्री. उदय अशा आम्ही तिघे मिळून पातोंडेकर ज्वेलर्स नावाने आमची फर्म जळगाव स...
07/08/2022

मोठा भाऊ श्री.रवी, मधला मी किरण आणि लहान भाऊ श्री. उदय अशा आम्ही तिघे मिळून पातोंडेकर ज्वेलर्स नावाने आमची फर्म जळगाव सुवर्णनगरी येथे उभारलेली आहे.आमचा सोने आणि चांदी दागिन्यांचा होलेसेलचा व्यवसाय आहे.
मी मूळचा जळगावचा, पातोंडा या गावाहून माझे वडील त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी उदरनिर्वाहसाठी जळगाव आले आणि इथेच स्थायिक झालो. सुरुवातीला वडिलांनी नोकरी केली नंतर स्वतःचा व्यवसाय म्हणजे व्यापारी बांधवांसाठी होलसेलमध्ये कारागिरी सुरू केली. माझा जन्म १९६८ चा, त्या वेळी आमची परिस्थिती बेताचीच...आई "सरस्वतीताई"शिवण काम करून आम्ही ३ भाऊ व १ बहीण यांचे शिक्षण,संसार यांना हातभार लावत होती.

माझं प्राथमिक शिक्षण २२ नंबर शाळा, माध्यमिक ला.ना. हायस्कूल आणि ११वी व १२ वी एम.जे.कॉलेज येथे पूर्ण केले. १९७८ मध्ये माझ्या वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांसोबत दुकानात बसून कारागिरी शिकू लागलो. मला आधीपासून व्यवसायाची आवड होती. मी बघून बघून दागिने कसे बनवायचे हे शिकू लागलो.

मोठे भाऊ यांनी 8 वर्षे नोकरी केली. आणि मी व लहान भाऊ आधीपासून व्यवसायच. हळूहळू मोठे भाऊ पण नोकरी सोडून व्यवसायात आले. त्यांचे शिक्षण आणि आमचा अनुभव याची सांगड घालून आमचे यशस्वी पर्व सुरू झाले. १५ ऑगस्ट १९७२ ला वडिलांनी स्वतः चे दुकान सुरू केले. मी १९८६ ला त्या दुकानाचे शोरूम बनवले. १९९४ मध्ये दुसरे नवीन दुकान विकत घेतले.या प्रवासात आनंदचा क्षण असेल तर तो म्हणजे लहान वयात सर्वात पहिले शो रूम बनवले.

सुरवातीच्या काळात आम्हाला व्यापार आणि व्यवसाय स्थिर करायला बऱ्याच अडचणी येत गेल्या आणि यातून आम्ही शिकत गेलो."विश्वास पूर्णसेवा" यामुले आज आमचे ३ शो रूम आहेत.पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इथेपर्यंत आमचे व्यापारी बांधव आहेत.

मी.श्री.किरण रामकृष्णशेठ पोतदार , माझे शिक्षण १२ वी असूनही आजही 'व्यवसाय कसा टिकवायचा' याची माहिती घ्यायला आजचे MBA झालेले नवतरुण येत असतात. मी त्यांना माझ्या अनुभवातून नक्की मदत करत असतो.

शीतल विसपुते

to read full story click the link below :
https://www.sh*talvispute.com/post/ravi_kiran_uday
Sunil Bhalerao Mandar Thorat marathi.blog

"जळगावचा-जाळ-आणि-धूर" माझं मूळ गाव अमळनेर तालुक्यातील वावडे. आजोबा, वडील, काका सर्व बँकेत नोकरी करणारे, माझे वडील  तर का...
28/07/2022

"जळगावचा-जाळ-आणि-धूर"
माझं मूळ गाव अमळनेर तालुक्यातील वावडे. आजोबा, वडील, काका सर्व बँकेत नोकरी करणारे, माझे वडील तर कारकून पासून ते जनरल मॅनेजर पदापर्यंत येवून रिटायर झाले. साहजिक, मी पण बँकेत नोकरीला लागावें अस घरच्यांचे स्वप्न. पण मला आधीपासून डिफेन्सकडे जास्त आवड होती.१ ली ते ४ थी किनगाव, ५ ते १० वी रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव, दरम्यान मी धुळे येथील राजे संभाजी मिलट्री स्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. NDA ची१ ली परीक्षा पास ही झालो. पण मी एकुलता एक दिवा असल्याने आईने मला घरी बोलावून घेतले.१२ वी सायन्स, नंतर बी. कॉम.असे वळण घेत घेत शैक्षणिक प्रवास पूर्ण केला.

थोडा खोडकर असा माझा स्वभाव, त्यामुळे माझे सारखं काहीतरी वेगळे विश्व असायचं. एक सामान्य मुलगा याचे आयुष्य बदलले ते डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या "कोण आहे रे तिकडे" या नाटकात मिळालेली भूमिका मुळे..... असाच मी नेहमीसारखा थोडा मस्तीखोर, सर म्हंटले"चल मला हे डायलॉग बोलून दाखव" मला त्या नाटकात एक छोटी भूमिका दिली गेली. त्या नाटकातील मुख्य पात्र "प्रधान" करणारा कलाकार ऐन वेळेवर नाटक सोडून गेला. मी एकपाठी असल्याने प्रधान पात्रची स्क्रिप्ट एका रात्रीत पाठ केली. आणि इथून सुरू झाला माझा रंगमंचावरील प्रवास....

सुरुवातीला माझे आई वडील यांना समजत नव्हते नेमक मी काय काम करतो, घरून रागवत,ओरडत,पण मी ते न जुमानता माझं काम सुरू ठेवले.

२००४ ला मुकुंद टकसाळे लिखित "कोसळे आज इथे देव्हरा" अस मेलोड्रामा यातील माझे काम बघायला माझे आई वडील आले होते. त्यातील माझी भूमिका पाहून भारावलेले माझे वडील "जी ले अपनी जिंदगी"अस म्हणून मी उंच उडावं यासाठी त्यांनी मला कायम पाठबळ दिले.माझे आई, वडील,पत्नी,गुरू डॉ.हेमंत कुलकर्णी ज्या हिमतीने माझ्या सोबत आहेत,त्यांच्या अपेक्षेला किमान पूर्तता देऊ शकेन..असा माझा प्रयत्न...!

"दास्तान" या नाटकाने मला आत्मविश्वास शिकवला. माननीय माधव खाडिलकर यांनी मला माझ्या दमदार आवाजाचा योग्य लय शिकवला. B.A नाट्यशास्त्र (जळगाव) आणि M.A(कोल्हापूर) अस शिक्षण घेतले.१ ,२,३ ......४१ नाटकात विविध पात्र रंगवले.वाचिक अभिनय ७ वेळा घेणारा एकमेव मुलगा,६ व्यवसायिक नाटके,५ मालिका,२५ " Best Actor" असे पुरस्कार प्राप्त झाले आहे.

मी, मराठी कलाकार प्रो .हेमंत प्रकाश पाटील ( ठाकरे) " महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम"माझे मित्र,सोबती ज्यांनी मला आर्थिक,मानसिक,भावनिक आधार दिला, अजूनही देत आहेत,त्यांच्या उपकरास उपकृत राहण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. जेव्हा मी रंगभूमी, दिग्गज, लोकांसोबत काम करतो तेव्हा एकच खंत असते.माझ्या जळगावकडून रंगभूमी गाजवायला येणारा वर्ग त्या मानाने कमी असतो.तरुण पिढीने अभ्यास सोबत वाचन आणि कला याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.रंगभूमी आणि अभिनय ही सामान्य लोकांची कला नाही...तेवढं असामान्य व्यक्तिमत्व असावं लागतं.

शीतल विसपुते

https://www.sh*talvispute.com/post/जळगावचा-जाळ-आणि-धूर



Hemant Patil Sunil Bhalerao Nihar Vispute

"किर्तीमय किर्ती""माझी आई त्या काळी M.Phil..शिकलेली,वडील भुसावळ येथे ऑर्डीनस फॅक्टरी अकाउंट ऑफिसर होते. घरात पूर्ण शिक्ष...
09/07/2022

"किर्तीमय किर्ती"
"माझी आई त्या काळी M.Phil..शिकलेली,वडील भुसावळ येथे ऑर्डीनस फॅक्टरी अकाउंट ऑफिसर होते. घरात पूर्ण शिक्षणमय ,मार्क्स, डिग्री यांच्या आम्हा भावंडांच्या गप्पा.

माझे माहेर आणि सासर जळगाव. M.S.C ला असताना माझी मैत्री धनंजय नीलकंठ पाटील यासोबत जमली,मैत्री चे रूपांतर प्रेम, आणि नंतर लग्न इतका गुलाबी प्रवास आमचा होता.bधनंजय तेव्हा इंजिनियर होते म्हणून आम्ही पुणे येथे स्थायिक झालो. छान सुरळीत चालू....संसार या वेलीवर एक गोंडस फुल..तो म्हणजे आमचा मुलगा...निशांत. इंजिनियर असूनही कुकींग ची खूप आवड असल्याने धनंजय ने नोकरी सोडून २००० मध्ये जळगाव येथे "कृष्णा पावभाजी सेंटर" सुरू केलं. चव व दर्जा यावर आम्ही नाव कमावलं...आणि वेगवान आमची नशीबाची गाडी एका मोठ्या दगडावर आपटली. १७ फेब्रु. २००८ मध्ये माझे मिस्टर स्वर्गवासी झाले. माझा मुलगा तेव्हा ४ थीत होता.

हे वादळ मला आणि मुलाला एकदम पोरक करून गेलं. आणि माझी वेगळी वाट सुरू झाली. २००८ ला मी L.L.M प्रथम वर्षाला होते. त्यामुळे १५ जून २००८ पासून लगेच मी डॉ.उल्हास पाटील लॉ कॉलेज ला तासिका तत्त्वावर शिकवायला जाऊ लागली. ८ वर्षे या कॉलेज ला,१ वर्ष युनिवरसिटी मध्ये PG ला,IMR ला, घरगुती लॉ क्लासेस घेतले.माझं लक्ष्य फक्त "निशांत आणि निशांत"होते. आई वडील ही दोघी भूमिका मला करायची होती. त्याच्या सोबत मी माझं शिक्षण सुरू ठेवले. M.Sc.L.L.B,L.L.M,P.Hd ( बाल गुंन्हेगारी) पूर्ण केलं आणि आता M.A.(मानस शास्त्र) करत आहे.

मी. ॲड.डॉ.किर्ती धनंजय पाटील, सध्या धुळे येथील S.M.biyani law college ला इन्चार्ज प्रिन्सिपॉल आहे. मुंबई येथे C.W.C law college येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले. डिस्ट्रिक्ट लीगल एड,बांद्रा येथे ट्रेनिंग देण्याचे काम केले. मुंबई युनिव्हर्सिटी तर्फे डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निग येथे हेड इन्चार्ज म्हणून काम केलंय. २२ नोव्हेंबर २०१९ ला " सहाद्री दूर दर्शन" वर बालहक्क व कायदे या वर मार्गदर्शनपर मुलाखत झाली होती. लॉ कॉलेज चे पेपर सेटर व मॉडरेटर म्हणूनही काम पाहिले आहे . मुंबई युनि्वरर्सिटीमध्ये २०१९ ला मी सेट केलेला पेपर आला होता...

एकंदरीत शिकत गेले आणि शिकवत गेले..आणि आयुष्यात ही अजून शिकत आहे.मैत्रिणी, विद्यार्थी, कुटुंब हेच माझे सोबती आहे.आज पर्यंत हजारो मुलांना लॉ चे शिक्षण दिले. स्वतः साठी पण काही कायदे ठरून घेतले, एकटी ने आजपर्यंत चा प्रवास ज्यात माहेर व सासर चे लोकांनी साथ दिली. जगणे आणि लढणे यात दुःख वर जास्त विचार न करता यातून मार्ग कसा निघेल या कडे जास्त लक्ष दिले .आणि स्वतः चे दुःख विसरून ज्यासाठी लढली, तो निशांत आज इंजिनियर बनून उत्तम नोकरीला रुजू झाला. कधी कधी एकांत मला निराश करतो तेव्हा निसर्ग आणि संगीत आहेतच सोबतीला ...आनंद वाढवायला....💐

शीतल विसपुते

https://www.sh*talvispute.com/post/किर्तीमय-किर्ती

२००८ मध्ये माझे मिस्टर स्वर्गवासी झाले. माझा मुलगा तेव्हा ४ थीत होता. हे वादळ मला आणि मुलाला एकदम पोरक करून गेलं. आण...

७० वर्षा नंतर..... मी,बापू गोविंद विसपुते, रा.अहमदाबाद.माझे मुळ गाव  चाळीसगाव. मी ६ वर्षाचाच होतो,दुर्दैव की,देवाने माझे...
09/07/2022

७० वर्षा नंतर.....
मी,बापू गोविंद विसपुते, रा.अहमदाबाद.माझे मुळ गाव चाळीसगाव. मी ६ वर्षाचाच होतो,दुर्दैव की,देवाने माझे मातृ छत्र काढून घेतले. मी एकदम पोरका झालो. माझे वडील चाळीसगावला सराफी दुकानात कारागिरी करून आमच्या दोघांचे पोट कसेबसे भरत होतो. ६ वी ला होतो,माझी बहीण मला म्हटली. "बापू, अस किती दिवस खितपत काढणार , काही वेगळे करायचे असेल तर ,वेगळे निर्णय घे, चल माझ्या सोबत माझ्या घरी," मी कोणताही विचार न करता तिच्याकडे आलो.माझे मेहुणे श्री.हिरामण बाबुरावशेठ बागुल हेच माझे आई वडील आहेत.कारण त्यांचे छत्र मिळाले म्हणून मी सावरलो. यांची साथ माझ्या सुकेलेल्या आयुष्यात हिरवळ करून गेली. यांचा डाई बनवण्याचा कारखाना होता. मी ७ वीत असताना काम शिकून काम सुरू केलं.२१ वर्षचा होई पर्यंत मी तिथे राहिलो. मग जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील सौ.कल्पना यांच्या सोबत माझी जन्म गाठ बांधली गेली. आणि मग वेगळीच कल्पना माझ्या डोक्यात आली.

मी मेहुणेची कंपनी सोडून दुसरीकडे नोकरी शोधली.१९८६ ला"अंबिका इंडस्ट्रीज" रू२०/- रोजने काम सुरू केलं. माझी पत्नी ने मला या २०/- ची कधी तक्रार नाही केली . व्यवसायिक ची पत्नी देखील धाडसी असते. प्रत्येक वेळ छान हाताळते.😁

१९९४ मध्ये पार्टनरशिप मध्ये "मेहनत माझी,पैसा तुमचा"या ठराववर "श्री साई इंडस्ट्रीज" सुरू केली. पण पैसा देणारी पार्टीने मला धोका दिला,"फक्त २०/- रू वर स्वतःला सिद्ध करून दाखवेल" अस बोलून तिथून निघून गेलो.रू.२०/- मधले रू.१०/- चे पेट्रोल टाकले आणि रू.१०/- खिशात घेऊन साई मंदिरात जाऊन धसाधसा रडलो.

"नशीब ला दोष देणे हे कर्तृत्ववान माणसाचे लक्षण नाही"नवीन वाट शोधली.त्या काळी मुलांनी हट्ट केला नाही .सौ...."अहो आपलेही दिवस येतील,तेव्हा उरलेली हौस पूर्ण करू".....मी मनोमनी सुखावतो....😌

एका जवळच्या मित्राने मला खूप मदत केली, विश्वास ठेवला, आणि आजही आम्ही दुपारचे जेवण सोबतच करतो. स्वतः चे घर ९०,०००/- विकून ज्याचे त्याचे देऊन ५०,०००/- नवीन व्यवसाय "श्री साई इंडस्ट्रीज" जिथे गास्केट बनवले जातात, आज त्याचे २ युनिट आहेत, ही सुरुवात केली.पूर्ण भारत भर माझे मार्केट आहे.३ कोटी चा उलाढाल आज माझे मूल मनोज आणि धृविष पण हातभार लावत आहे.

या यश पेक्षा माझ्या आयुष्यात अजून एक आनंदचा क्षण म्हणजे ...."तुम्हाला नात झाली"अस डॉक्टर कडून एकलेले शब्द...७० वर्षांनी लक्ष्मी आमच्या दारी आली.अजून काय हवं ....💐

मला अस वाटते की,नुसते शिक्षण आणि डिग्री घेतली म्हणजे आयुष्य जगलो अस नाही. मेहनत,उंच स्वप्न आणि स्वप्न पूर्ती साठी लागणारी धडपड अंगात असेल तर एक नोकरी दार पेक्षा व्यवसाय करणारा नेहमी अग्रेसर असतो. आपली वाट आपणच शोधा,श्रद्धा आणि सबुरी ने सर्व काही साध्य होते.

Sh*tal Vispute

https://www.sh*talvispute.com/post/७०-वर्षा-नंतर

मी साई मंदिरात जाऊन धसाधसा रडलो. "नशीब ला दोष देणे हे कर्तृत्ववान माणसाचे लक्षण नाही"नवीन वाट शोधली.त्या काळी मुला.....

09/07/2022

*७० वर्षा नंतर.....*
मी,बापू गोविंद विसपुते, रा.अहमदाबाद.माझे मुळ गाव चाळीसगाव. मी ६ वर्षाचाच होतो,दुर्दैव की,देवाने माझे मातृ छत्र काढून घेतले. मी एकदम पोरका झालो. माझे वडील चाळीसगावला सराफी दुकानात कारागिरी करून आमच्या दोघांचे पोट कसेबसे भरत होतो. ६ वी ला होतो,माझी बहीण मला म्हटली. "बापू, अस किती दिवस खितपत काढणार , काही वेगळे करायचे असेल तर ,वेगळे निर्णय घे, चल माझ्या सोबत माझ्या घरी," मी कोणताही विचार न करता तिच्याकडे आलो.माझे मेहुणे श्री.हिरामण बाबुरावशेठ बागुल हेच माझे आई वडील आहेत.कारण त्यांचे छत्र मिळाले म्हणून मी सावरलो. यांची साथ माझ्या सुकेलेल्या आयुष्यात हिरवळ करून गेली. यांचा डाई बनवण्याचा कारखाना होता. मी ७ वीत असताना काम शिकून काम सुरू केलं.२१ वर्षचा होई पर्यंत मी तिथे राहिलो. मग जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील सौ.कल्पना यांच्या सोबत माझी जन्म गाठ बांधली गेली. आणि मग वेगळीच कल्पना माझ्या डोक्यात आली.

मी मेहुणेची कंपनी सोडून दुसरीकडे नोकरी शोधली.१९८६ ला"अंबिका इंडस्ट्रीज" रू२०/- रोजने काम सुरू केलं. माझी पत्नी ने मला या २०/- ची कधी तक्रार नाही केली . व्यवसायिक ची पत्नी देखील धाडसी असते. प्रत्येक वेळ छान हाताळते.😁

१९९४ मध्ये पार्टनरशिप मध्ये "मेहनत माझी,पैसा तुमचा"या ठराववर "श्री साई इंडस्ट्रीज" सुरू केली. पण पैसा देणारी पार्टीने मला धोका दिला,"फक्त २०/- रू वर स्वतःला सिद्ध करून दाखवेल" अस बोलून तिथून निघून गेलो.रू.२०/- मधले रू.१०/- चे पेट्रोल टाकले आणि रू.१०/- खिशात घेऊन साई मंदिरात जाऊन धसाधसा रडलो.

"नशीब ला दोष देणे हे कर्तृत्ववान माणसाचे लक्षण नाही"नवीन वाट शोधली.त्या काळी मुलांनी हट्ट केला नाही .सौ...."अहो आपलेही दिवस येतील,तेव्हा उरलेली हौस पूर्ण करू".....मी मनोमनी सुखावतो....😌

एका जवळच्या मित्राने मला खूप मदत केली, विश्वास ठेवला, आणि आजही आम्ही दुपारचे जेवण सोबतच करतो. स्वतः चे घर ९०,०००/- विकून ज्याचे त्याचे देऊन ५०,०००/- नवीन व्यवसाय "श्री साई इंडस्ट्रीज" जिथे गास्केट बनवले जातात, आज त्याचे २ युनिट आहेत, ही सुरुवात केली.पूर्ण भारत भर माझे मार्केट आहे.३ कोटी चा उलाढाल आज माझे मूल मनोज आणि धृविष पण हातभार लावत आहे.

या यश पेक्षा माझ्या आयुष्यात अजून एक आनंदचा क्षण म्हणजे ...."तुम्हाला नात झाली"अस डॉक्टर कडून एकलेले शब्द...७० वर्षांनी लक्ष्मी आमच्या दारी आली.अजून काय हवं ....💐

मला अस वाटते की,नुसते शिक्षण आणि डिग्री घेतली म्हणजे आयुष्य जगलो अस नाही. मेहनत,उंच स्वप्न आणि स्वप्न पूर्ती साठी लागणारी धडपड अंगात असेल तर एक नोकरी दार पेक्षा व्यवसाय करणारा नेहमी अग्रेसर असतो. आपली वाट आपणच शोधा,श्रद्धा आणि सबुरी ने सर्व काही साध्य होते.

03/07/2022

"ते हजार दिवस"
मी स्वतः व्यवसायिक असल्याने १ ते १००० दिवसांचा प्रवास इतर व्यवसायिक प्रमाणे मी पण करत आहे.हे दिवस एकतर आनंद की दुःख देणारे असतात हेच समजत नाही.मला वेगवेगळ्या उद्योगात यशस्वी झालेल्या यशवंताची मुलाखत घेणे आवडते आणि ते मी करते पण.सुरुवातीला ही लोक अगदी वरवर बोलताना सांगतात की," माझा अमुक व्यवसाय आहे,इतक्या वर्षा पासुन आहे. एकंदरीत उत्तम चाललं आहे".असा सूर.
पण मला बेडगी कौतुक नको असते.तेव्हा मी जास्त खोल वर जाऊन प्रश्न विचारते.मग मला खरे उत्तर मिळतात.

व्यवसाय सुरू करताना पहिला दिवस....मराठी माणूस म्हणजे फक्त नोकरी, टिफीन,पगार,किराणा,हफ्ते,संपला विषय..या प्रवाह विरुद्ध व्यवसाय सुरू करणे म्हणजे एकदम ताकदीने स्वतः वर संयम, आत्मविश्र्वास, टिकवून आपण टिकणे हीच खरी कला आहे.त्या नंतर जो व्यवसाय सुरू केला,तो किती दिवस चालेल हे भाकीत आपल्या पेक्षा इतरांना जास्त माहीत असतात.हे तेच असतात जे बघण्याची भूमिका घेणारे...

मग उत्पादन,भांडवल,जागा,कामगार,त्यांचा पगार,व्यवसायातील नफा नुकसान याचा मेळ बसवता बसवता आपला ताळमेळ चुकतो, "कधी होत नुकसान" मग सल्ले द्यायला नंबर लागतात.व्यवसायाचे बी रोपण केले की,लगेच हिरवळ.दिसावी अशा अपेक्षा आपल्यावर लादून ते मोकळे होतात.मी म्हणते इतकी अक्कल पाजलण्यापेक्षा तुम्ही का नाही केली हिम्मत एकदा तरी प्रवाह विरुद्ध पोहायची.....

१ ला दिवस ते ९९९ दिवस असच असते...मग कुठे फळ दिसले की,हेच तत्वज्ञान शिकवणारे पुष्पहार घेऊन आपले कौतुक करायला येतात.व्यक्त होण्यासाठी सोहळा पण ठेवतात. टाळ्या पण गरजतात.पण या दिवसासाठी त्या व्यावसायिकाने किती रात्र जागून काढल्या,कुणा कडून पैसे मागितले परत देण्याच्या बोलीवर तरी पैसे न देता शाब्दिक अपमान पचवला,कुणी मुद्दाम चुकीचं मार्गदर्शन केलं,त्याचा कुटुंबाने दिलेली साथ,त्याग,स्वप्न, यांची मोजमाप कुणीच करू शकत नाही...असा व्यवसायिक यशस्वी होवो की न होवो,पण त्याच्या प्रयत्नांना मी कायम सलाम करते....
शीतल 🙏


Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amuk Ani Tamuk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amuk Ani Tamuk:

Share

Category