मला इंग्रजी उत्तम येते परंतु मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतु मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणारे माध्यमच नाही. अशा सर्वांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे 'आवर्तन पवई'.
तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या तुमच्याच भाषेत मांडणारे माध्यम म्हणजेच 'आवर्तन पवई'.
४. ७५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या पवईत ६०% पेक्षा जास्त जनसंख्या ही मराठी ब
ोलणारी, समजणारी आणि विचार करणारी आहे परंतु या जनतेला आपल्या भाषेत आपले विचार मांडायला देणारे व्यासपीठच मिळत नसल्याने या लोकांची मते, विचार आणि समस्या व्यक्त झालेल्या नाहीत याची खंत नेहमीच या पवईकरांना राहिलेली आहे. आता या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याबरोबरच त्यांचे विचार, त्यांची मते आणि परिसरातील समस्या यांना एक स्वर देण्याचे काम 'आवर्तन पवई' करणार आहे.
मग आता वाट कशाची पाहताय? चला उठा आणि आपली मते, आपले विचार आणि परिसरातील समस्या इथे किंवा [email protected] वर पाठवा योग्य विचारांना, समस्यांना 'आवर्तन पवई' प्रसिद्धी देईल आणि आपल्या लढाईत आपला सहकारी बनेल.