Aamhi Parlekar

Aamhi Parlekar 'Aamhi Parlekar' is the first ever suburban newsletter published from Vileparle since last 30 years. It mainly covers socio-cultural events from the area.

पीटीकेएस खेळाडूंची चमकदार कामगिरीखेलो इंडिया जलतरण स्पर्धेत सिया देवरुखकरला दुहेरी रौप्य पदकछत्रपती शिवाजी महाराज स्मारक...
07/06/2026

पीटीकेएस खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया जलतरण स्पर्धेत सिया देवरुखकरला दुहेरी रौप्य पदक

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना च्या वतीने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या १० व्या अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विजेत्यांसोबत डावीकडून सीएसएमएसएस चे प्रसाद देवरुखकर, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे सहसचिव याकूब सय्यद, सी एस एम एस एस चे योगेश सावंत, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण, सी एस एम एस एस चे विश्वस्त मकरंद येडुलकर, सी एस एम एस एस चे विश्वस्त राजू रावल आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे पदाधिकारी अनिल यादव उपस्थित होते.
तैवान ओपन आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक रोलर स्केटिंग स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी तैवान येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या तैवान ओपन इंटरनॅशनल आर्टिस्टिक रोलर स्केटिंग चॅम्पियन २०२६ स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यात भारतीय खेळाडू सीवाह संतोष नवले हिने क्वार्टेट (ली) प्रकारात सुवर्णपदक जिंकत देशाची मान उंचावली आहे. या प्रकारात सीवाहने उत्कृष्ट समन्वय, कलात्मक लयबद्ध सादरीकरण आणि तांत्रिक कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे भारताच्या आर्टिस्टिक रोलर स्केटिंग क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी अधिक भक्कम होत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

उर्वरित लेख ‘आम्ही पार्लेकर’च्या मे २०२६ अंकामध्ये उपलब्ध आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे
https://www.parlekar.com/aamhi-parlekar-may-2026/

जहांगीर आर्ट गॅलरी - कलेचा मेरुमणीपंधरा-वीस दिवसांपूर्वी काळच्या विस्मृतीत गेलेल्या मुंबईतील गोष्टी नेटवर शोधत असताना (म...
01/06/2026

जहांगीर आर्ट गॅलरी - कलेचा मेरुमणी

पंधरा-वीस दिवसांपूर्वी काळच्या विस्मृतीत गेलेल्या मुंबईतील गोष्टी नेटवर शोधत असताना (माझा एक मित्र त्याला दुष्काळी कामं असं म्हणतो), मार्च २०१५ मध्ये काही वृत्त वाहिन्यांनी प्रस्तुत केलेल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. 'जहांगीर आर्ट गॅलरी' च्या इमारतीमधील जवळजवळ सहा दशके कार्यरत असलेले 'कॅफे समोवार कायमचे बंद होत आहे' ही ती खेदजनक बातमी!

माझ्यासारख्या मुंबईतील अनेकांच्या भावनांशी निगडित असलेले कॅफे बंद झाल्याची बातमी पुन्हा एकदा मनावर वार करून गेली आणि जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देऊन गतस्मृतींना उजाळा द्यावे असे मनात आले. त्याप्रमाणे मी तिथे पुन्हा एकदा जाऊन आलो.

काळाघोडा पार करून छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाकडे जाताना डावीकडे एक साधी, बसकी इमारत अनेकदा तुमच्या नजरेतून बरेचदा सुटते. दोन गोलाकार भाग, मध्ये ८-१० पायऱ्या आणि वर अगदी भर रस्त्यावर येणारं छप्पर म्हणजेच जहांगीर आर्ट गॅलरी. साधेपणातच महानता दडलेली असते याची साक्षात साक्ष म्हणजेच जहांगीर आर्ट गॅलरी. या इमारतीमध्ये २७०० चौ. फूट प्रेक्षागार वजा प्रदर्शन कक्ष आणि ३७०० चौ. फूट प्रदर्शन कक्ष असे दोन भाग आहेत. मागील बाजूने वर चालून गेलात तर खास फोटोग्राफी साठी राखून ठेवलेल आणखी एक दालन आहे.

१९४५-५० च्या आसपासचा काळ ! त्याकाळात मुंबईत कला प्रदर्शने भरवण्यासाठी आर्ट गॅलरीज नव्हत्या. बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक, चित्र संग्राहक डॉ. होमी भाभा, चित्रकार के. के. हेब्बर, वॉल्टर लँगहॅमर, कलासमीक्षक लायडन अशा नामवंत लोकांनी एक आर्ट गॅलरीत मुंबईत असावी आणि कलावंतांना प्रोत्साहन मिळावे तसेच भारतीय कलांना लोकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले. बॅरिस्टर ओक हे चित्रकार आणि पेशाने वकील होते. बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले असताना तिथली कलादालने आणि प्रदर्शने पाहून मुंबईतही असे कलादालन व्हावे असे त्यांना वाटले. तत्कालीन मुख्यमंत्री बी. जे. खेर यांच्यामार्फत ओकांनी म्युझियमच्या आवारातील भूखंड मिळवला. मुंबईचे बॅरोनेट, सर कावसजी यांनी लागणारा संपूर्ण खर्च उचलायला होकार दिला आणि आर्ट गॅलरी कल्पनेतून प्रत्यक्षात साकारली. २१ जानेवारी १९५२ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भा. द. खेर यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन होऊन कावसजी यांचे पुत्र जहांगीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आर्ट गॅलरीला 'जहांगीर आर्ट गॅलरी' असे नाव देण्यात आले. एम एफ हुसेन, मेनन, अकबर पदमसी, एस एच रजा अशा आणि अनेक प्रतिथयश आणि नामवंत कलाकारांनी आपली कला लोकांसाठी येथे प्रदर्शित केली आहे.

चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, फोटोग्राफी तसेच वस्त्रोद्योग यावरील प्रदर्शने येथे आयोजित केले जातात. कलासंस्था, कलाकार आगाऊ आरक्षण आणि शुल्क भरून विहित काळासाठी आपली कला प्रदर्शित करू शकतात. सामान्य नागरिकांना कला समजवून सांगण्यासाठी किंवा कला शिकण्याची तळमळ असणाऱ्यांसाठी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आर्ट गॅलरीमध्ये गेलो असताना आसाम मधील तिनसुखिया आणि मेघालय, अरुणाचल, मणिपूर मधील काही कलाकारांनी एकत्र येऊन भरविलेले एक अप्रतिम प्रदर्शन मला पाहायला मिळाले. त्यातील एका कलाकाराने काही सामाजिक संस्थांसोबत एक कलामंदिर स्थापन केल्याचे सांगितले. मी फोटोग्राफी करत असल्याचे पाहिल्यावर या कलामंदिरात विविध कला शिकणाऱ्या मुलांसाठी छायाचित्रण कार्यशाळा आयोजित करण्याची गळ घातली. कला प्रदर्शन या हेतूबरोबरच कलाकारांना आचार-विचार, कल्पना, रसग्रहण आदानप्रदान करण्यासाठी एक मंच आपोआप तयार झाल्याचे लक्षात आले.

नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भारतीय आधुनिक कलेला प्रोत्साहन देणे, कला आणि समाज यांच्यात संवाद निर्माण करणे या उद्देशाने सुरु केलेली गॅलरी आजही नवोदित कलाकारांना त्यांच्या आयुष्यातील पहिली संधी उपलब्ध करून देते.

बंद झाल्यामुळे विस्मरण झालेल्या 'समोवार कॅफे' विषयी अनेक आठवणी भेटी दरम्यान जागृत झाल्या. प्रत्येक प्रदर्शन पाहिल्यावर कॅफे मध्ये जाऊन चर्चा नाही केली तर उपस्थिती लागत नसे. हे कॅफे काही कारणास्तव जरी बंद झाले असले तरीही 'एकला चालो रे' च्या धर्तीवर जहांगीर आर्ट गॅलरीची वाटचाल चालू आहेच.

हा लेख वाचत असतांना अनेकांना आपल्या पूर्वायुष्यातील काही प्रसंग आठवले असतील. या आठवणी पुन्हा एकदा जाऊन या आर्ट गॅलरीमध्ये. ही वास्तू आतुरतेने तुमची वाट पाहत आहे.

संजय देवस्थळी

पुष्कर श्रोत्री ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित  मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्...
26/05/2026

पुष्कर श्रोत्री ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित

मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, हिंदी-मराठी सिनेमांमध्ये अभिनय, सूत्र संचालन, निवेदन अशा अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व प्रांतात गेल्या जवळ जवळ ३५ वर्षांपासून पुष्कर श्रोत्री लीलया मुशाफिरी करत आहे. १९९२ पासून अभिनय क्षेत्रात असलेल्या पुष्करने ५६ च्या वर मराठी नाटकांमधे काम केले आहे. विनोदी शैलीतील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या असल्या तरीही वेगळ्या धाटणीच्या गंभीर भूमिकांमध्ये देखील पुष्करने आपला ठसा उमटवला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात पुष्करला ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्या निमित्ताने श्रोत्यांशी संवाद साधताना पुष्करने आवर्जून सांगितले की “अभिनय क्षेत्रातील दोन दिग्गज कलावंत अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या वयाच्या या टप्प्यावरदेखील रंगभूमीसाठी काम करत आहेत. त्यांचाच आदर्श ठेऊन या दोघांप्रमाणे मलाही पुढील अनेक वर्षे रंगभूमीवर कार्यरत राहायचे आहे.”

हा महत्वाचा आणि प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून पुष्करने पार्ल्याच्या सांस्कृतिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. पुष्करचे 'आम्ही पार्लेकर’तर्फे आणि समस्त पार्लेकरांकडून अभिनंदन !

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे पार्ल्याशी असलेले ऋणानुबंधआपल्या सर्वांना परिचित असणारे डॉ. आनंद नाडकर्णी एक मानसोपचार तज्ञ, ...
25/05/2026

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे पार्ल्याशी असलेले ऋणानुबंध

आपल्या सर्वांना परिचित असणारे डॉ. आनंद नाडकर्णी एक मानसोपचार तज्ञ, मनोविकास तज्ञ, लेखक, कवी, नाटककार, 'मुक्तांगण' संस्थापक आणि विश्वस्त, ठाण्यातील 'आयपीएच' चे संस्थापक आणि सामाजिक कार्य करत असणाऱ्या अनेक संस्थांशी निगडीत असलेलं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. १५ मे २०२६ रोजी एका अल्पशा आजाराने डॉक्टरांचं निधन झालं. गेले अनेक वर्ष ठाण्यात वास्तव्यास असलेल्या डॉ. नाडकर्णी याचं आपल्या पार्त्याशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं. अनेक निमित्तांनी ते पार्लेकरांच्या संपर्कात होते. शालेय जीवनातील दोन वर्ष त्यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण घेतले होते. पार्त्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी पार्लेकरांशी संवाद साधला होता. मानसिक आरोग्याच्या संदर्भात कार्यशाळा घेतल्या होत्या. पार्ले कट्टयावर त्यांची विस्तृत अशी मुलाखत घेण्यात आली होती. २०२५ सप्टेंबर पासून पार्लेकरे हमा भाटवडेकर आणि मेधा जांबोटकर यांच्या प्रयत्नातून पार्ल्यात शालेय विद्यार्थ्यासाठी 'मन मैत्री' आणि जेष्ठांसाठी 'पार्ले सप्तसोपान' हे उपक्रम सुरु करण्यात आले. या दोनही उपक्रमांना पार्लेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नोव्हेंबर २०१८ मध्ये पार्ले कट्ट्यावर डॉ. आनंद नाडकर्णी यांची डॉ. अनुया पालकर यांनी घेतलेली मुलाखत. त्याची लिंक खालील प्रमाणे.
https://youtu.be/Lo8vllmXrQQ

#डॉआनंदनाडकर्णी #मानसिकआरोग्य #मनोविकासतज्ञ #मुक्तांगण #ठाणे #पार्लेकर #समाजकार्य #प्रेरणादायीव्यक्तिमत्व #मनमैत्री #पार्लेसप्तसोपान #विद्यार्थीविकास #जेष्ठनागरिक #मानसोपचार #मराठीलेखक #कवी #नाटककार #सामाजिकभान #मराठीमाणूस #समाजसेवा #विचारवंत #प्रबोधन #कार्यशाळा #मानवतावाद

आम्ही पार्लेकर' तर्फे ३ मे या दिवशी एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार पराग अळवणी, वॉर्ड नंबर ८३...
22/05/2026

आम्ही पार्लेकर' तर्फे ३ मे या दिवशी एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार पराग अळवणी, वॉर्ड नंबर ८३, ८४, आणि ८५ चे लोकप्रतिनिधी सोनाली साबे, अंजली सामंत आणि मिलिंद शिंदे उपस्थित होते. वाकोला ट्रॅफिक विभागातून पीएसआय राजम, पार्ले पोलिस स्टेशन मधील सायबर गुन्हे विभागातील प्रमुख अधिकारी व्हीपी पीएसआय भरत गुरव, आरोग्य विभागातील प्रमुख मेडिकल ऑफिसर महेंद्र खंदाडे अशा पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली होती. या व्यतिरिक्त पार्ल्यातील प्रमुख सामाजिक संस्था उत्कर्ष मंडळ मधून अजय सप्रे, लो. सेवा संघाच्या नागरिक दक्षता समितीमधून कुमार पंडित आणि विनिता हाटे आणि या बैठकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे आणि प्रबोधनकार ठाकरे संकुलाचे अरविंद प्रभू आदी मंडळी उपस्थित होती. या खेरीज माजी नगरसेवक अभिजीत सामंत, पार्ल्यातील उबाठा पक्षाचे कार्यकर्ते सिद्धेश पवार आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला टीम च्या अध्यक्षा गीता झगडे यांनीही आपली उपस्थितीलावली होती. 'आम्ही पार्लेकर' तर्फे संपादक ज्ञानेश चांदेकर, सहसंपादिका भाग्यश्री महाजन आणि टीम मधल्या प्रतिनिधी संगीता बेहेरे यांनी बैठकीची सूत्र सांभाळली. या बैठकीत अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झाल्या नव्हत्या. समस्या घेऊन नक्की कोणाकडे जावं हे नागरिकांना कळत नव्हतं. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 'आम्ही पार्लेकर'ने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीबरोबर एक फेसबुक लाईव्ह घेण्यात आलं त्याला पार्लेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही अनेक पार्लेकर त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवत होते. आणि याच अनुषंगाने 'आम्ही पार्लेकर' ने ही समन्वय बैठक घेण्याचे ठरवले. नुसत्या समस्या आणि आरोप याचा भडिमार न करता दोनही बाजू अभ्यासून समन्वयाने अडचणी सोडवण्याचा हा एक प्रयत्न होता.
'आम्ही पार्लेकर'च्या प्रतिनिधी संगीता बेहेरे यांनी केले अनेक महिने पार्ल्यातील समस्या व अडचणी याच्यावर सखोल अभ्यास केलेला आहे. त्यातीलच अनेक मुद्द्यांपैकी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दिवसेंदिवस वाढ होत चाललेल्या सायबर गुन्हे संबंधित मुद्द्यांवर बोलताना पार्ल्यातील सायबर विभागाचे प्रमुख अधिकारी भरत गुरव यांनी सामाजिक संस्थांतील कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन जनजागृती कार्यशाळा चालवाव्यात जेणेकरून कमी कालावधीत अनेकांना याचा फायदा मिळू शकेल. असे बैठकीत ठरले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्ला स्टेशन समोरील मोगीबाई रोड हा no stopping zone करण्यात यावा आणि त्याचबरोबर काही अंतरापर्यंत वनवे असणारा एमजी रोड आणि पार्ले टिळक शाळेच्या दोन्ही बाजूला असणारे वन वे मार्ग न पाळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. याव्यतिरिक्त इमारतीचा पुनर्विकास करताना कायद्यामध्ये तरतूद केलेले दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारने लागू केलेले नियम व अटी पाळणे हे बंधनकारक राहील याकडेही जातीने लक्ष दिले जाईल अशीही ग्वाही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमार्फत दिली गेली. या व्यतिरिक्तही अनेक मुद्दे आणि समस्या नक्कीच आहेत आणि त्याची नों दही आमच्याकडे आहे. परंतु अश्या पद्धतीच्या बैठकी ठराविक कालावधीनंतर होणार असून त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येण्याचे मान्य केले आहे जेणेकरून नागरिकांना आहोत असलेल्या घडामोडीचे अपडेट्स मिळत राहतील. प्रामुख्याने सांगण्याची म्हणजे पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेऊन पार्लेकर या नात्याने सर्वजण आपापले विचार मांडत होते. संबंधित अधिकारी आणि नागरिक याच्यातील माध्यम असण्याची एक तटस्त भूमिका 'आम्ही पार्लेकर' बजावीत आहे याची उपस्थितांनी नोंद घेऊन अशा बैठकांना उपस्थित राहण्याचे मान्य केले. नागरिक, सामाजिक संस्था आणि अधिकारी यांच्या एकमेकांतील सहकार्याने आपल्या पार्ल्यात नक्कीच अधिक सकारात्मक बदल घडतील अशी आपण सर्वच आशा बाळगूया.

पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा 'आम्ही पार्लेकर'चा मे २०२६ चा अंक आमच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, त्याची लिंक खालील प्रमाणे.
https://www.parlekar.com/aamhi-parlekar-may-2026/
आपला,
ज्ञानेश चांदेकर
संपादक

नमस्कार,पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा...
21/05/2026

नमस्कार,

पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा 'आम्ही पार्लेकर'चा मे २०२६ चा अंक आमच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, त्याची लिंक खालील प्रमाणे.
https://www.parlekar.com/aamhi-parlekar-may-2026/

आपला,
ज्ञानेश चांदेकर
संपादक

कॅफे अर्पण: समावेशकतेचा एक प्रेरणादायी प्रवासमुंबईतील कॅफे अर्पण ही केवळ एक खाण्यापिण्याची जागा नाही, तर ती समाजातील समा...
18/05/2026

कॅफे अर्पण: समावेशकतेचा एक प्रेरणादायी प्रवास

मुंबईतील कॅफे अर्पण ही केवळ एक खाण्यापिण्याची जागा नाही, तर ती समाजातील समावेशकतेचा एक सुंदर नमुना आहे. २०१७ च्या शेवटी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि २०१८ पासून कॅफेने अधिकृतपणे आपले कामकाज सुरू केले. हा उपक्रम पारंपरिक नफा-केंद्रित व्यवसाय नसून, तो ‘यश चॅरिटेबल ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवला जातो.
या कॅफेच्या मागे संस्थापक सुषमा नगरकर आणि त्यांच्या सहकारी विश्वस्तांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या कॅफेचे खरे भागीदार म्हणजे येथे काम करणारे न्यूरोडायव्हर्जंट (ऑटिझम, ADHD इ.) व्यक्ती. ते केवळ कर्मचारी नसून, ते कॅफेच्या दैनंदिन कामकाजात सक्रियपणे सहभागी होतात.
कॅफे अर्पण सुरू करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील समावेशकता वाढवणे आणि न्यूरोडायव्हर्जंट व्यक्तींना अर्थपूर्ण रोजगार उपलब्ध करून देणे. या उपक्रमाद्वारे “दान” या संकल्पनेपलीकडे जाऊन त्यांना सन्मानपूर्वक आणि व्यावसायिक वातावरणात काम करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जीवनकौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
सुरुवातीला हा कॅफे जुहूमध्ये सुरू झाला होता, पण नंतर तो विले पार्ले पूर्व येथे हलवण्यात आला. विले पार्ले हे ठिकाण निवडण्यामागे अनेक कारणे होती—मुख्य कारण म्हणजे जागरूक आणि सुजाण रहिवासी, शाळा महाविद्यालयांमुळे जास्त प्रमाणात असलेली तरुण वर्गाची संख्या आणि त्याचबरोबरीने अश्या एका वेगळ्या उपक्रमाला अपेक्षित असलेले सकारात्मक वातावरण. याशिवाय, या उपक्रमाचा विस्तार Accenture आणि 360 ONE सारख्या कॉर्पोरेट ठिकाणी लहान युनिट्सच्या स्वरूपातही करण्यात आला आहे.
“अर्पण” या नावाचा अर्थ “समर्पण” किंवा “अर्पण करणे” असा आहे. हे नाव संस्थेच्या तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे जुळते—समाजासाठी निःस्वार्थपणे संधी, सन्मान आणि आदर अर्पण करणे.
कॅफे अर्पणमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि चवही तितकीच खास आहे. येथे Blue Tokai Coffee Roasters चे उत्कृष्ट कॉफी पेय दिले जातात. तसेच, इन-हाऊस बेकरीमधून बनवलेले ब्रेड वापरून तयार केलेले सँडविचेस आणि ताजे डेझर्ट्सही उपलब्ध आहेत. या सर्व पदार्थांची तयारी न्यूरोडायव्हर्जंट व्यक्ती प्रशिक्षित स्टाफच्या मदतीने करतात, ज्यामुळे त्यांना व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करता येतात.
कॅफेमध्ये सर्वाधिक गर्दी संध्याकाळच्या वेळेस दिसून येते. याशिवाय, शाळा, एनजीओ आणि कॉर्पोरेट गटांकडून होणाऱ्या भेटी, तसेच लोकांच्या तोंडी प्रसिद्धीमुळेही ग्राहकांची संख्या वाढते. अनेक ग्राहक येथे केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर या उपक्रमाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यामागील उद्देश समजून घेण्यासाठी येतात.
या प्रवासात अनेक आव्हानेही आली. सुरुवातीच्या टप्प्यात परवाने मिळवणे, जागेचे नियोजन आणि आवश्यक सुविधा उभारणे यासारख्या प्रशासकीय अडचणी होत्या. समाजातील गैरसमज दूर करणे, लोकांना हा एक व्यावसायिक उपक्रम आहे हे पटवून देणे हेही एक मोठे आव्हान होते. याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण पद्धती विकसित करणे आणि आर्थिकदृष्ट्या सुरुवातीच्या काळात क्राउडफंडिंगवर अवलंबून राहणे ही आव्हानेही होती.
तरीही, या सर्व अडचणींवर मात करून कॅफे अर्पण आज एक यशस्वी आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभा आहे. तो केवळ एक कॅफे नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक सुंदर चळवळ आहे.

साक्षी महाडीक

Cafe Arpan: Shop 3, Zee Jayashree, Prarthana Samaj Road, Satsang CHSL, Navpada, Vile Parle East, Mumbai

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

या महिन्याचे किस्से स्वर्गीय आशाताईना समर्पित..लता मंगेशकर आणि कवयित्री शांताबाई शेळके यांची गाढ मैत्री होती. शांताबाई न...
15/05/2026

या महिन्याचे किस्से स्वर्गीय आशाताईना समर्पित..
लता मंगेशकर आणि कवयित्री शांताबाई शेळके यांची गाढ मैत्री होती. शांताबाई नेहमी प्रभुकुंज मध्ये येत असत. कधी गाणं लिहिण्यासाठी तर कधी खास मैत्रीण लता बाईंना भेटायला. मंगेशकर कुटुंबीय सारस्वत. वेळोवेळी गोव्यात मंगेशीच्या दर्शनाला जात असत. असंच एकदा लताबाई म्हणाल्या, शांताबाई, आम्ही गोव्याला जातो आहोत. तुम्हीही चला. शांताबाई त्यांच्याबरोबर गेल्या. दर्शन झालं. सगळे गप्पा मारत पायऱ्यांवर बसले होते. तेव्हा आशाताई बोलता बोलता म्हणाल्या, हा मंगेश माझ्या पाठीशी उभा आहे ना, म्हणून मी सगळ्या संकटांचा सामना करू शकते आहे. हे ऐकताच तिथल्या तिथे शांताबाईंना गीत स्फुरलं, मागे उभा मंगेश.. पुढे उभा मंगेश.. या गाण्याला पुढे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी यमनकल्याण रागाचा आधार घेऊन चाल लावली. उषाताई मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे यांच्या समुह स्वरात रेकॉर्ड केलं आणि महानंदा चित्रपटात वापरलं गेलं. नंतर आशाताईंच्या मधुर स्वरात रेकॉर्ड केलं गेलं. पखवाजाच्या अप्रतिम तीन तालातील मुखड्यांवर खुलणारं आशाताईंच्या स्वरातील हे गाणं आजही सर्वांच्या मनांवर गारुड करून आहे.
तीसरी मंजिल हा संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेला चित्रपट. त्यावेळी ते बॉलिवूड मध्ये नवीन होते. यातील सगळी गाणी आशाताई आणि रफी साहेबांनी गायली होती. पंचमदा प्रत्येक गाण्यात काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी प्रयत्नशील असत हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आशाताईंना एका गाण्यासाठी एक जागा तयार करायला सांगितली. आशाताईंनी ती ऐकली आणि म्हणायला सपशेल नकार दिला. मी आजवर असं काही गायले नाही. ही जागा मला जमणार नाही. दुसऱ्या गायिकेकडून गाऊन घ्या. लोकांना नाही आवडली तर गाणं पडेल ही सार्थ भीतीदेखील त्या मागे होती. पण पंचमदांना खात्री होती की ही जागा फक्त आणि फक्त आशा गाऊ शकेल आणि हे गाणं आजवरच्या त्यांच्या गाण्यांमध्ये सर्वांत जास्त गाजेल.. तब्बल आठ दिवस लागले त्यांना आशाताईंचं मन वळवायला. शेवटी एकदाच्या तयार झाल्या आणि पंचमदांची भविष्यवाणी खरी ठरली... गाणं होतं आजा आजा मैं हूं प्यार तेरा.. या गाण्यासंबंधी अजुन एक मजेशीर किस्सा, स्वतः आशाताईंनी सांगितलेला. त्या गाडीतून जाताना.. आहाहा आजा आह आ आजा.. अशी प्रॅक्टिस करत होत्या. ड्रायव्हर घाबरला. त्याला वाटलं, बाईंना श्वास लागलाय. गाडी हॉस्पिटल कडे वळवू का असं विचारू लागला..
हे गाणं जबरदस्त हिट झालं आणि त्याबरोबर पंचमदा आणि आशाताई ही जोडी ही..

या महिन्याचे किस्से स्वर्गीय आशाताईना समर्पित..लता मंगेशकर आणि कवयित्री शांताबाई शेळके यांची गाढ मैत्री होती. शांताबाई न...
12/05/2026

या महिन्याचे किस्से स्वर्गीय आशाताईना समर्पित..

लता मंगेशकर आणि कवयित्री शांताबाई शेळके यांची गाढ मैत्री होती. शांताबाई नेहमी प्रभुकुंज मध्ये येत असत. कधी गाणं लिहिण्यासाठी तर कधी खास मैत्रीण लता बाईंना भेटायला. मंगेशकर कुटुंबीय सारस्वत. वेळोवेळी गोव्यात मंगेशीच्या दर्शनाला जात असत. असंच एकदा लताबाई म्हणाल्या, शांताबाई, आम्ही गोव्याला जातो आहोत. तुम्हीही चला. शांताबाई त्यांच्याबरोबर गेल्या. दर्शन झालं. सगळे गप्पा मारत पायऱ्यांवर बसले होते. तेव्हा आशाताई बोलता बोलता म्हणाल्या, हा मंगेश माझ्या पाठीशी उभा आहे ना, म्हणून मी सगळ्या संकटांचा सामना करू शकते आहे. हे ऐकताच तिथल्या तिथे शांताबाईंना गीत स्फुरलं, मागे उभा मंगेश.. पुढे उभा मंगेश.. या गाण्याला पुढे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी यमनकल्याण रागाचा आधार घेऊन चाल लावली. उषाताई मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे यांच्या समुह स्वरात रेकॉर्ड केलं आणि महानंदा चित्रपटात वापरलं गेलं. नंतर आशाताईंच्या मधुर स्वरात रेकॉर्ड केलं गेलं. पखवाजाच्या अप्रतिम तीन तालातील मुखड्यांवर खुलणारं आशाताईंच्या स्वरातील हे गाणं आजही सर्वांच्या मनांवर गारुड करून आहे.
तीसरी मंजिल हा संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेला चित्रपट. त्यावेळी ते बॉलिवूड मध्ये नवीन होते. यातील सगळी गाणी आशाताई आणि रफी साहेबांनी गायली होती. पंचमदा प्रत्येक गाण्यात काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी प्रयत्नशील असत हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आशाताईंना एका गाण्यासाठी एक जागा तयार करायला सांगितली. आशाताईंनी ती ऐकली आणि म्हणायला सपशेल नकार दिला. मी आजवर असं काही गायले नाही. ही जागा मला जमणार नाही. दुसऱ्या गायिकेकडून गाऊन घ्या. लोकांना नाही आवडली तर गाणं पडेल ही सार्थ भीतीदेखील त्या मागे होती. पण पंचमदांना खात्री होती की ही जागा फक्त आणि फक्त आशा गाऊ शकेल आणि हे गाणं आजवरच्या त्यांच्या गाण्यांमध्ये सर्वांत जास्त गाजेल.. तब्बल आठ दिवस लागले त्यांना आशाताईंचं मन वळवायला. शेवटी एकदाच्या तयार झाल्या आणि पंचमदांची भविष्यवाणी खरी ठरली... गाणं होतं आजा आजा मैं हूं प्यार तेरा.. या गाण्यासंबंधी अजुन एक मजेशीर किस्सा, स्वतः आशाताईंनी सांगितलेला. त्या गाडीतून जाताना.. आहाहा आजा आह आ आजा.. अशी प्रॅक्टिस करत होत्या. ड्रायव्हर घाबरला. त्याला वाटलं, बाईंना श्वास लागलाय. गाडी हॉस्पिटल कडे वळवू का असं विचारू लागला..
हे गाणं जबरदस्त हिट झालं आणि त्याबरोबर पंचमदा आणि आशाताई ही जोडी ही..

प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक याच्यात सुसंवाद घडवण्याची भूमिका ‘आम्ही पार्लेकर’ नेहमीच बजावीत राहिले आहे.रव...
08/05/2026

प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक याच्यात सुसंवाद घडवण्याची भूमिका ‘आम्ही पार्लेकर’ नेहमीच बजावीत राहिले आहे.

रविवार दि ३ मे रोजी 'आम्ही पार्लेकर' तर्फे एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विलेपार्ल्यातील लोकप्रतिनिधी (आमदार आणि नगरसेवक), बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.या बैठकीत अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

अशा पद्धतीच्या बैठका ठराविक कालावधीनंतर घेऊन आधीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार होत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
(सविस्तर वृत्त 'आम्ही पार्लेकर'च्या मे अंकात)

Anjali Samant .mahajan

Address

1, Alpha, M. G. Road, Vile Parle East
Mumbai
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Parlekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamhi Parlekar:

Share