Yukti Media

Yukti Media Generate New Ideas! Public Relations is about building publics and addressing them.

Yukti Media Consultancy is about dynamic re-engineering of communications through a fundamental reconsideration and redesigning of communication processes. We see PR as a strategic and management function addressing internal and external publics and as a strategic knowledge centre for managerial, symmetrical and asymmetrical public relations roles. Our employees and partners are carefully selected

to represent culturally diverse world views to communicate with specific cultural structures. Communication process re-engineering at Yukti media consultancy develops vision and a communication process objective that is based on an analysis of the political and economic environment of organizations. An organizational structure has inherent growth trajectories that determine how and how much an organization can grow. Yukti media consultancy helps understand and measure the existing growth trajectories and employ PR tools to build and address dynamic publics

The Lady Boss : एचआर क्वीन रेणू गुलराजकोणत्याही कंपनीसाठी कर्मचारी हा कणा असतो. ज्या कंपनीचे कर्मचारी उत्तम ती कंपनी चां...
20/10/2024

The Lady Boss : एचआर क्वीन रेणू गुलराज

कोणत्याही कंपनीसाठी कर्मचारी हा कणा असतो. ज्या कंपनीचे कर्मचारी उत्तम ती कंपनी चांगली प्रगती करते. पण या कर्मचाऱ्यांना कामासाठी सतत प्रेरित करणे, त्यांच्याकडून दर्जात्मक काम करून घेणे आवश्यक असंते. त्यासोबतच या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करणे देखील गरजेचे असते. ही सगळी कामे करणाऱ्या विभागास ह्युमन रिसोर्स अर्थात मनुष्यबळ विभाग म्हणतात. काही कंपन्या ही कामे करणाऱ्या कंपन्यांना याची जबाबदारी सोपवितात. अशी जबाबदारी समर्थपणे पेलवणारी कंपनी म्हणजे इझी सोर्स एचआर सोल्यूशन्स प्रा.लि. रेणू गुलराजने आपल्या पतीसह उभारलेली ही कंपनी आज काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.

रेणू गुलराज यांचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बाबा ड्राफ्ट्समन म्हणून शासकीय नोकरी करत होते. तर तिची आई शिक्षिका होती. रेणू तीन भावंडांमध्ये दुसरी मुलगी. तिचं कुटुंब एक निम्न मध्यवर्गीय कुटुंब होतं. तिला शाळेच्या सहलीला जाणे परवडण्यासारखे नसायचे. रेणू शाळेतील एक सरासरी दर्जाची विद्यार्थिनी होती. ती खेळामध्ये मात्र ती सक्रिय होती. ती शाळेच्या व्हॉलीबॉल संघाचा भाग असायची. मॅरेथॉनमध्ये सुद्धा ती भाग घ्यायची. बारावी नंतर, तिने दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीजमध्ये प्रवेश घेतला आणि 1993 मध्ये औद्योगिक संबंध आणि कार्मिक व्यवस्थापन या विषयात बीए पूर्ण केले.

पदवी मिळवल्यानंतर तिने जेनिथ कॉम्प्युटर्समध्ये इंटर्नशिप केली, जिथे तिला 1993 मध्ये 3200 रुपये पगारावर एचआर ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. झेनिथमध्ये काम करत असताना, तिने संध्याकाळच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि भारतीय विद्या भवन, दिल्ली येथून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका पूर्ण केली. रेणूने नोव्हेंबर 1994 मध्ये जेनिथ सोडले आणि दिल्लीतील शेअर ब्रोकिंग फर्म राहुल मलिक अँड कंपनीमध्ये ग्राहक सेवा नोकरी स्वीकारली.

तिच्या वडिलांप्रमाणेच तिलाही शेअर मार्केटमध्ये रस होता आणि म्हणून ती या शेअर ब्रोकिंग कंपनीत सामील झाली. इथेच तिला तिचा भावी पती नरेश गुलराज भेटला. बीटेक पदवीधर असलेल्या नरेशची त्या वेळी आर्थिक सेवा देणारी फर्म होती. तो या शेअर ब्रोकिंग कंपनीच्या कार्यालयात जायचा. पहिल्यांदा ओळख झाली व पुढे ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन 1996 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर रेणूने तिची नोकरी सोडली आणि 1997 मध्ये दिल्लीतील एका छोट्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांसह ‘इझी सर्च’ ही रिक्रूटमेंट फर्म सुरू केली. व्हर्लपूल आणि पेप्सीला तिचे प्रारंभिक ग्राहक म्हणून सेवा दिली.

2005 मध्ये, नरेश यांनीही आपला व्यवसाय बंद केला आणि ‘इझी सोर्स’ नावाची नवीन कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणारी कंपनी सुरू केली. त्यांनी राजेंद्र प्लेस, दिल्ली येथे कार्यालय सुरू केले. बचत केलेले 20 लाख रुपये हे त्यांचे भांडवल होते. हीच फर्म इझी सोर्स एचआर सोल्युशन्स प्रा. लि. म्हणून कंपनी नोंदणीकृत झाली.

तेव्हापासून या जोडप्याने मागे वळून पाहिलेच नाही. रेणू आणि नरेश यांनी कपल-प्रेन्युअरशिप एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. ते व्यवसाय भागीदार किंवा खऱ्या आयुष्यातले भागीदार असले तरीही ते एकमेकांसाठी बनलेले आहेत असे म्हणणे योग्य ठरेल.
इझी सोर्स आपल्या क्लायंट कंपन्यांना मनुष्यबळ (एचआर) सेवा प्रदान करते. वेतन, पीएफ, नियुक्ती यांसारखी कार्ये व्यवस्थापित करते. त्यांचा आता प्रोफेशनल एम्प्लॉयर ऑर्गनाइज़ेशन मध्ये विस्तार झाला आहे. इझी सोर्स परदेशी ग्राहकांसाठी कार्यालये व्यवस्थापित करते. 99% दूरस्थ ठिकाणांवरून काम करणाऱ्या आणि 1% इझी सोर्सद्वारे देखरेख केलेल्या ऑफिस स्पेसमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करतात. कंपनीकडे काही फॉर्च्युन 500 कंपन्यांसह सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील ग्राहक आहेत. या जोडप्याने कंपनीतील भूमिका स्पष्टपणे निर्धारित केल्या आहेत. रेणू टीम हाताळते आणि नरेश आर्थिक व्यवस्थापन पाहतात. सध्या कंपनीचे 70 पूर्णवेळ कर्मचारी आणि 12,000 आउटसोर्स कर्मचारी आहेत. गुरुग्राम, दिल्ली आणि नोएडासह संपूर्ण भारतात 200 ठिकाणी कंपनीची उपस्थिती आहे. एका वेबपोर्टलनुसार 2022 मध्ये इझी सोर्सची उलाढाल 202 कोटी रुपये इतकी होती.

कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेते. जेव्हा कंपनीने 2 कोटी रुपयांची उलाढाल केली तेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या आवडीचे घरगुती उपकरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपयांचे कूपन देण्यात आले. "तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि ते तुमच्या व्यवसायाची काळजी घेतील'’ या मंत्रावर रेणू व नरेश दाम्पत्यांचा विश्वास आहे.

वैयक्तिक आयुष्यात नरेश देखील एक क्रीडापटूच आहे. तो शालेय जीवनापासून बॅडमिंटन खेळत आहे. त्याने अलीकडेच बॅडमिंटनमधील दुहेरीसाठी ‘गुरुग्राम जिल्हा मास्टर्स चॅम्पियनशिप’ जिंकली. या दाम्पत्यास राहुल गुलराज हा 23 वर्षांचा मुलगा आहे. राहुल मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक असून सध्या तो दिल्लीतील अपोलो टायर्सच्या पुरवठा साखळी विभागात कार्यरत आहे.
“तुमच्या व्यवसायात प्रामाणिक रहा. तुमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करा आणि त्यांची काळजी घ्या. कल्पना आणि संवादासाठी नेहमी दरवाजे खुले ठेवण्याचे धोरण ठेवा.” असा सल्ला भावी उद्योजकांसाठी रेणू आणि नरेश देतात.

एका खासगी कंपनी मध्ये 3200 रुपयांच्या पगारापासून झालेली रेणू गुलराज यांची सुरुवात 200 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या एचआर कंपनी पर्यंत पोहोचली आहे. एचआर क्षेत्रातील या लेडी बॉसची ही गोष्ट प्रत्येक मध्यमवर्गीय तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.

प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
PrahaarNews Live

The Lady Boss - अन्नपुर्णा - विशाला रेड्डी संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष' म...
07/10/2024

The Lady Boss - अन्नपुर्णा - विशाला रेड्डी
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष' म्हणून घोषित केले होते. मात्र भारतातील एक महिलेने दोन वर्षां अगोदर तृणधान्याचे महत्व ओळखून तृणधान्याची ४० हून अधिक उत्पादने बाजारात आणली. शून्यातून सुरुवात करुन आज तिची कंपनी भरडधान्य व्यवसायातून काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे, विशाला रेड्डी या अन्नपूर्णेची.
विशालाचा जन्म आंध्र प्रदेशातील दुष्काळग्रस्त अशा रायलसीमा प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील मुल्लूर कृष्णपुरम नावाच्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-बाबा वर्षानुवर्षे शेतात राबले. विशालाने तिचे बारावी पर्यंत शिक्षण चित्तूर येथील कुप्पम शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ मधून राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन आणि समाजशास्त्र या विषयात बी.ए. पदवी प्राप्त केली. उस्मानिया विद्यापीठातून एमबीए पूर्ण केल्यानंतर काही काळ तिने पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगात काम केले.
कालांतराने तिने हैदराबादमध्ये डेस्टिनेशन/सिटी ब्रँडिंग आणि मार्केटिंग सेवांवर लक्ष केंद्रित करणारी आयडेन्ट सिटी नावाची फर्म स्थापन केली आणि इथेच उद्योजकतेची बीजे पेरली गेली. आयडेन्टसिटी स्थानिक सरकार आणि खासगी भागधारकांना सहभागी करून पर्यटन आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सल्ला सेवा देते, ज्यामुळे संबंधित गंतव्यस्थानांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. कोविड महामारीने जगाचा चेहरा मोहरा बदलला. विशालासारख्या पहिल्या पिढीतील अनेक उद्योजकासाठी नवीन संधीची कवाडे उघडली गेली. कोविड १९ या साथीच्या आजारामुळे लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान ती आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिच्या गावी परतली. तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोविड-19 ची लागण झाली. दु:खांची मालिका इथेच थांबली नाही. त्याच काळात एका रस्ता अपघातात तिच्या एका भावाचा मृत्यू झाला.
गावी अजून एक बाब तिला कळली की कर्नाटकात राहणाऱ्या तिच्या बहिणीला तिची कोल्हाळी भरडधान्यची शेती टिकवण्यात अडचणी येत आहेत. उच्च बाजारमूल्य असूनही तिचे केवळ 15 रुपये प्रति किलोने उत्पादन विकले गेले हे पाहून निराशाजनक वाटले. आपले पारंपारिक खाद्यपदार्थांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि अन्न प्रणालीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपले कौशल्य आणि विपणन ज्ञान वापरण्याचा विशालाने निर्धार केला होता.
आपल्या कुटुंबातील महिलांना भरडधान्य पिकवताना पाहून ती लहानाची मोठी झाली. पण ही धान्ये आपल्या संस्कृतीत आणि पाककृतीत किती खोलवर रुजलेली आहेत हे समजण्यात मला अपयश आले. दुर्दैवाने, गेल्या दोन दशकांत बहुतांश शेतकऱ्यांनी तृणधान्याची लागवड करणे बंद केले आहे. जून 2020 मध्ये, विशालाने तिचे संशोधन सुरू केले. तळागाळातील शेतकऱ्यांची आव्हाने, समस्या जाणून घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांशी 10 महिने संवाद साधला.
ऑगस्ट 2021 मध्ये, तिने मिंकन ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत तिचा ब्रँड, मिलेट बँकचे अनावरण केले. रेडी-टू-कूक (RTC) आणि रेडी-टू-इट (RTE) फॉक्सटेल भरडधान्य, मल्टी-मिलेट, छोटी भरडधान्य, पर्ल मिलेट नूडल्स, कुकीज, पास्ता, डोसा, इडली आणि पोंगल मिक्स अशी ४० च्या वर उत्पादने बाजारात आणली. अवघ्या तिसऱ्या वर्षी, कंपनीची उलाढाल 6 कोटी रुपयांच्या पुढे गेली. तर एकूण विक्री 10 कोटी रुपयांची झाली आहे. त्यांची सर्व उत्पादने त्यांच्या वेबसाइटवर विकली जातात आणि ती दक्षिण भारतातील सर्व आघाडीच्या सुपरमार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नोवोटेल हैदराबाद कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करणारे एक स्टोअर सुरू करण्यात आले आहे, जे त्यांच्या उत्पादनांसाठी जाहिरात व्यासपीठ म्हणून अधिक काम करते. तसेच विशालाची कंपनी आपली उत्पादने दुबईलाही निर्यात करतात. या उत्पादनांना तिकडे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमधून सुद्धा मागणी आहे.
भरडधान्य लागवडीचे फायदे अधोरेखित करण्यासाठी तिने तिच्या गावात एक भरडधान्य संग्रहालय देखील स्थापित केले आणि स्थानिक शेतकऱ्यांना ही चळवळ स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. तृणधान्याच्या शेतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरुवातीला आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करून, तिने अखेरीस इतर शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न वाढवले. सध्या, विशाला तेलंगणा आणि तामिळनाडूमधील 1,000 हून अधिक शेतकरी, तसेच कारागीर आणि सूक्ष्म-युनिट्ससोबत भागीदारी करत आहे. तिने लहान व्यावसायिक युनिट्स, उत्पादन सुविधा, कारागीर आणि शेतकरी उत्पादक संस्थांना एकत्र आणले आहे. सध्या तिचे प्राथमिक लक्ष्य पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर आहे. ही प्रमुख क्षेत्रे हाताळण्यासाठी 30 कर्मचाऱ्यांची टीम देखील कार्यरत आहे.
अन्न कंपनी व्यतिरिक्त "क्रिसायु" नावाचा हा एक विशेष भेटवस्तू विभाग आहे. जो 300 उत्पादनांचा संग्रह सादर करतो. या उत्पादनात पारंपारिक देशी खेळणी, दिवे (तेल दिवे), मसाल्यांचे मिश्रण, मध आणि आयुर्वेद आरोग्य उत्पादने समाविष्ट आहेत. अनेक ग्रामीण महिलांना पर्यावरणपूरक साहित्यापासून बास्केट बनवण्यास तिने प्रशिक्षित केले आहे. नंतर हे बास्केट कॉर्पोरेट कंपन्यांना विकले जाते. आजपर्यंत, विशालाने 2,000 पेक्षा जास्त बास्केट विकल्या आहेत.
"माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणत की, भरडधान्यची लागवड अयशस्वी होईल," विशाला सांगते. साशंकता आणि वैयक्तिक चाचण्या असूनही विशाला तिच्या ध्येयात स्थिर राहिली.
यूएन वुमन इंडियाने प्रकाशित केलेल्या प्रतिष्ठित "व्हेन वुमन लीड" कॉफी टेबल बुकमध्ये 75 कर्तृत्ववान महिला मधील एक म्हणून विशालाला सन्मानित करण्यात आले. ही संयुक्त राष्ट्र संस्थेची एक शाखा असून लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. स्त्री-पुरुष समानता आणि शाश्वत विकासासाठी विशालाच्या वचनबद्धतेवर भर देत अन्न आणि कृषी क्षेत्रातील एक नेतृत्व म्हणून तिच्या संघर्षमय प्रवासावर पुस्तक प्रकाश टाकते.
विशालाचा 22 वर्षांचा मुलगा, नचिकेथ रेड्डी, याने 2013 मध्ये क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बीएची पदवी प्राप्त केली. सध्या तो ई-कॉमर्स आणि थेट विक्री विभागाचे काम पाहतो.
कालपर्यंत गुरांचा चारा म्हणून संबोधले जाणारे भरडधान्य हे पौष्टीक असते हे तिने ओळखले. लोकांच्या मनावर बिंबवले. पुन्हा लोकांना भरडधान्याच्या शेतीकडे वळवले. आपण स्थापन केलेल्या कंपनीने कोटीची उड्डाणे घेतली. हा विशालाचा प्रवास भन्नाट आहे, नव्हे हा तर अन्न प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील लेडी बॉसचा प्रवास आहे.

प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

The Lady Boss :  भाकरीला ग्लोबल करणाऱ्या  : लक्ष्मी बिराजदारवीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या लक्ष्मी ब...
16/09/2024

The Lady Boss : भाकरीला ग्लोबल करणाऱ्या : लक्ष्मी बिराजदार
वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या लक्ष्मी बिराजदारांनी भाकरीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या अनोख्या व्यवसायाने लक्ष्मीताईंनी फक्त भाकरीलाच नाही महाराष्ट्रातलं तृणधान्य ज्वारीलाही जागतिक मान्यता मिळवून दिली.

दुपार किंवा रात्रीचं जेवण भाकरीशिवाय परिपूर्ण नसतं. भाकरी जरी करायला सोपी वाटत असली तरी प्रत्येकालाच जमतेच असं नाही. सोलापूरच्या ३२ वर्षांच्या लक्ष्मी बिराजदार स्वतः उत्तम भाकऱ्या थापतात. आपल्या सारख्या उत्तम् भाकरी तयार करणाऱ्या २५ महिलांना एकत्र करून त्यांनी संतोषी माता गृहउद्योगाची २०१२ मध्ये स्थापना केली. या गृहउद्योगांतर्गत त्या दिवसाला ३०,००० कडक भाकऱ्यांची विक्री करतात.

भाकारीसारख्या तयार खाद्यपदार्थाच्या चवीची लोकप्रियता अधिकाधिक खवैय्यांच्या जिभेपर्यंत पोहोचवल्याबद्दल लक्ष्मीताईंना विविध पुरस्कारांनी गैरविण्यात आलं आहे. २०२४ मध्ये ८ मार्च या जागतिक महिलादिनी लक्ष्मीताईंना कर्तृत्त्वान असमान्य महिला या पुरस्काराने सन्मानित केलं.

भाकरीचा व्यवसाय ग्लोबल करणाऱ्या लक्ष्मी बिराजदार या सन्मानाविषयी चित्रलेखाला सांगतात, 'माझ्यासारख्या अतिसामान्य महिलेचं आयुष्य पुरस्कारांमुळे असामान्य होऊन जातं. कारण माझं कुठेच काही होणार नाही, असा विश्वास माझ्या सासर आणि माहेरच्यांना होता. तो मी खोटा ठरवला. त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राची भाकरी ग्लोबल झाली तसंच ज्वारी हे पीक आणि त्या पिकाची पौष्टिकता भारताबाहेर पोहोचलीय, यावरही समाधान वाटतं.'

आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी लक्ष्मीताई सांगतात, ‘मी पुण्याच्या दौंड तालुक्यातली. आमच्या लिंगायत समाजाच्या जुन्या प्रथेप्रमाणे घरच्यांनी माझं लग्न कर्नाटकचे सुरेश बिराजदारांशी ठरवलं. इयत्ता नववीची परीक्षा झाली. माझं लग्न लावून दिलं. लग्न करून सोलापुरात आले. शिकण्याची इच्छा होती. पण सासरच्यांबरोबर शेतीत काम करावं लागे. एक दिवस नवऱ्यासमोर शिकण्याची इच्छा बोलून दाखवली. नेमकं त्यावेळेस त्यांना पुण्यात गवंडीकाम मिळालं. त्यानिमित्ताने माझं पुण्यात माझ्या माहेरी राहण्याचं निमित्त झालं. मात्र सासरवाडीला राहतोय हे नवऱ्याला पटत नव्हतं. शेजारच्या आजूबाजूच्या लोकांकडून मी माहेरी राहतोय म्हणून टोमणे बसायचे. साधारण वर्षभरानंतर आम्ही सोलापुरातल्या शेळगी तालुक्यातल्या शिवगंधानगरमध्ये भाड्याने जागा घेतली. तिथे नवऱ्याला गवंडीकाम मिळालं. घरची कामं आटपल्यावर उरलेल्या वेळात करायचं काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात गुंतलेली असताना शिकवण्या घेण्याची कल्पना सुचली. इयत्ता नववी शिकलेल्या मुलीला शिकवण्या घ्यायला जमेल का, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

लक्ष्मीबाई सांगतात, 'मी शिकवण्या घेते, हे सोलापुरातल्या माझ्या ओळखपाळखीच्या लोकांना सांगायचे तेव्हा त्याचा पुढचा प्रश्न असायचा, तुमचं शिक्षण किती झालंय? नववी पास हे कळल्यावर सुरुवातीला काही पालक आपल्या पाल्याला माझ्याकडे शिकवणीकरीता पाठवण्यासाठी चटकन तयार व्हायचे नाही. खूप प्रयत्नांती काही पालकांनी माझ्याकडे शिक्षणासाठी आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली. त्यांची अभ्यासातील प्रगती पाहून माझ्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली. पण माझ्या मात्र कामात तोचतोचपणा, एकसुरीपणा येऊ लागला. त्यामुळे कालांतराने मलाही शिकवण्या घेण्याचा कंटाळा येऊ लागला."

रीक्षा चालवून मिळणाऱ्या पैशांमधून लक्ष्मीबाई आणि सुरेश बिराजदार यांच्या कुटुंबाचा उदर्निवाह भागणं कठीण जात होतं. लक्ष्मीबाई सांगतात, 'त्यावेळी पुन्हा एकदा घरबसल्या काम करण्याची गरज निर्माण झाली. असंच एकदा चक्कीवर भाकरीसाठी ज्वारी दळायला गेले असताना सोलापुरातल्या एका दुकानात पुरणपोळ्या पाहिल्या. त्या पाहून पॅकबंद तयार भाकरीचा व्यवसाय करण्याविषयी सुचलं. आम्ही कर्नाटकातल्या लिंगायत वाणी समाजातले. आमच्याकडे कडक भाकऱ्या खाल्ल्या जातात. या कडक भाकऱ्या महाराष्ट्र आणि भारतात लोकप्रिय करण्याचं ठरवलं. पाच-पाच कडक भाकऱ्यांची दाहा पाकिटं तयार केली.
सोलापुरताल्या पेठे ब्रदर्स आणि खैरमोडेंच्या दुकानात ठेवली. सुरुवातीला त्या दोन्ही दुकान मालकांनी माझ्या कडक भाकऱ्या ठेवण्यासाठी स्पष्ट नकार दिला. शिळी भाकरी माणूस सोडा पण गाई-गुरांना खायला दिली जात नाही. मग आठ-आठ पंधरा दिवस जुन्या असणाऱ्या कडक भाकन्या लोक खाणार का, हा प्रश्न दुकानदारांना पडणं स्वाभाविक होता. त्यामुळे मला दोन्ही दुकानद्वारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, बाई ही पाकीट खपली तरच तुमचा माल ठेवू' मात्र मी बनवलेला कडक भाकऱ्यांचा माल दोन्ही दुकानांतून दोन दिवसांत संपला आणि कडक भाकरीवाली लक्ष्मी ही ओळख मला सोलापुरात मिळू लागली. '

सुरुवातीला दोन महिलांना हाताशी धरून कडक भाकरीच्या उद्योगाला लक्ष्मी बिराजदार यांनी भाकरी बनवण्याच्या उद्योगाला सुरुवात केली. लक्ष्मी सांगतात, 'उद्योग सुरू करायचा म्हणजे हाताशी भांडवल हवं. तेव्हा माझी आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की तेही नव्हती. तेव्हा सोलापुरताल्या एका बचतगटाच्या मदतीने संतोषीमाता गृहउद्योग या संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत २०१२मध्ये सोलापुरी ज्वारीच्या कडक भाकरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो, त्या घरीच कडक भाकरी उद्योगाची सुरुवात झाली. आम्ही तिघी महिन्याला १०० भाकऱ्या तयार करू लागलो. आता दिवसाला ३० हजार कडक भाकऱ्या तयार केल्या जातात. या भाकऱ्या तयार करण्यासाठी माझ्याकडे २५ जणी काम करतात. सोलापूर जिल्ह्यात आमची कडक भाकरी प्रत्येकी ४ रुपये दराने तर सोलापूर बाहेर प्रत्येकी ५ रुपये दराने विकली जाते. आमच्या भाकऱ्या पापडापेक्षाही पातळ असतात. ज्वारीच्या पिठापासून मी केक, बिस्किटं, रवा, शेवया, पापड बनवण्याचं प्रशिक्षण सोलापूर कृषी विज्ञान केंद्रातून घेतलेलं आहे. कडक भाकऱ्यांबरोबरीने संतोषी माता गृहउद्योगांतर्गत आता आम्ही हेही पदार्थ तयार करून त्यांची विक्री करतो. कडक भाकऱ्यांप्रमाणे जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे लग्नकार्यासाठी कमीत कमी ३०० मऊ भाकऱ्याही तयार करून देतो. ज्वारीपासून असे विविध उत्पादनं तयार करण्यासाठी आम्हाला दिवसाला २०० किलो ज्वारी लागते. महिन्याला कमीत कमीत २०० क्विंटल ज्वारी लागते. ही ज्वारी आम्ही थेट शेतकऱ्यांकडून किंवा घाऊक विक्रेत्यांकडून विकत घेतो.

ज्वारीपासून भाकरी बनवायला सुरुवात केल्यावर लक्ष्मी मॅडम यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. लक्ष्मीलाई सांगतात, 'ज्वारीपासून भाकरी बनवायला सुरुवात केल्यावर मध्यंतरीच्या काळात ज्वारी ही शरीरासाठी पोषक नसल्याच्या अफवा उठवल्या गेल्या. त्यावेळेस मला मालाची विक्री करणं कठीण गेलं. पण सोलापूर कृषी विज्ञान केंद्रात ज्वारी या पिकावर केलेलं संशोधन मांझ्यासाठी फायदेशीर ठरलं. कृषी विज्ञान केंद्रानं केलेल्या संशोधनानुसार ज्वारी शरीरासाठी उत्तम असल्याचं समोर आलं. तसंच ज्वारीमध्ये फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. परिणामी ज्वारी डायबेटिक लोकांसाठी फायदेशीर असल्याचं सिद्ध केलं. त्याचबरोबरीने ज्वारीपासून चकली, इडली, पोहे, न्यूडल्स हेही पदार्थ तयार करता येत असल्याचं प्रयोगांती सिद्ध केलं. कृषी विज्ञान केंद्राचे हे संशोधन माझ्या भाकरी उद्योगासाठी फायदेशीर ठरलं. लक्ष्मीबाईंच्या कडक भाकऱ्या अमेरिकेतही गेल्यायत.'

भाकरीच्या उद्योगाने लक्ष्मी बिराजदारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं. त्या सांगतात, 'सोलापुरात ज्या धरी भाड्याने राहत होते तेच घर विकत घेऊन तिथे तीन मजल्यांचा बंगला बांधला. नवऱ्याला स्कूल व्हॅन घेऊन दिली. माझ्यासोबत काम करणाऱ्या स्त्रियाही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. सोलापूरच्या बँक ऑफ इंडियाने ५ लाखांच्या मुद्रा लोन दिल्यामुळे व्यवसाय विस्तार करणसाठी मदत झाली. माझ्या कोडाच्या आजावर उपचार करून पूर्णपणे बरी झाले.

लक्ष्मीताईंना त्यांच्या व्यवसायात मुलगा मुलगी आणि पतीचीही मदत होते. त्या सांगतात, 'सकाळ आणि संध्याकाळची काही ठरावीक तासांची शाळेतून मुलांना नेण्या-आणण्याचं काम झाल्यावर मधल्या वेळात पती सुरेश बिराजदार कडक भाकरीच्या मार्केटिंगचं काम करतात. मुलगा निखिल आणि मुलगी निकिताची माल पॅकिंगच्या कामात मदत होते. यांच्याशिवाय माझा व्यवसाय अपूर्णच आहे."

ज्वारी ही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील काही काळात त्याची जागा उसाने घेतल्याने ज्वारी मागे पडत चालली आहे. पण पुन्हा ही ज्वारी ग्लॅमरस केलीय ती लक्ष्मी बिराजदार यांनी त्यांच्या भाकरी उद्योगामुळे. ध्येय आणि इच्छा शक्ती असेल तर अतिसमान्य माणूस असमान्य भरीरी मारू शकतो याचं जणू लक्ष्मी बिराजदार चालतं-बोलतं उदाहरण ठरल्या आहेत. त्यामुळेच तर त्या लेडी बॉस ठरल्या आहेत.

प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
PrahaarNews Live

The Lady Boss : खेळण्यांच्या व्यवसायातून लहान मुलांचे बालपण जपणारी उद्योजिका - नीना पानगावकर खेळण्यांविषयी लहान मुलांना ...
05/09/2024

The Lady Boss : खेळण्यांच्या व्यवसायातून लहान मुलांचे बालपण जपणारी उद्योजिका - नीना पानगावकर

खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. अलिकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजीटल खेळण्यांनी घेतलेली दिसते. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती. जी काळाच्या ओघात लोप पावते की काय अशी भिती वाटते. मात्र लव्हली टॉयजने मुलांमधलं हे बालपण जपलं. ती निरागसता जपली आहे. आणि ते सुद्धा तब्बल तीन दशके. कारण निव्वळ व्यावसायिक नफ्यासाठी खेळणी बनविणे हा या कंपनीचा उद्देश नाही तर मुलांनी त्यांच्या निरागस बालपणाला जपावं हाच उदात्त हेतु या मागे आहे. हे तत्व जपणाऱ्या आणि या तत्वालाच आपल्या कंपनीची संस्कृती म्हणून आकार देणाऱ्या या लव्हली टॉयजच्या संचालिका आहेत नीना पानगावकर.

कांतीलाल आणि कमल या गांधी दाम्पत्याच्या पोटी नीना गांधींचा जन्म झाला. बाबा बजाज कंपनीत कार्यरत होते. १ भाऊ आणि ३ बहिणी असा भावंडांचं छान जग होतं. पुढे भाऊ शल्यविशारद झाला तर नीनाने पुण्याच्या मॉडेल कॉलेजमधून स्टॅटिस्टिक्स या विषयातून एमएस्सी पूर्ण केलं. १९८६ च्या दरम्यान तिचं प्रफुल्ल पानगावकर या सालस आणि उच्चशिक्षित तरुणाशी विवाह झाला. नीना गांधीची नीना पानगावकर झाली. दरम्यान नीनाने गोंडस बाळाला जन्म दिला. गौतम त्याचं नाव. एक परिपूर्ण आयुष्य झालं. मात्र दीर्घोद्योगी नीनाला काहीतरी स्वत:चं करायचं होतं. त्यातून वरळीला तिने सॉफ्ट टॉयज बनविण्याच्या क्लास मध्ये प्रवेश घेतला. जात्याच हुशार असल्याने तिने ती कला लगेच आत्मसात केली. ती छान- छान सॉफ्ट टॉयज बनवू लागली. याचवेळी तिची ओळख डॉ. अरुणा कलगुटकर यांच्याशी झाली. सॉफ्ट टॉयजला व्यावसायिक स्वरुप कसं द्यावं याचे धडे त्यांनी नीनाला दिले. दरम्यान एका प्रदर्शनात तिने भाग घेतला. तिथे तिने तयार केलेल्या सॉफ्ट टॉयजना नावाजलं गेलं. काही खेळणी विकली गेली. तिचा उत्साह दुणावला.

सासरच्या मंडळींचा भरघोस पाठिंबा असल्यामुळे नीनाताई जोमाने काम करीत होत्या. सासऱ्यांची गिरगावला एक जागा होती. या जागेत ती सॉफ्ट टॉयज तयार करु लागली. उत्पादन तयार करण्याचा अनुभव मिळाला मात्र ही उत्पादने पोहोचविण्यासाठी मार्केटिंग, सेल्स या गोष्टींचं ज्ञान आवश्यक होतं. याकरिता त्यांनी त्यापद्धतीचे ज्ञान देणारे काही कोर्सेस केले. टॉयज असोशिएशनचे सदस्यत्व घेतले. एक्सपोर्टचे ट्रेनिंग घेतले. त्यांना चांगले डिस्ट्रिब्युटर्स मिळाले. लव्हली टॉयजचे सॉफ्ट टॉयज आता मॉल मध्ये उपलब्ध होऊ लागले. कामाचा पसारा वाढल्याने त्यांनी माहीमला आपला खेळण्यांचा कारखाना हलवला.

अवघ्या १० हजारांमध्ये सुरु झालेला हा व्यवसाय अनेक महिलांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देत आहे. नीनाताईंचे पती प्रफुल्ल पानगावकर हे देखील निवृत्तीनंतर पूर्ण वेळ लव्हली टॉयजमध्ये कार्यरत आहे. त्यांच्यामुळे नीनाताईंचा उत्साह दुणावला आहे. लव्हली टॉयजची खेळणी आकर्षक आणि सुबक असतात. पाहताक्षणी ही खेळणी हातात घेण्याचा मोह आवरत नाही. या खेळण्यांचे डिझाईन्स नीनाताई आणि त्यांचे सहकारी तयार करतात. ही खेळणी मेक इन इंडिया असल्याचा अभिमान असल्याचे पानगावकर दाम्पत्य म्हणतात. सध्या त्यांनी शैक्षणिक खेळणी तयार करण्यावर जास्त भर दिला आहे. मुलांना खेळण्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि सोबतच त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळावं हा या दाम्पत्यांचा उद्देश आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत म्हणजे अगदी १५० रुपयांपासून ही खेळणी उपलब्ध आहेत. लव्हली टॉयजची ही खेळणी मुंबई, महाराष्ट्रासह गोवा, बंगळुरु, हैद्राबाद येथे देखील उपलब्ध आहेत.
मुलांनी मोबाईल, व्हिडिओ गेम्स सारख्या खेळांकडे न वळता निरागसता जपणारे खेळ खेळावेत हा आमचा हेतु आहे. वयाच्या या टप्प्यावर व्यावसायिक नफा न कमाविता खेळण्याद्वारे मुलांचं बालपण सकस व्हावं हा आमचा उद्देश आहे, असं नीना पानगावकर सांगतात. सातत्य, चिकाटी, अभ्यासू वृत्ती या गुणांमुळेच गेली तीस वर्षे नीनाताई या व्यवसायात टिकून आहेत. व्यवसाय करण्यामागे जर उदात्त हेतु असेल, त्यासोबत नैतिक अधिष्ठान असेल तर तो व्यवसाय भरभक्कमपणे आपली मुळं घट्ट रोवून उभा राहतो. लेडी बॉस साठी लव्हली टॉयजच्या बालपण जपणारी उद्योजिका - नीना पानगावकर या उत्तम उदाहरण आहे.

प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

ही सुवर्ण संधी सोडू नका...यंदा बाप्पाला द्या स्वतः बनवलेले मोदक मोदक कार्यशाळेचे स्थळ, वेळ दिनांक :  शनिवार , २४ ऑगस्ट २...
14/08/2024

ही सुवर्ण संधी सोडू नका...यंदा बाप्पाला द्या स्वतः बनवलेले मोदक
मोदक कार्यशाळेचे स्थळ, वेळ
दिनांक : शनिवार , २४ ऑगस्ट २०२४
वेळ : सकाळी १० ते २ वाजे पर्यंत
स्थळ : परफॉर्मिंग आर्ट स्टुडिओ, दुसरा मजला, उमेच्छा बिल्डिंग, विष्णू नगर, ठाणे पश्चिम

बुकिंगसाठी संपर्क -
८१०८१०५२२९
७०२१८५८६१०

पारंपरिक उकडीच्या मोदकांबरोबरीने स्टफ माव्याचे मोदक, खजूर मोदक, माव्याचे मोदक, काजू मोदक आणि तळणीचे मोदक बनवायला...

The Lady Boss : देव घडवू पाहणारी वारसदार -मूर्तिकार रेश्मा खातूश्रावण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. पिढ्य...
12/08/2024

The Lady Boss : देव घडवू पाहणारी वारसदार -मूर्तिकार रेश्मा खातू
श्रावण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. पिढ्यान् पिढ्या मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांची तरुण पिढी गणेश चित्रशाळांमधून गणरायाची विविध रूपे साकारण्यात मग्न आहेत. त्यात महिला कलाकारांची संख्या दिवसगणिक वाढत आहे. काही जणी आवड म्हणून तर काही जणी कलेचा टच राहावा म्हणून तर काही जणी पोटाला काम म्हणून गणपती बनविण्याचे काम करीत आहेत. यातील काही जणी अशा आहेत की ज्या चित्रशाळेचा वारस जपावा म्हणून या फिल्डमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरल्या आहेत. त्यापैकीच एक आहे मूर्तिकार रेश्मा विजय खातू.

२६ जुलै २०१७ मध्ये मूर्तिकार विजय खातू यांचे निधन झाल्यावर त्यांचा वारसा चालवणार कोण हा प्रश्न कलावंत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, नामवंत गणेशचित्र शाळांना पडला होता. विजय खातूंना शेवटचा निरोप देण्यासाठी जो जनसमुदाय लोटला होता, तो पाहताना रेश्मा भारावून गेली. आजपर्यंत रेश्माने वडिलांच्यावर लिहून आलेले लेख वाचले होते. काही कामानिमित्ताने तिचे बाबांच्या चित्रशाळेत जाणेही होई; एक मूर्तिकार म्हणून विजय खातूंवर लोकांचे असलेले प्रेम रेशमाने त्या दिवशी पहिल्यांदा पहिले. त्याच दिवशी तिने ठरवले की बाबांची चित्रशाळा चालवायची. चित्रशाळेच्या माध्यमातून विजय खातूंच्या गणेश मूर्तीकलेचा वारसा जपायचा.

रेश्मा सांगते, "गणपतीच्या मूर्ती घडवणे या क्षेत्राशी माझा तसा काहीच संबंध नाही. माझे क्षेत्र ऍडव्हर्टायझिंगचे आहे. मुंबईतील दादर पूर्वेकडील राजा शिवाजी विद्यालय मुलींच्या शाळेतून मराठी माध्यमातून शिकले. अभ्यासाबरोबरीने चित्रकलेतही मला रस होता. पोदार कॉलेजमधून इयत्ता बारावी झाल्यावर रचना संसदमधून टेक्सटाईल डिझायनिंग, ऍडव्हर्टायझिंग, फ्लीममेकिंग असे निरनिराळे कोर्स केले. अर्थातच बाबांच्या प्रोत्साहनामुळे ते करता आले. कारण बाबा सतत सांगायचे की, माणसाने कुठलीना कुठली कला जोपासली पाहिजे. फ्रीलान्स कोर्स करीत असताना मुंबई विद्यापीठातून बीकॉमचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
फ्लीममेकिंगचा कोर्स करीत असताना मला सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचे मार्गदर्शन लाभले. शेखर सरतांडेल सरांमुळे दिग्दर्शनात यावंसं वाटू लागलं. शेखर सरांमुळे 'एक अलबेला' या मराठी सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. हा तोच सिनेमा जो बॉलिवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांचा जीवनपट. सिनेमात भगवानदादांच्या भूमिकेत अभिनेता मंगेश देसाई आणि गीता बालींच्या भूमिकेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचे दर्शन घडले. शेखर सर आणि त्यांच्या टीम सोबत सोनी टीव्हीसाठी मराठी मालिकासुद्धा केल्या. ऍडव्हर्टायझिंगमध्ये पीप होल या प्रॉडक्टशन हाऊससाठी ऍडफिल्मसाठी मॉडेल मेकिंगचं काम केलं. मी करीत असलेले काम आणि बाप्पांच्या मूर्ती यांची तसं पाहायाला गेलं तर काहीच संबंध नाही; पण बाबांच्या निधनानंतर त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम पाहता 'शरद आर्ट'चा सुरू राहिले पाहिजे. त्यामुळे २७ जुलै २०१७ पासून बाबांच्या चित्रशाळेत जायला सुरुवात केली."

विजय खातूंची चित्रशाळा चालवणे हे रेश्मासाठी एक प्रकारचे आव्हानच होते. रेश्मा सांगते, "बाबा गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शरद आर्टमध्ये जायला सुरुवात केली. बाबांच्या निधनाच्या बातमीने कित्येक मूर्तिकार, मंडळं हळहळली. काही गणेशोत्सव मंडळांनी मला असाही सांगितले की, जशा मूर्ती तयार असतील तशा द्या. आम्ही प्रभावळवगैरे बाकीचे डोकेरेशन बाहेरून करून घेतो. पण मी नाही म्हंटलं. कारण मूर्तिकार विजय खातूंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. बाबांनी बिल बुकवर जशा मूर्तींच्या ऑर्डर्स लिहून घेतल्या होत्या अगदी तशाच पूर्ण करून दिल्या. कुठेच डावं-उजवं झालं नाही. याचं क्रेडिट बाबांची शरद आर्टची टीम, त्यांच्याकडे शिकायला आलेल्या प्रत्येकावर त्यांनी केलेले संस्कारयांना जात. २०१७ मध्ये आम्ही देवीसुद्धा पूर्ण करून दिल्या. २०१८ आणि २०१९ सुद्धा चांगलं गेलं. भाद्रपद गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, माघी गणेशोत्सव मध्ये ऑर्डर्सप्रमाणे मूर्ती दिल्या. २०२० मध्ये कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जगाने अनुभवलेल्या मंदीच्या लाटेची झळ गणेशचित्रशाळांनाही बसली. २०२२ मध्ये विजय खातूंच्या शरद आर्टचे काही मूर्तिकार सोडून गेले. आमच्या प्रतिस्पर्धी चित्रशाळांनी जास्त मोबदला देऊन त्यांना फोडले. मंडळं कमी झाली. आयत्या वेळेस मूर्तिकार आणायचे कुठून..माझ्यासमोर यक्षप्रश्नच होता. राजकारण कुठल्या क्षेत्रात नाहीये, असं म्हणत मी माझ्या मनाची समजूत घालून घेतली."

ज्याचे कुणी नसते त्याच्यासाठी आणि त्याच्या पाठी बाप्पा असतो. याची प्रचिती रेश्माला आली. रेश्मा सांगते, "२०२२ हे वर्ष माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरले. अचानक मूर्तिकार सोडून गेले. मूर्तीच्या ऑर्डर्स कमी झाल्या. त्यामुळे कारखाना मुंबईतील भायखळा परिसरातील बकरी अड्डात हलवला. शेवटी भाडं सुद्धा भरणं परवडलं पाहिजे. त्याच वेळेस बाबांच्या सोबत २५ वर्षं गणपती बनविणारे अनिल सोनी यांची मदत झाली. बाबांनी त्यांना मूर्तीचे कॉन्ट्रॅक्टटिंग कसे करायचे हे शिकवलं. अनिल सोनींनी त्यांचा भाऊ रणजीत सोनींना शिकवलं. सोनी बंधूंनी मला शिकवलं. मूर्तिकारांची नवी टीम उभी करून दिली. शरद आर्टचे रूपांतर विजय खातू आर्ट्स मध्ये केले. नव्या संचात खातू आर्टची सुरुवात करताना 'चिंचपोकळीचा चिंतामणी', 'ताडदेवचा राजा, भायखळा', 'उपनगरचा महाराजा, बोरिवली', वसईचा राजा या मंडळांनी विजय खातूंच्या चित्रशाळेत गणपती घडविण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी' आणि विजय खातूंच्या चित्रशाळेचे अनोखे बंध आहेत. रेश्मा सांगते, " चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाबा सर्वात जुने मूर्तिकार. बाबांच्या नंतरही 'चिंचपोकळीचा चिंतामणी'ने खातूंच्या चित्रशाळेतून घडणे सोडलेले नाही. या मंडळाकडून मला घरच्यासारखी ट्रेंटमेंट मिळते. मीसुद्धा तितक्याच आत्मीयतेने चिंतामणी घडविते. मला वाटते की, मी माझ्या बाबांच्या कलेला घडवीत आहे. गेल्यावर्षी रामावतारातील चिंतामणीची मूर्ती घडविली. या मूर्तीची विशेष चर्चा झाली. यंदा तर कित्येक चित्रशाळेत रामावतारातील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या छोट्या छोट्या प्रतिकृती घडविल्या जात आहेत. हे माझे नाहीतर बाबांच्या साधनेचे आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे यश आहे."

विजय खातूंच्या नंतर गेल्या सात वर्षांच्या काळात रेश्मा स्वतंत्रपणे गणेश चित्रशाळा सांभाळणारी महिला व्यवस्थापक म्हणून नावारूपास येत आहे. रेश्मा सांगते, "सोनी बंधू आमच्याकडे गणेशमूर्तींचे कॉन्ट्रॅक्टटिंग करतात. त्यांच्या कॉन्ट्रॅक्टटिंग मधून मलाही शिकता येते. जसे की रंग, माती कशी निवडायची, खातूंचा फेमस बॉडी कलर कसा तयार करायाचा, साच्यातून तयार केलेल्या मूर्ती कशा जोडायच्या, आकर्षक प्रभावळी कशा जोडायच्या, मूर्तींची आखणी वगैरे बरंच काही शिकता आले. सध्या माझ्याकडे २३ कलाकार काम करीत आहेत. त्यांच्याबरोबर मी सुद्धा मूर्ती घडवते. यंदा १० मूर्ती घडविण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. २ वर्षांपूवी तयार केलेल्या नव्या संचासोबत करीत आहे. खातू आर्ट्सचे जुने कलाकार पुन्हा येऊ पाहत आहेत. मूर्तीचे कॉन्ट्रॅक्ट वाढल्यावर त्यांना नक्की चित्रशाळेत स्थान मिळणार."

चित्रशाळेच्या व्यवस्थापनाची धुरा वाहण्यात व्यग्र असल्यामुळे रेशमाचे ऍडव्हर्टायझिंग, फिल्ममेकिंगचे काम मागे पडत आहे. रेश्मा सांगते, "चित्रशाळेचा व्यवसाय हा हंगामी नाही तर वर्षभराचा आहे. मंडळांमधून गणपती विराजमान होण्याच्या शेवटच्या दिवसांत नवरात्रौत्सवासाठी देवीच्या मूर्ती घडविण्याची सुरुवात होते. मग माघी गणेशोत्सवाच्या कामाला सुरुवात करतो. त्यानंतर पुन्हा भाद्रपद गणेशोत्सवाच्या मूर्तीच्या कामास सुरुवात होते. खातू आर्ट्सचे अर्थकारण माझा भाऊ रोहित खातू सांभाळतो. मुलगा धनराज जव्हेरीला आई विनया खातू सांभाळते. नवरा यशेष जव्हेरी आणि सासरच्यांचा पाठबळामुळे खातू चित्रशाळेचे काम पूर्णपणे सांभाळणे शक्य होते. एकदा का चित्रशाळेची घडी नीट बसली की पुन्हा वेळात वेळ काढून ऍडव्हर्टायझिंग, फिल्ममेकिंगच्या कामाला सुरुवात करायाची आहे."

असं म्हणतात की, देव माणसाला निर्माण करतो. पण गणेशोत्सव, नवरात्रौत्सवामुळे माणूस देवाला घडवण्याच्या परंपरेचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. या परंपरेत मूर्तिकार विजय खातू यांचे नाव अतिशय आदराने घेतलं जातंय. विजय खातूंचा देव घडविण्याचा वारसा रेश्मा अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आहे. तिच्या डायरेक्टशन खाली खातू आर्टस् मध्ये साकारलेल्या गणेशमूर्तीच्या प्रतिकृती इतर चित्रशाळेत साकारल्या जाणे हे एकप्रकारे मूर्तिकार विजय खातू यांचा या क्षेत्रातला दबदबा आणि रेश्मा खातूंची या क्षेत्रात स्थिरावण्याची धडपड ठळकपणे अधोरेखित करतो. याच कारणामुळे ती खऱ्या अर्थाने लेडी बॉस ठरली आहे.

प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

The Lady Boss : मारिया कुरियाकोसनारळाच्या करवंटीतून कोटी रुपये कमावणारी केरळची मारिया आपल्या कोकणात नारळाच्या झाडाला कल्...
27/06/2024

The Lady Boss : मारिया कुरियाकोस
नारळाच्या करवंटीतून कोटी रुपये कमावणारी केरळची मारिया

आपल्या कोकणात नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात कारण नारळाच्या शेंड्यापासून ते मुळ्यापर्यंत या झाडाच्या प्रत्येक भागाचा सदुपयोग होतो. या सदुपयोगाचा खरा लाभ तिने घेतला. मुंबईतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने व्यवसाय निवडला, तो वाढवला. आज नारळाचा हा व्यवसाय काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे थेंगा कंपनीच्या मारिया कुरियाकोसेची.

केरळ मधील पलक्कड येथे मारिया कुरियाकोसेचा जन्म झाला. केरळमध्ये जन्मलेली आणि वाढलेली मारिया शालेय शिक्षणानंतर मुंबईत आली आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. तिने शिष्यवृत्तीवर स्पेनमधील आईसीएडीई स्कूल ऑफ बिझनेस अँड इकॉनॉमिक्समधून एमबीए केले. त्यानंतर ती मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करु लागली. 2018 मध्ये एओन येथील तिच्या कॉर्पोरेट नोकरीला तिने अलविदा केले आणि मुंबईतील मैना महिला फाऊंडेशनमध्ये सामील झाली. ही संस्था महिलांच्या समस्या आणि मासिक पाळी संदर्भात कार्य करते. मुंबईतील एऑन कन्सल्टिंगमध्ये विश्लेषक म्हणून चांगली नोकरी असूनही, मारियाला केरळमध्ये स्वतःचे काम करण्याची नेहमीच उत्सुकता असायची. शालेय दिवसांपासून नेहमीच उद्योजक होण्याचे स्वप्न ती पाहत असे. सामाजिक उद्योजकता समजून घेणे हा तिच्या कामाचा एक भाग होता. सामाजिक संस्थेतील तिच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात तिच्या स्वतःच्या व्यवसायाची ब्लू प्रिंट आकार घेऊ लागली.

मारिया नेहमी स्वयंपाकघरातील वापरासाठी टिकाऊ पर्याय शोधत असे. नैसर्गिक उत्पादनांनी तिला नेहमीच भुरळ घातली. सुरुवातीला ऑइल मिल्समधून वारंवार टाकून दिलेले नारळाचे पाणी वापरण्याचा विचार केला. पण प्रक्रिया उपकरणासाठी 2 कोटींची गुंतवणूक करण्यास ती असमर्थ होती. स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवत तिने फ्लॉवर पॉट्स तयार करण्यासाठी नारळाच्या फायबरचा प्रयोग केला आणि मुंबईच्या नर्सरीमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. तथापि, तिला लवकरच कळले की नर्सरी पोल्लाची, तामिळनाडू येथून स्वस्त दरात यासारखे उत्पादने मिळवत आहेत. नारळाच्या शेंड्यापासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन या व्यवसायात उतरण्याचे तिने निश्चित केले.

फेब्रुवारी 2020 मध्ये मारियाने थेंगा कंपनी सुरु केली. एक महिला कर्मचारी आणि नारळाच्या करवंटीपासून बनवलेले सलाड बाऊल हे एक उत्पादन यांच्यासह तिने सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, मारियाने तिच्या घरात नारळाच्या करवंटांची भांडी बनवण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मारियाला तिची आई, जॉली कुरियाकोस यांनी करवंट्या गोळा करण्यात मदत केली. आणि तिचे वडील वरू कुरियाकोसे जे टेक महिंद्राचे माजी अभियंता होते त्यांनी पाठिंबा दिला.

मारियाने पहिले 150 किचन बाऊल, सॅलड बाऊलसारखे बनवले आणि ते प्रत्येकी 60 रुपयांना स्थानिक जत्रेत आणि मित्रांना विकले. त्यातून 9,000 रुपये उत्पन्न मिळाले. तिने हे पैसे परत तिच्या व्यवसायात लावले, ड्रिलिंग मशीन 1,500रु.ला विकत घेतली. वडिलांच्या मदतीने सँडिंग मशीनमध्ये बदल केले.

एकूणच, स्टार्ट अप करण्यासाठी मारियाने रु. ४,००० पेक्षा जास्त खर्च केला नाही. प्रति वर्ष ८ लाख रुपयांची नोकरी सोडणाऱ्या मारियावर सगळेच टीका करायचे. अनेकांनी मारियाला नोकरी सोडण्याऐवजी एक छंद म्हणून व्यवसाय हाताळण्यास सांगितले, परंतु मारियाच्या पालकांनी तिच्या निर्णयाला खूप पाठिंबा दिला. चहाचे कप, साबण डिशेस, लाडू, मसाला होल्डर आणि चमचे यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत. वाटी, मेणबत्ती होल्डर, बेस्पोक शॉट ग्लासेस, तसेच घर आणि दिया सेट आणि प्लांट हँगर्स सारख्या बागेचे सामान अशी अनेक उत्पादने मारिया तयार करायची.

ही उत्पादने बनवणे सोपे वाटू शकते कारण शेवटी त्या "नारळाच्या करवंट्या " आहेत. मात्र मारियासाठी हा प्रवास खडतर होता. जेव्हा थेंगाला 300 मिली कपसाठी ऑर्डर मिळते, तेव्हा मागवलेल्या सर्व करवंट्या एकाच आकाराचे नसतात हे लक्षात घेऊन समान आकाराच्या करवंट्या मिळणे आवश्यक होते. कधी कधी नारळाच्या करवंटाच्या ट्रकमधून वापरता येण्याजोगे 100 करवंट्या मिळतात. मारिया हिने कारागीर जिथून आले त्या प्रदेशातील तेल गिरण्या ओळखण्याचे ठरवले. मारियाने या गिरण्यांशी संबंध जोडला आणि विविध आकारांच्या करवंट्या मिळवल्या.

नारळाच्या करवंट्याची ही उत्पादने बनवण्यासाठी कारागीर शोधत असताना, मारियाला बहुतेक ते लोक भेटले ज्यांनी ग्रामीण ग्राहकांसाठी अर्धवेळ ही उत्पादने बनवली कारण ते उपजीविकेसाठी बांधकाम साइट्सवर काम करायचे. त्यांच्यासोबत भागीदारी करून आणि त्यांना काम देऊन, मारिया आता या कारागिरांसाठी एक स्थिर उदरनिर्वाहाचा पर्याय देत आहे. हे कारागीर केरळमध्ये पलक्कड, त्रिशूर, अलापुझा, कोझिकोड आणि वायनाड सारख्या ठिकाणी राहतात.

अशाप्रकारे काम करताना लेबल लावण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंत पाठवण्यापर्यंतचे काम करण्यासाठी तिने एका महिलेला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 दरम्यान तिने तिचा व्यवसाय ऑनलाइन केला. ऑनलाइन मार्केटिंगमध्ये प्रवेश केला तेव्हाच थेंगा ब्रँडला ओळख मिळाली. कोरोना काळात मारियाच्या उत्पादनांना ओळख मिळण्यास मदत झाली. कंपनीच्या वेबसाइट आणि इंस्टाग्राम पेज व्यतिरिक्त, उत्पादने आता Amazon, Jio Mart आणि Flipkart सारख्या पारंपारिक ई-कॉमर्स साइटवर देखील उपलब्ध आहेत.

मारियाच्या थेंगामध्ये 20 कारागिर आहेत. तर 11 जणांची महिलांची ऑपरेशन्स टीम वेबसाइटपासून ग्राहक सेवा, विपणन, सोशल मीडिया आणि फायनान्सपर्यंत सर्वकाही व्यवस्थापित करतात. थेंगाने पहिल्या वर्षी 20 लाख, पुढील वर्षात 50 लाख आणि काही कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

ती आता पलक्कड येथे दागिन्यांचा व्यवसाय असलेले पती सचिन आणि तिच्या एक वर्षाच्या मुलासोबत राहते.

“माझ्या उत्पादनाचा प्रत्येक भाग इको-फ्रेंडली आहे. वाट्या पॉलिश करण्यासाठी मी पारंपारिक पेंट आणि वार्निशऐवजी खोबरेल तेल वापरले आहे. नारळाची करवंटी हे प्लॅस्टिक आणि मेटल कुकवेअरसाठी एक टिकाऊ पर्याय आहे कारण ते 100% बायोडिग्रेडेबल आहे." मारिया म्हणते.

तिचे बहुसंख्य ग्राहक केरळच्या बाहेरचे आहेत, विशेषत: बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबई सारख्या महानगरांतून आहेत जेथे पर्यावरणपूरक उत्पादनांबद्दल अधिक जागरूकता आहे. असे ती म्हणते.
मारिया तिची उत्पादने युरोप आणि अमेरिकेत निर्यात करते. वार्षिक कमाईच्या 60% निर्यातीचा समावेश होतो. तिच्या उत्पादनांची वाजवी किंमत आहे. चमचा, काटा आणि चाकूच्या कटलरी सेटसाठी 300 रु. पासून सुरू होते. समाजातील सर्व घटकांसाठी ते परवडणारे आहे. ती लवकरच खेळणी आणि ज्वेलरी क्षेत्रात उतरण्याची योजना आखत आहे. एप्रिलमध्ये कोवलम येथे झालेल्या G20 एम्पॉवरच्या बैठकीत मारियाच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली.

घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या एका वस्तुचा वापर करुन एक तरुणी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय अवघ्या चार वर्षांत उभारते हे विलक्षण आहे. हे सर्वार्थाने लेडी बॉसचंच लक्षण आहे.

प्रहार मंथन - 23 June 2024
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
#मारियाकुरियाकोस

Address

B-50, 2nd Floor, Mulaji House, Veer Savarkar Marg, Opp Gammon India, Prabhadevi
Mumbai
400025

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm

Telephone

+918108105232

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yukti Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yukti Media:

Share