05/03/2026
धन्यवाद...मुख्यमंत्री
मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, देवाभाऊ
आपण बंजारा समाजाला संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे, पण काही स्वयंघोषित नेते, सुपारीबाज समाजाच्या विरोधात बोलून स्वतःची भाकर भाजत आहेत.
आम्ही शांत असल्याचा फायदा घेत असतील तर त्यांना नक्कीच धडा शिकवणार.
बंजारा समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी मी केलेले सहा दिवसाचे जल व अन्नत्याग आमरण उपोषण व्यर्थ गेले नाही. याचा मला मनापासून आनंद आहे. मी खुप त्रास सहन केले, मरण यातना देखील भोगले. तसेच ९ दिवस रुग्णालयात भरती देखील होतो. माझ्या उपोषणादरम्यान मला तहसीलदार साहेबांमार्फत मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आदेशाने लिखित स्वरूपात पत्र देखील देण्यात आले होते. त्यामुळे माझे उपोषण मी ६ व्या दिवशी स्थगित केले होते. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी उपोषण व ५६ पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले होते. त्याअनुषंगाने राज्यशासनाने आज बंजारा प्रवर्गातील उप वर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहे.