Astro Trushna

Astro Trushna Astrologer
collaborater

(1)

06/06/2026

Buy Homesake Bird Cage With Floral Vine Metal Antique Hanging Hall Decorative Bird Cage 13.8In - - Home for Unisex from Homesake at Rs. 609

06/06/2026

पंचक
जून २०२६ मध्ये, पंचक शनिवार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ०७:०३ वाजता सुरू होते आणि गुरुवार, ११ जून २०२६ रोजी सकाळी ०८:१६ वाजतासंपते . शनिवारी सुरू होत असल्यामुळे, हा कालावधी विशेषतः 'मृत्यु पंचक' म्हणून ओळखला जातो , जो पारंपारिकपणे अत्यंत अशुभ मानला जातो.

panchak in june 2026 जून २०२६ मध्ये, पंचक शनिवार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ०७:०३ वाजता सुरू होते आणि गुरुवार, ११ जून २०२६ रोजी सकाळी ०८:१६ वाजतासंपते . शनिवारी सुरू होत असल्यामुळे, हा कालावधी विशेषतः 'मृत्यु पंचक' म्हणून ओळखला जातो , जो पारंपारिकपणे अत्यंत अशुभ मानला जातो.प्रमुख तपशील आणि प्रतिबंध (६ - ११ जून, २०२६):सुरुवात: शनिवार, ६ जून २०२६, सायंकाळी ०७:०३ वाजतासमाप्ती: गुरुवार, ११ जून, २०२६, सकाळी ०८:१६
प्रकार: मृत्यु पंचक (शनिवारची सुरुवात)टाळण्यासारख्या गोष्टी (काय करावे आणि काय करू नये):
बांधकाम: नवीन छप्पर बांधणे किंवा बांधकाम सुरू करणे टाळा.
लाकूडकाम: लाकूड, इंधन खरेदी करणे किंवा गोळा करणे, तसेच फर्निचर बनवणे टाळा.
प्रवास: दक्षिण दिशेने प्रवास करणे टाळा.प्रसंग: विवाह, साखरपुडा किंवा गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये टाळा.अंतिम संस्कार: या काळात मृत्यू झाल्यास, विशेष विधी करण्याची शिफारस केली जाते
नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी या पाच दिवसांत खालील पाच कृत्ये टाळण्याचा सल्ला दिला जातो.जर तुम्ही जून २०२६ मध्ये एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करत असाल, तर हे निर्बंध टाळण्यासाठी अधिक शुभ तारीख शोधण्यात मी तुम्हाला मदत करू शकेन. तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा!
Astro Trushna

゚viralfollowersシ゚

05/06/2026

आत्ता जो गोंधळ/chaeos सुरू आहे ना केदारनाथ मध्ये यात सर्वस्वी चूक तिथे जाणार्‍यांची आहे बाकी काही नाही....
मला कळत नाही की का जातात केदारनाथ/चारधाम ला लोक मंदिर उघडल्यावर पाहिल्या दोन तीन महिन्यात?

मान्य आहे की may, June मध्ये सुट्टी असते मुलांना n all... Tour कंपन्या activate होतात n कमीतकमी पॅकेज मध्ये घेऊन जायच्या तूफान मार्केटिंग करतात...

पण म्हणून लगेच चारधाम? Lolz.. काय फालतूगिरी आहे? 🙆🏻‍♂️😅

अरे समुद्रसपाटीपासून 12 हजार फुट उंचीवर वर आहे ते... त्यात तिथे weather अतिशय whimsical... आणि त्यात सोबत फॅमिली सहित? 🙆🏻‍♂️😅

काहीतरी सेन्स ठेवा.... देव घरी आहे तोच तिथे आहे...
पण तरीही तिथेच जायची खाज/इच्छा असेल तर किमान जाऊन आलेल्या लोकांना विचारवं की काय कष्ट आहेत Kedarnath चढणे... मग भले डोली करा, पिठ्ठू करा, घोडा करा किंवा मग चालत जा....
पण ही वेळ? अरे हाल हाल होऊन संपतात तिथे लोक.... यावेळी आलो पण परत पाय ठेवणार नाही अशी अवस्था होते....

आता केदारनाथ म्हणा किंवा पूर्ण चारधाम म्हणा मी म्हणतोय जाऊ नये बिलकुल... जीव वाचवून घरी थांबा निवांत....

बरं एवढे कष्ट करूनही शेवटी वरपर्यंत पोहोचलात तर आत मंदिरात जाऊन मनसोक्त दर्शन होतं पिंडीचं असं वाटतंय तुम्हाला?
पाठीवर, बोच्यावर फटके देऊन अर्ध्या क्षणात पुढे सरकवतात... (भले तुम्ही vip दर्शनाची साडेतीन हजाराची पावती फाडली असेल तरीही)

मी इतक्या वेळा सोलो जाऊन आलोय तिथे पण मला असे अनुभव आले नाहीत कारण मला पर्सनली गर्दीचा genuine प्रॉब्लेम आहे... मला तर ते जमत नाही/सहन होत नाही... त्यामुळे मी भारतात कुठेही travel करताना मला निवांतपणा कुठे, केव्हा, कसा मिळेल त्या हिशेबाने मी जातो. म्हणून मग माझे photos त्या त्या ठिकाणचे गर्दीविरहीत येतात.

त्यात आता काय झालंय की गोवा झालं, केरळ झालं, चारधाम झालं सोशल मीडिया, Instagram, आणि reels मुळे त्या त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचून शूट करणे आणि पोस्ट करणे यामुळे आधीच गलिच्छ झालेल्या ठिकाणांना अजून अजून गलिच्छ करायची स्पर्धा लागलेली आहे या देशात..

तर त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो की चारधाम कधी जायला पाहिजे n कसं जायला पाहिजे....

1. कपाट opening ceremony ला तर बिलकुल जायचं नाही.
2. कपाट opening झाल्यावर पाहिले 3 महिने सुद्धा बिलकुल जायचं नाही. तेवढ्या वेळेत जे जातात त्यांना तिथे किड्यामुंग्यांसारखं मरू द्यावं. फटके खाऊ द्यावेत.
3. कुठल्याही पॅकेज टूर अंतर्गत चारधाम टूर करू नये. जबाबदारी झटकून आहे त्या अवस्थेत हाल हाल करुन त्यांची itinerary "पूर्ण करून" आणतात.
4. तुम्ही जिथून कुठून असाल... डायरेक्ट ट्रेन ने ऋषिकेश ला पोहोचायचं. आणि तिथून गाडी करायची. एकदम स्वस्तात पडणार.
5. फक्त केदार करणार किंवा पूर्ण चारधाम करणार तर तिथून एकदम स्वस्तात पॅकेजेज् आहेत ज्यात travel, food, stay सगळं include. जागेवर मिळणार.
6. केदारनाथ साठी कधीही tent नाही बूक करायचे... प्रॉपर हॉटेल घ्यायचे तेही एकदम वर मंदिर कडे जवळ. नाहीतर हाल होतात टॉयलेट बाथरूम चे.
7. आणि या सगळया गोष्टी केव्हा करायच्या किंवा चारधाम ला केव्हा जायचं? तर भाऊबीजेला मंदिर बंद होतं त्याच्या दहा ते पंधरा दिवस आधी.... तर तुम्हाला मजा येणार.

नाहीतर मग अ‍ॅडमिट होऊ शकता तुम्ही अशी अवस्था आहे/होणार.... 🙆🏻‍♂️😅

टीप : गौरीकुंड ला stay घेतलात तर उत्तम.. मग पहाटे 5 ला चालायला सुरुवात करायची. घोडा तेव्हा स्वस्त असेल पण तिथल्या घोड्यांची अवस्था बघता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एकदम strong, धडधाकट असाल तर चारधाम चालत करा. कारण ही ट्रिप नव्हे. तर ही एक "यात्रा" आहे जी इतिहासात चालून पूर्ण करतात म्हणून ती यात्रा.

पण जीव सांभाळून. 😇

बाकी देव हा तुमच्या घरात, तुमच्या मनात, तुमच्या साधनेतच असतो हे kadhihi विसरू नका...💕

दुनिया जातेय म्हणजे आपण तिथे गेलो म्हणून आपल्याला देव मिळणार आहे असं काहीही नसतं.

- विनीत 💕


@
आत्ता जो गोंधळ/chaeos सुरू आहे ना केदारनाथ मध्ये यात सर्वस्वी चूक तिथे जाणार्‍यांची आहे बाकी काही नाही....
Cp

゚viralfollowersシ゚

01/06/2026

जपमाळेवर (१0८ मणी) नामजप करणे ही एकाग्रता वाढवण्याची आणि देवतेच्या आशीर्वादाची एक पवित्र पद्धत आहे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी स्वतःकडे ओढून जप करावा.

j*p malevar j*p kasa karava
जपमाळेवर (१0८ मणी) नामजप करणे ही एकाग्रता वाढवण्याची आणि देवतेच्या आशीर्वादाची एक पवित्र पद्धत आहे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी स्वतःकडे ओढून जप करावा.
जपमाळेचे महत्त्वाचे नियम (How to Use Japamala):माळ धरण्याची पद्धत: मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी ओढावेत.
तर्जनी (index finger) बोटाचा वापर करू नये.मेरुमणी (सुरुवातीचा मोठा मणी): जप करताना मेरुमणी ओलांडू नये. १०८ मणी पूर्ण झाल्यावर माळ उलटी करून (फिरवून) पुन्हा जप सुरू करावा.मण्यांचा आवाज: जप करताना माळेचे मणी एकमेकांवर आपटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मणी आपटल्यास जप व्यर्थ जाऊ शकतो.
माळ झाकणे: जप करताना माळ गोमुखात (पिशवीत) किंवा कपड्याने झाकून ठेवावी, ती उघडी ठेवू नये.
जप संख्या: एका माळेत १०८ मणी असतात, त्यामुळे एक माळ म्हणजे १०८ मंत्रांचा जप.
योग्य माळेची निवड (Types of Mala):तुळशीची माळ: विष्णू, राम, कृष्ण किंवा वैष्णव मंत्रांसाठी.रुद्राक्षाची माळ: शिव, गणपती किंवा दुर्गा मंत्रांसाठी.स्फटिकाची माळ: लक्ष्मी, सरस्वती किंवा देवीच्या उपासनेसाठी
महत्त्वाच्या टिप्स:जप सुरू करण्यापूर्वी माळेवर गंगाजल किंवा साधे पाणी शिंपडून ती शुद्ध करावी.जप करताना माळ हातातून खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
Astro Trushna



゚viralfollowersシ゚

31/05/2026

निशब्द..

आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती.
“अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते...? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आलोय... चूल, स्वयंपाक, झाडू-पोछा... एवढंच ना! आणि वरून तिचं हे दुखतं, ते दुखतं... नाटकच चाललेलं असतं जणू! जसं आम्ही कधी कामच केलं नाही...”

आणि माझ्या बायकोला सांगायला गेलो तर ती सरळ तोंड करून बोलायलाही तयार नव्हती. फक्त शांतपणे सगळं ऐकत होती.

अशावेळी... मला आईचंच बोलणं खरं वाटलं. खरंच तर आहे... आईसुद्धा किती काम करायची आधी... पण माझ्या बायकोचं मात्र वेगळंच नाटक आहे... पण मी तरी काय करणार? दोघींमध्ये भरडला जाणार तर मीच होतो. म्हणून बायकोशी बोलायला तिच्या मागे गेलो.

मीही रागात बोलून गेलो,
“अगं, कितीसं काम असतं? मला बघ... सकाळपासून बाहेर असतो, दिवसभर काम करतो... संध्याकाळी थोडा आराम करावा म्हटलं तर तुझी कटकट सुरू असते.”

पण बायको काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. समोर आईही नव्हती की बोलताना तिला काही संकोच वाटेल. ती म्हणाली,
“ठीक आहे पतिदेव... एक दिवस तुम्ही माझं आयुष्य जगून बघणार का?”

मीही म्हणालो,
“ठीक आहे! करीन. त्या दिवशी तू काहीच काम करू नकोस. फक्त बसून राहा. दिवसभर इकडे-तिकडे शेजाऱ्यांकडे जाणं, उरलेल्या वेळेत माहेरच्यांशी फोनवर बोलणं... हे सगळं बंद केलंस तर दोन तासांत काम संपेल.”

बायको एकदा हसली आणि म्हणाली,
“नाही नाही पतिदेव... तुम्हाला पूर्ण घरकाम करायचं नाहीये. फक्त माझ्या वाट्याचे तीनच काम करायचे आहेत.”

“फक्त तीन कामं...? सांग बरं कोणती?” मी विचारलं.

ती म्हणाली,
“पहिलं काम — मी कपडे धुवेन, तुम्ही फक्त ते वाळत टाका.
दुसरं — मी भांडी घासेन, तुम्ही फक्त ती जागेवर लावा.
आणि तिसरं — मी घर झाडून-पुसून घेईन, तुम्ही फक्त कचरा टाका.”

मी मिश्किल हसत म्हणालो,
“तू पण ना... तुला आरामाची चांगली संधी देत होतो, तीच घालवते आहेस. चालेल, उद्या तयार राहतो.”

---

सकाळ झाली. सगळ्यांचा चहा-नाश्ता झाला. त्यानंतर बायकोने सगळी भांडी धुवून टोपलीत ठेवली.

मी ती लावायला पुढे गेलो, तर ती म्हणाली,
“अहो अहो पतिदेव... आधी भांड्यांवरचं पाणी निथळू द्या. मग हे चिनी कप तिकडे समोर ठेवायचे. आणि हो, आधी कपड्याने पुसून घ्या. या प्लेट्स सिंकखालच्या कपाटात ठेवायच्या. त्या वेगळ्या-वेगळ्या ठेवा, एकावर एक ठेवल्या तर त्यात ओलसरपणा येतो. आणि ही चहाची किटली खिडकीजवळ उन्हात ठेवा म्हणजे वास जाईल. आणि आईंचा औषधाचा ग्लास त्यांच्या खोलीत नीट कोरडा करून ठेवायचा.”

मी तिचं सगळं ऐकत भांडी लावायला लागलो. भांडी लावत लावत पंधरा मिनिटं कधी गेली समजलंच नाही. काय करणार... चिनी मातीची भांडी होती... जपून ठेवावी लागत होती. फुटली तर? रोज आई माझ्या बायकोला बोल लावते... आज मला ऐकावं लागू नये म्हणून भीती वाटत होती.

---

नंतर बायकोने झाडू काढला आणि कचरा तसाच ठेवला.

मी कचरा टाकायला निघालो तर ती म्हणाली,
“पतिदेव, कचरा वेगळा टाका. ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. आणि किचनमध्ये भाजी साफ केली होती ना, त्यातलं गवत, देठ वगैरे खाली गाईला टाका. सोबत कालच्या पोळ्याही ठेवल्यात.”

मी एका हातात ओला कचरा, दुसऱ्या हातात सुका कचरा आणि किचनचा कचरा घेऊन अंगणात आलो. कॉलनीत आधीपासूनच गाय उभी होती. तिला पोळी खाऊ घालायला लागलो तर तिने थोडं खाल्लं, थोडा कचरा पसरवला. पुन्हा झाडू घेऊन साफ करावं लागलं.

कचऱ्याच्या गाडीचा आवाज येत होता — “गाडीवाला आला, घरचा कचरा काढा...” पण गाडी अजून आली नव्हती. बहुतेक प्रत्येक ठिकाणी थांबत येत असावी. म्हणून बाहेर उभा राहिलो. एकटं उभं राहून कंटाळा आला म्हणून मोबाईल काढून बोलायला लागलो.

पाच... दहा मिनिटांनी गाडी आली. कचरा टाकून परत घरात आलो.
अजून १५-२० मिनिटं गेली होती...

---

थोडा वेळ बसलो. बायको सगळ्या खोल्यांतून कपडे गोळा करत होती धुण्यासाठी.

मी विचार केला, “आता कपडे धुवायला वेळ लागेल, तोपर्यंत थोडा आराम करतो.”

इतक्यात बाथरूममधून धपाधप आवाज यायला लागला. असं वाटत होतं जणू ती कपडे धुत नव्हती... दिवसाचा सगळा राग त्यांच्यावर काढत होती.

मी रागाने बाथरूमजवळ गेलो आणि म्हणणारच होतो,
“राग काढायचाच असेल तर माझ्यावर काढ...”
तेवढ्यात पाहिलं तर ती माझीच जीन्स घासत होती, ज्यावर काल मी भाजी सांडली होती.

मी माझे शब्द तोंडातच गिळले...

---

थोड्या वेळाने ती दोन बादल्या कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका. आणि हो, ही साडी सावलीत टाका, रंग जातो तिचा. आणि हे शर्ट-पॅन्ट उलटे करून टाका म्हणजे रंगही जाणार नाही आणि ऊनही लागेल. सगळ्या कपड्यांना क्लिप लावा. आणि दूर-दूर टाका म्हणजे नीट वाळतील. कधी पाऊस येईल सांगता येत नाही.”

मी फक्त मान हलवत छतावर गेलो.

छतावर जाऊन एकेक कपडा वेगळा टांगायला लागलो. पॅन्ट उलटी केली... शर्टची बटणं लावली... कपडे टांगताना पाहिलं तर कॉलरवरचे आणि पॅन्टवरील डाग गेले होते. मनोमन बायकोचं कौतुक वाटलं.

मुलांचे छोटे छोटे कपडे वाळत घालणं तर फार अवघड वाटलं. जसा टाकायचो तसाच वाऱ्याने उडायचा. एका हाताने कपडा पकडायचा, दुसऱ्याने क्लिप लावायची. कसाबसा अर्धा तास गेला.

इतक्यात शेजारच्या आजीही त्यांच्या छतावर आल्या. आता त्यांना नमस्कार करणं भाग होतं. दुर्लक्ष करून निघालो असतो तर काय विचार केला असता कोण जाणे! म्हणून त्यांच्याशीही थोडं बोलावं लागलं.

---

खाली आलो तर बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. सिंकमध्ये पुन्हा भांड्यांचा ढीग जमा झाला होता. कढई, तवा, चमचे, मिक्सरचा जार, लाटणं, पाट... मध्येच चहाचे कप पुन्हा आलेले.

तिने सगळी भांडी धुतली आणि सगळ्यांना जेवण वाढायला लागली.

सगळे जेवले आणि पुन्हा सिंकमध्ये भांड्यांचा ढीग जमा झाला.

मी सकाळची भांडीच लावत होतो, तोपर्यंत तिने दुसरी भांडी धुवून ठेवली आणि दयाळूपणे म्हणाली,
“आता राहू द्या... दुपारी लावा.”

मी पाहिलं... सकाळपासून ती एकदाही बसली नव्हती. फोनलाही हात लावला नव्हता.

मी थोडं हसत विचारलं,
“काय गं, आज एकदाही फोन घेतला नाहीस?”

ती हलकंसं हसून म्हणाली,
“तुम्हालाच तर फोन करते मी... आज तुम्ही घरी आहात, मग कशाला करू?”

मी म्हणालो,
“का? माहेरी कोणाला फोन करत नाहीस? आई तर म्हणते दिवसभर मोबाईलवर असतेस.”

ती निर्विकारपणे म्हणाली,
“माझ्यासारख्याच माहेरच्या बायका पण कामात व्यस्त असतात. सणासुदीला थोडं बोलणं होतं. आई म्हणाल्या ते बरोबरच म्हणाल्या... मुलांच्या ट्युशनवाले, गॅसवाले, डिशवाले, कुरिअरवाले... अर्धी कामं आजकाल मोबाईलवरच होतात.”

---

मुलं शाळेतून आली. तिने पुन्हा गॅस लावला. मुलांच्या आवडीचं खायला केलं. टिफिन पुन्हा सिंकमध्ये आले. प्लेट्स जमा झाल्या. तिने त्या धुतल्या.

मग पुन्हा झाडू काढला. दुसऱ्यांदा घर झाडत होती.

इतक्यात आईचा आवाज आला — “चहा कर!”

ती चहा करायला गेली. पुन्हा चहाची भांडी सिंकमध्ये.

मुलांचे शाळेचे कपडे बाथरूममध्ये आले. ती पुन्हा कपडे धुवायला लागली. दुसऱ्या दिवशी शाळेत तेच घालायचे होते.

मी किचनमध्ये धुतलेल्या भांड्यांचा ढीग पाहूनच घाबरत होतो... इतक्यात ती मुलांचे कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका.”

---

असं करत करत पूर्ण दिवस गेला.

संध्याकाळचा नाश्ता झाला. पुन्हा भांडी.
रात्रीचं जेवण झालं. पुन्हा भांडी.

संपूर्ण दिवस हेच चक्र सुरू होतं.

आता मीच या कामाला कंटाळलो होतो.

खरंच... मला बायकोची दया आली.

ज्या गोष्टी फक्त वाळत टाकताना मला आळस येत होता, त्या ती आधी धुते, घासून चमकवते, मग वाळवते, नंतर इस्त्री करून जागेवर ठेवते.

रोज रोज हे सगळं करून ती किती कंटाळली असेल...

आणि काही वर्षांपासून तर तिने माझ्याकडे काही मागणंसुद्धा बंद केलं होतं.

कुठेतरी तिच्या या शांत स्वभावामुळे मलाच ती गर्विष्ठ वाटायला लागली होती...

---

रात्री मी तिला म्हणालो,
“आज मला कळलं तू दिवसभर किती काम करतेस... आणि किती नीट करतेस.”

“पण एक सांग... तू माझ्या आईशी नीट बोलत का नाहीस? त्यांची काळजी घेतेस तरी त्या तुझ्यावर रागावलेल्या का असतात?”

ती म्हणाली,
“आज तुम्ही एक दिवस माझ्या वाट्याचं थोडंसं काम केलं, तेव्हा तुम्हाला माझी अवस्था कळली.

आईजी तर हे आयुष्य स्वतः जगलेल्या आहेत. रोज स्वतःच्या डोळ्यांनी मला पाहतात... तरी समाधानी नसतात. चुका काढतात. माझ्या शरीराच्या वेदनांना नाटक समजतात...

सांगा बरं... मी किती वेळा स्वतःची सफाई देत राहू?

बोलले तर उद्धट...
न बोलले तर गर्विष्ठ...

त्यांचं एकच असतं — ‘आमच्या काळात... आमच्या काळात...’

पण पतिदेव... काळ निघून जातो... बदलतोही.

पण आयुष्य जगायचं असतं... ते कोणाच्या मर्जीप्रमाणे बदलत नाही.

त्यांच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या... आपल्या काळात वेगळ्या आहेत...

त्या अजूनही भूतकाळात जगत आहेत... आणि मी आजमध्ये जगते आहे.”

---

एका स्त्रीला वाईट तेव्हा वाटत नाही जेव्हा एखादा पुरुष तिला कमी लेखतो... कारण पुरुषाला कदाचित कल्पनाही नसते की जबाबदाऱ्या पेलता पेलता ती त्याच्या वयापेक्षाही कितीतरी मोठी झालेली असते.

जेव्हा तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, तेव्हाच तिचं लग्न लावलं जातं...

जेव्हा ती घर सांभाळायला शिकते, तेव्हाच मुलांची जबाबदारी येते... आणि ती स्वतः अजून मनाने लहानच असते...

आणि जेव्हा ती घर आणि मुलं दोन्ही सांभाळायला शिकते...

तेव्हा तिच्याकडून अपेक्षा केली जाते की आता पैसेही कमवावेत...

पण तेवढा आत्मविश्वास तिच्यात उरलेला असतो का?

तो तर कधीच तिच्या जवळच्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उणेदुणे काढून संपवलेला असतो...

आणि ती समाजात फक्त उपहासाचा विषय बनून राहते... फक्त म्हणून की ती चार भिंतींच्या आत राहते.

खरं तर, हे आमच्या स्त्रियांचं रोजचंच आयुष्य आहे...

म्हणूनच एका वेळेनंतर आम्ही स्वतःबद्दल स्पष्टीकरण देणं सोडून देतो...

आणि शांततेलाच आपला दागिना मानून अंगावर चढवतो...

स्त्रीला खर्‍या अर्थाने वाईट तेव्हा वाटतं... जेव्हा एक स्त्रीच तिची किंमत ओळखत नाही...

बायकोचं बोलणं ऐकून मी नि:शब्द झालो...

मयुरी 🖋️
Cp

Address

Dombivali
Mumbai
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astro Trushna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share