Sushant Waghmare

Sushant Waghmare Writer | Social Media Marketer | Designer | Editor

14/05/2026

NEET चा भ्रष्टाचार जर युपीए सरकारच्या काळात झाला असता, तर ह्याच भाजपवाल्यांनी किती उर बडवले असते...२-४ मंत्र्यांचे राजीनामे झाले असते. मात्र ती सौजन्यता भाजपमध्ये नाही...आणि खेदाने म्हणावे लागत आहे की ह्या विरोधात रान पेटवून मोदी सरकारला झुकवायची ताकद आता काँग्रेसमध्ये उरली नाही.
लोकशाहीच्या नावानं चांगभलं...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.
14/05/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.

14/05/2026

If Manmohan Singh was considered as a robot of Sonia Gandhi, Then There are many Chief Ministers in India right now who are Robots of Vishwaguru and Mota Bhayyyy!

Tip: Manmohanji was just introvert never a robot.

'धिरेंद्र शास्त्री एक दलिंदर भामटा' शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलण्याची त्याची लायकी नाही!नागपुरात एका कार्यक्रमा...
25/04/2026

'धिरेंद्र शास्त्री एक दलिंदर भामटा' शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलण्याची त्याची लायकी नाही!

नागपुरात एका कार्यक्रमात केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा दलिंदर शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगतो आणि समोर बसलेले हे मान्यवर त्या दलिंदरला टोकत देखील नाहीत.

भाजप आणि संघ नेहमीच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालत आला आहे, हे वेगळं सांगायला नको. मुळात २०१४ पासून भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर यांच्या
टुकार राजकीय लाभासाठी अत्यंत सोयीनं केला आहे. भाजपला आणि संघाला मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा इतिहास ह्याच्याशी काहीही घेणं देणं नाही.

गल्ली ते दिल्ली भाजपने लोकांना फोडणारे आणि खोटं नरेटिव्ह पसरवणारे असे अनेक दलिंदर शास्त्री पोसून ठेवले आहेत. ह्या दलिंदर शास्त्रीचं कर्तृत्व काय? महागड्या गाड्या, खासगी विमानं, पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणं? हे सगळं आलं कुठून? विरोधी पक्षाच्या आमदारांची, मंत्र्यांची, सामाजिक कार्यकर्त्यांची चौकशी करणाऱ्या ईडीला या दलिंदरांची चौकशी करावी वाटत नाही का?

गायपट्यातील भोळ्या जनतेला देवाच्या आणि खोट्या चमत्कारांच्या प्रभावाखाली घेत वारेमाप संपत्ती बनवणाऱ्या अशा दलिंदर शास्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासातील किती गोष्टी माहिती आहेत? ह्या महाराष्ट्रात उत्तरेचा प्रभाव वाढवण्यासाठी ह्या दलिंदरला इथे पायघड्या घालणं अत्यंत निर्बुद्ध जीव असण्याचं लक्षण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं भूषण, गर्व आणि अभिमान आहे. त्यांना कमकुवत दाखवून त्यांचं श्रेष्ठत्व आणि रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांना लढायला जा असं सांगून त्यांची विद्वत्ता कमी करण्याचा प्रयत्न ह्या दलिंदर बाबाने कितीही केला तरी महाराष्ट्राला खरा इतिहास माहीत आहे. ह्या दलिंदरचा निषेध करावा तितका कमीच...तसेच हा दलिंदर महाराष्ट्रात येऊन पुन्हा असं बरळू नये ही अपेक्षा!

| सुशांत वाघमारे

#छत्रपतीशिवाजीमहाराज

महाराष्ट्रात संजय गायकवाड सारखे मुजोर-अशिक्षित-गुंड आमदार होतायत, ह्यासारखी महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवणारी दुसरी को...
24/04/2026

महाराष्ट्रात संजय गायकवाड सारखे मुजोर-अशिक्षित-गुंड आमदार होतायत, ह्यासारखी महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवणारी दुसरी कोणती गोष्ट नाही. काल ३७ वर्षांपूर्वी कॉर्मेड गोविंद पानसरे यांनी लिहीलेल्या ह्या पुस्तकाच्या शीर्षकावरुन कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना ह्या अडाणी निगरगट्ट आमदाराने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पुस्तकाचं पान चाळलं असतं, तर कदाचित थोडी सद्बुध्दी संजय गायकवाडांना आली असती. पण १ ली तून शाळेतून हाकलून दिलेल्या या आमदाराला शरम तरी कसली असणार...प्रशांत आंबी यांचे आणि माझे कोणतेही संबंध नाहीत. पण एक लेखक आणि पुस्तक प्रेमी वाचक म्हणून मी ह्या प्रवृत्तीचा निषेध करायलाच हवा.

राजकीय वादांमध्ये किंवा वैचारिक वादामध्ये आपण एक मर्यादा ठेऊन बोलायला हवं. शिवाजी कोण होता? हे फक्त शीर्षक नसून शिवाजी महाराजांना थोडक्यात पण सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक आजही माझ्या पुस्तकांच्या साठ्यात आहे. आणि मला आनंद आहे...की हे पुस्तक मी वेळ मिळेल तसे काढून वाचतो आणि पुन्हा पुन्हा शिवाजी ह्या राजाच्या, मुलाच्या, मित्राच्या, बापाच्या, नवऱ्याच्या, सवंगड्याच्या, क्षत्रियाच्या आणि विशेषतः कर्तृत्त्ववान पुरुषाच्या प्रेमात पडतो.

मराठीत आपण ज्याच्यावर आतोनात प्रेम करतो, देवत्त्व देतो, त्याला आपण ऐकेरी भाषेतच बोलवतो. आजही प्रत्येक मराठी माणूस जय भवानी, जय शिवाजी म्हणतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नाही....ही घोषणा शिवसेनेच्याही अनेक कार्यक्रमांमध्ये दिली जाते, तेव्हा या निर्बुद्ध आमदाराचा प्रतिकार जातो कुठे?

कॉर्मेड गोविंद पानसरेंची हत्या झाली, पण त्यांचे विचार अशा पुस्तकांच्या रुपाने आजही अशा लोकांची झोप उडवतात आणि प्रसिद्धीसाठीचं साधन बनतात. पुस्तक हे वाचण्यासाठी इतिहासाची मिमांसा करण्यासाठी आहे. ज्या आमदारांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, त्यांनी मिमांसा न करता लोकांच्या जीवावर उठणं महाराष्ट्राला बिलकूल शोभणारं नाही...पण मतदारांना शिव्या घालणाऱ्या, कोरोनाचा विषाणू फडणवीसांच्या तोंडात कोंबू म्हणत त्यांच्याच सोबत सत्तेत बसणाऱ्या, आमदार निवासात वेटरला मारहाण करणाऱ्या संजय गायकवांडांवर हे सरकार कारवाई तरी करेल काय?

शेवटी खेदाने म्हणावे लागेल...कायदे हे फक्त सामान्यांसाठीच आहेत. अशा आमदारांवर कारवाई होणार नाही. आणि आपण कितीही प्रतिकार केला, तरी आपली गिणतीच केली जाईल...After all democracy is beautiful untill its 'not' implimented!!! Keep going with S**t Politics Sanjay Gaikwad - संजय गायकवाड

| सुशांत वाघमारे

24/04/2026

जो भय्या रिक्षा-टॅक्सीवाला ४ तारखेला संपावर जाईल, त्याची रिक्षा-टॅक्सी आणि त्याला ५ तारखेला पासून आपण फोडायला सुरू करायचं... ज्या हरमखोराला इथे कमावून इथल्या भाषेचा तिटकारा आहे. त्याने हे राज्य सोडावे, इथे कमावून इथल्याच भाषेला दुय्यम दर्जा देऊ नये!

#मराठीनाकारणाराभय्याहाभोसडीचाच!

आज भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेब म्हणजे राजकारणापलिकडची पण राजकारणात अडकलेली व्यक्ती. भा...
14/04/2026

आज भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेब म्हणजे राजकारणापलिकडची पण राजकारणात अडकलेली व्यक्ती. भारताचा इतिहास आधीपासूनच संतांच्या आणि महापुरुषांच्या विभाजनाचा इतिहास राहिला आहे. संत तुकाराम कुणब्याचे, संत सावता माळी माळ्याचे ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे-बौद्धांचे.

हे समाजसुधारकांचं पूर्वापार चालत आलेलं विभाजन ज्या दिवशी थांबेल, त्या दिवशी भारतात सामाजिक आणि आर्थिक क्रांति घडल्याशिवाय राहणार नाही. आज बाबासाहेबांविषयी बोलताना अनेकांची नाकं मुरडली जातात, अनेक जण त्यांना आरक्षण ह्या एक गोष्टीसाठी सामाजिक खलनायक ठरवतात. अगदी बहुजन समाजातही अनेक जातींमध्ये त्यांच्या विषयी आजही कमालीचा दुस्वास आहे. त्याला त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करणं हे मुख्य कारण असावं.

खरंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांनी केलेल्या कार्याकडे डोळसपणे पाहणं आणि लोकांना पाहायला लावणं गरजेचं आहे. त्यांच्याविषयी अर्धवट माहीत असलेल्या गोष्टींना पुसून पूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू विरोधी लेबल लावलं जातं, परंतु बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला तो केवळ हिंदू धर्मात असलेल्या कर्मकांड, अंधश्रद्धेच्या कूप्रथांमुळे. बाबासाहेबांचे बंड हे धर्माविरुद्ध नसून ते सामाजिक बदल घडावा या हेतूने केलेले होते. बाबासाहेबांना जर हिंदू धर्म सोडायचा होता असे जरी मानले तरी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह का केला असता? याचा विचार देखील करावा.

याविषयी त्याकाळात आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या पुस्तकात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी बाबासाहेबांच्या विषयी व्यक्त केलेले मत विचारात ह्यायला हवं "हिंदू समाजातील छळ करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामुख्याने स्मरण राहिल. त्या छळ करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध त्यांनी जळजळीतपणे विरोध केला म्हणून लोकांची मने जागृत राहिली होती. जरी ती एक मोठी वादग्रस्त व्यक्ती होती, तरी त्यांनी ज्याविरुद्ध बंड केले त्याविरुद्ध प्रत्येक व्यक्तीने बंड केले पाहिजे." नेहरूंच्या या विधानातच बाबासाहेबांची हिंदू म्हणून असलेली भूमिका स्पष्ट होते.

आजही बाबासाहेबांचा फोटो स्टेटसला जरी दिसला, तरी "अरे तू जय भीम वाला/वाली आहेस काय?" हे विचारणारी लोकं आपल्याकडे आहेत. खरंतर या देशातील प्रत्येक नागरिक जय भीम वाला/वाली आहे. कारण हा देश संविधानावर चालतो आणि संविधान पूर्णत्वास नेऊन आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा लोकशाही अधिकार मिळवून देणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आहेत. आणि त्यांचा विचार जय भीम म्हणत आपण पुढे नेलाच पाहिजे.

बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्यात काळानुरूप बदल करता येईल अशी तरतूद केली होती. त्याचा खरंतर त्यानंतर आलेल्या सरकारांनी मग ते युपीएचं सरकार असो किंवा एनडीएचं त्यांनी आपल्या सोयीनुसार बदल केला आहे. पण ह्या बदलांच्या विरोधात आवाज उचलण्यासाजी महाशक्ती एक नागरिक म्हणून त्यांनी आपल्याला बहाल केली आहे, ह्यासाठीच बाबासाहेबांचे आपण धन्यवाद मानायला हवे.

आज बाबासाहेब आपल्यात नसतीलही पण हा देश आणि हे संविधान असेपर्यंत बाबासाहेब आपल्यात कायम राहतील. त्यांची जयंती हा 'त्या' लोकांनाच सोहळा नसून आपल्या सर्वांचा सोहळा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याविषयी सुद्धा आहे. विविधतेतला एकोपा जपत महापुरुषांच्या आडून धार्मिक आक्रमण थांबवून त्यांच्या विचारांना वटवृक्षाप्रमाणे फुलवत उत्तरोत्तर अनेक पिढ्यांपर्यंत घेऊन जाणे हीच या महापुरुषांना खरी आदरांजली असेल. आणि तोच बाबासाहेबांचा आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा खरा सन्मान असेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, तसेच सर्व "भारतीयांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"

| सुशांत वाघमारे
१४ एप्रिल २०२६

01/03/2026
The love for   is unconditional! They are socially backward yet they are believers...Dr. Ambedkar is a thought, emoticon...
06/12/2025

The love for is unconditional! They are socially backward yet they are believers...Dr. Ambedkar is a thought, emoticon and art of living!!!

PC: Self

02/11/2025

भारताने वर्ल्ड कप जिंकत रचला इतिहास, रणरागिणींनी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत जग जिकलं!

Address

Sunrise Tower, Andheri East
Mumbai
400093

Telephone

+917738693848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushant Waghmare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sushant Waghmare:

Share