Sushant Waghmare

Sushant Waghmare Writer | Social Media Marketer | Designer | Editor

हिंदी भाषिकांचे हृदयसम्राट देवेंद्र फडणवीस...महाराष्ट्रावर हिंदी लादल्याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार...
20/06/2025

हिंदी भाषिकांचे हृदयसम्राट देवेंद्र फडणवीस...महाराष्ट्रावर हिंदी लादल्याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही!

#निषेध #मराठी #हिंदीनको #मराठीशाळाटिकवा

18/06/2025
18/06/2025

ह्या महायुती सरकारने मराठी माणसाला 'चुतीयात' काढलं. महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा ऐच्छिक केली, तरी ती प्रथम पर्यायी भाषा आहे...इतर भाषा शिकण्यासाठी घालून दिलेले नियम अत्यंत हास्यास्पद आहे.

आणि मुळात ज्या वयात मुलांना स्वतःची आवड निवडच कळत नाही, त्या वयात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा निवडायला सांगणं मुळातच हास्यास्पद आहे. शेवटी मागचे दोन महिने इतका, निकराचा लढा देऊन सुद्धा महायुती सरकारने मराठी माणसाची गणती केली. कारण त्यांना तुम्ही मराठी म्हणून 'एकत्र कधीच येणार नाही' हे ठाऊक आहे.

| सुशांत वाघमारे

11/05/2025

हा देश इंदिरा गांधीची आठवण काढतोय! 🇮🇳💪

एका हास्य युगाचा अस्त!ज्येष्ट अभिनेते अतुल परचुरे सर गेल्याची बातमी कळली. एक अत्यंत जिंदादील व्यक्तिमत्त्व आणि हरहुन्नरी...
14/10/2024

एका हास्य युगाचा अस्त!

ज्येष्ट अभिनेते अतुल परचुरे सर गेल्याची बातमी कळली. एक अत्यंत जिंदादील व्यक्तिमत्त्व आणि हरहुन्नरी अभिनेता आज आपण गमावला आहे. मी अतुल परचुरें सरांना पहिल्यांदा आमच्या विभागात २०१२ साली मनसेच्या प्रचाराच्या दरम्यान भेटलो होतो. तेव्हा सरांची आणि माझी भेट फक्त २ मिनिटांची होती.

त्यानंतर कामाच्या निमित्त विविध कार्यक्रमात आणि इव्हेंटमध्ये सरांची वारंवार भेट होत राहिली. अगदी ह्याच वर्षी झी नाट्य गौरवच्या कार्यक्रमात सरांची भेट झाली होती. आम्ही त्यांच्यासोबत गेम सुद्धा खेळलो होतो. त्यांच्याकडे रंगभूमीच्या ज्ञानाचा प्रचंड साठा होता. त्यांना जीवन तणावमुक्त जगण्याचं मर्म माहित होतं.

मागे त्यांना कॅन्सरचं निदान झालं, पण त्या आजारवर मात करुन सर अगदी जोमानं पुन्हा कामाला लागले होते. पुन्हा शूटींगला जाणं, मित्रांना भेटणं, गप्पा-गोष्टी, मुलाखती सर्व पूर्वीसारखं सुरळीत होतं. पण आज काळाने जणू त्यांच्यावर झडपच घातली.

अतुल सर आजवर जिथे जिथे गेले तिथे-तिथे केवळ त्यांनी आनंदच पेरला, आणि फुलवला. त्यांच्या वावरात एक मुक्तपणा आणि पॉझिटिव्हीटी होती. असंख्य चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून सरांनी मराठी रसिकांना निखळ मनोरंजनाचा ठेवा दिला आहे. निखळ आणि निर्मळ विनोद ही त्यांच्या कारकिर्दीची खासियत. आज ते आपल्यातून निघून जाणं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे.

अतुल सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

So Relatable?
26/08/2024

So Relatable?

गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजी, हा महाराष्ट्र सुरक्षित आहे का?पुणे पोर्शे अपघातापासून सुरु झालेलं महाराष्ट्राच्या गृहख...
10/08/2024

गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजी, हा महाराष्ट्र सुरक्षित आहे का?

पुणे पोर्शे अपघातापासून सुरु झालेलं महाराष्ट्राच्या गृहखात्याचं फेल्युअर हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. आपल्या महाराष्ट्रात सामान्य माणसाच्या सुरक्षेचे तीन तेरा तर वाजलेच आहेत, पण आता लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

एकीकडे अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे, अरविंद वैद्य यांच्या बलात्कार आणि हत्येची प्रकरणं ताजी असताना आणि तिकडे मराठा क्रांती मोर्चाचं उभं राहाणारं आक्राळ-विक्राळ रुप पाहताना, महाराष्ट्र पोलीसांचा इंटलिजेन्स कुठे कमी पडतोय? गेल्या महिन्याभरातच अमोल मिटकरी, जितेंद्र अव्हाड, आज आणि काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा कवचाला भेदून त्यांच्या गाडीवर हल्ला होतोय हे खरंच भयावह आहे.

ज्या लोकप्रतिनीधींना शासन सुरक्षा पुरवतं, त्यांची जर अशी अवस्था असेल तर काही बोलायलाच नको. ऐरोलीत एका मुलाने खाडीत उडी घेतली होती, त्याच्या वडीलांनी पोलीसांना विनंती करुनही तब्बल ३ दिवस पोलीसांनी कोणतीच कारवाई केली नाही, शेवटी बापानेच मुलाचा शोध घेतला. महाराष्ट्राचं गृहखातं इतकं सुस्तावलं आहे का?

मागे एसटी आंदोलनाच्या वेळी देखील शरद पवारांच्या जमावाने हल्ला केला होता, आज राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसारख्या बाहुबली नेत्यांच्या गाडीवर असे हल्ले होणार असतील, तर Devendra Fadnavis आपण गृहमंत्री पदाची खुर्ची उगाच गरम करत आहात का? असा प्रश्न पडतो आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था राखणं आपल्याला झेपत नसेल तर राजीनामा द्या.

आपण संघाच्या बैठकांमध्ये जितक्या हिरहीरीने आणि पक्ष फोडा-फोडीसाठी उत्स्फूर्त पणे काम करता, तसे महाराष्ट्रात कायदा-सुव्यस्था अबाधित राहावी ह्यासाठी देखील काम करा. आणि हो...सत्ता असेल तरच गृहमंत्री राहाल! तेव्हा हे असे हल्ले आणि हत्याकांड होऊ नये ह्यासाठी इथून पुढे कसोशीने प्रयत्न कराल अशी अपेक्षा.

हॅप्पी बर्थ डे खलनायक!मला आठवतं लहाणपणी रोडसाईडच्या व्हिडीओज् मध्ये ५ रुपयांच्या तिकीटावर  वेगवेगळे पिक्चर पाहायला मिळाय...
29/07/2024

हॅप्पी बर्थ डे खलनायक!

मला आठवतं लहाणपणी रोडसाईडच्या व्हिडीओज् मध्ये ५ रुपयांच्या तिकीटावर वेगवेगळे पिक्चर पाहायला मिळायचे. आमच्या घरी २००७ पर्यंत काय टिव्ही नव्हता. त्या व्हिडीओच्या बाहेर फिल्मचे पोस्टर चिकटवलेले असायचे. आणि मला कळतं तसं मी पहिल्यांदा त्या पोस्टरवर पाहिलेला सुपरस्टार खलनायक...म्हणजेच आपला संजू बाबा.

बॉलीवूडमधले अनेक हिरो-हिरोईन मला आवडतात. पण आपण फॅन आहे तो संजूबाबाचा. तशी दत्त फॅमिली आपल्यासाठी खास आहे. कारण संजू बाबाचा बाबा अर्थात दत्त साहाब आपल्या उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आणि आई नर्गिस आपल्या संपूर्ण फॅमिलीची फेव्हरेट हिरोईन. संजू बाबा इतक्या मोठ्या कर्तृत्त्ववान आई-बापाच्या पोटी जन्मला म्हणल्यावर लाडका असेलच.

दारु, ड्रग्ज, शस्त्र आणि पोरी ह्यांच्या अवतीभवती असणारा पद्मश्री आणि खासदार बापाचा लेक असलेला संजू बाबा एक वेगळंच रसायन आहे. पोरगा वाया जाऊ नये म्हणून दत्त साहेबांनी संजूला जबरदस्ती दत्त साहेबांनी फिल्ममध्ये आणलं. खरं तर दत्त फॅमिलीचा डीएनएच मुळात ऍक्टिंगचा. संजू बाबा जितका ऍक्टिंगपासून पळाला तितका तो एक्टिंगच्या जवळ खेचला गेला.

बहुतेक दत्त साहेबांना आपल्या पोराचं कॅलिबर कळलं असेल. ९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टमुळे संजू बाबाला ३ वेळा जेलमध्ये जावं लागलं, त्यानिमित्ताने त्याचे अंडरवल्ड कनेक्शन लोकांसमोर आले. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले (पुढे ते खोटे ठरले). तरी पण संजू बाबा खचला नाही. तो लढला, त्याची शिक्षा पूर्ण करुन तो पुन्हा आला. आणि आजही काम करतोय.

संजू बाबा ऍक्टिंगचं ते रसायन आहे, जे कोणत्याही भूमिकेत फिट्ट बसतं. जीवा, सडक, जीते है शान से, यल्गार अशा चित्रपटांमधला एंग्री यंग मॅन असो - खलनायक, वास्तव, अग्निपथ, केजीएफ सारख्या चित्रपटातला व्हिलन - कुरुक्षेत्र, शुट आऊट एट लोखंडवाला, पुलीसगीरी, डिपार्टमेंट यांमधला पोलीस ऑफीसर - एक और एक ग्यारह, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., धम्माल मधला कॉमेडी स्टार आणि साजन (I tell you this is much more favorite movie, I will write another article for this), सनम मधला लव्हर - पानीपत मधली ऐतिहासिक भूमिका असो, You just name the genere. संजू बाबा तुम्हाला सगळीकडे सगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल.

संजू बाबांच्या ३०८ गर्लफ्रेंड्सबद्दल माहीत नाही. पण संजू बाबाने ३०८ सुपरस्टार कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसोबत नक्की काम केलं आहे. We can say Sanju Baba is 3rd gen actor. ६०-७० च्या दशकातील दिलिप कुमार ते आताचा सुपरस्टार यश. संजू बाबाने खूप मोठा पल्ला गाठलाय. त्याने त्याचं आयुष्य वैयक्तिक जीवन जितकं विवादित ठेवलं, तितकंच त्याच्या फिल्मी करिअरच्या यशाने त्याच्या पायी लोटांगण घातलं. आफ्टर ऑल दोन वेळा फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर गेलेला संजू बाबा. तिसऱ्यांदा येऊन सक्सेसफुल काम करतोय.

आधी आई नर्गिस गेली, २००५ ला दत्त साहेब गेले, एका बायकोचा मृत्यू, एक घटस्फोट आणि तिसरी बायको...संजू बाबा हॅस केम फ्रॉम सो लाँग. पण तो रॉ आहे. बनावट नाही. उगाचचा दिखावा नाही. त्यामुळे तो बॉलीवूडमधल्या आजपर्यंतच्या सर्व कलाकांमध्ये खास आणि वेगळा आहे. फिल्मी घरात जन्मलेल्या संजू बाबाचं आयुष्य खरंच फिल्मी आहे. तो खरंच बॉलीवूडमधला खरा "खलनायक" आहे. म्हणून आजही त्याच्या अवगुणांसह त्याच्यावर प्रेम करणारे माझ्यासारखे असंख्य चाहते आहेत.

Much love to Sanjay Dutt बाबा!
Happy Birthday!

सुशांत वाघमारे
29-07-2024

𝘔𝘢𝘯𝘶 𝘉𝘩𝘢𝘬𝘦𝘳 is the first Indian woman to win an Olympic medal in shooting 🇮🇳 💙
28/07/2024

𝘔𝘢𝘯𝘶 𝘉𝘩𝘢𝘬𝘦𝘳 is the first Indian woman to win an Olympic medal in shooting 🇮🇳 💙

महाराष्ट्र शिक्षण मंडळ झोपलं आहे का?इयत्ता पहिलीच्या पुस्तकात ही कविता असल्याचं माझ्या वाचनात आलं. काय तर म्हणे "नाही ना...
22/07/2024

महाराष्ट्र शिक्षण मंडळ झोपलं आहे का?

इयत्ता पहिलीच्या पुस्तकात ही कविता असल्याचं माझ्या वाचनात आलं. काय तर म्हणे "नाही ना बात...चिकीमिकी माऊस...वन्समोर वन्समोर...झाला शोर? ही कविता लिहीणाऱ्या पूर्वी बाईंनी मौज म्हणून लिहीली असावी कविता..मात्र ती पहिलीच्या मुलांच्या अभ्यास क्रमात असणं हास्यास्पद आणि क्लेशदायक आहेत.

आपल्या लहाणपणी अनेक बालगीतं आणि कविता होत्या ज्या वाचायला मज्जा येत असे. अगदी 'सांग, सांग भोलानाथ पासून चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' अगदी सुस्पष्ट आणि समजेल अशी मराठी. पण ही कविता वाचल्यानंतर एक तीव्र सणक डोक्यात गेली आहे. कशाला म्हणून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून लढायचंय? जिथे शासनाचंच इतक्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष नाही.

महाष्ट्र शिक्षण मंडळात आणि बोर्डावर मराठीचे शिक्षक कमी असतील तर सांगा....Ohh Sorry! अजून शिक्षक भरतीच झालेली नाही ना. मग अशा चुका होणारच! लवकरात लवकर ही कविता अभ्यासक्रमातून काढण्यात यावी, हिच अपेक्षा!

दक्षिण मुंबईची दैना!मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून दक्षिण मुंबईशी माझं एक वेगळं नातं आहे. मी राहायला मालाडच्या...
20/07/2024

दक्षिण मुंबईची दैना!

मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून दक्षिण मुंबईशी माझं एक वेगळं नातं आहे. मी राहायला मालाडच्या डोंगराळ भागातल्या झोपडपट्टीत आहे. मात्र माझ्यातला लेखक, पत्रकार आणि कलाकाराला नेहमीच दक्षिण मुंबईतील सण, उत्सव, कलाकारांची मांदियाळी आणि इथल्या जुन्या झालेल्या इमारती आकर्षित करत आल्या आहेत. कदाचित त्यामुळेच माझा कामाव्यतिरीक्तचा वेळ मी दक्षिण मुंबईतल्या विविध ठिकाणी फिरून घालवतो.

वांद्रे ते कुलाबा हा परिसर तसा उचभ्रू लोकांचा. टोले जंग इमारती, कॉर्पोरेट हब, गणपती मंडळं, मंत्रालय, विधीमंडळ, सीएसटी स्टेशन, दादर स्टेशन, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, बॅण्ड स्टँण्ड, बाबुलाथ मंदीर, लालबाग, मुंबादेवी, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजी अली दर्गा, अवघ्या 30 ते 50 चौ.कि.मी.च्या परिसरात अवघ्या भारतात सापडणार नाही. इतकी विविधता आहे.

इतकंच नाही, तर ह्या एवढ्या छोट्याश्या परिसराशी अवघा महाराष्ट्र जोडला आहे. राज्याचं सत्ता केंद्र असो किंवा मुंबईतली भाईगीरी, क्रिडा, कला, व्यवसाय असो किंवा लोकांची श्रद्धा. सगळ्याच बाबतीत दक्षिण मुंबई स्वतःमध्येच एक परिपूर्ण शहर आहे.

पण हळूहळू ह्या शहराच्या अस्तित्वाला Unorganised Development च्या कॅन्सरचा विळखा बसत चाललाय. ह्या शहराचं सौंदर्यच जणू ह्या शहराला शाप ठरू लागलंय असं मला वाटतंय. ह्या शहरात फिरताना स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या वास्तू पाहतांना डोळ्यांना एक समाधान वाटतं. त्यांच्यात एक विचार दिसतो, वावरण्यासाठी जगण्यासाठी एैस-पैस जागा असते.

पण अलिकडे ह्या वास्तू जुन्या होऊन ढासाळत आहेत. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला जसं शिवाजी महाराजांच्या वाघनखांची काळजी घेता नाही आली (जशी इंग्रजांनी घेतली आहे) तसंच आपल्याला ह्या वास्तूंची काळजी घेता आली नाही. शेवटी काय तर आपल्याला विकास हवा आहे. तर जुन्या वस्तू आणि वास्तू जायला नको?

हो...जुन्या वस्तू आणि वास्तू दोन्ही आपल्याला नकोत. आपल्याला विकास हवा आहे. विकास...आणि हा विकास कसा करायचा? 4 मजली सुंदर आणि सुबक असलेल्या इमारती पाडायच्या आणि तिथे 20 ते 100 मजली टॉवर आणायचे, चांगल्या वावरता येणाऱ्या चाळीतल्या माणसाला 300-400 फुटाच्या खुराड्यात टाकायचं म्हणजे झाला विकास. (इथे दक्षिण मुंबईतून हाकण्यात आलेल्या मराठी माणसाविषयी एक वेगळं पुस्तक लिहिता येईल)

असो, आज ग्रँट रोड स्टेशन बाहेर असलेल्या एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आणि एका महिलेला आपले प्राण गमावावे लागले आहेत, तर काही लोक जखमी आहेत. (अजून लोक अडकल्याची शक्यता आहे). तसं मुंबईसाठी आता लोकांचं मरणं रोजचं झालं आहे. कुठे ना, कुठे अशा दुर्घटना घडतच असतात. मात्र ह्या घडणाऱ्या घटनांमधून आपण काही शिकत नाही.

आपल्याकडे शहर नियोजन समिती आहे. पण शहराचं नियोजन नाही. आपल्याकडे महापालिका आहे, पण लोकांचं पालकत्व घ्यायला कोणी नाही. आज दक्षिण मुंबईत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत, परंतु त्या अजूनही रिकाम्या करुन लोकांना Develop कराव्या का वाटत नाही? त्याचं कारण म्हणजे त्यांना त्या परिस्थितीतही त्या ऐस-पैस असलेल्या घरात राहायला आवडतं. त्यांना माहित आहे. Devlopment झाल्यानंतर त्यांना जेमतेम त्यांचे पाय पसरता येईल इतकीच जागा मिळेल.

मुंबईत मोठी जागा घ्यायचा विचारच त्यांच्यासाठी धाडसी आहे. सामान्य माणसाच्या चाळीवर इथे टोलेजंग काचेच्या इमारती बांधल्या गेल्यात, आणि आता त्याच सामान्य माणसाला एसआरएच्या उभ्या झोपडपट्टीत कोंबड्याच्या खुराड्या इतकी जागा दिली आहे. त्यांच्या हक्काच्या जागेवर बिल्डरांचा हक्क आलाय. मुंबईत अनेक नव्या बांधलेल्या इमारती पाहिल्या की ह्यांचं आर्किटेक्चर ऑडीट, सेफ्टी ऑडीट झालंय की नाही असा प्रश्न पडतो. कारण त्यांच्या उंचीकडे पाहिल्यानंतर ह्या कधी कोसळतील हे सांगता येत नाही, असं वाटतं.

दक्षिण मुंबईतला इंग्रजांनी बांधलेला गिरणगावचा जुना परिसर पाहिल्यावर त्यांच्या नियोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. रस्त्याच्या कडेला झाडं, इमारतींमध्ये असलेली वावरण्याची जागा, दोन इमारतींमधील अंतर, समांतर रस्ते, मंदीरं, शाळा, कॉलेज, इस्पितळं आणि बरंच काही. हे सगळं आजही उभं आहे...कारण त्यांचा दूरचा विचार.

असा दूरचा विचार आपले राज्यकर्ते कधी करतील हा प्रश्न तर आहेच. परंतु मुंबईत वाढणारी लोकसंख्या ते होऊ देईल का हा ही प्रश्न आहे. तुर्त दक्षिण मुंबईचं सौंदर्य हळू हळू हरवत जात आहे, आणि दक्षिण मुंबईची दैना होण्याकडे वाटचाल सुरु आहे असं वाटत आहे.

सुशांत वाघमारे
20-07-2024

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे २ - साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट आत्ताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मी धर्मवीर मुक...
20/07/2024

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे २ - साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट आत्ताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पाहिला. पहिल्या भागात आणि ट्रेलर वरुन एकंदर पाहता दुसऱ्या भागात खूप फरक आहे. खरं तर सिनेमा आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात, मात्र सिनेमाच्या माध्यमातून राजकारण हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या बायोपिक मधून होत असावं.

तसं शिवसेना राजकारणासाठी सिनेमाचा वापर आत्ताच करतेय अशातला भाग नाही. दादा कोंडकेंचे बहुतेक सिनेमे हे त्याकाळच्या इंदिरा गांधीच्या आणि युपीएच्या सरकारच्या विरोधात भाष्य करणारे असायचे. मात्र आनंद दिघे हे विशेषतः ठाणे जिल्हा, मराठी माणूस आणि शिवसेनेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असल्यामुळे त्यांच्या मार्फेत एखादा संदेश पोहोचवण्याची नामी शक्कल ह्यावेळी एकनाथजी शिंदेंनी शोधली आहे.

वास्तवात सिनेमाचे डायलॉग प्रविण तरडे सरांनी लिहीले आहेत, त्यामुळे सिनेमा तसा जबर होणारच. एक सिनेमा म्हणून हा दुसरा भाग साऊथच्या एखाद्या मोठ्या सिनेमा सारखा वाटतोय. मात्र बायोपिकच्या बाबतीत सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच काही भाष्य करता येईल. तुर्त लोकांना हा सिनेमा प्रोपोगंडा वाटत आहे हे नक्की!

SUBSCRIBE to Zee Music Marathi - https://bit.ly/2K8Hu9pहिंदुत्वाची वीरगाथा भगव्या रंगात झळकवत..मनामनात स्वाभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या..सादर आहे साह....

Address

Mumbai

Telephone

+917738693848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushant Waghmare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sushant Waghmare:

Share