Maha Live News

Maha Live News News/Media Company
(1)

16/10/2025

मनपाच्या कॉल सेंटर विषयी अधिक माहिती जाणून

नागपूर मनपा कार्यालयात ऑनलाईन तक्रार कशी करायची याबाबत जाणून घ्या.....

15/10/2025

नागपुर: महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई द्वारा आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण शिविर व पुरस्कार वितरण समारोह दिनांक 12 व 13 अक्टूबर 2025 को डेनिसन्स रिसॉर्ट, गोकर्ण महाबलेश्वर, कुम्टा, कर्नाटक में संपन्न हुआ।

इस अवसर पर फेडरेशन के अध्यक्ष व सहकार चळवळी के शिरोमणि काकासाहेब कोयटे के शुभहस्ते और कर्नाटक के सांसद प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले, विधायक शशिकला जोले तथा संजय होसमठ (अध्यक्ष, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) की प्रमुख उपस्थिती में गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड, नागपुर को आर्थिक वर्ष 2024-2025 में उत्कृष्ट कार्य के लिए दीपस्तंभ पुरस्कार प्रदान किया गया।

संस्था ने नागपुर विभाग में 100 करोड़ और उससे अधिक की ठेवी वाले समूह में प्रथम स्थान हासिल किया। संस्थान की ओर से यह पुरस्कार संपर्क अधिकारी श्री राजेश सोरते ने स्वीकार किया। संस्था के सभी सदस्य, संचालक, समिति सदस्य, कर्मचारी और दैनिक प्रतिनिधियों को हार्दिक शुभकामनाएं दी गईं।

इस पुरस्कार से गिरनार अर्बन क्रेडिट सोसाइटी की मेहनत, निष्ठा और सहकारी क्षेत्र में अग्रणी योगदान को मान्यता मिली है।

15/10/2025

कुही(उल्हास मेश्राम): महाराष्ट्र शासन की मातोश्री ग्रामसमृद्धि योजना के अंतर्गत कन्हेरी-डोंगर मोह से कोडबाजी मंदिर तक सड़क निर्माण का काम मंजूर किया गया है। यह उपलब्धि विशेष रूप से चेतन वैद्य जी के प्रयासों का परिणाम है, जिन्हें इस सफलता के लिए पूरे गांव और क्षेत्र के लोग धन्यवाद दे रहे हैं।

इस परियोजना को केंद्रीय सड़क मंत्री श्री नितीन गडकरी, महाराष्ट्र के महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे (पालक मंत्री, नागपुर) और माजी विधायक राजु भाऊ पारवे की स्वीकृति प्राप्त हुई। सड़क निर्माण से स्थानीय लोगों को बेहतर यातायात सुविधा, समय की बचत और क्षेत्रीय विकास में वृद्धि होगी।

गांववालों और परियोजना से जुड़े सभी हितधारकों ने इस महत्वपूर्ण निर्णय के लिए अपने कृतज्ञता व्यक्त की। यह सड़क परियोजना ग्राम विकास और ग्रामीण समृद्धि की दिशा में एक महत्वपूर्ण कदम मानी जा रही है।

15/10/2025

धम्मचक्र प्रवर्तन दीन निमित्ताने विविध संघटनांनी केली साजरी केली.
अखंड भारत चे निर्माते प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे छाया चित्र वितरित.

कन्हान -
आज 14 ऑक्टोबर रोजी डा बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे विविध संघटना ने केले धम्मचक्रप्रवर्तन दीन साजरा.
सर्वप्रथम डा बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बुधवंदन घेण्यात आली व प्रतिमेस मालयारपण करून जय भीम,जय संविधान,जय सम्राट अशोक , जयघोष करण्यात आले.
या कार्यक्रमात विशेष द ब्लैक इंडियन पँथर संघटनेने अखंड भारताचे निर्माते प्रियदर्शी सम्राट अशोक चे छाया चित्र वितरित करण्यात आले ज्यामध्ये सुखी,संपन्न,शासनाचे प्रणेते या छायाचित्र वितरण करून कन्हान मध्ये या प्रकारच्या शासनाची सुरवात करण्याचे निर्धार पण करण्यात आले

15/10/2025

साईबाबा आश्रमशाळेत तीन दिवसीय उत्सवात श्री साईबाबा मूर्तीची स्थापना 🕉️

कन्हान (प्रतिनिधी):
साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.), ता. पारशिवनी, जि. नागपूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरात तीन दिवसीय भव्य उत्सव साजरा करण्यात आला. श्री साईबाबा मूर्तीची विधिवत स्थापना, भजन–किर्तन, गोपालकाला आणि महाप्रसाद यांसह हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव थाटात पार पडला.

शनिवार (दि. ११ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजता साईबाबा आश्रमशाळेच्या पटांगणातून संकल्प रथयात्रा आणि साईपालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, भजनमंडळ, लेझीम पथक आणि डिजेचा समावेश होता. उत्साहात निघालेल्या पालखी मिरवणुकीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर धार्मिक विधी पार पाडले गेले.

रविवार (दि. १२ ऑक्टोबर) रोजी सकाळी श्री साईबाबा मूर्तीचे पूजन, भजन आणि पूजा-अर्चना पार पडल्यानंतर सायंकाळी ४ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आरती आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता आयोजित स्वागत सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जैस्वाल, मा. नितीन तेलगोटे, माजी आमदार टेकचंद सावरकर, आदिवासी उपायुक्त मा. दिंगाबरजी चव्हाण, भाजप पदाधिकारी आशिष पाठक, तसेच शाळेचे संचालक आणि आदिवासी आश्रमशाळा संघाचे सचिव मा. किशोर वानखेडे, सौ. हर्षाताई वानखेडे, सचिव मा. राजेश सरोदे यांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध आदिवासी आश्रमशाळांच्या संचालकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

सोमवार (दि. १३ ऑक्टोबर) रोजी सकाळी आरती, भजन, किर्तन यानंतर दुपारी गोपालकाला व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साईबाबा आश्रमशाळेचे संचालक मा. किशोर रा. वानखेडे, वानखेडे परिवार, तसेच मुख्याध्यापक संजय काळे, बालपांडे सर, अनिल वानखेडे सर, अभिलाश काळमेघ, निखाडे सर, यावले, डहाके, मेश्राम, चौधरी, डोंगरे, चव्हाण, मंहत, कदम, कापसे, आडे, सातपुते, खिळेकर, खंगार, शिक्षिका चव्हाण मॅडम, पोपटे, नाईक, नरूले, साक्षी खोरे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी चंदु चौधरी, गणेश हुड, पुरुषोत्तम पाटील, रंजीत पाजुर्णे आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

✨ श्रद्धा, सेवा आणि संस्कार यांचा संगम ठरलेला हा तीन दिवसीय श्री साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव सर्व उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. ✨

कॅमेरा मन नितीन मेश्राम सोबत रॉबिन निकोसे यांची रिपोर्ट

15/10/2025

उमरेड तालुक्यात काँग्रेस शून्य झाली आहे.. शिवसेना नेते राजू मेश्राम यांची टीका

महाभारताचा 'कर्ण' काळाच्या पडद्याआड... ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!  आपल्या दमदार अभिनयाने आणि भ...
15/10/2025

महाभारताचा 'कर्ण' काळाच्या पडद्याआड... ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले. बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेतील त्यांनी साकारलेली 'कर्ण' ही भूमिका अजरामर झाली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला आहे.

15/10/2025

Gadchoroli
60 नक्षलवादी सरेंडर कसे झाले, नक्षल कमांडर भूपतीसमोर मुख्यमंत्र्यांनी A टू Z सांगितलं

गडचिरोली : माओवादविरोधी लढाईत महाराष्ट्र पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या साठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण (Naxalites surrendered) केलं आहे. ही घटना काल (मंगळवारी १४ ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात घडली. पोलिसांच्या विश्वासार्ह सूत्रांनुसार, हे आत्मसमर्पण (Naxalites surrendered) अत्यंत नियोजित आणि गोपनीय स्वरूपात पार पडले. वेणुगोपाल राव हा माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असून, देशातील माओवादी चळवळीतील एक कळीचा मेंदू मानला जात होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला असून, गडचिरोलीतील माओवादविरोधी कारवाईत हा ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची संपूर्ण माहिती सांगितली आहे.
# काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच
नक्षल कमांडर भूपतीसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोलीमधून माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. चाळीस वर्ष सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा आहे. पीपल्स वॉर ग्रुप स्थापन झाल्यानंतर या भागातील तरुणांच्या मनात असलेल्या व्यवस्थेबद्दल संशय निर्माण करण्यात आले आणि या व्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, म्हणून संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था उलथून लावली पाहिजे आणि त्याच्या पर्याय म्हणून आपण जंगलातून पर्यायी व्यवस्था चालवू असे खोटे स्वप्न दाखविले गेले. त्याला इथले काही तरुण बळी पडली. सोनू उर्फ भूपतीचा आत्मसमर्पण अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पॉलीट ब्युरो मेंबर सेंट्रल कमिटी मेंबर तर आहेच. सोबतच गडचिरोली जिल्ह्यात माओवादी दल निर्माण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच होते.
#देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब
भूपतीने या संपूर्ण भागात माओवादी चळवळीचा म्होरक्या म्हणून भूमिका बजावली आहे. मोदी सरकारने चोख धोरण राबविले, तीव्रतेने विकास केले आणि दुसऱ्या बाजूला माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास ही प्रोत्साहित केले.अमित शहा यांची गृह मंत्री म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली. गडचिरोली पोलिसांनी खासकरून c 60 ने ऑपरेशन राबविले. माओवाद्यांची भरती बंद करून दाखविले. पोलिस दल यासाठी स्तुतीस पात्र आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि त्यांची पूर्ण टीम खास अभिनंदनास पात्र आहे.
भूपती सारख्या अतीवरिष्ठ आणि सुशिक्षित माओवादी, ज्याने आपल्या बौद्धिक गुणांनी संपूर्ण चळवळ उभी करून दाखवली. अशा माओवादी कमांडरला शस्त्रांसह आत्मसमर्पित करून दाखवणं हे देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब आहे. उत्तर गडचिरोली आधीच सशस्त्र माओवादापासून मुक्त झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये कंपनी 10 चे बोटावर मोजण्याइतके माओवादी शिल्लक आहे आता त्यांनीही आत्मसर्पण करावे अशी माझी त्यांना विनंती आहे.छत्तीसगड मध्ये लवकर मोठे आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे, असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे
# देशातला ग्रीन स्टील हब बनवायचे आहे
आपण विचारसरणीवरील युद्ध (ideological war) आपण हरलो आहे, हे माओवाद्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे उरलेल्यानी ही लवकर आत्मसमर्पण करावे. आज जे घडते आहे ते एक जानेवारीला तारकाच्या आत्मसर्पणाने त्याचे बिजारोपण झाले होते. ज्यांनी ज्यांनी आत्मसमर्पण केले त्यांना संविधानाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ. लॉयड्स मेटल्स (Loyads.metals) मध्ये आधीच आत्मसमर्पित माओवाद्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहे. आज आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यापैकी ज्यांची इच्छा असेल, त्यांना ही लॉयड्स मेटल्स(loyads metals) किंवा इतर उद्योगांमध्ये मध्ये नोकऱ्या मिळवून दिली जाईल. गडचिरोलीचा स्टील हब म्हणून विकास होत आहे, जे जे उद्योग इथे आले आहे किंवा भविष्यात येतील त्या सर्वांना आपण अट घातली आहे की जास्त करून भूमिपुत्रांनाच त्यांनी नोकऱ्या द्याव्या. गडचिरोलीचा विकास होत असताना इथली जैवविविधता आपण नष्ट होऊ देणार नाही. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. गडचिरोलीला देशातला ग्रीन स्टील हब बनवायचे आहे. गडचिरोलीला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा मानला जायचा, पनिशमेंट पोस्टिंग(punishment posting) म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जायचे. आज तो पहिला जिल्हा म्हणून मानला जात आहे, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.
# भूपती संदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेला शब्द पाळला
भूपती शरण येऊ शकतो, मात्र तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणे मान्य केले. गेले काही दिवस मध्यस्तांच्या माध्यमातून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजवण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले. मात्र, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणगतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळत आहेत.

15/10/2025

हिंदू-मुसलमान एकमेकांशी जोडले आहेत त्यांना कोणी तोडू शकत नाही...संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर प्यारे खान यांची प्रतिक्रिया

15/10/2025

Maha Live News #दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही… ती मायेचा, आधाराचा आणि प्रेमाचा प्रकाश आहे

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, नागपूर यांच्या “सोबत पालकत्व प्रकल्पा” तर्फे गेल्या वर्षी जसा आशा आणि आनंदाचा दिवा प्रज्वलित झाला…
तसाच या वर्षीही पुन्हा एकदा उजळणार आहे “दिवाळी मिलन सोहळा”

ज्यांनी आयुष्याच्या प्रवासात पालक गमावले… त्यांना नवी दिशा, नवं कुटुंब आणि नवीन उमेद देण्याचा हा संवेदनशील उपक्रम 🙏

📅 दिनांक : १६ ऑक्टोबर २०२५
🕕 सायं. ६ वा. | स्थळ : जेरील लॉन, लक्ष्मीनगर, नागपूर

15/10/2025

नागपूर येथील अभ्यंकर नगर परिसरातील तो घर ज्याला मूर्ख भूत बंगला म्हणतात बघा बघा हो नागपूरकर त्या घरात कुठला भूत राहतो.. जादू टोण्याचा नावावर एकाद्या परिवाराची कशी कोंडी करता तुम्ही हे बघाच...

15/10/2025

दिवाळीनिमित्त नागपूर पोलिसांची शहरात कडक निगराणी
CCTV च्या माध्यमातून पोलिसांची सतत नजर

Address

Mahal
Nagpur
440032

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Live News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maha Live News:

Share