Vidarbha Darshan

Vidarbha Darshan आपला विदर्भ, आपला अभिमान..!!

  - दशानन रावण मूर्ती, सांगोळा, अकोलाअकोला जिल्ह्यातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्...
02/10/2025

- दशानन रावण मूर्ती, सांगोळा, अकोला

अकोला जिल्ह्यातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते.

विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..

रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..

त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.

सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.

या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.

सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. हा रावण आमच्या गावाचा रक्षणकर्ता आहे त्यामुळेच दसर्‍याच्या दिवशी पूजा केली जाते असे गावकरी सांगतात.

  - रेणुका माता मंदिर, माहुरगड, नांदेडहे शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यात असून विदर्भाच्या सिमेवर आहे. महाराष्ट्रातील देवीच्या ...
01/10/2025

- रेणुका माता मंदिर, माहुरगड, नांदेड

हे शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यात असून विदर्भाच्या सिमेवर आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिंका माता मंदिर, मातृतिर्थ तलाव इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या पांडव लेण्या आहेत. एकदा अवश्य भेट द्या.

सिद्धक्षेत्र मातृतीर्थ सिंदखेड राजा परिसरात आढळलेल्या सप्तमात्रिका 🙏🙏✨मातृतीर्थ सिंदखेड राजा हा प्रदेश धार्मिक व सांस्कृ...
30/09/2025

सिद्धक्षेत्र मातृतीर्थ सिंदखेड राजा परिसरात आढळलेल्या सप्तमात्रिका 🙏🙏✨

मातृतीर्थ सिंदखेड राजा हा प्रदेश धार्मिक व सांस्कृतिक परंपरेमुळेही विशेष मानला जातो. प्राचीन काळापासून येथे शैव, वैष्णव तसेच शाक्त उपासना केंद्रित झालेली आहे.

या परिसरातील पुरातत्व उत्खनन व शोधांमध्ये **सप्तमात्रिकांच्या शिल्पमूर्ती** सापडल्या आहेत. सध्या त्या सिंदखेडराजा पुरातत्व संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. यावरून हे क्षेत्र केवळ इतिहासपुरते मर्यादित नसून **सिद्धक्षेत्र** म्हणूनही मान्यता प्राप्त झालेले दिसते.

सप्तमात्रिका : शक्तींचा अद्भुत संगम

*देवीमाहात्म्य* व पुराणांत सप्तमात्रिकांचे वर्णन येते. या सात मातृका देवशक्तींचे रूप धारण करून दुष्ट शक्तींचा नाश करतात.

**ब्रह्माणी** – ब्रह्माची शक्ती
**महेश्वरी** – शिवाची शक्ती
**कौमारी** – कार्तिकेयाची शक्ती
**वैष्णवी** – विष्णूची शक्ती
**वाराही** – वराहाची शक्ती
**इंद्राणी** – इंद्राची शक्ती
**चामुंडा** – पार्वतीचे उग्र रूप

या मातृका एकत्रितपणे *संपन्नता, रक्षण व संहारशक्ती* यांचे प्रतीक मानल्या जातात.

📸 येथे जोडलेल्या छायाचित्रांमधून सिंदखेडराजा परिसरात सापडलेल्या या शिल्पांचे दर्शन घेता येईल.🙏🙏

साभार - मातृतीर्थ प्रकाशन
Mayuresh Khekale
Drx Sumit Khandve Patil

  - विदर्भातील शक्तीपीठ - जगदंबा मंदिर, ठाणेगाव, वर्धा६०० वर्ष जुने श्री जगदंबा मातेचं मंदिर नागपूर अमरावती रोड वर असलेल...
30/09/2025

- विदर्भातील शक्तीपीठ - जगदंबा मंदिर, ठाणेगाव, वर्धा

६०० वर्ष जुने श्री जगदंबा मातेचं मंदिर नागपूर अमरावती रोड वर असलेले ठाणेगांव येथे आहे, हे मंदिर १३ व्या किंवा १४ व्या शतकातील असावे मंदिराची बांधणी हेमाडपंथी असून सुशोभित कला आणि मंदिराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते. येथे भाविक मातेचा आशीर्वाद घेण्या करीत फार दुरून येतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचे भक्त मंडळींनी सांगितले.

  - विदर्भातील शक्तीपीठ - महालक्ष्मी माता मंदिर, कोराडी, नागपूरकोराडीची देवी ही विदर्भातील प्रसिद्ध देवी आहे. नागपूरपासू...
29/09/2025

- विदर्भातील शक्तीपीठ - महालक्ष्मी माता मंदिर, कोराडी, नागपूर

कोराडीची देवी ही विदर्भातील प्रसिद्ध देवी आहे. नागपूरपासून केवळ १५ कि.मी. वर असलेले हे गाव. विदर्भ व मध्यप्रदेशाच्या लोकांचे दैवत आहे. स्त्रीस्वरूपात असलेली ही देवी महालक्ष्मी म्हणून प्रचलित आहे. माहुरझरीच्या रेणुकदेवीशी ही आपलं नातं सांगणारी आहे. गोंड वंशात ज्या देवीची आराधना करण्यात येते त्यात तिचा समावेश होतो. पूर्वी हे मंदिर काळ्या दगडांच्या चिरेदार दगडांनी तत्कालीन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या गेले होते. गर्भगृह अत्यंत प्राचीन होता. पुढे सभामंडप भोसल्याच्या राजवटीत बांधल्या गेला. मूर्ती अत्यंत देखणी, सुंदर असून काळ्या पाषाणाची आहे. भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांमध्ये तिची महती आहे. श्री रामदास फुलझेले जे आज पुजारी आहेत, त्यांनी सर्व ऐतिहासिक माहिती संग्रहित केली आहे. समोर तलाव असून, कमळांच्या फुलांनी ते फुललेले असते. प्राचीन असलेली ही देवी अन् तिचे स्वरुप भव्य दिव्य आहे. दिवसांतून तीन वेळा तिचे स्वरूप-रूप बदलते. आज या देवीचे भव्य दिव्य मंदिर आपणांस पाहण्यास मिळते. निसर्गसृष्टी, मंदिराचे भव्यत्व भाविकांना आकर्षित करते. - नवरात्रात हजारो भाविक विदर्भ व मध्यप्रदेशातून येत असतात. पूर्वी नवसाला पावल्यानंतर बळी प्रथा होती, पण आता ही प्रथा जवळ-जवळ बंद झाली आहे. पुर्वी सभा मंडपाच्या बाजूला दीपमाळ होती, परंतु आज ती दीपमाळ पाहायला जरी मिळत नसली, तरी मंदिराची भव्यता डोळ्यात भरणारी आहे. मंदिराचे प्रवेशद्वारही भव्य आहे. नागपुरातील सर्वश्रेष्ठ देवता म्हणून तिचे स्थान आहे. नवरात्रात तिचे रुप पाहण्याजोगे असते. अनेकांचे कुलदैवत ही अशी कोराडीची महालक्ष्मी आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखांची मदत.....गण गण गणात बोते !!
28/09/2025

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखांची मदत.....

गण गण गणात बोते !!

  - विदर्भातील शक्तीपीठ - अंबादेवी संस्थान, तारापूर, बुलढाणाबुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील तारापूर येथील प्राचीन ह...
28/09/2025

- विदर्भातील शक्तीपीठ - अंबादेवी संस्थान, तारापूर, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील तारापूर येथील प्राचीन हेमाडपंथी अंबादेवी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांनी या देवीची स्थापना केली होती. राणी तारामती च्या नावाने या गावाचे नाव तारापूर असे ठेवण्यात आले आहे. येथे निसर्गरम्य परिसर आणि अद्भुत शांतीचा अनुभव येथे मिळतो. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या भक्तांनी हा परिसर दुमदुमून जातो. प्राचीन काळापासून येथे एक भव्य हेमाडपंथी मंदिर अस्तित्वात होते. त्या मंदिराचे अवशेष येथे पडलेले आढळून येतात. दगडावर कोरीव काम असलेले स्तंभ, अनेक देवी देवतांच्या मुर्ती, मंदिराचे तुटलेले अवशेष येथे सापडतात. काही वर्षांपूर्वी त्या मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले. जुन्या मंदिराचे असंख्य अवशेष या बांधकामात गडप झाले.

तारापूर हे गाव मातीने बांधलेल्या तटबंदीमध्ये होते. गावाच्या चारही बाजूंना चार मातीचे भव्य बुरूज आहेत. ते बुरूज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. आज या गावात एकही मनुष्य नाही. तिथे आज शेती केली जाते. याच ठिकाणी ऋषी विश्वामित्र यांनी वास्तव्य केले होते. त्यांच्या नावावरुनच येथे उगम पावणाऱ्या नदीला विश्वगंगा नदी म्हणून ओळखले जाते.

पुरातत्व विभागाने येथे दुर्लक्ष केलेले आहे. या मंदिराच्या अवशेषांचा अभ्यास केल्यास मंदिराच्या इतिहासाबद्दल आणखी माहीती प्राप्त होईल.

ज्ञानगंगा अभयारण्याच्या डोंगराळ भागात हे निसर्गरम्य ठिकाण असून जवळच पलढग धरण आहे. पर्यटकांनी व इतिहासकारांनी अवश्य भेट द्यावी.

  - विदर्भातील शक्तीपीठ - चंडिका देवी मंदिर, काटोल, नागपूरआजच्या काटोल शहराला ऐतिहासिक संदर्भ आहे. राजा चंद्रहास च्या रा...
27/09/2025

- विदर्भातील शक्तीपीठ - चंडिका देवी मंदिर, काटोल, नागपूर

आजच्या काटोल शहराला ऐतिहासिक संदर्भ आहे. राजा चंद्रहास च्या राजवटीत हे शहर कुंतलापूर (Kuntalapur) या नावाने परिचित होते. शहरात माता चंडिका व माता स्वरस्वती हे दोन पुरातन मंदिर आहे. म्हणूनच कि काय काटोल शहरातील नवरात्री महोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अवतीभवतीच्या गाव खेड्यातून हजारो भाविक देवीची आरास पाहण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी येथे येतात. गल्लो-गल्ली केलेली रोषणाई रात्री रस्ते प्रकाशित करत भाविकांना मोहित करते. देवींच्या ठिकाणी सामाजिक, पौरोणिक उभे केलेले देखावे हे तर भाविकांच्या आकर्षणाचे बिंदू. स्वरस्वती माता मंदिर परिसरात छोटेखानी यात्रा भरते. आकाश पाळणे, रोषणाई, खाद्य, खेळण्यांची दुकाने, ठिकठिकाणी लावलेले लंगर त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत रस्ते लोकांनी गजबजलेले असतात.

  : विदर्भातील शक्तीपीठ - कमळजा देवी मंदिर, लोणार सरोवर, बुलढाणा हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला तीन मुख आहेत. उत्...
26/09/2025

: विदर्भातील शक्तीपीठ - कमळजा देवी मंदिर, लोणार सरोवर, बुलढाणा

हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला तीन मुख आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. देवीचे अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. मध्ये स्तंभ नाहीत. देवी मुखवट तांदळासारखा आहे. तिचा आकार माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणामध्ये यास पद्मावती देवी संबोधले आहे. अनेक ऋषी-महंतांनी व संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. पापनाशिनी गंगाभोगावती धारेखाली स्नान करुन श्री कमळजादेवीची अनेकांनी आराधना केली आहे. श्री कमळजादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देखणी आहे. समोर यज्ञकुंड आहे. अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करुन देणारी ही देवी आहे. शक्तिस्वरुपिणी, वरदायिनी श्री. कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन आहे. पूर्वी तेथे दीपमाळ होती. श्री. प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना या देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते, असे लोकमत आहे. मारुती चितमपल्ली यांच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे हे मंदिर हेमाडपंथी आहे. तेलपाणी दिल्यावर, दिलेल्या काळ्याशार पार्श्वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या ऑयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहे, हे त्यांच मत खरं आहे. मेहकरच्या बालाजी मंदिरापलीकडे एक जुनाट वाडा उद्धवस्त अवस्थेत आहे. तो कंचनी वेश्येचा महाल. तिला लोणारच्या कमळजादेवीसमोरील दीपमाळेची ज्योती रात्री बघायच्या होत्या. त्यासाठी उंच महाल बांधायला सुरुवात केली. शेवटचा मजला चढला, असता तर कंचनीला दीपमाळेच्या ज्योती दिसल्या असत्या. तिची अपार श्रद्धा श्री कमळजादेवीवर होती.

  : विदर्भातील शक्तीपीठ - महाकाली, चंद्रपूरमहाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाट...
25/09/2025

: विदर्भातील शक्तीपीठ - महाकाली, चंद्रपूर

महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते . चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .

येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले . आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

  : विदर्भातील शक्तीपीठ - एकविरा देवी, अमरावतीश्री अंबादेवी मंदिराच्या दक्षिणेस एकवीरा देवीचे मंदिर आहे. हजार वर्षांपासू...
24/09/2025

: विदर्भातील शक्तीपीठ - एकविरा देवी, अमरावती

श्री अंबादेवी मंदिराच्या दक्षिणेस एकवीरा देवीचे मंदिर आहे. हजार वर्षांपासून विदर्भाचे महाशक्तिस्थान असलेल्या एकवीरेला श्री अंबादेवीची मोठी बहीण मानतात. येथील महान तपस्वी जनार्दन स्वामी हे एकवीरा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एकदा नदीला पूर आल्याने त्यांना देवीचे दर्शन घेता आले नाही, काही दिवस त्यांना अन्नावाचून राहावे लागले. तेव्हा त्यांना दृष्टांत देऊन अंबादेवीनेच एकवीरा देवीची स्थापना करावयास सांगितल्याची आख्यायिका आहे. येथे येणारे भाविक प्रथम अंबादेवीच्या आणि नंतर एकवीरा देवीच्या दर्शनाला जातात. या ठिकाणी मोठ्या बहिणीने लहान बहिणीस मान दिला आहे. एकवीरेच्या मंदिराचे महाद्वार पश्चिमाभिमुख आहे. एकवीरा देवी हे रेणुकादेवीचे दुसरे रूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. नवरात्रात येथे यात्रा भरते. नऊ दिवस कार्यक्रमांची येथे रेचलेच असते.

देवीचे स्थान -

नागपूर- मुंबई रेल्वेमार्गावर बडनेरा स्थानकापासून १० किमी अंतरावर अमरावती शहर आहे. बडनेराहून अमरावतीला येण्यासाठी एसटी व रिक्षाची सोय आहे. मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध असून नागपूर-अमरावती अंतर १५५ किमी आहे. नागपूरहून एसटी वा खासगी बस आहेत. एसटी स्थानकापासून दोन किमी अंतरावर श्री अंबादेवी मंदिर आहे. बसस्थानकापासून ऑटोरिक्षा उपलब्ध आहे. मंदिरात राहण्याची सोय आहे.

24 सप्टेंबर - जागतिक नदी दिन निमित्त विशेष लेख‘गडचिरोली : नद्यांचा जिल्हा - समृद्धीचा कणा’गडचिरोली, घनदाट जंगलं आणि नैसर...
24/09/2025

24 सप्टेंबर - जागतिक नदी दिन निमित्त विशेष लेख

‘गडचिरोली : नद्यांचा जिल्हा - समृद्धीचा कणा’

गडचिरोली, घनदाट जंगलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ओळखला जाणारा जिल्हा, 'नद्यांचा प्रदेश' म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नद्यांनी गडचिरोलीची जमीन सुपीक केली आहे, जैवविविधता जपली आहे, आणि इथल्या जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली आहे.

गडचिरोलीतील नद्यांचे जाळे

गडचिरोली जिल्ह्यात अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. काही नद्यांचा उगम इथेच होतो, तर काही शेजारच्या राज्यांतून जिल्ह्यात येतात.

* जिल्ह्यात उगम पावणाऱ्या नद्या: सती नदी (७१ किमी), खोब्रागडी नदी (८१ किमी), कठाणी नदी (५८ किमी), पोहार नदी (४९ किमी), दिना नदी (४५ किमी), आणि सर्वात मोठी प्राणहिता नदी (११५ किमी) या नद्या गडचिरोलीतच उगम पावतात.

* बाहेरून येणाऱ्या नद्या: वैनगंगा (जिल्ह्यात १६९ किमी), गाढवी (४५ किमी), पर्लकोटा (४३ किमी), पामुलगौतम (४० किमी), इंद्रावती (१३१ किमी), आणि गोदावरी (४६ किमी) या नद्या इतर जिल्ह्यांतून आणि राज्यांतून गडचिरोलीत प्रवेश करतात.

गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या पाच प्रमुख नद्या वाहतात. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाते आणि चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे वर्धा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला 'प्राणहिता' असे म्हणतात. पुढे, ही नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाऊन सिरोंचा येथे गोदावरीला मिळते. इंद्रावती नदी जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व सीमेवरून वाहते आणि सिरोंचा तालुक्यातील सोमनूरजवळ गोदावरीला मिळते. बांडिया, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्या इंद्रावतीला मिळतात. तर, गाढवी, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना आणि दिना या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहतात. यापैकी पहिल्या चार नद्या वैनगंगेला, तर दिना नदी प्राणहिता नदीला मिळते.

गडचिरोलीतील महत्त्वाचे नदी संगम

नद्यांच्या संगमामुळे गडचिरोलीत काही विशेष स्थळे तयार झाली आहेत, ज्यांना धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व आहे.

* त्रिवेणी संगम (भामरागड): भामरागडमध्ये पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या नद्या एकत्र येतात. पावसाळ्यात येथील दृश्य खूप आकर्षक असते. या संगमावर नयनरम्य सूर्योदय व सूर्यास्त पाहता येतो.

* सोमनूर त्रिवेणी संगम (सिरोंचा): सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे इंद्रावती, गोदावरी आणि अदृश्य असलेली अंतरवाहिनी या नद्यांचा संगम होतो. हे स्थळ धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नदीचे पात्र मोठे असून, वाळू व खडकांवरून वाहणाऱ्या प्रवाहाचा नादमधुर आवाज पर्यटकांना आकर्षित करतो.

* वैनगंगा-वर्धा संगम (चपराळा): गडचिरोलीच्या चपराळा येथे वैनगंगा आणि वर्धा या दोन मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांना 'प्राणहिता' असे नाव मिळते. ही नदी पुढे तेलंगणात गोदावरीला मिळते.

नद्या आणि स्थानिक जीवन

गडचिरोलीतील नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्या इथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. नद्यांच्या काठावर शेतकरी भात आणि भाजीपाला पिकवतात. 'मरियाण' शेती पद्धतीमुळे स्थानिक समाजाला मोठा आधार मिळाला आहे. ढिमर समाजासाठी नद्या मासेमारीचे प्रमुख साधन आहेत. नद्यांच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. तसेच, नद्यांचे संगम पर्यटन वाढवण्यातही मदत करतात.

गडचिरोली जिल्ह्यातील नद्या या फक्त जलस्रोत नाहीत तर त्या जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा कणा आहेत. या नद्यांनी गडचिरोलीला एक अनोखी ओळख दिली आहे. औद्योगिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यासाठी, येथील नद्यांचे विस्तीर्ण जाळे भविष्यात मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकते. शेतीला पोषण, मासेमारीला आधार, जैवविविधतेला आश्रय आणि संस्कृतीला आधार देणाऱ्या या नद्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.

- गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarbha Darshan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vidarbha Darshan:

Share

आपला विदर्भ, आपला अभिमान

आपलं हक्काचं पेज !