Mass Maharashtra

डॉ.शिवानी शिवाजीराव पन्नासे हिचे होमिओपॅथिक  इंटरशिप पूर्ण .                            नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.  ...
07/06/2025

डॉ.शिवानी शिवाजीराव पन्नासे हिचे होमिओपॅथिक इंटरशिप पूर्ण .

नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.

अनंतराव कनसे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथुन बि.एच.एम.एस.शिक्षण व इंटरशिप पुर्ण झाले.त्यानिमित्ताने कॉलेज कडुन आळेफाटा येथील हाॅटेल गुरू देव सभागृहात दिक्षांत समारंभाचे भव्य दिव्य आयोजन करुन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना बि.एच.एम.एस. ही पदवी प्रदान करण्यात आली.या दिक्षांत कार्यक्रमात AKHMC चे संचालिका तथा प्राध्यापक डॉ.कनसे मॅडम व प्राचार्य डॉ घोलप सर यांच्या हस्ते माझी लाडकी कन्या डॉ.शिवानी शिवाजीराव पन्नासे सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना पदवी दान करण्यात आले.यावेळी कॉलेज चे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका सर्व स्टॉफ माझी पत्नी सौ सरस्वती शिवाजी पन्नासे माझे चिरंजीव श्री संगमेश्वर पन्नासे (सहाय्यक नगर रचनाकार पुणे), डॉ.सिध्देश्वर पन्नासे (दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल पुणे ) व पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

पुणे येथे शांतीदूत परिवार च्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे भव्य आयोजन – डॉ विठ्ठलराव जाधव !   शांतिदूत परिवाराच्या वती...
07/06/2025

पुणे येथे शांतीदूत परिवार च्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे भव्य आयोजन – डॉ विठ्ठलराव जाधव !

शांतिदूत परिवाराच्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे विविध कार्यक्रमाने भव्य दिव्य आयोजन करण्यात आल्या असून सर्वांनी सहभागी व्हावे डॉ विठ्ठलराव जाधव.

शांतीदूत परिवार पदाधिकारी हितचिंतक व परिवार कार्यात नव्याने सहभाग घेऊ इच्छिणारे मान्यवर यांना विनम्र आवाहन व आग्रहाचे निमंत्रण . कृपया आपली उपस्थिती बद्दल confirmation कळवा.म्हणजे आपली जागा निश्चित करणे सोयीची होईल.ज्यांनी कळवले आहे त्यांनी पुन्हा कळवणे ची गरज नाही.त्यांची जागा आरक्षित करण्यात आली आहे.
नमस्कार, शांतीदूत परिवाराच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जून रोजी आयोजित रक्तदान, अवयव दान जागृती व राजयोग ध्यान शिबिर व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम . या कार्यक्रमासाठी आपण पदाधिकारी व हितचिंतक म्हणून उपस्थित रहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपली उपस्थिती सकाळी 1o ते दुपारी 5 वाजे पर्यंत द्यावी. कार्यक्रमाचे ठिकाण LOC HOSPITAL नवी पेठ, N. C. फडके चौक निलायम टॉकीजचे जवळ, सदाशिव पेठ पुणे.दुपारी भोजनानंतर राज्यस्तरीय पदाधिकारी, हितचिंतक यांची बैठक आयोजित केली आहे. ज्यामध्ये आगामी काळात आरोग्य, शिक्षण कृषी व कौशल्य विकास या क्षेत्रात करावयाची कामे , यासाठी ची आर्थिक मदत व मानधन या विषयी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आसन व्यवस्था फक्त 100 मान्यवरासाठी आहे.त्यामुळे आपली उपस्थिती बाबत ची आगाऊ माहिती (अँडव्हान्स confirmatio) तृषाली ताई जाधव किंवा सुरेश भाऊ सकपाळ सचिव शांतीदूत परिवार यांचे कडे कळवावी व ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी.विनीत शांतीदूत परिवार पदाधिकारी पुणे.

पुणे येथे शांतीदूत परिवार च्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे भव्य आयोजन – डॉ विठ्ठलराव जाधव ! https://massmaharashtra.co...
07/06/2025

पुणे येथे शांतीदूत परिवार च्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे भव्य आयोजन – डॉ विठ्ठलराव जाधव !
https://massmaharashtra.com/shantidoot-parivar-pune/

*मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क*
*नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी*

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी - गजानन चौधरी ] शांतिदूत परिवाराच्या वतीने सहावा वर्धापन सोहळ्याचे विविध कार्यक्रमाने भव....

घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू ; मेळगाव घाटावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा शुभारंभ !https://massmaharasht...
07/06/2025

घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू ; मेळगाव घाटावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा शुभारंभ !
https://massmaharashtra.com/gharkul-yojna/

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी - गजानन चौधरी ] नायगाव तालुक्यातील मेळगाव येथून ४ मे २०२५ रोजी “मोफत रेती ” योजनेला औपचारिक...

डॉ.शिवानी शिवाजीराव पन्नासे हिचे होमिओपॅथिक इंटरशिप पूर्ण !https://massmaharashtra.com/homeopathy-internship-complete/  ...
07/06/2025

डॉ.शिवानी शिवाजीराव पन्नासे हिचे होमिओपॅथिक इंटरशिप पूर्ण !
https://massmaharashtra.com/homeopathy-internship-complete/

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी - गजानन चौधरी ] अनंतराव कनसे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथुन बि.एच.एम.एस.शिक्षण व इंटरशिप पुर्.....

राहेर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी.
31/05/2025

राहेर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी.

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ] राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्य, अहिल्या देवी होळकर ज...

रामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना - सुरु होणाऱ्या सप्ताहात 550 भाविकांचा सहभाग. ...
30/05/2025

रामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना - सुरु होणाऱ्या सप्ताहात 550 भाविकांचा सहभाग.

नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.

लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या श्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराश्याम महाराज संस्थानचा शिष्यगण बुधवारी (दि. 28) दोन जत्थ्यात रामेश्वर येथे रवाना झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दि. 30 मे रोजी रामेश्वर येथे रामकथेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, विनोद जोशी येवतीकर उर्फ बाळू महाराज रामकथास्थळी अगोदरच पोहोचले असून तेच भाविकांचे स्वागत करतील.

श्री सद्गुरु नराश्याम महाराजांचा शिष्यगण संपूर्ण महाराष्ट्रात पसरला असून वर्षात विविध प्रसंगी हे भक्तगण एकत्र येत असतात. त्यापैकी रामकथा किंवा भागवत कथा हे एक माध्यम आहे. दरवर्षी देशभरातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वतः श्री सद्गुरु नराश्याम महाराजांच्या कल्पकतेतून या कथेचे आयोजन केले जाते. यापूर्वी काशी (उत्तर प्रदेश), जगन्नाथपुरी (ओरीसा), मागील वर्षी श्रीक्षेत्र द्वारका (गुजरात) आणि यावर्षी रामेश्वर (तामिळनाडू) येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यात्माची पर्यटनाशी सुरेख सांगड घातली जात असल्याने भक्तगण सुद्धा सहकुटुंब आनंदाने सहभागी होतात. निवास व भोजन व्यवस्थेवर श्री सद्गुरु नराश्याम महाराज यांचे जातीने लक्ष असते. त्यामुळे भाविकांची कुठेही गैरसोय होत नाही. बुधवारी (दि. 28) सकाळी 8 वाजता देवगीरी या गाडीने 275 भाविक श्री हेमंत बेंडे, विशाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले. तर दुपारी 12 वाजता ओखा-रामेश्वर या गाडीने स्वतः सद्गुरु श्री नराश्याम महाराज यांच्या उपस्थितीत श्री राजेश जाधव मोकासदर, दत्तात्रय पाटील,नंदू दाचावार, महेश धुमशेटवार, चंदू सा टेंभुर्णी व्यंकट पदमवार, संतोष अण्णा महेंद्रकर, संतोष मेडेवार मुखेड, पांडुरंग पाटील, राजू कोटगिरे सावकार . रमेश सावकार चिद्रावार काही वसंत सावकार प्रतापवार यांच्या नेतृत्वाखाली 175 जणांचा दुसरा जत्था रवाना झाला. काही भाविक विमानाने तर काही भाविक स्वतःच्या नियोजनानुसार रस्ते मार्गे जाणार आहेत.

भाविकांची रेल्वेमध्ये फराळ व जेवणाची सोय करण्यात आली असून हे जत्थे गुरुवारी रात्रीपर्यंत रामेश्वर येथे पोहोचतील. शुक्रवारी (दि. 30) प्रसिद्ध रामकथाकार ह.भ.प श्री सुनील महाराज अष्टीकर हे रामकथेचे निरुपण करणार आहेत. या रामकथेत राज्यभरातील सुमारे 550 भाविक सहभागी झाले आहेत. रामायणातील काही दृश्य प्रसंग सुद्धा श्रीराम कथा सप्ताहात सादर केले जातात, हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
https://massmaharashtra.com/sadguru-narashyam-maharaj-2/

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी - गजानन चौधरी ] लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या श्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नरा...

लालवंडी  येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वे चालू.----------------------------------------नायगाव ब...
30/05/2025

लालवंडी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वे चालू.
----------------------------------------
नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन सर्वे करण्यासाठी जिल्हा तालुका व गाव पातळीवर संबंधित ग्रामपंचायत नगरपंचायत सूचना देऊन ऑनलाईन सर्वे करण्याचे निर्देश जारी केले असल्याने या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी लालवंडी येथील ग्रामसेवक संदीप पा.मोरे देगावकर हे प्रत्येक वार्डातील कुटुंबाचा डोर टू डोअर जाऊन पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजने पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून स्वतः जातीने लक्ष घालून ऑनलाईन सर्वे करत आहेत.
ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पक्के व हक्काचे घर असले पाहिजे यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र व गरजू अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना शासनाकडून कोणीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट आ.राजेश पवार यांनी मतदार संघात जास्ती जास्त घरकुलचे ऑनलाईन सर्वेक्षण झाले पाहीजे यासाठी प्रयत्नशिल आहेत. व आ.पवार यांनी ग्रामसेवकांना बक्षीस ही जाहीर केले आहेत.
नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे आदेश पाळून ग्रामसेवक सकाळी सहा वाजताच गावात पोहचत आहेत. लालवंडी येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप पा.मोरे व सेवक दत्ता कोंडावाड हे मात्र ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि या योजनेचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे हा दूरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून गावातील डोर भेट देऊन पात्र व गरजू लाभार्थ्यांचे सर्वे करत असल्याने पात्र व गरजू लाभार्थींना निश्चितच या योजनेचा लाभ मिळेल असा विश्वास गावकऱ्यांना आला आहे.
https://massmaharashtra.com/pantpradhan-awas-yojna/

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ] पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू न....

शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह धरू नये - दिपेश देवरे ----------------- ----------------- नायगांव बाजार तालुका प्रतिनिध...
30/05/2025

शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह धरू नये - दिपेश देवरे
----------------- -----------------
नायगांव बाजार तालुका प्रतिनिधी

नायगांव तालुका परीसरातील शेतकऱ्यांनी डीएपी या खताचा आग्रह न धरता डीएपी ऐवजी पर्यायी खतांचा वापर करावा जसे, की सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया. सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या तीन बॅगा व युरिया खताची अर्धी बॅग याचे मिश्रण करून वापरल्यास आपला उत्पादन खर्च कमी होईल व तेलबिया (सोयाबीन ) पिकास आवश्यक असलेले सल्फर हे सुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून पीकास मिळत आसल्यामुळे तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन तालुका कृषिअधिकारी दिपेश देवरे यांनी केले.
त्याचबरोबर पेरणी करीत असताना घाई न करता उगवण क्षमता तपासावी नंतरच पेरणी करावी असे सांगून शेतकऱ्यांना खते, बियाणे या संदर्भात काही तक्रार असल्यास तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षात व तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकास संपर्क साधावा त्यासाठी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावरती तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाच्या संपर्क क्रमांकाचे नाम फलक लावण्यात आले आसल्याची माहीती पंचायत समिती सभागृहात आयोजीत कार्यशाळेत बोलतांना दिली .
https://massmaharashtra.com/dipesh-devre-agriculture-officer/

[ नायगांव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ] नायगांव तालुका परीसरातील शेतकऱ्यांनी डीएपी या खताचा आग्रह न धरता .....

नरसी येथील कवि देविदास सूर्यवंशी यांच्या कवितेला छत्रपती संभाजीनगर येथे   सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानीत....!नायगाव बाजा...
30/05/2025

नरसी येथील कवि देविदास सूर्यवंशी यांच्या कवितेला छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानीत....!

नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी

छत्रपती -संभाजीनगर येथे वारसा साहित्य मंचच्या वतीने दि. २५ मे २०२५ रोजी रविवारी पार पडलेल्या कविसंमेलनात नायगाव तालुक्यातील नरसी येथील पत्रकार तथा कवी साहित्यिक देविदास सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या 'झाडे लावा' या कवितेला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वारसा साहित्य मंचच्या वतीने अनेक लेखक व कवी साहित्यिक यांनी आपल्या कसदार साहित्यकृतीतून 'वारसा' हे वाचनीय पुस्तक साकारले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे ज्येष्ठ
साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते होऊन भव्य कविसंमेलन पार पडले. यामध्ये नरसी येथील पत्रकार तथा कवी देविदास सूर्यवंशी यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. वारसा साहित्य मंचतर्फे या कवितेसाठी देविदास सूर्यवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित केल्याने त्यांचे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले आहे.

[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ] छत्रपती -संभाजीनगर येथे वारसा साहित्य मंचच्या वतीने दि. २५ मे २०२५ र.....

गोदमगाव येथे आनंदराज आंबेडकरांनी केले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण ! https://massmaharashtra.com/statue-of-babasaheb...
21/05/2025

गोदमगाव येथे आनंदराज आंबेडकरांनी केले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण !
https://massmaharashtra.com/statue-of-babasaheb-ambedkar/

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी - गजानन चौधरी ] येथून जवळच आसलेल्या गोदमगाव ( नायगांव ) येथे गावक-यांच्या वतीने नव्याने साका...

21/05/2025

पतीच्या सैन्यातील सेवानिवृत्तीनंतर पत्नीचे सत्कारप्रसंगी भाषण !!

सीआरपीएफ.तथा स.पो.उपनिरीक्षक गंगाधर गायकवाड यांचा सेवा पूर्ती सत्कार सोहळा संपन्न..

**गंगाधर गायकवाड याची देश सेवा ३८ वर्षाची...

[ बिलोली प्र.सुनिल जेठे ]

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले गंगाधरराव गायकवाड यांनी सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून ३८ वर्ष देश सेवा बजावून दि.३० एप्रिल २०२५ रोजी सेवा निवृत्त झाले असे गंगाधरराव नागोराव गायकवाड यांचा सेवा पूर्ती सत्कार सोहळा दि.१८ में रोजी दिशा केंद्र बिलोली येथे संपन्न झाला.

सीआरपीएफ.तथा केंद्रीय राखीव पोलीस दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगाधरराव नागोराव गायकवाड यांचा सेवा पूर्ती सत्कार सोहळा निमित्ताने दि.१८ में रोजी शहरात मोठ्या उत्साहाने गायकवाड परिवाराने रॅली देशभक्तीच्या संगीतावर नाचत-गाजत काढले.

गंगाधरराव गायकवाड यांच्या सेवा पूर्ती सत्कार सोहळा निमित्ताने सौ.कविता व गंगाधर गायकवाड या दोघांच्या हस्ते महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्या तद्नंतर सौ.कविता व गंगाधर गायकवाड यांचा सौ पत्नीक सत्कार उपस्थित मान्यवर नातेवाईकांच्या हस्ते करण्यात आला होता.

गंगाधर गायकवाड यांनी सीआरपीएफ
सेवा २४/०१/१९८८ ला नागपूर येथे बजावून त्यांनी पंजाब,जम्मू काश्मीर लोढा,किस्तवा,उत्तर प्रदेश,अयोध्या,कन्या कुमारी,आसाम,आंध्रप्रदेश,गुजरात,
तिरुपूरा,मिझोरम,छतीगड,कोलकात्ता, मुंबई,पूणे,१९९९ घ्या कारगील युद्धात,जम्मू काश्मीर मध्ये सामील होते,अश्या विविध ठिकाणी देश सेवा केली.

त्यांना कॅन्सर झालेल्या त्या आजारातून बाहेर पडून उत्कृष्ट केंद्रीय राखीव पोलीस दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावून ३० एप्रिल २०२५ रोजी सेवा निवृत्त झाले त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी गायकवाड यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

देवराव गाडेकर यांनी गंगाधर गायकवाड यांच्या सेवा कार्यचा उजाळा केला तर गंगाधर गायकवाड यांनी आपल्या डोळ्यात तेल टाकून देशाची सेवा करीत आहेत. म्हणून त्याची सौ.कविता त्यांनी कधी न डगमगले नाहीत,सावित्रीबाई सारखे धाडसी कार्य केलेत म्हणून गायकवाड देश सेवा केली असे बालाजी वारघडे यांनी म्हणाले.

यावेळी प्रतिष्ठीत मान्यवर व नातेवाईक,
सीआरपीएफ सेवानिवृत्त मित्र परिवारासह अ.भा.भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सेवा पूर्ती सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सुरेश कुडकेकर यांनी केले तर आभार मिलिंद पवार यांनी मानले होते.

Address

College Road
Nanded
431809

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mass Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mass Maharashtra:

Share