02/06/2026
अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने आमराबाद तांडा परिसराला मोठा तडाखा दिला. वादळामुळे परिसरातील केळीच्या बागा मुळासकट उखडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहीजणांना पत्रे लागली तर काहींच्या अंगावर पत्रावर ठेवलेली दगड अंगावर पडून दुखापत झाली. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, काही घरावरील पत्रे ३०० ते ४०० फूट दूर उडून गेली.