NG Click

NG Click नितळ समाज निर्मितीची नवी ट्रिक..

01/02/2026

Celebrating my 7th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

येत्या २२ मार्च २०२६ पासून
एकाहून एक बातम्या, प्रभावी विश्लेषण आणि बरंच काही..

२९ वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या, अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन सामाजिक सुधारणा घडवून आण...
31/05/2025

२९ वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून लोककल्याणकारी
राज्यकारभार करणाऱ्या, अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन
सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या,
लोकमाता,राजमाता अहिल्याबाई होळकर..
जयंतीच्या
खूप शुभेच्छा।
🌹🌿

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र...
11/03/2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सूचनेनुसार आयोगाने १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढककली आहे.

सर्दी पडसा आलेल्या लोकांनो, विनाकारण बाहेर पडू नका.विभागीय आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याच्या दिल्या सूचना.औरंगाबादः कोरो...
17/02/2021

सर्दी पडसा आलेल्या लोकांनो,
विनाकारण बाहेर पडू नका.

विभागीय आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याच्या दिल्या सूचना.

औरंगाबादः कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. सर्दी, तापाचे रूग्ण खासगी डॉक्टरांकडे गेले तर ते त्यांना कोरोना चाचणी करायला सांगत नाही. कुठलाही फ्लूसारखी लक्षणे असतील तर त्याला घरी पाठवू नका, त्याची चाचणी झालीच पाहिजे, अशा सूचना सर्व डॉक्टरांना लिखित स्वरुपात द्या. साधारण फ्लूची लक्षणे असतील तरी तो रूग्ण आयसोलेट झालाच पाहिजे. सर्दी-पडसे असलेले लोक कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय फिरले तर त्यांच्यावर महामारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा नव्याने फैलावण्याच्या धोका लक्षात घेता नियमावली पाळली नाही तर पुन्हा एकदा कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फन्सिंगमध्ये दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा औरंगाबाद दौऱ्यात दिला होता. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन चांगलीच कानउघाडणी केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

विनामास्क फिरणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यास सुरूवात करा. या दंडाची ५० टक्के रक्कम पोलिसांकडे वर्ग करा आणि ५० टक्के रक्कम स्थानिक स्वराज संस्थांकडे ठेवा. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकांना इशारा द्या. ही परिस्थिती राहिली तर अत्यंत कडक स्वरुपाचा लॉकडाऊन लावावा लागेल, हे लोकांना सांगा. लोकांना स्वतःहोऊन बाहेर यायला सांगा. प्रारंभिक लक्षणे असतील तर होम आयसोलेशनचा विचार करू. अन्यथा अनिवार्यपणे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल. संस्थात्मक विलगीकरणातच उपचार होतील, हे लक्षात घ्या, असेही केंद्रेकर या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात.

काही कोविड केअर सेंटर बंद झाले असतील तर ते तयार करा. आढावा घ्या. त्याचे प्लानिंग तयार करा. व्हेंटिलेटर सुरू आहेत की नाहीत, याच्याकडे लक्ष द्या. परभणीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत सुमार आहे. परभणीचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दहा वेळा ही गोष्ट सांगून झाली आहे पण ही गोष्ट आहे तिथेच आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. कोणत्याही जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० च्या खाली आले नाही पाहिजे. हिंगोली आणि बीडचे टेस्टिंग अत्यंत कमी आहे. टेस्टिंग नसेल तर हे चालणार नाही. टेस्टिंग झालेच पाहिजे. लातूर, बीडची परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे. नांदेडही आता तसेच होत चालले आहे. परभणीच्या सिव्हिलचे प्रशासन आणि इतर टेस्टिंग फिस्टिंग फार बोगस आहे. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा यंत्रणा गतीमान करा, असेही केंद्रेकर म्हणाले.

दुकानदारांच्या पुन्हा चाचण्याः भाजी मंडई, दुकानदार यांच्या पुन्हा चाचण्या सुरू करा. आधी आपण रुग्ण सापडला तर तो एरिया सील करायचो. आता किमान मायक्रो सिलिंग तरी सुरू करा. किमान बिल्डिंग सील करा. त्यांच्या घरच्या लोकांना तपासा आणि हे रुग्ण बोंबलत बाहेर फिरणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही केंद्रेकरांनी दिल्या आहेत.

झोपा काढू नकाः मोठमोठी लग्ने होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत, काहीच कारवाई होत नाही, हे यापुढे चालणार नाही. सर्व मंगल कार्यालयांवर धाडी टाका, त्यांना नोटीस द्या, मंजुरी दिलेल्या लोकांपेक्षा तेथे जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, दंड आकारा आणि पोलिस केसेस दाखल करण्याचा इशारा द्या, अशा सूचना केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हिंगोली, परभणीमध्ये मोठमोठी लग्ने होत आहेत. औरंगाबादचीही तीच परिस्थिती आहे. पण काहीच कारवाई होत नाही. सगळे झोपा काढत आहेत. सर्व मंगल कार्यालयांवर धाडी टाका, मंजुरी दिलेल्या लोकांपेक्षा तेथे जास्त लोक आणि विनामास्क लोक आढळले तर त्यांना नोटीस द्या, दंड आकारा पोलिस केसेस दाखल करण्याचा इशारा द्या, दुसऱ्यांदा जास्त लोक आढळले तर मंगल कार्यालय १५ दिवसांसाठी सील करा, अशा सूचनाही केंद्रेकरांनी दिल्या आहेत.

कोचिंग क्लासेसनाही भेटी द्या. तेथे सॅनिटायजेशनची व्यवस्था आहे की नाही ते पहा, विद्यार्थी विनामास्क आहेत का ते पहा, दुसऱ्यांदा तशीच परिस्थिती आढळली तर कोचिंग क्लासेस सील करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

05/02/2021

अभिनेत्री विद्या बालनचा 'नटखट' या लघुपटाला आता ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री मिळाली आहे.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी भारताकडून ‘नटखट’ची निवड करण्यात आली आहे.
सर्वश्रेष्ठ लघु चित्रपट (लाईव्ह सेक्शन) साठी ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. रॉनी स्क्रूवाला आणि विद्या बालन निर्मित हा लघुपट आहे. शान व्यास यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नटखट ही 33 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म आहे.

नांदेडचीही शाळा आता लांबणीवर .२ डिसेंबर रोजी सुरू होणार शाळा.मुंबई-पुण्यापाठोपाठ नांदेड प्रशासनाचाही निर्णय.नांदेड - (प्...
22/11/2020

नांदेडचीही शाळा आता लांबणीवर .

२ डिसेंबर रोजी सुरू होणार शाळा.

मुंबई-पुण्यापाठोपाठ नांदेड प्रशासनाचाही निर्णय.

नांदेड - (प्रतिनिधी)
२३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील प्रस्तावित (इयत्ता ९ ते १२ वी )शाळांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर कोविड १९ ची चाचणी सुरू असताना जिल्ह्यातील शिक्षकांच्या आरटीपीसीआर अहवालास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील शाळा लांबणीवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
आता येत्या २ डिसेंबर पासून जिल्हयातील इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात येतील.
या पार्श्वभूमीवर २२८२ शिक्षकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून ४९८२ शिक्षकांची चाचणी करणे सुरु आहे . ९२७ शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाली असून २७०२ शिक्षकांची चाचणी सुरू आहे .
यापार्श्वभूमीवर शाळांना लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

एक बेलारूसचा ब्लॉगर..  एक यूट्यूबर काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण बेलारूसमध्ये दिसत आहे. गेली तीन महिने तिथे सरकारविरोध...
21/11/2020

एक बेलारूसचा ब्लॉगर..

एक यूट्यूबर काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण बेलारूसमध्ये दिसत आहे. गेली तीन महिने तिथे सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. सर्गेई तिखानोवस्की (Sergei Tikhanovsky) हा एक फ्रिलान्स पत्रकार. तो तिथल्या हुकूमशाही सरकारची सातत्याने समीक्षा करत असतो.
सरकारी योजना, नीती, धोरण आदीची जनभूमिकेतून समीक्षा व विश्लेषण करतो, सरकारला प्रश्न व जाब विचारतो. उलटतपासणी करतो. बेलारूसमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता. त्याचे य़ूट्यूब वीडियो काही मिनिटात प्रचंड वायरल होतात.
एकदा त्याला एका दर्शकाने कमेंट केली, तुम्ही राष्ट्रपतीविरोधात सक्रीय राजकारणात उतरा! पाठोपाठ हजारो कमेंट पडल्या. दर्शक त्याला आगामी सार्वत्रिक निवडणुकात भाग घेण्याची विनंती करत होते. विचार करून सर्गेई तिखानोवस्कीने जाहिर केले की मी निवडणूक लढवेन.
जनतेमध्ये जल्लोष. काहीच दिवसात त्याच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांना भितीची चाहुल लागली. त्यांनी जुने वाद उकरून त्य़ाच्यावर चौकशी बसवली. उमेदवारी अर्ज भऱण्यापूर्वी त्याला जेलमध्ये टाकले. जनता हैरान-परेशान हुकूमशाही सत्तेपुढे ते पराभूत झाले. राष्ट्रपतींनी विरोधी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून काढून टाकला होता. आता लुंकाशिको एकच शक्तिशाली उमेदवार.. जनता हताश झाली.
इथे इंट्री होते स्वेतलानाची. ती एक शिक्षक व हाऊस विमेन. व्लॉगर सर्गेईची पत्नी. वय ३७. तिने केवळ राष्ट्रपतीसमोर विरोधक हवा म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरला. राजकारणात तिला रस नव्हता पण अनिच्छेने तिला यात यावे लागले. इकडे जनतेत उत्साह परत आला. तिच्या प्रचार सभांना प्रचंड गर्दी. जनतेचा उत्साह पाहून Svetlana Tikhanovskayaने प्रचारात जीव ओतला.
नवरा जेलमध्ये तर ही प्रचारसभामध्ये सरकार व हुकमूशाह राष्ट्रपतीची कट्टर विरोधक म्हणून रिंगणात.. जनतेच्या आशा व आकांक्षा परत येताना तिने पाहिले. मतदारांची कल्पना सत्यात आणण्यासाठी ती आता मनापासून कामाला लागली.
निवडणुका पार पडल्या. बहुसंख्य मतदारांनी स्वेतलाना बाजूने कौल दिला. मतमोजणीत वर्तमान राष्ट्रपती पराभूत होत आहे, हे कळून येताच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आणि वर्तमान राषट्रपतींना विजयी घोषित करण्यात आले.
सामान्य जनता त्यांच्या मताधिकाराचा अवमान झाला म्हणून सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. मतमोजणीत पक्षपात, गोंधळ व गडबड झाल्याचा आरोप करत त्यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला.
राष्ट्रपतींनी खोटारडेपणा करून मते आपल्याकडे वळविली असा मतदारांंचा आरोप होता. सरकारने आंदोलन करणाऱ्या जनतेला झोडपून काढले. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वेतलानाला गुचपूचरित्या देशाबाहेर काढले. आज १०० दिवस झाले बेलारूस अशांत आहे. स्थानिकांना अलेक्झांडर लुकाशेंको राष्ट्रपती म्हणून नको आहेत.
जनता मागे हटायला तयार नाही. त्यांना सत्ताबदल हवा आहे. जनतेला व्लॉगर व तिची पत्नी स्वेतलानालाच्या हातात सत्ता द्यावी असे वाटते. त्यासाठी गेली तीन महीने आंदोलन सुरू आहे. एक ब्रॉडकास्टर (ब्लॉगर) काय करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

गानकोकिळेच्या गोड गळ्यामागची कडवट मानसिकता..पुस्तकावर सही करण्यासाठी पैसे मागणारी साहित्यप्रेमी गायिका !( साभार : हरी नर...
28/09/2020

गानकोकिळेच्या गोड गळ्यामागची कडवट मानसिकता..

पुस्तकावर सही करण्यासाठी पैसे मागणारी साहित्यप्रेमी गायिका !

( साभार : हरी नरके यांची फेसबुक पोस्ट )

आवडत्या लेखक/लेखिकांची पुस्तके शक्यतोवर प्रकाशन समारंभातच विकत घ्यायची मला सवय आहे.
पुस्तकाची ती प्रत जपून ठेवताना मी एक करतो, त्या पुस्तकावर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लेखकांच्या/मान्यवरांच्या सह्या घेऊन ठेवतो.
माझ्याकडे असे शेकडो ग्रंथ आहेत.
आळंदीच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात मी त्यावेळी म.सा.प.चा पुणे जिल्हा प्रतिनिधी व अ.भा.म.सा.महामंडळावरही प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याने प्रमुख पदाधिकारी होतो.
उद्घाटन समारंभामात आम्ही "पसायदान" ही स्मरणिका प्रकाशित केली.
पहिल्या प्रतीवर मी मंचावरील संमेलनाध्यक्ष शांताबाई शेळके, पुर्वाध्यक्ष नारायण सुर्वे आणि इतर अनेक लेखकांच्या सह्या घेतल्या.
संमेलनाच्या उद्घाटक एक नामवंत गायिका होत्या. देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायिका असा त्यांचा लौकिक आहे. मलाही त्यांची गाणी आवडतात. त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देण्यात आलेला आहे.त्यांनी भलीमोठी रक्कम मानधन आकारूनच आमचा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम स्विकारलेला होता. त्यात त्यांच्या भावाचा गाण्याचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला नको असतानाही घ्यायला लावला होता.
साहित्य संमेलनाचे त्यांना निमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्यांचा जवळून परिचय झाला होता. अनेकवार भेटीगाठी झाल्या होत्या.
मी त्यांना सही मागताच त्यांनी माझ्याकडे व पुस्तकाकडे पाहून परत इतरत्र पाहायला सुरूवात केली.
शांताबाई त्यांना माझ्याबद्दल सांगू लागल्या. शांताबाईंनी अजिजीने सांगुनही त्यांनी सही केली नाही.
त्या म्हणाल्या, "मी पैसे घेतल्याशिवाय पुस्तकावर सही करणार नाही."
त्यांनी मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेरची होती. त्यांनी सही केली नाही याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.
अतिशय वाईट वाटून मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. शांताबाईही नाराज झाल्या.
उद्घाटन कार्यक्रम संपल्यावर शांताबाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, " असू दे. असतो एकेकाचा स्वभाव. ती माझी अतिशय जवळची मैत्रिण आहे. तिच्याकडे गडगंज संपत्ती आहे. काय करणार आहे माहित नाही त्या अफाट संपत्तीचं? पण जिला माणसांची आणि ग्रंथांची किंमत नाही ती माझ्या दृष्टीने ****!"
प्रकाशन समारंभाला उपस्थित असूनही पुस्तकावर फक्त एका मान्यवराची सही नसलेलं एव्हढं एकच पुस्तक माझ्याकडं आहे. बाकी सर्व पुस्तकं मात्र अनेकांच्या सह्यांची आहेत.
त्यांनी त्यांच्या सहीसाठी माझ्याकडे मागितलेली ती मोठी रक्कम मी त्यांना आता देऊ शकतो. माझी जास्त नसली तरी तेव्हढी ऎपत आज नक्कीच आहे.
काही किरकोळ शंका मात्र आहेत.
त्या राज्यसभेवर 6 वर्षे असताना दरवर्षी मतदारसंघाच्या विकासासाठीचा खासदारांना देण्यात येणारा दोनअडीच कोटी रूपयांचा निधी त्यांनी स्वत:च्या खाजगी मालकीच्या दवाखान्याला दिल्याचे सांगितले जाते.
त्यांनी सदर दवाखान्याची कोट्यावधी रूपयांची मोक्याची जागाही सरकारकडून फुकटच घेतलेली आहे.
या दवाखान्यात सामान्य पेशंटची लूट करण्यात येते असा आरोप केला जातो.
बाईंनी स्वत:च्या आईचे नाव इंदूरच्या रसिकांना नाट्यगृहाला द्यायला सांगितले. इंदूरकरांनी त्यांच्या शब्दावर विसंबून ते दिले. मात्र आजही बाईंनी त्यांना कबूल केलेली कवडीही दिलेली नाही. आजही ते नाट्यगृह सुविधांविना अपुरेच राहिलेले आहे. आपल्या घरासमोर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुल बांधल्यास आपण देश सोडू अशी धमकी देऊन त्यांनी पुलाचे काम रोखले. दुबईत मात्र त्यांच्या घरासमोर रातोरात ओव्हरब्रिज उभा राहिला. बाईंनी त्याविरूद्ध ब्र शब्द उच्चारलेला नाही.
वरील सर्व आरोपातील खर्‍याखोट्याची शहानिशा मी करू शकलेलो नाही. आणि तसेही "भारतरत्न" असे कसे करतील?
मला त्यांच्याविषयी आजही अपार आदर आहे. आज त्यांची सही घेण्याची मला इच्छा उरलेली नाही.
..
हरी नरके

केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणाला कोणत्या मुद्द्यांवर होतोय विरोध..?●●●●●●शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्य...
21/09/2020

केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणाला कोणत्या मुद्द्यांवर होतोय विरोध..?
●●●●●●

शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत.

APMC बाहेर विक्री झाल्यास 'बाजार शुल्क' न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल.

बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचं काय होणार?

किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल

e-NAM सारख्या ई-ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील?

हे झालं कृषीमालाबद्दल. दुसरं विधेयक कंत्राटी शेतीबद्दल बोलतं. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल

5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल

बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील

मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात

शेती क्षेत्राचं उदारीकरण?

शेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जातंय. पण यात खरंच शेतकरी फायदा करून घेऊ शकतील का ही शंका उपस्थित केली जातेय.

कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का?

अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का?

Essential Commodities (Amendment) Bill म्हणजे अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हे तिसरं विधेयक आहे ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याच्या तरतूदी काय आहेत?

डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद: युद्धसदृश असामान्य परिस्थिती

निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल
किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा
या तरतूदींमुळे शेतकऱ्यांचं नुकसानच होईल असाच आरोप केला जातोय. नेमके काय आक्षेप आहेत ते आपण पाहू या.
मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील.शे
तकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती
कांदा निर्यातबंदी सारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दल साशंकता
केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी हिंदुस्तान टाईम्समध्ये लिहिलेल्या एका लेखात या विधेयकांचं समर्थन करताना म्हटलंय, "अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून निर्मला सीतारमण यांनी शेती क्षेत्रात लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकलंय.
2019-20 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून येतं की ECA मुळे साखर, कांदा आणि डाळींच्या किंमती वाढायच्या आणि साठेबाजांवर धाडी टाकण्यात फक्त व्यापारांचं शोषण व्हायचं."
किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब बोलताना सांगितलं की, "अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषीमाल वगळण्याचं आम्ही स्वागत करतो पण त्याबरोबरच सीलिंग कायदाही रद्द झाला पाहिजे. 1960 पूर्वी बाजार समित्यांशिवायच व्यवहार व्हायचे. आता पुन्हा शेतकऱ्यांना तसा पर्याय उपलब्ध होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे."

ऑनलाईन शिक्षणासंदर्भात शासनाचे नवीन नियम: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशभरातील सर्व शाळांसाठी ऑनलाईन शिक्षणास...
16/07/2020

ऑनलाईन शिक्षणासंदर्भात शासनाचे नवीन नियम:

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशभरातील सर्व शाळांसाठी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत.

हे नियम देशातील सर्व शिक्षण मंडळांना बंधनकारक असणार आहेत. पण राज्य सरकारकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या नियमावली आणि केंद्राच्या आताच्या नियमावली यामध्ये तफावत असल्याने पदवी परीक्षांप्रमाणेच शालेय शिक्षणात नवीन संभ्रम निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, प्ले ग्रुप ते सिनियर केजीपर्यंतचे ऑनलाईन वर्ग दर दिवशी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेता येणार नाही .
पहिली ते आठवीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी दिवसाला 30-45 मिनिटांच्या दोन तासिका तर नववी ते बारावीसाठी दिवसाला 30-45 मिनिटांच्या चार तासिका याहून अधिक काळ ऑनलाईन वर्ग चालवता येणार नाही अशा स्पष्ट सूचना नियमावलीमध्ये देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या या नियमावलीमुळे महाराष्ट्रात मात्र नव्याने संभ्रम निर्माण झालाय. कारण राज्य सरकारने यापूर्वीच 15 जून 2020 या तारखेला ऑनलाईन शाळांच्या तासिकांबाबतचा शासन निर्णय काढला आहे.

त्यानुसार पहिली ते दुसरी या दोन इयत्तांना ऑनलाईन वर्ग भरवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तर तिसरी ते पाचवीसाठी एक तास, सहावी ते आठवी दोन तास आणि नववी ते बारावीपर्यंत तीन तास इतका वेळ शाळांना ऑनलाईन शिक्षणासाठी देण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएसई, केंद्रीय विद्यालय, एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. यामध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि केंद्रीय विद्यालय या शाळा केंद्रीय बोर्डाच्या आहेत. तर एसएससी आणि एचएससी या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत.

15 जूनपासून राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळा राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ऑनलाईन शिक्षण देत आहेत. आता शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांनी कुणाच्या नियमांचे पालन करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याने हा शिक्षणाच्या बाबतीत सगळा गोंधळ उडत असल्याचं पालकांचे म्हणणे आहे. विद्यापीठ पदवी परीक्षांवरुनही केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू असताना आता ऑनलाईन शिक्षणावरुनही दोन्ही सरकारच्या नियमावलीमध्ये तफावत दिसून येत आहेत.

09/07/2020

माध्यमातल्या नव्या इनिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ...

आपण ्लिक या वेब चॅनेलच्या माध्यमातून
सामाजिक ,सांस्कृतिक,पर्यावरणीय घटनांसोबत
चळवळ आणि राजकारणाचा सर्वस्पर्शी वेध तथा परखड विश्लेषण करणार आहोत..

टीम उभी होते आहे ,
आपण लवकरच एकत्र दिसणार आहोत.

माणसं जपण्यातच जीवनाचं सौंदर्य शोधणारे : काळेवार सर..काही माणसांचा संवाद , सहवास खूप हवाहवासा वाटतो, त्यांचं बोलणं इतकं ...
27/02/2020

माणसं जपण्यातच जीवनाचं सौंदर्य शोधणारे : काळेवार सर..

काही माणसांचा संवाद , सहवास खूप हवाहवासा वाटतो, त्यांचं बोलणं इतकं गुदगुल्या आणणारं असतं की, तात्काळ त्या व्यक्तिच्या प्रेमात आपण पडतो तेही कायमचंच. मिलिंद प्राथमिक शाळेचे निवृत्त शिक्षक गंगाधर बळीराम अर्थात जी.बी.काळेवार नावाचं रसायन खूपच विलोभनीय..
कालच २६ फेब्रुवारी रोजी काळेवार सर ,अल्पशा आजाराने आपल्यातून गेले..
कुंडलवाडी सारख्या छोट्याशा शहरात शिक्षकी सेवा बजावताना काळेवार सरांनी जो गोतावळा जमवलाय तो लाजवाबच.. खरं म्हणजे जी.बी.काळेवार हे माझ्या बाबांचे (एन. जी. वाघमोडे ) यांचे बालमित्र. वाघमोडे- काळेवार ही जोडी बिलोली तालुका व परिसरात नावाजलेली जोडी, सार्वजनिक उत्सवात सामाजिक जनजागृतीत ते नेहमी पुढेच , या दोघांनी अखंडपणे शाळेतल्या विविध प्रयोगांसह सामाजिक, धार्मिक , सांस्कृतिक आघाड्यावर दिवसरात्र धडपड केली आहे .
विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी काळेवार काकांची धडपड पाहण्यासारखी , एखाद्या रस्त्याने काळेवार सर जात असतील त्याचवेळी विद्यार्थ्यांची धांदल उडायची ,पोरं रस्ता बदलून जात असत ,इतकी कठोर शिस्त त्यांच्या वागण्यातून लख्खपणे दिसत. पोर एकमेकांना काळेवार सर येण्याची भीती दाखवायचे.
काळेवार काकांनी कधीही कुणाची भीती न बाळगता आपलं काम नेटाने केलंय.. त्यांचं खुमासदार बोलणं, बिलोली तालुक्यात इतक्या वेगाने पसरलंय की, विद्यार्थी आणि पालकांत ते सर्वांचे आकर्षण बनले.
त्यांनी शिक्षकी सेवा बजावताना विज्ञान विषयात अनेक नवनवे प्रयोग केले, ते प्रयोग जिल्हा वा विभाग स्तरावर चर्चेचा विषय बनले. काळेवार नावाची व्यक्ती ग्रामीण बोलीभाषेच्या संदर्भात खुप प्रयोगशील राहिलेली आहे ,विविध माणसांच्या नकला, ग्रामीण भाषेतले किस्से, विनोद ,चुटकुले इतक्या भन्नाट असायचे की , त्या घोळक्यातल्या हरेकानं हसून लोटपोट व्हावं,
आदरणीय काळेवार काकांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या एकाही माणसाला स्वतःपासून दूर होऊ दिलं नाही ,जिव्हाळा इतका की अनेक कुटुंबियांचे ते कायमचे सदस्य होऊन जात असत.
एखाद्या माणसाच्या व्यंगावर नेमकेपणाने भाष्य करीत , इतक्या मासलेदार पद्धतीने वर्णन करणं फक्त काळेवार काकांनाच जमायचं..
बाजारातली माणसं कोणत्या पद्धतीनं बोलतात त्यांच्या आवाजाविषयी व्यंग, शाळेतल्या हरेक शिक्षकांच्या लकबीची नक्कल, इतक्या खुबीने ते संवाद साधत की तातडीची कामं असलेल्या माणसाला उठुच वाटू नये, इतका हवाहवासा माणूस आपल्यातून जावं किती वेदनादायी आहे हे ..!
काकांनी आयुष्यभर माणसं जपली, आपल्या विनोदी शैलीने ती टिकवून ठेवली, सगळा परिसर आज त्यांच्या जाण्याने गलबलून गेलाय, मित्रपरिवाराला त्यांच्या जाण्याने मोठा धक्काच बसलाय,
माणसं अचानक आपल्यातून कशी भुरर्कन उडून जातात,जी नेहमीच आपल्याला हवीहवीशी वाटतात, हे सगळं हृदयाला दुःख देणारं आहे .
काळेवार काकांच्या जाण्याने माझ्या बाबांचा जीवलग सखा,सोबती गेला आहे , बाबा सकाळपासून अस्वस्थ दिसत होते ..मित्राची उणीव आणि यापुढे त्यांना वाटणारी भावना तसेच आम्हा पोरासुरांना खळखळून हसविणाऱ्या आपल्या काकांची कमतरता नेहमीच जाणवेल..
काळेवार सरांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली वाहावी लागते आहे .


कुलदीप नंदूरकर
पत्रकार ,नांदेड

Address

Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NG Click posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share