24/07/2025
कर्जमाफीवर बच्चू कडू आक्रमक
निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता
Navi Mumbai
Be the first to know and let us send you an email when The Varhad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
प्रसारमाध्यमे आता काही मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये एकवटली आहेत. ज्या संस्था उदयोगपत्यांच्या नियंत्रणाखालीगेल्यात तिथे पत्रकारांचे अधिकार, स्वातंत्र्य, हिरावून घेण्यात आले आहेत. किंवा ती प्रक्रिया हळूहळू सुरु झालीये. संपादकीय विभागावार आता मार्केटिंग विभागाच प्रभुत्व ठळकपणे जाणवत आहे.
ज्यावेळी बातम्यासंदर्भातील निर्णय भांडवलदार घेतात, पावरफुल वर्गाच्या सोयीच्या, हिताच्या बातम्या देण्यास सुरुवात होते. त्यावेळी आर्थिक दृष्ट्या मागास, दलित, पीडित, आदिवासी, शेतकरी, शोषित, लोंकाना न्याय देण्याची प्रक्रिया थांबते, मिडियात या वर्गाला कुठलच स्थान उरत नाही. सध्या आपल्या प्रसारमाध्यमांची परिस्थिती अशीच काहीशी झाली आहे. प्रसारमाध्यमांचा फोकस आता सामान्य माणसावरून घसरून सत्ताधारी, उद्योगपती, शोषक आणि आहेरे वर्गावर येवून ठेपला आहे.
अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, भ्रष्ट्राचाराविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या बातम्या आता गायब झाल्या आहेत. बातम्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळे वास्तव दाखवनाऱ्या पत्रकारांची आता कोंडी झाली आहे. मुंबई, दिल्ली इथल्या एसी ऑफीस मध्ये बसलेले आणि मुबई, पुणे, नाशिक या शहरापलीकडे महाराष्ट्राची ओळख नसणारे पत्रकार आता तळा गळातील, ग्रामीण भागातील बातम्याचा दररोज खून करताहेत. त्यामुळे फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, औषधी फवारणीत बळी जाणारे शेतकरी, विदर्भाचा अनुशेष हे महत्वाचे प्रश्न आता माध्यमात प्राईम टाईमसाठी वांझोटी चर्चा करण्यापुरते उरलेत. मीडियाचा फोकस आता पूर्णपणे शहरी झाला असून ग्रामीण भागासाठी तिथे स्पेस उरलेला नाही.