Gunhevishesh

Gunhevishesh Gunhevishesh is crime news coverage

29/10/2015

कॉलेजच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. तेजस्विनी असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. तेजस्वीनी मूळची औरंगाबादची होती.तेजस्विनी ही नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये शिकत होती. या कॉलेजच्या वर्गातच तेजस्विनीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.तेजस्विनीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्या हातावर टी. गाडे असं लिहिलेलं आहे. तिचा मोबाईल बाथरुममध्ये सापडला आहे.

दरम्यान, तेजस्विनीने कॉलेजच्या वर्गात आत्महत्या कशी काय केली? वर्गात तेजस्विनी एकटीच कशी काय होती? त्यामुळे तेजस्विनीच्या आत्महत्येबाबत तिच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.



तसंच तेजस्विनीने ज्या वर्गात आत्महत्या केली, त्याची उंची खूप आहे. त्यामुळे तिचा हात तिथवर कसा पोहोचला, असा सवालही उपस्थित होत आहे.

29/10/2015

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही प्रिपेड रिक्षाची संकल्पना आली. यासाठी ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा, टॅक्सी युनियनने पुढाकार घेऊन ती हाती घेतली.ठाणे स्टेशन परिसरात मे महिन्यात प्रीपेड आॅटो सेवेचा नारळ फोडला यानुसार रिक्षासाठी प्रवाशांना रांगा लावण्याची गरज नाही, किंबहुना एखादा रिक्षाचालक भाडेसुद्धा नाकारु शकत नाही. ही वैशिष्टे असली तरी सुरु वातीला तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र अनेक प्रवाशांनी प्रीपेड रिक्षांचा वापर केला आहे. आतापर्यंत ३ हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून यामध्ये ८० टक्के महिलांचा समावेश आहे. केवळ ठाण्यात अशा प्रकारची सुविधा देण्याबरोबरच इतर शहरांमध्येदेखील अशा प्रकारची सुविधा असावी अशी मागणी प्रवाशांकडून झाल्याने आता मिरारोड आणि भार्इंदर रेल्वेस्थानक आणि ठाण्यातील बस स्थानकांवर ती सुरु करण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या वंदना आणि खोपट डेपो अशा दोन ठिकाणी सुरुवातीला ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या येत असल्याने प्रवाशांना कधीही रात्री बेरात्री येथे उतरावे लागते. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी ती अत्यंत उपयोगी पडणार आहे

29/10/2015

एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे. शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे. सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली

29/10/2015

बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.मुलीची अब्रू वाचविण्यासाठी आईनं मुलावर पहिले तलवारीनं वार केले आणि नंतर गळा दाबून त्याला ठार मारलं. या घटनेनंतर तिनं स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जावून आत्मसमर्पण केलं.चिखलीच्या रामानंद नगरमध्ये राहणाऱ्या शोभाबाई शेषराव जाधव यांना कृष्णा आणि ज्ञानेश्वर ही दोन मुलं आणि चार मुली आहेत. २१ वर्षीय कृष्णा हा रिक्षा चालविण्याचे काम करतो, मात्र त्याला दारूचं व्यसन लागल्यानं घरी नेहमीच वाद होत असत. दारूच्या नशेत तो नेहमीच आई आणि दोन बहिणींशी लगट करायचा.

मंगळवारी रात्री दारूच्या नशेत त्यानं तलवारीचा धाक दाखवून, बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिची आरडाओरड ऐकून शोभाबार्इंनी घरात धाव घेतली, मुलाचं दुष्कृत्य पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लोखंडी पाईपनं मुलावर हल्ला चढवून, त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. याच तलावारीनं त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर असंख्य वार केले. त्यामुळं रक्तबंबाळ होऊन कृष्णा जमिनीवर कोसळला. त्यानंतर शोभाबार्इंनी गळा आवळून त्याचा खून केला. मुलाचा खून केल्यानंतर शोभाबार्इंनी आत्मसमर्पण करून, घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.

29/10/2015

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठ्याच्या मुंबई कार्यालयाने डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवरील कारवाई सुरू ठेवली आहे. गेल्या नऊ दिवसांत मुंबई व ठाणे विभागांत केलेल्या 440 कोटी रुपयांचा 61 हजार 250 मेट्रिक टन डाळ व कडधान्याचा साठा जप्त केला आहे.

19 ऑक्‍टोबर रोजी राज्यात डाळी, खाद्यतेले व खाद्यतेल बिया यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. सणासुदीच्या काळात डाळी, कडधान्ये यांच्या दरावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर डाळींचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली होती. मुंबई व ठाणे विभागात शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने 19 ऑक्‍टोबर पासून 27 ऑक्‍टोबरपर्यंत 36 गोदामांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये 440 कोटी रुपये किमतीचा 61 हजार 250 मेट्रिक टन डाळ व कडधान्याचा अवैधरित्या साठविलेला माल जप्त केला आहे. धाडी टाकलेल्या गोदामांपैकी 18 गोदामांच्या व्यापाऱ्यांवर जीवनावश्‍यक वस्तू कायदा 1955 नुसार फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

29/10/2015

कोकवन येथे मुरुड - सुपेगाव मार्गावर गोठणवाडी गावापासून चारशे मीटर अंतरावर जाऊचा मळा या ठिकाणी शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासामध्ये साठ किलो वजनाचा बिबट्या अडकून मृत झाल्याची घटना १२ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती. बिबट्याचा पायाचे पंजे शस्त्राने छाटून नेल्याने या बिबट्याच्या मरणाबाबत चर्चेला उधाण आले होते.

या घटनेची दखल वनखाते व पोलिसांनी घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. मिळालेलया गुप्त माहितीनुसार वनखाते व रोहा पोलिसांनी याच भागात राहणारा हरी नागू वाडकर याच्या मुसक्या आवळताच त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या शेतात ही घटना घडली ती शेती कसणारा शेतकरी गंगाराम काशिनाथ पाटील यांना पोलिसांनी अटक करताच त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार घटनेदरम्यान पहारा करणारा नजीर महम्मद भुरे याला देखील रविवारी सायंकाळच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हरी वाडकर याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत बिबट्याचा पंजा छाटण्यासाठी वापरलेल्या शस्त्रासहित चोरलेला पंजा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या पंजे तस्करी प्रकरणातील मुख्य म्होरक्या हरी वाडकर याचा जवळचा नातेवाईक असून त्याने अन्य एका ग्रामस्थाच्या साथीने हा पंजा मुरुड तालुक्यातील एका श्रीमंत व्यक्तीला विकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सापळ्यात तीन आरोपी सापडताच या मुख्य म्होरक्याने गावातून पलायन केले.

एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांच...
27/10/2015

एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांचे म्हणणे आहे की त्यांची पत्नी शरीरसंबंधांना नकार देते. मात्र महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती सुरक्षिततेच्या उपायाचा (काँडम) वापर करण्यास नकार देतात.

या सर्व्हेनुसार प्रत्येकी २० विवाहीत पुरूषांपैकी एका पुरूषाचे अनेक विवाहबाह्य संबंध असतात आणि दोन स्त्रियांशी शरीरसंबंधही असतात. मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. या सर्व्हेनुसार ५.३ टक्के विवाहीत पुरूष दोनपेक्षा अधिका स्त्रियांशी असुरक्षित शरीरसंबंध ठेवतात.

पत्नी शरीरसंबंधांना नर देऊ शकते. किंवा शरीरसंबंधासाठी ती सुरक्षिततेच्या उपायांचा आग्रह धरते, ते योग्य आहे. मात्र याच सर्व्हेनुसार अनेक पुरूष दोन स्त्रियांशी संबंध ठेऊन आपल्या पत्नी धोका देतात.

27/10/2015

भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्ह़िडिओसंदर्भात उघड केली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे.
कोर्टात देण्यात आलेल्या अहवाल, म्हटले आहे की पुरूषांची कधी न पूर्ण होणारी सेक्सच्या लालसेची मागणी पूर्ण करण्यासाठी पॉर्न कंटेंट देणारे लोक आपल्या साइटमध्ये नेहमी बदल करत असता. यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण काम आहे.
हे कटू सत्य आहे की सूचना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे बलात्कार आणि गँगरेप सारख्या घटनांना वेगळं रूप दिलं आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सायबर सेक्सचे स्वरूप असे बदलले आहे की त्याने राज्य आणि सीमांच्या बंधनात अडकलेले पोलीस यावर नियंत्रण करू शकत नाही. एखाद्या वेबसाइटला कंटेन्टमुळे ब्लॉक केले गेले तर तो कंटेन्ट दुसर्‍या किंवा तिसर्‍या साइटवर टाकला जातो हे काम बिदिक्तपणे सुरू आहे.
भारतात सायबर सेक्स आणि हिंसात्मक पॉर्न प्रकरणात चौकशी आणि गु्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात म्हटले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आम्ही सक्षम आहोत पण जास्त करून गुन्हेगार दुसर्‍या देशातील आहेत.
सीबीआयने सूचना दिली की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आणि सोशल नेटवर्कींग साइट्ससोबत काम करण्यासाठी सीबीआयचा एक अधिकारी तैनात केला पाहिजे. त्यामुळे त्वरित काम करण्यात मदत मिळेल. यासाठी सीबीआयने अमेरिकेचे उदाहरण दिले. त्या ठिकाणी इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडरसोबत एफबीआयचे अधिकारी नियुक्त केलेले असतात. बलात्कार, गँगरेपच्या घटनांमधून स्पष्ट होते की गु्हेगार पुरूष भारतीय महिलांसंदर्भात किती अमानवीय व्यवहार करतात. वीभत्स अपराध केल्यावर त्याची रेकॉर्डिंग करतात आणि त्याला इंटरनेटच्या माध्यमातून जगाला दाखवून इतर पुरूषांनाही भडकविण्याचे कामं करतात, असेही सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्य...
27/10/2015

परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. परंतु, ही मंडळे दंड भरणार का, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आधीच १३१ गणेशोत्सव मंडळांनी त्यांना ठोठावलेला १ लाखांचा दंड अद्याप भरलेला नसताना आता पुन्हा नवरात्रोत्सव मंडळांना दंड ठोठावला आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री दुष्काळ निधी फंडात हा निधी जमा करून त्याची पोचपावती पालिकेकडे आणायची, असे सांगून पालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी पालिकेची आहे. त्यानुसार, पालिकेशी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्यापही एकाही मंडळाने दंड भरलेला नाही.

दरम्यान, असे असताना आधीच गणेशोत्सव मंडळांनी ठाणे महापालिकेचे नियम पायदळी तुडविले उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेने रस्त्यावर मंडप उभारणाऱ्या मंडपांना चपराक लगावण्यास सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अशाच प्रकारे रस्त्यावर मंडप उभारून किंबहुना रस्ता अडविणाऱ्या १३१ मंडळांना पालिकेने १ लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या.

पाचपाखाडी, टेंभीनाका, मानपाडा अशा विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाचे मंडप रस्त्याच्या मध्यभागी टाकले होते. यामुळे ठाणेकरांना त्याचा त्रास झाला. अनेक ठाणेकरांनी याबद्दल पालिका प्रशासनाकडे तक्र ारीही केल्या होत्या.

27/10/2015

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास शिवकर गावाजवळ झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर दोघे जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने ही घटना घडली. मुंबईहून इनोव्हा कारने (एमएच ०४ डीवाय २५२) अय्यर कुटुंबीय पुण्याच्या दिशेने निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील शिवकर गावाजवळ वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला जोरात धडकली. गाडी भरधाव वेगात असल्याने अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रा रामामूर्ती अय्यर (६०), वैदेही श्रीनिवास अय्यर (४७), श्रीनिवासन गोपालन अय्यर (५२, सर्व राहणार नेरूळ) अशी मृतांची नावे आहेत. तर चालक शंकर बाल सुब्रमण्यम व राममूर्ती अय्यर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सहाने करीत आहेत.

गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे याच्या अटकेबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. इंडोनेशि...
27/10/2015

गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे याच्या अटकेबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेली व्यक्ती म्हणजे छोटा राजनच आहे, असा दुजोरा सीबीआयच्या संचालकांनी दिला आहे. इतकंच नाही तर इंटरपोलने छोटा राजनला पकडल्याचा फोटो इंडोनेशियातून प्रसिद्ध केला आहे.

55 वर्षीय राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. गेल्या दोन दशकापांसून सुरक्षा यंत्रणांना तो सतत गुंगारा देत होता. इंटरपोलनेही राजनचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला होता. अनेक गँगवॉरमध्ये छोटा राजनचा हात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या माहितीवरून त्याला इंडोनेशिन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही छोटा राजनला इंडोनेशियात ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.सीबीआयच्या विनंतीवरुन 25 ऑक्टोबरला बाली पोलिसांनी भारतीय वंशाच्या, मोहन कुमार असं नाव सांगणार्‍या व्यक्तीला अटक केली. मोहन कुमार उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन हा फरार आरोपी असून, सीबीयानं ऑस्ट्रेलियन सरकारसोबत त्याच्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियन सरकारच्या सहकार्यामुळे ही अटक झाली आहे. आमच्या विनंतीवर कारवाई केल्याबद्दल आम्ही इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचे आभारी आहोत. कायद्यानूसार पुढची कारवाई केली जाईल.

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर ज...
27/10/2015

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

कुशालनं ट्वीट केलं होतं की थिएटरमध्ये चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत सुरू होतं आणि त्याच्या पुढील सीटवरची तरुणी उभी राहण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यानंतर त्याला दिसलं की ती सामान्य तरुणी नाही तर अभिनेत्री अमिषा पटेल होती. यावर अमिषानं स्पष्टीकरण देत ट्विट केलं, अचानक मासिक पाळी आल्यामुळे मी उभी राहू शकली नाही. जर उभी झाली असती तर फ्लोरवर रक्त सांडलं असतं.

अमिषानं कुशालच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं, कुशाल सारख्या लोकांना थोबाडित मारण्याची गरज आहे. अमिषा म्हणाली मला माहित नव्हतं कुशाल याला राष्ट्रीय मुद्दा बनवेल.

Address

Navi Mumbai
4000705

Opening Hours

9am - 5pm

Telephone

0919594359375

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gunhevishesh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share