30/05/2026
मराठा आरक्षणावर सरकारची ५ नवी आश्वासने; जरांगेंचे उपोषण सुरूच, निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष
जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंची भेट घेत सरकारच्या वतीने पाच महत्त्वाची आश्वासने दिली.
सरकारने महिन्याभरात मराठा आरक्षण कक्ष सुरू करणे, नोंदी व जातपडताळणीसाठी हेल्पलाईन सुरू करणे, कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी एसओपी तयार करणे, आंदोलकांच्या वारसांना १५ दिवसांत अर्थसहाय्य देणे आणि हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे अशी आश्वासने दिली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून संविधान आणि न्यायालयाच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, लेखी मसुदा पाहिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी कायम ठेवली आहे.
आता सरकारच्या प्रस्तावावर जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Manoj Jarange Patil Official Devendra Fadnavis
#मराठाआरक्षण #मनोजजरांगे #मराठाआंदोलन #जालना #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रराजकारण
Manoj Jarange Patil, Maratha Reservation News, Maratha Andolan, Jalna Protest, Antarwali Sarati, Maharashtra Government, Devendra Fadnavis Statement, Radhakrishna Vikhe Patil Meeting, Kunbi Certificate, Maratha Reservation Cell, Maharashtra Politics News, Breaking Maharashtra News, Reservation Protest, Maratha Community, Viral Political News, Maharashtra Updates, Social Justice News, Trending Marathi News.