Dainik ALP

Dainik ALP "RAISING PEOPLE'S QUESTION"

परभणी :- आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना जाण्यासाठी परभणी आगारातून बसेस पाठविण्यात येत असून वारकऱ्यांकडून मोठ...
17/07/2024

परभणी :- आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना जाण्यासाठी परभणी आगारातून बसेस पाठविण्यात येत असून वारकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून म्हणजेच बुधवार 20 मार्चपासून उमेद...
20/03/2024

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून म्हणजेच बुधवार 20 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 21 राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे.

20/03/2024
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सातवे समन्स बजावले...
22/02/2024

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सातवे समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने त्यांना 26 फेब्रुवारी (सोमवारी) रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांना सहा समन्स बजावल्यानंतरही ते अद्याप ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.

मराठा आरक्षणासाठीचा कायदा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे करण्यात आला होता. याउलट, कौटुंबिक उत्पन्न...
22/02/2024

मराठा आरक्षणासाठीचा कायदा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे करण्यात आला होता. याउलट, कौटुंबिक उत्पन्न आणि इतर आर्थिक मागासलेपणाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी (EWS) 10% आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परिणामी, दोन्ही कायद्यांत फरक असल्याने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ ह...
22/02/2024

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने ऊस खरेदीची किंमत आठ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऊसाची किंमत ३१५ वरुन ३४० झाली आहे. ऊस उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.
22/02/2024

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये काल (मंगळवारी) एकादशी न...
21/02/2024

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये काल (मंगळवारी) एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यामधून जवळजवळ 500 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे अनेक लोक गंभीर जखमी आहेत.

राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊस तोडणी कामग...
20/02/2024

राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊस तोडणी कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे. याचा राज्यातील ६३ कामगारांच्या वारसांना लाभ मिळणार आहे.

पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यातच सोमवारी शंभू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झा...
20/02/2024

पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यातच सोमवारी शंभू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुढची दिशा स्पष्ट केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी मोर्चा दिल्लीकडे कूच करणार असल्याचं शेतकरी नेते पंढेर यांनी सांगितलं.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ दहा दिवसांच्या अवधीमध्ये...
20/02/2024

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ दहा दिवसांच्या अवधीमध्ये राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत. या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण दिले जावे अशी शिफारस केली जाणार आहे.

रविवारी मध्यरात्रीपर्यंत सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस 'दिल्ली चलो' आंदोलन थांबवणार असल्याचे सा...
19/02/2024

रविवारी मध्यरात्रीपर्यंत सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस 'दिल्ली चलो' आंदोलन थांबवणार असल्याचे सांगितले आहे. दोन दिवसांत सरकारने सादर केलेला MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमतीचा नवीन प्रस्ताव शेतकरी समजून घेतील आणि त्यानंतर भविष्यासाठी नवीन धोरण ठरवतील.

Address

Nehru Road, Opp. To LIC Of India Branch Office
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik ALP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share