Pronews

Pronews Well known in media as maharashra's no. 1 media coordinator in politics, sports, education, cultural & NGO news.

आरटीई साठी तक्रार निवारण व व्यवस्थापन समिती स्थापन करा ..... एनएसयुआय ची मागणीपिंपरी - ( दि.17 मार्च) आरटीई कायदा अंतर्ग...
17/03/2021

आरटीई साठी तक्रार निवारण व व्यवस्थापन समिती स्थापन करा ..... एनएसयुआय ची मागणी
पिंपरी - ( दि.17 मार्च) आरटीई कायदा अंतर्गत प्रवेश देताना पालकांची फसवणूक व संस्था चालकांकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते असे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी तत्काळ प्रत्येक जिल्हास्तरावर वा शक्य असल्यास महानगरपालिकास्तरावर RTE प्रवेश प्रक्रिया तक्रार निवारण व व्यवस्थापन समिती स्थापन करावी, ही समिती विद्यार्थी-पालक, शैक्षणिक संस्था व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहील अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण राणभरे यांनी शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांना त्यांचे शासकीय निवासस्थानी भेटून निवेदन देऊन केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय सोशल मीडिया प्रमुख अभिजित हळदेकर, कौस्तुभ लोखंडे, युवराज नायडू, शुभम घोलप आदी उपस्थित होते.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात, या जागा ज्युनिअर केजी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. राज्यात जवळजवळ 10 हजार पेक्षाही जास्त शाळांमध्ये अंदाजे 90 ते 95 हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया प्रतिवर्षी राबविली जाते. ही प्रक्रिया राबविताना विद्यार्थी व पालक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्यात प्रशासनाकडून त्यांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देता येत नाही परिणामी बरेच विद्यार्थी या प्रक्रियेपासून दूर राहतात. तसेच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला RTE मध्ये ॲडमिशन करून देतो असे म्हणून पालकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या असंख्य तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. तसेच शालेय स्तरावर ज्या विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेश मिळाले आहेत. त्यांच्याकडून या ना त्या कारणास्तव शैक्षणिक संस्था पैसे उकळत असतात त्यांना जाणून बुजून वेगळ्या वर्गात बसवून वेगळी वागणूक देऊन त्यांची पिळवणूक केली जाते. अशा अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या असून त्या आम्ही स्थानिक प्रशासनाकडे पाठविल्या आहेत. परंतु मुजोर शैक्षणिक संस्थाचालकांना याचा काडीमात्र फरक पडत नाही.
या सर्व गैरप्रकारावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे असे दिसते. त्यासाठी तत्काळ प्रत्येक जिल्हास्तरावर वा शक्य असल्यास महानगरपालिकास्तरावर RTE प्रवेश प्रक्रिया तक्रार निवारण व व्यवस्थापन समिती स्थापन करावी जेणेकरून विद्यार्थी-पालक, शैक्षणिक संस्था व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून ही समिती काम पाहील अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय च्या वतीने प्रा. वर्षाताई गायकवाड यांना त्यांचे शासकीय निवासस्थानी भेटून निवेदन देऊन केली आहे.
----------------------------

कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठआरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनो...
09/03/2021

कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठ
आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम
पिंपरी (9 मार्च 2021) : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महिला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने हे खडतर काम करीत आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. अशा होतकरू आणि कष्टाळू स्वाभिमानी महिलांचा समाजातील विविध स्तरातून सन्मान झाला पाहिजे व त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले.
महिलादिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महिला रिक्षाचालकांना आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांच्यावतीने निवडक महिलांना साडी, चप्पल आणि प्रथमोपचार किट देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. रिक्षाचालक कविता मैंदाळ यांनी रिक्षा चालवून आपल्या मुलाला डॉक्टर व मुलीला अभियंता असे उच्च शिक्षण दिले, याबद्दल मैंदाळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या महिला रिक्षाचालक सविता आव्हाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आरपीआय (आठवले) राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (8 मार्च) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुमताज शेख, माजी स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख, आरपीआय वाहतूक आघाडी शहराध्यक्ष राम बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल अगरवाल, बशीर सय्यद, मेघा आठवले, गंगाताई धेंडे, मनीषा प्रधान, ललिता बनसोडे, फिरोज पाटील, असिफ शेख, शाम उनवणे, प्रवीण चौधरी, जॉर्ज फ्रान्सीस, युवराज भास्कर, अमोल ढमाळे, सचिन गायकवाड, सुनील शिंदे, इब्राहिम शेख, आनंद देवकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डच्या रिक्षा चालक सविता आव्हाड, जयश्री शिरसाठ, स्मिता शिरसाठ, लक्ष्मी वैरागे, कविता सकट, जनाबाई वैरागे, संगीता जाधव, हिना तांबोळी, रोहिणी वाघमारे, राणी मांडगे, सविता मिसाळ, प्रज्वला आव्हाड, सुनीता डफ आदी उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डचे उद्‌घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक अजिज शेख यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महिला कुटुंबाच्या चरितार्थासाठी रिक्षा चालक म्हणून काम करीत आहेत. यामध्ये बहुतांश महिला विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आहेत. अशा गोरगरीब कुटुंबातील महिलांना रिक्षा चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षातील प्रवासी तसेच टवाळखोरांकडून देखील त्यांना त्रास सहन करावा लागतो. अशावेळी पोलिस प्रशासनाबरोबरच वाहतूक आघाडीचे कार्यकर्ते मदतीला धावून येतील. वेळप्रसंगी अशा टवाळखोरांचा सामना करण्यासाठी चप्पलचा वापर करा. तसेच रस्त्यात एखादा अपघात घडल्यास रिक्षात असणा-या प्रथमोपचार पेटीचा उपयोग करून पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अजिज शेख यांनी केले.
-------------------

पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळेपिंपरी (9 मार्च 2021) : 8 मार्च जागतिक महिलादिन...
09/03/2021

पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळे
पिंपरी (9 मार्च 2021) : 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देण्या अगोदर महिलांना भेडसावणारे प्रश्न सोडवावेत. केंद्रसरकारने महागाई, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत सक्षम धोरण तयार करून त्याची कडक त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी पत्राव्दारे नायब तहसिलदार प्रविण ढमाले यांच्याकडे केली आहे.
सोमवारी (8 मार्च) गिरीजा कुदळे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामलाताई सोनवणे तसेच संगीता कळसकर, नूरबानू शेख, मीना गायकवाड, मीना वाघमारे आदी उपस्थित होते.
या पत्रामध्ये 2014 सालापासून वाढत्या महागाईमुळे महिलांना कुटुंबाचे चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. पेट्रोल शंभरी पार झाले असून घरगुती गॅसची भाववाढ रोजचीच आहे. त्यामुळे महिला प्रचंड तणावाखाली आहेत, महिला भगिनींवरील अत्याचाराचा आलेख वाढताच आहे. अशा चिंताग्रस्त, आर्थिक विवंचनेत असणा-या महिलांना केंद्र सरकारने दिलासा देणे आवश्यक आहे. कोरोना या जागतिक महामारीमुळे लाखो कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे रोजगार बंद झाले आहेत. त्याचप्रमाणे हजारो महिलांचा देखील रोजगार बंद झाला आहे. यामध्ये घरकाम करणा-या महिला, मजूर, टपरी पथारी चालवून कुटुंब सांभाळणा-या महिलांची मोठी संख्या आहे. शेती, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात काम करणा-या महिला भगिनींनी कोरोना कोविड काळात अथक सेवा करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. या वर्गातील महिलांसाठी विशेष धोरण राबविण्याची गरज आहे, अशीही मागणी गिरीजा कुदळे यांनी पत्राव्दारे केली आहे.
--------

वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रियागोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदा...
09/03/2021

वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
गोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदान
पिंपरी (9 मार्च 2021) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लाखो गोर-गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी आतापर्यंत या सेवेचा लाभ घेतला आहे. येथील उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर आजारातून मुक्त झाले आहेत. तसेच दहा लाखात 1.7 टक्के रुग्णांना जबड्याचा अमिलोब्लास्टोमा हा दुर्मिळ आजार होतो. या आजाराची 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती, वायसीएम रुग्णालयाचे दंत चिकित्सक विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी दिली.
रुग्णालयात विविध अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया विभाग आहेत. यापैकी दंत चिकित्सा विभागात फेब्रुवारी महिन्यात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर 55 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले असून एक महिन्यांच्या उपचारानंतर ती आता ठणठणीत बरी झाली आहे. शाबीरा शेख (वय 55 राहणार इंद्रायणी नगर भोसरी) या महिलेला सहा वर्षांपूर्वी खालच्या जबड्याचा दुर्धर आजार झाला होता. अनेक खासगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यावर खात्रीशीर उपचार झाला नाही. जबड्याचे हाड कुजत चालल्याने दाताने अन्न चावतानाही वेदना होऊ लागल्या. शेख याना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. त्यांचे पती खासगी सफाई कर्मचारी म्हणून अल्प मानधनावर काम करतात. त्यामुळे हतबल झालेल्या शेख यांच्या पतीने वायसीएम रुग्णालयातील दंतचिकित्सा डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर दंत चिकित्सा विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात शेख यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून खालच्या जबड्याची कुजलेली हाडे काढून घेतली व टायटेनियम धातूच्या पट्टीचे रोपण केले. त्यानंतर रुग्णालयात एक महिना उपचार केले. शेख सध्या ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नाही. असा आजार दर दहा लाखात 1.7 टक्के लोकांमध्ये आढळतो आणि हा आजार स्थानिकदृष्ट्या घातक असल्याने जबड्याचे हाड कुजत जाते. त्यामुळे दुर्मिळ आजारावर कोणताही खर्च न होता यशस्वी उपचार झाल्याने शेख यांनी समाधान व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. दंत चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांच्या समवेत डॉ. दीपक पाटील, डॉ. श्रीनिवास, डॉ. अजिंक्य, डॉ. श्रद्धा म्हस्के यांनी सहकार्य केले. यासाठी डॉ. तुषार पाटील पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------

09/03/2021
चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे, यासाठी पाठपूरावा : खासदार डॉ. अमोल कोल्हेपिंपरी (9 मार्च 2021) : सर्वसमावेशक गतिशील योजने...
09/03/2021

चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे, यासाठी पाठपूरावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे
पिंपरी (9 मार्च 2021) : सर्वसमावेशक गतिशील योजने अंतर्गत चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे. यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत. मागील 15 वर्षांत शिरूर मतदारसंघात होऊ शकले नाही ते माझा खासदारपदाचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदर केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड येथे केले.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा परिसंवादाचा कार्यक्रम शनिवारी (दि. 6 मार्च), रोटरी क्लब हॉल, संभाजीनगर चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे आणि पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, खजिनदार संजय ववले, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक महामार्ग शिरूर- तळेगाव महामार्ग यांना जोडणारा चाकण केंद्रबिंदू आहे. तसेच कर्जत-भोरगिरी-राजगुरुनगर ते शिरूर हा मुंबई ते नगर यांना जोडणारा नवीन मार्ग करण्याचा प्रयत्न सुरु आहे तो देखील याच टप्प्यातून जातो. चाकण-हिंजवडी मेट्रोचा डीपी प्लॅन एमएसआरडीसी चा रिंगरोड पुणे-नाशिक हायवेवरील चाकण, राजगुरुनगर, कळंब, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील बायपास दोन वर्षात मार्गी लावले. पिंपरी चिंचवड, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकणचे सर्वदृष्टीने महत्व वाढले आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नगर या हायवेला देखील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहा हजार कोटी रूपये मंजूर केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. रेडझोनमधील लघुउद्योजकांना भेडसावणा-या समस्यांबाबत तसेच महावितरण आणि पोलिस आयुक्तालयातील प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेऊ. जीएसटीच्या समस्यांवर अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा करू. केंद्राने जीएसटीबाबत निर्णय घेताना घाई केली आहे. त्याच्या परिणामाची झळ देशभरातील उद्योग धंद्यांबरोबरच पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यालादेखील बसली आहे, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, एमएसएमई आणि लघुउद्योजक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान यांचे झाले आहे. या लघुउद्योजकांना दिलासा देण्यासाठी किमान वर्षभर भाडे न आकारता जागा द्यावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे स्वागत प्रास्ताविक करताना म्हणाले की, वन नेशन वन टॅक्स यासाठी केंद्र सरकारने जीएसटी लागू केला. तरी देखील 50 लाखांवरील जास्त उलाढाल असणा-या लघुउद्योजकांना उलाढाल कर आकारला जातो. जीएसटी रिटर्न भरल्यानंतर बदल करता येत नाही. चूक झाल्यानंतर बदल करण्यासाठी पुन्हा एप्रिल महिन्यापासूनचा दंड भरावा लागतो. जीएसटी भरण्यास उशीर झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड अधिक व्याज आकारले जाते. हे सर्व अन्यायकारक असून लघुउद्योजकांचे आर्थिक व मानसिक शोषण करणारे आहे. तसेच एमएसएमई व लघुउद्योजकांना राष्ट्रीयकृत बँकांची पत व कर्ज वितरणाची धोरणे बदलण्याची गरज आहे. यांच्या जाचक नियमांमुळे इच्छा नसतानाही लघुउद्योजकांना सहकारी, खासगी बँका किंवा सावकारांकडून वाढीव दराने कर्ज घ्यावे लागते. अर्थमंत्री, पंतप्रधान भाषणात नेहमी एमएसएमई आणि स्मॉल स्केल देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हणतात. परंतू, त्यांच्यासाठी काहीही करताना दिसत नाहीत.
माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे म्हणाले की, तळवडे भागातील रेड झोनमध्ये असणा-या लघुउद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत. पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांची रेडझोन व शास्तीकरातून मुक्तता करा. जीएसटी पूर्वी एलबीटी होता, आता तर लघुउद्योजकांना दंड अधिक शास्तीकर भरण्यासाठी अंतिम नोटीस पाठविल्या जात आहेत. ही भूमिका लघुउद्योजकांना त्रास देणारी आहे. एमआयडीसी ने प्लॉटींग करताना ड्रेनेज व्यवस्था केली नाही त्यामुळे इंद्रायणी पवना नदीत प्रदूषण वाढत आहे. पाणी ही काळाची गरज ओळखून धोरणे आखली पाहिजेत.
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका लघुउद्योजकांकडून कर आकारते परंतू, साध्या स्वच्छतेसारख्या सुविधादेखील देत नाही.
कार्यक्रमाच्या आयोजनात संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, उमेश लोंढे, हर्षल थोरवे, विजय खळदकर, विनाद मित्तल आदींनी सहभाग घेतला. सुत्रसंचालन जयंत कड यांनी तर आभार संजय जगताप यांनी मानले.
-------------------

07/03/2021

Happy womens day

Address

Pimpri
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pronews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pronews:

Share