Ekta Masik - एकता मासिक

Ekta Masik - एकता मासिक 'एकता' मासिक
स्थापना - 1948
राष्ट्रदेवतेचे शब्द पूजन
✍️📖📚🙏

एकता- सप्टेंबर -2025 किंमत 50  रु. (कुरीयर दर 40)वार्षिक वर्गणी -500 (+ 250 पोस्टल दर)त्रैवार्षिक वर्गणी-1300 (+250  पोस...
12/09/2025

एकता- सप्टेंबर -2025
किंमत 50 रु. (कुरीयर दर 40)
वार्षिक वर्गणी -500 (+ 250 पोस्टल दर)
त्रैवार्षिक वर्गणी-1300 (+250 पोस्टल दर)
संपर्क -8956977357

संपादकीय आहे – ‘सार्वभौम भारताचा वास्तववादी राजनय !’
जागतिक परिस्थिती जशी बदलली तशी भारताची भूमिका सुद्धा बदलणे स्वाभाविक आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचा आणि भारताने चीनशी आर्थिक जवळीक साधण्याचा राजनय वास्तववादी आहे. एकीकडे ब्रिक्स संघटन आणि एकीकडे क्वाड संघटन हे सुद्धा वास्तव आहे. भारताने हे सर्व संतुलन उत्तमपणे पेलले आहे. याचे विवेचन यात केले आहे.

नुकतेच तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ‘डाव्यांना आळा’ या लेखात अभिजित जोग यांनी त्यांचे विश्लेषण केले आहे. जनसुरक्षा कायदा, एन.सी.ई.आर.टी च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील बदल आणि जे.एन.यु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरु झालेले अध्यासन, हे ते निर्णय आहेत, जे डाव्या वळवीला नियंत्रणात ठेवू शकतात.

पंकज जयस्वाल यांचा ‘भगवा दहशतवाद नव्हे, भ्रष्ट मानसिकता’ या लेखात मालेगाव खटला आणि त्याच्याशी संबंधीत असणाऱ्या बाबींचे विवेचन केले आहे. ‘हिंदू दहशतवाद’ असे संबोधत अनेकांनी समाजात हिंदू धर्माच्या विषयी मने कलुषित करण्याचे कारस्थान राबवले होते.

अॅड.कुणाल रानडे यांचा ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक – 2024 ’ हा लेख यातील कायदेशीर तरतुदींची माहिती आणि आवश्यकता स्पष्ट करणारा आहे.

सुप्रसाद पुराणिक आणि स्वप्नील नहार यांचा ‘पुणे परिसरातील गणेश उपासना’ हा लेख ऐतिहासिक संदर्भांसह उपयुक्त माहिती देणारा आहे. गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या संप्रदायास गाणपत्य संप्रदाय म्हणतात. त्याअनुषंगाने हा अभ्यासपूर्ण लेख आहे.

शौनक कुलकर्णी यांचा ‘मालभाडे समानीकरण धोरण’ हा लेख –Freight Equalization Policy – या विस्मृतीत गेलेल्या धोरणाविषयी आहे. या धोरणाने प्रादेशिक आर्थिक विषमतेची बीजे रोवली गेली होती. यातूनच पुढे सामाजिक आणि राजकीय अस्मितांची पायाभरणी झाली. यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे.

‘कृतार्थ जेष्ठत्व’ हा अत्यंत वाचनीय लेख आहे प्रकाश क्षीरसागर यांचा. वयोमानाप्रमाणे काही गोष्टींचा शांतपणे स्वीकार करणे आणि आपल्या अस्तित्त्वाने कुटुंबाला समाधान देणे हे या लेखातून घ्यावे. वय वाढल्यावर जीवनाप्रती, कुटुंबातील व्यक्तींच्या विषयी कटुता वाढू न देता, जे जे आयुष्यात मिळाले त्याविषयी समाधान बाळगले पाहिजे. मागितल्याशिवाय सल्ला न देणे, तरुण पिढीशी तुलना करून त्यांना टोमणे न मारणे अशी पथ्ये पाळून, कसे सुखाने जगावे हे या लेखात वाचायला मिळते.

अपर्णा परांजपे यांचा ‘सार्थकता’ हा लेख आपल्याला आध्यात्मिक मार्गाची अनुभूती देतो. जीवनाकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी विकसित करून भगवंत हृदयस्थ आहे याची खत्री बाळगायला शिकवतो.

‘ऑन लाईन यशाची मेजवानी’ – ही मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल यांची मुलाखत घेतली आहे अक्षय जोशी यांनी. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्य यांची जोड द्यावी लागते. मराठी पदार्थांना प्रथमच युट्युबवर घेऊन जागतिक स्तरावर एक चविष्ट ‘क्युझिन’ अशी ओळख मिळवून देणाऱ्या बाचल यांची ही मुलाखत अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

‘वंदनीय प्रमिला मावशी’ हा लेख सुनीला सोवनी यांचा आहे. त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिला मावशी यांच्या कार्याचा, स्वभावाचा परिचय करून देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोनाली तेलंग यांचा ‘बदलते कुटुंब’ हे लेख समाजातील बदलांचा कुटुंबावर होणारा परिणाम स्पष्ट करतो. फक्त ‘मी’ च्या भोवती फिरणारी व्यक्तीकेंद्रितता, वाढते घटस्फोट ही कुटुंबाच्या विघटनाची नांदी आहे.

डॉ. सुमंगला बाकरे यांचा ‘श्रीसंत जनाबाई यांचा स्त्री जागर’ हा लेख त्याकाळातील ‘स्त्री-भान’ याची जाणीव करून देतो. भक्तीत रंगणाऱ्या जनाबाई त्याकाळातील स्त्रियांच्या जीवनावरही सामाजिकदृष्ट्या भाष्य करीत होत्या. याचे विवेचन या लेखात आहे.

वर्षा दिवेकर यांचा ‘पिवळ्या पानांचा हिरवा देठ’ हा लेख वृद्धापकाळ सुखमय करण्याचा मार्ग सुचवतो.

कै. सुनीलराव खेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख रवींद्र वंजारवाडकर यांचा असून त्यांनी खेडकर यांच्या विषयीच्या अनेक आठवणी यात शब्दबद्ध केल्या आहेत.

असा हा एकताचा अंक असून सुजाण वाचकांना आवडेल याची खात्री वाटते.

02/09/2025
बदल ... अटळ ... राष्ट्रहितार्थ ....आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या  राजनयाचा  वास्तववाद आपण अनुभवत आहोत ...
31/08/2025

बदल ... अटळ ...
राष्ट्रहितार्थ ....
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या राजनयाचा वास्तववाद आपण अनुभवत आहोत ...

एकता साहित्य कट्टा (LitroVerse)  आणि फर्ग्युसन महाविद्यालयात (FC ) हेरिटेज वॉक आज एकत्रित संपन्न झाले .. रिमझीम पाऊस आणि...
24/08/2025

एकता साहित्य कट्टा (LitroVerse) आणि फर्ग्युसन महाविद्यालयात (FC ) हेरिटेज वॉक आज एकत्रित संपन्न झाले ..

रिमझीम पाऊस आणि मध्येच ऊन असे मस्त वातावरण होते. प्रा . डॉ . शिवानी लिमये यांनी महाविद्यालयाची सर्व ऐतिहासिक माहिती दिली . बॉटनिकल गार्डन , मुख्य इमारत , ॲम्फी थिएटर , ग्रंथालय व रिडींग हॉल , स्वा. सावरकरांची खोली आणि किमया - येथे आम्ही भेट दिली ...
त्या नंतर किमया - या खास विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या खुल्या मोकळ्या जागेत सर्वांनी मराठी , हिंदी , इंग्लीश स्वरचित कविता म्हणून दाखवल्या . वातावरण चांगलेच रंगतदार झाले . तसेच - महाविद्यालयातील माझा अविस्मरणीय प्रसंग - या विषयावर अनेकांनी अनुभव कथन केले ... खूप छान वाटले .. धमाल केली आज लहान मोठे सर्वांनी एकत्र येऊन !
साधारण ४०/४५ जणांनी आजच्या कट्टयाची रंगत वाढली .
लिमये मॅडमचे आणि सर्वांचे खूप आभार ...
Sharing some glimpses .... Enjoy ...! Thanks Manju Thakur , Aditya Katre , Purvaja Deshpande and dear all ... ,🎉📝📚

कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की एकताच्या जम्मू - काश्मीर विशेषांकाचे प्रकाशन १५ ऑगस्ट २०२५ रोजी  मोतीबाग येथे ध्वजवंदन...
24/08/2025

कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की एकताच्या जम्मू - काश्मीर विशेषांकाचे प्रकाशन १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोतीबाग येथे ध्वजवंदनाच्या सोहळ्यात संपन्न झाले .

जयंत उमराणीकर , IPS , पोलिस महासंचालक (निवृत्त), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर , भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे (मोतीबाग ) अध्यक्ष राजीव जोशी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव , एकता मासिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय आंबुलकर आणि एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उमराणीकर यांचे व्याख्यान झाले. ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करतांना त्यांनी हा बदललेला भारत असून एक समर्थ राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा उजळली असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच श्री. वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्यातील संघाच्या स्वयंसेवकांच्या योगदानाविषयी विवेचन केले . राष्ट्रीय ऐक्याच्या गरजे विषयी प्रतिपादन केले . अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ त्यांच्या व्याख्यानात होते.
राजीव जोशी यांनी संस्थेची भूमिका मांडली.
या आधी कै . दामूअण्णा दाते संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन श्री . सुहास राव हिरेमठ यांच्या हस्ते झाले.
एकता मासिकाचा जम्मू आणि काश्मीर विशेषांक संग्रही ठेवावा असा आहे. काश्मीरचा प्राचीन , मध्ययुगीन तसेच आधुनिक इतिहास , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून २०२५ पर्यंत काश्मीर येथे घडवून आणलेला विकास , कलम ३७० , शारदा विद्यापीठ , काश्मीरच्या वीरांगना , जम्मू आणि काश्मीर चे सणवार , संस्कृती तेथील खादय संस्कृती आणि पर्यटन या सर्व पैलूंसह ऑपरेशन सिंदूर , हायब्रीड वॉर , डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे योगदान यावर लेख आहेत. काश्मीरी हिंदू संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोगत त्यात आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संयोजक इंद्रेश जी कुमार यांची मुलाखत सुद्धा या अंकात समाविष्ट केलेली आहे.

या प्रसंगी एकताचे मानसी ठाकूर , आदित्य कात्रे , प्रदीप उपासनी तसेच एकता मासिकाचे काही लेखक , जाहिरातदार आणि हितचिंतक याप्रसंगी उपस्थित होते.

अंक परिचय एकता - ऑगस्ट - जम्मू आणि काश्मीर विशेषांक किंमत - 50 रुपये (कुरीअर दर 40 रुपये ) वार्षिक वर्गणी - 500 ( + 250 ...
24/08/2025

अंक परिचय
एकता - ऑगस्ट - जम्मू आणि काश्मीर विशेषांक
किंमत - 50 रुपये (कुरीअर दर 40 रुपये )
वार्षिक वर्गणी - 500 ( + 250 पोस्टल दर)
त्रैवार्षिक वर्गणी - 1300 ( + 250 पोस्टल दर )
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे - हिंदू ऐक्यासाठी इतिहासाचा दाहक धडा ! काश्मीरच्या इतिहासातून हिंदूंनी बोध घ्यावा असे सर्व काही आहे.

काश्मीर परिवर्तनाचे मोदी दशक (2014 ते 2025 ) या मनोहर कुलकर्णी सरांच्या लेखातून जम्मू आणि काश्मीरच्या विकासाचा सविस्तर वेध घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी येथे विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण केले आहे. त्याविषयीचा हा लेख अवश्य वाचावा ..

नंदनवनातील दैत्यपर्व ( 1998-90 ते 2014 ) - हा देवीदास देशपांडे यांचा लेख काश्मीरी हिंदूंच्या हत्या , हिंदू स्त्रियांवरील अत्याचार या काश्मीरी इतिहासातील काळ्या प्रकरणावर प्रकाश टाकतो . दहशतवाद्यांच्या थैमानाची तीन दशकांची आकडेवारी
तारखांसह त्यांनी दिलेली आहे.

भूवरीच्या स्वर्गातील अस्थिरतेचे पर्व ( 1947 ते 1989-90 ) या लेखात मृदूला राजवाडे यांनी फाळणी , विलीनीकरण या पासून पुढील घडामोडींचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.

काश्मीर - इतिहासातून मिळणारा धडा - या लेखात पंकज जयस्वाल यांनी जम्मू आणि काश्मीरच्या प्राचीन आणि मध्ययुगिन इतिहासाचे आणि हिंदू राज्यकर्ते यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.

शारदा विद्यापीठ - ( इ .स.230 ते इ . स .1319 ) या लेखात श्वेता काजळे यांनी काश्मीरच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.

काश्मीरच्या रणदुर्गा - मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी यांनी प्राचीन काश्मीरमधील हिंदू राण्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे. कोटा राणीने शाह मिर ने निर्लज्जपणे केलेली निकाहाची मागणी धुडकवून आत्मसमर्पण केले .. आणि पुढे काश्मीर इस्लामी शासकाच्या हातात गेला . अत्यंत महत्वाचे संदर्भ या लेखात आहेत .

धर्म - संस्कृती समृद्ध कश्यपमेरु - या डॉ.आर्या जोशी यांच्या लघू लेखात निलमत पुराण आणि अन्य महत्वाचे संदर्भ आहेत .

मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक इंद्रेशजी कुमार यांची विशेष मुलाखत घेतली आहे रुपाली भुसारी यांनी. राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे कार्य, पहलगाम हल्ला , सिंधुदर्शन यात्रा , कलम 370 रद्द करणे या अनुषंगाने त्यांनी आपले विचार मांडले आहेत.

काश्मीर आणि डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी - या लेखात दत्तात्रय आंबुलकर यांनी मुखर्जी यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आहे .

ऑपरेशन सिंदूर आणि नंतर - हा ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांचा लेख लष्करी दृष्टीकोनातून भारतच्या राष्ट्रीय सुरक्षेचे विश्लेषण करतो .

ऑपरेशन सिंदूर - संमिश्र युद्धतंत्र हा विनय चाटी यांचा अभ्यासपूर्ण लेख आधुनिक युद्धातील हायब्रीड वॉरफेअर या विषयीची माहिती देतो.

संकटमोचक - गिरीश महाजन हा संजय जाधव यांचा लेख पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्या नंतर त्वरीत तिथे पोहचलेल्या माननीय आमदार महाजन यांच्या कार्याची माहिती देतो.

जम्मू आणि काश्मीर मधील राष्ट्र सेविका समितीचे योगदान - हा रंजना बजाज यांचा लेख असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसे सेवा कार्य तेथे चालते याचे थोडक्यात कथन त्यांनी केले आहे . ज्यांच्या घरात हिंसेचे थैमान आले , त्या घरांना भेटी देणे असो वा दवाखान्यात ज्या मुलांना भेटायला येणारे कुणी उरलेच नाही , त्यांना दत्तक घेऊन मोठे करणे असो ... मातृत्वाचा मोठा अविष्कार आणखी काय असू शकतो ? स्वतः चा जीव धोक्यात घालून मायेने मातृछत्र धरणे हे जम्मू मध्ये वर्षानुवर्ष समितीने साधलेले आहे .

हम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहे . त्याचा परिचय करून दिला आहे नंदिनी पित्रे यांनी .

काश्मिरी पंडित आणि पुणे - हे मनोगत आहे काश्मिरी हिंदू सभेचे अध्यक्ष राजन्दर प्रसाद राजदान यांचे
तर
काश्मीर - सनातन संस्कृतीच्या कुशीपासून विस्थापनाच्या शोकांतिकेपर्यंत - हे मनोगत आहे राहुल कौल यांचे . ते युथ फॉर पनुन काश्मीरचे चेअरमन आहेत.

कलम - 370 चा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे श्रीया अभिजीत बर्वे यांनी. संवैधानिक तरतुदींचा आढावा सोप्या भाषेत यात घेतला आहे.

जम्मू आणि काश्मीरची संस्कृती - हा अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे
डॉ . नयना कासखेडीकर यांचा. त्यांनी सिंधू दर्शन महोत्सव , शिकारा , केशर , गुरेज , ट्यूलिप या उत्सवांसह अन्य सण - वार , चालीरीती , खादय पदार्थ , लोकनृत्य , कला यांचा समग्र आढावा घेतला आहे .

जम्मू आणि काश्मीरची खाद्ययात्रा - हा रसभरीत लेख आहे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा . त्यांनी काही काश्मीरी पाककृती सुद्धा यात दिल्या आहेत.

पर्यटन जम्मूचं - या लघू लेखात अजय तेलंग यांनी जम्मूतील पर्यटन स्थळांची ओळख करून दिली आहे .
ससंदर्भ आणि संग्राहय असणारा हा एकताचा विशेषांक आहे . सुजाण वाचक याचे स्वागत करतील याची खात्री आहे .

एकता मासिकाकडून गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
10/07/2025

एकता मासिकाकडून गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

एकता ऑगस्ट - 2025जम्मू आणि काश्मीर विशेष संपर्क - 8956977357किंमत 50+40 (कुरीयर ) जम्मू आणि काश्मीर मध्ये एके काळी अत्यं...
08/07/2025

एकता ऑगस्ट - 2025
जम्मू आणि काश्मीर विशेष
संपर्क - 8956977357
किंमत 50+40 (कुरीयर )
जम्मू आणि काश्मीर मध्ये एके काळी अत्यंत प्रतिकुल वातावरणात सुद्धा तन , मन ,धनाने सेवा देणारी राष्ट्र सेविका समिति !
निर्वासित कुटुंबांचा आधार बनत, दुःखी घरांमध्ये जाऊन वेळोवेळी सांत्वन करत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सेविका ! रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या आणि ज्यांना भेटायला कुणी शिल्लकच राहिलेले नाही अशा बालकांच्या संगोपनाला वाहून घेणाऱ्या सेविका ! अनेक तरुणींचे चांगल्या घरांमध्ये विवाह करून देणे असो की त्यांना उच्च शिक्षण देऊन उत्तम सेवांमध्ये आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनवणे असो , राष्ट्र सेविका समितीचे जम्मू आणि काश्मीरमधील कार्य जाणून घ्या एकताच्या ऑगस्ट अंकात.
या इतक्या मोठ्या सेवाकार्याची लेख रुपात लहानशी दखल घेण्याचे भाग्य मला लाभले, म्हणून आभार !

15/02/2025
एकता-जानेवारी-2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष अंकाची किंमत - 50 वार्षिक वर्गणी - 500त्रैवार्षिक वर्गणी - 1300 सं...
04/01/2025

एकता-जानेवारी-2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष

अंकाची किंमत - 50
वार्षिक वर्गणी - 500
त्रैवार्षिक वर्गणी - 1300
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे ‘अहिल्येचा चैतन्यमयी जागर’
आधुनिक काळात ‘वर्क –लाईफ बॅलन्स’-कुटुंब –करीयर सांभाळणे हे शिकवण्यासाठी कुण्या पाश्चिमात्त्य उदाहरणांची गरज भारतीय स्त्रियांना नाहीच. कारण कुटुंब आणि राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या असामान्य कर्तृत्त्ववान स्त्रिया या मातीत आपल्या पाऊलखुणांचे ठसे उमटवून गेल्या.भारताच्या इतिहासातील अशी उदाहरणे एकमेवाद्वितीय आहेत.

एकताच्या या अंकाला अतिथी संपादक म्हणून मा.सुमित्राताई महाजन लाभलेल्या असून त्यांनी –‘प्रेरणादायी देवी अहिल्या’ हा लेख खास एकतासाठी पाठवलेला आहे. चौंडी गावाच्या कन्येने माळव्याची राजगादी सांभाळली हा इतिहास किती प्रेरक आहे हे यात सुमित्राताईंच्या शब्दात वाचायला मिळते.

‘अहिल्या देवींचे ऐतिहासिक महत्त्व’ हा अभ्यासपूर्ण लेख आहे सुधीर थोरात Sudhir Thorat यांचा. हिंदू धर्मरक्षण आणि संवर्धन यासाठी अहिल्यादेवींचे इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.इस्लामी शासकांनी उध्वस्त केलेल्या हिंदू मंदिरांची पुन्हा बांधणी करून त्यांनी धर्मरक्षण केले.

अहिल्यादेवींच्या आर्थिक धोरणावर लेखन केले आहे डॉ.देवीदास पोटे यांनी. राज्यात मालाच्या दर्जा प्रमाणे कर आकारणी , भिलकवडी कर ,शेतसारा सगळ्यांचा आढावा घेणारा हा लेख अवश्य वाचावा.

अहिल्येच्या सामरिक पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी Mohini Garge-Kulkarni यांनी. महिलांची सशस्त्र तुकडी तयार करणारी, राघोबादादांना परतवून लावणारी आणि इंग्रजांबद्दल पेशव्यांना सावध करणारी दूरदृष्टीची अहिल्या कशी रणरागिणी होती हे यात वाचावे .

‘अहिल्या देवी आणि पर्यावरण’ हा माहितीपूर्ण लेख आहे डॉ.राजेश मणेरीकर Rajesh Manerikar आणि चंद्रकला शिंदे यांचा . आज जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. अहिल्यादेवींनी त्याकाळी बांधलेल्या विहिरी-बारव,प्रवास मार्गांवर झाडे लावणे, निसर्गपूरक साधने वापरणे हे त्यांच्या कल्याणकारी धोरणासह पर्यावरण जागृतीची साक्ष देतात.

औरंगजेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वत: टोप्या विणून आणि कुराणाच्या प्रती हाताने लिहून स्वत:च्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खुप वेळा आपण ऐकतो ,पण अहिल्यादेवी कित्येक वर्ष एकभुक्त राहिल्या, पांढरी माहेश्वरी साडी आणि रुद्राक्ष माळ परिधान करून स्वत:च्या पैशाने देवळे, घाट आणि धर्मकार्ये केली हे किती जणांना माहीत आहे ? असा प्रश्न विचारला आहे शेफाली वैद्य Shefali Vaidya यांनी त्यांच्या ‘व्रतस्थ विरागी राणी अहिल्याबाई होळकर’ या लेखात....

‘आमच्या मानबिंदू –लोकमाता अहिल्यादेवी’ हा प्रा.आरती तिवारी यांचा लेख अहिल्या देवींच्या समग्र गुणांचा आढावा घेणारा असून आजच्या पिढीने त्यातून अवश्य प्रेरणा घ्यावी.

‘सामाजिक समरसतेच्या अग्रणी –अहिल्यादेवी’ हा लेख आहे डॉ.श्यामा घोणसे Shyama Ghonse यांचा आहे. भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्याला शूर तरुणाला –मग तो कोणतीही जातीचा असो –आपली कन्या देण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला आणि आमलात आणला. सामाजिक समरसता त्यांनी हिंदू ऐक्य समोर ठेवत आचरणात आणलेली होती.

‘लोककल्याणकारी अहिल्यादेवी’ हा Anjali Tagade अंजली तागडे यांचा लेख अहिल्यादेवींच्या समग्र धोरणावर प्रकाश टाकतो. त्यांनी लोककल्याण हेच ध्येय ठरवून अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. ‘एक भारत -श्रेष्ठ भारत,एक हिंदू -श्रेष्ठ हिंदू’ या जाणीवेची बीजे त्यांनी त्यांनी पेरली.

‘ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात अहिल्यादेवी’ हा अभ्यासपूर्ण ससंदर्भ लेख आहे प्रणव पाटील Pranav Patil यांचा.जॉन माल्कम यांच्या ग्रंथातील अहिल्यादेवींच्या दिनचर्येची नोंद असो की ‘अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस बायकात किंवा दौलतवंतांस कोणी योग्यतेस नाहीच नाही’ हे हैदराबादच्या निजामाचे पत्र असो. अशा ऐतिहासिक नोंदींचा उपयोग करून लिहिलेला हा लेख अवश्य वाचावा.

‘पुण्यश्लोक अहिल्या देवींची मंदिरे’ हा सर्वेश फडणवीस Sarvesh Fadnavis यांचा लेख हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी अहिल्यादेवींनी उभारलेल्या मंदिरांची नोंद घेतो. अनेक ठिकाणी स्वत: जमिनी विकत घेऊन मंदिरांची पुन्हा उभारणी त्यांनी केली. ही केवळ मंदिरांची उभारणी नव्हती तर उभारणी होती हिंदूंच्या स्वाभिमानाची !

अहिल्यादेवींच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त राष्ट्र सेविका समिति द्वारे राबवल्या गेलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आहे स्मिता पत्तरकीने यांनी.
तर ‘देवी अहल्या मंदिर –एक दीपस्तंभ’ हा राष्ट्र सेविका समिति नागपूर येथील वास्तू आणि सेवा यावर आधारीत लेख आहे मेधा नांदेडकर यांचा .

तसेच ‘राष्ट्रहिताचे करण्या चिंतन’ हा राष्ट्र सेविका समितीच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकणारा लेख आहे राधा भिडे यांचा.

स्त्रियांनी आपला आत्मसन्मान अवश्य जपावा पण त्याच बरोबर नम्रता बाळगणे , समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान देणे असे आपले संस्कार कधीच विसरू नये. अहिल्या देवींना त्यांच्या सासूबाईंनी पदराच्या पाच गोष्टी सांगितल्या त्या आजही स्त्रियांसाठी मार्गदर्शक आहेत . त्यावर आधारीत ‘जप तुझे स्त्रीत्त्व ,जप तुझी शालीनता’ हा लेख आहे स्मिता कुलकर्णी Smita Kulkarni यांचा.

अहमदनगर ते अहिल्या नगरी ही वाटचाल सोपी नव्हती. याविषयी अवश्य वाचावे ‘अहिल्या नगरीची कथा’ या रवींद्र मुळे यांच्या लेखात .

भारतीय ज्ञानाचा खजिना या लेख मालेतील ‘ओपनहायमरला हे समजलं पण..’हा प्रशांत पोळ Prashant Pole यांचा अप्रतिम लेख प्राचीन भारतीय विज्ञानाची महती स्पष्ट करतो. अणुबॉम्बचा जनक ओपनहायमरला अणुबॉम्बचे परीक्षण करतांना भगवतगीतेच्या ओळी आठवतात . गुरुत्त्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला हे आपण समजतो पण आपल्याच प्रश्नोपनिषधात दोन –अडीच हजार वर्षांपूर्वी गुरुत्त्वाकर्षणाविषयी लिहून ठेवलेले आहे याविषयी आपण अनभिज्ञ असतो... !

असा हा एकता मासिकाचा अंक संग्रही ठेवावा असा असून सुजाण वाचक याचे स्वागत करतील याची खात्री वाटते.

Address

1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918956977357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Masik - एकता मासिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekta Masik - एकता मासिक:

Share