Ekta Masik - एकता मासिक

Ekta Masik - एकता मासिक 'एकता' मासिक
स्थापना - 1948
राष्ट्रदेवतेचे शब्द पूजन
✍️📖📚🙏

09/06/2025

एकता मासिक आज 77 वर्ष पूर्ण करून 78 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . 8 जून 1948 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे , ॲड . बाबाराव भिडे यांनी एकता मासिकाची स्थापना केली . एकता मासिक कार्यालयात आजही सर्व जूने अंक - 1948 पासूनचे सुद्धा - जतन करून ठेवले आहेत .
अनेक बदल काळाप्रमाणे होणे गरजेचे असते.
गेल्या दोन वर्षात एकताचे फेसबुक आणि इस्टा पेज सुरु झाले .
एकता मासिक कार्यालयात आता यावर्षी पासून Journalism and Mass communication चे विद्यार्थी Internship साठी आम्ही घ्यायला सुरुवात केली आहे .
एकतामध्ये आदित्य कत्रे आणि पुर्वजा देशपांडे या विद्यार्थांनी तयार केलेला हा व्हिडीओ शेयर करत आहे .. अगदी बेसिक स्वरूपाचा आहे. पण त्यांनी प्रयत्न चांगला केला आहे...

एकताच्या वर्धापनदिनानिमीत्ताने शेअर करते आहे . यात त्यांचे कौतुक व्हावे आणि प्रोत्साहन मिळावे हा हेतु आहे ....

एकता जून-2025अंक परिचय अंकांची किंमत -50वार्षिक वर्गणी -500 त्रैवार्षिक -1300संपर्क - 8956977357संपादकीय आहे - 'ऑपरेशन स...
05/06/2025

एकता जून-2025अंक परिचय
अंकांची किंमत -50
वार्षिक वर्गणी -500
त्रैवार्षिक -1300
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे -
'ऑपरेशन सिंदूरचा गर्भितार्थ ' -
‘नया कश्मीर’मध्ये हमासच्या मदतीने रेझिस्टंट फ्रंट हिंदूंना निवडून ठार करू शकते तर याच ‘नया कश्मीर’साठी मोदीप्रणीत ‘नया भारत’ ठसठशीत हिंदू नावासह लष्करी कारवाई सुद्धा करू शकते ! ‘सिंदूर’ केवळ सांस्कृतिक-धार्मिक दृष्ट्याच नाही तर स्त्रियांच्या सामर्थ्याचा आधुनिक हुंकार सुद्धा यापुढे असणार आहे.

'पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर’ हा लेख आहे एअर मार्शल प्रदीप बापट यांचा. यात त्यांनी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताचे ऑपरेशन सिंदूर हे प्रत्युत्तर , यावर उत्तम विवेचन केले आहे.

महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी, ‘आणीबाणी कधीच विसरून चालणार नाही !’ हा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. आणीबाणी आणि इंदिरा गांधींनी केलेला अधिकाराचा गैरवापर जाणून घेण्यासाठी अवश्य वाचावा.

डॉ.शरद कुंटे यांनी ‘वंदे मातरम्’ या लेखात इतिहासाचा आढावा घेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, आनंदमठ कादंबरी तसेच बंगालची फाळणी याविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होऊन गेली असून हा ‘हिंदू साम्राज्य दिवस’ का मानला जातो आहे ? याचे अप्रतिम विवेचन केले आहे अमोल पुसदकर Amol Pusadkar यांनी.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. श्री.गुरुजी यांची ५ जूनला पुण्यतिथी असते. त्यांच्या समग्र आयुष्यावर माहितीपूर्ण लेख आहे प्राचार्य प्र.श्री.डोरले यांचा. गुरुजींच्या मनातील सेवेची आंतरिक ओढ आणि त्यांचा संघातील प्रवेश, सेवा याविषयी अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक माहिती यात आहे.

'संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा ....
माझ्याच किनाऱ्यावरती
लाटांचा आज पहारा’
या कवी ग्रेसच्या ओळी गुंफत पावसाळ्याचे स्वागत करणारा तरल लेख ‘पाऊस वेळा’ आहे मयूर भावे Mayur Bhave यांचा.

'म्युझियम ऑफ फ्युचर ' या दुबईतील अभिनव वास्तूची विलक्षण माहिती देणारा लेख रमेश पोफळी Dnyanada Pophali Supekar यांनी लिहिलेला आहे.

'आद्या ' पुरवणीत मीना साठे यांनी खास मुलाखत घेतली आहे पुण्यातील रिक्षा चालक कल्पना जाधव यांची !

'राष्ट्र सेविका समिती आणि आणीबाणी ' हा लेख आहे शैलजा देशपांडे यांचा.

राष्ट्र सेविका समितीच्या प्रभावती मायदेव यांच्या आठवणी जागवल्या आहेत विद्याताई मायदेव यांनी तर लता देशपांडे यांनी समितीच्या प्रतिभा देशपांडे यांच्या कार्यावर लेख लिहिलेला आहे. अवश्य वाचावा.

भारताची जैव अर्थव्यवस्था हा अत्यंत माहितीपूर्ण लेख लिहीला आहे पंकज जगन्नाथ जयस्वाल Pankaj Jayswal यांनी. विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली यात कशी वाढ झाली आहे ते विवेचन नक्की वाचावे.

‘बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर
पंछी को छाया नही, फल लागे अति दूर’
हे व्यवहारी तत्त्वज्ञान आपल्या दोह्यांच्याद्वारे सांगून सामान्य लोकांना आध्यात्माचा मार्ग दाखवणाऱ्या संत कबीरांची या महिन्यात जयंती असते. त्यानिमीत्त 'संत कबीर-एक चिंतन' हा लेख आहे सुप्रिया देशपांडे यांचा.

अश्विनी विद्या विनय भालेराव यांचा- 'शहरीकरणाच्या विळख्यात गवसलेले ‘गावपण’- हा लेख, अहिल्या नगर येथील श्रीरामपूरला त्यांना मिळालेले अनुभव शब्दबद्ध करतो.

डॉ.प्रभाकर पांडुरंग आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे डॉ.क.कृ. क्षीरसागर यांनी.
अरुण देशपांडे यांनी काव्यरेखा या रेखा पिटके- आठवले Rekha Pitke-Athavale यांच्या कविता संग्रहाचा उत्तम परिचय करून दिला आहे.

स्वाती खटी , अरुण देशपांडे Arun V. Deshpande आणि कविता मेहेंदळे यांच्या कविता सुद्धा या अंकात आहेत.

पावसाच्या अनेक सरींनी एकत्र बरसून धरतीला तृप्त करावं, तसा हा विविध लेखांनी युक्त असणारा अंक वाचकांची ज्ञानतृष्णा तृप्त करेल अशी आशा वाटते.

मे- एकता -2025- अंक परिचयवार्षिक वर्गणी - 500त्रैवार्षिक - 1300 कुरीयर चार्जस - 250संपर्क - 8956977357संपादकीय आहे ‘शहरी...
03/05/2025

मे- एकता -2025- अंक परिचय
वार्षिक वर्गणी - 500
त्रैवार्षिक - 1300
कुरीयर चार्जस - 250
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे ‘शहरी नक्षलवाद्यांचे विचारविष’
विशेष जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी नक्षलवाद्यांनी गरळ ओकत विष पसरवले. तथाकथित अन्यायाच्या विरोधात शहरी भागातील जी तरुणाई लढते, तिला हे ठाऊक नसते की तिचा वापर कोण करुन घेत आहे. शहरी नक्षलवादी आपल्याच भोवती वावरत समाजात तेढ वाढवत असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही ही गंभीर समस्या आहे.

'वक्फ कायदा दुरुस्ती – ना अतर्क्य, नाही अकस्मात ! ' हा लेख आहे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. सुशील अत्रे यांचा. वक्फ कायदा, त्यातील दुरुस्ती आणि त्याविषयी सर्व विवेचन सोप्या भाषेत या लेखात केले आहे. अवश्य वाचवा असा हा लेख आहे .

स्वाती दाढे या सुप्रसिद्ध बंगाली अनुवादक - लेखिका असून त्यांनी ‘मराठीची अभिजातता’ हा लेख महाराष्ट्रदिनाच्या निमित्त लिहिला आहे. अभिजात भाषेसाठीचे निकष यात स्पष्ट केले आहेत.

'भारतीय वीरांगना’ हा लेख आहे सोनाली तेलंग यांचा. आपल्या प्राचीन वारशाची आठवण ठेऊन ज्यांच्याकडून निरंतर प्रेरणा घ्यावी, अशा अनेक वीरांगना आहेत. त्यातील काही विरांगानांवर हा लेख आहे.

'श्रीक्षेत्र नेवासे ' हा येथील श्रीविष्णूचे अर्धनारी नटेश्वररूप आणि तेथील जत्रा यावर आधारीत लेख आहे रवींद्र मुनोत नेवासकर यांचा . वाचकांना गावच्या जत्रेचा अनुभव देणारा लेख नक्की वाचावा.

स्मिता कुलकर्णी या समुपदेशक असून त्यांचा ‘का वाढतंय मुलींचे लग्नाचे वय ?’ हा सद्य परिस्थितीवर विचार करायला लावणारा लेख आहे.

एकता मासिकाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील तृतीय पारितोषिक विजेता ‘राजेश्री ते लोकमाता’ हा स्वाती रानडे यांचा निबंध या अंकात प्रसिद्ध केला आहे.

'प्रणतो s स्मि विनायकम’ हा लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त मधुरा कुलकर्णी यांनी लिहीला असून यात त्यांच्या आध्यात्मिक धरणांचे विवेचन केले आहे.

प्रशांत पोळ यांनी 'भारतीय ज्ञानाचा खजिना ' या सदरात ‘शिवलिंग काय आहे ?’ याचे अप्रतिम विवेचन केले आहे. समाजात प्रचलित असणारा समज आणि प्राचीन संदर्भ देऊन त्यांनी शिवलिंगाचे वैश्विक चैतन्य याचे विश्लेषण केले आहे.

लव्ह जिहादच्या शेकडो केसेस ज्यांनी हाताळल्या आहेत, त्या मीराताई कडबे , यांची मुलाखत घेतली आहे अश्विनी अडोणी यांनी. मीरा ताईंनी आपले कुटुंब सांभाळून समाजसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. त्यांची प्रेरणादायी मुलाखत अवश्य वाचावी. लव्ह जिहाद मध्ये अडकवल्या जाणाऱ्या हिंदू मुलींवर त्या सातवी - आठवीत असल्यापासून पाळत ठेवली जाते . तिच्या घरची सर्व माहिती मिळवली जाते . मोठे नियोजन करून तिला फसवले जाते . वयात येणाऱ्या मुलींच्या पालकांनी खूप जागरूक राहणे ही काळाची गरज आहे .

वर्षा कौशिक यांचा ‘श्री शक्तीपीठ’ हा लेख राष्ट्र सेविका समितीच्या आद्य प्रमुख संचालिका वंदनीय मावशी केळकर यांच्या स्मारक स्थळाची माहिती देतो.

सुनिला चापोरकर यांचा ‘अ’क्षर ठेवा हा लेख समितीच्या हस्तलिखितांची माहिती देतो.

‘ज्येष्ठांची सेवा –मुक्ताईचे व्रत’ हा लेख खेड येथील मुक्ताई शाखेच्या सेवा कार्याचा आढावा घेणारा आहे.

तर माणिक कद्रे यांनी – 'तेजस्विनी सेवा समिती, यवतमाळ' या लेखाद्वारे तेथील तेजस्विनी कन्या छात्रावास आणि सेवांची माहिती दिली आहे.

सोनाली देशपांडे यांनी – ‘आधारवड – राजमाता जिजाबाई ट्रस्ट’ आणि ‘स्नेहशील ताई- समाजकार्याची दीपशिखा’ हे दोन लेख लिहीले आहेत. ठाण्याच्या जिजामाता ट्रस्टची माहिती आणि समाज समर्पित ताई फणसे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे.

भावना पारखी यांनी स्त्री-शिक्षणालय आणि पथप्रदर्शिनी –मा. स्व.बकुळताई देवकुळे हे दोन लेख लिहीले आहेत. त्यात त्यांनी अनुक्रमे स्त्री-शिक्षणालय आणि समितीच्या पहिल्या शाखेच्या सेविका मा.बकुळताई देवकुळे यांच्या कार्याविषयी माहिती दिलेली आहे.

अक्षय जोशी यांनी नीलेश भिसे यांच्या – वीरांचे वीर –धर्मवीर या संभाजी महाराजांवरील अप्रतिम पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिला आहे.

तर पराग लोणकर यांनी ग्रेट आयडॉल्स या अरविंद राणे लिखित थोरांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे.

असा हा एकताचा अंक वाचकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते.

अंक परिचय - एप्रिल एकता – 2025 - नानाराव ढोबळे विशेष -अंकाची किंमत –50 वार्षिक वर्गणी-500  त्रैवार्षिक वर्गणी –1300 संपर...
05/04/2025

अंक परिचय - एप्रिल एकता – 2025
- नानाराव ढोबळे विशेष -
अंकाची किंमत –50
वार्षिक वर्गणी-500
त्रैवार्षिक वर्गणी –1300
संपर्क -8956977357

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख स्व.नानाराव ढोबळे यांची १ एप्रिल २०२४ ला जन्मशताब्दी झाली असून त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून एकता मासिकाने हा अंक काढला आहे.
संपादकीय आहे – ‘आदर्श प्रचारक नानाराव ढोबळे’
नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दीनंतर सुद्धा आज नानांचे कार्य प्रेरणा मानत स्वत:ला घडवणारे स्वयंसेवक संघात आहेत. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यश आहे. ‘प्रचारक व्यवस्था’ हे संघाचे वैभव आहे. आपले जीवन संघाच्या शिस्तीत, संघाच्या रचनेत समर्पित करून पुन्हा आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे हे अनमोल हिरे आहेत. ‘भगवाध्वज’ हा आपला गुरु मानून, आता विजयादशमीला शताब्धी साजरी करणारी ही संघटना अजूनही कशी काय जोमाने वाढत आहे ? असा प्रश्न अनेकांना आज पडतो आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरित करणारे अॅड.इनामदार (वकील साहेब) यांच्यासारखे समर्पित प्रचारक त्यांच्या सहवासात होते हा प्रचारक व्यवस्थेचा परिणाम आहे. या अनुषंगाने नानाराव ढोबळे यांचे कार्यविशेष यात मांडलेले आहे.

भैयाजी जोशी यांचा लेख – ‘प्रेरक व्यक्तिमत्त्व नानाराव ढोबळे’ – आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. संघाच्या शिस्तीत राहून नानांनी केलेले सेवाकार्य, त्यांची संवेदनशीलता यावर त्यांनी लिहिले आहे.

सुहासराव हिरेमठ – ‘नवदधीची नाना ढोबळे’ या लेखात नानांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. नानांनी पर्यावरण, जनजाती, स्त्री-शक्ती अशा अनेक गतीविधींना प्रेरणा दिली. ते संतांच्या भक्तीत रमणारे आणि तळागाळातील व्यक्तीत देव शोधणारे, अत्यंत प्रेमळ असे होते. याविषयी ओघवत्या शैलीतील हा लेख अवश्य वाचवा.

प्राचार्य श्याम अत्रे यांनी ‘संघ्योगी नाना ढोबळे’ या लेखातून नानाच्या समग्र जीवनाचा आढावा घेतलेला आहे. अत्रे सरांनी नानांवर पुस्तक सुद्धा लिहिलेले असल्यामुळे त्यांचा लेख अत्यंत वाचनीय,प्रेरक असा झालेला आहे.

दिलीप क्षीरसागर यांनी – ‘समाज समर्पित नानाराव ढोबळे’ – या त्यांच्या लेखात नानांनी जळगाव,धुळे,नाशिक तसेच नंदुरबार या ठिकाणी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला आहे. गांधी हत्येनंतर उफाळलेल्या क्षोभात नानांचे जळगावचे तीन माजली घर जाळून बेचिराख केले गेले. तरीही किती खडतर परीस्थितीत नानांनी आपले समग्र जीवन संघकार्याला वाहिले होते या विषयी या लेखातून शिकण्यासारखे आहे.

दादा इदाते (पद्मश्री) यांनी ‘महाराष्ट्रीची माऊली –नाना ढोबळे’ या लेखातून नानांचे संवेदनशील मन उलगडलेले आहे. त्यांनी नानांच्या सहवासात काम केलेले असल्यामुळे समरसतेची बीजे कशी नानांमुळे रुजली याचे अनुभव कथन केले आहे.

स्व.नाना ढोबळे यांनी लिहिलेला – ‘एक देश व्याप्त शक्ती –वहिनी’ हा लेख त्यांच्या ‘समाज तळातील मोती’ या पुस्तकातून घेतला आहे. घरोघर वावरणारी स्त्रीशक्ती-मातृशक्ती पाठीशी असल्यामुळे संघाचे स्वयंसेवक, प्रचारक हे सेवाकार्याला कसे वाहून घेऊ शकतात याविषयीची कृतज्ञता नाना यात व्यक्त करतात. हा लेख वाचतांना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...! संघाच्या महिला समन्वयाची बीजे यात सापडतात.

वा.रा.शिंगणे यांनी ‘आधुनिक ॠषी- नानाराव ढोबळे’ या लेखातून नानाचे साधे व्यक्तिमत्त्व तसेच श्री.गुरुजी यांच्या विषयीचा अनुभव यात वर्णिलेला आहे. अवश्य वाचवा.

दिनकर देशमुख यांनी – ‘नाना म्हणजेच गोविंद श्रीधर ढोबळे’ या त्यांच्या लेखात नानांनी जनजातींसाठी केलेले, दुष्काळात केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत.

यामिनी पांडे यांनी – ‘दिनदर्शिका’ – या लेखातून राष्ट्र सेवा समीतिद्वारा निघणाऱ्या हिंदू परंपरा आणि संस्कृतीच्या माहितीने परिपूर्ण असणाऱ्या दिनदर्शिकेची माहिती दिलेली आहे.

जयंत पारखी यांनी ‘कै. नानाराव ढोबळे यांची मंगलनिधी योजना’ याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती आणि नानांच्या सहवासातील आठवणी दिलेल्या आहेत.
तसेच विमल पारखी यांनी सुद्धा अनुभव लिहीला आहे.

केसरसिंह राजपूत यांनी -
' समर्पित संघयोगी - सोशिक संघकर्मी' या लेखात आणिबाणी च्या काळातील नाना राव ढोबळे यांच्या सह घेतलेला अनुभव लिहीलेला आहे.

लक्ष्मण हिरालाल कदम यांनी –‘कै. नानाजी ढोबळे –एक प्रेरणा’ या लेखात शिवरायांची पत्रके वाटप, नाना आणि त्यातून त्यांनी घेतलेला बोध ही सुरेख आठवण कथन केली आहे.

गोविंद भास्कर यार्दी यांनी –‘राष्ट्रभक्त संत –कै. नानाराव ढोबळे’ – या लेखात खान्देशच्या रणरणत्या उन्हात पायी मैलोन मैल चालणाऱ्या नानांच्या तरल आठवणी लिहिलेल्या आहेत. अक्कलकोस गावात सामुहिक शेतीचा प्रयोग नानांनी केला होता. बौद्धिक देतांना नाना कसे भारुन टाकत असत यासारख्या अनेक आठवणी या लेखात आहेत.

‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ – या सदरात लता देवघरे यांनी नानीबाई कोलते या राष्ट्र सेविका समितेच्या प्रेरक व्यक्तीमत्त्वाविषयी माहिती दिलेली आहे. तर सुनीता लुले यांनी आद्य सेविका ताराताई देशपांडे यांच्या विषयी लेखन कलेले आहे. या सदरातून राष्ट्र सेविका समितीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक सेविकांच्या कार्याचा परिचय करून दिला जाणार आहे. युवतींनी यातून अवश्य प्रेरणा घ्यावी.

प्रशांत पोळ –यांनी ‘प्राचीन ज्ञानाचा खजिना’ या लेखमालेत ‘लोथल-प्राचीन वैभवाचा खणखणीत पुरावा’ – या लेखात लोथल येथील समृद्ध अभियांत्रिकीचा आढावा सप्रमाण घेतलेला आहे. येथील प्राचीन तंत्र आजच्या सिव्हील अभियांत्रिकीतील ‘इंग्लिश बॉंण्ड’शी साध्यर्म्य दाखवणारे प्रगत होते याविषयी त्यांनी विवेचन केलेले आहे.

असा हा एकताचा अंक संग्रही ठेवावा असा आहे.

एकता - संपादकीय - मार्च २०२५ - रुपाली भुसारी ***स्त्री-वादाच्या पुनर्विचाराची  गरज ***आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चला ...
05/04/2025

एकता - संपादकीय -
मार्च २०२५ - रुपाली भुसारी

***स्त्री-वादाच्या पुनर्विचाराची गरज ***
आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चला जगभर साजरा केला जातो. जागतिक पातळीवर स्त्रियांच्या हक्काविषयी दरवर्षी यानिमित्त चर्चा होतात. काही वर्षांपूर्वी स्त्रियांच्या राजकीय हक्क्कांसाठी सुरु झालेला लढा जागतिक पातळीवर स्त्रियांना नवी दिशा देऊन गेला होता.अनेक देशांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क नव्हते त्यासाठी संघर्ष करावा लागला. हळूहळू परिस्थिती बदलली. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांच्या हक्कांचा विचार केला गेला आणि राज्यव्यवस्थेने हे हक्क मान्य केले. जागतिक महिला दिन हा स्त्रीवादी विचारधारेचे प्रतिक बनला. आता बदलत्या सामाजिक परीस्थितीत पुन्हा एकदा स्त्रीवादाचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
सुदैवाने भारतात राजकीय हक्कांसाठी तसा लढा स्त्रियांना द्यावा लागला नाही. मतदान करणे, निवडणूक लढवणे, राजकीय पदे भूषवणे हे सगळे राज्यघटनेने स्त्रियांना बहाल केले. त्यामुळे पाश्चात्य देशातील स्त्रीवाद आहे त्या स्वरूपात भारतात कधी लागू करण्याची आवश्यकता भासली नव्हती. काही काळापूर्वी भारतीय समाजात काही आव्हाने होती. उदाहरणार्थ-जेव्हा स्त्रिया हुंडाबळी जात होत्या, सासरी छळ होऊन आत्महत्या कराण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नव्हता तेव्हा सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रियांची आंदोलने भारतातही काही प्रमाणात झाली. या समस्या अगदी सार्वत्रिक नव्हत्या. काही प्रमाणात त्या होत्या आणि कालांतराने त्याचे निराकरण केले गेले. पुढे सामाजिक परिस्थिती बदलत गेली. कायदे सुद्धा अधिक प्रभावी झाले.
जसा संघर्ष युरोपात स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी करावा लागला होता, तशी परिस्थिती भारतात कधी नव्हती. पण ‘स्त्रियांचे हक्क’ या शब्दाला इतके ठासून मांडले गेले की त्याचा प्रवास व्यक्तीवादाकडे कधी सुरु झाला ते कळले नाही. ‘चूल आणि मुल’ ह्या शब्द प्रयोगाला इतके हीन मानले गेले की कुटुंबासाठी स्वयपाक बनवणे आणि अपत्यांना जन्म देणे,त्यांचे संगोपन करणे हे जगातील सगळ्यात कनिष्ठ दर्जाचे काम आहे असे मानणारी एक पिढी इथे तयार झाली आहे .
मुळातच पाश्चात्य स्रीवाद हा संघर्षाची बीजे घेऊन येतो. भारतात स्त्रीवाद असा कधी नव्हताच. भारतात पुरुष आणि स्त्री हे परस्पर पूरक मानलेले आहेत. पुरुष आणि प्रकृती हे त्यांचे नैसर्गिक वेगळेपण स्वीकारून सर्वमान्य तत्त्व प्रस्थापित झालेले आहे. प्राचीन काळापासून अर्धनारीनटेश्वर ही संकल्पना असो, धार्मिक विधीत स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीने सहभाग असो, स्त्रियांना शक्तीचे स्वरूप मानणारी आपली संस्कृती आहे. याचा विसर पडलेली स्त्रियांची पिढी अलीकडे समाजात दिसून येते आहे.
विशेषत: उत्तर स्त्रीवादाने भारतीय समाजाला आपल्या विळख्यात घेतले आहे . पाश्चात्य स्त्रीवादाची पुढची पायरी म्हणजे हा उत्तरस्त्रीवाद ..! आधी पाश्चात्य स्त्रीवादाने प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी करणे म्हणजेच ‘समता’ हा अत्यंत घातक दृष्टीकोन नव्या पिढीवर बिंबवला. एखादी गोष्ट पुरुष करतो ती स्त्रियांनी करणे म्हणजेच तिने स्वत:ला सिद्ध करणे आहे असा समज झालेला दिसून येतो. विशेषत: महाविद्यालयीन युवतींच्या मनोधारणा त्या पद्धतीने प्रभावित झालेल्या दिसून येतात. विवाह संस्था म्हणजे स्त्रियांचे शोषण करणारी व्यवस्था मानून त्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून पाहणारी मुलींची पिढी आज समाजात वावरते आहे. विवाह केल्याने आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्याला मुकावे लागेल अशी त्यांची धारणा झाली आहे. इतकेच काय तर अपत्य प्राप्ती आणि त्यांचे संगोपन हे सुद्धा त्यांना अडचणीचे वाटू लागले. स्त्रियांच्या नैसर्गिक उर्मी, अपत्यप्राप्ती ही नैसर्गिक जबाबदारी आणि त्या अनुषंगाने येणारी काही कर्तव्ये यांचा जाच नकोच असे मानणारी मुलींची पिढी समाजात वावरते आहे. हे भारतीय समाजाला आणि त्या स्त्रियांच्या नैसर्गिक ऊर्मींच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. हे लोण भारतात पाश्चात्य स्त्रीवादातून झिरपले आणि पसरले आहे.
‘स्त्रीमुक्ती’ हा शब्दच मुळात ‘बंधने झुगारून टाकण्यासाठी मुक्ती’ असा वापरला गेला. मग मुक्ती कुणापासून तर शोषण करणाऱ्या पुरुषांपासून इथ पासून ते बंधने घालणाऱ्या कुटुंबापर्यंत हा प्रवास झाला. मग विवाह हे बंधन नकोच, ते झुगारून देणे हा युक्तीवाद आला. हल्ली तर युवा पिढीत -डबल इन्कम नो किड्स – हे सर्रास स्वीकारले जाते आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रवाह हिंदू धर्माला गिळायला सरसावलेला दिसतांना अन्य धर्मीय व्यक्तींवर याचा तितकासा प्रभाव का जाणवत नाही ? हिंदू मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्ग यात भिनलेली ही विचारधारा इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात तेवढी प्रभावी आहे का ?
हिंदू समाजातील खुलेपणा, पाल्यांना दिले जाणारे अवाजवी स्वातंत्र्य याला जबाबदार आहेत का ? याचा पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे.

स्त्रीवादाची संकल्पना इतक्या प्रमाणात बदलत गेली की भारतीय कुटुंब व्यवस्थेला आव्हान निर्माण करणारा स्त्रीवाद असे त्याचे स्वरूप घडत गेलेले आज दिसून येते आहे. स्त्रीवादाचे प्रतिक म्हणजे महिला दिन ! मुळातच हा महिला दिन साजरा करण्याची सुरुवात लेनिनच्या काळात रशियात सुरु झाली असल्यामुळे त्यातही डाव्या विचारसरणीचा दृष्टीकोन मुरलेला आहेच. नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आणि सर्वत्र स्वीकारला गेला. प्रत्येक देशाप्रमाणे महिला दिन साजरा करण्याची संकल्पना बदलते. तसेच स्त्रीवादाची वैचारीक बैठक सुद्धा बदलते.
महिला दिन म्हणून आधी साम्यवादी विचारसारणीतून आल्यामुळे त्यात व्यवस्थेला दोन परस्परविरोधी गटात टाकूनच विचार करण्याची सुप्त बीजे आहेत. कुटुंब हे पितृसत्ताक व्यवस्थेचे प्रतिक आणि त्याला विरोध करणारा स्त्रियांचा हक्क जोपासणारा समाज हा त्याचा पाया बनला. स्त्रियांना आपले हक्क अबाधित ठेवायचे तर त्यावर मर्यादा नको हा विचार पुढे आला. मग मर्यादा कोण घालते तर पुरुषप्रधान व्यवस्था. पुरुष प्रधान व्यवस्था म्हणजे जी कुटुंबाच्या रुपात आपण अनुभवतो. मग हे कुटुंबच नको ! अशी टोकाची विचारधारा या वैचारिक घुसळणीतून निर्माण झाली आहे.
उत्तर स्त्रीवादाने तर कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था सुद्धा नाकारली. स्त्रीयांना व्यक्तीवादाकडे ढकलले. ‘मला वाटले तरच मी विवाह करणार, नाही तर मी एकटी राहू शकते कारण मी सबल स्त्री आहे.’, ‘विवाहानंतर मुल हवे की नको हे मी ठरवणार कारण तो माझा हक्क आहे, मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे.’ ‘मला नोकरी करायची आहे, आर्थिक स्वावलंबन हवे आहे कारण तो माझा हक्क आहे,त्यासाठी प्रसंगी मी विवाह करणार नाही, अपत्य होऊ देणार नाही’ इथपर्यंत अनेक संवाद समाजात होतांना आढळू लागले. विशेषत: शहरी भागात आणि निमशहरी भागात तर ‘स्त्रीयांचे हक्क’ या शब्दाचा विपर्यास होतांना दिसत आहे. स्त्रिया आपल्या नैसर्गिक उर्मी, आरोग्य, आपल्या नैसर्गिक –भावनिक गरजा यांच्या विरोधात जाऊन केवळ तथाकथित हक्कांच्या नादी लागल्या आहेत. कारण यात त्या आधुनिक, सबळ सामर्थ्यशाली स्त्रीची प्रतिमा शोधू लागल्या आहेत. पाश्चात्य समाजात असणारा-दिसणारा स्वैराचार याला स्वातंत्र्य समजू लागल्या आहेत. याचे वाढते प्रमाण घातक आहे.
हल्ली तर वोकेझम सारखी आव्हाने यात भर घालत आहेत. आपण स्त्री आहोत की पुरुष हे ठरवण्याचे ‘तथाकथित स्वातंत्र्य’ लहान वयातच मुलांना दिले जावे असा युक्तीवाद करणारी ही क्रूर लॉबी भारतात सक्रीय झालेली आहे. निसर्गाने मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला घातले तरीही आपली लैंगिक ओळख ठरवण्याचे ‘व्यक्ती स्वातंत्र्य’ आहे हे कोवळ्या मनांवर बिंबवणारी टोळी घातक आहे. मग वैद्यकशास्त्राचा वापर करीत , होर्मोन थेरपीसारखे उपचार घेत आपली ‘आयडेंटीटी’ – ओळख ‘निवडण्याचा’ हक्क बजावला जातो आहे. यात जाणीवपूर्वक केली जाणारी पिळवणूक सुद्धा असून त्यात अनेक जण भरडले जात आहेत.
कुटुंब संस्थेपुढील विशेषत: हिंदू कुटुंब संस्थेपुढील आव्हाने अतिशय गंभीर होत चाललेली आहेत. घटत चाललेली हिंदू लोकसंख्या हे आणखी मोठे आव्हान समोर आहे. अशा सर्व परिस्थितीत भारतीय ‘स्त्री-शक्ती विचार’ हाच सर्वसमावेशक आहे. सगळ्याच पाश्चात्य विचारांचे अंधानुकरण करू नये हा बोध भारतीय स्त्रियांनी घेतला तर खऱ्या अर्थाने त्या जबाबदार नागरिक ठरतील यात शंका नाही.
भारतात होणाऱ्या अनेक आक्रमणांना परतावून लावले गेल्याचा इतिहास आहे. अनेक जण, अनेक विचार तर शेवटी याच मातीत सामावून गेले. त्यांचे भारतीयकरण होत गेले. याच प्रकारे हिंदू कुटुंबाचा आधार असणारी स्त्रीशक्ती –कुटुंब तोडणाऱ्या या स्त्रीवादाला आपल्या संस्कारांनी नमवून त्याचे भारतीयकरण करेल याची आशा वाटते. यातूनच प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि मनाने खंबीर असणारी भारतीय नारी हे जगात समर्थ स्त्री –शक्तीचे प्रतिक ठरेल यात शंका नाही.

एकता-फेब्रुवारी -2025 वार्षिक वर्गणी -500त्रैवार्षिक -1300संपर्क-8956977357 संपादकीय आहे – 'राष्ट्र ऐक्य आणि अखंडत्व टिक...
05/04/2025

एकता-फेब्रुवारी -2025
वार्षिक वर्गणी -500
त्रैवार्षिक -1300
संपर्क-8956977357

संपादकीय आहे – 'राष्ट्र ऐक्य आणि अखंडत्व टिकवणारा –कुंभमेळा'
प्राचीन काळापासून चालू असणारी कुंभमेळ्याची परंपरा आजही नवी पिढी सुद्धा आत्मसात करते आहे. हा भक्तीमय सोहळा नवतंत्रज्ञानाची जोड मिळून जगभर आज पाहता येतो आहे. असे बरेच काही आहे ,जे सनातन आणि शाश्वत आहे या मातीत..जे संपत नाही...ग्रॅमस्कीच्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या सिद्धांताला उगाच भारतात घुसवणाऱ्या डाव्या लॉबीला भारतीय संस्कृतीची पाळेमुळे तरी ओळखता आली आहेत काय ?

'वाराणसी आणि दोन मानचिन्हे' हा संशोधनात्मक लेख आहे Mahesh Gogate महेश माधव गोगटे (PhD) यांचा . पाश्चिमात्य मानचित्रण पद्धतीच्या प्रभावामुळे भारतीय स्थलवर्णनात्मक विचारांवर कसा परीणाम झाला हे त्यांनी अभ्यासातून दाखवून दिले आहे. लेखक क्योतो विद्यापीठ जपान येथे पी.एच.डी.रिसर्च फेलो असून त्यांचे The sacred waters of Varanasi-The colonial Draining and Heritage Ecology हे संशोधनात्मक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे.

एकताच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांकाचे प्रकाशन जानेवारीमध्ये पुणे येथे राष्ट्र सेविका समितिच्या वं. प्रमुख संचालिका मा.शांताक्का यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे लाभले. विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर स्वत: उपस्थित होते. या कार्यक्रमाचा वृत्तांत या अंकात घेतलेला आहे.

'आता निर्णायक पावलांची प्रतीक्षा’ हा राजेश कुलकर्णी राजेश कुलकर्णी यांचा लेख भारतीय राजकारणातील बदलणारे प्रवाह आणि आव्हाने यांचा वेध घेणारा आहे. गेल्या वर्ष भर झालेल्या विधान सभा निवडणूका आणि राजकारण यांचे विवेचन सुद्धा यात आहे.

दासबोधातील खगोलशास्त्र हा अभ्यासपूर्ण लेख आहे लीना दामले Leena Damle यांचा. ज्या काळात गॅलिलिओ, हॅले, न्यूटन ही मंडळी खगोलशास्त्रातील शोध लावत होती त्याकाळाच्या आधी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहून पूर्ण केला होता. त्यात खगोलशास्त्रीय माहिती तसेच विश्वाच्या उत्पत्ती आणि लय या विषयीचे सुद्धा श्लोक असून ते आधुनिक विज्ञानाशी जुळणारे आहेत.

कुंभमेळा भरत आहे त्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला होता. Amol Pusadkar अमोल पुसदकर यांचा लेख- ‘वक्फच्या मनमानीला लगाम’ हा लेख वक्फ बोर्ड विषयीची सर्व माहिती देणारा आहे.

दासनवमी निमित्त ‘उपासनेला दृढ चालवावे’ हा मधुरा कुलकर्णी मधुरा कुलकर्णीचा लेख समर्थ रामदासांनी दासबोधातून समाजाला केलेल्या मार्गदर्शनाचे महत्व अधोरेखित करतो.

प्राचीन भारतात विमाने होती का? हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. प्राचीन भारतातील ‘समरांगण सूत्रधार’ या ग्रंथात यंत्रमानवाची कल्पना केलेली आहे. विमानशास्त्र या विषयी महर्षी भारद्वाज यांनी लिहून ठेवलेले आहे. पण विमान उड्डाणासाठी पारा वापरणे याविषयी भोज राजा सांगतात हे विशेष आहे. अशा अत्यंत महत्वाची माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख आहे -‘यंत्र मानवाची कल्पना करणारे –समरांगण सूत्रधार’- प्रशांत पोळ Prashant Pole यांचा.

'बांगलादेश राजकीय अस्थिरता –भारताला संधी’ हा शौनक कुलकर्णी Shaunak Kulkarni यांचा लेख बांगला देशच्या परिस्थितीचा भारताला कसा फायदा करून घेता येईल यावर भाष्य करतो.

एकता मासिकाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त निबंध ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हा गार्गी जोशी यांचा निबंध प्रसिद्ध केला आहे.

जीवन जगतांना परमेश्वर ह्दयस्थ आहे ही जाणीव ठेवली तर आनंदाने जगता येते. ‘माझे ह्दयस्थ श्रीगुरू’ हा अपर्णा परांजपे Aparna Paranjape यांचा लेख आध्यात्माची अनुभूती देतो.

आई आणि मुलगी यांच्यातील तरल नाते दृढ करण्यासाठी आईला मुलीची मैत्रीण सुद्धा व्हावे लागते. ‘अशी असावी मैत्री’ हा Kaumudi Paranjpe कौमुदी परांजपे यांचा लेख याविषयी आहे.

Ahilyabai Holkar-Queen of Indomitable Spirit या पुस्तकाचा परिचय Dattatraya Ambulkar दत्तत्रय आंबुलकर यांनी तर व्यक्ती,घटना आणि प्रसंगांचे वर्तुळ या पुस्तकाचा परिचय पराग लोणकर Parag Lonkar यांनी करून दिलेला आहे.
असा हा फेब्रुवारीचा अंक असून सुजाण वाचकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते .

अंक परिचय - एप्रिल एकता – 2025 - नानाराव ढोबळे विशेष -अंकाची किंमत –50 वार्षिक वर्गणी-500  त्रैवार्षिक वर्गणी –1300 संपर...
03/04/2025

अंक परिचय - एप्रिल एकता – 2025
- नानाराव ढोबळे विशेष -
अंकाची किंमत –50
वार्षिक वर्गणी-500
त्रैवार्षिक वर्गणी –1300
संपर्क -8956977357

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख स्व.नानाराव ढोबळे यांची १ एप्रिल २०२४ ला जन्मशताब्दी झाली असून त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून एकता मासिकाने हा अंक काढला आहे.
संपादकीय आहे – ‘आदर्श प्रचारक नानाराव ढोबळे’
नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दी नंतर सुद्धा आज नानांचे कार्य प्रेरणा मानत स्वत:ला घडवणारे स्वयंसेवक संघात आहेत. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यश आहे. ‘प्रचारक व्यवस्था’ हे संघाचे हे संघाचे वैभव आहे. आपले जीवन संघाच्या शिस्तीत, संघाच्या रचनेत समर्पित करून पुन्हा आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे हे अनमोल हिरे आहेत. ‘भगवाध्वज’ हा आपला गुरु मानून, आता विजयादशमीला शताब्धी साजरी करणारी ही संघटना अजूनही कशी काय जोमाने वाढत आहे ? असा प्रश्न अनेकांना आज पडतो आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरित करणारे अॅड.इनामदार (वकील साहेब) यांच्यासारखे समर्पित प्रचारक त्यांच्या सहवासात होते हा प्रचारक व्यवस्थेचा परिणाम आहे. या अनुषंगाने नानाराव ढोबळे यांचे कार्यविशेष यात मांडलेले आहे.

भैयाजी जोशी यांचा लेख – ‘प्रेरक व्यक्तिमत्त्व नानाराव ढोबळे’ – आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. संघाच्या शिस्तीत राहून नानांनी केलेले सेवाकार्य, त्यांची संवेदनशीलता यावर त्यांनी लिहिले आहे.

सुहासराव हिरेमठ – ‘नवदधीची नाना ढोबळे’ या लेखात नानांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. नानांनी पर्यावरण, जनजाती, स्त्री-शक्ती अशा अनेक गतीविधींना प्रेरणा दिली. ते संतांच्या भक्तीत रमणारे आणि तळागाळातील व्यक्तीत देव शोधणारे, अत्यंत प्रेमळ असे होते. याविषयी ओघवत्या शैलीतील हा लेख अवश्य वाचवा.

प्राचार्य श्याम अत्रे यांनी ‘संघयोगी नाना ढोबळे’ या लेखातून नानाच्या समग्र जीवनाचा आढावा घेतलेला आहे. अत्रे सरांनी नानांवर पुस्तक सुद्धा लिहिलेले असल्यामुळे त्यांचा लेख अत्यंत वाचनीय,प्रेरक असा झालेला आहे.

दिलीप क्षीरसागर यांनी – ‘समाज समर्पित नानाराव ढोबळे’ – या त्यांच्या लेखात नानांनी जळगाव,धुळे,नाशिक तसेच नंदुरबार या ठिकाणी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला आहे. गांधी हत्येनंतर उफाळलेल्या क्षोभात नानांचे जळगावचे तीन माजली घर जाळून बेचिराख केले गेले. तरीही किती खडतर परीस्थितीत नानांनी आपले समग्र जीवन संघकार्याला वाहिले होते या विषयी या लेखातून शिकण्यासारखे आहे.

दादा इदाते (पद्मश्री) यांनी ‘महाराष्ट्रीची माऊली –नाना ढोबळे’ या लेखातून नानांचे संवेदनशील मन उलगडलेले आहे. त्यांनी नानांच्या सहवासात काम केलेले असल्यामुळे समरसतेची बीजे कशी नानांमुळे रुजली याचे अनुभव कथन केले आहे.

स्व.नाना ढोबळे यांनी लिहिलेला – ‘एक देश व्याप्त शक्ती –वहिनी’ हा लेख त्यांच्या ‘समाज तळातील मोती’ या पुस्तकातून घेतला आहे. घरोघर वावरणारी स्त्रीशक्ती-मातृशक्ती पाठीशी असल्यामुळे संघाचे स्वयंसेवक, प्रचारक हे सेवाकार्याला कसे वाहून घेऊ शकतात याविषयीची कृतज्ञता नाना यात व्यक्त करतात. हा लेख वाचतांना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...! संघाच्या महिला समन्वयाची बीजे यात सापडतात.

वा.रा.शिंगणे यांनी ‘आधुनिक ॠषी- नानाराव ढोबळे’ या लेखातून नानाचे साधे व्यक्तिमत्त्व तसेच श्री.गुरुजी यांच्या विषयीचा अनुभव यात वर्णिलेला आहे. अवश्य वाचवा.

दिनकर देशमुख यांनी – ‘नाना म्हणजेच गोविंद श्रीधर ढोबळे’ या त्यांच्या लेखात नानांनी जनजातींसाठी केलेले, दुष्काळात केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत.

यामिनी पांडे यांनी – ‘दिनदर्शिका’ – या लेखातून राष्ट्र सेवा समीतिद्वारा निघणाऱ्या हिंदू परंपरा आणि संस्कृतीच्या माहितीने परिपूर्ण असणाऱ्या दिनदर्शिकेची माहिती दिलेली आहे.

जयंत पारखी यांनी ‘कै. नानाराव ढोबळे यांची मंगलनिधी योजना’ याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती आणि नानांच्या सहवासातील आठवणी दिलेल्या आहेत.
तसेच विमल पारखी यांनी सुद्धा अनुभव लिहीला आहे.

केसरसिंह राजपूत यांनी -
' समर्पित संघयोगी - सोशिक संघकर्मी' या लेखात आणिबाणी च्या काळातील नाना राव ढोबळे यांच्या सह घेतलेला अनुभव लिहीलेला आहे.

लक्ष्मण हिरालाल कदम यांनी –‘कै. नानाजी ढोबळे –एक प्रेरणा’ या लेखात शिवरायांची पत्रके वाटप, नाना आणि त्यातून त्यांनी घेतलेला बोध ही सुरेख आठवण कथन केली आहे.

गोविंद भास्कर यार्दी यांनी –‘राष्ट्रभक्त संत –कै. नानाराव ढोबळे’ – या लेखात खान्देशच्या रणरणत्या उन्हात पायी मैलोन मैल चालणाऱ्या नानांच्या तरल आठवणी लिहिलेल्या आहेत. अक्कलकोस गावात सामुहिक शेतीचा प्रयोग नानांनी केला होता. बौद्धिक देतांना नाना कसे भारुन टाकत असत यासारख्या अनेक आठवणी या लेखात आहेत.

‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ – या सदरात लता देवघरे यांनी नानीबाई कोलते या राष्ट्र सेविका समितेच्या प्रेरक व्यक्तीमत्त्वाविषयी माहिती दिलेली आहे. तर सुनीता लुले यांनी आद्य सेविका ताराताई देशपांडे यांच्या विषयी लेखन कलेले आहे. या सदरातून राष्ट्र सेविका समितीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक सेविकांच्या कार्याचा परिचय करून दिला जाणार आहे. युवतींनी यातून अवश्य प्रेरणा घ्यावी.

प्रशांत पोळ –यांनी ‘प्राचीन ज्ञानाचा खजिना’ या लेखमालेत ‘लोथल-प्राचीन वैभवाचा खणखणीत पुरावा’ – या लेखात लोथल येथील समृद्ध अभियांत्रिकीचा आढावा सप्रमाण घेतलेला आहे. येथील प्राचीन तंत्र आजच्या सिव्हील अभियांत्रिकीतील ‘इंग्लिश बॉंण्ड’शी साध्यर्म्य दाखवणारे प्रगत होते याविषयी त्यांनी विवेचन केलेले आहे.

असा हा एकताचा अंक संग्रही ठेवावा असा आहे.

15/02/2025
एकता-जानेवारी-2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष अंकाची किंमत - 50 वार्षिक वर्गणी - 500त्रैवार्षिक वर्गणी - 1300 सं...
04/01/2025

एकता-जानेवारी-2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष

अंकाची किंमत - 50
वार्षिक वर्गणी - 500
त्रैवार्षिक वर्गणी - 1300
संपर्क - 8956977357

संपादकीय आहे ‘अहिल्येचा चैतन्यमयी जागर’
आधुनिक काळात ‘वर्क –लाईफ बॅलन्स’-कुटुंब –करीयर सांभाळणे हे शिकवण्यासाठी कुण्या पाश्चिमात्त्य उदाहरणांची गरज भारतीय स्त्रियांना नाहीच. कारण कुटुंब आणि राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या असामान्य कर्तृत्त्ववान स्त्रिया या मातीत आपल्या पाऊलखुणांचे ठसे उमटवून गेल्या.भारताच्या इतिहासातील अशी उदाहरणे एकमेवाद्वितीय आहेत.

एकताच्या या अंकाला अतिथी संपादक म्हणून मा.सुमित्राताई महाजन लाभलेल्या असून त्यांनी –‘प्रेरणादायी देवी अहिल्या’ हा लेख खास एकतासाठी पाठवलेला आहे. चौंडी गावाच्या कन्येने माळव्याची राजगादी सांभाळली हा इतिहास किती प्रेरक आहे हे यात सुमित्राताईंच्या शब्दात वाचायला मिळते.

‘अहिल्या देवींचे ऐतिहासिक महत्त्व’ हा अभ्यासपूर्ण लेख आहे सुधीर थोरात Sudhir Thorat यांचा. हिंदू धर्मरक्षण आणि संवर्धन यासाठी अहिल्यादेवींचे इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.इस्लामी शासकांनी उध्वस्त केलेल्या हिंदू मंदिरांची पुन्हा बांधणी करून त्यांनी धर्मरक्षण केले.

अहिल्यादेवींच्या आर्थिक धोरणावर लेखन केले आहे डॉ.देवीदास पोटे यांनी. राज्यात मालाच्या दर्जा प्रमाणे कर आकारणी , भिलकवडी कर ,शेतसारा सगळ्यांचा आढावा घेणारा हा लेख अवश्य वाचावा.

अहिल्येच्या सामरिक पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी Mohini Garge-Kulkarni यांनी. महिलांची सशस्त्र तुकडी तयार करणारी, राघोबादादांना परतवून लावणारी आणि इंग्रजांबद्दल पेशव्यांना सावध करणारी दूरदृष्टीची अहिल्या कशी रणरागिणी होती हे यात वाचावे .

‘अहिल्या देवी आणि पर्यावरण’ हा माहितीपूर्ण लेख आहे डॉ.राजेश मणेरीकर Rajesh Manerikar आणि चंद्रकला शिंदे यांचा . आज जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. अहिल्यादेवींनी त्याकाळी बांधलेल्या विहिरी-बारव,प्रवास मार्गांवर झाडे लावणे, निसर्गपूरक साधने वापरणे हे त्यांच्या कल्याणकारी धोरणासह पर्यावरण जागृतीची साक्ष देतात.

औरंगजेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वत: टोप्या विणून आणि कुराणाच्या प्रती हाताने लिहून स्वत:च्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खुप वेळा आपण ऐकतो ,पण अहिल्यादेवी कित्येक वर्ष एकभुक्त राहिल्या, पांढरी माहेश्वरी साडी आणि रुद्राक्ष माळ परिधान करून स्वत:च्या पैशाने देवळे, घाट आणि धर्मकार्ये केली हे किती जणांना माहीत आहे ? असा प्रश्न विचारला आहे शेफाली वैद्य Shefali Vaidya यांनी त्यांच्या ‘व्रतस्थ विरागी राणी अहिल्याबाई होळकर’ या लेखात....

‘आमच्या मानबिंदू –लोकमाता अहिल्यादेवी’ हा प्रा.आरती तिवारी यांचा लेख अहिल्या देवींच्या समग्र गुणांचा आढावा घेणारा असून आजच्या पिढीने त्यातून अवश्य प्रेरणा घ्यावी.

‘सामाजिक समरसतेच्या अग्रणी –अहिल्यादेवी’ हा लेख आहे डॉ.श्यामा घोणसे Shyama Ghonse यांचा आहे. भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्याला शूर तरुणाला –मग तो कोणतीही जातीचा असो –आपली कन्या देण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला आणि आमलात आणला. सामाजिक समरसता त्यांनी हिंदू ऐक्य समोर ठेवत आचरणात आणलेली होती.

‘लोककल्याणकारी अहिल्यादेवी’ हा Anjali Tagade अंजली तागडे यांचा लेख अहिल्यादेवींच्या समग्र धोरणावर प्रकाश टाकतो. त्यांनी लोककल्याण हेच ध्येय ठरवून अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. ‘एक भारत -श्रेष्ठ भारत,एक हिंदू -श्रेष्ठ हिंदू’ या जाणीवेची बीजे त्यांनी त्यांनी पेरली.

‘ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात अहिल्यादेवी’ हा अभ्यासपूर्ण ससंदर्भ लेख आहे प्रणव पाटील Pranav Patil यांचा.जॉन माल्कम यांच्या ग्रंथातील अहिल्यादेवींच्या दिनचर्येची नोंद असो की ‘अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस बायकात किंवा दौलतवंतांस कोणी योग्यतेस नाहीच नाही’ हे हैदराबादच्या निजामाचे पत्र असो. अशा ऐतिहासिक नोंदींचा उपयोग करून लिहिलेला हा लेख अवश्य वाचावा.

‘पुण्यश्लोक अहिल्या देवींची मंदिरे’ हा सर्वेश फडणवीस Sarvesh Fadnavis यांचा लेख हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी अहिल्यादेवींनी उभारलेल्या मंदिरांची नोंद घेतो. अनेक ठिकाणी स्वत: जमिनी विकत घेऊन मंदिरांची पुन्हा उभारणी त्यांनी केली. ही केवळ मंदिरांची उभारणी नव्हती तर उभारणी होती हिंदूंच्या स्वाभिमानाची !

अहिल्यादेवींच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त राष्ट्र सेविका समिति द्वारे राबवल्या गेलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आहे स्मिता पत्तरकीने यांनी.
तर ‘देवी अहल्या मंदिर –एक दीपस्तंभ’ हा राष्ट्र सेविका समिति नागपूर येथील वास्तू आणि सेवा यावर आधारीत लेख आहे मेधा नांदेडकर यांचा .

तसेच ‘राष्ट्रहिताचे करण्या चिंतन’ हा राष्ट्र सेविका समितीच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकणारा लेख आहे राधा भिडे यांचा.

स्त्रियांनी आपला आत्मसन्मान अवश्य जपावा पण त्याच बरोबर नम्रता बाळगणे , समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान देणे असे आपले संस्कार कधीच विसरू नये. अहिल्या देवींना त्यांच्या सासूबाईंनी पदराच्या पाच गोष्टी सांगितल्या त्या आजही स्त्रियांसाठी मार्गदर्शक आहेत . त्यावर आधारीत ‘जप तुझे स्त्रीत्त्व ,जप तुझी शालीनता’ हा लेख आहे स्मिता कुलकर्णी Smita Kulkarni यांचा.

अहमदनगर ते अहिल्या नगरी ही वाटचाल सोपी नव्हती. याविषयी अवश्य वाचावे ‘अहिल्या नगरीची कथा’ या रवींद्र मुळे यांच्या लेखात .

भारतीय ज्ञानाचा खजिना या लेख मालेतील ‘ओपनहायमरला हे समजलं पण..’हा प्रशांत पोळ Prashant Pole यांचा अप्रतिम लेख प्राचीन भारतीय विज्ञानाची महती स्पष्ट करतो. अणुबॉम्बचा जनक ओपनहायमरला अणुबॉम्बचे परीक्षण करतांना भगवतगीतेच्या ओळी आठवतात . गुरुत्त्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला हे आपण समजतो पण आपल्याच प्रश्नोपनिषधात दोन –अडीच हजार वर्षांपूर्वी गुरुत्त्वाकर्षणाविषयी लिहून ठेवलेले आहे याविषयी आपण अनभिज्ञ असतो... !

असा हा एकता मासिकाचा अंक संग्रही ठेवावा असा असून सुजाण वाचक याचे स्वागत करतील याची खात्री वाटते.

Address

1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918956977357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Masik - एकता मासिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekta Masik - एकता मासिक:

Share