अजिंठा

  • Home
  • अजिंठा

अजिंठा सकारात्मक आणि "अराजकिय"

इतिहास | संस्कृती | कला | विज्ञान

नागपूरमधील दिव्या आणि अक्षय होले या दांपत्याने 2018 साली नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1.5 वर्षे रिसर...
22/07/2025

नागपूरमधील दिव्या आणि अक्षय होले या दांपत्याने 2018 साली नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1.5 वर्षे रिसर्च करून, एरोपोनिक्स पद्धतीने केशराची लागवड करण्याचे ठरवले.

केशराची देशांतर्गत मागणी जास्त असून उत्पादन कमी आहे, त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असे त्यांना वाटले. 2019 आणि 2020 मध्ये त्यांनी काश्मीरमध्ये 3.5 महिने घालवून पारंपरिक केशर शेतीचे ट्रेनिंग घेतले.

2020 मध्ये, त्यांनी आपल्या घरातील 80 स्वे. फूट खोलीत 100 केशर बल्ब लावून प्रयोग सुरू केला. त्यापैकी 80 बल्बमध्ये फुले आली, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

2023 मध्ये, त्यांनी नागपूरमध्ये 400 स्वे. फूट क्षेत्रात केशर प्रॉडक्शन युनिट स्थापन केले. 250 किलो बल्ब लावण्यासाठी त्यांनी 8 लाख रुपये गुंतवले आणि पहिल्याच सिझनमध्ये 1600 ग्रॅम केशराचे उत्पादन करून 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

त्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे अनेक लोकांनी केशर शेतीचे ट्रेनिंग मागितले. त्यांनी ‘Shaya Enterprises’ या संस्थेद्वारे ट्रेनिंग कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये 7000 ते 15000 रुपयांपर्यंतचे विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत.

प्रत्येक महिन्यात ते 5 प्रशिक्षणार्थींचे 2 ते 4 बॅच घेतात, ज्यामुळे ट्रेनिंगमधून वार्षिक 12 ते 13 लाख रुपयांचे एक्स्ट्रा इन्कम मिळते. केशराची विक्री आणि ट्रेनिंग मिळून त्यांचे एकूण वार्षिक इन्कम 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

केशराची कापणी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान होते. कापणीनंतर, बल्बना मातीच्या ट्रेमध्ये ठेवले जाते, ज्यामुळे प्रत्येक बल्बपासून 4 ते 5 नवीन बल्ब तयार होतात.

नवीन बल्ब पुढील सिझनमध्ये लागवडीसाठी वापरले जातात किंवा इतर उत्पादकांना विकले जातात. अशा प्रकारे, दिव्या आणि अक्षय यांनी टेक्नॉलॉजीच्या मदतीने केशर शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

कधी कोणाचं पोट मारू नका.. गौरव मोरेचा इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा म्हणाला, तुम्ही तुमचे ग्रुपने.. फिल्टरपाड्याचा बच्...
22/07/2025

कधी कोणाचं पोट मारू नका.. गौरव मोरेचा इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा म्हणाला, तुम्ही तुमचे ग्रुपने.. फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणजेच लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौरवने त्याचा इंडस्ट्रीतील प्रवास सांगितला. यावेळी अभिनेत्याने इंडस्ट्रीची दुसरी बाजू अधोरेखित करत, त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. गौरव मोरे दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मला इंडस्ट्रीत कुणाचीच साथ मिळाली नाही. मला तर बरेच जण बोलायचे, तू कसा इंडस्ट्रीत काम करतोस तेच बघतो. आताही अनेक लोक माझ्याबरोबर काम करत नाहीत, काही लोकांनी फोन करून सांगितलंय की याला काम देऊ नका. बरं…या सगळ्या घटना अलीकडेच घडलेल्या आहेत. त्यामुळे मला एकटं राहायला आवडतं. माझे दोन चांगले मित्र आहेत ते म्हणजे अभिनय बेर्डे आणि विशाल देवरुखकर त्यांच्या संपर्कात मी कायम असतो. पण, इतर बाकीच्या गोष्टींमध्ये मी फारसं लक्ष देत नाही. कारण, मला काम करायचंय…ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आज नवीन घर झालंय, त्याचा EMI आहे. पण, माझ्याबाबतीत लोक का असं करत आहेत मला माहिती नाही. या सगळ्यांना मी माझ्या कामातूनच उत्तरं देणार आहे.“मी नेहमी सगळ्यांना एवढंच सांगेन की कधी कोणाचं पोट नका मारू…मला माहितीये आजकाल स्पर्धेचं युग आहे पण ती स्पर्धा ‘हेल्दी’ असायला पाहिजे. माझ्याबरोबर कोण-कोण काय करतंय सगळ्यांना सगळं माहितीये…पण, अशा वागण्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती कायमचा गमावताय हे तुम्हाला लक्षात येत नाहीये. मी एक मालिका करत होतो, तिथे फोन करून सांगण्यात आलं की, हा एकावेळी दोन-दोन शो करतोय त्यामुळे तुम्ही त्याला काम करू देऊ नका. त्याला थांबवा…पण, मी खरंच सांगेन अशा पद्धतीने कधीच कोणाचं पोट मारू नका. गौरवबरोबर राहू नका, बोलू नका, काम करू नका या अशा गोष्टी करणं बालपणी ठीक वाटायचं पण, आज तुम्ही मोठे आहात. तुम्ही तुमचे ग्रुपने राहा मला काहीच फरक पडणार नाही. मला फक्त या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणे काम करायचंय, सिनेमे करायचेत आणि मी तेच यापुढे करत राहीन

21/07/2025

गर्व मराठी, सर्व मराठी.

मराठी लोकांनी भावनिक न होता काही गोष्टींचा स्वीकार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदू...
21/07/2025

मराठी लोकांनी भावनिक न होता काही गोष्टींचा स्वीकार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे आहेत. तिकडे अजेंडा रेडी आहे. महाराजांचं व्यवहारज्ञान, शेती, शेतकरी, स्त्रियांचा आदर, किल्ल्यांचं महत्त्व, परराष्ट्र धोरण, गनिमी कावा, सर्वांस अन्नास लावणे वगैरे या गोष्टींचं कौतुक फक्त आपल्यालाच! बाहेर शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदूंचे राजे... भगवाधारी कट्टर हिंदू राजे!
तलवार, रक्त, घोडा आणि भगवा या चौकडीत छत्रपती शिवाजी महाराजांना गुंडाळून त्यांना खुजे करण्याचा प्रयत्न केला. याला कारणीभूत आपणच! भावनेच्या भरात आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारत गेलो, महाराजांच्या नावाने चौकांना, घरांना, हॉटेलांना नावे देत गेलो! आपल्याला शिवाजी महाराज अजून कळले नाहीत म्हणत म्हणत महाराज कधी आपल्यातून निघून गेले हेही कळलं नाही... कळलं असतं तर या उत्तरेकडील भुरट्या लोकांची महाराष्ट्रात येऊन महाराजांचा अपमान करण्याची हिंमत झाली नसती.
युद्धात मानसिकदृष्ट्या हरवायचे असेल तर समोरचा व्यक्ती कमजोर दुवा शोधत असतो... त्यांना माहीत आहे की भावनिक दृष्ट्या मराठी माणसांचा जेवढा स्ट्रॉंग तेवढाच वीक पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज आहेत! त्यांनी पुन्हा पुन्हा तोच पॉईंट ट्रिगर करणं सुरू केलं आहे.
चारशे वर्षांपूर्वी या मातीच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती महाराष्ट्र निर्माण कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होता. चारशे वर्षांत जे उभा केलं ते संपवायचा प्रयत्न गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. पुरंदरेंनं महाराजांच्या नावाने इतिहासात करुन ठेवलेली मोडतोड, चित्रपटांतून दाखवण्यात येत असलेला चुकीचा इतिहास असो की परवा राज्यपालाचं वक्तव्य असो... हा सगळा एकाच अजेंड्याचा भाग आहे. सगळं काही व्यवस्थित स्क्रिप्टेड आहे! ही फक्त सुरुवात आहे, मराठी माणूस जितका तटस्थ राहिल तितके शिवाजी महाराज इथून कमी कमी होत जातील. कदाचित आज हे वाचून वाईट वाटले पण... मराठी माणसांच्या तटस्थपणामुळे एक दिवस इथले महाराजांचे पुतळे सुद्धा हलवले जातील!
हिंदूत्वाच्या नावाखाली त्यांनी शिवाजी महाराज कधीच आपल्यापासून हायर केले आहेत... एक दिवस ते महाराजांवर मालकी हक्क दाखवतील! दरदिवसाआड ते खडा टाकून पाहात आहेत, लिटमस टेस्ट करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यामध्ये हळूहळू रूजवत आहेत. आज मराठी माणूस असाच तटस्थ राहिला तर महाराजांचा अपमान आपल्याला सरावाचा होऊन जाईल. पेट्रोल एका रुपयाने वाढल्याने आपल्याला जसं काहीच फरक पडत नाही तेवढाच सरावाचा...

- डॉ. प्रकाश कोयाडे

महाराजाधिराज बिंबदेव यादव – बिंबस्थान मुंबईचे संस्थापक.आजही बहुतांश लोकांना असा गैरसमज आहे की मुंबई किंवा बॉम्बेचे इतिहा...
21/07/2025

महाराजाधिराज बिंबदेव यादव – बिंबस्थान मुंबईचे संस्थापक.

आजही बहुतांश लोकांना असा गैरसमज आहे की मुंबई किंवा बॉम्बेचे इतिहास 1661 साली सुरू होतो, जेव्हा पोर्तुगीज राजकुमारी कॅथरिन ब्रागांझा हिचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसऱ्यासोबत झाला आणि लग्नाच्या हुंड्यात सात बेटे ब्रिटिशांच्या हातात पडली.

परंतु मुंबईचा इतिहास खूप पूर्वीपासून म्हणजे इ.स.च्या 5व्या शतकात कोकणातील मोर्यांच्या घराण्याने घारापुरीवर राज्य केले होते तेव्हापासून सुरू होतो. पण विशेषतः उत्तर मुंबई शहराला आधुनिक रूप मिळण्यास सुरुवात झाली ती 13व्या शतकातील माहिकावती राज्याचे सम्राट महाराज बिंबदेव यादव यांच्या काळात. ते देवगिरीच्या सम्राट रामदेवराव यादव यांचे पुत्र होते.

अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केल्यानंतर, राजकुमार बिंबदेव यांनी किनारपट्टीकडे माघार घेतली आणि पारनेर ते आसगरपर्यंतचा प्रदेश जिंकून पर्नेर, बोडी, संजन, दमन, शिरगाव या किल्ल्यांवर अधिकार मिळवला. त्यांनी माहिकावती (आजचे माहिम) येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यांच्यासोबत त्यांचे राजगुरू पुरुषोत्तम पंत कावळे व 11 सरदार होते.

त्या काळी उत्तर कोकणात कोळी आणि आगरी समाज प्रामुख्याने राहत होते. बिंबदेवांनी पैठण, चांपानेर आणि पाटणहून कुशल लोक आणले. त्यांनी मध्यमदिन यजुर्वेदी ब्राह्मणांच्या 9 कुटुंबांसोबत देशातून आलेल्या 27 सोमवंशी आणि 9 नागवंशी मराठा क्षत्रिय कुटुंबांचाही वसवाटा केली. याशिवाय पाचकलशी, पठारे प्रभू व भंडारी यांसारख्या अनेक समाजांना त्यांनी आपल्या राज्यात वसवले.

"महिकावतीची बखर" या ग्रंथानुसार बिंबदेव हे धर्मनिष्ठ व न्यायप्रिय राजा होते. त्यांनी आपले राज्य 15 महसुली विभागांमध्ये (महालांमध्ये) विभाजित करून त्यात 1624 गावे सामाविष्ट केली. त्यांनी आपल्या कुलदेवता प्रभावती देवीचे एक भव्य मंदिर बांधले, ज्याच्या शेजारी त्यांचा राजवाडा होता. (हे मंदिर आजही प्रभादेवी भागात आहे, अनेक वेळा पुनर्बांधले गेले असले तरी मूळ परंपरा आजही टिकून आहे.) त्यांच्या न्यायालयाचे ठिकाण दादरमधील नायगाव येथे होते.

माहिम, प्रभादेवी आणि दादर भागातून बिंबदेवांचा शासन सुरू होता. बखरीत माहिमच्या बंदरातून आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होत होता, मीठ निर्मिती, भंडारी समाजाचे ताडी उतार, तसेच ठाणेतील घोडबंदर या प्रसिद्ध घोड्यांच्या बाजारपेठेचा उल्लेख आहे. माहिम राजधानी असली तरी मालाड व मरोल या महत्वाच्या प्रांतांमध्ये 'देशाई' किंवा 'देशाळा' नावाचे राज्यपाल होते.

इ.स. 1303 मध्ये बिंबदेव यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा पुत्र महाराज प्रतापबिंबदेव यांनी माहिम किल्ला बांधला.

इ.स. 1368 मध्ये राजा हंबीरराव यांच्या काळातील एक शिलालेख भाभा अणुशक्ती केंद्र (देवनार) परिसरात सापडतो, ज्यात देवनार येथील एका सरदाराला दिलेल्या जमिनीचा उल्लेख आहे. हा फतवा दिल्लीच्या सुलतान फिरोजशाह तुघलक यांच्या अधिपत्याखालील वतनदार हंबीरराव यांच्या नावाने त्यांच्या प्रधान अरी सिन्ही प्रभू यांनी दिला होता. हंबीरराव यांना "महाराजाधिराज" या उपाधीने गौरवले असून, त्यांच्या राज्याची राजधानी माहिम-बिंबस्थान अशी सांगितली आहे. (हंबीरराव हे बिंबदेवांच्या वंशातीलच असण्याची शक्यता आहे.)

बॉम्बे हे नाव कदाचित बिंबदेव यांच्या 'बिंबस्थान' या मूळ नावाचा इंग्रजीतून अपभ्रंश असावा, अशी एक लोकप्रिय लोकसांस्कृतिक धारणा आहे!

बिंबदेव महाराजांची ही गौरवशाली परंपरा म्हणजेच मुंबईच्या इतिहासाची खरी सुरुवात आहे..!

#मुंबई

ही पोस्ट माझ्या मित्रासाठी आहे. छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला तो सर्वांपर्यंत पोचावा त्यासाठी आहे. तुमच्या ज...
21/07/2025

ही पोस्ट माझ्या मित्रासाठी आहे.
छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला तो सर्वांपर्यंत पोचावा त्यासाठी आहे. तुमच्या जवळचा माणूस जेव्हा घनदाट जंगलात मरणाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा २००० किलोमीटर लांब तुम्ही किती हताश आणि हतबल अवस्थेत असता हे दाखवण्यासाठी ही पोस्ट आहे.
तुमच्या जवळच्या माणसाचा आलेला कॉल हा शेवटचा असू शकतो हे कळल्यानंतर ही एक थंडगार लहर तुमच्या मेंदूत जाते त्यासाठी ही पोस्ट आहे
आयुष्य हे क्षणभंगुर आहे हे पुस्तकात वाचलेले असतं पण प्रत्यक्षात हे दिसतं तेव्हा काय होतं हे सांगण्यासाठी ही पोस्ट आहे.

रितेश हा सध्या छत्तीसगढ ओडिसा सीमेवरच्या जंगलात आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नेमकी जागा मी सांगू शकत नाही. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमध्ये तो असिस्टंट कमांडट आहे. कोब्रा कमांडो फक्त ऑपेरशन असतं तेव्हाच मैदानात उतरतात. या तुकडीचे तो नेतृत्व करतो आहे. अतिशय highly trained अशी ही तुकडी असते. अतिशय खडतर, बिकट आणि जिथं सामान्य शहरी माणसं तग धरु शकणार नाही असा परिस्थितीत हे कोब्रा कमांडो कितीही काळ जगू शकतात. कोब्रा कमांडो हे प्रकरण काय हे नंतर कधीतरी...
पण २१ सप्टेंबरला मध्यरात्री घडलेली ही घटना आहे. ज्याठिकाणी रस्ता नाही, नेटवर्क नाही असा जंगलात सीआरपीएफचा कॅम्प लागलेला आहे. आजूबाजूला तारेचं तात्पुरता उभं केलेले (बिनकामी) कुंपण, त्यात लागलेले तंबू, चहूबाजूला जंगल, नक्षलवाद्यांनी वेढलेला हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो त्यामुळे जंगली प्राण्यांचे असलेले भय ते वेगळं...

मी मुद्दाम हे वर्णन करत आहे कारण तुमच्या डोळ्यासमोर एक पट उभा राहावा. १७,१८ सप्टेंबरपासूनच या जंगलात ‘दे मार’ पाऊस झोडत होता. साहजिकच जमीन ओली, तंबू ओला, माणसंसुध्दा ओली पण कोब्रा कमांडो जगत होते.
२१ सप्टेंबरला रात्री झोपायच्या वेळेनुसार रितेश त्याच्या तंबूत झोपायला गेला. ना लाईट ना काही...बाहेर कोसळणारा पाऊस, बेडच्या खाली ओली जमीन, ओला तंबू, ठिपकणारा पाणी अशा अवस्थेत तो झोपला..
या भागात डासांचा प्रादुर्भाव भयानक असल्यामुळे मच्छरदाणी ही सक्तीची आहे. नक्षलवाद्यांच्या भागाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती मलेरिया हा या भागात नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहे. जास्त माणसं मारतो.

या मच्छरदाणीच्या आत मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास रितेशला जाग आली कारण पायाला खाज आली. खाज आली म्हणजे डासच असणार या शक्यतेने माणूस ज्या निसर्गसुलभ भावनेने पाय खाजवतो तो त्याने खाजवला पण १० मिनिटात त्याला जाणवलं की हा तो डास नव्हे...
रितेश उठला रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्याने बघितलं तर अत्यंत कुप्रसिद्ध अशा खुणा त्याला दिसल्या. ट्रेनिंग घेतल्यामुळे एका सेकंदात त्याला कळलं की आपल्याला साप चावला आहे. तो तसाच धडपडत उठला काही काळ शोधाशोध केली पण साप काही दिसला नाही.
आता अनेक प्रश्न समोर होते..मानवी वस्तीपासून प्रचंड लांब असलेल्य़ा त्या अटिंग्या रानी आता जीवन मरणाचा खेळ सुरु झाला होता. बाहेर पाऊस, जंगल आणि नक्षलग्रस्त भाग आणि एक कोब्रा कमांडो झगडत होता आयुष्याशी.

मध्यरात्री कॅम्प जागा झाला आणि पुढचा थरार हा सुरु झाला. कोब्रा कमांडोला कधीही कॅम्प सोडून बाहेर जाता येत नाही. रात्री अपरात्री तर नाहीच नाही. त्यासाठी परवानग्या लागता. रोड ओपनिंग लागतात. बाहेर नक्षलवादी असतात. रस्त्यात बॉम्ब असतात. मुळात रस्तेच नसतात. त्या पाऊस पण त्यावेळेला जीवावर उदार होऊन पाच कमांडो घेऊन रितेश बोलेरोत जाऊन बसला.
रस्त्या नसलेल्या त्या जंगलात तुफान पावसात ती बोलेरा लाईट न लावता पळत होती. (ड्रायव्हिग स्कील काय असेल). पण तासाभरातच स्नेक बाईटने त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. इतका वेळा शुध्दीत असलेल्या रितेशची शुध्द हरपली. बोबडी वळली, दृष्टी गेली..फेफरं भरल्यागत झालं.....यात काळात कदाचित आपली वेळ आल्याची जाणीव त्याला जाणीव झाली असावी कदाचित काही जणांना फिल्मी वाटेल पण
तशाची अवस्थेत त्याने घरी कॉल लावला... घडलेली परिस्थिती कशीबशी सांगितल...घरी एकच सन्नाटा आणि सेकंदात सुरु झाली रडारड...त्या माऊलीची हताश हतबल अवस्था आपण फक्त कल्पना करु शकतो.
या सगळ्या गोंधळात जवळच्या रुग्णालयात जायला तीन साडेतीन तास लागले. हे अंतर किमान ५० एक किलोमीटर असेल. तोपर्यंच सीआरपीफच्या अधिकाऱ्यांनी अँटीवेनमची व्यवस्था करुन ठेवली होती
बेशुध्दावस्थेतच रितेश तिथे पोचला आणि त्याला उपचार मिळाले आणि ८ तासानंतर त्याने डोळे उघडले. मला तीन फोटो पाठवले आणि मेसेज आला ‘बॉय वाचलो’
फोटो बघून मी हादरलो होतो कारण त्याला चावलेला साप होता पट्टेरी मण्यार उर्फ branded Crait…
-----------------------------------
P.S.
सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्या मण्यार माहिती असतो, फुरसं, नाग घोणस पण आता सोशल मिडियामुळे सगळ्यांना माहिती झाले आहेत पण पट्टेरी मण्यार हा फक्त गडचिरोली ते ओडिसाच्या पट्ट्यात सापडतो.
२ मीटर लांबीच्या या सापाचे विष हे नागापेक्षा १७ पट विषारी असतं असा म्हणतात. ते मुळात neuro toxic असतं त्यामुळे जास्त भयंकर.... मज्जासंस्थेवर परिणाम करतं.
१० वर्षापुर्वी आदरणीय प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात हा साप बघितला होता. या सापाचे मुख्य खाद्य फक्त सापच आहे.
याच सापाचे खाद्य म्हणून रात्री जंगलात जाऊन साप पकडण्याचे उद्योगही आम्ही प्रकाश आमटे यांच्यासोबत जाऊन केले होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा साप चावला तर त्याचे अँटी वेन्हम भारतात काही वर्षापुर्वी पर्यंत मिळत नव्हते.
नॉर्मल नाग, घोणस चावणे वेगळे, ते पण विषारीच, जीवघेणेच पण हा सापच मुळात अतिदुर्गम भागात सापडतो त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेटही जास्तच...
-----------------------------------
रितेश जीवंत राहिला कारण

तंबूत झोपलेल्या रितेशला साप चावला तो पायाला आणि तो पण ब्लँकेटवरुन... ब्लँकेटच्या जाडीमुळे सापाचा दंश हा पुर्ण क्षमतेने होऊ शकला नाही आणि पुर्ण क्षमतेच्या केवळ ४० ट्क्के दंश रितेशला झाला आणि त्यामुळे परिणामकारकता कमी राहिली.
पण ब्लँकेट नसतं तर किंवा साप ब्लँकेटच्या आत आला असता तर....?

जीवावर उदार होऊन त्या रानातून, खाचखळग्यातून, परिणामांची तमा न बाळगता बोलेरो नेणाऱ्या कमांडोजमुळे रितेश वाचला.... धन्यवाद

आयष्यातली ही कधीही न विसरता येणारी घटना आहे त्याची नोंद राहावी म्हणून हा लेखन प्रपंच...
-----------------------------------

लेख- Rohit Harip

मराठा साम्राज्याचा प्रभाव किती खोलवर आहे याचा अंदाज यावरून येतो पाकिस्तानातील अटोकपासून २५ किलोमीटर पुढे असलेल्या एका गा...
21/07/2025

मराठा साम्राज्याचा प्रभाव किती खोलवर आहे याचा अंदाज यावरून येतो पाकिस्तानातील अटोकपासून २५ किलोमीटर पुढे असलेल्या एका गावाचे नावच “मरहट्टी” आहे.
दख्खनचे मराठे जेव्हा पाकिस्तानपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांच्या सन्मानाने की भीतीने, हे नाव त्या गावाला देण्यात आले.

© महेश पाटील बेनाडीकर

केंद्रीय मंत्री, पुणेकर, मोहोळ साहेब.
20/07/2025

केंद्रीय मंत्री, पुणेकर, मोहोळ साहेब.

कर्नाटकात स्थानिक भाषा लादणारे भाजपवाले आहेत. मग महाराष्ट्राला नाव ठेवणारेही हेच आहेत.एक चेहरा. अनेक मुखवटे. शून्य लज्जा...
20/07/2025

कर्नाटकात स्थानिक भाषा लादणारे भाजपवाले आहेत. मग महाराष्ट्राला नाव ठेवणारेही हेच आहेत.
एक चेहरा. अनेक मुखवटे. शून्य लज्जा.

20/07/2025

मोरोपंतांच्या काळी काही प्राकृतविद्वेषी गीर्वाणपंडीत त्यांचा खरपूस द्वेष करीत. संस्कृत भाषेशिवाय इतर भाषा हीन मानणाऱ्या आणि त्यामुळेच मोरोपंतांच्या मराठी कवितांना तुच्छ लेखणाऱ्या या ढुढ्ढाचार्यांना मयूरकवींनी काय उत्तर दिले, ते आज तीनशे वर्षांनंतरही, एका वेगळ्या अर्थाने सार्थ ठरते.

"गोक्षीर सुवर्णपात्रातून प्याले काय, आणि पटाशद्रुमदलपटलांतून प्याले काय, सारखेच गोड लागते. दिवा सुवर्णपात्रात लावला काय, आणि विरूप खापरीत लावला काय, तो सारखाच प्रकाश देतो. ज्ञान, आनंद, परमार्थ कोणत्याही भाषेच्या द्वारे प्राप्त झाले तरी सारखेच. तद्वत भाषाभिमान सेाडून सुज्ञानें अर्थाकडे दृष्टि द्यावी"

मात्र मोरोपंतांचे हे आवाहन केवळ सुज्ञांसाठी लागू असल्यामुळे बिनडोक खोका-टपरी बहाद्दरांनी आपला हेका सुरु ठेवावा.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!!

-ऋषिकेश

मुस्लिम कसाबांचं आंदोलन सुरू आहे. हा विषय नीट माहीत करून घ्यायला हवा. त्यासाठी एक पोस्ट शेअर करत आहे:खंडणीखोर गोरक्षक आण...
20/07/2025

मुस्लिम कसाबांचं आंदोलन सुरू आहे. हा विषय नीट माहीत करून घ्यायला हवा.
त्यासाठी एक पोस्ट शेअर करत आहे:
खंडणीखोर गोरक्षक आणि मुस्लिम कसाब
“देर आयद, दुरुस्त आयद?” ही फारसीतील म्हण आहे की विलंबाने आले, पण बरोबर आले!
लातूर, परभणी आणि आता महाराष्ट्रातील मुस्लिम कसाब बिरादरीने जनावरे खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंदू शेतकरी आपली जनावरे जिल्हा, तहसील कचेरी येथे नेऊन सोडत आहे आणि सरकारने विकत घ्यावी असा तगादा लावीत आहे.
काही हिंदू शेतकरी ही जनावरे आता बजरंग दल, विहिंपच्या लोकांनी खरेदी करावी, अशी ओरड करत आहेत. मुस्लिम कसाबांच्या फक्त एका निर्णयाने महाराष्ट्रातील हिंदू शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय फार उशीरा झाला, पण चांगला निर्णय आहे. त्याची कारणेही अत्यंत सबळ आहेत.
एकतर जी जनावरे कृषी कामाची नसतात किंवा भाकड जनावरे जी शेतकऱ्याला पोसणे शक्य नसते, तेच बहुतांशी हिंदू शेतकरी बैल बाजारात विकायला आणतात. मुस्लिम कसाब जातीचे व्यापारी त्यास खरेदी करतात. रितसर पावती घेतात. परवाना घेतात. मात्र जनावरांची गाडी रस्त्याला लागली की बजरंग दल, विहिंप किंवा गोरक्षक दलवाले ती अडवतात. मुस्लिम व्यापाऱ्यांना मारहाण करतात. अनेकदा जीव सुद्धा घेतलेले आहेत. मुस्लिमांनी खरेदीची चिठ्ठी दाखविली तरी ती फाडून फेकतात. पोलीससुद्धा ऐकत नाही आणि गोरक्षा दलाच्या लोकांना सहकार्य करून जनावरे जप्त केल्याचा आणि मुस्लिम व्यापाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.
जनावरे विकणारे हिंदू शेतकरी मजेत, मात्र ज्या मुस्लिमांनी रितसर पैसे मोजून, पावती घेऊन खरेदी केले ते अपराधी? हा अन्याय, अतिरेक झाल्यामुळे कसाब बिरादरीने बैल बाजारातून जनावरे खरेदी न करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.
अर्थात या बिरादरीने जर व्यापार करायचाच असेल तर आम्हाला गोरक्षा दल, बजरंग दल सारख्यापासून संरक्षण मिळाले पाहिजे, रितसर पावती, बाजार समितीची चिठ्ठी असल्यावर कुठेही अडवणूक, मारझोड करण्यात येऊ नये आणि असे कुणी करीत असेल तर कडक कार्यवाहीचे आश्वासन मिळत असेल तरच हा व्यापार करण्याची घोषणा संविधान प्रेमी असल्याचीच साक्ष आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील, भारतातील सर्वच मोठे कत्तलखाने, जिथे गोवंश कापून परदेशात पाठविले जातात, ते बहुतेक हिंदूंचेच आहेत! मात्र, आपले रोजीरोटीचे साधन म्हणून गाव, खेडे, शहरातील मुस्लिम खाटिकांना क्रूरपणे त्रास देणे अन्यायकारकच होते.
आज जनावरांच्या कातड्यांपासूनच चार चाकी गाड्यांचे सीट कव्हर, सोफे, पर्स, चप्पल-बुट, बेल्ट इत्यादी बनतात. हाडांपासून बटणे, सौंदर्य प्रसाधने, चरबीपासून अनेक साहित्य वगैरे बनते. अनेक मेडीसीनमध्ये जनावरांचे विविध अंग वापरले जातात... मग हा पुरवठा करणारे जनावरे कोण विकतो? कोण कापतो आणि कोण व्यापार करतो?
दुसरी बाजू
१९९०च्या दरम्यानच मुस्लिम व्यापारी, कसाब यांनी खरेदी केलेले, रितसर पावती, परवाना असलेले जनावरे सापळा रचून, बाजारातून बाहेर पडलेल्या गाड्यांची टिप्स देऊन बजरंग दल, गोरक्षा दलाकडून पकडली जात असे. २५-३० लोकांचा घोळका, धार्मिक आरोळ्या आणि मारहाण यात मुस्लिम कसाब, व्यापारी यांचा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता.
प्रकरण कोर्टात गेले तर जनावरे कोर्टामार्फत गोरक्षण संस्थेला दिली जात होती. हा निकाल लागेपर्यंत जनावरे मेली असलेली असत. असे प्रकार १९९० पासून चालू होते तर ३५ वर्ष हा मुस्लिम कसाब समाज काय करीत होता? याचे नेते, मोठे व्यापारी, वकील काय करीत होते?
मुस्लिम व्यापारी आणि कसाब उगीच भानगड नको, झगडा नको म्हणून बजरंगदल, गोरक्षा दल आणि भ्रष्ट पोलीस इत्यादींना पैसे, लाच देऊन व्यापार करायचे. एक प्रकारे हा सिंडिकेट झाला होता. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे घडत होते. ज्यांनी या लोकांना मॅनेज केले तेच सुखरूप आपले जनावरे ठिकाणापर्यंत नेऊ शकत होते. यात अनेक गोरक्षा दले, बजरंग दल ग्रुप उभे राहिले व राजकीयदृष्ट्या सक्षम झाले.
मीडियाने अनेकदा गोरक्षादल आणि बजरंगदलाचे लोक जनावरांची तस्करी करीत असल्याचे उघड केले. याच काळात अनेक ठिकाणी ‘गोसंरक्षण संस्था’ उभ्या राहिल्या. यांना सरकारी अनुदाने भरपूर मिळाली. मात्र यांचे रिपोर्ट्स अत्यंत भयंकर आहेत. पकडलेली जनावरे या संस्थांना देण्याचा एक प्रघातच कोर्टाने चालू केला होता. यात ८० टक्के जनावरे निकाल लागल्यावर देखील मूळ मालकाला कधीच मिळाली नाहीत. (इंडिया टूडे रिपोर्ट)
अर्थात या काळात मुस्लिम कसाब, व्यापारी वर्गाने बजरंगदल, गोरक्षा दल यांना पैशाचे आमिष देऊन त्यांना पोसले, त्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली, हीदेखील दुसरी बाजू!
याच १९९०च्या दशकात महाराष्ट्रात गोवंश कायद्याच्या विरोधात एक आंदोलन उभे करण्यात आले होते, ज्यात आम्ही स्वतः (जावेद पाशा) पुढाकार घेतला होता. सोबत कॉमरेड विलास सोनवणे, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, आमदार कपिल पाटील आणि कसाब बिरादरीचे काही लोक होते. मात्र यास पाहिजे तसे आर्थिक पाठबळ मुस्लिम कसाब समाजाने दिले नाही. ते दिले असते, किमान जेवढे पैसे त्यांनी बजरंग दल आणि गोरक्षा दल, पोलिसांना दिले त्यापैकी ३० टक्के जरी चळवळीला दिले असते तर हा प्रॉब्लेम कायद्याने आणि आंदोलनाने तेव्हाच रोखला गेला असता.
मात्र, मॅनेज करण्याच्या आणि एक प्रकारे या सर्वांना हाताशी घेऊन जनावरे मागच्या दाराने कापण्याच्या नादात ज्यांना पोसले तेच या बिरादारीच्या छाताडावर बसलेले आहेत. १९९०च्या आंदोलनात वारकरी चळवळीतील कार्यकर्ते सुद्धा होते. आम्ही स्वतः जमियत उल कुरैशचे राष्ट्रीय संयोजक आणि उपाध्यक्ष अब्दुर रहमान कुरैशी यांच्याशी अनेकदा मीटिंग घडवून आणल्या.
याच काळात कसाब बिरादरीने मा. शरद पवार यांना बोलावून एक मोठे अधिवेशन नागपूर येथे घेतले होते आणि १९९२ला गोवंश कायद्यात सुधारणा घडवून आणण्यात काही प्रमाणात यश प्राप्त केले होते. मात्र त्यानंतर पुन्हा तीच प्रॅक्टिस चालू झाल्याने बजरंग दल, गोरक्षा आणि पोलीस यांना पैसे देऊन काम करीत राहण्याचा सवयीने मोठे संकट यांनी ओढवून घेतले होते. आज कसाब बिरादरीने जे आंदोलन सुरू केले आहे, ते योग्य असून कायद्याची जोपासना करणारे आहे. उशीर केला, मात्र ते योग्य दिशेने आहेत.
याच काळात आमचा पहिला कथा संग्रह ‘औरंगजेब आणि जोशी’ १९९२ला प्रकाशित झाला. त्यात ‘ममदु कसाब’ या कथेने खूप प्रसिद्धी मिळवून दिली. कथेत फक्त तेच वास्तव मांडले जे १९९२ला समोर होते. आज तेच अधिक तीव्रतेने समोर आहे.
(जावेद पाशा यांच्या फेसबुक वॉलवरून)

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजिंठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अजिंठा:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share