Rashtra Sanchar

Rashtra Sanchar राष्ट्रसंचार : सत्य , स्पष्ट आणि सखोल

01/06/2025

UNIQUE CONCEPT
to understand international market & new era of earning

Learn Forex trading : Basic to strategies
cost ( F R E E ) *
Duration :8 days ( online )
With little reg cost & 100% returnable deposit.

राष्ट्रसंचार : सत्य , स्पष्ट आणि सखोल

01/06/2025
28/05/2025

मयुरीच्या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट

चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

पुणे : वैष्णवीच्या मृत्यूनंतर मागील वर्षी तिच्याच घरात असलेल्या मयुरी हगवणे हिच्यावर झालेल्या अन्यायाबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती, मयुरी हगवणे यांच्याबाबत राज्य महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याचा दोषारोप होत होता. परंतु आज पोलिसांनी दिलेल्याअहवालाद्वारे मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा पुढे आला आहे.
नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिसांना एफ आय आर दाखल करण्याबाबतचे आदेश दिले. त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली. परंतु पोलिसांनी तपासानंतर महिला अत्याचारासंबंधीच्या या प्रकरणात गुन्ह्याची निरगती ६० दिवसांमध्ये करणे अपेक्षित होते. परंतु ती केली नाही म्हणून माननीय न्यायालयाने मयुरी हगवणे प्रकरणातील आरोपींना दोषारोप मुक्त केले, ही गंभीर बाब आता समोर आली आहे.
याबाबत महिला आयोगा च्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज २८ मे रोजी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालातील माहिती धक्कादायक असल्याचे समोर आले. आवश्यक पोलीस तपासानंतर महिला अत्याचारा संबंधी या प्रकरणाच्या गुन्ह्याची निरगती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना दोषारोपपत्र विहित मुदतीमध्ये न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची बाब या अहवाला मधून स्पष्ट झाली . त्यामुळे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

वैष्णवीचा मृत्यू आणि पिंडावरील कावळे- अनिरुद्ध बडवे संपादक , राष्ट्र संचार वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य म...
24/05/2025

वैष्णवीचा मृत्यू आणि पिंडावरील कावळे

- अनिरुद्ध बडवे
संपादक , राष्ट्र संचार

वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य महिला आयोगाने स्वतः होऊन सुमोटो दाखल करीत या हुंडाबळी प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. आज शनिवारपर्यंत त्यातील सर्व आरोपी अटकेत आहेत, परंतू यातून जी राजकीय अहनामिका माजली त्यात अनेक नेत्यांनी आणि विशेषतः राज्यभरातील सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या महिला नेतृत्वानी वैष्णवी प्रकरणाच्या संवेदनशीलतेचे भांडवल करीत तिचा खांदा वापरला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रूपाली चाकणकर यांच्यावर राजकीय हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला आहे. महिला आयोगापेक्षा पोलीस व्यवस्थेचा दोष यात मोठा आहे. फडणवीस, पवार, चाकणकर यांनी कितीही ' सुशासना ' चा हट्टहास केला तरी ती व्यवस्था ' सुप्रशासना' च्या माध्यमातून पोहोचविणाऱ्या पोलिसांची मानसिकता सुधारण्याचे मोठे
आव्हान आहे. याविषयीचा लेखाजोखा घेणारा विशेष लेख !
.....................,..................................................

अजितदादांची किल्ली अन् हगवणे यांची प्रतिष्ठा

हगवणे यांच्यासारख्या अनेक घटना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. परंतू या प्रकरणातील प्रतिष्ठित अशा हगवणे कुटुंबाच्या लग्नामध्ये अजित पवार यांनी दिलेली फॉर्च्यूनरच्या किल्लीमुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना देखील सतत दमबाजी करणारे दादा अशा क्रिमिनल लोकांच्या सग्या सोयऱ्यांच्या घोटाळ्यामध्ये कसे हा प्रश्न
अनेकांना पडला ? वाईट वर्तणूक खपवून घेणार नाही याबाबत सतत नाकाने कांदे सोलणारे दादा हगवणेंसारखेच निष्ठूर कुटुंबातील सगे -सोयरे आहेत ही कल्पनाच महाराष्ट्राच्या पचनी पडेना. दादांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. राजकीय संबंध असले तरी घरामध्ये काय चालले आहे याची कल्पना अनेकदा राजकीय नेतृत्वांना नसते. आता हगवणे यांच्या सुनेच्या छळाला अजितदादांची संमती नव्हती. शिवाय ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अल्पकाळावरील अत्यंत कठोर कारवाई करत सर्वांना शोधून काढले, अटक केली. परंतु एक राजकीय भांडवल म्हणून अजित दादा आणि रूपाली चाकणकर यांच्यावर राजकीय हल्ले चढवले गेले. त्यांच्यावर मिम्स रिलीज झाले, व्हिडिओ आले आणि जितकी बदनामी राष्ट्रवादीची आणि चाकणकरांची करता येते तितकी करण्याचा प्रयत्न केला.

महिला आयोगावरील आरोप आणि निष्कर्ष

हगवणे प्रकरणामध्ये कारवाईच्याबाबत बोलावे तर महिला आयोगाने स्वतःहून त्याची दखल घेतली. पोलिसांना आदेश दिले. पोलिसांनीदेखिल आठ दिवसांमध्ये सर्व आरोपी अटकेमध्ये आणले. आता हा विषय सरकारच्या किंवा महिला आयोगाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. या प्रकरणाची तपासणी करत असताना मागील वर्षी याच कुटुंबामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती, त्यावेळी वैष्णवीच्या जावेला सासरे असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्याकडून अशाच छळाला सामोरे जावे लागले होते, हे समोर आले. तिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावेळी आयोगाने लक्ष दिले नाही हा एक आरोप करण्यात येतो. त्यावेळी जर सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावर कारवाई झाली असती तर पुन्हा दुसऱ्या सुनेला छळण्याचे त्यांचे धाडस वाढले नसते हा एक निष्कर्ष काढण्यात येत आहे. हा निष्कर्ष अगदी बरोबर आहे. परंतू, यामध्ये महिला आयोगाचा दोष सिद्ध होत नाही. तथापि पोलीस व्यवस्थेचे अपयश मात्र निश्चितपणे समोर येते.

पोलिसी निष्क्रियता ही खरी मेख

आयोगाने त्यावेळी बावधन पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. परंतू पोलिसांनी त्या दोन्ही कुटुंबांना बोलावून समंजसपणे समजावून सांगितले आणि सोडून दिले. इथे या संपूर्ण प्रकरणाची मेख आहे. आयोगाने दखल घेऊन पोलीस ठाण्यात त्याची फिर्याद दिली. येथे आयोगाचा विशेष संपला. परंतू पोलिसांनी ते प्रकरण कसे हाताळले हे तपासण्याचे कुठलीही व्यवस्था सध्या राज्याकडे नाही. पुण्याची पोलीस व्यवस्था ही अत्यंत अविश्वासू आणि असंवेदनशील आहे, हे गेल्या अनेक वर्षांपासून समोर आले आहे. सुनेच्या अंगावर हात टाकणाऱ्या सासऱ्याला समजावून सांगून पाठवायचे की त्याच्यावरती कारवाई करायची ? ही इतकीदेखिल संवेदना पुणे पोलिसांना असू नये याचा अर्थ काय ? आजही कुठलाही सामान्य नागरिक जर पोलिस स्टेशनला गेला तर फिर्यादीलाच भीती वाटावे अशा पद्धतीचे पोलिसाचे वर्तन असते. त्यामुळे पोलिसांच्या दारामध्ये न्याय मिळत नाही हा समज सर्वमान्य झाला आहे. हगवणे यांच्या सुनेलादेखिल हाच अनुभव आला. त्यामुळे वैष्णवीने पुन्हा महिला आयोग किंवा तत्सम कायद्याच्या व्यवस्थेच्या पाठीमागे लागण्याचा विचारही केला नाही आणि स्वतः ते सर्व छळ सहन करत बसली. पोलिसी खात्याच्या बदललेल्या मानसिकतेमुळे अशा पद्धतीने पोलिसांच्या किंवा कायद्याच्या दारात आपल्याला न्याय मिळत नाही याबद्दलचे मत ठाम होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूला ही पोलिसी मानसिकताच जबाबदार आहे..

चाकणकरांवरील हल्ला

महिला नेत्यांवरील अशोभनीय हल्ले हे या नव्या सोशल मीडियावादी समाज व्यवस्थेची सर्वात मोठी विकृती आहे. समाजातील एखाद्या महिलेकडे पाहत असताना ती आपली आई आहे, ताई आहे या भावनेने आपण पहावे ही खरी राज्याची संस्कृती असताना देखिल सरसकट कुठेही नेटिजन्स महिला नेतृत्वावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करतात. त्यांच्या अंगवीक्षेपापासून ते चारित्र्यापर्यंत टीका करत असताना कुणालाही आता याची लाज राहिली नाही. त्याहीपेक्षा दुर्दैवाने आता राजकीय नेतेदेखिल यामध्ये उतरले आहेत. त्याहून ही दुर्दैवाची गोष्ट
म्हणजे राज्यातील सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या महिला नेत्यादेखिल आता त्यांची पायरी उतरत असा मूर्खपणा करीत आहेत.

ओबीसी महिलेचा झंझावात खुपला

तथापि तीच विकृत मानसिकता रूपाली चाकणकर यांच्यावर चाललेल्या हल्ल्याविषयी दिसून येते. वैष्णवीच्या या प्रकरणांमध्ये आपण त्या दुर्दैवी मृतात्म्याचे खांदे वापरतो हेदेखिल भान या राज्यातील महिला नेतृत्वांना राहिले नाही. ज्यांना कुठलाही मतदारसंघ बांधता आला नाही, पाच-दहा हजार मतांच्या जोरावर कुठली निवडणूक लढवता आली नाही, अशा वाचाळ वीर नेतृत्वांमध्ये महिलांचाही सहभाग असावा ही सर्वात मोठी दुर्दैवी बाब आहे. चाकणकर यांच्या सौंदर्यापासून ते राज्यभर चालत असलेल्या त्यांच्या दौऱ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींवरती सध्या टीका होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांना असणारे मानाचे पान आणि त्यांचा एकूणच ओबीसी बेसच्या माध्यमातून वाढत चाललेला जनप्रभाव पाहता त्यांच्यावरती ही टीका विरोधकांकडून एक वेळेस स्वाभाविक आहे, परंतु ती स्वपक्षीयांकडून देखिल केली जाते याचे मोठे आश्चर्य वाटते. दीपक मानकर यांनीही असेच हल्ले चढवले होते पण नंतर चक्क परदेशी महिला त्या संबंधित अवैध धंदे यावर त्यांनाच राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांच्याकडे असलेला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाचा दुहेरी मान हा अनेकांना खटकतो आहे . राज्यभरातील पहिलीच महिला आयोगाचे अध्यक्ष असेल जी प्रत्येक गाव वस्त्यावर वाड्यावर जाऊन तेथे जनसुनावणीचा दरबार लावत आहे, हे देखिल कदाचित पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या राजकीय पक्षांमध्ये जाचत असावे. चाकणकर यांच्या वागण्या-बोलण्यात कधी जातीय अभिनवेश दाखवत नाही तरीही ओबीसी समाजामध्ये अनेक वर्षानंतर अशा पद्धतीची एक महिला लीडरशीप पुढे येत आहे. यापूर्वी पंकजा मुंडे यांच्यासह काही मोजक्या महिला नेत्या यामध्ये पुढे आल्या त्यांनी भ्रष्टाचाराच्या किंवा दबावाच्या अनेक मर्यादा पार पडल्या. या सर्वमान्य नेत्या होऊ शकल्या नाहीत, परंतु रुपाली चाकणकर यांचे नेतृत्व अकलंकीत असे असताना त्याचा प्रभाव ओबीसी कॅडरसह सर्वसामान्य जनतेत देखिल वाढत असल्याचे दिसत असल्यामुळे एक प्रकारच्या अँटीफेमिजन्स आणि अँटी ओबीसी फॅक्टरही त्यांच्या नेतृत्वावर हल्ले चढविण्यासाठी सूप्त पद्धतीने प्रचारक आहे , हे समजून घ्यावे लागेल.

चाकणकर चुकल्या कुठे ?

हगवणे यांच्या प्रकरणांमध्ये रूपालीताई यांची कार्यतत्परता दिसून आली. फक्त त्यांनी टीका करत असताना नंतर जो तोल सोडला त्यामुळे त्यांच्यावरती हल्ले कठोर झाले असावेत. ज्याप्रमाणे फडणवीस किंवा नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यावरील आरोपांना अत्यंत संयमाने उत्तर दिले, त्याच पद्धतीने हा संयम ठेवणे गरजेचे आहे, परंतू बातम्यांमुळे जागा मिळते, चिल्लर पार्टी.... अशा काही शेलक्या आरोपांमुळे चाकणकर यांच्यावरील आरोपाची धार पुन्हा एकदा तीव्र झाली आणि आरोपाला प्रतिउत्तर देत विरोधी महिला नेतृत्व आपली पातळी सोडून कधी खाली गेल्या हे लक्षात आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे पत्नीवरील आरोपांना अत्यंत संयमीत उत्तर दिले किंवा दुर्लक्ष करून अनुउल्लेखाने मारले त्या पद्धतीने चाकणकर यांची चाल अपेक्षित होती. वास्तविक पाहता त्यांच्यावर सोशल मीडियावर होणाऱ्या आरोपांना त्या अत्यंत संयमितपणे आणि तटस्थपणे पाहतात त्याच पद्धतीने त्यांनी या वाचाळ महिला नेतृत्वांना अनुउल्लेखाने मारायला हवे. पण त्यांच्या कर्तव्याबाबत मात्र , त्यांनी केवळ पोलिसांवरील कोड कौतुक करतन फिरता त्यांच्या वर्तणुकीचे देखिल धडे घेतले पाहिजेत. ज्याप्रमाणे अजित दादा समोरच्या अधिकाऱ्याला जागा दाखवतात आणि त्यामुळे दादांचा धसका घ्यावा लागतो त्या पद्धतीने आयोगाच्या अध्यक्षांचा धसका अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे.

पुण्याच्या पोलिसांना सुधरवा

देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा रूपाली चाकणकर हे सर्वच कर्तबगार असले तरी त्यांची व्यवस्था सांभाळणारे जे पुणे पोलीस आहेत ते अत्यंत निष्प्रभ आणि अत्यंत असंवेदनशील आहेत, हे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख तेच दर्शवतो. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये आज कोणी सामान्य माणूस गेला तर महिला एपीआय पासून दरडावणारे आणि फिर्यादीच्या अंगावर धावून जाणारे पोलीस कर्मचाऱ्यांचा सामना त्याला करावा लागतो. केवळ जबाब नोंदवून घेण्याची कार्यवाही होते. डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून न घेता सामान्य फिर्यादीचा हक्क डावलला जाण्याची ही मानसिकता जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात दिसते. सामान्य माणसाला कुठल्या नगरसेवकाच्या, आमदारांच्या फोन किंवा चिठ्ठीचा आधार असेल तरच सामान्य माणसाला पोलिसांच्या समोर प्रतिष्ठा मिळते. अन्यथा कुठलाही पोलीस निरीक्षक सामान्य माणसाला प्रतिष्ठा देत नाही, त्याचे ऐकून घ्यायला तयार हाेत नाही. त्यामुळे पोलिसांची मानसिकता बदला. आलेल्या प्रत्येक पीडीताचे समाधान होईल, त्यांच्यावरती कार्यवाही होईल याकरिता त्यांना संवेदनशीलतेने लोकांशी, जनतेशी वागायला सांगा तरच तुमचे सुशासन सुप्रशासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या एकट्यांची धडपड आणि तळमळ अशा निगरगट्ट प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये प्रभावी ठरणार नाही.

23/05/2025



सिलेंडर गॅसला पर्याय – पाण्यावर चालणारी नैसर्गिक गॅस शेगडी! चे प्रात्यक्षिक आर्ट ऑफ लिविंग , बेंगलोर येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात झाले. त्याच्या व्हिडिओ आज राज्यभरात वेगाने व्हायरल होत आहे.

गॅस सारख्या महागड्या व्यवस्थेपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाल्याने लोकांनी याचे प्रचंड स्वागत केले आहे.

कोरेगाव-खटाव मतदारसंघ चे आमदार महेश शिंदे यांनी याचे सादरीकरण केले आहे.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीराला अटक
23/05/2025

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीराला अटक

रूपालीताईंच्या जनता दरबारात 500 हून अधिक सूचनांचे थेट निर्देश _____________________________________आमदार , खासदारांच्या ...
21/05/2025

रूपालीताईंच्या जनता दरबारात 500 हून अधिक सूचनांचे थेट निर्देश
_____________________________________
आमदार , खासदारांच्या उदासीनतेमुळे त्रासलेल्या मतदारांना दिलासा
_______________________________________
पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज वडगाव पुणे येथे झालेल्या जनता दरबारामध्ये सुमारे 500 हून अधिक सूचनांची दखल घेत त्याच्यावर कार्यवाही बाबत प्रशासनाला थेट निर्देश देण्यात आले.
आज सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार तब्बल साडेतीन ते चार तास चालला . वडगाव , सिंहगड रोड , धायरी , कोंडवा ते अगदी कात्रज पर्यंतच्या अनेक नागरिकांनी आपले गाऱ्हाणे घेऊन हा जनता दरबार गाठला होता.

खडकवासला मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार किंवा खासदाराकडून कुठलाही जनता दरबार घेतला जात नाही.
त्यामुळे सामान्य नागरिकांचा त्यांच्याशी थेट कनेक्ट होत नाही .
परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथे हा दरबार सुरू केल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळत आहे .
आता त्यांच्याकडे पुन्हा आयोगाचे अध्यक्ष पद आल्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वच प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आदेशाचे थेट पालन करतात . त्यामुळे नागरिकांना येथे मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसते .

आज हा जनता दरबार होणार असल्याच्या सोशल मीडियावरील जाहिराती पाहून येथे लोकांनी आपले अर्ज घेऊन मोठी गर्दी केली. परंतु प्रत्येकाची भेट घेत रूपालीताई चाकणकर यांनी प्रत्येकाच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम केले.
क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान संचलित स्व. सुषमा स्वराज महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, वडगाव खु.पुणे येथे हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

या दरम्यान विविध विभागातील नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, अडचणी तसेच शासकीय योजनांबाबतच्या सूचना मोकळेपणाने मांडल्या. सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले. प्रत्येक मुद्द्यावर पाठपुरावा केला जाईल, याची नागरिकांना हमी देण्यात आली.

या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पो.स्टे श्री. दिलीप दाईगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी पो.स्टे श्री अतुल बोस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवेली पो.स्टे श्री सचिन वांगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजगड पो.स्टे श्री राजेश गवळी, सहाय्यक आयुक्त, मनपा सिंहगड रोड श्री तिमया जगले, सहाय्यक गटविकास अधिकारी हवेली पंचायत समिती श्री नागवे, PSI श्रीमती शीतल थेंबे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष श्री.बाबा धुमाळ, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष श्री.राजेंद्र पवार, खडकवासला महिला अध्यक्ष शुभांगी खिरीड, युवक अध्यक्ष श्री.सागर कोल्हे, ग्रामीण युवक अध्यक्ष श्री.शशिकांत किवळे, श्रीमती आम्रपाली शिरसाट, समुपदेशक व इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16/05/2025

*Forex mastery program*

( An initiative of *Free education* by Excel CSR desk )

ज्याप्रमाणे भारतीय शेअर बाजार हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE ) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ( NSE ) या माध्यमातून चालतो त्याच पद्धतीने फॉरेक्स मार्केट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालते.
भारतीय शेअर बाजारामध्ये कंपन्यांच्या शेअरच्या मूल्यातील चढउतारावर तसेच ट्रेडिंग चालते त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉरेक्स मध्ये गोल्ड , सिल्वर , कॉपर , क्रिप्टो अशा अनेक स्तरांवर ट्रेडिंग चालते.

भारतीय कंपन्या जशा सेबी ( SEBI ) मध्ये रजिस्टर असतात तशा आंतरराष्ट्रीय फॉरेक्स मार्केटमध्ये मेटा फाईव्ह वर रजिस्टर करून अनेक कंपन्यांचे व्यवहार चालतात.

आंतरराष्ट्रीय बाजारातील हे व्यवहार भारतीय बाजारांपेक्षा अनेक पटीने अधिक मूल्यांचे आणि वेगवान असतात. तसेच ते आठवड्याचे पूर्ण दिवस 24 तास चालतात.

फॉरेक्स मध्ये किमान 100 डॉलर म्हणजे सुमारे आठ हजार रुपयांपासून आपण कितीही गुंतवणूक करू शकतो .

*कोर्स बद्दल*
ABOUT COURSE
फॉरेक्स मास्टर कोर्स हा केवळ इंटरनॅशनल मार्केटमधील गुंतवणुकीच्या शिक्षणाला प्रोत्साहित करतो . त्यामुळे मराठी जनतेला आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे , ट्रेडिंगचे ज्ञान हा या कोर्सचा एकमेव शुद्ध हेतू आहे.

एक्सेल बी अँड ए रिसर्च इन्स्टिट्यूट ही सीएसआर फंड प्रोव्हाइडेड अभ्यासक्रम चालवते. त्यामुळे या कोर्ससाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही.
तथापि या कोर्समध्ये केवळ गुंतवणुकीस आणि ट्रेडिंग प्राधान्य देणारे लोक यावेत , त्यांना या शिक्षण आणि व्यवहाराबद्दल गांभीर असावे यासाठी आम्ही याचे नोंदणी म्हणून 250 /- रुपये आणि कोर्स फी डिपॉझिट म्हणून 10,000/- रुपये आकारतो .
डिपॉझिट ची ही रक्कम आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये कॅपिटल म्हणून वापरता येते . अन्यथा आपण पुन्हा आपल्या बँक अकाउंटला ती परत घेऊ शकता.

या कोर्सला Agil Global ltd यांनी प्रोत्साहित ( Supported) केले आहे . एजेस ग्लोबल ही दुबई स्थित मेटा फाईव्ह वर रजिस्टर असलेली एक अधिकृत आणि विख्यात ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे.
आपले अकाउंट एजेस ग्लोबल सोबत असेल तर आपल्याला पुढच्या तीन महिन्यापर्यंत दररोज उपयुक्त टिप्स आणि ट्रेडिंगच्या वेगवेगळ्या डेली स्ट्रॅटेजी पुरविल्या जातील , ज्या आपल्या ट्रेडिंगच्या ज्ञानामध्ये भर घालतील.

Course by ,
Excel B&A Research institute
( Reg. Solapur F 3467 )

Supported by ,
Agil Global ltd.
IND | UAE

Markets by
Vision media , Pune

Duration
1 जून ते 10 जून
सायंकाळी 6 _ 7
झूम कॉल /कॉन्फरन्स

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांची यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सरप्राईज विजिट पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च प्रकरण ...
15/05/2025

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांची यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सरप्राईज विजिट

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च प्रकरण घडल्यानंतर राज्य महिला आयोगाने धर्मादाय आयुक्त सोबत घेतलेल्या बैठकीत सर्वच हॉस्पिटलमध्ये दर्शनी फलक लावण्या संबंधी सूचना केल्या होत्या. आयोगाच्या निर्देशानुसार आयुक्तांना सूचना देऊन सर्व हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे तक्रार निवारण समितीचे फलक दर्शनी भागात लावली आहेत किंवा नाहीत याची पाहणी काल महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केली. त्यांच्या या अनपेक्षित सरप्राईज दौऱ्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची धांदल उडाली.
रुग्णाच्या हिताकरिता महिला आयोगाने आता दक्षतेने कारभार सुरू केला आहे हे पुन्हा एकदा समोर आले.

बुधवारी राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अचानक पाहणी दौरा घेत यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड येथे प्रत्यक्ष जाऊन स्थितीची पाहणी केली. रुग्णसेवा, सुविधांची उपलब्धता आणि नियमांची अंमलबजावणी याचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर संबंधितांची सविस्तर चर्चा करून सुधारणा आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माजी महापौर मा. योगेश बहल, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, POSH समिती अध्यक्षा डॉ. दिपाली अंबिके, प्रा. व मानसोपचार तज्ञ डॉ. मंजीत संत्रे, सहयोगी प्रा. डॉ. स्मिता ठक्करवाड, प्रा. डॉ. महेश असलकर, कविता आल्हाट, उज्वला ढेरे, कविता खराडे, कोमल कवडे, मोनाली सातपुते व तर मान्यवर उपस्थित होते.

कधी कळी पुण्याच्या पर्यटनाचे नाक ठरणाऱ्या आणि अत्यंत प्रेक्षणीय स्थळ ठरलेल्या कात्रज येथील म्युझिकल फाऊंटन ची ही आजची अव...
15/05/2025

कधी कळी पुण्याच्या पर्यटनाचे नाक ठरणाऱ्या आणि अत्यंत प्रेक्षणीय स्थळ ठरलेल्या कात्रज येथील म्युझिकल फाऊंटन ची ही आजची अवस्था !



मस्के - कर्वे हाय प्रोफाईल लग्नाला दिग्गजांची उपस्थिती पुणे: निवृत्त मुद्रांक शुल्क उपसंचालक वसंतराव मस्के यांचे चिरंजीव...
11/05/2025

मस्के - कर्वे हाय प्रोफाईल लग्नाला दिग्गजांची उपस्थिती

पुणे: निवृत्त मुद्रांक शुल्क उपसंचालक वसंतराव मस्के यांचे चिरंजीव शंतनू आणि दिवंगत उद्योजक प्रतापराव कर्वे यांची कन्या संपदा यांचा हाय प्रोफाईल लग्न सोहळा काल येथील ग्रँड शेरेटोन हॉटेलमध्ये पार पडला.
अलीकडे पुण्यात झालेल्या मोजक्या दिमाखदार विवाह सोहळ्यांपैकी हा एक सोहळा होता .
राजकारण, समाजकारण, उद्योग , सिने नाट्य अशा क्षेत्रातील अनेक दिग्गजानी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
ग्रँड शेरेटोन मध्ये खास या विवाह सोहळ्यासाठी विशेष सजावट करण्यात आली होती . प्रवेशद्वारापासूनच विविध प्रकारचे पुष्प डेकोरेशन आणि सुवासिक अत्तरांनी पहिल्या मजल्यापर्यंत मान्यवरांचे स्वागत होत होते.
सुमारे चार बॅक्वेंट हॉलमध्ये ४८ प्रकारचे सुवासिक व्यंजनांचा अंतर्भाव असलेले स्नेहभोजन होत होते तर मुख्य विवाह दालनामध्ये लब्धप्रतिष्ठितांची रेलचेल दिसून येत होती.
सौ वसंतराव मस्के आणि सौ कौशल मस्के यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
सकाळी साडेदहाच्या सुमारास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे , सिंहगड इन्स्टिट्यूट चे प्रमुख मारुती नवले , सुनंदा नवले तसेच डॉ. रचना नवले _ अष्टेकर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. तर सायंकाळच्या स्वागत समारंभास राज्यभरातून अनेकांनी हजेरी लावली.

महाराष्ट्रीय परंपरा, संस्कृती याला अनुसरून पारंपारिक मंगलाष्टकाच्या निनादामध्ये हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी खा. डॉ. मेधा कुलकर्णी ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, भाजपाचे संघटक राजेश पांडे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सचिन इटकर , इंदिरा इन्स्टिट्यूटच्या डॉ. तरिता शंकर, विखे फाऊंडेशनचे डॉ. अशोक विखे ,कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस संचालक सुनील फुलारी, सुप्रसिद्ध गायिका देवयानी बेंद्रे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राज्याचे अतिरिक्त वित्त सचिव ओ.पी . गुप्ता, त्यांच्या सौभाग्यवती डॉ. राखी गुप्ता, प्रशासकीय अधिकारी अनिल डिग्गीकर, पुढारीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश जाधव, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, शेरेटोन ग्रँड चे प्रमुख आणि प्रथितयश बिल्डर आर के अग्रवाल, पुण्याचे डीसीपी मिलिंद मोहिते, परिक्षेत्र महासंचालक अरविंद चावरीया, सारंग आव्हाड, सोलापूरचे उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी , सुहाना मसाल्याचे प्रमुख राजकुमार चोरडिया, पुणे इन्कम टॅक्सचे अतिरिक्त आयुक्त स्नेहल सोनकवडे, निवृत्त आयएएस रमेश देवकर, श्री मुत्याळ, सुप्रसिद्ध उद्योजिका सौ विद्याताई जोशी,
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी वसंत वैद्य, मुंबई येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, तत्कालीन आयएएस ऑफिसर माधव सांगळे , शिरीष कारले, दिलीप बंड , प्रथितयश उद्योजक राजकुमार झंवर, व्यवसाय उद्योजक प्रमोदशेठ धारिवाल , हॉटेल उद्योजक राम पाटणकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जयंत शहा, अल्फा लवल च्या पूनावाला, लेखक विश्वास पाटील दुबईचे उद्योजक राजेश बाहेती, राष्ट्र संचार चे संपादक अनिरुद्ध बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

In pic : शंतनू आणि संपदा यांच्या विवाह सोहळ्या वेळी उपस्थित महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, सिंहगड इन्स्टिट्यूट चे प्रमुख एम एन नवले, सौ सुनंदा नवले, श्री वसंतराव मस्के, सौ. कौशल मस्के.

What is brahmos ? दरवर्षी १०० ब्रह्मोसची निर्मितीलखनऊ   : भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले असून, केंद्र...
11/05/2025

What is brahmos ?

दरवर्षी १०० ब्रह्मोसची निर्मिती

लखनऊ : भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले असून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लखनऊ येथील ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन आणि टेस्टिंग सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे दरवर्षी १०० ब्रह्मोस मिसाइलांचे उत्पादन शक्य होणार आहे. संरक्षणमंत्र्यांनी याला राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिनाशी जोडत १९९८ च्या पोखरण अणुपरिक्षणाची आठवण करून दिली आणि भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचे कौतुक केले.

राजनाथसिंह म्हणाले, “ही सुविधा देशाच्या संरक्षण सामर्थ्याला बळ देणारी आहे. डीआरडीओ, वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या मेहनतीला मी सलाम करतो.” त्यांनी या प्रकल्पाला देशातील तरुण, अभियंते आणि वैज्ञानिकांचे यश असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत ब्रह्मोस मिसाइलाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “पाकिस्तानला ब्रह्मोसची ताकद माहीत आहे. या मिसाइलाने दहशतवाद्यांना धडा शिकवला.” भारतीय वायुसेनेनेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीची पुष्टी केली. हे ऑपरेशन राष्ट्रीय हितासाठी गोपनीय आणि सुनियोजित पद्धतीने सुरू आहे.

दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेखेवर तणाव वाढला आहे. शनिवारी शांती करारानंतरही पाकिस्तानने घुसखोरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर २४ मिसाइले डागली होती. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल हल्लेही यशस्वीपणे हाणून पाडले. ही सुविधा भारताच्या संरक्षण सज्जतेला नवी उभारी देणारी ठरेल.

#ब्रह्मोस_मिसाइलची_वैशिष्ट्ये –

प्रकार: सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, भारत-रशिया संयुक्त प्रकल्प

वेग: २.८ ते ३ मॅक (ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट), शत्रूच्या रडारला चकवण्यास सक्षम.

पल्ला: २९० ते ४५० किमी (मॉडेलनुसार), अचूक लक्ष्यभेद.

वजन: सुमारे २,५०० किलो (हवाई आवृत्ती: २,२०० किलो).

लांबी: ८.४ मीटर, व्यास: ०.६ मीटर.

इंधन: रॅमजेट इंजिन, ठोस आणि द्रव इंधन संयोजन.

लक्ष्यभेद: जमीन, समुद्र आणि हवाई लक्ष्यांवर अचूक हल्ला.

प्रक्षेपण: जमीन, पाणबुडी, युद्धनौका आणि लढाऊ विमानांवरून प्रक्षेपण शक्य.

मार्गदर्शन: इनर्शियल नेव्हिगेशन, जीपीएस, ग्लोनास आणि रडार-आधारित मार्गदर्शन प्रणाली.

सामर्थ्य: २००-३०० किलो विस्फोटक, उच्च विध्वंसक क्षमता.

वापर: भारतीय नौदल, लष्कर आणि वायुसेनेत कार्यरत, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये यशस्वी.

विशेष: स्टेल्थ तंत्रज्ञान, कमी उंचीवर उड्डाण, शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला भेदण्याची क्षमता.

Address

Nal Stop, Erandwane
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtra Sanchar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rashtra Sanchar:

Share