Rashtra Sanchar

Rashtra Sanchar राष्ट्रसंचार : सत्य , स्पष्ट आणि सखोल

 #ब्रॅण्डिंगच्या_दुनियेचा_बादशहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस काल देशभरात धुमधडाक्यात साजरा झाला . वाढदिवस...
17/09/2025

#ब्रॅण्डिंगच्या_दुनियेचा_बादशहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस काल देशभरात धुमधडाक्यात साजरा झाला . वाढदिवसानिमित्त तालुकास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहित केले गेले . भव्य दिव्य कार्यक्रमांची शृंखला निर्माण करत असताना संपूर्ण देश मोदीमय कसा होईल याची याचे पुरेपूर नियोजन करण्यात आले . अर्थात सलग अकरा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या आणि भारतासारख्या एक नवशक्ती , महाशक्ती म्हणून जगाच्या समोर येत असलेल्या देशाचा पूर्ण बहुमताचा पंतप्रधान म्हटल्यावर हे सगळं स्वाभाविक आहे. पंतप्रधानांचं इतकं मोठं ब्रँडिंग , मार्केटिंग आणि त्या उंचीवरून करण्यात आलेले हे सगळे कॅम्पेनन्स त्यांच्या प्रभावशाली कारकीर्दीला शोभूनच दिसतात.
गेल्या काही महिन्यांपासून मोदी यांच्या विरोधामध्ये देशभरात एक प्रकारचा आक्रोश आणि आंदोलन सुरू आहे . त्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस थोडा झाकोळेल असं वाटत होतं. परंतु नेमकं त्याच्या उलट भारतीय जनता पक्षाने केलं. या सगळ्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी मोदी यांचे कार्य , त्यांची प्रतिमा , त्यांचे संकल्प याची पुन्हा एकदा अत्यंत प्रभावीपणे उजळणी व्हावी अशा पद्धतीने देशभरामध्ये मोदी उत्सव साजरा करण्यात आला . हा उत्सव साजरा करत असताना नेमक्या पद्धतीने ब्रॅण्डग कसे करावे ? याचा एक धडाच भाजपाने आणि त्यांच्या मीडिया टीमने घालून दिला आहे. प्रत्येक राज्याचे विशेषतः भाजपा शाशित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या त्या राज्याच्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मोदी यांच्या कौतुकाचे लेख लिहायचे . डिजिटल मीडियाने गेल्या दहा वर्षातील अनेक लहान-सहान रिल आणि भावनिक प्रसंग एकत्रित करून त्याचे बुस्टिंग करायचे. तसेच मुंबई ,नागपूर , पुणे यासारख्या भागामध्ये तेथील खासदार किंवा मंत्री याच्याकडे यजमानपद देऊन एका मेगा इव्हेंटच आयोजन करायचे ही यावेळेसच्या मोदी वाढदिवसाचे स्टेटस आहे .
एक प्रचंड नियोजनबद्ध कार्यक्रम यासाठी राबतो आहे. एक नियोजनबद्ध यंत्रणा यासाठी राबत आहे . या देशांमध्ये खचितच एखाद्या दुसऱ्या पक्षाला हे इतकं स्मार्टवर्क आणि ग्राउंड लेव्हलची स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग जमेल . किमान आज तरी तसा पक्ष दृष्टिक्षेपात नाही. केडर बेस असलेल्या या पक्षाने शेवटच्या कार्यकर्त्यापासून ते प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री पर्यंत सर्वांना कामाला लावले आणि हा मोदी उत्सव संपूर्ण देशभरामध्ये घडवून आणला. हे घडवत असताना पुण्यामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रोन शोचा अनोखा कार्यक्रम साकारला. ड्रोन एकत्रित करायचे आणि त्या माध्यमातून आकाशामध्ये विविध प्रात्यक्षिक दाखवायची हा एक अफलातून प्रयोग पुण्यामध्ये घडला .
वर्तमानपत्राच्या जाहिराती आणि रस्त्यावरचे रक्तदान शिबिरापासून विविध कार्यक्रम हे तर वाढदिवसाचे नेहमीचे आयुध आहेत . परंतु याच्याही पलीकडे जाऊन पाच ते दहा हजार लोकांना एकत्रित करून यापूर्वी कधीही पाहिले आणि असे काहीतरी विलोभनीय दर्शन घडविणे आणि त्याची चर्चा सतत तेवत ठेवणे हे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगचे एक नवीन शस्त्र आहे , जे भाजपाने लिलया पेलेले. जे पुण्यामध्ये घडले. महाराष्ट्रात घडले . तेच विविध प्रांतामध्ये आणि राज्यांमध्ये घडले . देशभरातील राष्ट्रीय स्तरावरील मोदी उत्सव साजरा करत असताना इव्हेंट, जाहिराती , बातमी , संपादकीय लेखन , ग्राउंड लेव्हल ऍक्टिव्हिटी प्रभाग निहाय कार्यक्रम त्याच्या पलीकडे जाऊन भव्य दिव्य करण्याचा एक मोठा इव्हेंट देशभर साजरा करण्यात आला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सेंट्रल कमिटीने चक्क तस कार्यक्रम दिले जेथे धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी सकाळी मोदींच्या नावे पूजा आजच्या तेथील अभिषेक तेथे संत महंतांना त्याची आमंत्रणे त्यांचे मानसन्मान
जेथे लोककला आणि त्यांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी लोककलांचे कार्यक्रम त्यांचे निमंत्रणे जेथे पैसे खर्च करण्याची ताकद आहे अशा ठिकाणी दोन सारखे कार्यक्रम. 75 या आकड्याच्या अवतीभवती फिरणाऱ्या जितक्या संकल्पना ब्रँडिंगच्या दुनियेत आहेत तितक्या काल आणि आज राबविल्या गेल्या .
मोदी यांच्या प्रतिभेला ते शोभणारे आहे. परंतु एखाद्याच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला ही शोभणारे नसेल पण त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या भव्य दिव्य ब्रँडिंग च संकल्पना साकारली गेली, तर अस्तित्वाहूनही काहीतरी उत्कट असे दर्शन राष्ट्राला घडल्याशिवाय राहणार नाही आज मोदी कॅम्पेन किंवा भाजपाची ब्रॅण्डिंगची ही ब्रॅण्डिंगची स्ट्रॅटेजी पाहता मोदी हे बॅंडिंग आणि मार्केटिंगचे बादशहा आहेत हे मान्य केले पाहिजे.

: अनिरुद्ध बडवे
संपादक, राष्ट्र संचार. पुणे
9226337627

 #शिवसेनेचा सांस्कृतिक चेहरा ! #आज नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस आहे. खरंतर नीलमताई या प्रथमदर्शनी शिवसेनेच्या स्वभावाच्य...
11/09/2025

#शिवसेनेचा सांस्कृतिक चेहरा ! #

आज नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस आहे. खरंतर नीलमताई या प्रथमदर्शनी शिवसेनेच्या स्वभावाच्या दिसत नाहीत ! त्यांच्या स्वभावाची, प्रकृतीची, प्रवृत्तीची एकूण ठेवण ही कधीच आक्रमक, दुराग्रही अशी नाहीच. तरी एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी पक्षांमध्ये विविध जबाबदाऱ्या पेलेल्या आणि त्या यशस्वीरित्या पार पाडल्या. कदाचित शिवसेनेचे रस्त्यावरचे आक्रमक राजकारण आणि महाराष्ट्राच्या मर्यादिशील स्त्री शक्तीची चौकट यामध्ये एक सक्रिय आणि विधायक दुवा म्हणून त्यांनी काम केले आणि त्यामुळेच आज महिलाशक्ती या पक्षाच्या पाठीमागे उभी करण्यात नीलमताई यांचा मोठा वाटा आहे.

२००५ मधील शिवसेना उपनेते पदापासून ते तीनही टर्म विधान परिषदेच्या सभापती पर्यंतची कारकीर्द म्हणजे खऱ्या अर्थाने शिवसेनेची एक संविधानिक ओळख राज्यासमोर ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. राग अनावर झाल्यावर सभागृहात, अहो पडळकर तुम्हाला काही शिस्त बिस्त आहे का नाही... ? असे म्हणत आपल्या सहकारी पक्षाच्या आमदाराला खडसावणाऱ्या नीलमताई कधीतरी आभावानेच पाहायला मिळतात. एरव्ही कितीही आरडाओरडा, गोंधळ आणि बेशिस्त असले तरी देखील कधी संसदीय आयुधांच्या माध्यमातून तर कधी वैयक्तिक स्नेहबंधांच्या आग्रहातून त्यांनी अनेक सदस्यांना थांबविले, अनेकांना न्याय दिला, अनेकांना संधीही दिली आणि या राज्याचे हे उच्चतम सभागृह सुरळीतपणे चालेल याचे दक्षता घेतली. कधी कधी शिस्तीच्या चौकटीला अगदी सुरंग लावणाऱ्या पडळकरांसारख्या आमदारावर देखील त्या बरसल्या, परंतु व्यक्तीशः भाव, राग, द्वेष या कधीही त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये डोकावू दिला नाही.

तसं पाहिलं तर नीलम ताईंचा संबंध हा आजोळच्या प्रेमातून. पण त्याहीपेक्षा तो खरा जाणवला तो पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राबद्दल असलेल्या विकासात्मक उत्कट भावनेतून. पंढरपूरचे देशपांडे हे त्यांचे आजोळ आणि तिथूनच त्यांना कवितेचा आणि प्रतिभावंत काव्याचा वारसा मिळाला तर सासरी करंदीकर यांच्या माध्यमातून तो वारसा साहित्यिक प्रांतांमध्ये स्वच्छंदतेने प्रवाहित झाला. म्हणूनच उत्कृष्ट वक्तृत्व सोबतच त्यांनी अनेकविध पुस्तकांचे लिलया लेखन केले.
राजकारण, साहित्य, दिव्य _अंध _अपंगांच्या सेवेतून समाजकारण, सिने _ नाट्य समीक्षण आणि महिला सक्षमीकरण ही त्यांच्या कर्तुत्वाची यशोशिखरे आहेत.
शिवसेनेत असूनही एक शब्द समन्वयी आणि सुसंवादी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणावर छाप पाडली.

दोन वर्षांपूर्वी शिवसेना दुभंगली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आपली निष्ठा वाहिली. गेल्या अनेक वर्षांपासून चाललेली त्यांची एक प्रकारची घुसमट या निमित्ताने थांबली आणि शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा त्याच पदावर विराजमान करत महाराष्ट्राच्या महिला शक्तीचे प्रातिनिधित्व बहाल केले.

आज पुण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रभावी चेहरा म्हणून नीलमताई या अनेकविध पातळीवर काम करीत आहेत. जाहिरातबाजी, कोडकौतुकांचे रकाने, सरंजामी दरबार या सगळ्यांपेक्षा दूर राहात रचनात्मक पद्धतीने राष्ट्र उभे करण्याच्या भावनेने नीलमताई च काम अहोरात्र सुरू आहे. पुण्यातील रॉयल स्टोन बंगल्यापासून ते विधान परिषदेतील त्यांच्या दालनापर्यंत सातत्याने गरजूंचा, पदाधिकाऱ्यांचा, पत्रकारांचा आणि राज्यातील प्रतिभावंतांचा राबता त्यांच्याकडे असतो आणि त्या सर्वांच्या सुसंवादातून अनेकांचे प्रश्न सोडवत असतात.

त्यांच्या व्यक्तिमत्वाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समाजकारणाचे, शिक्षणाचे आणि राजकारणाचे अनेक पैलू आहेत. आपल्या उदंड परदेश यात्रांमधून त्यांनी जग जाणले आणि त्यातील विकासाचे धागे एकत्रित करून राष्ट्र विकासाच्या भरजरी वस्त्राचे स्वप्न विणले. पंढरपूरच्या विकासाबाबत तर त्यांनी सातत्याने घेतलेल्या बैठका या कुठल्याही लोकप्रतिनिधीला लाजवेल अशा होत्या. खरंतर पंढरपूरचा विकास आणि त्याचे प्रकल्प कार्यान्वित होत असताना त्या कुठेही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून व्यवस्थेमध्ये नव्हत्याच. सोलापूर जिल्ह्यात तसे त्यांचे पद ही नव्हते. परंतु केवळ शहराबद्दलची आपुलकी आणि तेथील आध्यात्मिक तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी हा आग्रह असल्यामुळे ताईंनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, विकास आराखड्याच्या सदस्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सातत्याने स्वतः बैठकांमध्ये पुढाकार घेतला आणि तेथील अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

आज महाराष्ट्रात अनेक पक्षांमध्ये ज्या महिला नेत्या आहेत त्या सगळ्यांचे स्वभाव आणि गुण दोष पाहता नीलम ताई गोरे या खऱ्या अर्थाने या राज्यातील अग्रक्रमाच्या महिला नेत्या असाव्यात याची सामान्य माणसाला साक्ष पटते.

सुषमा अंधारे, चित्राताई वाघ, रोहिणीताई खडसे, रूपालीताई चाकणकर, सुप्रियाताई सुळे, पंकजाताई मुंडे अशा अनेक महिला नेत्या आज प्रादेशिक स्तरावर काम करतात. परंतु या सर्वांना जे दोष चिकटले आहेत, त्या सर्वांपासून नीलमताई या कैक पटीने लांब असल्याचे दिसते. त्यानी कधीही वैयक्तिक हेवेदावे, आचकट _ विचकट हवभाव, वक्तव्य, व्यक्तिगत किंवा जातीवाचक टीका टिप्पणी अथवा राजकीय, सार्वजनिक जीवनाला डाग लागेल असे वर्तन केले नाही. त्यांचे चारित्र्य देखील या सार्वजनिक जीवनामध्ये सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि धवलांकित राहिले. यामुळे सर्व महिला नेत्यांपेक्षा नीलम ताई गोरे या उजव्या ठरतात.

आज पर्यंत महाराष्ट्रातील दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना आणि स्त्री शक्तींना त्यांनी सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन या माध्यमातून मदत केली आहे . घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटांची त्यांनी स्थापना केली आणि त्या स्त्री आधार केंद्रामार्फत पोलीस स्टेशनच्या लढाईपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत त्यांनी सक्रिय सहकार्य केले.
स्त्री सक्षमीकरणाचा आविष्कार, एक प्रतिभावंत लेखिका, व्यासंगी साहित्यिका, संवेदनशील समाजकारणी आणि संसदीय आयुधे जाणणारी संविधानिक राजकारणी अशा अनेक विविध रत्नांनी नीलम ताई गोरे यांचे व्यक्तिमत्व आज रत्नजडित आभूषणांनी भारलेले आहे आहे.

अशा या महाराष्ट्राच्या ताईस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

#अनिरुद्ध बडवे
संपादक राष्ट्र संचार
[email protected]


#नीलमताई #वाढदिवस #शिवसेना

अजितदादा (गिरी) ना नडणारी ! 1981 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आयपीएस अधिकारी शरद प्रसाद पांडे यांनी कानपूर येथील ...
05/09/2025

अजितदादा (गिरी) ना नडणारी !

1981 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आयपीएस अधिकारी शरद प्रसाद पांडे यांनी कानपूर येथील एका बड्या राजकीय व्यक्तीवर आयकर धाड टाकली होती आणि ' इतिहासातील सर्वात मोठी रेड ' म्हणून ती गाजली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी पांडे यांना फोन करून तो छापा थांबविण्याची सूचना केली . त्यावेळी पांडे यांनी दिलेले उत्तर हे त्यांच्या करारी आणि धाडशीपणाचे ऐतिहासिक उदाहरण ठरले. पांडे म्हणाले होते की , ' मॅडम प्राईमिनिस्टर आपण जे सांगत आहात ते लेखी पाठवा . हे समजू शकत नाही की तुम्ही स्वतःच फोनवर आहात की अन्य कोणी आपल्या नावाने फोन करीत आहे ' असे आदेश देणे इंदिरा गांधी यांना शक्य नव्हते आणि त्यांनी फोन ठेवला.
अनेकांनी 2018 मध्ये आलेल्या रेड या सिनेमात कदाचित हा इतिहास पाहिला असेल. आज याची आठवण होण्याचे कारण म्हणजे माढा तालुक्यातील कुरडू येथील उपविभागीय अधीक्षक IPS अंजना कृष्णा यांनी ' महाराष्ट्राचे दादा ' अजितदादा पवार यांना दिलेले उत्तर !
महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाचा करारीपणा सर्वांनाच माहित आहे . ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारीच नव्हे तर जेष्ठ नेते सुद्धा फार त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करीत नाहीत . कधी दादांचा पारा चढेल आणि कधी त्या हाड ! हुड !! ..... मधून कार्यकर्त्याचा पालापाचोळा उडून जाईल , हे सांगता येत नाही. असे असले तरी दादा हे शिस्तबद्ध आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ' चुकीचे काम खपवून न घेण्याबद्दल ' आग्रही असतात. मात्र अंजना कृष्णा यांच्या व्हिडिओतून एक वेगळेच सत्य समोर आले आणि त्यातून दादांच्या विरोधामध्ये सातत्याने 'दादा'गिरी ची टिप्पणी करणाऱ्यांच्या आरोपात तथ्य आहे की काय असे वाटू लागले ?
सरकारी कंत्राटांमधून महामार्ग बांधत असताना जो मुरूम निघतो त्याची ठराविक रक्कम भरून तो मुरुम ठेकेदारांना किंवा बांधकाम व्यवसायिकांना दिला जातो. कुर्डू येथे असेच एक काम सुरू असताना तेथे अचानक अनेक भूमाफिया , टिपरवाल्यांनी गर्दी केली आणि कुठलाही परवाना , खनपट्टी न भरता ते मुरूम उचलून घेऊन जाऊ लागले. कर्तव्यावर असणाऱ्या अंजना कृष्णा यांना तहसीलदारांनी याबाबत माहिती दिली असता त्या स्वतः तातडीने कार्यक्षेत्रावर पोहोचल्या आणि त्यांनी त्या गाव गुंडांना मज्जाव केला. शासकीय महसूल लाटला जाऊ नये हाच त्यांचा हेतू. पण अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेले दादा त्या गावगुंड कम ठेकेदारांना आठवले. आणि त्यांनी थेट दादांना फोन लावला . आता ठराविक जवळच्या कार्यकर्त्यांचा फोन दादा स्वतः उचलतात हे माहीत असल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलेला ! अपेक्षेप्रमाणे दादांनी फोन उचलला आणि थेट अंजना कृष्णा यांना दमात घेतले .ही कारवाई थांबवा ! असे आदेशच उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले . त्यावर कृष्णा यांनी , सर आपण मला माझ्या फोनवर फोन करून हे आदेश द्याल का ? असे सुचविले. अजित दादांना असे स्पष्ट बोलणारा महाराष्ट्रात दुर्मिळ ! दुर्मिळच नव्हे तर कदाचित एकमेवाद्वितीयच !!
दादांच्या ' दादा' गिरी चा कानोसा लागलेले मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या दादागिरीचा उल्लेख हसत हसत _ कोपरखळ्या मारत करतात . त्यांना थेट कोणी ऐकवणे अशक्यच. तर अशा अंजना कृष्णा यांनी दादांना ही सूचना केली आणि दादांचा पारा चढला. त्यांनी व्हिडिओ कॉल करून अंजना कृष्णा यांनी यांना आदेश दिले आणि कारवाई थांबली ही गोष्ट वेगळी....
मात्र कुणीतरी दादांनाही असे ' भेटले ' याची चर्चा मात्र राज्यभर सुरू झाली. वास्तविक पाहता अशा ठेकेदार कम कार्यकर्ता कम वाहतूकदारांच्या माध्यमातूनच पक्षाची ' बेसिक मनुष्यबळाची बांधणी ' होते आणि तिथूनच पक्ष वाढीस लागतात , हे महाराष्ट्राला नवीन नाही . अजित दादा माणूस चांगला पण त्यांनी गाव पातळीवर एक गुंडशाहीला पोषक ठरणारे कार्यकर्ते पोसले , या बद्दल कायमच त्यांच्याबद्दल एक प्रकारचा रोष व्यक्त होतो. हगवणे प्रकरणापासून तर , ' असले कसले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ' अशा जाहीर टोमणे भाजपवाल्यांनी सुरू केले आहेत. एरवी कागद पडले , पुष्पगुच्छ आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाली पडल्या , खुर्च्या आडव्या तिडव्या लावल्या किंवा कॉलमची लांबी _ रुंदी पाच दहा सेंटिमीटरने इकडे तिकडे आली तर कटाक्ष ठेवून नियमात काम करण्याचा आग्रह धरणारे दादा अशा वेळेस नियम गुंडाळून का ठेवतात ? हे देखील आकलनाच्या पलीकडच आहे .
नेमके दादा खरे कोणते ? असा प्रश्न पडावा असे वर्तन देखील अनेकदा त्यांच्याकडून घडते. अंजना कृष्णा या जर खरोखरच खणपट्टी न भरता शासनाचा महसूल असलेला मुरूम बेकायदेशीरपणे घेऊन जाणाऱ्या ठेकेदारांना , कार्यकर्त्यांना अडवत असतील तर ती त्यांची कृती योग्यच असायला हवी, मात्र कुठलीही चौकशी न करता , शहानिशा न करता दादांनी थेट कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. हे का बरं ? याचा विचार कदाचित गाव पातळीवरील कार्यकर्ते करणार नाही पण शहरातील सजग नागरिक मात्र नक्की करेल .
राष्ट्रवादीची खरी ताकद अजूनही खेड्यात मर्यादित आणि संकुचित आहे . शहरात, महानगरात ती रुजविण्यासाठी तटकरे _ पवार _ चाकणकर _ प्रफुल्लभाई धडपड करीत आहेत. अशा शहरांमध्ये दादांचा काटेकोरपणा , कडक शिस्त , वावगे वागणाऱ्या कार्यकर्त्यांना _ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावणाऱ्या त्यांच्या कृती या काहीशा अपील होत असल्या तरी अशा पद्धतीने नियमात वागणाऱ्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारावर चालविलेली दादागिरी मात्र रुचणारी नाही.
शहरातच काय पण शांत , सभ्य , नियमशीर गाव _ खेड्याच्या महाराष्ट्रात देखील दादांची ही अरेरावी फारशी पचणी पडणारी नाही.
अर्थात हल्ली जन माणसातील प्रतिमा , पक्ष नेतृत्वाचे ध्येयधोरणे , त्यावर होणारे कल यापेक्षा ' मतांची बेगमी आणि जात समाजाचे एकीकरण _ ध्रुवीकरण ' यातून निवडणुका जिंकण्याचे कसब नेते लोकांना माहीत झाले आहे. त्यामुळे दादांचे कदाचित फारसे बिघडणार नाही पण या निमित्ताने अंजना कृष्णा यांच्यासारख्या काही अधिकारी आजही व्यवस्थेमध्ये आहेत याचे मनस्वी समाधान मात्र समाजाला वाटले .

*सर्वाधिक गर्दी खेचणारा संयुक्त भेलके नगर चा शिवपार्वती देखावा*पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे आकर्षण असते. त...
04/09/2025

*सर्वाधिक गर्दी खेचणारा संयुक्त भेलके नगर चा शिवपार्वती देखावा*

पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे आकर्षण असते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे गणरायाचे दर्शन आणि भव्य देखाव्यांचा ढोल, ताशे, वाद्य वृदाचा अनुभव घेण्यासाठी लोक येतात. मानाच्या गणपती सह पेठ परिसरातील काही प्रमुख गणेशोत्सव मंडळे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र यंदाचा गणेशोत्सव कोथरूड येथील संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाने गाजविला. संयुक्त भेलके नगर मित्र मंडळ हे सर्वाधिक गर्दी खेचणारे आणि सर्वात चर्चेत असणारे मंडळ म्हणून यंदा पुढे आले. या मंडळाने भेलके नगर चौक कोथरूड येथे शिवपार्वती विवाह सोहळ्याचा सजीव देखावा उभा केला होता.

शिव शंकराचे अनेकविध रूपे, विवाह सोहळ्याचे प्रसंग, त्याच्या अनुषंगाने रोषणाई, नाट्यछटा, सजीव पात्रे या सर्वांमुळे एखाद्या शिवकालीन सभे मध्येच आपण आलो आहोत हा अनुभव दर्शकांना येत होता.

उत्सव प्रमुख उमेश भेलके आणि मंडळाचे अध्यक्ष धनेश हगवणे तसेच संतोष भेलके यांनी हा देखावा उभा करण्यात नियोजनबद्ध परिश्रम केले. या मंडळाचे यंदाचे ५० वे वर्ष असून शिवपार्वती विवाह सोहळा आणि भव्य जिवंत देखाव्यामुळे कोथरूड हेच यंदाच्या गणेशोत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरले.






-----------

गणेशोत्सवात मानाचा गणपतीच्या दर्शनाला गेलो. रांगेतून वाट काढत मूर्ति समोर पोहोचल्यावर , साहजिकच खिशात हात गेला .... नाणं...
28/08/2025

गणेशोत्सवात मानाचा गणपतीच्या दर्शनाला गेलो.
रांगेतून वाट काढत मूर्ति समोर पोहोचल्यावर , साहजिकच खिशात हात गेला ....
नाणं काढून दानपेटीत टाकलं .
नमस्कार केला..
पुन्हा खिशात हात घातला . आणखी दोन नाणी काढली.
एक बायकोच्या हातात दिलं , एक मुलाच्या .
त्यांनीही दानपेटी टाकल
#आपल्या_माणसाच्या हातूनही पुण्य घडाव ही भावना ! बाकी काय ?

एक बातमी : पार्थ दादा आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी लालबागच दर्शन घेतलं . नंतर दादानी खिशातून पैसे काढत जॅकलीन च्या हातात दिले .तिने मोठ्या श्रद्धेने ते दानपेटीत टाकले.

#आपापल्या_माणसाचा_पुण्य_प्रपंच

26/08/2025



 #सहकार_शिरोमणीचा_लेखाजोखा................................................... #स्वार्थ , संशय आणि निष्क्रियतेमुळे अधोगती...
25/08/2025

#सहकार_शिरोमणीचा_लेखाजोखा...................................................
#स्वार्थ , संशय आणि निष्क्रियतेमुळे अधोगतीची 25 वर्षे..............................................

#पार्श्वभूमी
पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेतृत्व उदयाला आलं. प्रस्थापित राजकारणाची चौकट मोडून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या नेतृत्वाला बळ दिले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारू सोलापूर जिल्ह्यामध्ये उधळला. विठ्ठल परिवाराच्या अंतर्गत सभास, शेतकऱ्यांच्या सहकार्याने चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. दुर्दैवाने या परिवाराने वसंतरावांचे नेतृत्व हरवले आणि वारसदार म्हणून कल्याणराव काळे यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली. वसंत दादा खरे कर्तुत्व पुरुष होते. वसंतराव यांनी चार नव्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. दोन हातात होते. मात्र पुढील पिढीने या स्वप्नातील कारखान्याचा आरंभ केला नाहीच तथापि विठ्ठल हातातून घालवला आणि आता सहकार शिरोमणी देखील जाण्याच्या मार्गावर आहे .

#पारंपारिक_विरोधक
आज हा कारखाना खाजगी उद्योजकाला देण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काळे परिवाराचे पारंपारिक विरोधक असलेले दीपक पवार यांनी या संभाव्य खाजगीकरणाला विरोध करत पुन्हा एकदा कल्याणराव काळे यांच्या गैरकारभाराचा पाढा समोर वाचला.
वास्तविक पाहता पूर्वी दामू अण्णा पवार आणि आता दीपक पवार यांनी सातत्याने काळे यांच्या या कारभाराला विरोध करत कारखान्यांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु काळे परिवाराने ' गावकी ,भावकी, जवळकी' च्या नात्याने गुंफलेली कारखान्याची ही वीण त्यांना आजपर्यंत उसवता आली नाही.
सभासदाच्या हिताचे असलेले अनेक मुद्दे जनतेला पटायचे परंतु कधी गणगोताच्या , नाती_ गोतीच्या भावनेने सातत्याने सभासदांनी काळे परिवारालाच कौल दिला.

#निष्क्रियतेची_25_वर्षे
वास्तविक पाहता कल्याणराव काळे हे चेअरमन होऊन आज 25 वर्षे झाले . परंतु कर्जमुक्ती , ऊस उत्पादकांना दर , वेळेत हप्ता याबाबत कधीही या कारखान्याने प्रगतीची एकही पायरी चढली नाही.
ज्यावेळी विठ्ठलच्या घुसळणीतून वर आलेले सिताराम चे लोणी कल्याणरावाना टिकवता आले नाही तेव्हाच त्यांची साखर कारखाना चालविण्याबाबतची ' संकुचित बुद्धी ' समजून आली होती . परंतु केवळ काळे यांचा वारस म्हणून सभासदांनी त्यांच्यावरती दीर्घकाळ विश्वास ठेवला.
त्यांच्यासोबत वाटचाल करीत असलेले विठ्ठल राव शिंदे साखर कारखाना , त्यांच्याच परिवारातील असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना , पांडुरंग सहकारी चे एक्सपान्शन अशा अनेक कारखान्यांनी प्रगती साधली.
विठ्ठल च अवस्था तर चंद्रभागे पेक्षाही वाईट होती . अभिजीत पाटील यांच्या बद्दल कितीही वाद विवाद झाले तरी सगळ्या संकटावर मात करून त्यांनी हा कारखाना चालू केला . नव्याने गाळप करता झाला. त्यामुळे यातून त्याची सक्रियता आणि कर्तुत्व सिद्ध होते. त्याच वेळेस मात्र सहकार शिरोमणी साठी हीच सगळी संसाधने , ऊस क्षेत्र, सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असताना देखील हा कारखाना केवळ अधोगती करत गेला.

#अधोगतीचे_त्रिकूट
या सातत्यपूर्ण अधोगतीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कल्याणराव काळे यांचा अत्यंत संशयी स्वभाव , सहकारी संचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील अविश्वास आणि मूळतः साखर कारखाना चालवण्याबाबतची ' असमंजस बुद्धी' .
जेव्हा विरोधक कल्याणराव काळे यांना कारखान्यातला काही कळत नाही असे म्हणत होते , त्यावेळी लोकांनी त्यांना राजकारणासाठीचे विरोधक ठरवले . परंतु आज पंचवीस वर्षानंतर खरोखरच या नेतृत्वाने या कारखान्याची , त्या सभासदांची, ऊस उत्पादकांची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या पाहुण्या _ रावळ्यांची किती अधोगती केली आहे , हे समोर येते.

गेल्या दहा वर्षापासून कारखान्याला एच एन टी म्हणजे वाहन, टोळी ऍडव्हान्स अशा खर्चासाठी जी कर्ज मिळत होते , ते देखील अनेक संस्थानि नाकारले आणि तेथूनच या कारखान्याच्या अधोगतीला सुरुवात झाली .
काळे यांच्यावर सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाचा जसा घात झाला तसाच प्रत्येक राजकीय नेत्याचा , त्यांच्या पक्षाचा आणि आर्थिक संस्थांचा झाला आहे . सातत्याने जो सत्ता स्थानावर आहे त्याच्या पायऱ्या झीजवायच्या , 5/ 25 हजार मतांची बेगमी करायची आणि कारखान्याला मदत आणायची हे त्यांनी गेल्या दोन दशक भर केले.
जो ज्येष्ठ सभासद , जेष्ठ ऊस उत्पादक कारखान्याच्या भल्याच्या हिताच्या चार गोष्टी सांगतो त्याला पुढच्या संचालक मंडळातून डच्चू देण्याचा त्यांनी प्रघात पाडला .
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील सातत्याने अविश्वास दाखवला .वाडी कुरोलीचे दोन अधिकारी जर सोडले तर कोणाच्याही हातामध्ये सहकार शिरोमणीच्या कारभाराबाबत कल्याण काळे यांनी विश्वासार्ह चर्चा केली नाही .. त्यामुळे कोणाचेही शहाणपण या कारखान्यात कधी चालले नाही. कल्याण काळे आणि ह्या दोन अधिकाऱ्यांनी _ अशा त्रिकूटाने या कारखान्याची त्रेधा तिरपीट केली असे आता सभासद सांगत आहेत.

ाबाकीचे_राजकारण
ज्यांनी कारखाना उभारणीमध्ये खांद्याला खांदा लावून लढा दिला , त्या सगळ्यांचे राजकीय खच्चीकरण कल्याणराव काळे यांनी केले. सुरेश दाजी बागल . बाळासाहेब देशमुख. कौलगी अण्णा , दामू अण्णा , पंडित भोसले . हिम्मत आसबे , गोरख तात्या ताड , तावशी चे यादव . नागणे सर अशा अनेक निष्ठावंतांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला .
आज कृष्णात पुरवत , नागणे सर , मुकुंद देवधर हयातीत नाही . पण यांच्या सहकार्यामुळेच स्व. वसंतदादा हे धाडस करू शकले. या सगळ्यांना कल्याणरावांनी दूर लोटले , अशी चर्चा आहे त्यामुळे ते अखेरच्या क्षणी खट्टू होते .
इतकेच नव्हे तर ज्या शिवसेनेमुळे चंद्रभागा कारखान्याचे निर्मिती झाली , त्या शिवसेनेच्या नेत्यांना कारखान्यामध्ये प्रवेश होऊ द्यायचा नाही हा निर्णय जणू काही घेतल्यामुळे अनेक शिवसेनेचे नेते नाराज झाले . संभाजी राजे शिंदे , दत्ता भोसले हे देखील त्या कारखान्याच्या पायरीचे दगड होते .
वजाबाकीचे राजकारण करत अनेकांचे सभासदत्व रद्द केले , त्या संचालकांनी विठ्ठल कडे ओढा घेतला. काहींनी बबनदादा शिंदेंकडे घेतला . ऊस बंद केले . त्यामुळे परिणामी कारखान्यालाच त्याचे नुकसान झाले. कै. वसंतराव काळे यांनी सतत बेरजेचे राजकारण केले. त्याचे नेमके उलटे राजकारण कल्याण रावांनी केले.

#पाहुणे_ रावळे देशोधडीला लावले
कल्याणराव काळे यांना सभासदांपेक्षा देखील त्यांच्या घरच्यांनी , मोलाची साथ दिली . अनेक पाहुणेरावळे , गावकी , मित्र मंडळी , साखर व्यापारी अशा अनेकांची साथ घेऊनच कल्याण काळे यांनी वाटचाल केली . परंतु प्रत्येक पायरीला प्रत्येकाच्या डोक्यावर पाय देऊन त्यांनी यशाची शिखरे चढण्याचा प्रयत्न केला.
' आमच्या सगळ्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या , सिबिल खराब केले ' अशी ओरड आता गणगोता मध्ये सुरू आहे. आज या कारखान्याला मदत करणारा एकही घटक राहिला नाही.

#बदलत्या_निष्ठेचा_विक्रम
या महाराष्ट्रात कल्याण काळे यांनी जितके पक्ष बदलले तितके कोणीही बदलले नसतील. पक्षप्रवेश करायचा , सत्ताधाऱ्यांकडून फंड्स मिळवायचे हे त्यांचे रुटीन आहे . त्यांनी आठ वेळा पक्ष बदल केले . कधी तिकिटाच्या बेगमीवर , कधी उमेदवाराला मदत करायची म्हणून तर कधी सभासदांच्या नावावर सतत पक्ष प्रवेश केले . पैसे आणले . दीपक पवार यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार , गेल्या पाच वर्षात कारखान्याला तब्बल 900 कोटी रुपये मिळाले आहेत . कुठे गेले हे 900 कोटी ? इतर जबाबदाऱ्या पार पाडत असताना कायम शेतकऱ्याना पैसे देण्याच्या बद्दल पाठीमागे ठेवले. कधीही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका व्यक्तिशः कल्याण काळे आणि त्यांच्या संचालकाने घेतली नाही. आलेलेे पैसे वाडीच्या _ भाळवणीच्या शिवारापर्यंत पोहोचायच्या आधीच पुण्यातील मोहम्मदवाडीच्या बंगल्यात त्याची ' वाटणी ' संपून जायची. अशी चर्चा होत होती. आणि हे आता सर्वच पक्षांच्या नेतृत्वांना माहीत झाले आहे.

#अजित_पवारांची_नाराजी
अनेक पक्ष फिरल्यानंतर शेवटी आज कल्याण काळे अजित पवार यांच्या वळचणीला गेले आहेत. आणि ही कल्याण काळे यांची सर्वात मोठी चूक आहे . कारण अजित पवार हे वास्तववादी नेते आहेत . ते कधीच भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत . भेटायला आलेला समोर दारात बघितला की , कशा करता आलाय? किती रुपया करता आलाय ? याने मागे काय माती खाल्ली ? पुढे ह्याला काय घोळ घालायचेे आहेत .... दादांच्या चाणाक्ष नजरेत याचे एका क्षणात स्कॅनिंग होते.

मदतीची जाण नसेल आणि त्याचे काही आउटपुट मिळत नसेल तर किती वेळा मदत करायची ? हे अजितदादा यांचेच शब्द आहेत. मागील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच्या उपसमितीत राजगड , छत्रपती सहकारी याच्यासह अनेक कारखान्यांच्या आर्थिक मदतीचे विषय होते . सहकार शिरोमणीचाही प्रस्ताव होता . तो प्रस्ताव थांबवला गेला हे विश्वसनीय वृत्त आहे . सोलापूर जिल्ह्याचा विषय चर्चेला आल्यानंतर या समितीमध्ये केवळ माळशिरस च्या शंकर सहकारी ची चर्चा झाली. सर्व कारखाने मागे ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
कल्याणराव काळे यांच्यावरती आज कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे कदाचित हा कारखाना कुठल्यातरी बड्या उद्योगपतीला द्यायचा आणि पुन्हा काही कोटी एकत्रित करत राजकारण करत बसायचे हा त्यांना सुचलेला शेवटचा पर्याय दिसत असावा. परंतु ते या कारखान्याचे मालक नाहीत , विश्वस्त आहेत हे ते विसरले.
मध्यंतरी एका नेत्याबद्दल जिल्ह्यात खूप चर्चा होत होती. ते नेते ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता गेली म्हणून समजा. हे असे पंधरा वर्षे घडत असल्यामुळे आजही प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात ' छोटा पप्पू ' म्हणून कोण प्रसिद्ध आहे याच्या सुरस चर्चा ऐकायला मिळतात.

#राजकीय_आत्महत्या
सहकार शिरोमणी कारखाना हा खाजगी उद्योजकाला देणे म्हणजे स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या वारसदारीची राजकीय आत्महत्या ठरेल. दादांच्या निष्ठावंत शिलेदारांना हे मान्य होणारे नाही. कार्यक्षमता नसेल तर कितीही मोठी वारसदारी असली तरी ती संपून जाते . आज औदुंबर अण्णांनी खऱ्या अर्थाने जे विकासाचे साम्राज्य सुरू केले होते , त्यांचा फोटो केवळ औपचारिकता म्हणून राहिला आहे . स्वर्गीय वसंतदादांचे तसे होऊ नये , त्यांच्या स्मृती त्यांच्या साम्राज्याच्याच रूपाने जिवंत रहाव्यात. ही सभासदांची इच्छा आहे.

#पर्याय_काय ?
जो भावकी , गावकी संभाळू शकत नाही तो कारखाना काय चालवणार ? अशा प्रकारची कठोर टीका आज कल्याण काळे यांच्यावरती होत आहे. आता ही लढाई सभासदांची राहिली नाही तर आधी ती भावकीतून सुरू झाली आहे . आपलाच कुटुंबकर्ता निष्क्रिय असल्याची जाणीव सगळ्या भावकीला झाली आणि तिथून खरी खदखद सुरू झाली आहे.
कल्याण काळे यांनी आता केवळ राजकारण करावे आणि हा कारखाना भाऊबंदकीतील कर्तृत्ववान सहकार्यांना संभाळयला द्यावा असाही एक सूर उमटत आहे. समाधान काळे यांना प्रोजेक्ट करण्याचे काम या निमित्ताने सुरू झाले आहे.
एक वेळ अभिजीत पाटील आणि समाधान काळे दोघांनी मिळून कारखाना चालवावा पण सभासदांची ही हालअपेष्टा थांबवावी , असा प्रामाणिक सूर स्वर्गीय वसंतरावांचे नेतृत्व मानणाऱ्या आणि काळे घराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या वर्गातून निघत आहे.
विशेषतः अजित पवार यांच्या देखील नजरेत समाधान काळे यांचे नेतृत्व नव्याने आले आहे . कल्याण रावांचे नेतृत्व बाजूला झाल्याशिवाय अजित दादांसारखा चोखंदळ माणूस या कारखान्याला मदत करू शकणार नाही . हा राष्ट्रवादी काँग्रेस मधीलच सूर आहे.

एक तर समाधान _ अभिजीत यांचे नेतृत्व पुढे आणावे अन्यथा दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील ' नव्या सोंगट्यांना पट ' उपलब्ध करून द्यावा , तरच स्व. दादांचे नाव चिरंतन राहील , हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल .

- अनिरुद्ध बडवे
[email protected]

23/08/2025

23/08/2025

जाणून घ्या प्रारूप आराखडा : पुण्यात निवडून येणार 165 नगरसेवक 41 प्रभाग निश्चित
22/08/2025

जाणून घ्या प्रारूप आराखडा :

पुण्यात निवडून येणार 165 नगरसेवक
41 प्रभाग निश्चित

दादांची गोची अन कंगनाची मध्यस्थी !अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रा...
22/08/2025

दादांची गोची अन कंगनाची मध्यस्थी !

अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. स्वाभाविकपणे विरोधी पक्षांसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत टीका करत अजित पवार यांना लक्ष्य केले.

गेल्या दोन वर्षापासून शाहू - फुले - आंबेडकरवादी राजकारणाचे प्रतिनिधी असलेले अजित पवार आणि याच्या परस्पर विरोधी असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपा यांच्यामध्ये जवळीकता वाढली. हा परस्पर भिन्न विचार निभावताना अजित पवार यांची दमछाक होत आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानुभव हे अजित पवार यांच्या प्रवेशाने नाके मुरडतात. वारंवार आमंत्रण देऊन देखील गोळवलकर स्मृतीसहित अनेक कार्यक्रमांना अजित पवार हे येत नाहीत, सहभागी होत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे संघ धार्जिने असलेले भाजपवाले सुद्धा अजित पवार यांना फारशी पसंती देत नाहीत.

तर दुसरीकडे शाहू - फुले - आंबेडकर हा विचार स्वीकारणाऱ्या काँग्रेस - राष्ट्रवादी मधून अजित पवार यांचे नेतृत्व पुढे आले आहे. महाराष्ट्रातील फुले - आंबेडकरवादी जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनी भाजपशील सलगी केली आणि सरकारमध्ये सहभागी झाले. परंतु भाजपाचा मुख्य विचार, आचार त्यांची प्रकृती ही पूर्णतः भिन्न आहे. त्यामुळे मतभेदाच्या या ठिणग्या अधून मधून उडत असतात. या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी आपण संघाच्या संबंधित आहोत, हे देखील अजित दादांना भासवावे लागेल. परंतु त्याचवेळी ग्रामीण महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरवादी जनतेला आपण संघनिष्ठ झाल्याचे चित्र रुचणारे नाही याचे देखील भान त्यांना आहे.

*कंगना राणावत याची भूमिका*

भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या लीडरशिप साठी कार्य करत असताना एक कॉर्पोरेट बॉन्डिंगची एक वेगळी यंत्रणा विकसित झालेली आहे. आणि ती सतत कार्यरत असते. आकर्षक , प्रभावशाली अशा चेहऱ्यांच्या माध्यमातून पक्षाशी आणि लीडरशिपशी अनेक घटक संलग्न करण्याची एक यंत्रणा भाजपामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्मृती इराणी या त्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून इराणी यांचे महत्त्व कमी होऊन त्यांची जागा कंगना राणावत यांनी घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांची ही 'स्मार्ट मुव्ह' समजली जाते.

त्यामुळे कंगना राणावत सध्या विविध नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांचे भेटून हे कॉर्पोरेट पर्सनल बॉण्डिंग घट्ट करीत आहेत. मागच्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांना घेऊन त्या शिर्डी येथे गेल्या होत्या. आता सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांनी सलगी साधली आहे.

मुंबईत कंगनाचे घर पाडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तिने जो थयथयाट केला आणि ठाकरे यांच्या त्यावेळच्या परिस्थितीची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी करत ठाकरे उध्वस्त होण्याची शापवाणी केली, त्यातून सारेच भाजपवाले प्रभावित झाले. त्या प्रभावातून कंगना राणावत यांना खासदारकी देखील मिळाली.

कंगना राणावत या आता भाजपासाठी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यासाठी काही घटकांचे ' सलगणी' करण करण्यात, अनेकांमध्ये स्नेहसेतू बांधण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत आहेत. एक प्रकारे हे त्यांचे ' अंडर कव्हर' मिशन आहे. त्यातीलच एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीच् आयोजन केले . त्यामध्ये त्यांनी अनेक कॉर्पोरेट महिला, माजी खासदार, विद्यमान खासदार आणि महिला पदाधिकाऱ्यांना बोलावले. त्यात सुनेत्रा वहिनी यांना देखील आमंत्रित केले गेले.

सातत्याने संघाची निमंत्रणे झुगारणाऱ्या अजित दादांना कदाचित पत्नीला आलेले हे निमंत्रण त्यातल्या त्यात राजकीय सोयीचे वाटले असणार, म्हणून सुनेत्रा वहिनींनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

यापेक्षा या प्रकरणात वेगळे काही नसावे.

#अनिरुध्द बडवे
[email protected]


#कंगनाराणावत
#स्मृतीइराणी

21/08/2025


Address

Nal Stop, Erandwane
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtra Sanchar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rashtra Sanchar:

Share