Pune Crime News

Pune Crime News पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यातील ?

13/11/2022

सासवड लोकअदालतीत ४२४ खटले निकाली काढले

सासवड दि. 13, (पुणे क्राईम न्यूज) सासवड, ता. पुरंदर येथील न्यायालयात शनिवारी दि. १२.११.२०२२ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी प्रकरणे, प्रलंबित तडजोडपात्र व गुन्हा कबुलीची फौजदारी प्रकरणे, सर्व दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ४२४ खटले निकाली काढण्यात आले आहेत. यात एकूण २ कोटी ५१ लाख चाळीस हजार रुपयांची वसुली झाली आहे. सासवड न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश ताहीर बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश डी. एम. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एम. एस. भरड हे पॅनलप्रमुख होते. त्यांना ॲड. प्रसाद किकले, ॲड. पल्लवी भोसले, ॲड. राहुल काळे यांनी सहाय्य केले. या वेळी सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय भोईटे, उपाध्यक्ष ॲड. रूपेश ताकवले, ॲड. एन. के. जाधव, ॲड. अण्णासाहेब खाडे, ॲड. कलाताई फडतरे, ॲड. गणेश लेंडे, ॲड. अनुश्री भारंबे, ॲड. गायकवाड, ॲड. दिगंबर पोमण, ॲड. सौरभ वढणे, ॲड. तेजस खाडे आदी उपस्थित होते.

*‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद*  *बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक*  चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या...
22/10/2022

*‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद*
*बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक*
चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार
पुणे : ‘कोथरूड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पहाट दोन दिवसीय कार्यक्रमास रसिकांचाा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘कोथरूड सुरोत्सवाच्या पहिल्या दिवशी 20 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केलेे होते. तर दुसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबर 2022 रोजी सांयकाळी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी सदाबाहर गाणे सादर केली. यावेळी बेला शेंडे यांच्या गाण्यावर रसिक थिरकले होते. कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् पाहिले होते.
‘कोथरूड सुरोत्सव’ कार्यक्रमात पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महारांजाची मुर्ती भेट देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

*'सुरोत्सवा'ने रसिक झाले मंत्रमुग्ध*  *राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने* पुणे :   सुप्रसिद्ध शास्त्...
20/10/2022

*'सुरोत्सवा'ने रसिक झाले मंत्रमुग्ध*

*राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने*

पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्र सिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले होते.
�कोथरूड सुरोत्सव� उत्सव सुरांचा दिवाळी पहाट आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् यांनी पाहिले.
कार्यक्रम सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांच्यावतीने राहुल देशपांडे, अमृता नातू यांच्या शास्त्रीय गायन, सदाबाहर गाीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिकली. काल रात्री जोरदार पाऊस झाला असतांना देखील आज पहाटे पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. 1600 पेक्षा अधिक रसिक कार्यक्रमास उपस्थित होत तर ऑनलाईन सुमारे 2000 नागरीक सहभागी झाले होते.
तसेच 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 05:30 वाजता सुरांच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सदाबाहर गाणे सादर करणार असून सूत्रसंचालन समीरा जोशी करणार आहेत. यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

कॅन्सरग्रस्तांसोबत दिवाळी विथ परपजपुणे दि. ९ : (पुणे क्राईम न्यूज प्रतिनिधी) केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉ...
09/10/2022

कॅन्सरग्रस्तांसोबत दिवाळी विथ परपज
पुणे दि. ९ : (पुणे क्राईम न्यूज प्रतिनिधी) केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पीटलने आज कॅन्सर रुग्णांसोबत दिवाळी कमांड हॉस्पिटल के चरक सभागृहात साजरी केली. यावेळी मेजर जनरल बी.के गोयल, व्हीएसएम कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे, ले.ज. एम. ए. तुताने, महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री सल्लागार डॉ. सुभाष. आर साळुंके, सकाळचे संपादक सम्राट फडणविस, संस्थेचे संचालक एन.एस. न्यायपथी सोबत कॅन्सर रुग्णांचे नातेवाईक, नर्स, मावशी आदी उपस्थित हेाते.
मोफत रुग्णांवर सर्वोत्तम उपचार करणार्‍या केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटलचे कार्य अतुलनीय आहे, ही संस्था म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी देव आहे, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. दिवाळी विथ परपज कार्याक्रमात रुग्णांच्या नातेवाईक भावोत्कट झाले होते. रुग्णांची याठीकाणी एक आई जशी करते त्याप्रमाणे केली जाते, विश्रांती हे एक मंदीरच आहे, ही भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
कर्करोगाच्या उपचारात रुग्णाला तीव्र वेदना होतात. त्यासाठी वेदना व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अनेकदा मृत्यू अटळ असतो. त्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदनारहित देण्याचा प्रयत्न संस्था करते. मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांला आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे महत्वाचे कार्य संस्था करते. त्याबद्दल नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Breaking news....लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आ...
18/09/2022

Breaking news....

लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Breaking News .....अन्न व औषध प्रशासनद्वारे मे.जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉ...
18/09/2022

Breaking News .....

अन्न व औषध प्रशासनद्वारे मे.जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचा मुंबईतील मुलुंड यंथील उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील ( डॉ ) . एम . एस . जाधव यांना शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या ...
18/09/2022

पुरंदर तालुक्यातील ( डॉ ) . एम . एस . जाधव यांना शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या योगदानाबद्दल आसाम विद्यापीठाची मानद डी.लीट पदवी प्रदान

पुणे (18) : सीए . ( डॉ ) एम . एस . जाधव यांना मानद डी.लीट् . पदवी प्रदान शुक्रवार , दि . १६ सप्टेंबर २०२२ रोजी आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ , गुवाहटी , आसाम या विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये प्रा . सीए ( डॉ ) . एम . एस . जाधव यांनी शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार इत्यादी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या योगदानाबद्दल विद्यापीठाने प्रा . जाधव यांना मानद डी.लीट ही पदवी आसामचे राज्यपाल व विद्यापीठाचे व्हीजीटर श्री . जगदीश मुखी , आसाम राज्याचे शिक्षण व आदिवासी विकास मंत्री डॉ . रानौज पेगु व शास्त्रज्ञ डॉ . शेखर मेडगे , विद्यापीठाचे कुलपती डॉ . एन . एन . दत्ता , कुलगुरु प्रा . डॉ . नारा तालुकदार यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली . भारतातील ३,५०,००० सनदी लेखापाल आहेत त्यातील २,००,००० हे इंडस्ट्रीजमध्ये से करतात १,५०,००० हे खाजगी प्रॅक्टीस करीत आहेत . विद्यापीठाने डॉ . जाधव यांनी सदस्य अध्य बोर्ड , भारतीय सनदी लेखाकर संस्थान , नवी दिल्ली म्हणून केलेले काम सावित्रीबाई फुले ! विद्यापीठामध्ये १ ९९ ६ ते २००६ या काळात वित्त व लेखा अधिकारी अंतर्गत हिशोब तपासणी प्रभारी कुलसचिव म्हणून केलेले कौतुकास्पद काम व विद्यापीठामध्ये नवनवीन प्रयोग करून पद्धती यंत्रना निर्माण करून विद्यापीठाला आर्थिक शिस्त व आत्मर्निभर बनविण्यासाठी केलेल योगदानाबद्दल , पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडख , सासवड , दौं शिक्षण प्रसारक मंडळ , सासवड , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे या संस्थांच्यामार्फत शैक्षणि क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल , महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे विश्वस्त म्हणून गेली ३० काम करीत आहेत . पर्यावरण विकास ग्राम विकास , घर तिथे शौचालय इत्यादी प्रकल्प राबविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे व गांधी विचार प्रसारासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केलेली आहे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आदर्श वित्तीय प्रणाली सुरू करून देशात २००१ मध्येच ISO 9000-2001 प्रमाणपत्र प्राप्त करणेमध्ये महत्त्वाचे योगदान होते , त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक शिस्त व स्थिती भक्कम करणेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे . शरद कृषी पर्यावरण विकास प्रतिष्ठान , सासवड या संस्थेमार्फत आदर्शगाव , पाणी अडवा पाणी जिरवा , जल संधारण , वनराई बंधारे असे विविध प्रकल्प राबविले आहे त्याचा फायदा आजही या गावांना मिळत आहे . शैक्षणिक विकास , विद्यार्थ्यांना मागदर्शन , उद्योजकता निर्माण करणे , आर्थिक शिस्त व प्रशासकीय प्रक्रिया उत्तम ठेवण्याचे महत्त्वाचे काम विविध विद्यापीठे , महाविद्यालये , विद्यालयांमध्ये केलेले आहे . आपले ज्ञान हे समजासाठी आहे त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे . या भावनेने गेली ३५ वर्षे या क्षेत्रात प्रा . एम . एस . जाधव काम करीत आहेत याचा गौरव ही मानद डी . लीट् . पदवी देऊन करण्यात येत आहे असे गौरवउद्गार मा . राज्यपाल यांनी आपल्या भाषणात केले . शिक्षणमंत्री , कुलपती , कुलगुरु यांनी डॉ . जाधव यांच्या कार्याचा गौरव केला मानद डी . लीट ही पदवी प्रदान केली . भारतातील सीए ( डॉ ) एम . एस . जाधव हे पहिलेच सीए आहेत त्यांना मानद डी . लीट् . ही पदवी प्राप्त झाली आहे . पुरंदर तालुक्यातील मा . डॉ . राम ताकवले यांचे नंतर प्रा . सीए . डॉ . एम . एस . जाधव यांना हा बहुमान मिळाला आहे . पुरंदरच्या मातीत वाढलेला पुरंदर मध्ये बालपण व पदवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मानद डी . लीट् ही पदवी मिळू शकते हे केवळ हा मातीचा गुण हे कन्ऱ्हेचे पाणी आहे आणि कष्ट करणेची तयारी त्याचे योग्य नियोजन आणि उद्दीष्टापासून न भटकणे की असे यश व अशा पदव्या मिळू शकतात आणि ही माजी मानद डी . लीट् पदवी माझे दैवत माझी आई . माझे आदरणीय ना . डॉ . पतंगराव कदम , मा . चंदुकाका जगताप व शरदतात्या ढमढेरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वीकारतो . आता माझी जबाबदारी वाढलेली आहे यापुढे यापेक्षा मोठ्या कौशल्यतेने शैक्षणिक कार्य व सामाजिक विकासाचे कार्य करीत राहील असा विश्वास प्रा . सीए , डॉ . एम . एस . जाधव यांनी व्यक्त केला . की पदवी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीस व ' मुळ ' जो व्यक्ती विसरला नाही त्याला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे . हे शैक्षणिक कार्य करताना माझे कुटुंब माझी धर्मपत्नी सौ . निशा जाधव हिने मोठ्या शिताफीने सांभाळली . मुलांचे संस्कार व जडणघडण करण्यामध्ये मोठे योगदान दिले त्याबद्दल सौ . निशा जाधव यांचे ऋण व्यक्त केले , मुलगा लंडन मध्ये संशोधन करीत आहे . मुलगी उत्तम पद्धतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे . या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो व मला ही मानद डी . लीट् पदवी प्राप्त होण्यामागे ज्या सर्व ज्ञान अज्ञात व्यक्ती माझ्या कार्यात सहभागी झाले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे . मी काम करू शकलो कारण ते सर्वजण माझे समवेत होते त्यांनी मला सहकार्य केले म्हणूनच हे घडू शकले हे मी कधीही नाकारणार नाही . त्यामुळे सर्व सहकारी सर्व महाविद्यालयातील व विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक या सर्वांचा मी आभारी आहे व यापुढेही असेच सहकार्य करावे व विश्वास माझ्यावर ठेवावा ही नम्र प्रार्थना , ही मिळालेली मानद डी . लीट पदवी माझ्या पुढील आयुष्यासाठी एक प्रेरणा म्हणून कार्य करेल असा मला विश्वास वाटतो असे मनोगत प्रा . सीए . ( डॉ . ) एम . एस . जाधव यांनी केले . कार्यक्रमास आसाम सरकारमधील वरिष्ठ अधिकारी , राजभवन मधील वरिष्ठ अधिकारी , विद्यापीठाचे सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी राष्ट्रगीत होऊन पदवीप्रदान समारंभाची सांगता झाली .

Breaking news.......माननीय विशेष न्यायालयाने (पीएमएलए), रांची यांनी एका बनावट प्रकरणात मेसर्स नव निर्माण बिल्डर्स अँड डे...
16/09/2022

Breaking news.......

माननीय विशेष न्यायालयाने (पीएमएलए), रांची यांनी एका बनावट प्रकरणात मेसर्स नव निर्माण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे 80 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत." अशी माहिती ED ने ट्विट केली आहे.

Breaking news.....लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या तैलचित्राचे रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात अनावरण करण्यात आले. क...
14/09/2022

Breaking news.....

लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या तैलचित्राचे रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात अनावरण करण्यात आले. कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे विचार याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

14/09/2022

गुळुंचे (जिल्हा पुणे ) येथील तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी

जेजुरी , दि . १४ : महाराष्ट्र नागरी सेवा नियम १ ९ ७ ९ नुसार तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी केला आहे .गुळुंचे येथील मतदारांची कुठलीही नोटीस न देता नावे वगळली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच चौकशी करून मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचा आदेश केला आहे .
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावच्या ३३ मतदारांना पूर्वसूचना न देता तलाठ्यांनी त्यांना मतदारयादीतून वगळ होते तर वेळेत नावे देऊनही ४७ नव मतदारांची नावे समाविष्ट केली नव्हती . २६ जानेवारीच्या ग्रामसभेत यावरून मतदार
संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यासंबंधी ठराव घेतले . मतदारांची नावे वगळताना रीतसर १३ व १४ क्रमांकाच्या नोटिसा बजावणे बंधनकारक असते . मात्र तलाठ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब न करता खोटे पंचनामे केले . हेतूपुरस्सर नावे वगळली असे तहसीलदार यांना आढळल्याने त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना दिला होता . तलाठ्यांची बाजू योग्य असल्याचा नितीन निगडे यांचा युक्तिवाद व कोतवाल नारायण भंडलकर यांचा अनुकूल जबाबही तलाठ्यांना वाचवू शकला नाही . दुसऱ्या गावी राहणाऱ्या काही मतदारांची नावे कुठलीही नोटीस न देता परस्पर वगळण्याप्रकरणी गुळुंचे ( ता . पुरंदर ) गावचे तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काढला आहे . तसेच वगळलेल्या मतदारांना चौकशी करुन पुन्हा समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही तहसीलदारांना दिले आहेत .

Breaking news......ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांवर शोध घेतला.  मेसर्स पारेख अल्युम...
14/09/2022

Breaking news......

ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांवर शोध घेतला. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लि.च्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. ₹ 47.76 कोटी मूल्याचे 91.5 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आले आहे.

14/09/2022

हडपसर जवळील शेवाळवाडी येथे दोन मैत्रिणीची आत्महत्या

पुणे : जिल्ह्यातील हडपसरमध्ये दोघा मैत्रिणींनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे हद्दीत ही घडना घडली. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यापैकी एका मैत्रिणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं तर दुसऱ्या मैत्रिणीने थेट पाचव्या मजल्यावरुनच उडी घेतली.

हडपसर जवळील शेवाळवाडी इथं दोन मैत्रिणीनी आत्महत्या केली. मंगळवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आत्महत्या केलेल्या दोन्ही मैत्रिणींचं वय अवघं 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मैत्रिणीचं नाव आकांक्षा औदुंबर गायकवाड आहे. तर दुसऱ्या मैत्रिणीचं नाव सानिका हरिश्चंद्र भागवत आहे.

सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली. तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी मारली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.

पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे आकांक्षा हीचा जागीच मृत्यू झाला. आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन जेव्हा उडी टाकली, तेव्हा ती वरुन थेट एका रुग्णवाहिकेच्या जवळच कोसळली. पाचव्या मजल्यावरुन कोसळल्यामुळे आकांक्षाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती.

दोन्ही मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलंय. दरम्यान, हडपसर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेत पाठवण्यात आले आहेत. याआत्महत्याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,सामाजिक प्...
13/09/2022

महाविद्यालयीन शिक्षण घेताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी,सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हावी यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार आणि सक्षम करण्यासाठी अभि...
13/09/2022

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार आणि सक्षम करण्यासाठी अभियंतादिन चे औचित्य साधून बांधकाम मंत्री डोंबिवलीकर रवी यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबरला राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील पनीर कारखान्यावर कारवाईपुणे, दि. १२ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्य...
13/09/2022

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील पनीर कारखान्यावर कारवाई

पुणे, दि. १२ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.

कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली वाराणसी : ...
12/09/2022

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली

वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल केली गेली होती, ती याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही त्यावरच वाराणसीचे जिल्हा न्यायालयाने आज सुनावणी केली आहे. मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली आहे. दरम्यान, या वरचा निर्णय आता 22 सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार आहे.

ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर मात्र दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या 19 मे रोजी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होते, त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर त्यावरच आता वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजची सुनावणी करत याचिकाकर्त्यांना 15 सप्टेंबर ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे.

11/09/2022

NHRC महिलांच्या आरोग्य सेवा आणि पोषण मधील आव्हाने आणि संभावनांवर चर्चा करण्यासाठी विविध भागधारकांसह बैठक आयोजित करते

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर, 2022

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, NHRC, भारत ने 5 सप्टेंबर 2022 रोजी 'भारतातील महिलांचे आरोग्य, जगण्याची आणि पोषण स्थिती: आव्हाने आणि संभावना' या विषयावर एक बैठक आयोजित केली. त्यावर अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती श्री अरुण मिश्रा, अध्यक्ष, NHRC म्हणाले की, महिलांसाठी उत्तम आरोग्य सेवा तसेच त्यांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम कायदे आणि धोरणात्मक चौकट आहेत. मात्र, त्यांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरातील असमतोल हा बऱ्याच काळापासून चिंतेचा विषय आहे. ते म्हणाले की, पालकांच्या मालमत्तेमध्ये मुलींना कायदेशीररित्या समान वाटा असूनही स्त्री-पुरुषांमध्ये ही विषमता निर्माण करणाऱ्या मानसिकतेमुळेच हे घडत आहे. याचा सर्वांगीण समाजाने विचार करण्याची गरज आहे.
न्यायमूर्ती मिश्रा यांनी असेही निरीक्षण केले की माता मृत्यू दर, एमएमआर देशात तुलनेने कमी झाला आहे परंतु तो अजूनही उच्च आहे. काही राज्यांमध्ये इतरांपेक्षा कमी एमएमआर का आहे याचा विचार व्हायला हवा यावर त्यांनी भर दिला. NHRC चेअरमन म्हणाले की MMR मधील आंतर-राज्य फरक हे महिलांचे आरोग्य निर्धारित करणाऱ्या घटकांसह आरोग्य सेवांच्या प्रवेशातील विद्यमान असमानता दर्शवतात.

तत्पूर्वी चर्चेची सुरुवात करताना श्री.डी.के. सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरणासाठी विविध काम करणाऱ्या केंद्रीय मंत्रालयांसह विविध स्टेकहोल्डर्सकडून माहिती मिळवणे आणि धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील तफावत शोधणे हा या बैठकीचा उद्देश आहे.

हायब्रीड मोडमध्ये आयोजित केलेली ही बैठक दोन थीमॅटिक सत्रांमध्ये विभागली गेली होती: आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्रवेश करण्यामधील समस्या/आव्हाने ओळखणे आणि भारतातील महिला आणि मुलींचे आरोग्य, जगण्याची आणि पोषण स्थिती सुधारण्याच्या शक्यता.

एनएचआरसीच्या सहसचिव श्रीमती अनिता सिन्हा यांनी केले. सहभागींमध्ये NHRC सदस्य, न्यायमूर्ती एमएम कुमार आणि श्री राजीव जैन, वरिष्ठ अधिकारी, महिला, आरोग्य, महिला आणि बाल विकास, आदिवासी व्यवहार आणि पंचायती राज यावरील NHRC कोअर ग्रुपसह विविध केंद्रीय मंत्रालयांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

आयोग आपल्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी विविध सूचनांवर विचार करेल.

पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाला नवे नेतृत्व द्या ! या मगणीसाठी १२ सप्टेंबर रोजी, मुंबई येथे पक्ष कार्यालयासमोर पदाधिकाऱ्या...
10/09/2022

पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाला नवे नेतृत्व द्या ! या मगणीसाठी १२ सप्टेंबर रोजी, मुंबई येथे पक्ष कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांचे उपोषण,

शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२

सासवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा भारतीय रिपब्लिकन पक्ष, ( आठवले ) पुणे जिल्हा ग्रामीण ,या पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षकासह नविन जिल्हाध्यक्ष मिळावा ,व २३ ऑगस्ट २०२२ रोजी, मावळ तालुक्यात रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा घेऊन, बेकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या सर्व निवडी रद्द करण्यात याव्यात , व पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील एकाधिकारशाही व मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, सोमवार दि. १२ / ९ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजून ३० मिनिट या वेळेपासून रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई आझाद मैदान येथील, पक्ष कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष तथा पक्षाचे जेष्ठ नेते , पंढरीनाथ जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली,

रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण या पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सन १९९८ या वर्षी घेण्यात आला होता, तदनंतर आजतागायत पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणूका घेण्यात आल्या नाहीत, त्यामुळे, गेले २४ वर्षे एकाच व्यक्तीकडे, व एकाचं तालुक्याला पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात याबाबत असंतोष निर्माण झाला असून, पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील एकाधिकारशाही व मक्तेदारीला लगाम घालण्यासाठी, पुणे जिल्हा ग्रामीणला नवे नेतृत्व मिळावे या बाबत , पक्षाच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणी यांच्याकडे याबाबत वारंवार लेखी व तोंडी युक्तिवाद केला आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पक्ष कार्यकारण्या बरखास्त करून, लोकशाही मार्गाने, केंद्रीय, राज्य, जिल्हा, शहर ,व तालुका व शाखा या या सर्व कार्यकारण्या पुन्हा नव्याने घटीत करण्याचा निर्णय घेऊन, रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, वरील कमिटी मध्ये लोकशाही मार्गाने, अध्यक्ष व पदाधिकारी होण्यासाठीची संधी प्राप्त करुन दिली आहे, त्यामुळे या पक्ष निर्णयाचे देशभरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. असे असताना, व राज्य कार्यकारिणी अस्तित्वात नसताना, २३ ऑगस्ट २०२२ रोजी मावळ तालुक्यात जिल्हा मेळावा घेऊन, पक्षाची नेत्यांची व पदाधिकारी यांची फसवणूक करुन, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी यांची परवानगी नसताना किंवा त्यांनी जिल्हा कार्यकारिणी घटीत करण्यासाठी अधिकृत पक्ष निरीक्षक दिला नसताना , पक्ष ,नेते , व नेतृत्व यांची फसवणूक करुन सदर मेळाव्यात स्वतः हाची जिल्हाध्यक्ष म्हणून, निवड करुन पक्षशिस्तीचा भंग करुन, महिला आघाडी व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांची निवड करुन, मीचं पक्षाचा कर्ता करविता आहे, असे म्हणून, सर्वांच्या अधिकाराचा गैरवापर करून, पक्षात अराजकता माजवून लोकशाहीचा मुडदा पाडला आहे,

त्यामुळे ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी , व याबाबींकडे पक्ष नेतृत्वाचे पक्ष श्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी, व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाला नवे नेतृत्व व पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षक मिळावा . या मागणीसाठी सोमवार दि. १२ / ९ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजून ३० मिनिटापासून रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येईल, व सदर ठिकाणी पक्ष श्रेष्ठींना निवेदन देऊन , कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल , हे आंदोलन , पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात नसुन, पक्षाची व नेत्यांची फसवणूक करुन, त्यांची दिशाभूल करुन, स्वतः हाची पोळी भाजून, घेणा-या प्रवृत्ती विरोधात आहे. त्यामुळे पक्षातील एकाधिकारशाहीला लगाम घालण्यासाठी व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना रोटेशन पध्दतीने जिल्हाध्यक्ष पदांची संधी मिळावी या मागणीसाठी सदर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे स्वतः हाचे पद वाचविण्यासाठी काही मंडळी हेतुपुरस्सर हे आंदोलन पक्ष विरोधी आहे . अशी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे खोट्या आफवेवर विश्वास न ठेवता, खरे वास्तव पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी , मी पंढरीनाथ जाधव , व पक्षाचे प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष विष्णूदादा भोसले, व प्रभारी जिल्हानिमंत्रक संतोषनाना डोळस यांच्यासह रिपब्लिकन पदाधिकारी यांनी यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरविण्यासाठी , पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील सर्व स्वाभीमानी पदाधिकारी यांनी सदर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहान पंढरीनाथ जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Address

Pune
Pune

Telephone

+919405094926

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Crime News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Crime News:

Share

Category