Mahaenews

Mahaenews My job to aware people & educate them.

वदप, ता. कर्जत, जिल्हा रायगड..शेतकर्‍याच्या हाताला आलेलं पीक वादळानं अडवं पडलं
29/09/2025

वदप, ता. कर्जत, जिल्हा रायगड..

शेतकर्‍याच्या हाताला आलेलं पीक वादळानं अडवं पडलं

28/09/2025

नळदुर्ग.... जिल्हा धाराशिव
#धाराशिवसंकट

धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे चुकलेचशेतकरी संकटात अन् जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी नाचगाण्यात ?राज्यात 780 पैकी 687 स्थ...
27/09/2025

धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे चुकलेच

शेतकरी संकटात अन् जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी नाचगाण्यात ?

राज्यात 780 पैकी 687 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील कित्येक वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. आजवर या संस्थांवर लोकशाही मार्गाने कोणाही राजकीय पक्षाची सत्ता प्रस्थापित होऊ नये, यासाठीच की काय सत्ताधाऱ्यांनी ब्रिटिश राजवटीप्रमाने राज्य करण्यास सुरुवात केल्याची परिस्थिती आहे.

यामुळे झाले काय ? तर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्जितले आयएएस अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, जिल्हाधिकारी म्हणून नेमले आहेत. आता त्यांच्या माध्यामातून वाट्टेल त्या प्रमाणे राज्य केले जाते आहे. कारण, अशा अधिकाऱ्यांवर एकमेव मुख्यमंत्र्यांचाच वचक असतो. ते म्हणतील त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात.

अपवाद वगळता एखादा चांगला अधिकारी लोकाभिमुख निर्णय घेत असेल आणि तो पक्षाला मारक ठरणारा किवा इतर पक्षाच्या फाद्याचा असेल तर तो मागे घेण्यासाठी अधिका-यावर दबाव टाकला जातो, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

अशा वेळी अधिकारी नोकरी टिकवण्यासाठी (निलंबन होऊ नये म्हणून) गप्प राहतात. पण, मंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी जनतेच्या विरोधातही निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते आणि अशा प्रकरणांत अनेक अधिकारी अथवा मंत्र्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागलेली आहे.

आता अशा अधिकाऱ्यांच्या हातात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपवला गेला आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा दरारा संपुष्टात आला आहे. त्यामुळे सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे.

आज अधिकार्‍यांसाठी केवळ मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळण्याचाच प्रश्न उरला आहे. तेवढे केले की त्यांना कोणी हात लावणार नाही, हे त्यांना माहीत आहे. राजकीय आश्रय मिळाल्यामुळे अधिकारी जबाबदारीचे भान विसरून, किंवा जाणूनबुजून, वाटेल तसे वर्तन करत सुटले आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी अपवाद असले तरी बहुतांश ठिकाणची प्रशासनातील परिस्थिती बिघडलेली आहे. असे असेल तर प्रशासन म्हणून यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी, याची खंतच वाटते.

संपूर्ण धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटात सापडलेला असताना, जिल्हाधिकारी मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात मश्गुल होते. त्यांचही थोडे चुकलेच, कारण महापुरात लोकांच्या घरातच नव्हे तर नाकातोंडात पाणी शिरले. जनावरे दावणीला मृत्युमुखी पडली, शेळ्या-मेंढ्या प्रवाहात वाहून गेल्या. कष्टाने टिकवलेली शेती मातीसकट वाहून गेली. पिकांचे व फळबागांचे न भरून येणारे नुकसान झाले.

एका बाजूला खासदार ओमराजे निंबाळकर गळ्याएवढ्या पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत होते, तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात खुल्या व्यासपीठावर रमले होते.

जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रचंड अधिकार असतात. त्या अधिकारांचा वापर करून भूम, परांडा, वाशी, पाथरुड, आंबी, काजळा आदी भागातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते. त्यांना हवी ती मदत काही तासांत उपलब्ध करून देणेही शक्य होते. मग या सनदी अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडतोच कसा ? याचा विचार करताच चीड येते. या कृत्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी असे वर्तन उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अशोभनीय आहे.














#महाराष्ट्रपूर
#धाराशिवसंकट
#स्थानिकराजकारण
#आयएएसजबाबदारी
#भ्रष्टाचारउघड
#आपत्तीव्यवस्थापन
#शेतकऱ्यांचीनुकसान
#सरकारीउपेक्षा
#प्राणवाचासंरक्षण
#पूरसहाय्यता
#प्रशासनाचाफेटा
#जनहक्क
#जबाबदारीमहत्त्वाची

------

मायबाप सरकार...शेतकर्‍यांना भीक नको मदत द्या ! मराठवाड्यात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे विशेषतः धाराशिव, सोलापू...
26/09/2025

मायबाप सरकार...
शेतकर्‍यांना भीक नको मदत द्या !

मराठवाड्यात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे विशेषतः धाराशिव, सोलापूर, बीड जिल्ह्यातील बळीराजा रात्रीत उध्वस्त झाला. पुराच्या पाण्यात पिकं वाहून गेली, नाका तोंडात पाणी जाऊन दुबती जनावरं दावणीला मेली आणि एका क्षणात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. आता सुरु झाल्यात नेत्यांच्या पर्यटन यात्रा, बांधावर फोटो सेशन करायचं आणि टिव्ही चॅनेल, पेपरात बातम्या छापून प्रसिध्दी मिळवायची. तुम्ही बांधावर जाऊन पाहणी जरूर करा, पण त्यांना सढळ हाताने मदत देण्याची प्रक्रिया तातडीने राबवा. आणि यंदा तरी शेती मालाला हमीभाव द्या. आहो आमचा शेतकरी इमानेइतबारे काळ्या आईशी निष्ठा राखून देशाला धान्य पिकवून देतोय आणि त्याच शेतक-याने पिकविलेल्या मालाचा कवडीमोल भाव करून त्याची थट्टा केली जाते. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे, याचा विचार आपण करावा.

सायोबीनला हमीभाव देण्याची घोषणा आपण सत्तेत येण्यापूर्वी केली होती, मुख्यमंत्री साहेब. आज जवळपास दहा वर्षे राज्यात आपली सत्ता आहे, आणि आपण सत्तेच्या सिंहासनावर विराजमान आहात. तरीसुध्दा आपण शेतक-यांना दिलेला शब्द पाळू शकला नाही. सोयाबीन, हरभरा, कापूस यासारख्या महत्वाच्या पिकांना वर्षानुवर्षे आपण हमीभाव नाकारत आला आहात. हमीभाव जरी जाहिर केला तरी तो बाजारात शेतक-यांना मिळत नाही. व्यापा-यांचे साटेलोटे आणि बाजार समित्यांतील राजकीय हस्तक्षेपामुळे योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाही तर काय होणार ? ही भ्रष्ट साखळी जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचे भले होणार नाही, हे अलिखित सत्य आहे.

साहेब.. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर मदतीची प्रक्रिया वेळेत राबविली जात नाही. पंचनामे उशिरा होतात. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्ष मोबदला अपुरा ठरतो आणि तोही शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर पोहोचत नाही. ई-कृषी किंवा इतर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांना नीट समजत नाही, तरीही ती सक्तीची केली जाते. पीकविमा योजनेत तर वारंवार गैरप्रकार समोर येतात. शेतकऱ्यांनी वेळेवर हप्ते भरले, तरी नुकसानभरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार केवळ विमा कंपन्यांचा गल्ला भरण्यासाठीच आहे का, असा संशय वाटू लागला आहे.

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला जातो, पण त्यावेळी अपात्र लोकही त्याचा लाभ घेतात. उलट खरे लाभार्थी स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन मदतीपासून वंचित राहतात. कर्जमाफी वेळेवर दिली जात नाही; झालीच तर ती निवडक लोकांपुरतीच मर्यादित राहते. या सगळ्या अन्यायातून निर्माण होणारे नैराश्य आणि विवंचना शेतकऱ्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. सरकारकडून योग्य मदतीऐवजी केवळ आकडेवारीची झाकपाक केली जाते. कितीही शेतकऱ्यांचे बळी गेले तरी ‘मायबाप’ सरकारला ते जाणवत नसेल, हे शेतकर्‍यांचा उपयोग निवडणुकीत मते घेण्यासाठी करणार का ?

पूरग्रस्त भागात सध्या रस्ते आणि वीज यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि पशुपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हाताला आलेले सोयाबीन पुरात वाहून गेले आहे. कांदा पाण्यावर तरंगत आहे, तर फळबागाही पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. पाण्यात वाहून गेलेल्या शेतीची पुनर्बांधणी करणे अशक्य झाले आहे. यासोबतच पशुधनासाठी आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे, आणि दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय पुन्हा उभा करणेही आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील पंचनामे प्रामाणिक अधिकाऱ्यांकडूनच केले जाणे अत्यावश्यक आहे.

नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करताना कोणतेही निकष लावणे योग्य ठरणार नाही. नैसर्गिक आपत्ती घोषित करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई दिली, तरच ते या संकटातून कसेबसे सावरू शकतील. यासाठी गावपातळीवर कृषी अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी सुसंवाद होणे अत्यावश्यक आहे. तसेच, तक्रार निवारणासाठी स्वतंत्र समिती गठित करावी लागेल. फोटोसेशन आणि घोषणाबाजीवरच समाधान न मानता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची हीच खरी वेळ आहे—याचे भान सरकारने ठेवणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री साहेब.., आपण म्हणता की पैशाचं सोंग करता येत नाही. मग लाडकी बहिण योजना किंवा महिला सन्मान योजना सुरू करताना हा विचार का केला नाही ? महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. पण, आज शेतकऱ्यांवर वेळ आली की मात्र आपण विपरीत भूमिका घेता. एकदा नाही, तर तब्बल दोनवेळा शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर आपण “पैसे नाहीत” असे सांगितले. शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की सरकार वारंवार मागे का हटते, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही असे समजू नका. शेतकरी खुळा नाही. तो आपल्या हक्काची मदत मागतो आहे, भीक नाही.

- अमोल शित्रे

#मराठवाडा_पूरसंकट
#शेतकरी_वाचवा
#हक्काची_मदत_हवी
#सरकार_जागे_हो
#बळीराजा_आव्हानात
#नुकसानभरपाई_आता
#शेतकरी_आत्महत्या_थांबवा
#आकडेवारी_नको_मदत_हवी
#कर्जमाफी_वाचा
#काळ्या_आईचा_पुकार









25/09/2025

सोलापूर-विजापूर रोडवर पाणी, महाराष्ट्र-कर्नाटक संपर्क तुटला.

24/09/2025

सोलापूर जिल्ह्यातील ति-हे गावातील घराघरत सीना नदीची पाणी शिरले. जनजीवन विस्कळित झाले. शेतात बांधलेली कित्येक जनावरे पाण्यात वाहून गेली, काही जागीच मेली. शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले.

24/09/2025

सोलापूर जिल्ह्यातील ति-हे गावातील घराघरत सीना नदीची पाणी शिरले. जनजीवन विस्कळित झाले. शेतात बांधलेली कित्येक जनावरे पाण्यात वाहून गेली, काही जागीच मेली. शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले.

24/09/2025

, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर भागात पावसाने थैमान घातले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना भारतीय लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढले.

23/09/2025

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष हेल्पलाईन

022-22027990

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय

संपर्क : 02472-224501

Fax No: 02472-228018

Email: [email protected]/

[email protected]

निवासी उपजिल्हाधिकारी संपर्क : 02472-227301

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahaenews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahaenews:

Share