13/05/2026
मराठी पोरं बिंदासपणे Corporate नोकऱ्या सोडून गावाकडे राहायला का येऊ शकतात ? त्यांच्यात हिंमत येते कुठून ? | Kadak Rao
" आरं गरज नाही तुझ्या कामाची, लग्नाचा प्रश्न नसता तर तुझ्याकडं कामच केलं नसतं. आजच्या आज आपला हिशोब मांडायचा. घरी जाऊन शेण काढीन पण तुझा तोरा ऐकून घेणार नाही. " हे असे डायलॉग अन महाराष्ट्राची पोरं हे तिखाटजाळ समीकरण. युपी बिहाऱ्यासारखे मान मोडून आपल्या पोरांना जगता येत नाही. गुजरात्यांसारखं लांगूलचालन करून फुशारक्या मारता येत नाहीत. आपलं पोरगं मुंबई आसू, पुणे आसू निदान दिल्ली बँगलोर, कदाचित फॉरेन सुद्धा, ऑफिस ते एमआयडीसी त्यो एकदम ताठ मानेनं राहतं, इज्जत द्याल तर इज्जत घ्याल या तत्वावर प्रामाणिकपणे काम करतं. जोवर सहन होतंय तोवर तो ऑफिसमधले सगळे अपमान, बॉसचे टोमणे, ऑफिस पॉलिटिक्स, लफडी, ओव्हरटाईम सगळं मुकाट सहन करतं. पण जेव्हा गोष्ट स्वाभिमानावर येते तेव्हा एका झटक्यात नोकरीवर लाथ मारून गावची वाट धरण्याची तयारी ठेवतंय. ह्यो असतोय अस्सल महाराष्ट्रीयन तोरा. आता भले त्याचे काहीही फायदे तोटे असोत पण ह्यो स्वाभिमान कुठं इकत मिळत नाही. त्यो पिढ्यानपिढ्या मराठी पोरांच्या डीएनएमध्ये मुरलेला आहे छ. शिवाजी महाराजांच्या रूपात. हा स्वाभिमान आणि भिडस्तपणा गावच्या काळ्या मातीशी दोन हात केल्यावर येतो. बाप नावाचा आधार आपल्यामागं, आपल्यासाठी आहे हा विश्वास असल्यावर येतो. म्हणून तर खिशात पुढच्या महिन्याचं भाडं देण्याचे पैसे नसताना, मोबाईलचे हफ्ते थकलेले असताना सुद्धा तो एका दणक्यात राजीनामा देऊन बाहेर पडतो. पण ही अशी एका फटक्यात 'नोकरीला लाथ मारण्याची' हिंमत मराठी पोरांच्यात येते कुठून ? हा केवळ त्यांचा रागीटपणा किंवा रगेलपणा नाहीये, यामागं शेकडो वर्षांचा इतिहास, एक विशिष्ट प्रकारची सामाजिक जडणघडण, शेतीची नाळ आणि रक्तात भिनलेला 'मराठी बाणा' आहे. आता हे सगळं कसं बैजवार समजावून घेऊ....