Rights of OBC

Rights of OBC ओबीसी समाजातील समस्या, राजकीय हक्क, अधिकार आणि प्रतिनिधित्वासाठी या पेज आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 1. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (1803-1865)(परवा एका चित्रपटाबद्दल एके ठिकाणी...
19/04/2025

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 1. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (1803-1865)
(परवा एका चित्रपटाबद्दल एके ठिकाणी वाचलं, तिथे डॉ. भाऊ दाजी लाड यांचा उल्लेख वाचला. अन मग वाटलं की या एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारकांवर कितीतरी पुस्तकं, लेख लिहिले गेले आहेत. अगदी विकिपिडिया, विश्वकोश इथेही यांची माहिती लिहिलेली आहे. पण तरीही यातली बरीच लोकं हळूहळू काळाच्या पडद्या आड हरवून जात आहेत. अगदी काही कारणांनिमित्त कोणी ती मुद्दाहून जाऊन वाचतीलही. अन भरपूर तपशील, विश्लेषण सापडेल. पण सहजी समोर आलं तर अनेकांना त्यांची नव्याने ओळख होईल. या दृष्टिकोनातून एका व्हॉट्सअप गृपवर काही सुधारकांची माहिती लिहिलेली. नंतर ती ब्लॉगवरही डकवली. असं वाटलं किमान इतपत माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी. म्हणून मग इथे ती आणतेय. मान्य आहे की हे लिखाण अगदी प्राथमिक स्वरुपाचं आहे. पण सध्या रिळांच्या दुनियेत इतका वेळही कुठे आहे साऱ्यांना खूप तपशीलवार, विवेचन वाचायला? चूक नाही, परिस्थिती शरणता!
खरे तर या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
न्या. रानडे, म. फुले, राजा राममोहन रॉय यांसारखी काही नावे, त्यांचे कार्य बहुतांश माहिती असते. किमान नावं नक्की माहिती असतात. परंतु इतर अनेकांना मात्र आज आपण विसरले आहेत की काय असं वाटतं. म्हणून त्यांच्या नावांची, त्यांच्या कार्याची सर्वसामान्यांना पुन्हा आठवण करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आधी म्हटलं तसं माहितीवजा छोटेखानी लेख. अधिक वाचायचं, माहिती करून घ्यायची तर विकिपिडिया, विश्वकोश वा ग्रंथालयांची जुनी पुस्तकं उपलब्ध आहेतच. इथे फक्त छोटीशी ओळख.
जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड या गावी झाला. नाना शंकरशेठ या नावाने ते विशेष प्रसिद्ध पावले. #जगन्नाथ_शंकरशेठ_मुरकुटे हे अतिशय श्रीमंत #वंजारी समाजातील घरात जन्मले होते. त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती. त्यामुळे नानांचे बालपण अतिशय सुखात गेले. पुढे त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली. त्यांच्या व्यापाराचा इतका प्रचंड व्याप होता की त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. परंतु नानांना सार्वजनिक कामाची अत्यंत आवड होती. त्यामुळे जनसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीमध्ये नानांचा सहभाग होता. #बॉम्बे_असोसिएशन, #बॉम्बे_नेटिव्ह_एज्युकेशन_सोसायटी, #एल्फिन्स्टन_कॉलेज, #ग्रँड_मेडिकल_कॉलेज, #स्टुडंट्स_लिटररी_अँड_सायंटिफिक_सोसायटी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी #आर्थिक स्वरूपाची मदतही केली.

भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
स्त्री शिक्षणाचे ते खंदे पुरस्कार होते. त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्करून 1848 मध्ये मुंबई येथे,
स्वतःच्या घरात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली.
1829 मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा,
लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. या कायद्याला भारतातल्या सनातनी लोकांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे देशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अशावेळी नानांनी या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले. आणि सतीची चाल कशी अमानुष आहे हे त्यांनी जनतेला पटवून दिले.

सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावण्यासाठी नाना तत्पर असत. मुंबईतील अनेक सामान्य लोकांची गाऱ्हाणी, त्यांनी सरकार दरबारी मांडली. आणि त्याला योग्य तो न्याय मिळवून दिला. सामान्य जनतेला, विशेषत: गोरगरिबांना, नाना आपल्या आधार वाटत असत.

नानांनी शिक्षण क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. मुंबई इलाख्यात नव्या शिक्षणाचा पाया घालण्याचे कार्य, मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांच्या मदतीने, नाना शंकरशेठ यांनी सुरु केले. 1823 मध्ये मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेच्या मार्फत मुंबई शहरांमध्ये आणि मुंबई बाहेरही अनेक शाळा त्यांनी उघडल्या. या कामी त्यांना सदाशिवपंत छत्रे, बाळाशास्त्री जांभेकर यांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सुरुवातीच्या इंग्रजी राज्यकारभारात पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांची पहिली पिढी उदयास आली. त्यापैकी अनेक तरुणांनी महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या कार्यात खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचे सर्वांचे श्रेय अर्थातच जगन्नाथ शंकरशेठ यांच्याकडे जाते.

भारतीय समाजात विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि येथील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1845 मध्ये मुंबईमधे स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. नानांनी या संस्थेला आर्थिक आणि इतरही खूप मदत केली मुंबईच्या इलाख्याचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ड एलफिन्स्टन यांनी अतिशय चांगली काम केली होती. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी एक फंड जमवल्या. या फंडातून मुंबईमधे एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली. आजही हे अतिशय महत्त्वाचे कॉलेज म्हणून मुंबईत मानले जाते. तसेच मुंबई इलाखाचा आणखीन एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज उभारण्यात नानांनी पुढाकार घेतला होता.

राजकीय कार्यातही नाना पुढे होते. राजकीय प्रश्नांबाबत नानांचे मत आज आपल्याला वेगळे वाटेल परंतु 1818 मध्ये मराठ्यांचा राज्य संपून ब्रिटिश राजवट भारतामध्ये स्थिरावली. आणि लगतच्याच काळात, साधारण 1825 ते 35 -40 पर्यंत नाना शंकरशेठ यांचे कार्य आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळातील सर्वांचे ब्रिटिश राजवटी बद्दल चांगले मत होते. अनेक वर्ष चालू असलेली युद्धे संपली, कायद्याचे राज्य आले, सुरक्षितता वाढली. यामुळे सुरवातीच्या शिक्षित वर्गाला ब्रिटिश राजवट आपल्या भल्यासाठी आली आहे असे वाटत असे. इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाऱ्हाण्यांची, अडीअडचणींची दाद लावून घेता येईल असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवरती भर दिला.

याच उद्देशाने जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत १८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशन संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून येथील जनतेची दुःखे, अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. आणि जनतेच्या सुखाकरता सरकारला प्रत्येक गोष्टी सहकार्य करावे, असा त्यांचा प्रयत्न असे. बॉम्बे असोसिएशन ही भारतातील राजकीय स्वरुपाची पहिली संस्था होती. बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही, भारतातील सनदशीर राजकारणाची सुरुवात मानता येईल. पुढील काळात हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. यावरूनच बॉम्बे असोसिएशनचे महत्त्व लक्षात येईल.

प्रारंभीच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये खूप पक्षपात होत असे. प्रशासनातील महत्त्वाची पदे इंग्रज किंवा गोऱ्या लोकांसाठी राखीव ठेवली जात. सरकारच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध ज्या भारतीय नेत्यांनी सुरुवातीला आवाज उठवला, त्यामधे जगन्नाथ शंकरशेठ हे होते. भारतीय लोकांना विविध क्षेत्रांमध्ये गोऱ्यांचे बरोबर अधिकार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.उदाहरणार्थ सुप्रिम कोर्टा मध्ये जी ज्युरीची पदे असत ती, सुरुवातीला फक्त गोऱ्यांनाच दिली जात. नानांनी या पदांवर भारतीय लोकांचाही समावेश केला जावा म्हणून प्रयत्न केले. 1836 मध्ये प्रथमच भारतीय लोकांचा ग्रँड ज्युरी मध्ये बसण्याचा हक्क मान्य झाला.

जगन्नाथ शंकरशेठ हे दातृत्वाबद्दल देखील फार प्रसिद्ध होते. शाळा, दवाखाने, धर्मशाळा, ग्रंथालय, मंदिरे यासारख्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. आपल्या संपत्तीचा अतिशय सुयोग्य वापर त्यांनी केला. नानांचा त्यांच्या कार्याचा भारतीयांनी गौरव केलाच परंतु ब्रिटिश सरकारनेही त्याचा गौरव केला. अनेक समित्या, पदे यावर त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या शिक्षणच्या व्यवस्थेवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारने 1840 मध्ये बोर्ड एज्युकेशनची स्थापना केली होती. हे बोर्ड जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत नाना त्याचे सन्माननिय सदस्य राहिले. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठाचे फेलो म्हणूनही नानांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबईचे मुन्सिपल कमिशनवरही त्यांची नियुक्ती झाली होती. 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमान ब्रिटिश सरकारने त्यांना दिला.
आधुनिक मुंबईच्या शहराच्या उभाणीतही त्यांचा फार मोठा वाटा आहे. नानांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मुंबईच्या प्रगतीचा आलेखच होता असे म्हटले जाते.

सर्वांगीण सुधारण्याचे बिजारोपण करणारे महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक असे वर्णन नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे केले जाते.
© आरती खोपकर

आम्ही ओपन गटातून परिक्षा देऊन आमची गुणवत्ता सिद्ध केली तरी, आमची जात माहिती होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सरळ नियुक्...
16/02/2025

आम्ही ओपन गटातून परिक्षा देऊन आमची गुणवत्ता सिद्ध केली तरी, आमची जात माहिती होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सरळ नियुक्ती नाकारत आहे... हा ओबीसी विद्यार्थ्यांवर सपशेल अन्याय आहे..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा फक्त उच्चवर्णीय सरंजाम्यानसाठीच असतो काय??

आम्हाला हलक्यात घेऊ नका; शांत आहोत याचा अर्थ असा नाही कि आम्ही भ्याड आहोत.!राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाह...
03/01/2025

आम्हाला हलक्यात घेऊ नका; शांत आहोत याचा अर्थ असा नाही कि आम्ही भ्याड आहोत.!

राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही.. बोटावर मोजण्याइतके आमचे प्रतिनिधी असताना फक्त आमची बोटं छाटण्याचं धोरण राबवणाऱ्या झुंडशहांना आम्ही बळी पडणार नाहीत.. आता 'ओबीसी' एकीची झळही सोसावी लागेल.!

02/01/2025

महाराष्ट्रातील न्यायधिशांना सुट्टीवर पाठवून निर्बुद्ध माज करणाऱ्या बिनडोक पाटलाला सर्वाधिकार देऊन टाक.!
#जातियवादीराजकारण

बीडमधील खंडणी प्रकार समोर आला त्याच बरोबर झोपलेल्या सर्व पक्षीय मराठा नेत्यांची जात जागी झाली. पण खालील प्रकार.... पुण्य...
01/01/2025

बीडमधील खंडणी प्रकार समोर आला त्याच बरोबर झोपलेल्या सर्व पक्षीय मराठा नेत्यांची जात जागी झाली.
पण खालील प्रकार....
पुण्यात-मुळशी_पॅटर्न?
खैरलांजी प्रकरण जातीने केले होते.?
कोल्हापूर- मझ्जीद वर हमला कोणत्या राजाने केला?
कोयता गॅंग कोण करतेय.?
मुंबई गॅंग वार कोण करीत होते.?
असे अनेक प्रकरणे आहेत पण याचा अर्थ आम्ही गुन्ह्यावर पांघरूण घालत नाही... गुन्हा झाला शिक्षा ही त्याचप्रमाणे कठोर व्हावी.. पण त्याआड सरळ मराठा नेते जातीयवाद करत आहे..

ते आष्टी चा हाल्या आधी तिकिटासाठी पुढे पुढे भीक मागत होता आता तोडांने शेण खातोय...
माजलगाव चा फुग्गा ही काही वेगळा नाही

हे खालील घराणे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातील जनतेवर सत्तेतून राजेशाही गाजवणार..

1) पुणे - शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, जय पवार, युगेंद्र पवार, मुरलीधर मोहोळ, हर्षवर्धन पाटील, कुल परिवार, पठारे परिवार

2) अहिल्यानगर (अहमदनगर) - बाळासाहेब विखे पाटील, संजय विखे पाटील, बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात, तांबे, कर्डिले, लंके, जगताप, पाचपुते, मुरकुटे

3) लातूर - अमित विलासराव देशमुख, धीरज देशमुख, अशोक पाटील, अभिमन्यू पवार, बाबासाहेब पाटील

4) नांदेड - अशोक चव्हाण, श्रीज्या चव्हाण, अमिता चव्हाण, भास्कर खतगावकर, मीनल खतगावकर, प्रताप पाटील

5) बीड -आडसकर, सुरेश धस, साहेबराव दरेकर, जयसिंग सोळंके, रजनीताई पाटील, प्रकाश सोळंके, मोहन जगताप, अमर पंडित, बदाम पंडित, लक्ष्मण पवार, सुरेश नवले

6) कोल्हापूर - शाहू राजे भोसले, संभाजीराजे भोसले, चंद्रकांत पाटील, क्षिरसागर, सतेज पाटील, महाडिक, मंडलिक,

7) सांगली - विशाल पाटील, जयंत पाटील, रोहित पाटील, संजयकाका पाटील, प्रतीक पाटील, शालिनीताई पाटील, घोरपडे

8) सातारा - उदयन राजे भोसले, शिवेंद्र राजे भोसले, शशिकांत शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले, रामराजे निंबाळकर

9) सोलापूर - विजयसिंह मोहिते पाटील, रणजित पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील, कदम, राजेंद्र राऊत

10) धाराशिव -पद्मसिंह पाटील, रणाजगजीत पाटील, अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकर, राहुल मोटे, मधुकर चव्हाण

11) जालना - राजेश टोपे, अर्जून खोतकर, रावसाहेब दानवे, संतोष दानवे, बबनराव लोणीकर

12) परभणी - सुरेश वरपुडकर, राजेश विटेकर, बंडू जाधव, सुरेश देशमुख, पाटील परिवार

13) सिंधुदुर्ग - नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे
अजून भरपूर आहेत हे
वरील सर्व जिल्ह्यातील मराठा घराणे सुरवातीपासून राजकारणात राज्य करीत आहेत त्यांना कोणाचाही विरोध नाही...
आता कुठे एकाद दुसरा ओबीसी नेतृत्व दिसत आहेत तर

पुरोगामी महाराष्ट्र अचानक जातीयवादी_झाला
आधी जातीचा माज, दादागिरी, गुंडगिरी करून घराणे राज्य करीत आहेत त्याचे काय❓

सर्वात जास्त महाराष्ट्र जातीयवाद हा कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात सुरू आहे..
कारण; ह्यांना उस कारखाने, शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय, इंजीनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, खाजगी बन्का, पतसंस्था, दुध संघ, आणि आमदार, खासदार, मंत्री, सर्व स्वतः लाच आणि स्वतः च्या जातीकडे च पाहिजे... आणि वरून आरक्षण मागणार म्हणून सर्व आटापिटा सुरू...

आरक्षण हवे तर #जातिनिहाय_जनगणना करून ओबीसी वर अन्याय न करता घ्या आरक्षण पण तसे नको
आरक्षण मागणार तेही ओबीसी मधूनच...
ह्यांना
नाशिक मध्ये भुजबळ नको
बीड मध्ये मुंडे नको
परभणी मध्ये जानकर नको
अकोला मध्ये आंबेडकर नको
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मध्ये जलील नको
सांगली मध्ये गोपीचंद पडळकर नको...

म्हणून ओबीसींनो एकत्र या...
आपली एकजूट आपली वज्रमूठ...हाच ओबीसींचा विजय... #जातियवादीराजकारण #लक्ष्मण_हाके #जातिनिहाय_जनगणना #महादेव_जानकर #महाराष्ट्र_विधानसभा_निवडणुक_2024_निकाल ्व_ओबीसी_सर्व

27/12/2024

लवकरच बीडमध्ये प्रतीमोर्चा काढण्यात येणार आहे "वाल्मिक अण्णा कराड" आणि "धनंजय मुंडे" यांच्यावर षडयंत्र करून यांना जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, आणि हा obc समाजाचा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे, लोकनेते भुजबळ साहेब, पडळकर, जानकर, ताई यांना प्रमुख आमंत्रण दिले जाणार आहे सर्वांनी ताकतीने सहभागी व्हावे.
💪💪 #एकच पर्व obc सर्व 💪💪

27/12/2024

OBC नेत्यांनो दुसऱ्यांच्या राजकीय पक्षांची गुलामगिरी करा.
पिढ्यानपिढ्या कुत्र्यांसारखी अवस्था अशीच होत राहिल.
्व_ओबीसी_सर्व

18/11/2024

#महाराष्ट्र_विधानसभा_निवडणुक_2024_निकाल #लक्ष्मण_हाके #जातिनिहाय_जनगणना #सुसंस्कृतपणा

03/11/2024

आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघातून
भिमराव धोंडे

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rights of OBC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share