ACP MEDIA consultant

ACP MEDIA consultant PR AND MEDIA SERVICES

कोरोना ... लॉकडाऊनचा काळ आठवतोय ना . होत्याचं नव्हतं झालंय. जरी आज निर्बंध शिथिल झाले आहेत,कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वप...
27/08/2021

कोरोना ... लॉकडाऊनचा काळ आठवतोय ना . होत्याचं नव्हतं झालंय. जरी आज निर्बंध शिथिल झाले आहेत,कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे ;पण निर्धास्त होऊन कदापी चालणार नाही!

कोरोना ... लॉकडाऊनचा काळ आठवतोय ना . होत्याचं नव्हतं झालंय. जरी आज निर्बंध शिथिल झाले आहेत,कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे ;पण निर्धास्त होऊन कदापी चालणार नाही!

 # आठवा 'त्या'जाहिराती ...  कोरोनामुळे ''लॉकडाऊन''ला सर्वजण सामोरे गेले... गेल्या   चार महिन्यांपासून सर्वसामान्यांची नो...
29/06/2020

# आठवा 'त्या'जाहिराती ...
कोरोनामुळे ''लॉकडाऊन''ला सर्वजण सामोरे गेले... गेल्या चार महिन्यांपासून सर्वसामान्यांची नोकरी, रोजगार हिरावल्यामुळे आधीच प्रत्येकजण बेजार झाला आहे. अशा अवस्थेत इंधनाच्या दराचा दरदिवशी भडका उडत आहे ;पण केंद्र सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे मग सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागायची ? हा प्रश्न जितका महत्वाचा आहे त्याहीपेक्षा इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंसह सर्व काही महागणार आहे,हा मुद्दा महत्वाचा आहे. लॉकडाऊनच्या काळात पेट्रोलची किंमत ७६ रु. लि. एवढी असताना अनलॉक सुरू झाल्यानंतर लिटरमागे सुमारे १३ ते १४ रु.ची भरघोस वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 # लवकरच
15/09/2019

# लवकरच

आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व तेजस्वी   ज्ञात - अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन !
09/08/2019

आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व तेजस्वी ज्ञात - अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन !

20/05/2019

*एक्झिट पोलचे अंदाज आणि इतिहास *
….....……..............................................
(उद्याच्या भागात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास मोदी सरकारसाठी देशातील तीन दिग्गज नेते सरसावणार का ? ते तीन नेते कोण ? यावर सविस्तर .... )..........................................................

लोकसभा निवडकीच्या सातव्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे अनेक चर्चा सुरु आहेत. काही एक्झिट पोल मतदारांचा कौल जाणून घेण्यात अपयश आल्याचीही उदाहरणं आहेत. अशात हे एक्झिट पोल खरे ठरणार का? हा खरा प्रश्न आहे पण त्यांचा इतिहास काय सांगतो? असे प्रश्नही समोर आहे त.

जरा उजळणी ....

#2004 साली बहुतांश एक्झिट पोलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं एनडीए सरकार येईल, अशी भविष्यवाणी झाली होती.

पण त्यावेळी NDA ला 189 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA ला 222 जागा मिळाल्या. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

# 2009 मध्येही एक्झिट पोलचे अंदाज साफ चुकीचे ठरले. यामध्ये यूपीएचा विजय होईल असे अंदाज होते पण काँग्रेसला 200 जागा मिळतील, असे कुणीही म्हटले नव्हते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला 206 जागा मिळाल्या तर यूपीएला 262 जागा मिळाल्या.

#2014 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच अंशी खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचं सरकार बनेल, असे या सर्व्हेमध्ये म्हटले होते.

त्यानुसार 2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 जागा मिळाल्या. भाजपला 282 जागा मिळाल्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पुन्हा एनडीए सरकार येणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आता 23 मे ला ठरेल किती खरं किती खोटं!

एक्झिट पोलबद्दल ...

# एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील? हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असते. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असले, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असे नाही.

# एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करूनसुद्धा त्याच्यामध्ये जागा किती मिळतील, याबाबत अनिश्चितता असू शकते.

#पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.

उद्याच्या भागात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास मोदी सरकारसाठी देशातील तीन दिग्गज नेते सरसावणार का ? ते तीन नेते कोण ? यावर सविस्तर ....

सोचने कि बात ... आता एक्झिट पोलचा धुराळा उडणार आहे त्यात  दिल्लीतही विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्षांच्या खलबतांना आतापासूनच...
19/05/2019

सोचने कि बात ...

आता एक्झिट पोलचा धुराळा उडणार आहे त्यात दिल्लीतही विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्षांच्या खलबतांना आतापासूनच वेग आलाय.एक्झिट पोलच्या आभासी निकालांनी देश चार दिवस पूर्णपणे ढवळून निघणार आहे .पण २0१९ च्या लोकसभेच्या या महासंग्रामातील संपूर्ण प्रचारात भारतीय जनता पार्टी कुठेतरी हरविलेली आहे का ? हा खरा प्रश्न आहे . प्रचारात आघाडीवर दिसले ते फक्त मोदी सरकार. त्यामुळे विजय झाला तरी तो कुणाचा होईल हा प्रश्न आहेच शिवाय काँग्रेस अथवा प्रादेशिक पक्षांचाही विजय होईल ;पण भाजपा या स्थितीमध्ये कुठेही दिसणार नाही ही सल नक्कीच बोचत राहील.

क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते!बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
18/05/2019

क्रोधाला प्रेमाने

पापाला सदाचाराने

लोभाला दानाने आणि

असत्याला सत्याने जिंकता येते!

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

 #जशास तसे -विधानसभा चाहूल मतप्रवाह २०१९  #प्रवीण पगारे  आघाडीत जास्त खासदार निवडून येणार्‍या पक्षाकडून विधानसभेसाठी जास...
18/05/2019

#जशास तसे -विधानसभा चाहूल

मतप्रवाह २०१९ #प्रवीण पगारे

आघाडीत जास्त खासदार निवडून येणार्‍या पक्षाकडून विधानसभेसाठी जास्त जागांवर दावा केला जाईल. हे दोन्ही काँग्रेसला सोयीचे ठरणार नाही. राष्ट्रवादीचे जास्त खासदार निवडून आल्यास काँग्रेसपेक्षा जास्त जागा किंवा निम्म्या जागांची मागणी केली जाऊ शकते. हे काँग्रेसला मान्य होणे कठीण आहे. अशावेळी पुन्हा २0१४ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

18/05/2019
07/02/2019

सकारात्मक असो किंवा टीकात्मक ... प्रचार प्रसिद्धीचं काम आमच्यावर सोपवा आणि निर्धास्त व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क :०२०२४४३२२२४

गोष्ट...  १५ लाखांची आणि सिंगापूरची !सत्तेच्या सारीपाटात नेहमीच आश्वासने आणि आमिषांचा पाऊस पाडला जातो, हे काही  नवे नाही...
25/10/2018

गोष्ट... १५ लाखांची आणि सिंगापूरची !

सत्तेच्या सारीपाटात नेहमीच आश्वासने आणि आमिषांचा पाऊस पाडला जातो, हे काही नवे नाही. कारण आपल्या नागरिकांची तशी मानसिकता आहे आणि राज्यकर्त्यांचीही. त्यामुळे विकास नक्की कुणाचा होतो ? या प्रश्नावर पीएचडी केली पाहिजे अशीच स्थिती आहे. गरिबांचा विकास काही होत नाही आणि श्रीमंतांचाही काही थांबत नाही. मग काय विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढतच आहे, फाटक्या कपड्यांवर रोजीरोटीसाठी गरिबांची जगण्यासाठी धडपड अहोरात्र सुरु आहे. अपवाद फक्त श्रीमंत आणि राजकारणी वर्गाचा आहे. या दोघांमधला नोकरशाहीचा वर्ग लालफितीच्या कारभारात स्वतःचे हित साधत आहे. त्यासाठी सत्तेवर बसलेले काय विरोधी बाकांवरीलही हातभार लावत आहेत . बिल्डर्स , उद्योगपतींसाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. राईट ऑफचा आधार असताना उद्योगपती परागंदा होत आहे;पण पाच - पंचवीस हजाराच्या कर्जाच्या बोज्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे ;पण राजकारणातील आश्वासनांचा पाऊस काही थांबत नाही. हे आजवर घडत आल्याने परिस्थिती बिकटच होत आहे.
गरिबांच्या नावाखाली श्रीमंतांचे भले होत आहे. निवडणुकीत मतांच्या समीकरणासाठी जातीयवाद काय मंदिराचा आधार घेतला जात आहे. जग कुठे चालले आहे हे कळत असूनही वळत नसल्याच्या भूमिकेतच सारे गुरफटले आहेत कारण सगळ्यांचे लक्ष्य सत्तेचा मेवा चाखणे हेच आहे त्यासाठी जनतेशी काही देणे -घेणे नाही, हीच प्रवृत्ती दिवसेंदिवस फोफावत आहे.
आता पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून हिंदू राष्ट्र निर्माणाच्या नावाखाली 'सबका साथ सबका विकास'चे दिलेले आधीचे आश्वासन झाकून नामानिराळे होण्याचा डाव रंगणार आहे . त्यासाठी जनतेला पुन्हा बळी पाडताना नव्या विकासाचा आव आणला जाणार आहे. सत्तेच्या सारीपाटात किती दिवस हे घडणार आहे?हा प्रश्नच आता अर्थहीन बनला आहे.
असो, 'काला धन लाऊंगा , हर एक के खाते में १५ लाख दूंगा' हे आश्वासन चुनावी जुमले ठरविले गेले असेल तर 'ना खाऊंगा ,ना खाने दूंगा' हे घोषवाक्य कुणासाठी होते ? हेही आता तपासण्याची गरज आहे. मुळात राजकिय क्षेत्र एकमेव असे आहे ,ज्याची सर्वांना गरज लागते. उद्योगपती असो किंवा कारखानदार, बिल्डर्स, वैद्यकीय, शैक्षणिक असे सर्वच क्षेत्र जिथे सरकार दरबारी विविध परवानग्या, मंजुरी यासाठी राजकारणी वर्गाची मोलाची मदत लागते. किंबहुना लायझनींग ऑफिसर म्हणुनच राजकारणी वर्ग कार्यरत असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे 'ना खाऊंगा ,ना खाने दूंगा' ही भूमिका नोकरशहा आणि उद्योगपतींचे 'नाते ' थेट बळकट करण्याबरोबरच प्रतिस्पर्धी विरोधकांना टिपण्याची 'एका दगडा'तच्या धर्तीवरील खेळी जनतेच्या हिताची कशी आहे ? हा प्रश्न महत्वाचा आहे, आणि ते जनतेलाही पटवून देण्याची गरज आहे.
प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार हे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिले ? काळा पैसा देशात आणून नागरिकांना वाटणार यामागे काय भूमिका होती ? अर्थ क्रांतीच्या नादात नोटबंदी करताना भ्रष्टाचारबरोबर दहशतवादीकृत्याचा आधार घेतला.इतकं करून काय साध्य झालं ? हा प्रश्न आजतागायत जसाच्या तसाच आहे. उलट नोटबंदी करताना ' प्रॉमिसरी नोट'चा भंग झाला त्यावर एक अवाक्षरही नाही. असे असले तरी १५ लाख का आणि कसे देणार? हा प्रश्न विसरून नाही कि दुर्लक्षुनही चालणार नाही. येत्या निवडणुकीत हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाने विचारला पाहिजे. शिवाय प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख का देणार होते, त्यामागची संकल्पना , प्रेरणा कुणाची होती याचाही खुलासा मागितला पाहिजे. असो, १५ लाख रुपये काय साधे १५ रूपयेही नागरिकांच्या खात्यात जमा झाले नाहीत मात्र सिंगापूरने एक चांगला आदर्श ठेवला आहे आणि तो नागरिकांच्या हिताचा कारभार कसा असतो यासाठी पथदर्शीही आहे. कोणतेही सरकार आपल्या कर्मचार्‍यांना बोनस देते; पण सिंगापूरच्या सरकारने आपल्या प्रत्येक नागरिकाला बोनस जाहीर केला. सरकारचे २०१८-१९ चे अंदाजपत्रक सादर करताना सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला हा बोनस . हे अंदाजपत्रक सादर करताना सरकारने सरत्या वर्षातला दुरुस्त अंदाज सादर केला आणि सरत्या वर्षात सरकारकडे मोठी शिल्लक राहिली असल्याचे सांगितले.अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीनंतर राहिलेली ही १ हजार सिंगापुरी डॉलर्सची रक्कम काय करायची असा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हा सरकारने या रकमेतला ७० कोटी डॉलर्स बोनस म्हणून वाटण्याचे ठरविले. अर्थात हा बोनस सर्वांना सारखा मिळणार नाही. तर वार्षिक उत्पन्नावरून त्यांचे तीन गट केले . २८ हजारा पर्यंत उत्पन्न असणारांना ३०० डॉलर्स,२८ हजार ते एक लाख उत्पन्न असणारांना २०० डॉलर्स तर एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारांना १०० डॉलर्स बोनस. या बोनसचा लाभ २७ लाख लोकांना हे विशेष. आता सिंगापूरची आणि आपल्या देशाची तुलना कशी काय होऊ शकेल ? तसेच त्यांची लोकसंख्या आणि आपली किती ? हा प्रश्नही उपस्थित केला जाईल. असे असले तरी तेथील राज्यकर्त्यांची जनतेप्रती असलेली मानसिकता आणि आपल्याकडे असलेल्या सत्ताधाऱ्यांची कशी ? ही तुलना महत्वाची ठरणार आहे. सिंगापूरमध्ये अनेक कंपन्यांनी आणि दानशूर लोकांनी सरकारला दिलेल्या देणग्या तसेच वाढीव स्टँप ड्यूटी या मुळे वाढलेले उत्पन्न शिलकी अंदाजपत्रकास उपयुक्त ठरले आहे. लोकांना बोनस म्हणून रक्कम वाटूनही काही शिल्लक राहणारच आहे. ती रक्कम वृद्धांच्या विमा योजनेत भर टाकण्यासाठी वापरली जाणार ; पण त्यातला ५०० कोटी डॉलर्सचा हिस्सा हा रेल्वेच्या पायाभूत सोयी वाढवण्यासाठी राखून ठेवला . तेथील सरकारने आगामी वर्षात करवाढही केली. कारण गेल्या १२ वर्षात एकदाही करवाढ झालेली नाही.आता प्रश्न असा १२ वर्षात जिथे एकदाही करवाढ होत नाही आणि नागरिकांना बोनस दिला जात असेल तिथे नागरिकांना केंद्रबिंदू मानूनच विकास होत आहे ना. मग आपल्याकडे १५ लाखांचे आमिष दाखवले गेले नंतर ते काही प्रत्यक्षात आले नाही उलट जनतेला भिकारी ठरविण्यापर्यंत मजल गेली. राजकारणात सत्तेला खूप महत्त्व असते. चळवळ परिवर्तनाचा लढा असतो आणि राजकारण हा सत्ताप्राप्तीचा मार्ग असतो. अशा संघर्षात राजकारणाचा आखाडा रंगला, की मग चळवळीची कात टाकून पक्षीय सत्तेची लढाई लढण्याला पर्याय नसतो. तेथे चळवळीचेच सोंग लावून फिरले, की पराभवाला पर्याय नसतो. मग काळ्या पैशावाल्यांविरोधातील चळवळ नक्की कुणासाठी होती ? हा प्रश्न जितका महत्वाचा त्याहीपेक्षा सिंगापूरसारखं आपल्या भारतात होईल का ? आणि तशी मनोवृत्ती राजकारण्यांची आहे का ? हाच खरा प्रश्न आहे.

Address

101 , Prabhat Chamber, Appa Balawant Chowk , Bajirao Road
Pune

Opening Hours

Monday 1:05pm - 8am
Tuesday 1:05pm - 9am
Wednesday 1pm - 7am
Thursday 11:10pm - 6:10am
Friday 11:10pm - 8am
Saturday 2:05pm - 10am
Sunday 5am - 8am

Telephone

+919422532122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ACP MEDIA consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ACP MEDIA consultant:

Share