06/06/2026
क्षणात होत्याचं नव्हतं! वादळी पावसाने शिरूरमधील केळीची बाग जमीनदोस्त
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त झालं.काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने अडीच एकरांवरील केळीच्या बागेचा अक्षरशः चुराडा केला. वाऱ्याच्या तडाख्याने उभं असलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं. या पिकासाठी शेतकऱ्यांनी तब्बल चार ते पाच लाख रुपये खर्च केले होते. मात्र निसर्गाच्या एका फटक्यात सर्व काही हातातून निसटलं. आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, घर चालवायचं कसं, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर अद्याप कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही. कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोनही 'नॉट रिचेबल' लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.निसर्गाच्या संकटाने आधीच खचलेल्या या शेतकऱ्याला आता प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
#मांडवगणफराटा #अवकाळी #मान्सून #शेती #केळीबाग #शेतीनुकसान #शेतकरी #शिरूर