Wajir News

Wajir News Day to day activities from Pune & Maharashtra ! Interesting facts & knowledge & Entertaining content all around
Jay Maharashtra !

Note :- Content we are posting is only & purely for entertainment purpose.

हनुमान मंदिर पाडलं, पण हनुमानाची मूर्ती हलली नाही! प्रशासनाने प्रयत्न करूनही तीन दिवसांपासून मूर्ती जागची तसूभरही हललेली...
10/09/2026

हनुमान मंदिर पाडलं, पण हनुमानाची मूर्ती हलली नाही! प्रशासनाने प्रयत्न करूनही तीन दिवसांपासून मूर्ती जागची तसूभरही हललेली नाही.

मिरा रोड (Thane) येथील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' (Seven Square Academy) या शाळेने आपल्या पोर्टल व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प...
10/09/2026

मिरा रोड (Thane) येथील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' (Seven Square Academy) या शाळेने आपल्या पोर्टल व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पालकांना एक परिपत्रक पाठवले ,त्यानुसार पर्युषण काळात (८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा बीट यांसारखे जमिनीखाली उगवणारे (कंदमूळ) पदार्थ आणू नयेत, असे आदेश दिले आहेत,
ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे
फडणवीस यांच्या मंत्री मंडळात जे तथाकथित हिंदू धर्माभिमानी वैगरे आहेत त्याना महाराष्ट्र धर्मावरील हे आक्रमण मान्य आहे का?
हा प्रकार लव जिहाद पेक्षा भयंकर आहे!
मुंबईत मराठी माणसाने राहायचे का नाही ते हेच लोक ठरवणार?
काय खायचे आणि नाही खायचे ते सुद्धा हे लोक ठरवणार?
मुंबईतले गणपती उत्सव हे ताब्यात घेणार?१०६ मराठी जनांच्या बलीदानातून मिळवलेला हा महाराष्ट्र लिलावात काढला काय?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवू...
10/09/2026

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील २ सत्ताधीशांचा दिसतोय.

बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ?
या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३ च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ?

सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही.

माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील.

या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.

राज ठाकरे ।

#राष्ट्रीय_चित्रपट_पुरस्कार

संतोष पंडित यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त.
08/09/2026

संतोष पंडित यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी;
वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त.

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा (National Film Awards) वितरण सोहळा यंदा प्रथमच नवी दिल्लीतील विज्ञान भवनाबाहेर, ग...
08/09/2026

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा (National Film Awards) वितरण सोहळा यंदा प्रथमच नवी दिल्लीतील विज्ञान भवनाबाहेर, गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर (केवडिया) येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity) परिसरात आयोजित केला जात आहे.

​महत्त्वाचे मुद्दे:

​तारीख: हा पुरस्कार सोहळा २२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केला जाईल.

​पुरस्कार प्रदान: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.

​इतिहास: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर होत आहे.

पुण्यात या गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; महापालिकेचे नागरिकांना पाण्याचा साठा करण्याचे आवाहन​पुणे:पुणे शहरातील विविध ज...
08/09/2026

पुण्यात या गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; महापालिकेचे नागरिकांना पाण्याचा साठा करण्याचे आवाहन

​पुणे:

पुणे शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये अत्यावश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने या गुरुवारी शहरातील मोठ्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली असून नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​पाणीपुरवठा बंद राहण्याची वेळ:

​बंदचा कालावधी: बुधवार रात्री १०:०० ते गुरुवार रात्री १०:०० (एकूण २४ तास)

​शुक्रवारचा पुरवठा: शुक्रवारी सकाळी नेहमीपेक्षा उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

07/09/2026

पुण्यात MPSC पेपरफुटीविरोधात स्पर्धा परीक्षार्थींचा भव्य मोर्चा; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

​पुणे:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांमध्ये होणारा विलंब, ढिसाळ कारभार आणि अन्न व औषध प्रशासनातील (FDA) ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ आज पुण्यात स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भव्य मोर्चा काढला.

​आज सकाळी १० च्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा अलका टॉकीज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

​विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:

​ड्रग इन्स्पेक्टर व इतर परीक्षांमधील गैरप्रकारांची एसआयटी (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी.

​MPSC अध्यक्षांनी खाबुगिरी व नियोजनातील गोंधळाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.

​प्रलंबित परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी

५३ व्या वर्षीही सचिन ३५ चे कसे दिसतात? काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य?वय ५३ वर्षे… पण चेहऱ्यावरचा ताजेपणा, शरीरातील ऊर...
06/09/2026

५३ व्या वर्षीही सचिन ३५ चे कसे दिसतात? काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य?
वय ५३ वर्षे… पण चेहऱ्यावरचा ताजेपणा, शरीरातील ऊर्जा आणि फिटनेस पाहिला तर सचिन तेंडुलकर यांचे वय खरंच ५३ आहे का, असा प्रश्न पडतो!
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य करणारे सचिन तेंडुलकर आजही तितकेच फिट आणि उत्साही दिसतात. क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्षे झाली, मात्र त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे केलेले लक्ष आजही कायम आहे.
म्हणूनच प्रश्न पडतो—५३ व्या वर्षीही सचिन तेंडुलकर एवढे तरुण कसे दिसतात?
यामागे कोणतीही जादू नाही. आहे ती वर्षानुवर्षांची शिस्त, व्यायाम, योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैली.
व्यायामाला पर्याय नाही
सचिन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत फिटनेसला खूप महत्त्व दिले. निवृत्तीनंतरही त्यांनी शारीरिक हालचाल आणि व्यायाम पूर्णपणे सोडलेला नाही.
शरीराची ताकद, flexibility, stamina आणि mobility टिकवण्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा असतो.
वय वाढत असताना शरीराला व्यायामाची गरज कमी होत नाही; योग्य व्यायामाची गरज वाढत जाते.
आहारात शिस्त
तरुण दिसण्यासाठी केवळ चेहऱ्यावर काही लावणे पुरेसे नाही. आपण दिवसभरात काय खातो, किती खातो आणि किती नियमितपणे खातो याचा शरीरावर मोठा परिणाम होतो.
संतुलित आहार, पुरेसे protein, भाज्या-फळे आणि योग्य प्रमाणात carbohydrates याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
झोप आणि Recovery
फिटनेस म्हणजे फक्त gym मध्ये जाऊन व्यायाम करणे नाही.
Exercise जितका महत्त्वाचा, तितकीच Recovery आणि झोपही महत्त्वाची.
शरीराला योग्य विश्रांती मिळाली तर व्यायामाचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे होतो.
मनानेही Active राहणे
सचिन आजही विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. क्रिकेट, कुटुंब, प्रवास, छंद आणि विविध सामाजिक उपक्रम यामुळे त्यांची जीवनशैली सक्रिय राहते.
शरीर तरुण ठेवण्यासाठी शरीरासोबत मनही सक्रिय ठेवणे गरजेचे आहे.
मग ५३ व्या वर्षीही ते ३५ चे कसे दिसतात?
खरं तर एखाद्या व्यक्तीचे वय पाहून ती किती वर्षांची दिसते याचा अचूक अंदाज लावता येत नाही. पण सचिन यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचा fitness level आणि youthful energy नक्कीच जाणवते.
आणि यातून सामान्य माणसाने एक गोष्ट नक्की शिकायला हवी—

वय थांबवता येत नाही, पण वय वाढण्याची पद्धत आपल्या हातात असते.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ताणावर नियंत्रण आणि सकारात्मक जीवनशैली या सवयी आपण आजपासूनच अंगीकारल्या, तर ४०-५० नंतरही आपण स्वतःला अधिक फिट आणि उत्साही ठेवू शकतो.
सचिन यांचं तारुण्य हे एका दिवसाचं यश नाही;
ते अनेक वर्षांच्या शिस्तीचं परिणाम आहे.
वय ५३ असलं तरी मन आणि शरीर Active असेल, तर व्यक्तिमत्त्वातला उत्साह कायम तरुण राहू शकतो!

“डीजेला पूर्णपणे बंदी आलीच पाहिजे. डीजेचा गणपती उत्सवाशी काहीही संबंध नाही. केवळ मनोरंजन, नाच-गाणे आणि मौजमजेसाठी त्याचा...
06/09/2026

“डीजेला पूर्णपणे बंदी आलीच पाहिजे. डीजेचा गणपती उत्सवाशी काहीही संबंध नाही. केवळ मनोरंजन, नाच-गाणे आणि मौजमजेसाठी त्याचा वापर केला जातो. मागील वर्षी टिळक रोडवर आम्हाला ढोल-ताशांचे वादन करायचे होते; मात्र डीजेच्या प्रचंड आवाजामुळे आम्हाला वादन करता आले नाही. मिरवणुकीला उशीर झाल्यामुळे अखेर आम्हाला ढोल-ताशे न वाजवताच तेथून निघावे लागले.”

Address

Bajirao Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wajir News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wajir News:

Shortcuts

Share