Samkaleen Publication

Samkaleen Publication समकालीन प्रकाशन - समकालीन सामाजिक वास्तवाचा शोध घेणारी पुस्तकं.

नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणा

रे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.

खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीचील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.

📚 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समकालीन पुस्तकं सवलतीत 📚१) अज्ञात गांधी - नारायणभाई देसाईगांधीजींच्या आयुष्यातील अनेक ...
02/10/2025

📚 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समकालीन पुस्तकं सवलतीत 📚

१) अज्ञात गांधी - नारायणभाई देसाई

गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा करणारं, खात्रीशीर पुराव्यांवर आधारित आगळं-वेगळं पुस्तक.

२) लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी - नरेन्द्र चपळगावकर

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाची सांधेजोड उकलून दाखवणारं पुस्तक.

३) महात्मा गांधी आणि राज्यघटना - नरेन्द्र चपळगावकर

आपल्या घटनेवरचा गांधीजींचा प्रभाव, घटनानिर्मितीच्या काळातील घडामोडी आणि घटनानिर्मिती यांचा वेध घेणारं पुस्तक.

४) असे होते गांधीजी - सुहास कुलकर्णी

भारताच्याच नव्हे, तर जगभरातल्या अनेक स्वातंत्र्य चळवळींची प्रेरणा ठरलेले महात्मा गांधी होते तरी कसे? समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

• मूळ किंमत - 850 रुपये

• सवलत किंमत - 680 रुपये (शिवाय फ्री घरपोच)

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

01/10/2025

📚 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समकालीन पुस्तकं सवलतीत 📚

१) अज्ञात गांधी - नारायणभाई देसाई

गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा करणारं, खात्रीशीर पुराव्यांवर आधारित आगळं-वेगळं पुस्तक.

२) लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी - नरेन्द्र चपळगावकर

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाची सांधेजोड उकलून दाखवणारं पुस्तक.

३) महात्मा गांधी आणि राज्यघटना - नरेन्द्र चपळगावकर

आपल्या घटनेवरचा गांधीजींचा प्रभाव, घटनानिर्मितीच्या काळातील घडामोडी आणि घटनानिर्मिती यांचा वेध घेणारं पुस्तक.

४) असे होते गांधीजी - सुहास कुलकर्णी

भारताच्याच नव्हे, तर जगभरातल्या अनेक स्वातंत्र्य चळवळींची प्रेरणा ठरलेले महात्मा गांधी होते तरी कसे? समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

• मूळ किंमत - 850 रुपये

• सवलत किंमत - 680 रुपये (शिवाय फ्री घरपोच)

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9370979287

#अज्ञात_गांधी #लोकमान्य_टिळक_आणि_महात्मा_गांधी #महात्मा_गांधी_आणि_राज्यघटना #नरेन्द्र_चपळगावकर #समकालीन #प्रकाशन #नवं_पुस्तकं #पुस्तकं #मराठी #युनिक_फीचर्स #गांधी #जयंती

गांधीजींना देश 'राष्ट्रपिता' मानतो. पण त्यांच्याविषयी अनेक समज-अपसमज-गैरसमज आहेत. गांधीजींना संत मानणारे जसे खूप आहेत, त...
01/10/2025

गांधीजींना देश 'राष्ट्रपिता' मानतो. पण त्यांच्याविषयी अनेक समज-अपसमज-गैरसमज आहेत. गांधीजींना संत मानणारे जसे खूप आहेत, तसंच त्यांचे दोष आणि चुकांवर बोट ठेवणारेही भरपूर आहेत. गांधीजींमुळे देशाचं नुकसानच जास्त झालं असं मानणारेही आहेत. ज्यांच्याबद्दल इतक्या टोकाची मतं आहेत, ते गांधीजी खरे कसे आहेत? समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

*असे होते गांधीजी*
*-सुहास कुलकर्णी*

• किंमत : 200 रु /-
• सवलत किंमत : 160 रु /-
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287

📖 समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्रातील कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख अन् त्यांच्या विचारांचा मागोवा घ...
24/09/2025

📖 समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्रातील कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख अन् त्यांच्या विचारांचा मागोवा घेणारी पुस्तकं 📖

गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स हा जागतिक सन्मान गडचिरोलीतील ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या समारंभात सहसंचालक डॉ. आनंद बंग यांनी पुरस्कार स्वीकारला.

बालमृत्यू रोखण्यासाठी व ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी बंग दाम्पत्यांनी केलेल्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अर्भक मृत्यूदर 121 वरून 16 वर आला आणि भारत सरकारने हीच पद्धत 2005 पासून आशा सेविका उपक्रमाद्वारे राबवली. आज देशभरातील 10 लाखांहून अधिक आशा सेविका दरवर्षी दीड कोटी बालकांना आरोग्यसेवा पुरवतात. ही पद्धती जगभरातील 80 देशांत स्वीकारली गेली आहे.

समाजासाठी धडपडणा-या या सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल जाणून घ्यायचंय? मग वाचा समकालीन प्रकाशनाच्या खरेखुरे आयडॉल्स या बेस्टसेलर पुस्तकाचे तीन भाग.

1) खरेखुरे आयडॉल्स भाग 1

2) खरेखुरे आयडॉल्स भाग 2

3) खरेखुरे आयडॉल्स भाग 3

मूळ किंमत - 750रु /-
सवलत मूल्य - 600 रु /- (फ्री घरपोच)
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

📖 वर्दीतल्या माणसाच्या नोंदी 📖- सदानंद दातेसदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. आजवर अनेक सक्षम ...
20/09/2025

📖 वर्दीतल्या माणसाच्या नोंदी 📖

- सदानंद दाते

सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. आजवर अनेक सक्षम अधिकारी न्यायाची आणि सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडले आहेत, हे खेदाने कबूल करायला हवं. पण सुदैवाने आपल्याकडे असेही काही अधिकारी आहेत, ज्यांनी घटनेचा मान राखण्याची आपली शपथ तंतोतंत पाळलेली आहे. सदानंद दाते अशा पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

पोलिस खात्याच्या व्यवस्थापकीय पदांवर अधिकाऱ्यांची थेट भरती करण्याची पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली; कारण आपल्या देशात भ्रष्टाचार रुजलेला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहत असल्याचं त्यांचं मत होतं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी थेट विद्यापीठांमधून सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या नेमणुका करण्याचं आणि त्यांना इतर अधिकाऱ्यांहून चांगले पगार देण्याचं ठरवलं. आय.पी. (इंपीरियल पोलिस) मध्ये भरती झालेल्या अशा अधिकाऱ्यांचं प्रमुख काम होतं, ते म्हणजे स्टेशन हाऊस ऑफिसर्स आणि इतर कनिष्ठांच्या तपासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून अपराधी पकडले जातील हे पाहणं आणि एकाही निरपराध्याला हकनाक शिक्षा होणार नाही याची खातरजमा करणं. स्वातंत्र्यानंतरही सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या अशा थेट नेमणुका सुरू राहिल्या. सुरुवातीच्या अशा अधिकाऱ्यांनी आपल्या पूर्वसुरींची परंपरा पुढे चालवली. त्याच वेळी, अशा अधिकाऱ्यांनी सत्याची कास सोडू नये आणि कायद्याने मिळालेल्या अमाप सत्तेचा गैरवापर करू नये याकडे राजकारणी जातीने लक्ष ठेवून होते.

आता इतक्या वर्षांनी परिस्थिती खूपच पालटली आहे. भारतातल्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी कायद्याला बगल देऊन सत्यापेक्षा राजकारण्यांच्या इच्छांनुसार चालावं यासाठी सत्तेचा वारंवार वापर करून पोलिसांना आमिष दाखवली जातात. यामुळे गुन्हेपीडितांवर अपार अन्याय होतो. त्याच वेळी गुन्हेगारांनाही बळ मिळतं. पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या करणाऱ्या राजकारण्यांचा वरदहस्त असेल तर आपल्याला कुणी हात लावू शकत नाही असं त्यांना वाटू लागतं.

सदानंद दाते यांनी राजकीय दबावाच्या अशा अनेक अंधाऱ्या गल्ल्या पार केल्या आहेत. त्यामुळेच त्यांना जनतेचं प्रेम मिळालं. हे पुस्तक वाचून तुमच्या लक्षात येईल, की त्यांनी सत्याची आणि न्यायाची कास अजिबात न सोडल्यामुळेच त्यांना हे शक्य झालं. आपल्या कामाचा गौरव व्हावा अशी त्यांनी कधीच अपेक्षा ठेवली नाही, आणि तेच त्यांच्या यशाचं गमक आहे.

पुस्तकात त्यांनी आपल्या पोलिस ट्रेनिंग अकॅडमीमधल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल लिहिलं आहे. तिथे त्यांना डी.आय.जी. रामकृष्णन यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यानंतरची प्रत्येक जबाबदारी पार पाडताना त्यांनी हाताखालच्या लोकांकडूनही शिकत राहणं कधीही सोडलं नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला पाठवण्यात आलं. तत्कालीन अधीक्षकांनी त्यांना आपल्या कार्यालयाबाहेर दोन तास ताटकळायला लावून मगच त्यांची भेट घेतली. एका तरुण सहायक अधीक्षकाला प्रशिक्षणासाठी खातेनिहाय बढती मिळालेल्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचं मला आश्चर्यच वाटलं होतं. आमच्या वेळेला तरुण अधिकाऱ्यांची पहिली नेमणूक सर्वोत्तम अधिकाऱ्यांच्या हाताखाली होत असे. त्यामुळे करियरच्या सुरुवातीलाच त्यांच्या जडणघडणीला योग्य ती दिशा मिळत असे.

वर्धा जिल्ह्याशी महात्मा गांधींचं नाव अगदी जवळून जोडलं गेलेलं असल्याने जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित झालेली होती. असं असूनही तिथे दारूची सर्रास विक्री चालायची हे दातेंनी पाहिलं. तसंच त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वाधिक तक्रारी अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या विरोधातल्याच असायच्या. त्यांनी अवैध दारूच्या विरोधात मोहीम उघडली आणि अवैध दारूव्यवसायाशी लागेबांधे असणाऱ्या राजकारण्यांची आणि पोलिस अधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. परिणामी, त्यांची लोकप्रियता घटली. मात्र, त्यामुळे ते नाउमेद झाले नाहीत.

भंडाऱ्यात त्यांना एका मंत्रिमहोदयांनी आपल्या मर्जीतल्या उमेदवारांची भरती करण्यास सांगितलं. त्याला त्यांनी नकार दिल्यावर मंत्र्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करण्याची मुभा देण्याइतपत सौजन्य तर दाखवलं; मात्र, त्या उमेदवारांसमोर आपली शिफारसपत्रं टरकावू नयेत अशी विनंतीही केली! पोलिसभरती म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण बनलेलं आहे, आणि ही बाब चीड आणणारी आहे. प्रामाणिकपणे केली जाणारी भरती संबंधित भरती अधिकाऱ्याच्या लौकिकात तर भर घालतेच, शिवाय त्यामुळे पोलिस दलाचं सामर्थ्यही वाढीस लागतं. चांगल्या अधिकाऱ्यांकडून धडे घेण्यास दाते नेहमीच तयार असत. सूर्यकांत जोग आणि संजीव दयाल यांचा ते उल्लेख करतात. पोलिस स्टेशनची परिणामकारक पाहणी कशी करावी, तसंच कठीण परिस्थितीतही शांत कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

२००५ साली सदानंद दाते फुलब्राइट शिष्यवृत्तीवर एक वर्षासाठी अमेरिकेला गेले. तिथल्या सर्वसामान्य माणसांचे त्यांनी लिहिलेले अनुभव वाचण्यासारखे आहेत. एका विनातिकीट प्रवाशाला तिकीट तपासनीसाने पकडलं. त्या प्रवाशाचं ओळखपत्र जप्त केलं गेलं. तिकिटाची आणि दंडाची रक्कम भरून कार्यालयातून ओळखपत्र घेऊन जाता येईल असं त्याला सांगण्यात आलं. आपल्याकडे जसं चित्र दिसलं असतं त्याच्या बरोबर उलट तिथे त्या गोष्टीचा जराही कांगावा केला गेला नाही.

सदानंद दाते यांनी आपल्याला मिळालेली कोणतीही नेमणूक स्वीकारण्यास कधीही का-कू केली नाही. तीच त्यांची ताकद आहे. आपलं सामान बांधून ते सदैव तयार असतात. राजकारण्यांद्वारे सरळमार्गी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर सतत बदलीची टांगती तलवार ठेवली जाते; पण दातेंना त्याचं कधीही भय वाटलं नाही. त्यामुळेच ते चुकीच्या गोष्टींना नकार देऊ शकले आणि निर्भीडपणे, स्वतंत्र बाण्याने काम करू शकले. संपूर्ण चमूला पुढे घेऊन जाणारं उत्तम नेतृत्व, चांगल्या कामाचं श्रेय कनिष्ठांनाही देण्याची वृत्ती, आदींबद्दलची त्यांची मतं आवर्जून वाचण्याजोगी आहेत.

पोलिस खात्यातले तरुण उमेदवार तसेच त्यांचे वरिष्ठ या सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवं. या पुस्तकाचे इंग्रजीत आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद व्हायला हवेत. देशभरातल्या सर्व पोलिस दलांपर्यंत हे पुस्तक पोहोचायला हवं. तरुण पोलिस अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, की जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणतीही हीरोगिरी करण्याची ना आवश्यकता असते, ना तसं करणं श्रेयस्कर ठरतं. उलट, नैतिकता, सचोटी बाळगणं, न्याय्य आणि योग्य कृती करणं हेच महत्त्वाचं ठरतं. असं केल्याने जनता त्यांना कायम आपलं मानून लक्षात ठेवेल आणि त्यांना कामातून पुरेपूर समाधान मिळेल; अगदी सदानंद दाते यांच्याप्रमाणेच!

- जे. एफ. रिबेरो

• पुस्तकाची किंमत- २०० रुपये

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

📚 ना. धों. महानोर यांची अनुभवपर पुस्तकं सवलतीत 📚१)  पु. ल. आणि मीपु. ल. देशपांडे आणि ना. धों. महानोर यांच्या नात्याचे बं...
17/09/2025

📚 ना. धों. महानोर यांची अनुभवपर पुस्तकं सवलतीत 📚

१) पु. ल. आणि मी

पु. ल. देशपांडे आणि ना. धों. महानोर यांच्या नात्याचे बंध उलगडणारं पुस्तक.

२) यशवंतराव चव्हाण आणि मी

यशवंतराव चव्हाण यांचं सुसंस्कृत, संवेदनशील आणि विचारी व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारं हृदयस्पर्शी पुस्तक.

३) शरद पवार आणि मी

राजकारणात मैत्रीच्या ओलाव्याला जागा नसते, हा समज खोटा पाडणारी दोन मित्रांच्या नात्याची हृद्य गोष्ट.

• मूळ किंमत - ₹ 300

• सवलत मूल्य - ₹ 225 (शिवाय फ्री घरपोच)

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

#पु_ल_आणि_मी #यशवंतराव_चव्हाण_आणि_मी
ार_आणि_मी #ना_धों_महानोर #समकालीन
#प्रकाशन #नवं_पुस्तकं #पुस्तकं #मराठी #युनिक_फीचर्स





📚 ना. धों. महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची ललित पुस्तकं सवलतीत 📚१)  गपसपपळसखेड परिसरातल्या अस्सल लोककथांचा रसाळ ल...
17/09/2025

📚 ना. धों. महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची ललित पुस्तकं सवलतीत 📚

१) गपसप

पळसखेड परिसरातल्या अस्सल लोककथांचा रसाळ लेखणीतून उतरलेला गावरान आविष्कार.

२) गावातल्या गोष्टी

गावखेड्यातील माणसांच्या सुखदुःखाच्या गोष्टी. काळजाला भिडणाऱ्या, मन सुन्न करणाऱ्या.

३) आठवणींचा झोका

गावखेड्यातलं समृद्ध जगणं अनुभवलेल्या एका निर्मळ रानकवीने उलगडलेला आठवणींचा झोका.

• मूळ किंमत - ₹ ३२५

• सवलत मूल्य - ₹ २४५ (शिवाय फ्री घरपोच)

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9370979287

#गावातल्या_गोष्टी #गपसप #आठवणींचा_झोका
#ना_धों_महानोर #समकालीन #प्रकाशन #नवं_पुस्तकं
#पुस्तकं #मराठी #युनिक_फीचर्स #वाचालतर_वाचाल




'मुक्तांगण' संस्थेचं चाळिसाव्या वर्षात पदार्पणडॉ. अनिल अवचट आणि डॉ. सुनंदा अवचट यांच्या प्रयत्नांतून व्यसनमुक्तीचा मार्ग...
30/08/2025

'मुक्तांगण' संस्थेचं चाळिसाव्या वर्षात पदार्पण

डॉ. अनिल अवचट आणि डॉ. सुनंदा अवचट यांच्या प्रयत्नांतून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या मुक्तांगण या संस्थेची स्थापना झाली. व्यसनाधीन रुग्ण, त्यांची शारीरिक- मानसिक अवस्था, समाजाचा दृष्टीकोन,व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाची स्थिती, रुग्णाची बरं होण्याची प्रक्रिया आदीप्रत्येक टप्प्यावर साथ देण्याचं मोठं काम मुक्तांगणनं उभं केलं आहे. या प्रवासाचा मागोवा घेणारं पुस्तक म्हणजे 'मुक्तांगणची गोष्ट'
________________

आश्चर्य सांगतो, हे पुस्तक लिहायचा मी कधीही बेत केला नव्हता. साधा विचारही मनात आला नव्हता. इतर अनेक विषयांचे मी बेत करीत असतो. त्यासाठी भेटाभेटी करतो, प्रवास करतो, काही विषयांबाबत पुस्तके वाचतो, कधी तज्ज्ञ गुरू भेटले की शिकवणीही लावतो. पण असं काहीच इथं घडलं नाही. तसा मुक्तांगणमध्ये मुलांना मुक्तांगणच्या जन्माची गोष्ट सांगतो. कधी विषय निघाल्यावर एखाद्या जुन्या पेशंटची हकीगत आठवली की ती सांगतो. पण तेवढेच. सांगण्यासारखे आठवणींचे पुस्तक भरेल एवढे भांडार आपल्याजवळ आहे याची मलाच कल्पना नव्हती. मी इतका त्यात आहे, त्याच्या जवळ आहे, की मलाच ते दिसत नव्हते. जसे आपण पुस्तक अगदी डोळ्यांलगत धरले तर काहीच दिसत नाही, तसे.

मध्यंतरी अमेरिकेचा दोन महिन्यांचा दौरा झाला. मित्रांनी आपापल्या गावी माझे कार्यक्रम ठेवलेले. शनिवार-रविवार सोडला तर मधले दिवस मस्त मोकळे. मी यजमान मित्रांना सांगत असे, तुम्ही तुमच्या कामाला जा, माझा वेळ मी छान घालवीन. अशा निवांतपणात एक विचार मनात आला, मुक्तांगणमध्ये काम करणाऱ्या पुढच्य पिढ्यांसाठी हे सगळे लिहू यात का? संस्था कशी आकार घेते? कितीदा खचायला होते, पण त्यातनं कसा रस्ता निघू शकतो... सुरुवातीचा मजकूर पेशंट मित्रांना अनेकदा सांगितलेला. त्यामुळे कंटाळा येईल असे वाटले होते. पण त्या निवांतपणाची जादू अशी, की न सांगितलेलेही काही आठवले. असा काही भाग लिहून झाल्यावर गाडी सुटली ती सुटलीच.

भारतात परत आलो. पण थोड्याच दिवसांत दुबईला जायचे होते. तिथं पाय घसरून पाठीवर पडलो. एका मणक्याचे आणि उजव्या हाताच्या हाडाचे कोपराजवळ फॅक्चर झाले. या लिखाणाचं गारुड असं, की पालथा पडून मी हे पुढं लिहीत राहिलो. तो हात फक्त वळवला की खूप दुखायचा. पण नशीब, लिहिण्यामध्ये काही अडचण नव्हती. तिथून परत आल्यावर विश्रांती पर्वच होते. मग काय, ते आणि तेच !

पहिला प्रतिसाद मिळाला तो आनंद (नाडकर्णी) चा. त्याने ज्या शब्दांत वर्णन केले ते लिहिणे जरा अवघड आहे. पण परिणाम सांगतो. आधीच वेडा.. त्यात... अशी अवस्था. मधनं मधनं कागदाची पुडकी त्याला कुरियर करत होतो. रात्री फोन यायचा, "बाब्या..." एरवी मी बिघडेन किंवा डोक्यावर बसेन म्हणून तो (आणि मुक्ताही) बरे शब्द वापरत नाही. पण या वेळी सगळाच अपवाद. तोही मुकांगणच्या जन्मापासून निगडित. हे सगळे पेशंट मित्र त्याला माझ्यापेक्षाही चांगलेच माहीत असत. तो त्यांच्या आणखी आठवणी सांगत असे. काही मित्रांचे आता काय चाललेय त्याची भर घालत असे.

माझी एरवीची लिहिण्याची मर्यादा लेखाइतकी. कधी तो दीर्घ लेख होई इतकेच. पण असे एकटाकी पुस्तक लिहिणे हा अजबच अनुभव होता. 'अमेरिका' हे पुस्तकरूपाने आले असले, तरी वर्षभर अधूनमधून प्रकरणे लिहिली. आणि त्यांचे विषयही वेगवेगळे होते. 'वाघ्यामुरळी ही तसेच. पण या लिखाणात आपण मागे काय लिहिलेय, तेच तेच परत तर लिहीत नाही ना, ही भीती. पण एकदा ठरवले, या दुरुस्त्या नंतर करता येतील. आत्ता कशाला विचार करायचा?

जे आठवेल ते लिहीत गेलो. पुस्तकाचे विभाग पाडले नाहीत की मुद्दे काढले नाहीत. ते वाहत गेलं, आणि त्याच्याबरोबर मीही. एकदा सगळे झाले. आसपासच्या कुणी कुणी वाचले. मधल्या काळात काही नव्याने आठवले की भर घालायचो. पण ती त्या लिखाणात घुसवणे दुरापास्त होई. मग तो सगळा भागच नव्याने लिहून ती आठवण प्रवाहात सामावून जाई.

या वेळी प्रथमच 'समकालीन प्रकाशना'तर्फे माझे पुस्तक येतेय. आनंद अवधानी खूप दिवसांपासून मागे लागला होता, मी मुक्तांगणबर असे काही लिहावे म्हणून. मी ती कल्पना मुळातूनच उडवून लावीत होतो. आता हे लिहिल्यावर त्याचा आग्रह होता, त्यांना ते पुस्तक द्यावे. मी द्विधा होतो. माझा मित्र मानसपुत्र महेंद्र कानिटकर. त्याने हे वाचल्यावर तो म्हणाला, हे 'समकालीन'कडे द्या.

बापाचे मुलाने ऐकावे, अशी रीत आहे. पण विचार केला, चला, मुलाचे ऐकावे. म्हणून हे पुस्तक त्यांच्याकडे आले. या पुस्तकाच्या निमित्ताने आनंद (अवधानी), सुहास (कुलकर्णी) आणि श्याम (देशपांडे) या त्रिकुटाची नव्याने ओळख व मैत्री झाली.

माझा धाकटा भाऊ सुभाष याची मुखपृष्ठे पूर्वी माझ्या पुस्तकांना लाभायचो. पण नंतर तो मोठमोठी चित्रे काढण्यात मश्गूल झाला. जरा धाडसानेच विचारले; आणि तो 'करतो' तर म्हणालाच, पण आठवड्याच्या आत मला ते बघायलाही मिळाले. त्याची ताकद, त्याचे पॉवरफुल स्ट्रोक्स परत एकदा अनुभवायला मिळाले. आणि त्यावर एक लाल रंगाचा ब्रशचा स्ट्रोक असा उठवलाय, की वाटले, सुभाष तो सुभाषच. माझ्या आगामी पुस्तकांना, जमेल तेव्हा, त्याच्या मुखपृष्ठांनी कवेत घ्यावे, ही इच्छा.

देणगी देतेवेळी पु. ल. म्हणाले होते, 'एका जरी घरात (व्यसनमुक्तीचा) दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.' ते तसे माझे वडीलच. त्याचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणाऱ्या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल तर सार्थक झाले समजेन. हे वाचून एका जरी कार्यकर्त्यांला, मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, आणि घडपडणाऱ्या मित्राला प्रतीत झाले, की कामात अडचणी येतात, खचवणाऱ्या घटना घडतात. पण तरी निरपेक्ष काम करीत राहिलं की असीम समाधान मिळतं, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून (मग नवरा कुठल्याही अवस्थेत असेना का) चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे ऊन पसरेल आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल.. त्यापेक्षा अधिक काय मिळवायचं असतं?

- अनिल अवचट

पुस्तकाची किंमत - 250 रु /-
सवलतीत : 200 रु/-
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क - 093709 79287

ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिवस. समकालीन प्रकाशनाने त्यांची दहा पुस्तकं प्रकाशित केली. अवचटांची आधीची बहुतेक पु...
26/08/2025

ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिवस.

समकालीन प्रकाशनाने त्यांची दहा पुस्तकं प्रकाशित केली. अवचटांची आधीची बहुतेक पुस्तकं वर्षभर कुठेकुठे किंवा दिवाळी अंकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून तयार झाली आहेत. पण समकालीनसाठी मात्र त्यांनी नव्याने काही पुस्तकं लिहिली. मुक्तांगणची गोष्ट, माझी चित्तरकथा, लाकूड कोरताना आणि माझ्या लिखाणाची गोष्ट ही ती पुस्तकं.. त्यातील माझ्या लिखाणाची गोष्ट या पुस्तकातला एक भाग.. स्वतःच्या आगळ्यावेगळ्या लिखाणाबद्दलचं अवचटांचं स्वगत.

विषय दिसले तसा मी लिहीत गेलो. विषयाला सोईचा होईल असा फॉर्म आपोआप मिळत गेला. तसा मी फार काही पक्क्या विचारांचा, तत्वनिष्ठ वगैरे माणूस नव्हे. एकूण काम ढिसाळ. कशात शिस्त नाही. पण काही बाबतींत मात्र मी फार हट्टी होतो. अजूनही आहे. संपादकाने मला विषय सांगितलाय आणि मी लेख लिहिलाय असं कधी झालं नाही. संपादकाने मला विषय सुचवायचा नाही. ते मी ठरवणार. कसा लिहायचा, किती लिहायचा, हे सगळं त्या लेखाच्या विषयावर ठरणार. संपादकाने माझ्या लेखनात काही बदल करायचे नाहीत, काटछाट करायची नाही. त्याने मला सुचवावं. मला पटलं तर ते बदल माझ्या हाताने मी करेन हवं तर. संपादकाला एकच मुभा- लेख स्वीकारणं किंवा नाकारणं! ही ऐट मी करू शकलो, कारण सुनंदाचा पाठिंबा. इतर पत्रकारांना हा चॉइस नसतो. मी पत्रकार मित्रांना म्हणायचो, “संपादक सांगतो तसं तुम्हाला लिहावं लागतं हे बरोबर. पण महिन्याकाठी किमान एक लेख असा लिहा की जो तुम्हाला सुचला आहे. तो लेख सर्वस्वी तुमचा असेल. कुणाचंही दडपण न मानता अनिर्बंध लिहू लागलात तर तुमच्यातला अंकुर जागा राहील.”

त्या वेळी पुस्तकजगात कथा-कादंबऱ्यांना फार महत्त्व होतं. मला प्रकाशक म्हणायचे, “तुम्ही कथा, कादंबरी लिहा, लगेच पुस्तक काढतो. हे काय लिहीत बसलाय?” काही कथालेखक दिवाळीला 15-20 कथा लिहायचे. त्याचा कंपोज ‘फिरवून' कथासंग्रह काढायचे. तिथे गरिबांच्या जीवनातली असह्य दलदल दाखवणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाला कोण विचारणार? पण सगळ्यांचाच अंदाज चुकला. ‘पूर्णिया' या पहिल्याच पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. शासनाचा राज्य पुरस्कारही मिळाला. आता समजतंय, ती ट्रेंड बदलाची सुरुवात होती. कथा-कादंबऱ्यांचा लोकांना कंटाळा येऊ लागला असावा. आमच्यासारखे ‘नॉनफिक्शन' लिहिणारे वाचकांना हवे होते. अनुवादाच्या पुस्तकांचाही खप वाढत होता.

मी हमालांवर लेख लिहिला (तो ‘माणसं' पुस्तकात आहे), तेव्हा तो वाचून माझ्या ज्येष्ठ स्नेही सरोजिनी वैद्य म्हणाल्या, “तू एका कादंबरीचा विषय वाया घालवलास.” मी म्हटलं, “यातनं कादंबरी कशी झाली असती बुवा?” त्या म्हणाल्या, “एक पात्र गुळाच्या गुदामातलं, एक मिरचीतलं, अशी पात्र उभी करून त्यांच्यात ‘इंटरॲक्शन' दाखवायची..”

मला ही कल्पना कशीशीच वाटली. कमालीची कृत्रिम. मी त्यांना म्हणालो, “नाही बुवा जमणार आपल्याला.” त्या म्हणाल्या, “तुझा लेख एकदा वाचला की परत कोण वाचणार? कादंबरी सार्वकालिक आहे. तुझं हे लिखाण अल्पजीवी आहे.” मी म्हटलं, “असू द्या अल्पजीवी. आजची हमालांची परिस्थिती वाचकांपुढे ठेवायची, एवढाच माझा उद्देश आहे. तेवढं काम करतोय की हा लेख.” पण आज पाहतोय, तर 80 सालचं ‘माणसं' चाळीस वर्षांनीही तेवढंच वाचलं जातंय. पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघताहेत.

तसाच दुसरा एक प्रसंग. जशा सरोजिनीबाई माझ्या जवळच्या, तसेच विजय तेंडुलकरही. त्यांना मी ओतूरच्या घराविषयी, मागच्या पिढ्यांविषयी सांगत होतो. ते म्हणाले, “तू यावर कादंबरी लिही.” त्यांनाही मी तेच सांगितलं, “ते माझं काम नाही. मला तसं सुचत नाही.” नंतर दरवेळी भेटलो की ते विचारायचे, “कादंबरी कुठवर?” मी तोंड चुकवायचो. एवढा मोठा माणूस म्हणतोय तर लिहू या, म्हणून बसलो; पण कागद कोराच राहिला. मित्र म्हणाला, “तुला तुझा फॉर्म सापडला आहे तर त्यातच लिही. भलत्या फॉर्ममध्ये कशाला अडकतोस?” मग ती रुखरुख जाऊन शांत झालो. नंतर तेंडुलकरांनीही नाद सोडून दिला.

असे आग्रह जवळच्यांकडूनच व्हावेत हा मोठाच योगायोग. सदाशिव अमरापूरकरला मी ‘वाघ्या-मुरळी' या संशोधनातलं काही सांगत होतो. तो हट्टच धरून बसला, मला यावर नाटक लिहून दे. परत माझी माघार. दादापुता. पण तो ऐकेच ना. तो त्या वेळी आय. एन. टी. या ग्रुपमध्ये नाटकं करायचा. त्याने तिथेही जाहीर केलं, “अनिल माझ्यासाठी नाटक लिहितोय.” मग मला कुणी कुणी विचारायचे, “काय, कुठवर आलंय नाटक? किती प्रवेश लिहून झालेत? जसं लिहून होईल तसं आमच्याकडे द्या. आम्ही तालमी सुरूच करतो.” एवढी जवळची, प्रिय माणसं आग्रह करत असतानाही मी त्या दडपणाला जुमानलं नाही.

कवितेपासून मी खूप काळ दूर राहिलो; पण वयाच्या साठीनंतर अचानक कविता सुचू लागली आणि मी कविता लिहू लागलो. कथा, गोष्टी आदी ‘फिक्शन'पासूनही दूर होतो; पण गोष्टीही मला अचानक सुचू लागल्या. त्यातून इतक्या लिहिल्या की त्यांची तीन पुस्तकं झाली. त्यातल्या एका पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आतून आलं तर लिहिलं जातंच.

आधीचं माझं लिखाण कमालीचं कोरडं होतं. भावनांना मी आसपास फिरकू देत नसे. कारण मला दाखवायचं होतं दाहक वास्तव. मी कॅमेऱ्यामागचा माणूस. त्याने दृश्यात कडमडायचं नसतं. जे लिहितो त्या परिस्थितीवर फोकस. मग त्यात माझं म्हणजे लिहिणाऱ्याचं स्वातंत्र्य काय? तर मी काय दाखवायचं ते ठरवू शकतो. ते कसं, कुठल्या क्रमाने दाखवायचं ती रचना ठरवू शकतो. फक्त जे काही ‘वाटायचं' ते वाचकाला वाटलं पाहिजे. आपणच गळा काढून चालणार नाही. परिस्थिती जितकी भीषण, तितका लेखक अलिप्त, तितकं लिखाण कोरडं हवं. म्हणजे आपल्याला हवा तो परिणाम वाचकांवर होण्याची शक्यता.

याउलट मोर, स्वत:विषयी, आप्त वगैरे लिखाणात मी माझ्या मनातलं वास्तव न्याहाळतोय. जसं बाहेर एक वास्तव आहे तसं आतही आहे. तिथे माझं जगणं, विविध प्रसंगांना झालेल्या माझ्या भावनिक प्रतिक्रिया याही एका वास्तवाचाच भाग आहेत. आधीच्या लिखाणात मी दाखवणारा होतो, आता जे दाखवायचं आहे त्यातही मी आहे. आधीच्या लेखनातली अलिप्तता आता तितकी महत्त्वाची नाही. एकदम ‘मॅटर ऑफ फॅक्ट' असून चालणार नाही. इथे विषयाला काही बंधनही नाही. लहानपणातली एखादी आठवण यायची, पण तिच्या मागचं- पुढचं काही आठवायचं नाही. त्यावर विचार करून थोडंसं दिसायचं, पण ते तेवढंच.

यात लिहिण्यासारखं काही तरी आहे हे जाणवायचं आणि लिहायला बसायचो. लिहिता लिहिता किती आठवायला लागायचं. हे कोण उभं आहे, अंधुक अंधुक... अरे, हा तर आपला ज्ञानू सुतार किंवा माळवे गुरुजी. ते देऊळ दिसलं. त्याचा गाभारा दिसला. तिथला फुलांचा वास आला आणि बाजूच्या निर्माल्याचाही. पलीकडे जमिनीत पक्की बसवलेली मोठ्या परातीएवढी सहाण. त्यावर ठेवलेल्या चंदनाने उगाळून गंध करून कपाळाला लावायचो. त्या गंधाचा वासही इतक्या दूर इतक्या वर्षांनी आला. मला लोक म्हणतात, “तुम्हाला इतकं आधीचं कसं आठवतं? बुद्धी सतेज आहे.” माझं म्हणणं, “लिहायला बसलात तर तुम्हालाही आठवेल.”

या लिखाणाचा मला खूप फायदा झाला. ते लिहिता लिहिता मी स्वत:कडे निरखून बघू लागलो. मागे वळून पाहताना काही गोष्टी नव्याने जाणवू लागल्या. त्या वेळी अमुक एका व्यक्तीला त्रास झाला तर आपण तिच्याशी जाऊन बोललो का नाही? वेळीच आधार देऊ शकलो असतो. का मागे राहिलो? काही घटनांमध्ये तर स्वतःच्या चुकाही दिसू लागल्या. ‘अरेच्या, आपण असं कसं केलं? काय वाटलं असेल त्या माणसाला!' कधी कधी त्या माणसाला भेटून ही उपरती सांगूही लागलो. सुनंदा म्हणायची, “अनिल या तऱ्हेचे लिहू लागलाय ना, तर जास्त हळवा झालाय.” मी आधी स्वत:कडे पाहतच नव्हतो. बाहेरचं पाहण्यात व्यस्त. जेव्हा स्वत:कडे पाहू लागलो तेव्हा अनेक दोष दिसू लागले. आजवर हे दोष दुसरं कुणी दाखवत होतं; पण त्याकडे मी लक्ष दिलेलं नाही. आता ते मलाच दिसू लागले. नाकारायची सोयच उरली नाही.

मधल्या काळात सामाजिक आणि वैयक्तिक असं दोन्ही प्रकारचं लिखाण एकाच वेळी चालू होतं. एक फेज संपली आणि दुसरी सुरू झाली, असं झालं नाही. आता पाहताना असं वाटतंय, की त्यामुळे एकातून उडी मारून दुसरं लिखाण सुरू झालं नाही, तर हळूहळू झालेलं ते अवस्थांतर होतं.

निरनिराळ्या मानवसमूहांवर लिहीत होतो. ते तसंच चालू ठेवलं असतं तर त्याला तोचतोपणा आला असता. स्वत:च स्वत:ला गिरवणं, हा लेखनाचा अंतकाळच. तसं व्हायला नको, अशी आतून जाणीव होत होती. मनात आलं, वास्तवाचं एक रूप पाहिलं. आता वेगळ्या रीतीने ते पाहिलं पाहिजे. त्याच काळात सामाजिक कृतज्ञता शिबिरात सुरेखा दळवीचं छोटंसं पण प्रभावी भाषण ऐकलं. ती कोकणात आदिवासींमध्ये काम करत होती. तेव्हा वाटलं, असे लोकांमध्ये राहून काम करणारे कार्यकर्ते शोधू यात. त्यांचे अनुभव ऐकू यात. ते ज्या प्रश्नांशी झगडताहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करू यात. त्यातून ‘कार्यरत' हे पुस्तक तयार झालं.

डॉ. अभय बंग, अरुण देशपांडे अशा विविध व्यक्ती आणि त्यांच्या कामावर लिहिलं. कामावर लिहिण्याची मला सवय होती; पण आता कार्यकर्त्यांच्या जीवनात डोकावू लागलो. ठरलेली चाकोरी सोडून हे वेगळ्या वाटेकडे कसे आले? सुरळीत, सुखाचं आयुष्य सोडून हे खडतर, संकटांनी भरलेल्या आयुष्याकडे कसे खेचले गेले? कामाच्या सुरुवातीला तर ज्यांच्यासाठी हे काम करतात त्यांचाही प्रतिसाद नसतो. अशा वेळी यांना एकाकीपण येत असेल का? परत फिरावं, असा विचार येत असेल का?

असे प्रश्‍न पडत गेले आणि त्यांचा माग घेता घेता लेख आपोआप उलगडत गेला. काम आणि कार्यकर्ते हे दोन्ही भाग त्यात तितक्याच सहजतेने आले. कुठे शैलीचा प्रश्‍न आला नाही की फॉर्मचा. अभयवरच्या लेखात आदिवासींच्या आरोग्याच्या समस्याही आल्या आणि त्याबरोबर अभय आणि राणीमधलं हृद्य नातंही आलं. अमेरिकेतली मोठी संधी सोडून हे दोघं गडचिरोलीला येतात काय, प्रस्थापितांच्या पैसे खाण्याच्या संधी गेल्यामुळे यांच्यावर कसले कसले आरोप केले जातात काय, सगळंच आश्चर्याचं. अरुणसारखा स्वतंत्र, सर्जक बुद्धीचा संशोधक पाश्चात्त्य जगात जन्मला असता तर केवढ्या संधी मिळाल्या असत्या! त्याने निर्मिलेली जगावेगळी यंत्रं पाहून समाजाने डोक्यावर घेतलं असतं. इथे मात्र अरुणच्या पुढ्यात ओढवून घेतलेल्या नाना अडचणी, पत्करलेलं दारिद्य्र आणि जीवनभर उपेक्षाच उपेक्षा.
या सगळ्यांनी मला केवढं वेगळं जग दाखवलं!

लिहिण्याविषयी लिहायचं ते लिहून झालं. हे माझं लिखाण काही आवर्जून लिहिलेलं, काही नकळत आलेलं. काहींमध्ये दोन्ही तऱ्हेचं लिखाण मिसळून गेलेलं. हे साहित्य आहे, असाही माझा दावा नाही.

मध्यंतरी युनिक फीचर्सने मला त्यांच्या मराठी ई-साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केलं होतं. त्यावर एकाने टीका केली, “त्या लायकीचं अवचटांचं लिखाण नाहीच, तर यांना हे पद का दिलं?” कुणी मला म्हटलं, “याला उत्तर द्या.” त्यांना मी म्हटलं, “ते म्हणतात ते बरोबरच आहे. नुसतं तेच नव्हे, तर माझं लिखाण कसल्याच लायकीचं नाही. मी लिहिलेल्या लिखाणाला कोणी साहित्य म्हणालं तर तो उगाचच गौरव. मला साहित्यिक समजू नका आणि लिखाणाला साहित्य समजू नका.” हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे.

माझी पुस्तकं मी क्वचितच वाचली असतील. स्वतःचा लेख छापून आल्यावरही मी सहसा तो पुन्हा वाचायला जात नाही. कधी वाचायला घेतलाच तर दोन-चार वाक्यं वाचून फेकून देतो. इतकं बोअर लिखाण मी वाचकांसमोर ठेवतोय? काय म्हणत असतील लोक मला! लहानपणापासून हा न्यूनगंड आहेच माझ्यात रुजलेला. पण हळूहळू लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागतात. काही लोक भेटून सांगतात, काही नुसते हात हातात घेऊन उभे राहतात. त्यांना मी लिहिलेलं आवडल्याचं त्या स्पर्शातून मला कळत असतं. मला त्यांचं खरोखर आश्चर्य वाटतं. मी कधी पैशासाठी लिहिलं नाही की बक्षिसांसाठी नाही. कीर्ती तर आपसूक येते. त्याला आपण काय करणार?

तरीही काही बक्षिसं माझ्या मनात अजून रेंगाळली आहेत. त्याच्यावर लेख लिहिल्यावर अभय बंग म्हणाला, “आम्ही काम करत होतोच; पण अनिलच्या लेखाने आमचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. आता आम्ही एकाकी नाही आहोत.” अरुण म्हणाला, “संकटकाळात कुचंबून बसतो तेव्हा तुझा माझ्यावरचा लेख वाचलेला कुणी भेटतो आणि मदतीचा हात पुढे करतो. तुझा लेख म्हणजे माझा पासपोर्ट झालाय. पूर्वीची बंद दारं खटाखट उघडली जातात.” निपाणीच्या तंबाखू कुटणाऱ्या स्त्रिया म्हणतात, “आता अत्याचार करायची मालकाची ताकद हाय काय? त्याने नुसता हात लावला तर त्याला चपलांनी बडवून काढू.” ‘कोंडमारा'मधल्या सत्यभामेला पाच-सात वर्षांनी भेटायला गेलो. मधल्या काळात लेखाने खूप फरक पडला. आता तरुणांची चांगली पार्टी सत्तेत आली. सत्यभामेवरचं दडपण दूर झालं. मला पाहून इतकी आनंदली! तिचं पोर विचारत होतं, “आयव, हे कोन?” ती हळूच म्हणाली, “गप बस. तुजं मामा हायेत.” मला एक बहीण मिळाली. आणखी एका प्रकरणात अन्याय झालेल्या एका तरुणाला लागेल ती मदत केली. पोलिस चौकशी, वकिलाची मदत, सगळं पुरवलं. तरी आम्ही केस हरलो. काही वर्षांनी त्या घरी गेलो. त्याच्या बायकोला, आईला म्हणालो, “आम्ही काहीच करू शकलो नाही. शरम वाटते.” म्हातारी म्हणाली, ‘तवा भावासारखा उगवलासा. लई आधार वाटला.”

सत्यभामा, ही म्हातारी यांना पुढची काही वर्षं भाऊबीज पाठवत राहिलो.
‘माणसं'मधल्या हमालांवरच्या लेखाचं त्यांच्यासमोरच वाचन केलं. एक म्हणाला, “मी धान्यात काम करतो. शेजारी मिरचीचं गुदाम आहे, पण मिरचीवाल्यांचे एवढे हाल असतात हे पहिल्यांदा कळलं.” वार्षिक मागण्यांमध्ये हमालांनी दरवाढीची महत्त्वाची मागणी खालच्या नंबरला टाकली आणि गुदाम सुधारणेचा, अधिक आरोग्यदायक करण्याचा आग्रह धरला. काही सर्वांत खराब गुदामांत काम करायचं नाकारलं. यातही त्या वाचनाचा वाटा.

‘संगोपन' वाचून अनेकांनी कळवलं, ‘मुलांशी कसं वागावं ते कळलं.' किंवा ‘कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालावं, हा घरात चर्चेचा विषय, त्याचाही निकाल लागला.' ‘सुनंदाला आठवताना' हा लेख वाचून एका ब्रेस्ट कॅन्सर पेशंटने कळवलं, ‘हा लेख वाचून जगायची हिंमत आली. मिस्टरांना वाचायला लावला. म्हणाले, असं जगायचं. त्यातून आमचा ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार झाला.'
. सांगायचं असं, की माझ्या लिखाणाला ललित गद्य म्हणा किंवा आणखी काही, त्याने काही फरक पडत नाही. ते लिखाण लोकांपर्यंत पोहोचतं का, त्यांना त्यातून काही मिळतं का, हा खरा प्रश्‍न आहे. ते ठरवण्याचं काम वाचकांचं. मला मात्र वाचकांच्या प्रतिक्रियांमधून बक्षीस मिळत राहतं.

📖 अनिल अवचट यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची समकालीन पुस्तकं सवलतीत उपलब्ध 📖 १) अनवट : अनेक अनवट वाटांची सैर घडवून आणणारं...
26/08/2025

📖 अनिल अवचट यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची समकालीन पुस्तकं सवलतीत उपलब्ध 📖

१) अनवट : अनेक अनवट वाटांची सैर घडवून आणणारं खास अवचट शैलीतलं पुस्तक
किंमत - ₹ २५०

२) कुतूहलापोटी : सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला शोध. वाचाल, तर थक्क व्हाल गुरू !
किंमत - ₹ २००

३) माझ्या लिखाणाची गोष्ट : अनिल अवचट यांनी स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेलं आगळं पुस्तक. एका अर्थाने त्यांच्या लिखाणकामाचं आत्मचरित्रच.
किंमत - ₹ २००

४) मुक्तांगणची गोष्ट : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वाटचालीचा खुद्द संस्थापक व लेखक अनिल अवचट यांनी ललित शैलीत घेतलेला वेध.
किंमत - ₹ २५०

५) आणखी काही प्रश्न : आपल्या विचारविश्वापलीकडच्या प्रश्नांची अवचट यांनी त्यांच्या खास शैलीत करून दिलेली ओळख.
किंमत - ₹ २००

६) माझी चित्तरकथा : विविध शैलीतल्या चित्रांचा समावेश असलेलं, स्वत:च्या चित्रकलेचा प्रवास सांगणारं सचित्र अन् वाचनीय पुस्तक!
किंमत - ₹ ३००

७) लाकूड कोरताना : अनिल अवचट यांनी लाकडातून कोरलेल्या विविध शिल्पांचं मनोहारी दर्शन घडवणारं दर्जेदार पुस्तक!
किंमत - ₹ २००

८) रिपोर्टिंगचे दिवस : सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठ. चित्रमय शैलीत लिहिलेले सडेतोड रिपोर्ताज.
किंमत - ₹२००

९) अगं अगं रेषे : चित्रं काढणं ही एकदम सोपी गोष्ट आहे. गरज असते ती फक्त रेषेशी मैत्री करण्याची. कसं ते सांगताहेत लेखक-चित्रकार अनिल अवचट.
किंमत - ₹१००

१०) जवळचे: आधीच्या अन् आजच्या काळातल्या आपल्या जवळच्यांविषयी अनिल अवचट यांनी लिहिलेले उत्कट लेख.
किंमत - ₹२५०

• कोणतंही पुस्तक २०% सवलतीत (फ्री घरपोच)

• सर्व पुस्तकांची मूळ किंमत ₹ २,१५० मिळावा ₹ १,७२० मध्ये (फ्री घरपोच)

• संपर्क : 093709 79287

📖 डॉ. मेधा पुरव सामंत यांचे कार्यचरित्र 'आम्ही स्वयंपूर्णा' पुस्तकाचे प्रकाशन 📖आजच्या काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर ज...
25/08/2025

📖 डॉ. मेधा पुरव सामंत यांचे कार्यचरित्र 'आम्ही स्वयंपूर्णा' पुस्तकाचे प्रकाशन 📖

आजच्या काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर जे बदल घडत आहेत, त्यात अशा चळवळींनी दिलेला आधार फार महत्त्वाचा आहे. अन्नपूर्णा परिवाराचा प्रवास हे भारतातील स्त्री-संघर्षाचे उज्ज्वल उदाहरण असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापिका डॉ. मेधा पुरव सामंत यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आम्ही स्वयंपूर्णा’चे प्रकाशन रविवारी ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ येथे मान्यवरांच्या हस्ते झाले. या पुस्तकात अन्नपूर्णा परिवाराच्या तीन दशकांच्या कार्याची सखोल नोंद आहे. लघुवित्त, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पेन्शन योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे म्हणाले, ‘‘अन्नपूर्णा परिवाराचे कार्य म्हणजे केवळ सामाजिक उपक्रम नाही, तर ते एक मॉडेल ऑफ इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आहे. या संस्थेने मायक्रो फायनान्स क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.’’

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी पुस्तकातील काही अंश अत्यंत भावपूर्ण पद्धतीने वाचून दाखवले. ‘आम्ही स्वयंपूर्णा’ हे पुस्तक समकालीन प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून, प्रकाशन संस्थेच्या वतीने संपादकीय मंडळातर्फे गौरी कानिटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. मेधा पुरव सामंत म्हणाल्या, ‘‘ही कहाणी माझी नाही. ती माझ्यासोबत चालणाऱ्या हजारो महिलांची आहे. स्वयंपूर्णता म्हणजे फक्त आर्थिक सक्षमतेचा प्रश्न नाही, तर आत्ममूल्य आणि सामाजिक आत्मनिर्भरतेचा प्रवास आहे.’’

• पुस्तकाची मूळ किंमत : 250 रु /-

• सवलत किंमत : 200 रु /- (फ्री घरपोच)

• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 093709 79287

Address

Samakaleen Prakashan, 8 Amit Complex, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 6:15pm
Tuesday 11am - 6:15pm
Wednesday 11am - 6:15pm
Thursday 11am - 6:15pm
Friday 11am - 6:15pm
Saturday 11am - 6:15pm

Telephone

+919922433606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samkaleen Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samkaleen Publication:

Share