लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan

  • Home
  • India
  • Pune
  • लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan

लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan https://lokvrat.in/
देशभरातल्या मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत लेखकांनी एकत्र येऊन सुरू केलेली राष्ट्रहिताची साहित्यिक चळवळ!

"अपर्णा "आजच्या सामाजिक समस्यांकडे बघतांना काही मुली व स्रियांची मनोव्यथा जाणतांना आपण सुन्न होतो. आजच्या या मनाच्या दोल...
21/08/2025

"अपर्णा "

आजच्या सामाजिक समस्यांकडे बघतांना काही
मुली व स्रियांची मनोव्यथा जाणतांना आपण सुन्न
होतो. आजच्या या मनाच्या दोलायमान परिस्थिती
मध्ये चिमणपाखरी मुलींपासुन ते वयोवृध्द आया
भगिनींपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर बराचसा सकारात्मक असा बदल घडवण्यात नक्कीच
मदत होइल असे मला तरी वाटते.
"अपर्णा " मी जसजसे वाचत गेले तसा आतला सात्विक गंध हलके हलके पसरत आहे असा
भास झाला, त्यामुळे अधिक आनंद झाला,आणि
खरोखरच श्रावण सुफळ संपन्न झाला.
अपर्णा ही पार्वती कुठे पुराणातच नाहीं तर कुठेशी
आपल्या आतच ती वसलेली असावी, अस " स्व"
शोधाकडे प्रवृत्त करायला लावणारे लिखाण यात आहे. असे मला वाटते.
एकुणच "अपर्णा " प्रत्येक कुटुंबात ठेवावे, कुणी
कुणाला भेट द्यावे असे नितांत सुंदर पुस्तक आहे.
श्रावण मासात माझे झालेले वाचन ही केवळ
शिवशक्तीचीच कृपा असावी असे मी मानते.
धन्यवाद!🙏

सौ. अंजली वेखंडे

डॉ.शिरीष कुलकर्णी सर म्हणजेच Shirish Smile सर यांनी लिहिलेले हे सुंदर प्रकाशकीय म्हणजे 'अपर्णा' पुस्तकातील एक मोठे बलस्थ...
11/08/2025

डॉ.शिरीष कुलकर्णी सर म्हणजेच Shirish Smile सर यांनी लिहिलेले हे सुंदर प्रकाशकीय म्हणजे 'अपर्णा' पुस्तकातील एक मोठे बलस्थान...

'अपर्णा' प्रकाशकीय

साहित्यातल्या काही शब्दांची मालकी आत्म्याची असते. शब्द हे केवळ तिथवर जाण्याचे माध्यम ठरतात. जेव्हा एखादी प्रतिभा त्या शब्दांतून प्राण ओतते, तेव्हा त्यातून एक अशी नवसृष्टी आकारते की, जिचा प्रवेश थेट वाचकाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात होतो. टाळ, मृदंग, डमरू नुसते वाजत नाहीत, तर वाचकांच्या हृदयातून धडधडू लागतात.
मा. भैरवी देशपांडे यांनी लिहिलेली ‘अपर्णा’ ही अशीच एक सर्जनयात्रा आहे. ध्यान, स्मृती, ओढ, वेदना आणि आत्मशोध यांच्या अभंग प्रवाहात अखंडपणे वाहणारी!
‘अपर्णा’ ही पार्वतीची जीवनकहाणी सगळ्या मर्यादांच्या पलीकडे आपल्याशी एकरूप होते. साक्षात पार्वतीच्या अंतःकरणातील चिंतनयात्रेचे दस्तऐवज आपल्या हाती लागतात. लेखिकेने ‘पौराणिक’ घटनांना नव्या जाणिवेचा आणि स्त्रीच्या स्वानुभवाचा गाभा दिला आहे. तिच्या लेखणीतून पार्वती हळूहळू आपली ओळख विसरलेल्या, स्वप्नांतून स्वतःला पुन्हा शोधणाऱ्या आणि अखेर त्याग, प्रेम, तपश्चर्या, समर्पण अशा प्रत्येक आणि कित्येक अवस्थांतून शिवत्वाकडे झेपावणारी एक स्त्री म्हणून उभी राहते.
ही कादंबरी वाचताना आपल्याला काही अनोखे क्षण भेटतात. जिथे आपण काळाच्या पार गेलेलो असतो. तिच्या प्रासादातल्या पहाटेचे वर्णन असो की, हिमशिखरांकडे पाहत पार्वतीच्या मनात उठणारी स्मरणांची लाट असो, लेखिका त्या प्रत्येक दृश्याला इतक्या तन्मयतेने रंगवते की, वाचकही त्या पार्वतीसह त्या हिमालयापाशी उभे असतात. लेखिका जी भाषा वापरते ती अतिशय कोमल आहे; पण तेवढीच विलक्षण ताकदीची आहे. ती नितळ आणि खोल, सखोल आहे. म्हणूनच ‘अपर्णा’ वाचताना वाचकाला शब्द नव्हे, तर भावनांचे, लाटांचे, डमरूंचे आवाज ऐकू येतात.
पार्वती ही प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली एक ऊर्जा आहे. जिला तिचे ‘स्व’ गवसायचे आहे, जिला शिवाचा ‘ध्यास’ आहे. ‘अपर्णा’ ही त्या ध्यासाची गोष्ट आहे. हे एका स्त्रीचे आत्मबोधातून आत्मार्पणाकडे जाणारे अस्तित्वप्रवाहाचे सर्जन आहे. यज्ञकुंडामध्ये झेपावणारी सती, ध्यानस्थ होणारी पार्वती, आत्मसंशयाने भरलेली; पण तरीही तपाच्या अग्नित स्वतःला शुद्ध करणारी पार्वती, या सर्व रूपांचा एकच निष्कर्ष आहे, ‘मी कोण आहे?’ याचा शोध!
या शोधयात्रेत लेखिका कुठेही आरती, कीर्तन वा चमत्कारांची मदत घेत नाही. ती पार्वतीला एक सामान्य मुलगी म्हणून उभी करते. जिला स्वप्ने पडतात, जी गोंधळते, जी उत्तरे शोधते, आणि अखेर स्वप्नांतल्या त्या रुद्राक्षधारी, जटाधारी योग्याच्या प्रतीक्षेत स्वतःच एक तपस्विनी बनते. हे करताना लेखिका केवळ तिच्या सौंदर्याचेच नाही तर तिच्या मानसिक सामर्थ्याचेही विलक्षण सुंदर चित्र रंगवते.
‘अपर्णा’ ही म्हणूनच एक स्त्रीच्या अंतःकरणातील आत्ममुक्तीची कहाणी आहे. पार्वतीचा आत्मशोध हा शेकडो हृदयांचा अंतर्ध्वनी ठरते. म्हणूनच ही कादंबरी पौराणिक असूनही अत्यंत जवळची आपलीशी आणि समकालीन वाटते.
यात स्त्रीच्या निवडीला महत्त्व आहे, तिच्या ‘होकारा’ला तितकेच महत्त्व आहे जितके ‘नकारा’ला! आणि तिच्या अंतर्मनातील उत्तरांचा शोध घेताना वाचक स्वतःही अंतर्मुख होतो.
मा. भैरवी देशपांडे यांनी पारंपरिक स्त्रीदेवतेच्या गाभ्याला नव्या अभिव्यक्ती शैलीने स्पर्श केला आहे. त्यांच्या लेखणीला भावनांची नाजूक जाण आहे, शब्दांवर प्रभुत्व आहे आणि प्रत्येक प्रसंगात तत्त्वज्ञानाचा एक मृदुल झराही आहे.
‘अपर्णा’ वाचताना आपण केवळ कथा वाचत नाही, तर एका महान स्त्रीच्या जन्मानंतरही अनेक जन्म चालणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतो.
या ग्रंथाच्या पानोपानी पार्वतीचा ध्यास वाचकांची समाधी होईल आणि साक्षात पार्वतीची समाधी आपल्यातही घडू लागेल आणि तिचा ‘स्व’ शोधताना आपणही कुठेतरी स्वतःच्या आत वळू लागू, हा विश्वास ही कादंबरी प्रकाशित करताना मनामध्ये आहे. संपादक माणिक घारपुरे ह्याही या कादंबरीच्या सहप्रवासी आहेत. लेखिकेचे आणि त्यांचेही मनापासून अभिनंदन!
खरोखर ‘अपर्णा’ ही केवळ कादंबरी नाही, तर ही एक अंतर्प्रेरणा आहे आणि म्हणूनच या दिव्य लेखनप्रयत्नाला माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!

-डॉ. शिरीष कुलकर्णी

आनंदवार्ता:अपर्णा आणि कोऽहम्? चे हृद्य प्रकाशनःमा. भैरवी देशपांडे यांच्या सर्जनशील लेखनप्रवासातील दोन अत्यंत सकस साहित्य...
14/07/2025

आनंदवार्ता:

अपर्णा आणि कोऽहम्? चे हृद्य प्रकाशनः

मा. भैरवी देशपांडे यांच्या सर्जनशील लेखनप्रवासातील दोन अत्यंत सकस साहित्यकृतींचा, ‘अपर्णा’ (कादंबरी) व ‘कोऽहम्?’ (कवितासंग्रह) यांचा ११ जुलै २०२५ रोजी गोंदिया येथे एक भव्य आणि सुसंस्कृत सोहळ्यात दिमाखदार प्रकाशन संपन्न झाले.

या विशेष प्रसंगी लेखिकेच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या त्यांच्या सासूबाई श्रीमती लक्ष्मी देशपांडे आणि मातापित्यांच्या, सौ. अनुराधा आणि अरुण सरूरकर यांच्या हस्ते हे पुस्तकप्रकाशन झाले. कुटुंब आणि स्नेहीजनांच्या प्रेमाच्या साक्षीने आणि साहित्याच्या तेजाने उजळलेला हा क्षण अत्यंत भावुक करणारा हृद्य आणि प्रेरणादायी ठरला.

‘अपर्णा’ ही पौराणिक पार्वतीकथेला आत्मशोधाच्या आणि स्त्री-अस्मितेच्या दृष्टिकोनातून मांडणारी चिंतनशील कादंबरी आहे. तर ‘कोऽहम्?’ हा कवितासंग्रह म्हणजे वैयक्तिक अनुभवांमधून वैश्विक प्रश्नांकडे झेपावणाऱ्या मनाच्या प्रवाहाचे सर्जन आहे. दोन्ही पुस्तके त्यांच्या आशयसंपन्नतेमुळे वाचकांच्या अंतर्मनाला भिडणारी ठरली आहेत.

हे दोन्ही ग्रंथ लोकव्रत प्रकाशन यांच्यामार्फत प्रकाशित झाले असून, रसिक वाचकांसाठी उपलब्ध आहेत:

📘 अपर्णा – ₹३००/- (टपाल खर्चासह)
📗 कोऽहम्? – ₹२२५/- (टपाल खर्चासह)

पुस्तक खरेदी करण्यासाठी कृपया पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी:

1. वर नमूद केलेल्या किंमतीची रक्कम खाली दिलेल्या क्रमांकावर ट्रान्सफर करावी.
2. ट्रान्सफर केल्यानंतरचा स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवावा.
3. खरेदी केलेल्या पुस्तकाचे नाव व पिनकोडसह पूर्ण पोस्टल पत्ता स्वतंत्र मेसेजमधून कळवावा.

संपर्क:
✍🏻 भैरवी देशपांडे
📞 +91 98901 22036

साहित्यप्रेमींनी या दोन्ही पुस्तकांचा अनुभव घ्यावा आणि एका नव्या संवेदनशील साहित्यिक विश्वात आणि लोकव्रत प्रकाशनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, ही विनम्र आग्रहाची विनंती लोकव्रत प्रकाशनाच्या प्रमुख संपादक माणिक घारपुरे यांनी केली आहे.

-लोकव्रत प्रकाशन

आगमनवार्ता... आनंदवार्ता:गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर जाहीर करण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, सा. जनमंगलच्या का. संपादक ...
10/07/2025

आगमनवार्ता... आनंदवार्ता:

गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर जाहीर करण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, सा. जनमंगलच्या का. संपादक मा. भैरवी देशपांडे लिखित 'अपर्णा' ह्या कादंबरीचा आणि 'कोऽहम्?' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ उद्या दिनांक ११.०७.२०२५ रोजी, जलाराम लॉन्स, गोंदिया येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. या आनंदसोहळ्यास आपण सर्व रसिक वाचक आदरपूर्वक आमंत्रित आहात.

धन्यवाद.

-लोकव्रत प्रकाशन

आनंदवार्ता... आगमनवार्ता================साहित्य म्हणजे समाजजीवनाचा आरसाच असतो. तत्कालीन रुढी, मान्यता, आचारविचार यांचे प...
14/05/2025

आनंदवार्ता... आगमनवार्ता
================

साहित्य म्हणजे समाजजीवनाचा आरसाच असतो. तत्कालीन रुढी, मान्यता, आचारविचार यांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते. समाजातल्या स्त्रीच्या वेगवेगळ्या भूमिका आणि तिचं स्थान अभ्यासण्यासाठी मा. डॉ. माधुरी कलकोटे यांनी तब्बल ८२ संस्कृत ग्रंथांचा सखोल, चिकित्सक अभ्यास केला. माधुरीजींनी अगदी वेदकाळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या संस्कृत साहित्यातील स्त्रीजीवनाचे तौलनिक अध्ययन करून 'भारतीय स्त्री: काल आणि आज( वैदिक काळ ते आधुनिक काळ)' ह्या मोठ्या ग्रंथाची निर्मिती केली. या निर्मितीमधे लोकव्रत प्रकाशनाचा सहभाग आहे, याचा खूप आनंद होत आहे.

प्रकाशकीय:
========

#उद्याच्या_भारतासाठी...

*भारतीय स्त्री : काल आणि आज*

*चिंतनाने समृद्ध झालेला मार्गदर्शक ग्रंथ*

स्त्री ज्या स्थितीत होती आणि आहे याची याची जाणीव करून देत उद्याच्या निर्दोष समाजव्यवस्थेसाठी केलेले चिंतन म्हणजे ‘भारतीय स्त्री: काल आणि आज’!

डॉ. माधुरी कलकोटे यांच्या सखोल अभ्यास आणि चिंतनातून हा समृद्ध ग्रंथ सकारण निर्माण झालेला आहे. या चिंतनातूनच उद्याचा भारत, निर्दोष अशा समाजव्यवस्थेच्या पायावर उभा रहावा, अशी लेखिकेची अभिलाषा आहे. सर्वप्रथम लेखिकेचे आम्ही त्रिवार अभिनंदन करतो.

मूलतः स्त्रीचे आयुष्य हा जवळपास नरक आणि नरकयातनांचा संगम; पण याची जाणीव स्त्रीमनास होत नाही. आजमितीला काळाच्या करकचून बांधलेल्या, रुतलेल्या शृंखला थोड्या हलक्या झाल्या आहेत, असे वाटू शकते. यासाठी इतिहासाचे बलिदान स्त्रियांनी विसरता कामा नये.

सतीची प्रथा, विधवांचे केशवापन प्रथा लोप पावली असली, तरीही स्त्रीभ्रूणहत्या आणि बलात्कार हे अत्याचार त्याइतकेच क्रूर आणि भयंकर आहेत. त्याचे प्रमाणही फार मोठे आहे आणि जोपर्यंत ही विकृती या समाजात नांदत आहेत तोपर्यंत सक्षमीकरण हा शब्द हास्यास्पद ठरणार आहे.

'स्वीकार’ हा स्त्रीचा मूल स्वभाव आहे. गुलामीचा, दुर्व्यवस्थेचा स्वीकार करून स्त्री आनंदाने जगते आहे, किमान तसा आभास ती स्वतःपुरता निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे. म्हणूनच या अद्वितीय, अभ्यासपूर्ण ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषांनी या ग्रंथाचा यथोचित अभ्यास करणे आवश्यक आहे.

समाजाला सर्वोत्तम विचार देण्याचे आणि याचवेळी प्रसंगी डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य या लेखिकेने आणि ग्रंथाने केलेले आहे. याला पुस्तक न संबोधता ग्रंथ असेच संबोधावे लागेल. कारण हा ग्रंथासम मौल्यवान विचार यातून दिला गेला आहे. सामाजिक मूल्यांचे विचारांचे परिवर्तन आणि समाजाचा, स्त्रीपुरुषांच्या मानसिक परिवर्तनाचा हा लढा आहे, हे स्पष्ट करतानाच त्यासाठी शेकडो उपयुक्त भाष्यांचा परिचय, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

इतिहासात सामाजिक विचारवंतांनी, संतांनी भाष्य केल्यानंतर यापुढे या विषयावर आणखी कोणतेच भाष्य करण्याची आवश्यकता नाही, हा विचार बाजूला होऊन या ग्रंथांची आवश्यकता होतीच असे मत वाचकांचेही होईल, हे निःसंशयपणे सांगता येईल.

स्त्रीशिक्षणाचा उत्तम प्रसार झाला. स्त्रीशिक्षणाचे प्रमाण थोडे वाढू लागले; पण स्त्री अधिकच हळवी आणि संवेदनशील झाली. स्त्रियांचे मानसिक प्रश्न निर्माण झाले, नैराश्य वाढू लागले. आणि यासाठी केरळमधले स्त्रीमृत्यूचे वाढते प्रमाण आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण याकडेही उदाहरण म्हणून डॉ. माधुरी कलकोटे अंगुलीनिर्देश करतात.

जन्मच पिंजऱ्यात झाल्याने पिंजऱ्याविषयी तक्रार केली पाहिजे, याचे भान वा जाणीव निर्माणच होणार नाही. स्त्रीपुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक रचनेतील नैसर्गिक भेद स्पष्ट करताना डॉ. माधुरीजी, इंद्र हा नमुचीच्या सैन्याचा ‘अबला सैन्य' असा उल्लेख ऋग्वेदात करतो, याचेही उदाहरण देतात म्हणजे या ग्रंथाच्या निमित्ताने स्त्रीच्या कालच्या स्थितीचा अभ्यास हा आजपर्यंत म्हणजे पुराणापासून ते वर्तमानापर्यंत असा प्रदीर्घ झालेला आहे. म्हणूनच हा ग्रंथ ७५० पानांचा झाला.

स्त्रीशिवाय कुटुंब टिकणार नाही, धर्म टिकणार नाही मानववंशच पुढे जाणार नाही. असे असूनही स्त्रीला आजही पुरेसे जखडून ठेवले गेले आहे. दुय्यम स्थान तर स्त्रीच्या पाचवीलाच पुजलेले आहे. या स्थितीत सक्षमीकरणावर हा ग्रंथ खरेखुरे वास्तवदर्शी प्रबोधनही करतो.

हा ग्रंथ प्रत्येक सामाजिक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने अभ्यासला पाहिजे. विद्यापीठांनीही जाणीवपूर्वक अभ्यासक्रमात घेतला पाहिजे, याचा आग्रह आम्ही धरू. विद्यार्थ्यांचा विवेक वाढण्यास या अभ्यास ग्रंथाची पुष्कळ मोठी मदत होईल.

प्रकाशकीयाचा समारोप करताना स्त्रीच्या हाती या जगाचे संचालन देऊन पहा, या जगताचा अंधार नष्ट होईल. असे सांगतानाच 'देऊन पहा' हे वाक्य केवळ स्वप्नभिक्षा अर्थात कल्पनेतलीच भिक्षा ठरणार आहे, याचीही जाणीव होते आहे.

या पुस्तकाच्या निमित्ताने इथे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये महिला समस्या निवारण केंद्र चालवतो आहोत. हे भारतातले पहिले महिला समस्या निवारण केंद्र आहे. याशिवाय आम्ही स्त्रीभ्रूणहत्याविरोधी चळवळीची सुरुवात केली होती.

डॉ. माधुरी कलकोटे यांचे या ग्रंथांचे निमित्ताने मनःपूर्वक आभार मानून स्त्रीजातीच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा मोह होतो. हा मोह प्रकाशक या नात्यानेही होतो आहे. डॉ. पंकज चांदे, माजी कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि श्री. रामराव पवार, माजी अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेही विनम्रपणे व मनःपूर्वक आभार.

डॉ. माधुरीजींना पुढील लेखनासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा! माधुरीजींनी या ग्रंथाच्या निमित्ताने दिलेले योगदान अविस्मरणीय आणि भविष्यास मागदर्शी ठरणारे आहे.

जयहिंद!
-लोकव्रत प्रकाशन

या ग्रुपवर सातत्याने लक्ष दिल्याबद्दल खालील महत्त्वाच्या पदाधिकारी आणि रसिक साहित्यिक व लेखिकांचे  मनःपूर्वक आभार!   निल...
13/04/2025

या ग्रुपवर सातत्याने लक्ष दिल्याबद्दल खालील महत्त्वाच्या पदाधिकारी आणि रसिक साहित्यिक व लेखिकांचे मनःपूर्वक आभार!
निलिमा नंदुरकर, Shreya Abhijit Sarnaik, Anjali Wekhande, Aparna Chandorkar, रेखा भिवगडे, Mangal Apte, Ketaki Deshpande, Abha Agwan-Bahirat, Swati Deshpande

धन्यवाद

13/04/2025

लोकव्रत प्रकाशन, पुणे आणि जनमंगल परिवारातील सदस्यांसाठी
आणि आमच्या साहित्यिक स्नेही मित्रांसाठी साहित्य अकादमी पुरस्काराची माहिती

साहित्य अकादमी पुरस्कार हा भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार दरवर्षी देशातील २४ प्रमुख भाषांतील सर्वोत्तम साहित्यकृतीस दिला जातो. या पुरस्कारात एक शाल, मानपत्र आणि ₹१,००,०००/- चे रोख पारितोषिक दिले जाते.

साहित्य अकादमी पुरस्कारासाठी थेट अर्ज करायचा नसतो. लेखक स्वतः अर्ज करत नाही. यासाठी एक ठराविक प्रक्रिया असते:
अर्ज शक्यतो प्रकाशक करतात.

१. साहित्य अकादमी निवड समिती आणि सल्लागार मंडळ ही निवड प्रक्रिया पार पाडतात.

२. प्रकाशक, साहित्य संघटना, पूर्वीचे पुरस्कार विजेते, किंवा विशेष आमंत्रित सदस्य हे संबंधित पुस्तकांची शिफारस करतात.

३. लेखकाने पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर साहित्य अकादमीकडे पाठवणे हे आवश्यक आहे.

पात्रता काय असावी?

१. साहित्यकृती मूळ असावी – म्हणजे अनुवादित किंवा प्रेरित नसावी.

२. ती कृती गेल्या ५ वर्षांत प्रकाशित झालेली असावी.

३. ती भाषा साहित्य अकादमीने मान्य केलेल्या २४ भाषांपैकी एक असावी (उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, इ.).

४. लेखक भारतीय नागरिक असावा.

५. लेखकाचा साहित्याशी सक्रिय संबंध असावा.

६. जर एखादी कृती एकापेक्षा जास्त लेखकांनी लिहिलेली असेल, तर पुरस्कार विभागून दिला जातो.

७. साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने माहिती:

१. शिफारसी मिळवणे:

साहित्य अकादमी दरवर्षी निवड प्रक्रियेच्या सुरुवातीला शिफारसी मागवते. या शिफारसी #प्रकाशक, #विद्वान, सल्लागार, #वाचक, इत्यादींकडून घेतल्या जातात.

२. प्राथमिक परीक्षण:

एक समिती सर्व आलेल्या पुस्तकांचा प्राथमिक आढावा घेते आणि काही पुस्तकांची यादी तयार करते.

एक स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक मंडळ ही पुस्तके वाचून गुणांकन करते. त्यानंतर अंतिम तीन पुस्तकांची यादी तयार होते.

प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र भाषा सल्लागार मंडळ (Language Advisory Board) असते. त्यातल्या तज्ज्ञ मंडळींच्या चर्चेनंतर एकमताने किंवा बहुमताने विजेते ठरवले जातात.

पुरस्कारासाठी शिफारस कशी करावी?

तुमचे पुस्तक किंवा इतर कोणाचे पुस्तक तुम्हाला शिफारस करायचे असेल, तर:

१. संबंधित भाषेच्या सल्लागार मंडळाच्या सचिवांशी संपर्क साधावा.

२. पुस्तकाच्या तीन प्रती, लेखकाचा संक्षिप्त परिचय, प्रकाशन वर्ष, विषय इत्यादी माहिती द्यावी.

३. शिफारस लेखी स्वरूपात पाठवावी.

४. ही शिफारस खालील पत्त्यावर पाठवता येते

५. संपर्काचा अधिकृत पत्ता:

To,
Secretary,
Sahitya Akademi
Rabindra Bhavan,
35, Ferozeshah Road,
New Delhi – 110001
फोन: 011-23386626 / 23386745

महत्त्वाचे आणखी काही नियम व अटी:

१. एकच लेखक एका वर्षी एका भाषेसाठीच पात्र असतो.

२. #स्वतःची शिफारस साहित्य अकादमी स्वीकारत नाही.

३. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लेखक त्याचे स्वीकार किंवा नकार देऊ शकतो.

४. पुरस्कार वितरणासाठी प्रसिद्धीपूर्व गुप्तता पाळली जाते.

५. पुरस्कार प्राप्त झालेली कृती जर नंतर विवादास्पद ठरली, तर अकादमी त्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकते.

प्रकारानुसार पुरस्कार

साहित्य अकादमी तीन प्रमुख प्रकारचे पुरस्कार देते:

१. साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) – मूळ आणि उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी.

२. बाल साहित्य पुरस्कार – बालसाहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी.

३. अनुवाद पुरस्कार – एका भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती दुसऱ्या भाषेत उत्तम प्रकारे भाषांतरित केल्याबद्दल.

शिफारसीची अंतिम तारीख: साधारणपणे दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून दरम्यान.

पुरस्कार जाहीर होण्याची वेळ: डिसेंबर महिन्यात.

पुरस्कार वितरण सोहळा: पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होतो.

पुस्तक सुबोध, गुणवत्तापूर्ण आणि मौलिक असावे.
पुस्तकाची मुद्रण, मांडणी आणि मुखपृष्ठ दर्जेदार असावी. भाषेचे व्याकरणशुद्ध लेखन असावे. एक विशिष्ट साहित्यिक दृष्टिकोन असावा.

तुम्ही लेखक, प्रकाशक किंवा साहित्यप्रेमी असाल, तर योग्य माहिती आणि योग्य प्रक्रिया वापरून साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिशेने नक्की प्रयत्न करा.

लोकव्रत प्रकाशन, पुणे आणि साप्ताहिक जनमंगल आपल्यासाठी सदैव शिफारस करावयास तयार आहे, करत असते. प्रतिवर्षी आपण अतिशय गोपनीय रीतीने अशी पुस्तके पाठवत असतो.

-डाॅ. शिरीष कुलकर्णी
सौ.विशाखा राजे Bhairavi Deshpande लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan Sumedha Harshey Mohini Hedaoo Sonali Patle Rutuja Deshpande Geeta Bhawsar Manik Gharpure Shreya Abhijit Sarnaik Jan Mangal Veena Randive Mrunalee R Dipali Pande Rohini Pande Gayatri S Muley Vijaya Brahmankar Vijaya Babar Swati Tapas Potdar Arundhati Vaidya Anuradha Pathak Malini Ambadekar Anant Pandurang Joshi Ajita Anand Deshmukh Archana Deshpande Archana Kulkarni Mrunalee Raje Mohan Pande Sangita Mhaskar Sangita Tamboli Neha Munje Manisha Kurhe Sunetra Joshi Shilpa Deolekar Shirish Smile Vaishnavee Borgaonkar Vrinda Joglekar Vijaya Keshavrao Marotkar Sheela Rajput Sheela Gahilot Shilpa Nandanpawar Samiksha Bangde Namrata Padwal DrVasudha Vaidya DrSuruchi Dabir
Siddhi Pankaj Deshmukh Pune City Suparna Naik

आनंदवार्ता... पुरस्कारवार्ता:==================मान्यवर लेखिका सौ. विजया ब्राह्मणकर यांच्या लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित क...
03/04/2025

आनंदवार्ता... पुरस्कारवार्ता:
==================
मान्यवर लेखिका सौ. विजया ब्राह्मणकर यांच्या लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'शेगावीच्या राणा' या श्री गजानन महाराजांच्या चरित्रास 'संत गोरा कुंभार पुरस्कार' जाहीर!

मा. विजयाजींचे मनःपूर्वक अभिनंदन!
-लोकव्रत प्रकाशन

 # आगमन_वार्ता  #आनंदवार्ताआनंदवार्ता... आगमन वार्ता-=================मनातले अनावर झालेले दुःख जेव्हा शब्दांचे रूप घेते ...
19/03/2025

# आगमन_वार्ता
#आनंदवार्ता

आनंदवार्ता... आगमन वार्ता-
=================

मनातले अनावर झालेले दुःख जेव्हा शब्दांचे रूप घेते तेव्हाच 'तू असता तर...'सारखे पुस्तक जन्माला येते.

लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेला सुनेत्रा विजय जोशी लिखित गझलसंग्रह, 'तू असता तर...' लोकव्रत प्रकाशनाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. या गझलसंग्रहातील सहजसुलभ गझलरचना रसिक वाचकांना खात्रीपूर्वक आवडतील असा विश्वास वाटतो. 'तू असता तर...' या गझलसंग्रहाचे सहर्ष स्वागत!

सुनेत्राजी जोशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

'तू असता तर' हा गझलसंग्रह विकत घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.

lokvrat.in/10128

धन्यवाद!

-लोकव्रत प्रकाशन

प्रकाशनवार्ता:=========पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक संमेलनात लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'शेगावीचा राणा' या ...
03/03/2025

प्रकाशनवार्ता:
=========
पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक संमेलनात लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'शेगावीचा राणा' या विजयाताई ब्राह्मणकरलिखित कादंबरीचे प्रकाशन मा. डाॅ. प्रशांतजी बोकारे, कुलगुरू रा. तु. म. विद्यापीठ, नागपूर, यांच्या हस्ते पार पार पडले. या सोहळ्यास मा. नितीन केळकर, संघटनमंत्री अखिल
भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिनंदन विजयाजी.

पुस्तक विकत घेण्यासाठी लोकव्रत प्रकाशनाच्या वेबसाईटवरील खालील लिंकवर आपली मागणी नोंदवावी. पैसे जमा केल्याचा स्क्रिनशॉट व पत्ता कृपया खालील व्हॉटस् ॲप क्रमांकांवर पाठवावा.

https://lokvrat.in/10126

खालील लिंकवर गेल्यानंतर पुस्तकाच्या माहिती सोबतच आपणास CheckOut चे बटन दिसेल. त्यावर Click करा.

आपल्यासमोर माहितीचा form येईल. त्यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.

Submit button च्या वर लोकव्रत प्रकाशनचा upi id दिलेला आहे. नमूद केलेली रक्कम upi id वर पे करा.

तुम्ही दिलेल्या इमेल id वर तुम्हाला order नोंदविल्याचा मेल येईल.

धन्यवाद.

डॉ. शिरीष कुलकर्णी
+91 93735 60817

माणिक घारपुरे
+91 94201 52944

भैरवी देशपांडे
+91 98901 22036

विजया ब्राह्मणकर
+91 788 828 6072

पुस्तक- शेगावीचा राणा
लेखिका- विजयाताई ब्राह्मणकर
पृष्ठसंख्या- २२२
छापील किंमत- ₹३५०/-

-लोकव्रत प्रकाशन

आनंदवार्ता... आगमन वार्ता-=================लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेला डॉ. मालिनी अंबाडेकर लिखित कवितासंग्रह, 'पल...
22/02/2025

आनंदवार्ता... आगमन वार्ता-
=================

लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलेला डॉ. मालिनी अंबाडेकर लिखित कवितासंग्रह, 'पलाश' लोकव्रत प्रकाशनाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. 'पलाश' या कवितासंग्रहातील विविध विषयांवरील रचना रसिक वाचकांना आवडतील असा विश्वास वाटतो. 'पलाश'चे सहर्ष स्वागत!

डॉ. मालिनी अंबाडेकर यांचे हार्दिक अभिनंदन!

'पलाश' कवितासंग्रह विकत घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.

lokvrat.in/10127

धन्यवाद!

-लोकव्रत प्रकाशन

आज श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन! या दिवसाचं औचित्य साधून लोकव्रत प्रकाशन प्रकाशित करत असलेल्या 'शेगावीचा राणा' या ग्रं...
20/02/2025

आज श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन! या दिवसाचं औचित्य साधून लोकव्रत प्रकाशन प्रकाशित करत असलेल्या 'शेगावीचा राणा' या ग्रंथाच्या लेखिका मा. विजयाजी ब्राह्मणकर यांचे मनोगत आपण जाणून घेऊ या. लोकव्रत प्रकाशनाच्या फेसबूक पेजवर 'रुजू व्हावी सेवा' या कार्यक्रमात आज संध्याकाळी ६ वाजता भेटू या.
धन्यवाद!
-लोकव्रत प्रकाशन
-सा. जनमंगल

Address

Pune
411045

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लोकव्रत प्रकाशन Lokvrat Prakashan:

Share

Category

LOKVRAT GAPPA

EACH SATURDAY AT 5.00 P.M...... JOIN OUR GROUP TO ENJOY BOOKS AND DISCUSSIONS