06/03/2026
#शिवजयंती
#देशमुखआणिकंपनी
#डॉश्रीनिवाससामंत
#नरहरकुरुंदकर
पुस्तक - वेध महामानवाचा
लेखक - डॉ.श्रीनिवास सामंत
किंमत - रु.८००/-
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा एक सेनानी.. एक राज्यकर्ता - एक महामानव या अंगाने शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. सामंत यांनी केला आहे.
रामदासांसारख्या संताला शिवाजीराजांना श्रीमंत योगी म्हणावे वाटले हे राजांचे खरे मोठेपण आहे. शिवाजीराजे हे राज्यसाधना करीत असतानाच एका पातळीवर योगी कसे होते हे सामंत यांनी या ग्रंथात स्पष्ट केले आहे.
------------------------------------------------
पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य
लेखक - नरहर कुरुंदकर
किंमत - १००/-
शिवाजी महाराजांनी केलेली राष्ट्ीय जागृती इतर धर्मीयांसंबंधीचे त्यांचे धोरण आणि त्यांची प्रजेसंबंधीची कर्तव्यभावना यातूनच भूमिपुत्राचा स्वाभिमान जागृत झाला. ते धर्मनिष्ठ होते. हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा होती इतर धर्मीयांना ते भेदभावाने वागवीत नसत.त्यांनी सामान्य मावळा शेतकरी आपल्या राज्याचा आधार मानला. आपल्या नैतिक आचरणाने सामाजिक व्यवहारात आदर्श निर्माण केला. सत्प्रवृत्तीने प्रजेचे हित पाहण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले या सर्व गुणांतच त्यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे रहस्य सामावलेले आहे.
------------------------------------------------
पुस्तक - युगप्रवर्तक छत्रपती
लेखक - नरहर कुरुंदकर
किंमत - ६००/-
नरहर कुरुंदकरांचे काही प्रकाशित- अप्रकाशित, दुर्मिळ साहित्य 'युगप्रवर्तक छत्रपती' या नव्या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित. भारतीय इतिहासातले मध्ययुग हे इस्लामच्या वर्चस्वाचे युग आहे. या आक्रमकांच्या टोळधाडीपुढे इथल्या हिंदू मनाला शतकानुशतके चिघळत वाहणाऱ्या जखमा करणारे अनेक प्रसंग घडले आहेत. तर दुसरीकडे ज्याच्या आधारे ताठ मानेने उभे रहावे, ज्याची रोमहर्ष जयगाथा उल्लासाने घोषित करावी,असे एकच स्थळ या युगात आहे. ते स्थळ म्हणजे 'शिवाजी'. इतिहासातल्या या नवख्या घटनेचे अवलोकन करून त्याचा रहस्यभेद करणारा ग्रंथ म्हणजे 'युगप्रवर्तक छत्रपती'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे जनतेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय. हा अभ्यास करताना शिवचरित्रात जागोजागी जयगाथांची मालिका आहे तसेच काही वादस्थळे आहेत, इतिहास लिखाणाचे प्रवाह आहेत, बलिदानाची सांस्कृतिक प्रेरणा आहे, जनतेची ध्येयवेडी निष्ठा आहे. अशा अनेक विषयांचा परामर्श घेणारे नरहर कुरुंदकरांचे दुर्मिळ लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध करणारा हा ग्रंथ आहे.
तिन्ही पुस्तकांचा संच सवलतीत १२००/- रुपयांत घरपोच मिळवा.
एका पुस्तकावर २५% सवलत अधिक टपाल खर्च.
*सवलत फक्त १५ मार्च २०२६ पर्यंत लागू.
संपर्क -
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६ / ७७९८५०९००७