11/08/2026
"फाळणीनंतर पाकिस्तानने हिरवा राष्ट्रध्वज स्वीकारला, मग भारताने भगवा का नाही? "
१५ ऑगस्टच्या निमित्ताने एका भारतीय हिंदूच्या नात्याने माझ्या मनात आलेले काही प्रश्न…
लहानपणी शाळेत आपण तिरंग्याबद्दल शिकलो—
केशरी म्हणजे त्याग आणि शौर्य,
पांढरा म्हणजे शांतता आणि सत्य,
हिरवा म्हणजे समृद्धी आणि प्रगती,
आणि मधोमध असलेलं अशोकचक्र म्हणजे धर्म आणि गतिशीलतेचं प्रतीक.
शाळेत आपण तिरंग्याच्या रंगांचे अर्थ शिकलो.
पण त्या ध्वजाच्या निर्मितीमागची राजकीय आणि ऐतिहासिक प्रक्रिया आपण किती जाणून घेतली?
आपल्याला फक्त प्रतीकांचा अर्थ शिकवला गेला की त्या प्रतीकांच्या निर्मितीमागचा इतिहासही?
आपण ते मनापासून स्वीकारलं.
तिरंगा पाहिला की अभिमान वाटला.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकताना पाहिला की देशभक्तीची भावना जागी होते.
पण मोठं होत गेल्यावर इतिहास, फाळणी आणि त्या काळातील राजकारण वाचताना मनात काही प्रश्न निर्माण झाले.
१९४७ मध्ये भारताची फाळणी "धर्माच्या" आधारावर झाली.
पाकिस्तानने धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या आपल्या राष्ट्राची ओळख ‘इस्लामी प्रजासत्ताक’ म्हणून स्वीकारली आणि त्याच्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगाला स्थान दिलं. पाकिस्तानने आपल्या धार्मिक ओळखीशी जोडलेली राष्ट्रीय ओळख स्वीकारली
मग धर्माच्या आधारावर फाळणी झालेल्या भारताने आपल्या बहुसंख्य समाजाच्या सांस्कृतिक आणि सभ्यतागत ओळखीचा विचार करून राष्ट्रीय प्रतीकांमध्ये भगव्या रंगाला प्राधान्य का दिलं नाही?
भारताने मुघल साम्राज्य : १५२६ ते १८५७ — सुमारे ३३१ वर्षे.
• ब्रिटिश सत्ता : साधारण १७५७ ते १९४७ — सुमारे १९० वर्षे.
• इतका प्रदीर्घ परकीय सत्तेचा इतिहास आणि संघर्ष, हिंसा सोसल्यानंतरही १९४७ मध्ये स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्ष राष्ट्राची दिशा का स्वीकारली?
• त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाने भारताच्या या इतिहासाकडे दुर्लक्ष का केले?
• आणि मग तिरंगाच का?
• तिरंग्यात पांढरा आणि हिरवा रंग ठेवण्याची नेमकी गरज काय होती?
भगवा हा रंग भारतीय संस्कृतीत त्यागाचा, तपश्चर्येचा, संन्यासाचा, अध्यात्माचा आणि शौर्याचा आहे. ज्या रंगाशी या भूमीचा त्याग, अध्यात्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या संघर्षाच्या आठवणी जोडलेल्या आहेत, त्या भगव्याचा राष्ट्रध्वज म्हणून विचार का झाला नाही?
"आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्मृतींशीही भगवा जोडला जातो." स्वाभिमान, स्वसंरक्षण आणि स्वराज्याची आकांक्षा या भावनांशी तो जोडला गेला.
१९२१ मध्ये "पिंगली वेंकय्यांच्या" प्रारंभिक ध्वजकल्पनेत लाल आणि हिरवा रंग होता. पुढे त्यात पांढरा रंग आणि चरखा जोडण्यात आला.
पिंगली वेंकय्या हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांशी त्यांचा संबंध होता.
१९२१ मध्ये विजयवाडा येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी ध्वजाची रचना गांधीजींसमोर मांडली.
पुढे अनेक बदल होत गेले आणि २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने सध्याचा तिरंगा स्वीकारला.
म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर “भारतीय राष्ट्रध्वजाचे जनक” म्हणून ओळखले जाते.
२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने सध्याचा राष्ट्रध्वज स्वीकारला.
केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी अशोकचक्र.
हा प्रस्ताव जवाहरलाल नेहरूंनी मांडला.
त्या वेळी राष्ट्रीय सत्ता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होती. तेव्हा नेहरूंनी संविधान सभेत राष्ट्रध्वजाच्या रंगांना कोणताही सांप्रदायिक अर्थ नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
मग जर या रंगांचा धर्माशी काही संबंधच नव्हता, तर मग भारतीय राष्ट्रध्वजासाठी भगव्याबरोबर पांढरा आणि हिरवा हेच रंग का जोडावे लागले?
त्या काळातील राष्ट्रीय नेतृत्वाने भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा विचार नेमक्या कोणत्या पद्धतीने केला? त्या काळातील हिंदू-मुस्लिम राजकारणाचा राष्ट्रीय प्रतीकांच्या निर्मितीवर किती प्रभाव होत?
फक्त भगवा स्वीकारण्याची गरज का भासली नाही? हा निर्णय घेण्यापासून त्यांना कोणी अडवलं होतं?
भारताच्या राष्ट्रीय ओळखीला याच तीन रंगांची गरज का पडली?
आणि जर हिरवा समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक होता, तर त्या रंगाची निवड नेमकी कोणत्या विचारातून झाली?
म्हणून "हिरवा फक्त मुस्लिमांना खूश करण्यासाठीच ठेवला असावा" हा ही विचार येतो.
"गांधीजींचा राष्ट्रवाद हा केवळ हिंदू समाजापुरता मर्यादित नसून; तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर सर्व समुदायांना सामावून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर आधारित होता.”
सर्वांना सामावून घेणं योग्यच; पण त्यासाठी बहुसंख्य समाजाच्या सांस्कृतिक मुळांना दुय्यम स्थान देणं आवश्यक होतं का?
भारताची संस्कृती १९४७ मध्ये जन्माला आलेली नाही!
वेद-उपनिषदं, रामायण-महाभारत, भगवद्गीता, बुद्ध-महावीरांची परंपरा, आदि शंकराचार्य, भक्ती-संत परंपरा, नालंदा-तक्षशिला, अजिंठा-वेरूळ, आयुर्वेद, योग, भारतीय गणित आणि खगोलशास्त्र—
हा भारताच्या हजारो वर्षांच्या सभ्यतागत प्रवासाचा वारसा आहे.
मग राष्ट्रीय ओळख घडवताना या वारशाचा विचार न करता
धर्मनिरपेक्ष होण्यासाठी स्वतःच्या संस्कृतीपासून अंतर ठेवणं आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न मनात येतात. तुम्ही कधी या सर्व दृष्टिकोनातून विचार केलाय का.
हे असे प्रश्न व्यक्त केले की लगेच "सांप्रदायिक", "कट्टर", "धर्मांध" अशी लेबलं लावली जातील. पण
माझा तिरंग्याचा अपमान करण्याचा किंचितही उद्देश नाही.
🇮🇳 तिरंगा माझ्या भारताचा अभिमान आहे.
🚩 भगवा माझ्या संस्कृतीचा स्वाभिमान आहे.
आणि स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान प्रत्येकानी बाळगलेच पाहिजे.
जय हिंद 🚩
©️ Source From Social media ⛓️💥